Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

Categories
Breaking News social पुणे

Pune Water Issue | 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याची पालकमंत्री यांच्याकडे मागणी

| सजग नागरिक मंचाच्या विवेक वेलणकर यांनी केली मागणी

Pune Water Issue – (The Karbhari News Service) – निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात (Pune Water Scarcity) सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश जलसंपदा विभागास (Department of Water Resources) द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे.
वेलणकर यांच्या निवेदनानुसार खडकवासला धरण साखळीत आज रोजी 9.4 TMC पाणी शिल्लक आहे. पुणे शहर दरमहा खडकवासला धरणसाखळीतून 1.6 TMC पाणी वापरते. 31 जुलै पर्यंत पुणे शहरासाठी खडकवासला धरणसाखळीतून 5.25 TMC पाण्याची गरज आहे. उन्हाळ्याचा कडाका बघता पुढील तीन महिन्यात किमान 1.5 TMC पाण्याचे धरणातून बाष्पीभवन होईल. जून महिन्यात वारीसाठी किमान अर्धा TMC पाणी लागेल.
हे सर्व बघता ३१ जुलैपर्यंत किमान ७.२५ TMC पाणी राखून ठेवणे गरजेचे आहे. आत्ता शेतीसाठी सुरु असलेले आवर्तन आवरते घेण्याची गरज आहे. कारण परत मे अखेर दौंडसह गावांना पिण्यासाठी दीड TMC चे आवर्तन सोडणे आवश्यक ठरणार आहे. पुणे हे देशातील पहिले शहर आहे की जे महिन्याला अर्धा TMC सांडपाणी शुद्धीकरण करून शेतीसाठी पुनर्वापरासाठी सोडते आहे. त्यामुळे शेतीला पाणी कमी पडेल ही भिती अनाठायी आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
  निवडणूका संपल्यानंतर पुण्यात पाणीकपात सुरु होईल अशी लोकांमध्ये भिती आहे. या पार्श्वभूमीवर खडकवासला धरणसाखळीत 7.25 TMC पाणी पुण्यासाठी राखून ठेवण्याचे आदेश आपण जलसंपदा विभागास द्यावे आणि पुणेकरांस आश्वस्त करावे.
–  विवेक वेलणकर,अध्यक्ष, सजग नागरिक मंच,  पुणे

CM Eknath Shinde | ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

CM Eknath Shinde | ‘अब की बार, महाराष्ट्रात ४५ पार’ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– कमळ किंवा धनुष्यबाण किंवा घड्याळ कोणतेही बटण दाबा मत मोदींनाच जाणार हे नक्की

CM Eknath Shinde  – (The karbhari News Service) – फेसबुकवाले मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी त्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून ठीक, पण जर त्यांची वक्रदृष्टी फेसबुकवाल्यांकडे गेली तर तोंडाला फेस येईल. यावेळी आपल्याला प्रत्येक बूथ जिंकण्याचे उदिष्ट आहे. त्यातून आपण देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार करू, थोडी जास्त मेहनत कार्यकर्त्त्यांनी घेतली तर राज्यात ४५च्याही पुढे जाऊ, असा विश्वास  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. (Mahayuti melava pune)

पुणे शहर-जिल्ह्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लिकन पार्टी आठवले गट आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या संयुक्त मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

या पदाधिकारी मेळाव्यास पालकमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, रुपाली चाकणकर, आमदार माधुरी मिसाळ, आ. सुनील टिंगरे, आ. चेतन तुपे, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, महेश शिंदे, दीपक मानकर, धीरज घाटे, प्रमोद भानगिरे, अजय भोसले, परशुराम वाडेकर, श्री. लतीफ शेख, संजय माशिलकर, संजय सोनवणे, प्रकाश भालेराव, श्रीनाथ भीमाले, बालाजी पवार, राजेश पांडे, भारत नागद, संजय आल्हाट यांच्यासह महायुती आणि घटक पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.

