Shivsena Pune | शिवसेनेकडून पुण्यातील पाण्याखालील परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

Categories
Breaking News Political social पुणे

Shivsena Pune | शिवसेनेकडून पुण्यातील पाण्याखालील परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू

 

Pune News – (The Karbhari News Service) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या आदेशान्वये पुणे शहरातील सिंहगड रोडवरील एकता नगरी,निंबजनगर, विठ्ठल नगर, जलपूजन अपार्टमेंट तसेच पुलाची वाडी, पाटील इस्टेट विश्रांतवाडी,वारजे,दत्तवाडी, दांडेकर पूल,कोरेगाव पार्क, बोपोडी,येरवडा या परिसरात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी युद्ध पातळीवर मोहिम राबविण्यात आली असून 200 स्वयंसेवकांच्या टीम कडून पाण्याखालील परिसरातील गाळ उपसून काढण्यात सुरुवात करण्यात आली आहे. शिवसेना पुणे शहराचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे स्वतः घटनास्थळी पोहोचत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार, ‘शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे’ यांनी आवश्यक ती पाऊले उचलत, पुणे शहरातील सिंहगड रोड, संचेती पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलाचीवाडी आदी भागात मनपाच्या सफाई कामगारांना सोबत घेवून, आपण स्वत: तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खासगी कंपनीच्या मदतीने अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने परिसरातील चिखल उपसायला सुरवात केली आहे व आवश्यक ती मदत देखील तेथील नागरिकांना पुरवण्यात येत आहे.
पुणेकरांना मदत करण्याससाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्वतंत्र मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. पुणे शिवसेनेमार्फत शिवाजीनगर परिसरातील पूरग्रस्त नागरिकांसाठी शिवाजीनगर मतदारसंघातील पी. एम. सी. कॉलनी वाकडेवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, वाकडेवाडीतील न. ता. वाडी शाळा, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनमागील खाशाबा जाधव शाळा, आणि संगमवाडी येथील मेजर राणे शाळा या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आलेली आहे.

शिवसेनेमार्फत अतिमुसळधार पावसामुळे व पुरामुळे शहरातील विविध ठिकाणी नागरिक अडकले असता त्यांना तातडीने सुरक्षितरित्या हलविण्यात आले व यावेळी नागरिकांना झालेल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय मदत पुण्यातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आली आहे. तसेच पुरानंतर उद्भवू शकणाऱ्या संभाव्य साथ रोगाच्या शक्यतेमुळे नागरिकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून देण्यात येणार आहे. तसेच
पुरामुळे नागरिकांचे झालेले नुकसान विचारात घेवून, शिवसेना पुणेतर्फे संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात येणार आहे.
पुरामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्त नागरिकांना स्वत:च्या घराची स्वच्छता करण्यासाठी मदत करण्यासह परिसरातील चिखल काढून परीसराची स्वच्छता करण्यासाठी, शहराध्यक्ष प्रमोदनाना भानगिरे, रमेश बापू कोंडे, निलेश गिरमे व शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख,उपविभागप्रमुख, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Chandrakant Patil | पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करू -चंद्रकांतदादा पाटील | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Chandrakant Patil | पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तात्काळ मदत करू -चंद्रकांतदादा पाटील

| उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

 

 

Pune News – (The Karbhari News Service) –  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एरंडवणे येथील पूरग्रस्त भागाला भेट देवून येथील नागरिकांशी संवाद साधला. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आवश्यक सर्व मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे महानगरपालिका उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय नायकल, डॉ. संदीप बुटाला, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी रजपूत विटभट्टी, कोथरूड येथील शाहू वसाहत, एरंडवणे येथील प्रतिज्ञा मंगल कार्यालय आणि कर्वे नगर येथील स्पेन्सर चौक भागाला भेट दिली. पूराचे पाणी शिरलेल्या घरांची पाहणी करून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुण्यात बुधवारी मध्यरात्रीपासून झालेला पाऊस हा असाधारण होता. मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोथरुडमधील पूरग्रस्त नागरिकांना जेवण- नाश्त्याची सर्व व्यवस्था करण्यात आली, तसेच रात्री ब्लँकेटदेखील देण्यात आले. पुरामुळे घरांच्या झालेल्या नुकसानाची माहिती घेवून प्रशासनाच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून मदत केली जाईल, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.

वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश श्री.पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Pune Irrigation Department | खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यावरून टीका झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने दिला खुलासा!

 

Khadakwasla Dam – (The Karbhari News Service) – पुणे शहरात महापूर सारखी परिस्थिती निर्माण होण्यास पाटबंधारे विभाग कारणीभूत आहे. नागरिकांना न कळवता पाटबंधारे विभागाने जास्त पाण्याचा विसर्ग केला आणि पूरस्थिती उद्भवली. असा आरोप खासदार मुरलीधर मोहोळ आणि बऱ्याच राजकीय नेत्यांनी केला. यावर पाटबंधारे विभागाने आपला खुलासा सादर केला आहे. (Pune Rain News)

खडकवासला समुहातील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला धरणाच्यावरील भागात २५ जुलै २०२४ रोजी पहाटे २ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत अतिवृष्टी झाली. या २४ तासांत ११८ ते ४५३.५ मी.मी. इतकी अचानक अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे खडकवासला धरण ते पुणे शहर या भागामध्ये १०८ ते १६७.५ मी.मी. इतका पाऊस झाला व तो विक्रमी स्वरुपाचा होता. त्यामुळे खडकवासला धरणातील मोठ्या प्रमाणातील येवा तसेच शहरातील नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. या अचानक आलेल्या पाऊसामुळे धरणातील विसर्ग सोडणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करुन नदीत पाणी सोडण्यात आले होते.

जलसंपदा विभागाने या संदर्भात सतत संनियंत्रण करुन पाणी सोडण्याची पुर्वसूचना २२ जुलै २०२४ पासून पुणे महानगरपालिका नियंत्रण कक्ष व जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना देण्यात आली होती. जलसंपदा विभाग महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय राखण्यात आलेला आहे, असेही खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे पाटबंधारे मंडळ पुणे यांनी कळविले आहे.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाचे आवाहन

खडकवासला धरण क्षेत्रात पुन्हा पावसाचे प्रमाण वाढल्यास परिस्थितीनुसार धरणातून विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरीकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

पुणे शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन व त्यांची गैरसोय होऊ नये याकरीता जलसंपदा विभागाचे अधिकारी सतर्क आहेत. खडकवासला पाटबंधारे विभाग जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांच्या संपर्कात असून वेळोवेळी धरणातील पाण्याच्या विसर्गाची माहिती अवगत करीत आहे.

 

Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश

Categories
Breaking News Education social पुणे

Pune School Closed | पुणे शहर आणि परिसरातील शाळांना उद्या देखील सुट्टी | जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी जारी केले आदेश

Pune School Closed- (The Karbhari News Service) – भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २५ जुलै व २६ जुलै २०२४ रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार आज (२५ जुलै) शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्याचप्रमाणे उद्या (२६ जुलै) देखील पुणे शहर आणि परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Dr Suhas Diwase IAS)

जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील
शाळा २६ जुलै २०२४ रोजी बंद ठेवणे आवश्यक आहे. तसेच खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग
सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. (Pune News)

या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ जुलै २०१४ रोजी सुट्टी जाहिर करीत आहे. असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती
व्यवस्थापनाचे कामकाज करावे. असेही आदेशात म्हटले आहे.

 

Prashant Jagtap on Pune Rain | पूर परिस्थितीला पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभाग जबाबदार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Prashant Jagtap on Pune Rain | पूर परिस्थितीला पुणे महानगरपालिका व पाटबंधारे विभाग जबाबदार | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – काल रात्रीच्या पावसामुळे सिंहगड रोड ते पुलाची वाडी संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. अनेक सोसायट्यांची पार्किंग, नागरिकांच्या गाड्या पाण्याखाली गेल्याच परंतु इमारतींच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. हजारो नागरिकांच्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व मराठी माणसांच्या नुकसानीला पुणे महानगरपालिका, पाटबंधारे विभाग, पुणे जिल्हाधिकारी व भारतीय जनता पार्टीने पुणे शहराची लावलेली विल्हेवाट जबाबदार आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला. (Pune Rain News)

पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदीपात्राची रुंदी कमी करून नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यात आला. यामुळे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे. आज झालेल्या प्रलायाची संपूर्ण जबाबदारी स्वतःला पुणे शहराचे शिल्पकार म्हणवून घेणारे देवेंद्र फडणवीस व त्यांना मुकाट्याने साथ देणारे मुरलीधर मोहोळ यांची आहे.

