Amit Shah on Sharad Pawar | ५८ वर्षांत तुम्ही गरिबांसाठी काय केलं | अमित शाह यांचा काँग्रेस ला सवाल | शरद पवारांना दिली भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी उपमा

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

Amit Shah on Sharad Pawar | ५८ वर्षांत तुम्ही गरिबांसाठी काय केलं | अमित शाह यांचा काँग्रेस ला सवाल | शरद पवारांना दिली भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार अशी उपमा

Amit Shah On Congress – (The Karbhari News Service) – शरद पवार (Sharad Pawar) हे  भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, असा आरोप अमित शाह (Amit Shah) यांनी केला.  यावेळी अमित शाह यांना काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसवाले खूप अपप्रचार करत आहेत. आम्ही गरीब, दलित, आदिवासींचं कल्याण करणार, असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र मी आज हे विचारायला आलो आहे की,   ५८ वर्षांपर्यंत तुमची सत्ता होती. या काळात तुम्ही गरिबांसाठी काय केलं. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणं दूर राहिलं. यांनी त्यांचे विचार समाप्त करण्याचं काम केलं. दहा वर्षांमध्ये गरीबांचं कल्याण करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं आहे, असं अमित शाह म्हणाले. (BJP Adhiveshan Pune)

भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शाह बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. 

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार यांना लक्ष्य केलं. ते म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वेगवेगळे संभ्रम पसरवण्यास सुरुवात केली आहे. मी आज शरद पवार यांना विचारू इच्छितो की, आमच्याकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे सर्वजण बोलत आहेत. आता मी एक निरीक्षण नोंदवू इच्छितो, जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं. मात्र जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेवर येतात तेव्हा मराठा आरक्षण गायब होतं, असं अमित शाह म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिक मांडताना अमित शाह यांनी सांगितलं की, मागच्या काही काळात खूप भ्रम पसरवले गेले. भाजप आरक्षण संपविणार असे सांगितले गेले. आम्ही उत्तर देण्यामध्ये संकोच करू लागलो. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. मात्र आज मी सांगू इच्छितो की, आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ ही नरेंद्र मोदींचं पूर्ण बहुमताचं सरकार असतानाच दिली गेली. तसेच आरक्षणाला बळ देण्याचं कामही नरेंद्र मोदी यांनी केलं.

 

शहा म्हणाले, देशसुरक्षेसाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. येत्या दोन वर्षात देश नक्षलवादापासून मुक्त होईल. आतंकवाद मुळापासून काढला आहे.  देशाच्या सुरक्षेला औरंगाबाद फॅन क्लब करू शकत नाही. आघाडीवाले फॅन क्लब आहे. त्यांचे नेता उद्धव ठाकरे आहेत. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यासोबत ते बसत आहेत. संभाजीनगरला विरोध करताता त्या़च्याजवळ ते बसतात. लाज वाटली पाहिजे. हे सुरक्षित करू शकत नाहीत.

 

देशाला पुन्हा दाखवून द्या आणि महाराष्ट्रात भाजपला विजयी करा. इतिहासातील सर्वात मोठा विजय येथे होईल. महाराष्ट्रात शरद पवारांना विचारतो की, केंद्रात, राज्यात दहा वर्षे तुमचे सरकार होते. तुम्ही खोटे आश्वासन‌ दिले. बाकी काहीच दिले नाही.  दहा वर्षात १० हजार ५ कोटी रूपये महाराष्ट्राला दिले आहेत. त्यांनी काहीच केले नाही. रस्ते ७५ कोटी, रेल्वे २ लाख कोटी दिले. १ लाख कोटी मुंबई बुलेट ट्रेन केले. ११ हजार कोटींचा पालखी मार्ग केला. पवारांनी कसला विकास केला. पवारांनी दहा वर्षे कृषी मंत्री होते. मी दीड मिनिटांत साखर कारखान्यांचे काम केले. लाडकी बहिण योजना आली. पवार साहेब म्हणातात नवीन काय. पण तुम्ही का नाही केले. पुन्हा भाजपची सरकार येईल.

