Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

 

 

Mahavikas Aghadi Vs BJP – (The karbhari News Service) – मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्डनोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहेत्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार एमआयएम व वंचितच्या माध्यमातून उभे करण्यात आलेअसा आरोप महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी केला.

 

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडेमाजी महापौर कमल व्यवहारेमाजी नगरसेवक रफीक शेखअजित दरेकर उपस्थित होते.

 

अरविंद शिंदे म्हणालेभाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड आणि नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. विरोधकांवर बोलणारे भाजप नेते या दोन विषयांवर शब्द काढत नाहीत. जे पंतप्रधान दहा वर्षात‌ पत्रकारांना उत्तर देवू शकले नाहीतमग‌ ते जनतेला काय खरे बोलणार. दहा वर्ष जनतेला फसवणारे भाजप आज विकासाच्या नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहे. पुण्याचे उमेदवारही रामाचे नाव घेवून मते मागत आहेत. मात्र पुणेकर व देशातील सर्व मतदार या निवडणुकीत राम मंदिरावर नाही तर विकासावर मतदान करतील. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे भाजपने वंचित व एमआयएमला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते‌ कसे उभे‌ केले हे त्यांनात माहित. यांना पुणे मतदार‌संघात उमेदवार मिळाला नाहीम्हणून दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातून आयात केले. या दोन पक्षाला मत म्हणजे भाजपला मतहे दलित आणि मुस्लिम समाजाला कळून चुकले आहे‌. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना पुणेकर महागाईबेरोजगारी व शहरातील ढासळलेला कायदा‌ व सुव्यवस्थेचा डोळ्यासमोर ठेवून धंगेकर यांना निवडून देतीलअशा विश्वास‌ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

 

प्रशांत जगताप म्हणालेभाजपचे जे उमेदवार आहेत ते महापालिकेत स्थायी‌ समिती अध्यक्ष होतेमहापौर होते. या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या टेंडरमध्येच लक्ष घातले.   भाजपने समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोळ्यात धुळफेक‌ केली आहे. विविध योजनेच्या नावाखाली पुणेकरांना फसवण्याचे काम केले आहे. आता निवडणुकीच्या काळात महायुतीला शहरात मुळशी पॅटर्न आणायचा आहेअसेही‌ते म्हणाले.

 

गजानन थरकुडे म्हणालेभाजपने कोथरुडमधून पालकमंत्रीखासदार दिले. कोथरूडला सत्ताकेंद्र केले. तरीही कोथरुडचा विकास झाला नाही. कोथरुडचा जो विकास‌ झाला तो माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याच काळात झाला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना काय कामे केली त्यातील केवळ चार कामे त्यांनी सांगावीत. विकासाचे गाजर दाखवून निवडणुक लढवली जात आहे. सुनेला पाठवा दिल्लीत लेकीला ठेवा गल्लीत अशी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेताना थरकुडे म्हणालेगोऱ्हे यांना स्वत:ला नगरसेवक म्हणून निवडून येता‌येत नाहीना त्या एक नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. तरीही शिवसेनेने त्यांना गेल्या २० ते २२ वर्षे विधान परिषदेच्या आमदार केले.

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

 

Sharad Pawar – (The karbhari News Service) – आज ज्यांच्या हातात सत्ता आहेत्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे प्रश्नमहागाईबेरोजगारीमहिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तरूणांना दरवर्षी नोकरीराजगारांचे आश्वासन देऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे   जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहेअसा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

    जिल्हाधिकारी कार्यालयापासून  भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल शांताई येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभास्थळी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

 

यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर सुषमा अंधारे आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापआमदार संग्राम थोपटेसंजय जगतापरोहित पवारमाजी आमदार उल्हासदादा पवारदीप्ती चवधरीजयदेव डोळे ,अशोक पवारमाजी उपमहापौर अंकुश काकडेरोहिणी खडसे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर उपस्थितीत होते.