संपूर्ण रात्र मुसळधार पाऊस सुरू असताना, प्रचंड प्रमाणात धरणातून विसर्ग केला जात असताना पुणे जिल्हाधिकारी  सुहास दिवसे व महानगरपालिका आयुक्त  राजेंद्र भोसले काय करत होते, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपस्थित केला. पाण्याची पातळी वाढत असताना सायारन वाजवून, भोंग्याद्वारे सूचना देऊन नागरिकांना सतर्क करणे मी महानगरपालिकेची जबाबदारी होती. असे असतानाही महानगरपालिका आयुक्त सकाळी ७ वाजेपर्यंत निष्क्रीय होते, म्हणून त्यांची राज्य शासनाने तातडीने बदली करावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे शहराच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे याचं उत्तर पुणेकरांना द्यावं अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

पुराने बाधीत भागात त्वरित पंचनामे करून नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुणे शहरात पावसाळापूर्वी कोणकोणती कामे पूर्ण करण्यात आली, कोणती कामे शिल्लक राहिली ? का शिल्लक राहिली ? सर्व कामे पूर्ण झाली असा जर महानगरपालिकेचा दावा असेल तर पूर परिस्थिती का निर्माण झाली ? या प्रश्नांची उत्तर पुणे महानगरपालिका आयुक्तांनी द्यावीत अशी मागणी प्रशांत जगताप यांनी केली.

यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता संबंधित खात्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश व्हावेत तथा ज्यांचे नुकसान झाले आहे त्या नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह किशोर कांबळे, शेखर धावडे, गणेश नलावडे, स्वातीताई चिटणीस, अप्पा जाधव, किरण गाडेकर आदि उपस्थित होते.

Pune BJP | Pune Rain | पूरस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पुणे शहर भाजपचे तातडीचे मदत केंद्र आणि हेल्पलाइन | तीन हजार कार्यकर्ते मदतीसाठी ऑनफिल्ड | शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

Categories
Breaking News Political social पुणे

Pune BJP | Pune Rain | पूरस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पुणे शहर भाजपचे तातडीचे मदत केंद्र आणि हेल्पलाइन

| तीन हजार कार्यकर्ते मदतीसाठी ऑनफिल्ड

| शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

 

Pune Rain – (The Karbhari News Service) – अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीत पुणेकरांना मदत करण्यासाठी पुणे शहर भाजपच्या कार्यालयासह शहरातील सर्व खासदार आणि आमदारांची कार्यालये पुढील आठ दिवस मदत केंद्र म्हणून 24 तास खुली राहातील अशी माहिती भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. (Pune Rain News)

शहर कार्यालयाशी नागरिकांना मदतीसाठी 9066515656 किंवा 9928814646 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही घाटे यांनी केले आहे. पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने तातडीने ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, सर्व आमदार, माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते.