मी अनेक जयपराजय पाहिले आहेत. पण जिंकल्यावर अहंकार येतो. राहुल गांधी हे हरल्यानंतर अहंकारी बनले आहेत. जनतेने मोदींच्या कामावर मोहोर लावली आहे. म्हणून तर मोदी विजयी झाले. आपल्या २४० जागा आल्या.  अजून थोडी कसर राहिली आहे, आता ती भरून काढू. विधानसभेला पुन्हा भगवा फडकावू.  देशाचे सरकार भाजपच बनवेल हे जनतेने ठरवले आहे. म्हणून तिसऱ्यांदा आपले सरकार आले असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

BJP Sanvad Yatra | भाजपाची राज्यस्तरीय संवाद यात्रा | 21 तारखेला पुण्यात पाच हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

BJP Sanvad Yatra | भाजपाची राज्यस्तरीय संवाद यात्रा |  21 तारखेला पुण्यात पाच हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

| चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

BJP Maharashtra- (The Karbhari News Service) – विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. येत्या २१ जुलै रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून त्यात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख पक्की ठरणार आहे.

ते कोराडी (नागपूर) येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पुण्यात होणाऱ्या अधिवेशनात अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

* संवाद यात्रा

महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे.

* संघटनात्मक बैठक

21 जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी 19 तारखेला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव ही बैठक घेणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.

* विरोधकांची भूमिका निंदनीय

आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचा राजकारण करत आहे हे जनतेला दिसले. चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे.

Pune MP Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार | पुण्यावरही राहणार विशेष ‘फोकस’

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Pune MP Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार | पुण्यावरही राहणार विशेष ‘फोकस’

 

Pune MP Murlidhar Mohol – (The Karbhari News Service) – पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. यावेळी या विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर दोन दिवसांनी आज केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. नायडू यांनीही आज पदभार स्विकारला. यावेळी मोहोळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी ‘देशभरातील विमानतळांची संख्या वाढविणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, यावर आपला अधिक भर असेल,’ असे मोहोळ यांनी सांगितले. यानंतर नायडू व मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरी हवाई मंत्रालयातील प्रशासन व निर्णय अधिक गतिमान करू व प्रवाशांसाठी, तसेच हवाई वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलू,’ असे यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि १०० दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रांतील कंपन्या, तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मोहोळ म्हणाले.
…………….

पुण्यावरही राहणार विशेष ‘फोकस’

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर मोहोळ म्हणाले, ‘ही खूप मोठी जबाबदारी आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींच्या सरकारमधले हे महत्त्वाचे खाते आहे. या क्षेत्रात आव्हानं खूप असली तरी गेल्या दहा वर्षात या विभागात खूप मोठे काम झाले आहे. तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न असेल. मला आठवते आहे, पुण्याचा महापौर असताना पुण्याचे प्रश्न घेऊन इथे आलो होतो. मात्र, त्यावेळी स्वप्नातही वाटले नव्हते, आपण समोरच्या खुर्चीवर कधीकाळी बसू. भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपलब्ध करून दिलेली ही मोठी संधी आहे.

‘पुढच्या १० वर्षातं सगळे बदललेले असेल. जनतेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून महाराष्ट्रातील पुरंदर विमानतळ, पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, टर्मिनल सुरु करणे, नवी मुंबई विमानतळ हे महत्त्वाचे विषय मार्गी लावणार आहोत. शिवाय महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करुन गती देण्याचा प्रयत्न आहे. देशाचे काम करताना महाराष्ट्राच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष होणार नाही.’

Pune BJP Manifesto |  पुण्यासाठी भाजपचे संकल्पपत्र | प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित 

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP Manifesto |  पुण्यासाठी भाजपचे संकल्पपत्र | प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

 

Pune BJP Manifesto – (The karbhari News Service) – पुणे: भविष्यातील विकसीत , सुरक्षित आणि पर्यावरणपुरक विकासाचा संकल्प महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हे संकल्प पत्र बुधवारी प्रकाशित करण्यात आले. (Murlidhar Mohol Pune Loksabha)

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, आमदार आशिष देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे नेते बाबु वागस्कर,आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनावणे,  लहुजी  क्रांती सेनेचे नितीन वायदंडे, महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख अमोल कविटकर, उपस्थित होते.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम आणि वेगवान बनविणार.
नगर रस्ता, सातारा रस्ता, जुना मुंबई-पुणे रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजीनगर ते हिंजवडी, तसेच कोथरूड उपनगर या मार्गांवर विस्तारित मेट्रो मार्गांची आखणी व्हावी आणि हे मार्ग जलदगतीने पूर्ण व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.

