Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

Categories
Breaking News Political social पुणे

Kasba Peth Constituency | कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

Kasba Constituency – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास ३ लाख ८० हजार ५०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे. (Pune Loksabha Election)

फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी १२ वाजता एका इसमाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

00

Keshavrao Jedhe | शहर काँग्रेसला देशभक्त कै. केशवराव जेधेंचा विसर | जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे यांनी केली टीका 

Categories
Breaking News cultural Political social

Keshavrao Jedhe | शहर काँग्रेसला देशभक्त कै. केशवराव जेधेंचा विसर | जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे यांनी केली टीका

 

Keshavrao Jedhe – (The Karbhari News Service) – देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या स्वतंत्र चळवळीत सिंहाचा वाटा होता. काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे या नेत्यांनी बहुजन समाजाला स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणले. ऐतिहासिक काँग्रेस भवन उभारणीसाठी जेधे, गाडगीळ, मोरे यांनी पुढाकार घेतला असे असताना त्यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसने त्यांना अभिवादन सुद्धा केले नाही. अशी टीका जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे (Kanhoji Jedhe) यांनी केली. (Pune Congress)

दरम्यान 21 एप्रिल  रोजी देशभक्त कै. केशवराव जेधे यांची 128 वी जयंतीच्या निमित्ताने जेधे पुतळा स्वारगेट, पुणे येथे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा. रवींद्र धंगेकर मा. आमदार व मंत्री रमेश बागवे मा.आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना अध्यक्ष संजय मोरे, माजी महापौर कमल व्यवहारे, मा.नगरसेवक अविनाश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल खजिनदार अजय पाटील, केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे व सर्व जेधे परिवार उपस्थित होते. मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले.

Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Voting | युवकांनी उत्साहाने लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

 

Loksabha Election Voting – (The Karbhari news Service) – अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीचा संदेश देण्यासाठी रेखाटलेल्या भित्तीपत्रक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. युवकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन यावेळी डॉ.पुलकुंडवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय कला प्रसारिणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे, भारतीय कला प्रसारिणीचे पृथ्वीराज पाठक, प्राचार्य राहूल बळवंत उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशातील नागरिकांना मताधिकार मिळाल्याने मतदानाचा दिवस हा उत्सव साजरा करण्याचा दिवस आहे. प्रत्येक नागरिकाला लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होता यावे व पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. मतदानावेळी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांनीदेखील लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणून साजरा न करता लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करावा. समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद तरुण पिढीमध्ये असून नवमतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.पुलकुंडवार यांनी कलेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला मतदानाचे आवाहन करणारे संदेश दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांच्या मनात निश्चितपणे मतदान करण्याची भावना निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. दिवसे म्हणाले, कला हे प्रभावी माध्यम असल्याने कलेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्रभावीपणे संदेश पोहोचविता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तयार केलली भित्तीपत्रके मतदारजागृतीसाठी उपयुक्त ठरतील. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रांतून मतदानाचा संदेश अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचेल. अन्य माध्यमांचा उपयोग करून ही कलाकृती विविध शासकीय कार्यालयात प्रदर्शित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सजग नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी व्हावे, असे सांगून प्रत्येक पात्र मतदाराने येत्या १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी स्वीप समन्वयक अधिकारी अर्चना तांबे यांनी मतदान जनजागृतीसाठी स्वीप मार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच भारतीय कला प्रसारणीचे श्री. पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी तसेच विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भित्तीपत्रके तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