घाटे म्हणाले, आज पहाटेपासून संपूर्ण शहरात भाजपचे तीन हजार कार्यकर्ते ऑनफिल्ड असून पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम करत आहेत. पूराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी हलवणे, आवश्यकतेनुसार प्रथमोपचार, निवास, चहा, न्याहारी, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पूरस्थितीवरून विरोधकांनी राजकारण सुरू केले आहे. परंतु ही राजकारण करण्याची वेळ नाही आम्ही सर्व लक्ष नागरिकांना मदत करण्यावर केंद्रीत केले आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, संसदेच्या अधिवेशनामुळे दिल्लीत आहे. आज पहाटेपासून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. धरणातून साधारण 40 हजार क्यूसेक्स पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती निर्माण होते. परंतु इतके पाणी सकाळी सोडणार याची पूर्वकल्पना प्रशासनाने नागरिकांना देणे गरजेचे होते. नालेसफाईची कामे नीट झालेली नाहीत. आमचे सर्व कार्यकर्ते सकाळपासून प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत कार्य करीत आहेत.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचत असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सुचना देत आहेत. मी स्वतंः सर्व परिस्थितीचा आढावा घेत असून, भाजपच्या कार्यकर्त्यांना जे जे मदत कार्य करणे शक्य आहे ते ते करण्याच्या सुचना दिल्या आहेत. सुरक्षित स्थळी नागरिकांना हलविणे, औषधे, धान्य, चहा, नाष्टा, भोजन, पिण्याच्या पाण्याचे टँकर, कपडे, पत्रे, ताडपत्री, निवास व्यवस्था अशी मदत केली जात आहे. शासन पातळीवर सर्व निर्णय तातडीने घेतले जातील आणि सर्वोतोपरी मदत केली जाईल.

National Commission for Safai Karmchari  | क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करा, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करा | राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांच्या सूचना 

Categories
Breaking News PMC social पुणे

National Commission for Safai Karmchari  | क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करा, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करा | राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांच्या सूचना

PMC Sanitation Workers – (The Karbhari News Service) – क्षेत्रिय कार्यालय (PMC Ward Office) स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करा, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करा. अशा सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे (National Commission for Safai Karmchari) अध्यक्ष एम व्यंकटेशन (M Vyankteshan) यांनी पुणे महापालिका प्रशासनाला केल्या आहेत. (Rashtriya Safai Karmchari Ayog)

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष  एम. व्यंकटेशन केंद्रीय राज्यमंत्री दर्जा यांचा पुणे शहर दौरा आयोजित करण्यात आला असून त्या अनुषंगाने दिनांक २४ रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत पुणे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत सर्व सफाई कर्मचारी यांचे मासिक वेतन, पेन्शन/ग्रॅज्युटी/पी.एफ., सफाई कर्मचा-यांना मंजूर असलेल्या सुट्ट्या, सफाई कर्मचा- यांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना, सी. एस. आर. स्किम्स, वारसांबाबतचे विविध प्रश्न, सेवकांची आरोग्य तपासणी, वेतनाबाबतच्या समस्या, ग्रेड पे बाबतच्या समस्या, घराबाबतच्या
समस्या तसेच अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
अध्यक्ष यांनी सफाई कर्मचा-यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर आरोग्य कोठीच्या ठिकाणी चेंजिंग रूमची सुविधा करावी, सफाई सेवकांना वेळेवर पगार आदा करावा. तसेच ESI, PF भरला जात असलेबाबत खातरजमा करावी अशा सुचना अध्यक्ष यांनी दिल्या.
तसेच Manual Scavengers and Their Rehabilitation Act, 2013 बाबत देखील चर्चा होऊन पुणे महानगरपालीकेच्या परिक्षेत्रामध्ये मानवी मलमूत्र स्वच्छतेचे काम हाताने किंवा डोक्यावर नेण्याचे काम केले जात नसल्याचे सांगण्यात आले.
बैठकीसाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष  एम. व्यंकटेशन,  केंद्रीय राज्यमंत्री दर्जा, पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), संदिप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, प्रतिभा पाटील, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, डॉ. कल्पना बळीवंत, प्र. आरोग्य अधिकारी, नितीन केंजळे, कामगार कल्याण अधिकारी, उपायुक्त, परिमंडळ १ ते ५ व इतर विभागांचे खातेप्रमुख व अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी इ. उपस्थित होते.