 

       काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर इंडिया आघाडीचा विजय असोअशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

     शरद पवार म्हणालेपंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये होते. मोदी म्हणालेपन्नास दिवसांत पेट्रोलचे दर कमी  करतो. आज 3 हजार 650 दिवस झालेआज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरूणांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होतेउलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा अन तो फिरवायचा. त्यामुळे जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहे. मोदींनी जनतेची वेळोवळी फसवणूक केली आहे. आता त्यांना सत्ते पासून जनताच दूर करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

 

      जयंत पाटील म्हणालेमहाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार स्वाभिमानी आहेत. या उमेदवारांना मतदार संसदेत पाठवणार आहेत. भाजप- महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही.  दिलेला उमेदवार त्यांना बदलावा लागत  असून  आपल्याला जनता आता स्वीकारणार नाहीहे त्यांना कळून चुकले आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. धंगेकर यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे.

 

    मोहन जोशी म्हणालेयंदा पुण्याचा खासदार काँग्रेसचाच होणार. धंगेकर यांना तळागाळातून पाठींबा आहे.

 सुषमा अंधारे म्हणल्यामोदीं सरकारची गॅरंटी ही जाहिराती पुरती आहे. जाहिरात वाईट गोष्टींची होते. जसे की रमी पें आवो ना महाराज. आदर्श घोटाळा70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या लोकांची मोदीं सरकारने  गॅरंटी घेतली आहे. पुण्याचा उडता पंजाब सारखी परिस्थिती सरकारे केली आहे. यावर ते बोलत नाही. रविंद्र  धंगेकर यांनी यावर आवाज उठवला. पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी धंगेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

   सचिन अहिर म्हणालेही लढाई पक्षापुरती नसून हुकूमशाही विरोधात आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना जनता घरी बसवणार आहे.

 

रविंद्र धंगेकर म्हणालेआमची स्वाभिमानाची लढाई आहे. इतिहास सामान्य माणसांचा लिहिला जातो. पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. पुण्यात 10 वर्षात काम केले असा प्रश मी विरोधकांना विचारला असतात्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला.  जनता हुशार आहे आता फसवणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. जनता मला निवडून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

अमोल कोल्हे म्हणालेआत्ता फक्त ट्रेलर दाखवतोपिक्चर दाखवायला आपल्याकडेडं खुप वेळ आहे.

 

देशातल्या जनतेचं ठरलंयबळकट पंजाने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन विजयाची तुतारी फुंकायची.

 

  आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबापाहिजे तेवढा निधी देतो. हा पैसा  काय ह्यांच्या खिशातला आहे काअहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का?

   कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिलीनंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारलीउशीर झाला तर दंड ही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन निवडणुकीसाठी पैसा वापरला जातोय.

  सुप्रिया सुळे म्हणाल्यामाझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर   खूप टीका होत आहे. घटस्फोट होऊन सहा महिने झालेअठरा वर्षे आमच्यासोबत संसार करणारे आता वैयक्तिक टीका करतायेत. मात्र ही निवडणूक आता जनतेच्या हातात गेली आहे.

 

विश्वजित कदम म्हणालेसध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा त्यांनी फासला आहे. आता जनता त्यांना काळीमा फासणार आहे.

 

बाळासाहेब थोरात म्हणलेही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा धंगेकर आहेत. जनतेतू त्यांची मागणी झाली होतीत्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री मविआचा व्हायला हवाहे ध्येय बाळगून काम कराअसे आवाहन यावेळी केले.

 

पृथ्वीराज चव्हाण म्हणालेमोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहेअसे म्हणतात. मात्रमनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होतीतशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली. मोदी फक्त गोलगोल फिरवतात   विकासाची व्याख्या मात्र सांगत नाहीत. मोदी फक्त प्रत्येक ठिकाणी आपला फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहेआपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जाईल.

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे म्हणाले की, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणी सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुण्यासारखे महत्वाचे शहर काँग्रेस पक्षाने विकासित केले मात्र गेल्या १० वर्षात भाजपाने पुण्याला १० वर्ष मागे नेले.

