Loksabha Election Voting | अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Voting | अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे – जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

 

Loksabha Election Voting – (The Karbhari News Service) –  भारत निवडणूक आयोगाच्या (Election commission of India) – सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळेस अधिसूचित अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून विहीत मुदतीत नमुना १२ डी सादर केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. (Dr Suhas Diwase IAS)

टपाली मतदानाचा नमुना १२ डी चा अर्ज सादर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्र (पीव्हीसी) स्थापन करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी जाऊन संबधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान करावे.

टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत राहतील. ३५ बारामती लोकसभा मतदार संघात १ ते ३ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत, ३३ मावळ लोकसभा मतदार संघ, ३४ पुणे लोकसभा मतदार संघ व ३६ शिरूर लोकसभा मतदार संघात ७ ते ९ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून ते सायं. ५ वाजेपर्यंत टपाली मतदान केंद्रे कार्यरत राहतील, असेही जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Mahavikas Aghadi Nomination | महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर, सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांचे अर्ज दाखल

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Nomination | महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरसुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांचे अर्ज दाखल

 

Pune Baramati Shirur Loksabha Election – (The karbhari News Service) –    महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे शहर व जिल्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (पुणे)सुप्रियाताई सुळे (बारामती) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

या वेळी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिरउपनेत्या सुषमा अंधारे,आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीआमदार रोहित पवारसंजय जगतापसंग्राम थोपटेमाजी आमदार रमेश बागवेदीप्ती चवधरीजयदेव डोळेउल्हासदादा पवारसंजय बालगुडेअंकुश काकडेपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकरसंभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव यावेळी उपस्थितीत होते.

 

       काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करणयात आला. यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

     गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्रित आले होते. सकाळी पावणे अकराच्या सुमारास

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर)  आणि  सुप्रियाताई सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून  वंदन केले.  रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सुप्रियाताई सुळे (बारामती) यांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल केला.

 

   महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, माजी खासदार एड वंदना चव्हाण, पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी आणि माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी  उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सह्या केल्या. 

BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी

BJP Manifesto 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

भांडारी म्हणाले, ‘जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र आहे. या संकल्पपत्रात दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे. अशी भूमिका या आधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला.’

भांडारी पुढे म्हणाले, ‘२०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.’

समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असेही भांडारी म्हणाले.

Loksabha Election 2024 | राजकीय जाहिरातींच्या बल्क एसएमएसचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election 2024 | राजकीय जाहिरातींच्या बल्क एसएमएसचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

| खासगी एफ.एम. वाहिन्यांनीही जाहिरात प्रसारणापूर्वी प्रमाणीकरण झाल्याची खात्री करावी

Loksabha Election 2024 – (Tge Karbhari News Service) – निवडणूक प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे बल्क एसएमएस, रेकॉर्डेड व्हाईस मेसेजेस यांना जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक आहे. तसेच रेडिओ आणि खासगी एफएम वाहिन्यांसाठीही या तरतुदी लागू असून जाहिरात प्रसारण करण्यापूर्वी या बाबींचा खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याचे प्रतिनिधी, कम्युनिटी रेडिओ व एफएम चॅनेल्सच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, जिल्हा दळणवळण आराखड्याच्या समन्वय अधिकारी शमा पवार आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असून निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष, उमेदवार तसेच त्रयस्थ व्यक्तींकडून विविध माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. निवडणूक प्रचाराच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हाईस मेसेजेस तसेच सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावरुन प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन घेणे आवश्यक आहे.