Union Budget 2024 | केंद्रीय अर्थसंकल्पा बाबत संमिश्र प्रतिक्रिया | सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश पुणे

Union Budget 2024 | केंद्रीय अर्थसंकल्पा बाबत संमिश्र प्रतिक्रिया | सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या

 

‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

 

कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतानाच युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि ‘विकसित भारत’ संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

शेतकऱ्यांना बळ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गरीब, महिला, युवा, शेतकरी या घटकांवर भर देतानाच कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद तसेच शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्याचा निर्णय हा कृषी क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. त्याचबरोबर एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य शासनाने देखील महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी पावले उचलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नविन कररचना ही सामान्यांना, नोकरदारांना दिलासा देणारी असून त्याचे मी स्वागतच करतो. या नव्या कररचनेमुळे करदात्यांची संख्याही वाढेल. यातून विकासाला आवश्यक असणारे करसंकलनातही महाराष्ट्रात अग्रेसर राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागाचा कायापालट

या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा या नऊ घटकांचा प्रामुख्याने विचार करण्यात आल्याने सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याचे सांगत ग्रामीण भारताच्या विकासासाठी केलेली २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद खेड्यांचा कायापालट करणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

५० लाख अतिरिक्त रोजगार

आपला देश युवांचा आहे असे नेहमी म्हटले जाते. त्याचे प्रतिबिंब आजच्या अर्थसंकल्पात पहायला मिळाले असून युवा वर्गासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना एक महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात देण्याचा निर्णय हा युवांसाठी दिलासा देणारा आहे. ५० लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा देखील निर्धार अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील युवकांनाही रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे.

देशातील ५०० अग्रणी कंपन्यांमध्ये युवकांना इंटर्नशिप संधी मिळणार असून पाच वर्षांत सुमारे एक कोटी तरुणांना याचा फायदा होणार आहे. कौशल्य विकासासाठी जाहिर केलेल्या नवीन योजनेद्वारे राज्य सरकार व उद्योगविश्व यांच्या संयुक्त विद्यमातून ५ वर्षांच्या काळात २० लाख युवकांना कौशल्यविकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुद्रा योजनेतून दुप्पट कर्ज देण्याचा निर्णयही युवांना सक्षम करणारा आहे.

पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी देखील भरीव तरतूद करण्यात आला आहे. देशात पायाभूत सुविधा उभारणी कामात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ११ लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या खासगी गुंतवणुकीला सरकारी धोरणांमधून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक पाठबळ मिळेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. देशभरात रस्तेबांधणीसाठी २६ हजार कोटींचा खर्च केला जाणार असल्याने दळणवळणाचे जाळे मजूबत होणार आहे. देशभरात १२ इंडस्ट्रियल पार्कला नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत मंजुरी देण्याचा निर्णय हा उद्योगक्षेत्राला भरारी देणारा आहे.

देशभरातील २५ हजार गावांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजना टप्पा ४ सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेद्वारे सौर ऊर्जेला चालना मिळणार असून अर्थसंकल्पातील तरतुदी आणि योजनांमुळे महाराष्ट्राच्या विकासात मोठी भर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


सर्वंकष विकासाच्या लोककल्याणकारी अर्थसंकल्पाबद्दल
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन व आभार
-उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार

“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाच्या आशा-आकांक्षा-अपेक्षांची पूर्तता करणारा, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, रोजगार, स्वयंरोजगार, विज्ञान, संशोधन, कौशल्यविकास, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा एक चांगला, दूरदृष्टीपूर्ण, लोककल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो. त्यांना धन्यवाद देतो. एनडीए सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरील देशवासियांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, देशाला विकसित राष्ट्र, विश्वशक्ती बनविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारचे स्वप्न आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवाआधी हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. या स्वप्नपूर्तीसाठी दूरदृष्टीने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. 1) शेती क्षेत्रात उत्पादकतावाढ, 2) रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकासावर भर, 3) मनुष्यबळ विकास व सामाजिक न्यायाकडे विशेष लक्ष, 4) उत्पादन व सेवाक्षेत्राचा विकास 5) शहरांच्या नियोजनबद्ध विकासावर भर, 6) ऊर्जासंरक्षण 7) पायाभूत सुविधांचा विकास 8) संशोधन व विकासाला प्राधान्य, 9) नव्या पीढीसाठी सुधारणा या 9 क्षेत्रांना दिलेलं प्राधान्य देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा, देशाला सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जाणारा निर्णय आहे.

शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची केलेली तरतूद महत्वाची आहे. त्यातून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येणार आहे. कमी खर्चात, अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत 5 वर्षांसाठी वाढवत आली आहे. त्यामुळे देशातील 80 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा मिळाली आहे.