दौंड-पुणे-तळेगाव-लोणावळा ईएमयू, पुणे-दौंड लोकल सेवा आणि नाशिक-पुणे मार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार. पुणे स्टेशन, शिवाजीनगर, खडकी, हडपसर स्टेशनचा आधुनिक पद्धतीने विकास करणार. – लोहगाव, पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडे (एनएचएआय) पुणे-नगर रस्त्यावर येरवडा ते शिक्रापूरदरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाबाबत पाठपुरावा करणार.

पुणे शहरासाठी संकल्प
समान पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने पूर्ण करणार. पुण्यातील जुने तलाव, विहिरी, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणार.नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण करून पूर्ण क्षमतेने चालविणार.

पुण्याभोवतालच्या टेकड्या, वनक्षेत्राचे कसोशीने संरक्षण करणार. वेस्ट टू वेल्थ’च्या माध्यमातून कचर्‍यातून ऊर्जानिर्मिती, खत उत्पादन अशा पर्यावरणपूरक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणार. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार.

कचरामुक्त पुण्यासाठी शहराच्या विविध भागांत प्लॉगेथॉन उपक्रम नियमित राबविणार, ई-कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्प उभारणार. सोसायट्या, सार्वजनिक ठिकाणे, व्यावसायिक संकुले येथे सौरऊर्जा वापराला प्रोत्साहन देणार. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ (एम्स) पुण्यात उभारण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनुसार पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार.

महापालिकेचे ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय’ पूर्ण क्षमतेने सुरू करणार, महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालय उभारणार. रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना होणार्‍या त्रासापासून सुरक्षा मिळावी, याकडे विशेष लक्ष देणार. सुधारित नियमावली वापरून ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’अंतर्गत झोपडपट्टीधारकांना सदनिका देणार.

रिक्षा सेवेसाठी शासकीय पातळीवर ॲप विकसित करणार. विविध कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधीतून तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम राबविणार. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे क्रीडा विद्यापीठाच्या उभारणीसाठी प्रयत्न करणार. विद्यार्थी व शिक्षण संस्थांना पुणे परिसरातील कंपन्या हॉस्पिटल, आयटी सेक्टरसह अन्य उद्योगांशी जोडणार.

संगमवाडी येथील आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळाच्या कामाला गती देणार. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडे वाड्याचे स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे वारसास्थळांच्या परिसरातील बांधकामांत अडथळा येऊ नये यासाठी पाठपुरावा करून निश्चित धोरण आखणार.

पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महापालिकेत विलीन करणे व या परिसरातील ‘एफएसआय’ वाढविणे यासाठी पाठपुरावा करणार.