 

 

BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी

BJP Manifesto 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

भांडारी म्हणाले, ‘जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र आहे. या संकल्पपत्रात दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे. अशी भूमिका या आधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला.’

भांडारी पुढे म्हणाले, ‘२०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.’

समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असेही भांडारी म्हणाले.

Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

Categories
Breaking News Political social पुणे

Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

 

Brahmin Samaj Pune – (The Karbhari News Service) –  देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निमित्ताने पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या संस्थांसोबत भाजप नेते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. (Pune Loksabha Election Mahayuti)

यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी (MP Medha Kulkarni), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  दीपक मानकर, पुणे लोकसभेचे उमेदवार  मुरलीधर  मोहोळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष  विश्वजीत देशपांडे, व्यावसायिक किशोर सरपोतदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे केंद्राचे श्री. विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे श्री. चैतन्य जोशी,ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे श्री. अशोक जोशी,श्री प्रमोद जोशी,परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, धीरज जोशी, शैलेश खोपटीकर, डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री.विजय शेकदार,वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे व वेळोवेळी ब्राह्मण समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार व स्वतः वैयक्तिक पातळीवर देखील आपण प्रयत्न करतच असतो या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले गेली 25 वर्ष ज्या भागातून मी राजकारण करत आहे तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला पुत्रवत प्रेम दिले आहे माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले पाहिजे.
ह्या बैठकीत विधानसभा निहाय मेळावे घेऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरविण्यात आले.

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल

 

Shivsena UBT Pune – The Karbhari News Service – लोकसभेचे देशभर बिगूल वाजले. आचारसंहिता सुरु झाली. प्रशासनाने राजकीय नेत्यांचे बोर्ड झाकले. अनेक बॅनर काढले. पण आज पाच दिवस उलटूनही सत्ताधारी भाजप च्या विरोधात कणभर पण कारवाई झाली नाही.  हे प्रशासनाच भाजप साठीच राजकीय वरदान आहे की भीती हा प्रश्न शिवसेना पुणे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहराच्या वतीने करण्यात आला. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांना निवेदन देखील देण्यात आले. (Pune Municipal Corporation (PMC)

शिवसेनेच्या निवेदना नुसार  स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या. परंतू भारतीय जनता पक्षाच्या वतीने या आणि अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करुन स्वच्छ सर्वेक्षणात पुणेकरांची मान खाली घालविण्याचा प्रकार करुन शहर विद्रुपीकरण केले आहे.
तसेच देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असूनही पुणे मनपा प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे. शहरात सर्रासपणे भाजप ने निवडणूक चिन्ह, मोदींच्या घोषणा, भाजप नेत्यांची नावे भिंतींवर लावली आहेत यातून शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.
मागील आठवड्यात शिवसेनेच्या वतीने आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधिकारी माधव जगताप यांना भेटून निवेदन देऊनही त्यावर आजतागायत कारवाई झालेली दिसत नाही .

या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.  पुणे मनपा प्रशासने यावर तत्पर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला लोकशाही च्या रक्षणार्थ पुणे मनपा विरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले .

आयुक्तांनीही आचारसंहितेची कारवाई चालू केली आहे आणि चुकीचे काम करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल करू असे आश्वासन यावेळी दिले .

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे , शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे , पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहर प्रमुख समीर तुपे , आनंद गोयल, प्रशांत राणे, उमेश वाघ, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख , गणेश काकडे, विभागप्रमुख अजय परदेशी, राजेश मोरे, राहुल जेकटे व शिवसैनिक उपस्थित होते .

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी! 