युवकांना शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 1.48 लाख कोटींची तरतूद केली आहे. त्यातून येणाऱ्या 5 वर्षात 20 लाख युवकांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘ईपीएफओ’मधील नोंदणीवर आधारित योजनेंतर्गत, पहिल्यांदाच रोजगारासाठी तयार झालेल्या युवकांना 1 महिन्याचा भत्ता पहिल्या महिन्यात दिला जाणार आहे. 21 कोटी युवकांना याचा फायदा होणार आहे. पुढील 5 वर्षात देशातील 500 कंपन्यांमध्ये किमान 1 कोटी युवकांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. देशात 12 इंडस्ट्रीयल पार्क उभारण्यात येणार आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होईल असा मला विश्वास आहे, असेही अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.

रुग्णांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काही औषधांना अबकारी शुल्कातून वगळण्याचा निर्णय असेल, मोबाईल चार्जर आणि इतर गोष्टींवरील अधिभार १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय असेल, लिथियम बॅटरी स्वस्त करण्याचा निर्णय असेल, पीएम आवास शहरी योजनेंअंतर्गत शहरात राहणाऱ्या 1 कोटी गरीब नागरिकांना 10 लाख कोटी रुपये खर्चून बांधून देण्याचा निर्णय व त्यासाठी पुढील पाच वर्षात 2.5 लाख कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारे ठरतील, असेही अजित पवार म्हणाले.

प्राप्तीकराअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गासाठी महत्वाचा आहे. यातून त्यांची किमान 17 हजार 500 रुपयांची बचत होणार आहे. स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारांवरून 75 हजारांपर्यंत वाढवणे. फॅमिली पेन्शन डिडक्शनची मर्यादा 15 हजारांवरून 25 हजारांपर्यंत वाढवणे. हेही निर्णय महत्वाचे असून 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे, मी या निर्णयाचेही स्वागत करतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


मोदी सरकारचा पुण्यासाठी निधीचा ओघ यंदाही : मुरलीधर मोहोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे २०१४ पासूनच पुण्याकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे दरवर्षीच्या केंद्राच्या अर्थसंकल्पात पुण्यासाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. या अर्थसंकल्पात पुण्यातील मेट्रो प्रकल्पासाठी केलेल्या ८१९ कोटी रूपयांच्या तरतुदीमुळे मेट्रोच्या विस्ताराला निश्चितच वेग येईल. मुळा-मुठा नदी पुनर्रुज्जीवन ६९० कोटी निधीमुळे प्रदूषणाला आळा घालता येईल.

पुणे हे एमएसएमई आणि स्टार्टअपचे हब म्हणून विकसित होत असल्याने त्यासाठी केलेल्या तरतुदींच्या पुण्यातील युवकांना लाभ मिळेल. देशात १००० इंडस्ट्रियल ट्रेनिंग संस्था उभारण्यात येणार असून त्यातून तयार होणारे मनुष्यबळ पुण्याला उपयोगी पडणारे आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने अर्थसंकल्पातील विद्यार्थ्यांशी संबंधित कर्ज, इंटर्नशीप हेही पुण्यासाठी महत्त्वाचे आहे.

फिल्म इन्स्टिट्यूट, आयआयटीएम, नॅचरोपॅथी संस्था, आधारकर संस्था या संस्थांसाठीही निधीची तरतूद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे देशातील ३० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या विकासासाठी विशेष निधी दिला जाणार असल्याने त्यात पुण्याचाही समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे रेल्वेसाठीच्या अर्थसंकल्पात पुणे-मिरज, पुणे-दौंड, पुणे-नगर, पुणे-नाशिक या रेल्वे मार्गांचा समावेश आहे.


भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकार व अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा आणि विकसित भारत निर्मितीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प सादर केला. मी त्याचे स्वागत करतो.

शिक्षण, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देणारा, उत्पादन क्षेत्रात रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करणारा हा अर्थसंकल्प असून शिक्षणावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. नोकरदार महिलांसाठी विविध योजना, मुद्रा योजना कर्ज क्षमता वाढवली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. पुणे मेट्रो, नदी सुधार प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. पुणे मेट्रोसाठी ८१४ कोटी आणि मुळा मुठा नदी संवर्धनासाठी ६९० कोटी अशी भरीव तरतूद केली आहे.