Categories
Breaking News social पुणे

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

| सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी केली मागणी

Pune Water Issue – (The Karbhari News Service) – निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात (Pune Water Scarcity) सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागास (Department of Water Resources) द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.
वेलणकर यांच्या निवेदनानुसार खडकवासला धरण साखळीत आज रोजी 9.4 TMC पाणी शिल्लक आहे. पुणे शहर दरमहा खडकवासला धरणसाखळीतून 1.6 TMC पाणी वापरते. 31 जुलै पर्यंत पुणे शहरासाठी खडकवासला धरणसाखळीतून 5.25 TMC पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बघता पुढील तीन महिन्यात किमान 1.5 TMC पाण्याचे धरणातून बाष्पीभवन होईल. जून महिन्यात वारीसाठी किमान अर्धा TMC पाणी लागेल.
हे सर्व बघता ३१ जुलैपर्यंत किमान ७.२५ TMC पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. आत्ता शेतीसाठी सुरु असलेले आवर्तन आवरते घेण्याची गरज आहे. कारण परत मे अखेर दौंडसह गावांना पिण्यासाठी दीड TMC चे आवर्तन सोडणे आवश्यक ठरणार आहे. पुणे हे देशातील पहिले शहर आहे की जे महिन्याला अर्धा TMC सांडपाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी पुनर्वापरासाठी सोडते आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी पडेल ही भिती अनाठायी आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
  निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश आपण जलसंपदा विभागास द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे.
–  विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच,  पुणे

PMC Health Department | IHIP-IDSP पोर्टल मुळे साथरोग नियंत्रणात आणण्यात पुणे महापालिकेला मिळतंय यश!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Health Department | IHIP-IDSP पोर्टल मुळे साथरोग नियंत्रणात आणण्यात पुणे महापालिकेला मिळतंय यश!

PMC Health Department – (The Karbhari News Service) – शहरातील साथ रोग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने IHIP-IDSP पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. याचा पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला (Pune Municipal Corporation (PMC) Health Department) चांगला फायदा होताना दिसतोय. कारण पुणे शहरातील साथरोग नियंत्रणात आणण्यात याची मदत होत आहे. अशी माहिती महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ सूर्यकांत देवकर (Dr Suryakant Devkar PMC) यांनी दिली. (Pune PMC News)
याबाबत डॉ देवकर यांनी सांगितले कि, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनुसार पुणे मनपाच्या आरोग्य विभागाकडून कार्यरत दवाखाने/ रुग्णालये व खाजगी रुग्णालामार्फत केंद्र शासनाचे IHIP IDSP पोर्टल वरती दररोज साथरोग संशयित रुग्णाची माहिती नोंदविली जाते. पोर्टलवर नोंदविलेले माहिती प्रमाणे संशयित तसेच पॉजिटीव्ह रुग्णांच्या नोंदी संपूर्ण माहितीसह एकत्र करण्यात येतात. ही माहिती वॉर्ड निहाय सर्व्हेक्षण करिता पुणे म. न. पा. च्या १५ क्षेत्रिय कार्यालयानिहाय करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने कोविड – १९, इन्फ्लुएंझा – H1N1, H3N2, जलजन्य (Water Borne Diseases) इत्यादि रुग्णांची प्रतिबंध करण्यासाठी सर्व्हेक्षण करून वेळेत साथ रोग नियंत्रण करण्यात येत आहे.

साथ रोग विभागाकडून राबवण्यात येत असलेले विविध उपक्रम

NRCP – Rabies Control Programme :-

पुणे म. न. पा. स्तरावर साथरोग विभाग आणि पशु संवर्धन विभाग यांचे संयुक्तिपणे NRCP ( National Rabies Control Programme ) अंतर्गत रेबिज नियंत्रण व प्रतिबंधक लसीचा साठा पुरेसा उपलब्ध ठेवण्यात येतो.

3) NPCCHH – National Program for Climate Change and Human Health :

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनुसार पुणे मनपाच्या स्तरावर उष्मा हवामानाच्या पार्श्वभूमीवर दर वर्षी HRI ( Heat Related Illness) मार्च ते जुलै अखेरपर्यंत पुणे म. न. पा. दवाखाने / रुग्णालय मार्फत सर्वेक्षण व आवश्यक तयारी करण्यात येत आहे.