Categories
Breaking News Political पुणे

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी!

| महाविकास आघाडी टाकतेय सावध पाउल

Muralidhar Mohol Pune Loksabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Loksabha Constituency) हा भाजपचा (BJP)  बालेकिल्ला मानला जातो. पुणे लोकसभेसाठी यावेळी भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Ex Mayor Pune Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मात्र जपून आणि सावध पावले टाकताना दिसून येत आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून कळणार आहे कि पुणे लोकसभा निवडणूक किती रंगतदार होणार आहे. (Pune Loksabha Election)
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. सगळेच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. मात्र यात भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. भाजपने उमेदवार जाहीर करण्यात मुसंडी मारली आहे. भाजपने आपल्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. आज भाजपने महाराष्ट्रतील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे.
पुणे लोकसभेसाठी बरेच लोक इच्छुक होते. यामध्ये मोहोळ, जगदीश मुळीक, सुनिल देवधर अशी नावे आघाडीवर होती. अखेर मोहोळ यांच्या नावावर मोहोर उमटवली गेली आहे. मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर राहिले आहेत.
दरम्यान भाजपकडून दोन याद्या जाहीर केल्या तरीही विरोधी पक्षाकडून हालचाल दिसून येत नाही. महाविकास आघाडीने मात्र जपून आणि सावध पाऊल टाकायचे ठरवलेले दिसत आहे. कारण महाविकास आघाडीने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत. पुणे ही सगळ्यासाठी प्रतिष्ठेची जागा आहे. खासकरून भाजप साठी तर जास्तच. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत तेव्हाच कळणार आहे जेव्हा महाविकास आघाडी पुण्यासाठी उमेदवार जाहीर करेल!

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार! | चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

Loksabha election 2024 Mahayuti | लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार!

|  चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

Pune – (The Karbhari News Service) – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शहर प्रमुख प्रमोदनाना भागगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सह मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचच एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री तथा शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम शेतकरी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Ram Mandir Ayodhya Hindi Summary |  राम मंदिर, बीजेपी और कारसेवक |  चुनौती सांस्कृतिक और राजनीतिक विविधता के धागों को एक साथ बुनने की 

Categories
Breaking News cultural Political social देश/विदेश संपादकीय हिंदी खबरे

Ram Mandir Ayodhya Hindi Summary |  राम मंदिर, बीजेपी और कारसेवक |  चुनौती सांस्कृतिक और राजनीतिक विविधता के धागों को एक साथ बुनने की