बडे मियां (अमित शहा), छोटे मियां (देवेंद्र फडणवीस) यांनी महाराष्ट्राला दाखवला ठेंगा | प्रशांत जगताप ( शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, केवळ नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला म्हणून बिहार व आंध्रप्रदेशवर पैशांचा पाऊस पडत असताना नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राला मात्र उपाशीच ठेवले.
बडे मियां अमित शहा व छोटे मियां देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरलं, भाजप सरकार हे भेदावर मार्गक्रमण करणारं सरकार आहे, हाच भेद त्यांनी अर्थसंकल्पातही दाखवून दिला.
देशाला सर्वाधिक कर महाराष्ट्र देत असताना अर्थसंकल्पात मात्र महाराष्ट्राचा उल्लेखही करण्यात आलेला नाही, पुणे शहराला एकही नवीन प्रकल्प देण्यात आलेला नाही. पुणे शहराला मंत्रिपद मिळाले, एका पक्षाचे भले झाले, परंतू सामान्य पुणेकरांना काय मिळाले ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अर्थसंकल्पात झालेल्या अन्यायाचा हिशोब पुढील तीनच महिन्यात महाराष्ट्राची जनता मांडणार आहे, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या अपमानाची व्याजासह परतफेड होईल ही मला खात्री आहे.


अकामगारांसाठी  कोणतीही घोषणा केली नाही – सुनिल शिंदे

संघटीत कामगार दिवसेदिवस वाढत चालले आहेत. कामगारांसाठी कोणतेही कायदे लागू नाहीत. याबाबत निर्णय देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर झोमॅटो, ओला उबेर यासारख्या ॲपवर काम करणाऱ्या कामगारांसाठी  कोणतीही घोषणा केली नाही .यावरुन एकूणच हे सरकार कामगारविरोधी कामगारांप्रती असवेंदनशील आहे. असे आजच्या केंद्रीय बजेट बाबत महिराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेस विभागाचे प्रदेश अध्यक्ष आणि कामगार नेते  सुनिल शिंदे यानी  सांगिंतले.


 

Creative Foundation |Chandrakant Patil |   क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे  चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग मुलांना मदतीचा हात 

Categories
Breaking News Political social पुणे

Creative Foundation |Chandrakant Patil |   क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे  चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग मुलांना मदतीचा हात

| उमेद फाउंडेशन च्या बालक पालक प्रकल्पास सर्वोतोपरी मदतीचे चंद्रकांतदादांचे वचन

 

Creative Foundation – Chandrakant Patil | क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर हे त्यांच्या फाउंडेशन च्या नावाप्रमाणेच क्रिएटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि वेगळेपण जपणारे कार्यक्रम करत असतात. ते समाजात चांगलं काम करणाऱ्यांच्या शोधात असतात आणि कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अश्या व्यक्ती / संस्थांना मदतीचा हात देत असतात, या कार्यात त्यांच्या पत्नी मंजुश्री खर्डेकर देखील त्यांना मदत करत असतात. असे गौरवोदगार चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

आज क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या उमेद फाउंडेशन ला सुमारे तीन महिने पुरेल येवढे जीवनावश्यक साहित्य देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संस्थेच्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई मोहोळ, धर्म जागरण मंचचे सीताराम खाडे, सुमित दिकोंडा, संस्थेच्या मार्गदर्शक सीमाताई दाबके, उमेद चे संस्थापक अध्यक्ष राकेश सणस इ मान्यवर उपस्थित होते.

उमेद फाउंडेशन ने पौड येथे 11 गुंठे जागा विकत घेतली असून तेथे बालक पालक प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला असल्याचे उमेद फाउंडेशन चे राकेश सणस यांनी सांगितले.

या प्रकल्पास मी सर्वतोपरी मदत करेन असे वचन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.तसेच विशेष मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही आनंदाने जगता यावे यासाठी चा हा प्रकल्प स्तुत्य असून मुलांसोबत त्यांच्या पालकांचा ही विचार करणे हे कौतुकास्पद असल्याचे ही चंद्रकांतदादा म्हणाले.