Metropolitan Surveillance Unit (MSU ) :

साथ रोगाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने शहरांमधील सर्वेक्षण यंत्रणा सक्षम करणे करिता मेट्रोपोलिटन सर्व्हलन्स युनिट उभे करणे करिता महाराष्ट्रातील चार शहरांची निवड केलेल्यांपैकी पुणे
शहर अग्रस्थानी आहे. सदर मेट्रोपोलिटीन सर्व्हलन्स युनिट अंतर्गत शहरा करिता विविध प्रकारच्या साथ रोगांसाठी आवश्यक असणारी अद्यावत लॅब उपलब्ध होणार असून विविध प्रकारच्या साथ रोगांवर तातडीने उपाययोजना व कारवाई करणे व तसेच साथ रोगांबाबत भविष्यात होणाऱ्या घटनांचा सविस्तर अभ्यास करणे शक्य होणार आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिका अंतर्गत बाणेर स.नं १०९ मध्ये जुने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल मधील सहाव्या मजल्यावर ६००० स्क्वेर फीट जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पुणे म.न.पा स्तरावर मेट्रोपोलिटीन सर्व्हलन्स युनिट स्थापन करण्याकरिता प्रशासकीय
कामकाज चालू आहे.
पोर्टल  – ihip अर्थात integrated health information platform  महापालिका आरोग्य विभागसाठी फायदेशीर ठरत आहे.  त्यासाठी साथरोग विभागाने 4 लोकांची टीम ठेवली आहे. खाजगी आणि महापालिकेच्या दवाखान्यातून सर्व पेशंटची माहिती या पोर्टलवर घेतली जाते. संबंधित टीम ही माहिती दररोज चेक करतात.  त्यानुसार आसपासच्या परिसरात सर्वे केला जातो. त्यानुसार आसपासच्या परिसरात औषध फवारणी आणि तत्सम कार्यवाही केली जाते.  पोर्टल मुळे ही कार्यवाही करता येते. त्यामुळे साथ रोगाला प्रतिबंध करतो आहोत.
डॉ सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी. 

MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Sanjay Jagtap | समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्याना नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची आमदार संजय जगताप यांची मागणी

MLA Sanjay Jagtap – (The Karbhari News Service) – पुरंदर हवेली मतदारसंघाच्या (Purandar Haveli Constituency) कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिका हद्दीतील (PMC Pune Limits) समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Water Issue)

आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानुसार  माझ्या कार्यक्षेत्रातील पुणे महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या, पिसोळी, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवालेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, येवलेवाडी, गुजर- निंबाळकरवाडी, जांभुळवाडी व कोळेवाडी, उंड्री, भेकराईनगर, उरूळीदेवाची, फुरसुंगी, आंबेगाव आंबेगाव बु. खुर्द या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने येथील वाड्यावस्त्या, सोसायट्या, गावठाणांचा समावेश झाल्यापासून आजपर्यंत पिण्याच्या पाण्यासह मुलभुत सोयीसुविधांपासून वंचित आहेत.

जगताप यांनी पुढे म्हटले आहे कि मागील वर्षी मान्सुनपुर्व व जुन ते सप्टेंबर २०२३ कालावधीत पर्जन्यात तूट निर्माण झाल्याने तसेच वातावरणीय बदलामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. या परिसराला पाणी पुरवठा करणारे टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसराकरीता येणाऱ्या पाण्याच्या टँकरची संख्या अथवा फेऱ्या वाढवून याठिकाणी नियमित पाणी पुरवठ्याकरीता योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या बाबींचा सहानुभुतीपुर्वक विचार करून समाविष्ट गावातील वाड्यावस्त्या, सोसायट्या व गावठाणे यांना तात्काळ नियमित टॅकरने पाणीपुरवठा करावा. अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.

Pune And Khadki Cantonment Board in PMC – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेत होणार हस्तांतरित!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune And Khadki Cantonment Board in PMC – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड मधील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेत होणार हस्तांतरित!

| पुणे महापालिकेने सुरु केली प्रक्रिया

Pune and Khadki Cantonment Board in PMC limit- (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्यातील पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Pune Cantonment board and Khadaki Cantonment board) पुणे महापालिकेत (PMC) विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लष्कराच्या संस्था आणि केंद्रीय संस्था वगळून कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशी भाग पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात येणार आहे. दरम्यान या दोन्ही बोर्डातील आस्थापना आणि मनुष्यबळ पुणे महापालिकेकडे हस्तांतरित केले जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया पुणे महापालिकेने सुरु केली आहे. उपायुक्त महेश पाटील (Mahesh Patil PMC) यांनी याबाबतचे आदेश महापालिकेच्या सर्व विभागांना दिले आहेत.

देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून लष्कराच्या 62 छावण्या म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. आता ही कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून त्यातील नागरी वस्तीचा समावेश महापालिकांमध्ये करण्याचा तर लष्कराच्या ताब्यातील भाग एक्स्क्लुजिव्ह मिलिटरी स्टेशन्स म्हणून लष्कराच्या ताब्यात ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठीची प्रक्रिया केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांकडून सुरू करण्यात आली आहे. यामुळे लष्कराच्या ताब्यातील लाखो हेक्टर जागा महापालिकेच्या ताब्यात जाऊन विकासासाठी खुली होणार आहे. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा बदल सुचवला आहे. (PMC Pune Cantonment board)

दरम्यान केंद्र शासन अर्थात  संरक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार कटक मंडळातील सिविल एरिया संलग्न स्थानिक स्वराज्य संस्थाना हस्तांतरित करणेबाबत 4 मार्च रोजी  सह सचिव, संरक्षण
मंत्रालय, भारत सरकार यांच्या सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी कॅन्टोनमेंट
बोर्ड व. महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संयुक्त बैठक घेण्यात
आली होती.  या बैठकीत संरक्षण विभागाने खडकी/पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांची सर्व माहिती पुणे महानगरपालिकेस देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांनी 13 मार्च l रोजी पुणे सब एरीया येथे संयुक्त बैठक आयोजित करून प्रेझेन्टेशन दाखविण्यात आले.

 प्रेझेन्टेशन प्रमाणे संरक्षण विभागाच्या अधिसुचनेसुसार कटक मंडळातील सिविल एरिया संलग्न स्थानिक स्वराज्य संस्थाना अस्थापना / मनुष्य बळ हस्तांतरित करणेसाठी विविध विभागांचे समन्वय आवश्यक आहे.  पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांचे प्रेझेंटेशन प्रमाणे महापालिकेच्या विविध विभागाकडे हस्तांतरित होणाऱ्या आस्थापना / मनुष्य बळ यांचे संबंधिताकडून मेळ घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्याशी समन्वय साधून आपल्या विभागाकडे हस्तांतरित होणारी संसाधने, आस्थापना / मनुष्यबळ यांची माहिती व त्याबाबत आपल्या विभागाचे मुद्दे इ.बाबींची माहिती तयार ठेवावी. आवश्यकते प्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करावी. असे आदेश उपायुक्त महेश पाटील यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रातील  कॅन्टोन्मेंट बोर्ड

महाराष्ट्रात पुणे, खडकी, देहू रोड, औरंगाबाद, अहमदनगर, देवळाली (नाशिक) आणि नागपूर अशी सात कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. ही सातही कॅन्टोन्मेंट बोर्ड स्थानिक महापालिकांच्या हद्दीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. (Cantonment board)

62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि लाखो हेक्टर जागा
देशातील वेगवगेळ्या राज्यांमध्ये 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. या कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या ताब्यात एक लाख साठ हजार एकर जागा आहे. 50 लाखाहून अधिक लोकसंख्या या कॅन्टोन्मेंट बोर्डांमध्ये राहते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील खाजगी मालमत्ता देखील लष्कराच्या ताब्यात आहे. लष्कराकडून मूळ मालकांशी दर काही वर्षांनी त्यासाठी भाडेकरार देखील केला जातो. लष्करी कार्यालयांच्या सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्टोन्मेंट हद्दीत विकास कामे आणि बांधकामासाठीच्या एफएसआयला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. (Pune News)

Pune PMC Disaster Management | आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिका तयार करणार SOP | 2 हजार कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune PMC Disaster Management | आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिका तयार करणार SOP | 2 हजार कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

Pune PMC Disaster Management – (The Karbhari News Service) – मान्सून (Monsoon) काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या काळात आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग (PMC Disaster Management Department) सज्ज झाला आहे. विभागाकडून SOP तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शिवाय विभागाने महापालिकेच्या 2 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना आपत्ती विषयक प्रशिक्षण देखील दिले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Ganesh Sonune PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC)

| जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोबत बैठका सुरु

सोनुने यांनी सांगितले कि, पुणे शहरात पावसाळ्यात पूर परिस्थिती उद्भवते. कारण शहराच्या मध्यातून मुळा आणि मुठा नद्या वाहतात. तसेच शहरा पासून जवळच खडकवासला प्रकल्पातील धरणांची साखळी आहे. त्यामुळे पावसाळा सुरु झाल्याबरोबर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असते. त्यानुसार महापालिका या कामासाठी सज्ज झाली आहे. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोबत देखील महापालिकेच्या बैठका सुरु आहेत. त्यात जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या होत्या कि, शहरातील सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. त्यानुसार महापालिका सर्व विभागांशी समन्वय ठेऊन आहे.