Ram Mandir Ayodhya Hindi Summary | अयोध्या पौराणिक कथाओं और इतिहास से ओत-प्रोत एक शहर है।  अयोध्या के मध्य में, एक विशाल परियोजना चल रही है – जिसने लाखों लोगों की कल्पना पर कब्जा कर लिया है और भारत के राजनीतिक परिदृश्य में हलचल मचा दी है।  हिंदुओं के लिए सांस्कृतिक और धार्मिक महत्व के प्रतीक राम मंदिर का निर्माण सिर्फ एक भौतिक संरचना नहीं बल्कि एक लंबी सामाजिक-राजनीतिक यात्रा का प्रकटीकरण है।  इस विशाल परियोजना के चौराहे पर भारतीय जनता पार्टी (भाजपा) और कारसेवक हैं, प्रत्येक मंदिर के निर्माण के आसपास की कहानी को आकार देने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं।  (Ram Mandir India)
  ऐतिहासिक संदर्भ
 राम मंदिर की गाथा दशकों पुरानी है, यह स्थल 19वीं सदी से एक विवादास्पद मुद्दा रहा है।  विवादित स्थल पर खड़ी बाबरी मस्जिद धार्मिक और राजनीतिक तनाव का केंद्र बन गई।  1980 और 1990 के दशक में, राम मंदिर निर्माण के आंदोलन ने गति पकड़ी, “जय श्री राम” के नारे मंदिर के पुनर्निर्माण की मांग का पर्याय बन गए।
  बीजेपी की संलिप्तता
  भारत में दक्षिणपंथी राजनीतिक दल भारतीय जनता पार्टी ने राम मंदिर के समर्थन में महत्वपूर्ण भूमिका निभाई।  पार्टी, जिसकी जड़ें वैचारिक मूल संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) में हैं, ने राम जन्मभूमि आंदोलन को अपने राजनीतिक एजेंडे के एक महत्वपूर्ण पहलू के रूप में अपनाया।  बीजेपी नेता लालकृष्ण आडवाणी और अटल बिहारी वाजपेयी समेत लालकृष्ण जैसे दिग्गज नेता भी शामिल हुए.
  राजनीतिक निहितार्थ
 राम मंदिर का मुद्दा भारतीय राजनीति में एक निर्णायक कारक है, खासकर भाजपा के लिए।  20वीं सदी के अंत में पार्टी के उदय का मंदिर निर्माण के लिए उसे मिले समर्थन से गहरा संबंध था।  1992 में कारसेवकों द्वारा बाबरी मस्जिद का विध्वंस, देश के इतिहास की एक दुखद घटना थी, जिसने इस मुद्दे पर राजनीतिक उत्साह को और बढ़ा दिया।  इसके बाद समुदायों का ध्रुवीकरण और पहचान की राजनीति का उदय भारत के राजनीतिक परिदृश्य में महत्वपूर्ण कारक बन गए।
  कारसेवक
 आंदोलन के पैदल सैनिक: “कारसेवक” शब्द उन स्वयंसेवकों को संदर्भित करता है जिन्होंने राम मंदिर के निर्माण के लिए आंदोलन में सक्रिय रूप से भाग लिया था।  धार्मिक उत्साह और कर्तव्य की भावना से प्रेरित होकर, इन व्यक्तियों ने जनमत को आकार देने और राजनीतिक प्रतिष्ठान पर दबाव डालने में महत्वपूर्ण भूमिका निभाई।  हालाँकि, कारसेवक विवाद का विषय बन गए हैं, खासकर बाबरी मस्जिद विध्वंस के बाद।  इस घटना के कारण सांप्रदायिक तनाव और कानूनी अड़चनें पैदा हुईं।
  रास्ते में आगे:
 राम मंदिर के निर्माण की शुरुआत के साथ भारत की सांस्कृतिक और राजनीतिक कथा में एक नया अध्याय सामने आया।  मंदिर कई हिंदुओं के लिए लंबे समय से चली आ रही आकांक्षा की पूर्ति का प्रतिनिधित्व करता है, जबकि अन्य के लिए यह धर्मनिरपेक्षता और धार्मिक बहुलवाद पर सवाल उठाता है।  राम मंदिर आंदोलन के मद्देनजर महत्वपूर्ण चुनावी जीत हासिल करने वाली भाजपा के सामने शासन के जटिल परिदृश्य से निपटने और बहुलवादी समाज की विविध जरूरतों को पूरा करने की चुनौती है।
 राम मंदिर, बीजेपी और कारसेवकों की कहानी भारतीय इतिहास और राजनीति के ताने-बाने में गहराई से जुड़ी हुई है।  जैसे-जैसे मंदिर आकार लेता है, यह न केवल धार्मिक आस्था का बल्कि संस्कृति, पहचान और शासन के बीच की जटिलताओं का भी प्रतीक बन जाता है।  भारत के सामने चुनौती इन विविध धागों को समेटने और एक ऐसा रास्ता बनाने की है जो एकता, समावेशिता और सह-अस्तित्व की भावना को बढ़ावा दे।
  ——-

Ram Mandir Ayodhya | राम मंदिर, भाजप आणि कारसेवक |  सांस्कृतिक आणि राजकीय विविधतेचे धागे एकत्र गुंफणे हे आहे आव्हान 

Categories
Breaking News cultural social देश/विदेश संपादकीय

Ram Mandir Ayodhya | राम मंदिर, भाजप आणि कारसेवक |  सांस्कृतिक आणि राजकीय विविधतेचे धागे एकत्र गुंफणे हे आहे आव्हान