The karbhari - mahayuti melava pune

एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मुरलीधर मोहोळ यांना गिरीश बापट यांचा वारसा पुढे चालवायचा आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट मला मोठ्या भावासारखे होते. पुण्याचे प्रश्न ते मांडायचे. आता आपला खासदार पुण्यातून दिल्लीला जाणार आहे. इथे भाऊॅ तात्या कोणी नाही, मुरलीधर अण्णाच निवडून येणार आहेत. आयोध्येतील रामलल्लासाठी पुण्यातून दोन धागे रामासाठी विणले, त्याची वस्त्र श्रीरामल्लांना परिधान केली गेली. आता मतांचे धागे आपल्याला विणायचे असून जिल्ह्यातील चारही उमेदवारांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे आहे.

कोरोना काळात मुरलीधर मोहोळ यांनी चांगले पुण्यात काम केले, आम्ही राज्यात काम करत होतो, पंतप्रधान मोदी देशात काम करत होते.पण काही जण फक्त फेसबुक लाइव्ह करत होते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘आता हेच फेसबुकवाले मोदीजींवर टीका करत आहेत. मोदीजी त्याकडे लक्ष देत नाहीत म्हणून ठीक, पण जर त्यांची वक्रदृष्टी फेसबुकवाल्यांकडे गेली तर तोंडाला फेस येईल. यावेळी आपल्याला प्रत्येक बूथ जिंकण्याचे उदिष्ट आहे. त्यातून आपण देशात ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ पार करू, थोडी जास्त मेहनत कार्यकर्त्त्यांनी घेतली तर राज्यात ४५च्याही पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित चारही मतदारसंघात काम केले पाहिजे. विधानसभेची ही रंगीत तालीम असल्याने कुणीही गहाळ राहू नका. समोरचा उमेदवार कमकुवत समजायचा नाही. सर्वांची एकजूट दाखवणे महत्वाचे आहे. सोशल मीडिया सेलच्या पदाधिकाऱ्यांना जास्त काम करावे लागणार आहे. विकासावर मत मागायची. केलेल्या कामाच्या जोरावर मत मागायची आहेत. काही लाख कोटींची काम सुरू आहेत. पुण्यातील वाहतूक कोडी सोडवण्यासाठी मेट्रो कात्रज, हडपसर, वाघोलीला नेतोय,त्यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असणे गरजेचे आहे. आपल्या सर्व उमेदवारांचे मताधिक्य वाढण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे टाळा, वादविवाद टाळा. गंमततीचा भाग नाही खरोखर नम्रतेने वागा. ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. सामाजिक कार्यकर्ते, संघटना जोडून घ्या.त्यांना सोबत घ्या. मतदारांना श्री मोदीजींना मतदान करायचे आहे. जिल्ह्यात घड्याळदोन ठिकाणी, धनुष्यबाण आणि कमळ ही तीन चिन्हं आहेत. त्या समोरचं बटण दाबलं तरी मत श्री मोदीजींना जाणार आहे.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, जर महायुतीला महाराष्ट्रात हरवू शकेल, तर तो कार्यकर्ताच हरवू शकेल. माझा फोटोच नाही, नावच नाही, असं नाही. मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात काम केले. त्यांचे सर्व कुटुंब ऍडमिट असताना ते तेथून काम करत होते. एकेका जागेचा विचार करा. उध्दवजी गेले मत कमी होतील पण दादा आले. त्यापेक्षा जास्त मत आपल्यात अधिक होतील. त्यामुळे महायुतीचे उमेदवार जिंकणार हे लहान मुलही सांगेल.

उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी महापौर झाल्यावर कोरोनाचे संकट आले आणि जगच थांबले पण त्या काळात काम करायची खरी संधी मला मिळाली. लोकांसाठी काय आणि कसे काम करायचे असते? ते मला या काळात काम करताना शिकायला मिळाले. पुण्यातील रिंगरोड, चांदणी चौकातील रस्ते-उड्डाणपूल, मेट्रोचा विस्तार ही सर्व कामे केवळ राज्यात आणि देशात असलेल्या विकासाच्या विचारांच्या सरकारमुळे शक्य होत आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला हीच स्थिती कायम ठेवण्यासाठी काही दिवस मेहनत करायची आहे. कार्यकर्त्यांनी मुरलीधर मोहोळसाठी नाही तर श्मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

NCP Youth | फारुख मुसा पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती

Categories
Breaking News Political पुणे

Farooq Musa Patel | फारुख मुसा पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव पदी नियुक्ती

NCP Youth – (The Karbhai News Service) – पुणे येथील युवा उद्योजक फारुख मुसाभाई पटेल यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Farooq Musa Patel)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित दादा पवार, देशाचे सचिव अविनाश आदिक, राष्ट्रवादी प्रदेशध्यक्ष खा.सुनिल तटकरे व उचतंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल ही अपेक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण व इतर सर्व नेत्यांनी केली आहे. यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून तसेच पुणे येथील आमदार चेतन तुपे , महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, पुणे शहरातील विवध सामजिक संघटना व शहर राष्ट्रवादी काँगेस पार्टी यांचे कडून स्वागत करण्यात आले व कौतुक करण्यात आले ..

श्रीरामपुर तालुक्यातील  मूळ नाऊर गावी अभिंनदंचा वर्षाव करण्यात आला .फारुख पटेल यांचे वडील मुसा भाई पटेल हे मूळ गावी माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत होत.

Maharashtra Cabinet Meeting Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Meeting Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या

Maharashtra Cabinet meeting decision – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्या अगोदर राज्य सरकारच्या वतीने विविध निर्णय घेतले आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात विविध योजनांची खैरात करण्यात आली आहे. या निर्णया विषयी जाणून घेऊया.

 

राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
( उद्योग विभाग)

तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार*
( वैद्यकीय शिक्षण विभाग)

मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
( गृह विभाग)

१३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
( विधि व न्याय)

संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार
(सांस्कृतिक कार्य)

शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
(सांस्कृतिक कार्य)

विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल
( इतर मागास)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
( पशुसंवर्धन विभाग)

हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना
( सामाजिक न्याय विभाग)

संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
( गृह विभाग)

राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
( गृह विभाग)

ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
( परिवहन विभाग)

भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप
( महसूल विभाग)

संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
( गृह विभाग)

वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
( सांस्कृतिक कार्य)

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर
( सामान्य प्रशासन विभाग)

श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
( महसूल व वन)

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत अजून 9 सदस्यांचा समावेश | जाणून घ्या नवीन 9 सदस्यांची यादी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत अजून 9 सदस्यांचा समावेश  | जाणून घ्या नवीन 9 सदस्यांची यादी

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. हा प्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर होत चालला आहे.  आता यावर तोडगा काढण्यात आला असून यासाठी विभागीय आयुक्तांच्या (Pune Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान याबाबत काही सदस्यांनी आम्हांला डावलले गेल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार या यादीत अजून 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे महापालिका (PMC Pune) हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाली आहे. तसेच या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची (PMC Pune property Tax) वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधाचा अभाव आहे.  यावर  नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) देखील चर्चा झाली होती.  मंत्री उदय सामंत यांनी ह्या विषयाबाबत दखल घेतली होती. शासनाकडून 34 गावातील लोकप्रतिनिधी मिळून विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून समिती ताबडतोब नेमली जाईल व त्या समितीमार्फत निधी देऊन कामे होतील असे अधिवेशनात सांगितले होते. त्यानुसार 18 लोकांची समिती स्थापन केली होती. (PMC Pune village news)

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे आम्हांला डावलले गेल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पवार यांनी यात लक्ष घालून समितीत अजून 9 लोकांचा समावेश केला आहे. 

पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये ०९ लोकप्रतिनिधीची सदस्यपदी नियुक्ती.