| पुणे मेट्रोला महापालिकेकडून सूचना

  दरम्यान पुणे मेट्रो कडून शहरात विविध ठिकाणी कामे चालू आहेत. ही कामे काही ठिकाणी नदी पात्रात सुरु आहेत. तर काही ठिकाणी मेट्रोचे पिलर पाण्याचा निचरा होण्यासाठी अडथळा ठरतात. याबाबत सोनुने यांनी सांगितले कि, मेट्रो च्या अधिकाऱ्या सोबत बैठक घेऊन आम्ही त्यांना या गोष्टींची सूचना देत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मेट्रो ने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

डिसेंबर ते मार्च कालावधीत 2000 कर्मचाऱ्याना प्रशिक्षण

गणेश सोनुने यांनी सांगितले कि, पुणे शहरात तीन प्रकाराच्या आपत्ती प्रामुख्याने भेडसावतात. यामध्ये पूर, रस्ते अपघात आणि आग यांचा समवेश आहे. त्यामुळे या समस्यांचे निवारण करण्याबाबत महापालिकेच्या 2 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना डिसेंबर ते मार्च या कालावधीत आपत्ती विषयक प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात नागरी सुरक्षा दलाने सहकार्य केले. यात प्रामुख्याने शहरात आपत्ती आली तर तिचे निवारण कसे करावे, सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन कसे हाताळावे, आपत्ती आल्यावर काय करावे आणि काय करू नये, सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण कसे करावे, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

| SOP चे काम अंतिम टप्प्यात

गणेश सोनुने यांनी पुढे सांगितले कि, आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्व सूचना लक्षात घेऊन एक मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure (SOP) तयार करण्याचे काम सुरु आहे. Sop तयार झाल्यांनतर संबंधित सर्व विभाग महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना ही नियमावली देण्यात येईल. त्यानुसार अंमल करण्याच्या सूचना दिल्या जातील.

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

 

Sharad Pawar – (The karbhari News Service) – आज ज्यांच्या हातात सत्ता आहेत्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे प्रश्नमहागाईबेरोजगारीमहिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तरूणांना दरवर्षी नोकरीराजगारांचे आश्वासन देऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे   जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहेअसा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

    जिल्हाधिकारी कार्यालयापासून  भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल शांताई येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभास्थळी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

 

यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर सुषमा अंधारे आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापआमदार संग्राम थोपटेसंजय जगतापरोहित पवारमाजी आमदार उल्हासदादा पवारदीप्ती चवधरीजयदेव डोळे ,अशोक पवारमाजी उपमहापौर अंकुश काकडेरोहिणी खडसे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर उपस्थितीत होते.

 

       काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर इंडिया आघाडीचा विजय असोअशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

     शरद पवार म्हणालेपंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये होते. मोदी म्हणालेपन्नास दिवसांत पेट्रोलचे दर कमी  करतो. आज 3 हजार 650 दिवस झालेआज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरूणांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होतेउलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा अन तो फिरवायचा. त्यामुळे जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहे. मोदींनी जनतेची वेळोवळी फसवणूक केली आहे. आता त्यांना सत्ते पासून जनताच दूर करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

 

      जयंत पाटील म्हणालेमहाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार स्वाभिमानी आहेत. या उमेदवारांना मतदार संसदेत पाठवणार आहेत. भाजप- महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही.  दिलेला उमेदवार त्यांना बदलावा लागत  असून  आपल्याला जनता आता स्वीकारणार नाहीहे त्यांना कळून चुकले आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. धंगेकर यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे.

 

    मोहन जोशी म्हणालेयंदा पुण्याचा खासदार काँग्रेसचाच होणार. धंगेकर यांना तळागाळातून पाठींबा आहे.

