Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप

 

 

Mahavikas Aghadi Vs BJP – (The karbhari News Service) – मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्डनोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहेत्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार एमआयएम व वंचितच्या माध्यमातून उभे करण्यात आलेअसा आरोप महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी केला.

 

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडेमाजी महापौर कमल व्यवहारेमाजी नगरसेवक रफीक शेखअजित दरेकर उपस्थित होते.

 

अरविंद शिंदे म्हणालेभाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड आणि नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. विरोधकांवर बोलणारे भाजप नेते या दोन विषयांवर शब्द काढत नाहीत. जे पंतप्रधान दहा वर्षात‌ पत्रकारांना उत्तर देवू शकले नाहीतमग‌ ते जनतेला काय खरे बोलणार. दहा वर्ष जनतेला फसवणारे भाजप आज विकासाच्या नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहे. पुण्याचे उमेदवारही रामाचे नाव घेवून मते मागत आहेत. मात्र पुणेकर व देशातील सर्व मतदार या निवडणुकीत राम मंदिरावर नाही तर विकासावर मतदान करतील. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे भाजपने वंचित व एमआयएमला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते‌ कसे उभे‌ केले हे त्यांनात माहित. यांना पुणे मतदार‌संघात उमेदवार मिळाला नाहीम्हणून दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातून आयात केले. या दोन पक्षाला मत म्हणजे भाजपला मतहे दलित आणि मुस्लिम समाजाला कळून चुकले आहे‌. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना पुणेकर महागाईबेरोजगारी व शहरातील ढासळलेला कायदा‌ व सुव्यवस्थेचा डोळ्यासमोर ठेवून धंगेकर यांना निवडून देतीलअशा विश्वास‌ शिंदे यांनी व्यक्त केला.

 

 

प्रशांत जगताप म्हणालेभाजपचे जे उमेदवार आहेत ते महापालिकेत स्थायी‌ समिती अध्यक्ष होतेमहापौर होते. या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या टेंडरमध्येच लक्ष घातले.   भाजपने समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोळ्यात धुळफेक‌ केली आहे. विविध योजनेच्या नावाखाली पुणेकरांना फसवण्याचे काम केले आहे. आता निवडणुकीच्या काळात महायुतीला शहरात मुळशी पॅटर्न आणायचा आहेअसेही‌ते म्हणाले.

 

गजानन थरकुडे म्हणालेभाजपने कोथरुडमधून पालकमंत्रीखासदार दिले. कोथरूडला सत्ताकेंद्र केले. तरीही कोथरुडचा विकास झाला नाही. कोथरुडचा जो विकास‌ झाला तो माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याच काळात झाला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना काय कामे केली त्यातील केवळ चार कामे त्यांनी सांगावीत. विकासाचे गाजर दाखवून निवडणुक लढवली जात आहे. सुनेला पाठवा दिल्लीत लेकीला ठेवा गल्लीत अशी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेताना थरकुडे म्हणालेगोऱ्हे यांना स्वत:ला नगरसेवक म्हणून निवडून येता‌येत नाहीना त्या एक नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. तरीही शिवसेनेने त्यांना गेल्या २० ते २२ वर्षे विधान परिषदेच्या आमदार केले.

Sharad Pawar in Congress Bhavan | दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार

तब्बल दोन दशकानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आज पुण्याच्या काँग्रेस भवनात (Congress Bhavan pune) पाऊल ठेवलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (INC)  १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांना काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आलं होतं. काँग्रेस भवनात दाखल होतात काँग्रेस नेत्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं. सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना केली होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीदरम्यान (
Loksabha Election) पवारांनी पुण्यातील काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली होती.

भाजपच्या काँग्रेसमुक्त भारत या नाऱ्यावर आणि काँग्रेसशिवाय तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात त्यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, “काही लोक कॉंग्रेसमुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही प्रमाणात आहेत. पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावं लागणार आहे. सत्ताधारी पक्ष हा देशामध्ये विद्वेष निर्माण करत आहे. आत्ताचं सरकार काँग्रेसविरोधी विद्वेशाची भावना कशी निर्माण होईल यातच धन्यता मानत आहे. पण काँग्रेसी विचार सोडता येणार नाहीत. काँग्रेस पक्षाला मी धन्यवाद देतो की त्यांनी मला वर्धापनदिनानिमित्त काँग्रेस भावनात येण्याचं आमंत्रण दिलं”