 1. पांडुरंग एकनाथ खेसे – लोहगाव वाघोली

2.  बाबुराव दत्तोबा चांदेरे – सूस, म्हाळुंगे, बावधन

3. दत्तात्रय बबनराव धनकवडे – नऱ्हे,  शिवणे, उत्तमनगर, धायरी

4.  राकेश राजेंद्र कामठे – उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी

6.  भगवान लक्ष्मण भाडळे – मंतरवाडी, देवाची ऊरुळी

6.  शांताराम रंगनाथ कटके – कटकेवाडी, वाघोली

7.  गणेश बाळासाहेब ढोरे – ढोरेवस्ती, फुरसुंगी, भेकराई नगर

8.  राहुल सदाशिव पोकळे – धायरी, पुणे

9. अजित दत्तात्रय घुले – मांजरी बु. ता. हवेली, पुणे

Ahilyanagar | Ahmadnagar | अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

Ahilyanagar | Ahmadnagar | अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता

| राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

 

Ahilyanagar | Ahmadnagar- (The Karbhari News Service) – अहमदनगर शहराचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
——०००००———-

Amendment in the Act to reduce the increased Property tax of 34 villages | Deputy Chief Minister Ajit Pawar directed Urban Development Secretary

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

 Amendment in the Act to reduce the increased Property tax of 34 villages | Deputy Chief Minister Ajit Pawar directed Urban Development Secretary

| 34 villages included in the Pune Municipal Corporation will be exempted from the income tax arrears and will also reduce the income tax by three to ten times.

— Directives in a meeting chaired by Deputy Chief Minister Ajit Pawar

PMC 34 Villages Property tax – (The Karbhari News Service) – It is unfair to levy income tax three times to ten times the income tax of the previous gram panchayat on the incomes of the residents and non-residents of the 34 villages newly included in the Pune Municipal Corporation and keeping in mind the fact that it is not possible for the income earners to pay this tax, care should be taken that the income tax of the Pune Municipal Corporation is not more than double the previous gram panchayat tax. In this regard, Deputy Chief Minister Ajit Pawar directed that the process of amending the law should be started immediately in a meeting held with the Urban Development Secretary today.

Pune Municipal Corporation has imposed three times to ten times increased tax on resident and non-resident incomes of 34 villages, which is causing injustice to the respective villages. The villagers demanded its removal from Deputy Chief Minister Ajit Pawar. Accordingly, Deputy Chief Minister Ajit Pawar today held a meeting with the senior officials of the Urban Development Department and directed to remove the injustice immediately. Secretary of Urban Development Department K. Govindaraj, MLA Sarveshree Chetan Tupe, Sunil Tingre, Bhimrao Tapkir along with representatives of 34 villages, senior officers of Urban Development Department were present.

Through a special letter, the state government has instructed to suspend the collection of 2 percent penalty (delay amount) imposed on the annual arrears of property tax and penalty on illegal construction in 34 villages newly included in the Pune Municipal Corporation till further instructions. Deputy Chief Minister Ajit Pawar today gave clear instructions to the senior officials of the Urban Development Department that as the law needs to be amended to reduce the tax levied from three to ten times on the income of 34 villages along with waiving the penalty, the said action should be completed immediately and relief should be given to the income holders of the 34 villages. is

PMC 34 Villages Property tax | सामाविष्ट 34 गावांचा वाढीव मिळकतकर कमी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नगरविकास सचिवांना निर्देश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 PMC 34 Villages Property tax | सामाविष्ट 34 गावांचा वाढीव मिळकतकर कमी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नगरविकास सचिवांना निर्देश

| पुणे महानगरपालिकेत सामाविष्ट 34 गावांच्या थकीत मिळकतकरावरील शास्तीस माफी देण्यासह मिळकतकराची तीनपट ते दहापट रक्कमेतही कमी करणार

— उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्देश

PMC 34 Villages Property tax | पुणे महापालिकेत नव्याने सामाविष्ट 34 गावांतील निवासी तसेच बिगरनिवासी मिळकतींना पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या मिळकतकराच्या तीनपट ते दहापट मिळकतकर आकारणे अन्याय्य असून मिळकतदारांना हा कर भरणे शक्य नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचा मिळकतकर पूर्वीच्या ग्रामपंचायतकराच्या दुप्पटीपेक्षा अधिक नसेल, याची दक्षता घेण्यात यावी. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास सचिवांसोबत आयोजित बैठकीत दिले.