अयोध्या(Ayodhya) म्हणजे पौराणिक कथा आणि इतिहासाने नटलेले शहर. अयोध्येच्या मध्यभागी, एक स्मारक प्रकल्प चालू आहे – ज्याने लाखो लोकांच्या कल्पनेवर कब्जा केला आहे आणि भारताचे राजकीय परिदृश्य ढवळून काढले आहे.  हिंदूंसाठी सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाचे प्रतीक असलेल्या राममंदिराचे (Ram Mandir) बांधकाम हे केवळ भौतिक संरचना नसून दीर्घकाळ चाललेल्या सामाजिक-राजकीय प्रवासाचे प्रकटीकरण आहे.  या प्रचंड प्रकल्पाच्या छेदनबिंदूवर भारतीय जनता पक्ष (BJP) आणि कारसेवक (Karsevak) आहेत, प्रत्येकजण मंदिराच्या बांधकामाच्या सभोवतालचे कथानक तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. (Ram Mandir India)
 ऐतिहासिक संदर्भ
राममंदिराची गाथा अनेक दशकांपूर्वीची आहे, 19व्या शतकापासून या जागेचा वाद विवादित मुद्दा आहे.  वादग्रस्त जागेवर उभी असलेली बाबरी मशीद धार्मिक आणि राजकीय तणावाचा एक फ्लॅश पॉइंट बनली.  1980 आणि 1990 च्या दशकात राममंदिराच्या उभारणीच्या चळवळीला वेग आला, “जय श्री राम” च्या जयघोषाने मंदिराच्या पुनर्बांधणीच्या मागणीचा समानार्थी शब्द बनला.
 भाजपचा सहभाग 
 भारतातील उजव्या विचारसरणीचा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने राममंदिराचे समर्थन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या वैचारिक पालक संघटनेमध्ये मूळ असलेल्या पक्षाने रामजन्मभूमी आंदोलनाला त्याच्या राजकीय अजेंडाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून स्वीकारले.  एल.के.सारख्या दिग्गजांसह भाजपचे नेते लालकृष्ण  अडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीची मागणी करणाऱ्या कोट्यवधी हिंदूंच्या भावनांशी धोरणात्मकपणे पक्षाशी जुळवून घेतले.
 राजकीय परिणाम
राममंदिराचा मुद्दा भारतीय राजकारणात, विशेषतः भाजपसाठी एक निर्णायक घटक आहे.  20 व्या शतकाच्या उत्तरार्धात पक्षाचा उदय हा मंदिराच्या बांधकामाला मिळालेल्या समर्थनाशी जवळचा संबंध होता.  1992 मध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली, जी देशाच्या इतिहासातील एक दुःखद घटना होती, त्यामुळे या मुद्द्याभोवती राजकीय उत्साह आणखी वाढला.  समुदायांचे त्यानंतरचे ध्रुवीकरण आणि अस्मितेच्या राजकारणाचा उदय हे भारताच्या राजकीय परिदृश्यातील महत्त्वाचे घटक बनले.
 कारसेवक
चळवळीचे पायदळ सैनिक: “कारसेवक” ही संज्ञा राममंदिराच्या उभारणीच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना सूचित करते.  धार्मिक आवेशाने आणि कर्तव्याच्या भावनेने प्रेरित झालेल्या या व्यक्तींनी जनमत तयार करण्यात आणि राजकीय आस्थापनांवर दबाव आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  कारसेवक मात्र वादाचा विषय ठरले आहेत, विशेषत: बाबरी मशीद विध्वंसानंतर.  या घटनेमुळे जातीय तणाव आणि कायदेशीर परिणाम झाले.
 पुढचा रस्ता: 
राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय कथनात एक नवा अध्याय उलगडला.  हे मंदिर अनेक हिंदूंच्या दीर्घकालीन आकांक्षेच्या पूर्ततेचे प्रतिनिधित्व करते, तर इतरांसाठी ते धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक बहुलवाद यावर प्रश्न उपस्थित करते.  राममंदिर आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर लक्षणीय निवडणूक विजय मिळवून भाजपला प्रशासनाच्या गुंतागुंतीच्या परिदृश्यात नेव्हिगेट करण्याचे आणि बहुलवादी समाजाच्या विविध गरजा पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
राम मंदिर, भाजप आणि कारसेवकांची कहाणी भारताच्या इतिहासाच्या आणि राजकारणाच्या जडणघडणीत खोलवर गुंफलेली आहे.  मंदिर जसजसे आकार घेते तसतसे ते केवळ धार्मिक श्रद्धेचेच नव्हे तर संस्कृती, अस्मिता आणि शासन यांच्यातील गुंतागुंतीचेही प्रतीक बनते.  या वैविध्यपूर्ण धाग्यांचा ताळमेळ साधणे आणि एकता, सर्वसमावेशकता आणि सहअस्तित्वाची भावना वाढविणारा मार्ग पुढे नेणे हे भारतासमोरचे आव्हान आहे.
 ——-