पुण्यातील गणेशोत्सव परंपरा आणि नवतेचा संगम साधत अधिक वैभवशाली होण्यासाठी विचारविनिमय करणार. शहरातील जागांच्या योग्य आणि न्याय्य वापरासाठी धोरण आखणार आहे.
—————–
जनतेचा जाहीरनामा
‘पुणे नेक्स्ट’ या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांना त्यांच्या अपेक्षा मांडण्यासाठी आवाहन केले होते. यातून हजारो सूचना आल्या. त्यातील काही निवडक सूचनांचा ‘संकल्पपत्रा’मध्ये समावेश केला आहे. यातील सूचना केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या संस्थांच्या अधिकारकक्षांत येतात. याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न त्या-त्या स्तरावर निश्चितपणे केला जाईल.
पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर आठवड्यातून एकदा ‘नो व्हेईकल झोन’ उपक्रम राबवावा. काँक्रीट मिक्सर्स आणि जड वाहनांना मुख्य शहरात सकाळी 8.30 ते 10.30 आणि सायंकाळी 5.30 ते रात्री 10 प्रवेश बंदी करावी. महिन्यातील एक दिवस सार्वजनिक वाहने, इलेक्ट्रिक वाहने किंवा सायकलच्या वापरासाठी राखून ठेवावा. प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीने दर तीन महिन्यांतून एकदा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवावा. टेकड्या, शाळा, सार्वजनिक आस्थापना येथील वृक्षसंवर्धनाची जबाबदारी उद्योग क्षेत्रे, बँका यांनी घ्यावी.सार्वजनिक उत्सवांमधील डीजेचा वापर थांबवावा.स्ट्रीट फूड्सची गुणवत्ता राखण्यासाठी सातत्याने तपासणी व्हावी.पाण्याची नासाडी रोखण्यासाठी गळणारे नळ, फुटक्या पाईपलाईन्स, गळते टँकर यांच्यावर अंकुश ठेवावा. केंद्र व राज्य सरकारांच्या मोकळ्या जागांवर वनीकरण कार्यक्रम राबवावा.पाऊस येताच मोठ्या प्रमाणात ड्रेनेज तुंबतात आणि पाणी साचते. यासदंर्भात पावले उचलावीत.सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता प्राधान्याने आणि दर चार तासांनी व्हावी.वारसास्थळांच्या परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ धोरण राबविणार. रामवाडी मेट्रो विमानतळापर्यंत घेवून जाणार असल्याचे संकल्प आखण्यात आला आहे.
————————-
पुणे शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प आखण्यात आला आहे. पायाभुत विकास, पर्यावरण, वाहतुक, नवीन रस्ते, अशा योजनांसाठी प्रयत्न करणार पीएमपीच्या ताफ्यात इलेट्रीक बसची संख्या वाढविण्यात येईल. मेट्रोच्या विस्ताराचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी कार्यालय चोवीस तास खुले असणार आहे.
महायुतीचे उमेदवार, मुरलीधर मोहोळ
———————
पुणे शहराचे प्रश्‍न मोदी सरकारने सोडवले आहेत. मेट्रो, नदीसुधार प्रकल्प, चांदणी चौकाचे प्रश्‍न सोडवण्यात आले आहेत. पुण्यासाठी केंद्र सरकारने इलेट्रीकल बस दिल्या, जायका प्रकल्पासाठी अनुदान देण्यात आले आहे. पुण्याच्या विकासाचे  नियोजन उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे ( भाजप प्रदेशाध्यक्ष)
————–

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

Categories
Breaking News Political पुणे

Pune Cantonment Constituency | महाविकास आघाडीसाठी ‘पुणे कॅंटोन्मेंट’ निर्णायक ठरणार !

 

Pune Cantonment Constituency- (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Loksabha) पुणे कॅंटोन्मेंट मतदारसंघ (Pune Cantonment Constituency) निर्णायक ठरणार आहे. विशेष करून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बाजूने या मतदारसंघात कौल मिळणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा भाजपसाठी ‘डेंजर झोन ‘ असलेला हा मतदारसंघ परिवर्तनास हातभार लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Pune Loksabha Election 2024)

पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा मतांचे ‘गणित’ कोण कोणत्या विधानसभा मतदारसंघात फिसकटू शकते याचा आढावा घेतला तर यंदा भाजपच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण होणार आहे. मुख्यत्वे वडगावशेरी , पुणे कॅंटोन्मेंट या दोन विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची चिन्हे आहे. इतकेच नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीतही परिवर्तन घडू शकते.अशी स्थिती आहे. त्यात सहाही विधानसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठा समाजाची भूमिका ही महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते.असे राजकीय अभ्यासकांचे ठाम मत आहे.

पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात गत लोकसभा निवडणुकीत मिळालेले मतदान पाहता, महायुती पर्यायाने भाजपला ६७,१७७ तर महा विकास आघाडीला ५४,४४४ मते आणि वंचितला १४,६९९ व अन्य असे एकूण १,४०,३६४ मतदान झाले. यंदा या मतदारसंघात एकूण २ लाख ८० हजार ४०० मतदारांपैकी पुरुष १लाख ४३ हजार ०४५,महिला १लाख ३७ हजार ३२२ तर ३३ तृतीय पंथीय मतदार आहेत.सद्यस्थितीत इंडिया फ्रंटच्या एकीमुळे या मतदारसंघातही महाविकास आघाडी सरस ठरली आहे. गतवेळी मत विभाजनासाठी वंचित कारणीभूत ठरल्याची चर्चा जोरात झाली होती. मात्र भाजपची बी टीम म्हणून वंचितची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे यंदा महायुतीच्या मतांचे समीकरण बिघडण्यास वंचितच कारणीभूत ठरणार आहे. त्यात एमआयएमही स्वतंत्रपणे रिंगणात असली तरी मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते महाविकास आघाडीच्या पारड्यात जाणार आहे. आंबेडकरी चळवळीचे तसेच मुस्लिम समाजाचे मतदान हे महाविकास आघाडीसाठी जमेचे ठरणार आहे. एकप्रकारे आंबेडकरी चळवळ आणि मुस्लीम समाजाच्या एक गठ्ठा मतांपासून भाजप यंदा ‘वंचित’ होऊ शकतो. त्यात २००९ नंतर भाजपने सलग हा विधानसभा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे.