संयुक्त महाराष्ट्र होण्यात पुण्याच्या काँग्रेस भवनाचं महत्वाचं योगदान

मी पहिल्यांदा सन 1958 मध्ये कॉंग्रेस भवनमधे आलो होतो. आज अनेक वर्षांनी पुन्हा आलोय. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असं त्यावेळी समीकरण होतं. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचं केंद्र इथेच होतं. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूतून चालायचा. इथून कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हेअन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यामध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचं योगदान मोठं आहे, अशी आठवणही यावेळी शरद पवार यांनी सांगितली.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने स्नेह मेळावा ” चहापान ” कार्यक्रम काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आले. या प्रसंगी अनेक प्रतिष्ठित मान्यवर या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.विविध पक्षातील नेते उपस्थित राहून अनेक जुन्या आठवनींना उजाळा देत स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला. शरद पवार  यांनी काँग्रेस भवन येथे ऐतिहासिक व भारत जोडो यात्रेतीक छायाचित्र प्रदर्शन ची पाहणी केली.अरविंद शिंदे ( पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ) यांनी गाई वासरू देऊन पवार साहेबांचे सत्कार केले. या प्रसंगी शाहू महाराज छत्रपती, श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, बाबा आढाव व अनेक नामवंत मंडळी यांनी काँग्रेस भवन ला भेट दिली.

Arvind Shinde | Pune Congress | अरविंद शिंदे यांनी स्विकारला पुणे काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्‌भार

Categories
Breaking News Political पुणे

अरविंद शिंदे यांनी स्विकारला पुणे काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्‌भार

 पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदाचा पद्‌भार माजी अध्यक्ष रमेश बागवे यांच्या कडून अरविंद शिंदे यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये स्विकारला.

     शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरिय नवसंकल्प शिबीरामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या झालेल्या ठरावानुसार ५ वर्षांपेक्षा जास्त संघटनेतील असलेल्या पदांचा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यामध्ये पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड व रोहित टिळक या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले होते. त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांनी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीला प्रभारी अध्यक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक अरविंद शिंदे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

     आज काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या पद्‌भार स्विकारण्याच्या कार्यक्रमामध्ये बोलताना रमेश बागवे म्हणाले की, ‘‘माझ्या सारख्या मातंग समाजातील कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने पुण्यासारख्या शहराचे अध्यक्ष पद दिले हे माझ्यासाठी आमदार, मंत्री पदापेक्षा मोठे होते. अध्यक्ष असताना शहरातील निष्ठावान व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेवून व पदाधिकारी व नगरसेवकांना विचारात घेवून पक्षाचे काम गेली ६ वर्ष मी प्रामाणिकपणे केले.’’

     नवनिर्वाचित प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यावेळी म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाचे काम करीत असताना एक युवक काँग्रेसचा कार्यकर्ता ते पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या प्रवासामध्ये अनेकांनी मला साथ दिली. पक्षाचे प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ आज अध्यक्ष पदाच्या रूपाने मला मिळाले. यामागे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, एच. के. पाटील, मा.ना.बाळासाहेब थोरात, सुशिलकुमार शिंदे, मा.ना.अशोक चव्‍हाण, पृथ्वीराज चव्‍हाण, मा.ना.सुनिल केदार, संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांच्या सहकार्याने आगामी पुणे महानगरपालिकेच्या

निवडणुकीत पूर्ण ताकदीने व काँग्रेस पक्षाच्या हिताचे काम मी करेन. त्याचबरोबर येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला विचारात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय महानगरपालिकेत व शहरामध्ये होणार नाही. या पध्दतीचे काम शहरामध्ये पक्ष संघटना म्हणून मी करेन.’’

     यावेळी माजी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी राज्यस्तरीय नवसंकल्प शिबीरामध्ये झालेल्या निर्णयांची माहिती उपस्थितांना दिली.

     यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, संजय बालगुडे, कमल व्‍यवहारे, अमीर शेख, गोपाळ तिवारी, सोनाली मारणे, दत्ता बहिरट, कैलास कदम, संगीता तिवारी, रमेश अय्यर, पुजा आनंद, राहुल शिरसाट, भुषण रानभरे, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, सतीश पवार, प्रविण करपे, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, शोएब इनामदार, प्रदिप परदेशी, सुनील घाडगे, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, रजनी त्रिभुवन, सुनिल शिंदे, नीता रजपूत, राजेंद्र शिरसाट, शिवाजी बांगर, अस्लम बागवान, मुख्तार शेख, संदीप मोकाटे, राहुल तायडे, सुजित यादव, मेहबुब नदाफ, राजू शेख, दिपक निनारिया, मीरा शिंदे, दिपक ओव्‍हाळ, विठ्ठल गायकवाड, दत्ता पोळ, गौरव बोराडे, लतेंद्र भिंगारे, नंदलाल धिवार, शैलजा खेडेकर, सुंदर ओव्‍हाळ, सुरेश कांबळे, बबलु कोळी, योगेश भोकरे, अंजली सोलापूरे, शिलार रतनगिरी, अजित ढोकळे, किशोर मारणे, संतोष आरडे आदी उपस्थित होते.