Pune Cantonment Vidhansabha | Pune Congress | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी | काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी 

Categories
Breaking News Political पुणे

Pune Cantonment Vidhansabha | Pune Congress | पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी | काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी

 

Pune Cantonment Vidhansabha – (The Karbhari News Service) – आगामी विधानसभा निवडणुकीत ‘पुणे कॅंटोन्मेंट विधान
सभा मतदारसंघ मधून बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Congress)

नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरातील २१४, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा, हा मतदार संघ राखीव असल्याने गेल्या तीन वेळा या ठिकाणी बौद्ध समाजाला संधी मिळाली नाही. समाजनिहाय जनसंख्ये नुसार पुणे शहरातील मागासवर्गीय समाजापैकी सर्वाधिक लोकसंख्या ही बौद्ध समाजाची आहे. तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात सुद्धा बौद्ध समाजाची संख्या अधिक  आहे. गेली २५ वर्ष पुणे शहरात उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे यावेळी बौद्ध समाजाला उमेदवारी न दिल्यास समाजात तीव्र नाराजी पसरेल आणि काँग्रेस ला मतदार संघात पराभव स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे कि,  जयपूर अधिवेशनाच्या ठरावा नुसार 2 वेळा उमेदवारी देऊन जर पराभव झाला असेल तर त्याला उमेदवारी देऊ नये. अशा नियमावली करण्यात आली होती. यामुळे आपल्याला विधानसभा तिकीट मिळणार नाही याची खात्री झाल्याने आणि त्यामुळे निराश झाल्याने एक इच्छुक घराणेशाही राबवू इच्छित आहेत. संबंधित इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करू पाहत आहेत. तसेच काँग्रेस ला खच्ची करण्याचे काम देखील सुरु आहे. त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन बौद्ध समाजाला उमेदवारी द्यावी. अशी मागणी नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे.

| भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करा

ठराविक नेते म्हणजे पुणे शहर काँग्रेस नसून भाजपच्या उंबरठ्यावर असलेल्या नेत्यांना काँग्रेसने निवडणुकीच्या आधीच बाहेरचा रस्ता दाखवावा अशा मागणीसाठी  बहुसंख्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी  आज प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची भेट घेतली.

निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर काँग्रेस पक्षातील वातावरण प्रदूषित करून फोडाफोडीचे राजकारण करणारे नेते यांना आता सामान्य कार्यकर्ते वैतागले आहे. अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीचे आश्वासन घेतलेले कधी तळ्यात कधी मळ्यात राहणारे, असे विरोधी नेत्यांना आता हाकलून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी भावना कॉंग्रेस पदाधिकारी यांनी व्यक्त केली.

  • पदाधिकारी बदलले जाणार नाहीत

नाना पटोले यांच्यासोबत झालेल्या बैठकी वेळी के सी वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथेला हे देखील उपस्थित होते. त्यांनी सांगतिले कि, सध्या आहेत तेच पदाधिकारी विधानसभा निवडणुकीसाठी राहतील. त्यात कुठलाही बदल केला जाणार नाही. मात्र विधानसभेचा उमेदवार देताना नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. असे निर्णय या बैठकीत झाले. अशी माहिती सूत्रांनी दिली.

यावेळी बाळासाहेब शिवरकर, आनंद गाडगीळ, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, माजी नगरसेविका वैशालीताई मराठे, सुजाता शेट्टी, लताताई राजगुरू, रफिक शेख ,मेहबूब नदाफ, अजित दरेकर, संगीता  तिवारी, माजी नगरसेवक नंदलाल दिवार, माजी नगरसेवक संतोष आरडे मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुजित आप्पा यादव, सर्व ब्लॉग अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष, एन एस सी अध्यक्ष, क्रीडा अध्यक्ष, मायनॉरिटीचे अध्यक्ष त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी, शहराचे उपाध्यक्ष शहराचे सरचिटणीस सेलचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

India Aghadi | विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय | काँग्रेस भवनात जल्लोष

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

India Aghadi | विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय | काँग्रेस भवनात जल्लोष

Congress Bhavan Pune – (The Karbhari News Service) – सात राज्यांमधील विधानसभा पोटनिवडणुकीत (Vidhansabha By Election) इंडिया आघाडीने (India Aghadi) १० जागा जिंकल्याबद्दल काँग्रेस भवनात (Congress Bhavan Pune) कार्यकर्त्यांनी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) आणि आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांच्या उपस्थितीत आज (रविवारी) जल्लोष केला.

लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ इंडिया आघाडीची घोडदौड चालू राहिल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पेढे वाटले, फटाक्यांची आतषबाजी केली.

पवित्र तीर्थक्षेत्र बद्रीनाथ येथील जागा, हिमाचल प्रदेशातील दोन जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या. या पवित्र तीर्थक्षेत्रांवर इंडिया आघाडीला मिळालेला विजय अर्थपूर्ण आहे, असे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी सांगितले.

या विजयी आनंदोत्सवात पीएमटी चे माजी चेअरमन चंद्रशेखर कपोते, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे समन्वय किशोरी मीना, युवक काँग्रेस पुणे चे अध्यक्ष सौरभ अमराळे, पीएमटी चे माजी सदस्य ॲड.शाबीर खान, माजी नगरसेवक आयुब पठाण, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सरचिटणीस सुरेश कांबळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, चेतन अग्रवाल, इंद्रजीत ताकवले, ॲड.निलेश बोराटे, चंदाबाई कांबळे, धनंजय देशमुख, विजय वारभुवन, गोरख पळसकर, उमेश कंधारे, चंदन पाचंगे, योगेश चव्हाण ,साहिल राऊत, फैयाज शेख, आनंद खन्ना, मंगेश थोरवे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Parvati Vidhansabha Election | ‘पर्वती’ साठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले! | उमेदवारी कुणालाही मिळू द्या, एकदिलाने काम करण्याचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

Parvati Vidhansabha Election | ‘पर्वती ‘ साठी काँग्रेस कार्यकर्ते एकवटले! | उमेदवारी कुणालाही मिळू द्या,एकदिलाने काम करण्याचा निर्धार

 

Parvati Vidhansabha Election – (The Karbhari News Service) – उमेदवारी कुणालाही मिळू द्या, आम्ही एकदिलाने काम करू असा निर्धार व्यक्त करताना यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षालाच मिळाला पाहिजे. अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (Pune Congress)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul Pune Congress)  यांच्या पुढाकारातून काँग्रेस कार्यकर्ता – पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अडीचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी यंदा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळावा यासाठी एकीचे दर्शन घडवले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड (Abhay Chajed Pune congress), प्रदेशच्या महिला अध्यक्षा व पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे, स्नेहल पाडळे,युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष सौरभ अमराळे, घन:श्याम सावंत,नंदकुमार बानगुडे, हेमंत बागुल आणि पर्वती ब्लॉक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, सिंहगड रस्ता परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी येत्या विधानसभा निवडणुकीत पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळाला पाहिजे यासाठी लवकरच शिष्टमंडळासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेवून या मतदारसंघाच्या मागणीवर ठाम राहण्याचेही यावेळी ठरले.

यावेळी या मतदारसंघातून निवडणुकीसाठी तीव्र इच्छुक असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी यंदा मी निवडणूक लढणारच हे यावेळी जाहीर करताच उपस्थितांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला.
माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, पर्वती विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि आजही येथे काँग्रेस विचारधारेला मानणारे मतदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळाला पाहिजे. ही सर्वांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी उमेदवारी कोणालाही मिळाली तरी चालेल मात्र सर्वजण एक दिलाने काम निश्चित करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत 

 

Pune Vidhansabha Election 2024 – (The Karbhari News Service) – राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या पुणे शहरातील २०८ वडगांवशेरी, २०९ शिवाजीनगर, २१० कोथरूड, २१२ पर्वती, २१४ पुणे कॅन्टॉन्मेंट, २१५ कसबा,  २११ खडकवासला, २१३ हडपसर या आठही मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Pune congress) 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार आहे. हे अर्ज उमेदवारांनी सोमवार ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत, पुढे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. 

अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune BJP Vs Pune Congress | पुण्याच्या वाहतुक कोंडीला काँग्रेसच जबाबदार | भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची टीका

 

Pune BJP – (The Karbhari News Service) – काँग्रेसच्या (Pune Congress) नेतृत्वातील दूरदृष्टी व इच्छाशक्तीचाअभाव, नियोजनशून्य कारभार आणि राजकीय उदासीनता यामुळे पुणेकरांना सध्याच्या वाहतूक कोंडीचा (Pune Traffic Congestion) त्रास सहन करावा लागत असल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे )Dheeraj Ghate BJP) यांनी केली. (Pune News)

शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने काँग्रेसने काल घोड्यावरून रपेट असे आंदोलन केले होते. त्यावर घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे.