मात्र विद्यमान आमदार सुनील कांबळे हे केवळ ५ हजार १२ मताधिक्य घेऊन विजयी झाले होते.मात्र या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रमेश बागवे यांना दुसऱ्या क्रमांकाची 47 हजार 148 मते मिळाली होती. आता राजकीय स्थिती बदलेली आहे आणि त्यावरून मतदारांच्या भावना संतप्त आहे. त्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी मतदारसंघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्यात सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचे काटेकोरपणे नियोजन त्यांनी केले आहे. माजी नगरसेवक अविनाश बागवे हेही मोदी सरकारच्या योजनांचा पंचनामा करत आहे.त्यात पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हेही याच मतदारसंघातील असून त्यांनी जोरदार ताकद लावली आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

याचबरोबर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची सभा याच मतदारसंघात पार पडली आणि या सभेने संपूर्ण चित्र पालटले आहे. राहुल गांधी यांच्या सभेने मतदारांवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसला प्राबल्य मिळणार आहे. सद्यस्थितीत इंडिया फ्रंटमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ( उबाठा )आप व सर्व घटक पक्षांची बांधलेली मोट काँग्रेसच्या मतांचे समीकरण दृढ करेल असा ठाम विश्वास राजकीय अभ्यासकांचा आहे. प्रामुख्याने दाट लोकवस्ती असलेला हा मतदारसंघ संमिश्र आहे. कष्टकरी वर्गाचे मोठे प्रमाण आहे. वाढती महागाई हाच मुद्दा महायुतीला गारद करणार आहे.

या मतदारसंघात स्व. गिरीश बापट यांना १२७३३ मतांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दारुण पराभव पत्करत बालेकिल्ला ही ओळख भाजपने जशी गमावली आहे.
तशी भाजपमधील अंतर्गत दुफळीमुळे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात लोकसभाच काय आगामी विधानसभा मतदारसंघाचे चित्र महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरणार आहे. विशेषतः राष्ट्रवादीच्या विभाजनाचा सर्वाधिक फटका हा या मतदारसंघात भाजपला बसणार आहे. त्यामागे स्थानिक पातळीवरील राजकीय महत्वाकांक्षा हे प्रमुख कारण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी – कार्यकर्ते मनापासून सहभाग देतील का ? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपची या मतदारसंघावर पकड आता कमकुवत झाली आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीला सहज खेचून आणता येईल.यासाठी हा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे.

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

 

 

Mahavikas Aghadi Vs BJP – (The karbhari News Service) – मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्डनोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहेत्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार एमआयएम व वंचितच्या माध्यमातून उभे करण्यात आलेअसा आरोप महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी केला.

 

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडेमाजी महापौर कमल व्यवहारेमाजी नगरसेवक रफीक शेखअजित दरेकर उपस्थित होते.

 

अरविंद शिंदे म्हणालेभाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड आणि नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. विरोधकांवर बोलणारे भाजप नेते या दोन विषयांवर शब्द काढत नाहीत. जे पंतप्रधान दहा वर्षात‌ पत्रकारांना उत्तर देवू शकले नाहीतमग‌ ते जनतेला काय खरे बोलणार. दहा वर्ष जनतेला फसवणारे भाजप आज विकासाच्या नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहे. पुण्याचे उमेदवारही रामाचे नाव घेवून मते मागत आहेत. मात्र पुणेकर व देशातील सर्व मतदार या निवडणुकीत राम मंदिरावर नाही तर विकासावर मतदान करतील. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे भाजपने वंचित व एमआयएमला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते‌ कसे उभे‌ केले हे त्यांनात माहित. यांना पुणे मतदार‌संघात उमेदवार मिळाला नाहीम्हणून दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातून आयात केले. या दोन पक्षाला मत म्हणजे भाजपला मतहे दलित आणि मुस्लिम समाजाला कळून चुकले आहे‌. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना पुणेकर महागाईबेरोजगारी व शहरातील ढासळलेला कायदा‌ व सुव्यवस्थेचा डोळ्यासमोर ठेवून धंगेकर यांना निवडून देतीलअशा विश्वास‌ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