 “Ram Mandir, BJP, and Karsevak: Unraveling the Threads of India’s Cultural and Political Tapestry”

Categories
Breaking News cultural Political social देश/विदेश

 “Ram Mandir, BJP, and Karsevak: Unraveling the Threads of India’s Cultural and Political Tapestry”

 

In the heart of Ayodhya, a city steeped in mythology and history, a monumental project is underway—one that has captured the imagination of millions and stirred the political landscape of India. The construction of the Ram Mandir, a symbol of cultural and religious significance for Hindus, is not just a physical structure but a manifestation of a long-standing socio-political journey. At the intersection of this colossal project are the Bharatiya Janata Party (BJP) and the Karsevaks, each playing a pivotal role in shaping the narrative surrounding the temple’s construction.

The Historical Context: The saga of the Ram Mandir dates back several decades, with the dispute over the site being a contentious issue since the 19th century. The Babri Masjid, which stood on the disputed site, became a flashpoint for religious and political tensions. The movement for the construction of the Ram Mandir gained momentum in the 1980s and 1990s, with the rallying cry of “Jai Shri Ram” becoming synonymous with the demand for the temple’s reconstruction.

BJP’s Involvement: The Bharatiya Janata Party, a right-wing political party in India, played a crucial role in championing the cause of the Ram Mandir. The party, with its roots in the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), an ideological parent organization, embraced the Ram Janmabhoomi movement as a key aspect of its political agenda. The BJP’s leaders, including stalwarts like L.K. Advani and Atal Bihari Vajpayee, strategically aligned the party with the sentiments of millions of Hindus who sought the reconstruction of the temple.

Political Implications: The Ram Mandir issue has been a defining factor in Indian politics, particularly for the BJP. The party’s rise to prominence in the late 20th century was closely linked to its support for the temple’s construction. The demolition of the Babri Masjid in 1992 by Karsevaks, which was a tragic episode in the country’s history, further fueled the political fervor around the issue. The subsequent polarization of communities and the rise of identity politics became key elements in the political landscape of India.

Karsevaks: Foot Soldiers of the Movement: The term “Karsevak” refers to the volunteers who actively participated in the movement for the construction of the Ram Mandir. These individuals, motivated by religious fervor and a sense of duty, played a crucial role in shaping public opinion and putting pressure on the political establishment. The Karsevaks, however, have been a subject of controversy, especially in the aftermath of the Babri Masjid demolition. The incident led to communal tensions and legal repercussions.

The Road Ahead: With the commencement of the construction of the Ram Mandir, a new chapter unfolds in India’s cultural and political narrative. The temple represents a fulfillment of a longstanding aspiration for many Hindus, while for others, it raises questions about secularism and religious pluralism. The BJP, having realized a significant electoral victory on the back of the Ram Mandir movement, faces the challenge of navigating the complex landscape of governance and addressing the diverse needs of a pluralistic society.

Conclusion: The story of the Ram Mandir, the BJP, and the Karsevaks is deeply intertwined with the fabric of India’s history and politics. As the temple takes shape, it becomes a symbol not just of religious faith but also of the intricate relationship between culture, identity, and governance. The challenge for India lies in reconciling these diverse threads and forging a path forward that fosters unity, inclusivity, and the spirit of coexistence.