सर्व ठिकाणी शासन पोहोचू शकत नाही, त्यामुळे अश्या पद्धतीने समाजातील विशेष मुलांचा सांभाळ करणाऱ्यांना मदत करण्यासाठी समाजातील सधन व्यक्तींनी योगदान द्यावे असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले. तसेच नेत्यांचा किंवा स्वतःचा वाढदिवस हा अश्या घटकांना मदत करून साजरा करण्याची क्रिएटिव्ह फाउंडेशन ची परंपरा असून त्यानुसार आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष मुलांना मदत करताना सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद होत आहे असेही खर्डेकर म्हणाले.

तसेच आपण दिव्यांग मुलांचा विचार करतो त्यांना मदत करतो पण ह्या मुलांचा सांभाळ करणे हे जिकिरीचे आणि अत्यन्त अवघड काम असते त्यामुळे अश्या पालकांचा विचार उमेद फाउंडेशन ने केला हे महत्वाचे असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.

राकेश सणस यांनी प्रास्ताविक केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

BJP Maharashtra Adhiveshan | महायुतीचा निर्णय होईल तेव्हा होईल, मात्र पक्ष नेतृत्वावर श्रद्धा ठेऊन काम करा | आपण विधानसभेत 200 च्या वर जागा जिंकू | चंद्रशेखर बावनकुळे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

BJP Adhiveshan | महायुतीचा निर्णय होईल तेव्हा होईल, मात्र पक्ष नेतृत्वावर श्रद्धा ठेऊन काम करा | आपण विधानसभेत 200 च्या वर जागा जिंकू | चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule – (The Karbhari News Service) – विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा निर्णय होईल. कोण लढेल ते वरिष्ठ ठरवतील. पण आपल्याला पक्षासाठी काम करायचे आहे. चार महिने पक्षावर, नेतृत्वावर श्रद्धा ठेवा आणि काम करा. येत्या निवडणुकीत विधानभवनावर भगवा फडकावायचा असेल, तर सर्वांनी घरोघरी जाऊन काम करावे. आपल्याला दोनशेच्यावर जागा मिळतील. मला घमंड नाही, तर आत्मविश्वास आहे. प्रत्येक बुथवर दहा मते वाढवा, आपला विजय निश्चित आहे, असे आवाहन आत्मविश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Vidhansabha Election)

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन बालेवाडीत आज सुरू आहे. त्यावेळी बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बावनकुळे म्हणाले, लोकसभेला आपल्याला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. पण मतांची आकडेवारी पाहिली तर थोड्या मतांनी आपल्या अनेक जागा गेल्या. आता विधानसभेला प्रत्येक बुधवर दहा मते वाढविली तर आपला विजय निश्चित आहे. विधनसभेत आपल्याला चांगले यश मिळेल. विरोधकांनी खोटेपणा करून लोकसभेत आपल्याला पराभूत केले. पण आता त्या पराभवातून आपण शिकलो आहोत. त्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. खरंतर मराठा समाजासाठी देवेंद्रजींनी रात्ररात्रं काम केलं आहे. मराठ्यांना आरक्षण दिले. तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज आंदोलन करताना देवेंद्रजी यांना टार्गेट केले जात आहे. मराठा आरक्षणाला आम्ही पाठिंबा देतोय. देवेंद्रजी यांनी जो कायदा केला, त्याचा मारेकरी शोधा.

बावनकुळे पुढे म्हणाले, उद्याचे महाविकास आघाडीला मत म्हणजे मोदींच्या योजना थांबविण्यासाठी असेल. म्हणून १४ कोटी जनतेला माझे आवाहन आहे की, असे करू नका. योजना बंद करू नका. आज घरोघरी जाऊन मोदी सरकारचे काम सांगायला हवे. लोकप्रिय योजना पुढे नेण्यासाठी काम करायचे आहे. मनात निराशा ठेवू नका. सर्वांनी नेटाने काम करावे. आपले नेते दणकट आहेत. कार्यकर्ता हा आपला श्वास आहे. इथून गेल्यावर प्रत्येक बुथवर जाऊन काम करायचे आहे.