 

प्रशांत जगताप म्हणालेभाजपचे जे उमेदवार आहेत ते महापालिकेत स्थायी‌ समिती अध्यक्ष होतेमहापौर होते. या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या टेंडरमध्येच लक्ष घातले.   भाजपने समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोळ्यात धुळफेक‌ केली आहे. विविध योजनेच्या नावाखाली पुणेकरांना फसवण्याचे काम केले आहे. आता निवडणुकीच्या काळात महायुतीला शहरात मुळशी पॅटर्न आणायचा आहेअसेही‌ते म्हणाले.

 

गजानन थरकुडे म्हणालेभाजपने कोथरुडमधून पालकमंत्रीखासदार दिले. कोथरूडला सत्ताकेंद्र केले. तरीही कोथरुडचा विकास झाला नाही. कोथरुडचा जो विकास‌ झाला तो माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याच काळात झाला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना काय कामे केली त्यातील केवळ चार कामे त्यांनी सांगावीत. विकासाचे गाजर दाखवून निवडणुक लढवली जात आहे. सुनेला पाठवा दिल्लीत लेकीला ठेवा गल्लीत अशी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेताना थरकुडे म्हणालेगोऱ्हे यांना स्वत:ला नगरसेवक म्हणून निवडून येता‌येत नाहीना त्या एक नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. तरीही शिवसेनेने त्यांना गेल्या २० ते २२ वर्षे विधान परिषदेच्या आमदार केले.

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे

Sharad Pawar | भाजपाने दहा वर्षे जनतेची फसवणूक केली – शरद पवार

 

Sharad Pawar – (The karbhari News Service) – आज ज्यांच्या हातात सत्ता आहेत्यांनी गेली दहा वर्षे जनतेची फसवणूक केली. शेतकऱ्यांचे प्रश्नमहागाईबेरोजगारीमहिलांची सुरक्षितता याबाबत केलेली वक्तव्य आणि वस्तुस्थिती यात जमीन-अस्मानचा फरक आहे. तरूणांना दरवर्षी नोकरीराजगारांचे आश्वासन देऊन त्यांचीदेखील फसवणूक केली आहे. त्यामुळे   जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहेअसा विश्वास जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

 

    जिल्हाधिकारी कार्यालयापासून  भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह जिल्हाभरातून आलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर हॉटेल शांताई येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभास्थळी उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते वाढवण्यात आला.

 

यावेळी ते बोलत होते. या वेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातकाँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदमराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटीलशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर सुषमा अंधारे आणि आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटकेमाजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशीपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगतापआमदार संग्राम थोपटेसंजय जगतापरोहित पवारमाजी आमदार उल्हासदादा पवारदीप्ती चवधरीजयदेव डोळे ,अशोक पवारमाजी उपमहापौर अंकुश काकडेरोहिणी खडसे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरेगजानन थरकुडेआम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर उपस्थितीत होते.

 

       काँग्रेसराष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षशिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेतेपदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांनी धंगेकर इंडिया आघाडीचा विजय असोअशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

 

     शरद पवार म्हणालेपंतप्रधान मोदी 2014 मध्ये सत्तेत आले. त्यावेळी पेट्रोलचे दर 71 रुपये होते. मोदी म्हणालेपन्नास दिवसांत पेट्रोलचे दर कमी  करतो. आज 3 हजार 650 दिवस झालेआज दर 106 रुपये झाले. घरगुती गॅस बाबत मोदी म्हणाले410 रुपयांवरून कमी आणणार. आता 1 हजार 160 रुपये झाला. मोदी तरूणांना रोजगार देणार होते. प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होतेउलट रोजगार टक्का घसरला. आज 86 टक्के तरुण बेरोजगार आहेत. याचा अर्थ शब्द द्यायचा अन तो फिरवायचा. त्यामुळे जनतेने आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाहीहा ठाम निर्णय घेतला आहे. मोदींनी जनतेची वेळोवळी फसवणूक केली आहे. आता त्यांना सत्ते पासून जनताच दूर करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.