निवडणूक प्रचाराचं संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाचे सर्व माध्यमातून होत असलेल्या निवडणूक प्रचारावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पूर्वप्रमाणिकरण न करता बल्क एसएमएस पाठविले जात असल्याचे किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जाहिरात प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

आचारसंहितेच्या काळात निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल अशा प्रकारची कोणतीही पोस्ट नागरिकांनी समाजमाध्यमांवरुन करू नये. निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. उमेदवारांच्या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीशी (एमसीएमसी) जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून सर्वोपचार रुग्णालयासमोर, पुणे ४११००१ दूरध्वनी क्र. ०२०-२६१२१३०७, ई-मेल diopune@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
0000

Pune Voter | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात  | चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Pune Voter | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात

| चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

 

Pune Voter – (The Karbhari News Service) –  लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)  महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत. नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

पुण्यात 82 लाखांहून अधिक मतदार

पुण्याची एकूण मतदार संख्या 82 लाख 82 हजार 363 आहे. तर मुंबई उपनगरची एकूण मतदार संख्या 73 लाख 56 हजार 596 इतकी आहे. ठाण्याची एकूण मतदार संख्या 65 लाख 79 हजार 588, नाशिक जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 48 लाख 08 हजार 499 इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या 42 लाख 72 हजार 366 इतकी आहे.

त्नागिरी, नंदुरबार, गोंदिया आणि सिंधुदुर्गात महिला मतदारांची संख्या अधिक

चार जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार सर्वाधिक आहेत. रत्नागिरीची एकूण मतदार संख्या 13 लाख 03 हजार 939असून यामध्ये 11 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 31 हजार 012 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 72 हजार 916 इतकी आहे. नंदुरबारची एकूण मतदार संख्या 12 लाख 76 हजार 941 असून यामध्ये 12 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 37 हजार 609 आहे तर महिला मतदारांची संख्या 6 लाख 39 हजार 320 इतकी आहे. गोदिंया जिल्हयातही महिला मतदारांची संख्या जास्त आहे. गोंदियाची एकूण मतदार संख्या 10 लाख 92 हजार 546असून यामध्ये 10 तृतीयपंथींची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 5 लाख 41 हजार 272 आहे तर महिला मतदारांची संख्या 5 लाख 51 हजार 264 इतकी आहे. सिंधुदुर्गची एकूण मतदार संख्या 6 लाख 62 हजार 745असून यामध्ये 1 तृतीयपंथीची नोंद आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 3 लाख 30 हजार 719 आहे तर महिला मतदारांची संख्या 3 लाख 32 हजार 025 इतकी आहे.

राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा पाच टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा तयारीला लागली आहे. राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 मतदारांची नोंद आहे. यामध्ये 4 कोटी 80 लाख 81 हजार 638 पुरुष मतदार तर 4 कोटी 44 लाख 04 हजार 551 महिला मतदार आणि 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत.

5 जिल्ह्यात 30 लाखांहून अधिक मतदा

अहमदनगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये 30 लाखांहून अधिक मतदार आहेत. अहमदनगरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 252 आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार 36 लाख 47 हजार 141 आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार 35 लाख 22 हजार 289 आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार 31 लाख 72 हजार 797 आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार 30 लाख 48 हजार 445 आहेत.

बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई शहर, बीड, सातारा, सांगली आणि पालघर या 10 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांहून अधिक मतदार आहेत.

Dr Suhas Diwase IAS | निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी | डॉ. सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Dr Suhas Diwase IAS | निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडावी | डॉ. सुहास दिवसे

 

Dr Suhas Diwase IAS – (The karbhari news service) –  लोकसभा निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा योग्यप्रकारे काम करीत असून यापुढेही नियुक्त केलेल्या सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिलेली जबाबदारी उत्तमप्रकारे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Loksabha Election 2024)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदार संघात स्वीप अंतर्गत कार्यक्रम घेऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करावी. नागरिकांना मतदार यादीतील नाव शोधण्याबाबत माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांची शहरी भागातील मतदान केंद्रावर आवश्यकतेनुसार नियुक्ती करण्यात यावी. मनुष्यबळाचे योग्य नियोजन करावे. आवश्यकतेप्रमाणे राखीव मनुष्यबळ वापरावे.

सी-व्व्हिजील नियंत्रण कक्ष आणि एमसीएमसी समितीने त्यांचा दैनंदिन अहवाल प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावा. फेक न्यूज, वृत्तपत्रातील आक्षेपार्ह बातमी याचीही माहिती देण्यात यावी. आरोग्य विभागाने मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची माहिती घेऊन त्यांच्यासाठी अगोदरच व्हीलचेअरचे नियोजन करावे.