 सुषमा अंधारे म्हणल्यामोदीं सरकारची गॅरंटी ही जाहिराती पुरती आहे. जाहिरात वाईट गोष्टींची होते. जसे की रमी पें आवो ना महाराज. आदर्श घोटाळा70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या लोकांची मोदीं सरकारने  गॅरंटी घेतली आहे. पुण्याचा उडता पंजाब सारखी परिस्थिती सरकारे केली आहे. यावर ते बोलत नाही. रविंद्र  धंगेकर यांनी यावर आवाज उठवला. पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी धंगेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

   सचिन अहिर म्हणालेही लढाई पक्षापुरती नसून हुकूमशाही विरोधात आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना जनता घरी बसवणार आहे.

 

रविंद्र धंगेकर म्हणालेआमची स्वाभिमानाची लढाई आहे. इतिहास सामान्य माणसांचा लिहिला जातो. पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. पुण्यात 10 वर्षात काम केले असा प्रश मी विरोधकांना विचारला असतात्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला.  जनता हुशार आहे आता फसवणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. जनता मला निवडून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

अमोल कोल्हे म्हणालेआत्ता फक्त ट्रेलर दाखवतोपिक्चर दाखवायला आपल्याकडेडं खुप वेळ आहे.

 

देशातल्या जनतेचं ठरलंयबळकट पंजाने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन विजयाची तुतारी फुंकायची.

 

  आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबापाहिजे तेवढा निधी देतो. हा पैसा  काय ह्यांच्या खिशातला आहे काअहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का?

   कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिलीनंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारलीउशीर झाला तर दंड ही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन निवडणुकीसाठी पैसा वापरला जातोय.

  सुप्रिया सुळे म्हणाल्यामाझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर   खूप टीका होत आहे. घटस्फोट होऊन सहा महिने झालेअठरा वर्षे आमच्यासोबत संसार करणारे आता वैयक्तिक टीका करतायेत. मात्र ही निवडणूक आता जनतेच्या हातात गेली आहे.

 

विश्वजित कदम म्हणालेसध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा त्यांनी फासला आहे. आता जनता त्यांना काळीमा फासणार आहे.

 

बाळासाहेब थोरात म्हणलेही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा धंगेकर आहेत. जनतेतू त्यांची मागणी झाली होतीत्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री मविआचा व्हायला हवाहे ध्येय बाळगून काम कराअसे आवाहन यावेळी केले.

 

पृथ्वीराज चव्हाण म्हणालेमोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहेअसे म्हणतात. मात्रमनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होतीतशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली. मोदी फक्त गोलगोल फिरवतात   विकासाची व्याख्या मात्र सांगत नाहीत. मोदी फक्त प्रत्येक ठिकाणी आपला फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहेआपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जाईल.

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे म्हणाले की, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणी सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुण्यासारखे महत्वाचे शहर काँग्रेस पक्षाने विकासित केले मात्र गेल्या १० वर्षात भाजपाने पुण्याला १० वर्ष मागे नेले.

 

 

Mahavikas Aghadi Nomination | महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर, सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांचे अर्ज दाखल

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Nomination | महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरसुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांचे अर्ज दाखल

 

Pune Baramati Shirur Loksabha Election – (The karbhari News Service) –    महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे शहर व जिल्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (पुणे)सुप्रियाताई सुळे (बारामती) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

या वेळी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिरउपनेत्या सुषमा अंधारे,आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीआमदार रोहित पवारसंजय जगतापसंग्राम थोपटेमाजी आमदार रमेश बागवेदीप्ती चवधरीजयदेव डोळेउल्हासदादा पवारसंजय बालगुडेअंकुश काकडेपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकरसंभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव यावेळी उपस्थितीत होते.

 

       काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करणयात आला. यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

     गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्रित आले होते. सकाळी पावणे अकराच्या सुमारास

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर)  आणि  सुप्रियाताई सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून  वंदन केले.  रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सुप्रियाताई सुळे (बारामती) यांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल केला.

 

   महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, माजी खासदार एड वंदना चव्हाण, पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी आणि माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी  उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सह्या केल्या.