 

      जयंत पाटील म्हणालेमहाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार स्वाभिमानी आहेत. या उमेदवारांना मतदार संसदेत पाठवणार आहेत. भाजप- महायुतीला अजूनही उमेदवार मिळत नाही.  दिलेला उमेदवार त्यांना बदलावा लागत  असून  आपल्याला जनता आता स्वीकारणार नाहीहे त्यांना कळून चुकले आहे. त्यांचा आत्मविश्वास हरवला आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. धंगेकर यांच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे.

 

    मोहन जोशी म्हणालेयंदा पुण्याचा खासदार काँग्रेसचाच होणार. धंगेकर यांना तळागाळातून पाठींबा आहे.

 सुषमा अंधारे म्हणल्यामोदीं सरकारची गॅरंटी ही जाहिराती पुरती आहे. जाहिरात वाईट गोष्टींची होते. जसे की रमी पें आवो ना महाराज. आदर्श घोटाळा70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या लोकांची मोदीं सरकारने  गॅरंटी घेतली आहे. पुण्याचा उडता पंजाब सारखी परिस्थिती सरकारे केली आहे. यावर ते बोलत नाही. रविंद्र  धंगेकर यांनी यावर आवाज उठवला. पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी धंगेकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

   सचिन अहिर म्हणालेही लढाई पक्षापुरती नसून हुकूमशाही विरोधात आहे. शिवसेना फोडणाऱ्यांना जनता घरी बसवणार आहे.

 

रविंद्र धंगेकर म्हणालेआमची स्वाभिमानाची लढाई आहे. इतिहास सामान्य माणसांचा लिहिला जातो. पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही. पुण्यात 10 वर्षात काम केले असा प्रश मी विरोधकांना विचारला असतात्यांनी दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा आराखडा सांगितला.  जनता हुशार आहे आता फसवणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. जनता मला निवडून देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

अमोल कोल्हे म्हणालेआत्ता फक्त ट्रेलर दाखवतोपिक्चर दाखवायला आपल्याकडेडं खुप वेळ आहे.

 

देशातल्या जनतेचं ठरलंयबळकट पंजाने स्वाभिमानाची मशाल पेटवायची अन विजयाची तुतारी फुंकायची.

 

  आता हे म्हणतायेत कचाकचा बटन दाबापाहिजे तेवढा निधी देतो. हा पैसा  काय ह्यांच्या खिशातला आहे काअहो आम्हा जनतेकडून तुम्ही कर घेता अन त्या कराच्या जोरावर तुम्ही कचाकचा बटन दाबायला सांगता का?

   कोट्यवधींना मोफत खाती उघडून दिलीनंतर त्या खात्यात दोन हजार रुपये रक्कम ठेवावीच लागेल असा नियम आणला. मग या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक करायला लावलं. हे करण्यासाठी दोनशे रुपये फी आकारलीउशीर झाला तर दंड ही आकारला. मग हा निधी फोडाफोडी अन निवडणुकीसाठी पैसा वापरला जातोय.

  सुप्रिया सुळे म्हणाल्यामाझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर   खूप टीका होत आहे. घटस्फोट होऊन सहा महिने झालेअठरा वर्षे आमच्यासोबत संसार करणारे आता वैयक्तिक टीका करतायेत. मात्र ही निवडणूक आता जनतेच्या हातात गेली आहे.

 

विश्वजित कदम म्हणालेसध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा त्यांनी फासला आहे. आता जनता त्यांना काळीमा फासणार आहे.

 

बाळासाहेब थोरात म्हणलेही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. तिन्ही उमेदवार निवडून येणारे आहेत. सर्वसामान्यांचा चेहरा धंगेकर आहेत. जनतेतू त्यांची मागणी झाली होतीत्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. बाळासाहेब थोरात यांनी पुढील मुख्यमंत्री मविआचा व्हायला हवाहे ध्येय बाळगून काम कराअसे आवाहन यावेळी केले.

 

पृथ्वीराज चव्हाण म्हणालेमोदी भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहेअसे म्हणतात. मात्रमनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती जशी होतीतशीच कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आलो असतो. हे मी नव्हे तर देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो. याला मोदींची धोरणं कारणीभूत ठरली. मोदी फक्त गोलगोल फिरवतात   विकासाची व्याख्या मात्र सांगत नाहीत. मोदी फक्त प्रत्येक ठिकाणी आपला फोटो झळकवतात. 48 ठिकाणी त्यांचे फोटो झळकवले आहेत. त्यांना भीती आहेआपला फोटो जनतेसमोर नसेल तर जनता आपल्याला विसरून जाईल.