पुणे महापालिकेत नव्याने सामाविष्ठ 34 गावातील निवासी-बिगरनिवासी मिळकतींना तीनपट ते दहापट वाढीव कर आकारण्यात आल्याने संबंधित गावांवर अन्याय होत आहे. तो दूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अन्याय तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव के. गोविंदराज, आमदार सर्वश्री चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर यांच्यासह 34 गावांचे प्रतिनिधी, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे महापालिकेत नव्याने सामाविष्ट 34 गावातील अवैध बांधकामावरील शास्ती व वार्षिक थकीत मालमत्ताकरावर लावण्यात आलेल्या 2 टक्के शास्तीच्या (विंलब आकार) वसुलीस पुढील निर्देशांपर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश राज्य शासनाने विशेष पत्राद्वारे दिले आहे. सदर शास्ती माफ करण्यासह 34 गावांतील मिळकतींवर आकारलेला तीनपट ते दहापट कर कमी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक असल्याने सदर कार्यवाही तात्काळ पूर्ण करुन, 34 गावांतील मिळकतधारकांना दिलासा देण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने संबंधीत गावांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.
—-००००००००—

PMPML Pune | Need to get new buses in PMPL’s fleet! – Former MLA Mohan Joshi

Categories
Political पुणे

PMPML Pune | Need to get new buses in PMPL’s fleet!

– Former MLA Mohan Joshi

 

PMPML Pune – (The Karbhari News Service) – As the number of bus passengers in Pune and Pimpri Chinchwad cities is increasing, former MLA, Maharashtra Pradesh Congress Vice President Mohan Joshi has given a statement to the Deputy Chief Minister Ajitdada Pawar demanding that 2000 new buses be added.

At present the number of buses of PMPML is 2,028. Out of this, 300 to 400 buses break down on time or are in garage for repairs. About 1,600 buses are available. Pune and Pimpri Chinchwad city and surrounding areas together have a population of 1 crore. Therefore, the rush of passengers is increasing. Keeping this in mind, it is necessary to add at least 2000 new buses to the fleet of PMPML, for which the state government should provide funds, Mohan Joshi has demanded.

PMPML’s bus service needs to have good connectivity to solve traffic congestion in the city. Although the city has a metro, enabling PMPL is the only option at present, Mohan Joshi said in a statement. Deputy Chief Minister Ajitdada Pawar has responded positively to the demand.

PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या घेण्याची आवश्यकता!

Categories
Breaking News Political social पुणे

PMPML Pune | पीएमपीएल च्या ताफ्यात नवीन बस गाड्या  घेण्याची आवश्यकता!

– माजी आमदार मोहन जोशी

 

PMPML Pune – (The Karbhari News Service) – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील बस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने २००० नवीन बस गाड्यांची भर घालावी, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना  दिले.

सद्यस्थितीत पीएमपीएमएलच्या बसेसची संख्या २,०२८ इतकी आहे. त्यातही ३०० ते ४०० बस गाड्या ऐनवेळी बिघडतात किंवा दुरूस्तीसाठी आगारात असतात. साधारणतः १,६०० बस गाड्याच उपलब्ध असतात. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि आसपासचा परिसर मिळून १कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढतेच आहे. हे लक्षात घेऊन पीएमपीएमएलच्या ताफ्यात कमीतकमी २००० नवीन बस गाड्यांची भर घालणे आवश्यक आहे, याकरिता राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमपीएमएलच्या बस सेवेची चांगली कनेक्टिव्हिटी असणे गरजेचे आहे. शहरात मेट्रो असली तरी, पीएमपीएल सक्षम करणे, हा सद्यस्थितीत एकमेव पर्याय आहे, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे. उपमुख्य मंत्री अजितदादा पवार यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.