अल्पसंख्याक समाजात पडदा वापरणाऱ्या महिलांची ओळख पटविण्यासाठी व शाई लावण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात यावी. ‘तुमचे मतदान केंद्र ओळखा’ हे अभियान राबवून मतदारांना आपले मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती देण्यात यावी. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मॉक पोलच्यावेळी आवश्यकता भासल्यास ईव्हीएममधील बिघाड दुरूस्‍त करण्यासाठी नियंत्रण कक्षात २ तज्ज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करावी.

लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले असून सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी वेळेत पूर्ण करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मनुष्यबळ, प्रशिक्षण, वाहन, संगणक, स्वीप, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, ईव्हीएम, पोस्टल बॅलेट, मतदार यादी, मतदार मदत केंद्र, एक खिडकी योजना व दिव्यांग कक्ष व्यवस्थापन समन्व्यक अधिकाऱ्यांकडून निवडणूक माहिती घेतली.

Loksabha Election Nomination | उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Nomination | उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

 

Loksabha Election Nomination – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे व योग्यरितीने नामनिर्देशनपत्र दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी केले आहे.

नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्र हे नमुना २अ मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र सादर करावे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २अ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे.

एका उमेदवारास अधिकाधिक ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १७३ (अ) अन्वये उमेदवाराने स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपूर्वी शपथ घ्यावी लागेल. दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी नसावे.

उमेदवार निवडणूक लढवीत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघाव्यतिरीक्त, इतर लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्यास, ज्या लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारयादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणे बंधनकारक राहील. उमेदवार स्वतः किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करावे.

नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात उमेदावारासहीत एकूण ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (त्यामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल.) नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराच्या केवळ ३ वाहनांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाहने वाहनतळावरच उभी करण्याची अनुमती राहील.

उमेदवार हा ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक राहील. मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारास १ मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील. अपक्ष उमेदवार आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष, नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार यांना मतदारसंघातील १० मतदार प्रस्तावक म्हणून असणे बंधनकारक राहील.

प्रस्तावक अशिक्षीत असल्यास, त्यांनी त्यांचा अंगठा (ठसा) हा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा विनिर्दिष्ट सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या उपविभागीय अधिकारी दर्जापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यासमोर जाऊन त्यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील.

प्रपत्र-२६ मधील शपथपत्र न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग किंवा नोटरी पब्लिक किंवा उच्च न्यायालयाने शपथपत्र करण्यासाठी प्राधिकृत केलेल्या शपथ आयुक्त यांचेसमोर केलेले असणे बंधनकारक राहील. शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर उमेदवाराची (अभिसाक्षीची) स्वाक्षरी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त शपथपत्राच्या प्रत्येक पृष्ठावर नोटरी किंवा शपथ आयुक्त किंवा दंडाधिकारी ज्यांच्या समक्ष शपथपत्र सत्यापित केले गेले असल्यास त्यांचा शिक्का असणे आवश्यक राहील.

नामनिर्देशनपत्रासोबत विहित नमुन्यातील शपथपत्र हे १०० रुपयांच्या मुद्रांक कागदावर देणे बंधनकारक राहील. शपथपत्रातील सर्व माहिती किंवा रकाने पूर्णपणे भरलेले असावे. शपथपत्रातील माहिती टिक, डॅश केलेली ग्राह्य धरली जाणार नसून त्यामध्ये निरंक (निल) किंवा लागू नाही (नॉट ॲप्लिकेबल) अशी स्पष्ट माहिती नमूद करणे बंधनकारक राहील.

उमेदवारांनी मागील १० वर्षाच्या कालावधीत शासनाने वाटप केलेल्या निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास, शासकीय निवासस्थानाचे भाडे, विद्युत, पाणीपट्टी, दूरध्वनी आकारणी केल्याबाबत संबंधित यंत्रणेचे ‘ना देय प्रमाणपत्र’ सादर करणे बंधनकारक राहील.

राजकीय पक्षाच्या उमेदवाराने प्रपत्र ‘ए’ आणि ‘बी’ यांची मूळ शाईची स्वाक्षरीत प्रत पक्षाचे मोहोरेसह नामनिर्देशनपत्र दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल करणे बंधनकारक राहील.

सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये व उमेदवार अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील असल्यास १२ हजार ५०० रुपये भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात, जमात प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी. अनामत रक्कम रोख स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारली जाईल.

उमेदवारांनी निवडणूकीसाठी नव्याने स्वतंत्र बँक खाते उघडणे बंधनकारक राहील. इतर कोणतेही बँक खाते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त इतर कोणतेही व्यवहार असू नयेत. सदरील बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कमीत कमी एक दिवस अगोदर उघडलेले असावे. नामनिर्देशनपत्रासोबत बँकेच्या पासबुकची किंवा बँक खात्याच्या व्यवहाराचा तपशील छायांकित प्रत सादर करावी.

उमेदवाराचे छायाचित्र पांढऱ्या किंवा फिकट पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवरील पूर्ण चेहरेपट्टी असलेले स्टॅम्प साईज २ से.मी. X २.५ से.मी. आकाराचे अलीकडच्या काळातील असावे. (मागील लगतच्या तीन महिन्यातील छायाचित्र असावे). निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाप्रमाणे नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील नमूद जागी छायाचित्र चिटकवावे. उमेदवारांनी ५ छायाचित्र स्वतंत्र दाखल करावेत. छायाचित्रावर, पाठीमागे नाव नमूद करुन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील. छायाचित्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाचे विहित नमुन्यातील घोषणापत्र दाखल करावे.

नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात बंधनकारक राहील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी.

ह्या सर्वसाधारण स्वरुपाच्या असून नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व तरतूदीनुसार परिपूर्ण नामनिर्देशनपत्र भरण्याची व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम जबाबदारी ही उमेदवाराची राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिली आहे.

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली | लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली

| लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे

 

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – 
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत.

2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98 हजार 114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

सर्वांत जास्त मतदान केंद्र पुण्यात तर सर्वांत कमी मतदान केंद्र सिंधुदुर्गात

सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. याची संख्या 8 हजार 382 आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 380 मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात 6 हजार 592, नाशिकमध्ये 4 हजार 800 आणि नागपूरमध्ये 4 हजार 510 मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये 918 आणि गडचिरोलीमध्ये 950 मतदान केंद्रे असणार आहेत.

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात

3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये 3 हजार 734,सोलापूरमध्ये 3 हजार 617, जळगावमध्ये 3 हजार 582, कोल्हापूरमध्ये 3 हजार 368, औरंगाबादमध्ये 3 हजार 085, नांदेडमध्ये 3 हजार 047 आणि सातारामध्ये 3 हजार 025 मतदान केंद्र असतील.

10 जिल्हयांत 2000 हून अधिक मतदान केंद्रे

2000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्हयात आहेत. रायगडमध्ये 2 हजार 719, अमरावतीमध्ये 2 हजार 672, यवतमाळमध्ये 2 हजार 532, मुंबई शहरमध्ये 2 हजार 517, सांगलीमध्ये 2 हजार 448, बीडमध्ये 2 हजार 355, बुलढाण्यामध्ये 2 हजार 266, पालघरमध्ये 2 हजार 263, लातूरमध्ये 2 हजार 102 आणि चंद्रपूरमध्ये 2 हजार 044 मतदान केंद्र असतील.

2000 पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नंदुरबार 1 हजार 412, धुळे 1 हजार 704, अकोला 1 हजार 719, वाशिम 1 हजार 76, वर्धा 1 हजार 308, भंडारा 1 हजार 156, गोंदिया 1 हजार 288, हिंगोली 1 हजार 17, परभणी 1 हजार 587, जालना 1 हजार 719, उस्मानाबाद 1 हजार 503, रत्नागिरी 1 हजार 717 मतदान केंद्रे असतील.

मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

0000000

Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

| पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे.

आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.

सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Loksabha Election Divyang Employees | लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

Categories
Breaking News social महाराष्ट्र

Loksabha Election Divyang Employees | लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

 

 

Loksabha Election Divyang Employees (The karbhari News Service) – येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड अश्या ६ जिल्ह्यात प्रत्येकी १ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल.
या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण ६,०४,१४५ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.