 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे म्हणाले की, लोकशाही, सर्व धर्म समभाव आणी सामाजिक समता या विचारांची शिदोरी घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पुण्यासारखे महत्वाचे शहर काँग्रेस पक्षाने विकासित केले मात्र गेल्या १० वर्षात भाजपाने पुण्याला १० वर्ष मागे नेले.

 

 

BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

BJP Manifesto 2024 | भाजपचे संकल्पपत्र ‘विकसित भारता’चा रोड मॅप | माधव भांडारी

BJP Manifesto 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

भांडारी म्हणाले, ‘जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र आहे. या संकल्पपत्रात दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा घेतला आहे. अशी भूमिका या आधी कोणत्याही राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला.’

भांडारी पुढे म्हणाले, ‘२०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे राहण्याचा संकल्प करण्यात आला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.’

समान नागरी कायदा लवकरात लवकर लागू व्हावा ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असेही भांडारी म्हणाले.

Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

Categories
Breaking News Political social पुणे

Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

 

Brahmin Samaj Pune – (The Karbhari News Service) –  देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निमित्ताने पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या संस्थांसोबत भाजप नेते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. (Pune Loksabha Election Mahayuti)

यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी (MP Medha Kulkarni), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  दीपक मानकर, पुणे लोकसभेचे उमेदवार  मुरलीधर  मोहोळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष  विश्वजीत देशपांडे, व्यावसायिक किशोर सरपोतदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे केंद्राचे श्री. विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे श्री. चैतन्य जोशी,ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे श्री. अशोक जोशी,श्री प्रमोद जोशी,परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, धीरज जोशी, शैलेश खोपटीकर, डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री.विजय शेकदार,वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे व वेळोवेळी ब्राह्मण समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार व स्वतः वैयक्तिक पातळीवर देखील आपण प्रयत्न करतच असतो या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले गेली 25 वर्ष ज्या भागातून मी राजकारण करत आहे तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला पुत्रवत प्रेम दिले आहे माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले पाहिजे.
ह्या बैठकीत विधानसभा निहाय मेळावे घेऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरविण्यात आले.

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल

 

Shivsena UBT Pune – The Karbhari News Service – लोकसभेचे देशभर बिगूल वाजले. आचारसंहिता सुरु झाली. प्रशासनाने राजकीय नेत्यांचे बोर्ड झाकले. अनेक बॅनर काढले. पण आज पाच दिवस उलटूनही सत्ताधारी भाजप च्या विरोधात कणभर पण कारवाई झाली नाही.  हे प्रशासनाच भाजप साठीच राजकीय वरदान आहे की भीती हा प्रश्न शिवसेना पुणे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहराच्या वतीने करण्यात आला. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांना निवेदन देखील देण्यात आले. (Pune Municipal Corporation (PMC)

शिवसेनेच्या निवेदना नुसार  स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या. परंतू भारतीय जनता पक्षाच्या वतीने या आणि अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करुन स्वच्छ सर्वेक्षणात पुणेकरांची मान खाली घालविण्याचा प्रकार करुन शहर विद्रुपीकरण केले आहे.
तसेच देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असूनही पुणे मनपा प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे. शहरात सर्रासपणे भाजप ने निवडणूक चिन्ह, मोदींच्या घोषणा, भाजप नेत्यांची नावे भिंतींवर लावली आहेत यातून शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.
मागील आठवड्यात शिवसेनेच्या वतीने आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधिकारी माधव जगताप यांना भेटून निवेदन देऊनही त्यावर आजतागायत कारवाई झालेली दिसत नाही .

या विरोधात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहराच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.  पुणे मनपा प्रशासने यावर तत्पर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला लोकशाही च्या रक्षणार्थ पुणे मनपा विरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले .

आयुक्तांनीही आचारसंहितेची कारवाई चालू केली आहे आणि चुकीचे काम करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल करू असे आश्वासन यावेळी दिले .

यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे , शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे , पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहर प्रमुख समीर तुपे , आनंद गोयल, प्रशांत राणे, उमेश वाघ, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख , गणेश काकडे, विभागप्रमुख अजय परदेशी, राजेश मोरे, राहुल जेकटे व शिवसैनिक उपस्थित होते .