घाटे म्हणाले, शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणावी यासाठी 1987 च्या विकास आराखड्यात (Pune DP) एचसीएमटीआर (HCMTR) हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. शहर आणि उपनगरांना 38 किलोमीटरच्या मार्गाने जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. परंतु काँग्रेसच्या सत्ता काळात त्यांना या प्रकल्पाला साधी मान्यताही देता आली नाही. वाहतुकीची कोंडी बिकट होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. महायुती सरकारने नुकतीच या प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

पुणे महापालिका (Pune Municipal Corporation-PMC) क्षेत्रातील उड्डाणपुलासाठीची भूसंपादन प्रक्रिया महापालिकेने करून द्यावी सर्व उड्डाणपूल बांधण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल असा प्रस्ताव युती सरकार सत्तेत असताना तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. त्यावेळी पुणे महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती. उड्डाणपूल बांधले गेले तर त्याचे श्रेय भाजपला मिळेल या भीतीने काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळून लावला. काँग्रेसच्या सत्ता काळात जे उड्डाणपूल बांधले ते नियोजन शून्य होते. म्हणूनच विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडावा लागला. त्यामुळेही शहरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

मेट्रो सेवा (Pune Metro) सुरु करावी असा प्रस्ताव मंजूर करणारी पुणे महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका होती. सन 2005 मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला. परंतु पुढच्या दहा वर्षांमध्ये अन्य महानगरांमध्ये मेट्रो सुरू झाली पुण्यात ती सुरू होऊ शकली नाही याला काँग्रेसचे उदासीन नेतृत्व जबाबदार होते. सार्वजनिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा मेट्रो प्रकल्प भाजपने मान्यता देऊन सुरू केला. त्याचा पहिला टप्पा पूर्णही केला आणि दुसऱ्या टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. काँग्रेसने वेळीच मेट्रोचे काम सुरू केले असते तर आज उद्भवलेली वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली नसती.

सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याचा उद्देशाने निवडणुका डोळ्या समोर ठेवून काँग्रेसने कात्रज ते स्वारगेट या मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी सुरू केली. परंतु घाईघाईने केलेल्या या प्रकल्पामध्ये अनेक त्रुटी राहिल्या. परिणामी बीआरटी प्रकल्प अपयशी ठरला. वाहतूक कोंडी होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी सन 2012 ते 2017 काँग्रेसच्या सत्ता काळात महापालिकेत एकही नवीन बसची खरेदी करण्यात आली नाही. सन 2017 ते 22 या कालावधीत 1000 हून अधिक पर्यावरण पूरक बसेसची खरेदी भारतीय जनता पार्टीने केली. भाजपने नेहमीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य दिले आहे.

त्यामुळे काँग्रेसने काल केलेले आंदोलन ही स्टंटबाजी असून चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका घाटे यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाने यासाठी पुणेकरांची माफी मागावी अशी मागणी घाटे यांनी केली आहे.

Pune Congress Agitation | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधीत  चिखलफेको आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Pune Congress Agitation | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महायुती सरकारच्या विरोधीत  चिखलफेको आंदोलन

 

Congress Vs Mahayuti – (The Karbhari News Service) – महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते बियाणांचा काळा बाजार, वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जनतेवर होणाऱ्या अन्याया विरोधी  भाजपा महायुती सरकारच्या निषेधार्थ चिखल फेको आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरीकष्टकरीदलितअल्पसंख्याकमहिलातरूणगरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराजराजर्षी शाहू महाराजमहात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. सरकारी नोकर भरती केली जात नाही. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीतह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागतेशेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदाकापूससोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाहीसरकार एमएसपी देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. NEET परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या सरकारने धोक्यात आणले आहे. पब संस्कृती व ड्रग्जचे तरूणांमध्ये वाढते प्रमाण, महागाईबेरोजगारीपेपरफुटीहिला सुरक्षाखतेबि-बियाणांचा काळाबाजारकर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूकचिखलात सुरु असलेली पोलीस भरतीराज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, श्रीमंताची मुले नशेमध्ये धुंद होऊन दिवसाढवळ्या गोरगरीब जनतेला गाडीखाली चिरडत आहे, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही हे ‘चिखल फेको’ आंदोलन करीत आहोत.’’

यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह मा गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, आमदार रविंद्र धंगेकर, मा मंत्री बाळासाहेब शिवरकर, मा महापौर कमलताई व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयज छाजेड, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय बालगुडे,मा गटनेते आबा बागुल, मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक चंदुशेठ कदम, मा नगरसेवक रफिक शेख, मा नगरसेविका लताताई राजगुरू, मा नगरसेविका सुजाताताई शेट्टी, मा नगरसेवक कैलास गायकवाड,अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, ओ बी सी सेलचे प्रदेश पदाधिकारी साहिल केदारी, ओ बी सी सेलचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, पुणे शहर उपाध्यक्ष सतिश पवार, ब्लॉक अध्यक्ष अक्षय माने,राजु ठोंबरे, रविंद्र माझिरे, रमेश सोनकांबळे, हेमंत राजभोज, दिलीप तुपे, पुणे शहर सरचिटणीस उषाताई राजगुरू, सुंदरताई ओव्हाळ,रवी आरडे, मतीन शेख, रवी ननावरे, वाल्मिकी जगताप,नुर शेख, बाबा सय्यद, रॉबर्ट डेव्हिड, द स पोळेकर, सुरेश नांगरे, अनिल पवार, अविनाश अडसूळ, सुनील काळोखे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Congress on Pune Rain | मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने महापालिका आयुक्तांकडे केल्या या मागण्या!

 

Pune Congres – PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये पुणे शहरात पावसाळी परिस्थितीमुळे उद्‌भवलेला हाहाकार व नागरिकांची होणारी प्रचंड गैरसोय या बबातची जाणीव मा. आयुक्त यांना करून देण्यात आली. निवेदन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

नाल्याच्या कडेला व पात्रात झालेली गुंठेवारीतील बांधकामे, पुराच्या पाण्याचा लोंढा जाण्यासाठी नाल्याचे अपुरे पात्र, मैलापाणी वाहून आणणारे नाल्यातील चेंबर्स, पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा अभाव, चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले ‘कल्व्हर्ट्स’ यामुळे शहरात एकजरी जोरदार पावूस झाल्यास पूरस्थिती निर्माण होतें हा गेल्या तीन चार वर्षांपासून पुणे शहराच्या अवस्थेचा अनुभव असतानाही पुणेकरांच्या नशिबी मान्सून काळात वारंवार
पूरस्थिती, वाहतूक कोंडी व वित्तीय हानी यांना हतबलतेणे सामोरे जायचे एव्हढेच राहिले आहे. असा आरोप कॉंग्रेस कडून करण्यात आला.

पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खालील मागण्या आयुक्त पुणे मनपा यांच्याकडे करण्यात  आल्या 

१) मान्सूनपूर्व व मान्सून कालावधीतील सर्व कामे आयुक्त स्तरावरून दक्षता विभागाच्या निगराणीखाली करण्यात यावी.
२) चुकीच्या पद्धतीने नाले वळवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी जाण्याचे प्रकार घडत असल्यामुळे आयुक्तांच्या अधिकारात नाला वळवण्यास दिलेल्या सर्व परवानग्या रद्दबातल करून नाल्यांचा प्रवाह नैसर्गिक परिस्थिती प्रमाणे पूर्ववत करण्यात यावा.
३) पुणे शहरातील नाल्यातील चौकातील फुटपात वरील अतिक्रमणे तातडीने काढून टाकण्यात यावे.
४) पुणे शहरातील साईड मार्जिन फ्रंट मार्जिन नालापात्र इमारतीच्या टेरेसवर निकषाशी विसंगत असलेल्या सर्व जाहिरात फलकांवर युद्ध स्तरावर कारवाई करण्यात यावी.
५) शहरात जागोजागी रस्त्यांवर खड्डे पाडायचे प्रमाण वाढले असल्याने रस्त्यावर खड्डे पडल्यास रातोरात सदर खड्डे बुजवण्याची यंत्रणा उभी करून रस्ते खड्डे मुक्त ठेवण्यात यावेत.

 

     यावेळी माजी आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्‍यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, सुजात शेट्टी, महिला अध्यक्षा पुजा आनंद, समीर शेख, संतोष आरडे, सुनिल शिंदे, युवक अध्यक्ष राहुल शिरसाट, मेहबुब नदाफ, सुजित यादव, हेमंत राजभोज, रमेश सकट, अक्षय माने, रमेश सोनकांबळे, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, बाळासाहेब अमराळे, सतिश पवार, प्रदिप परदेशी, रवि ननावरे, राजेंद्र शिरसाट, जयसिंग भोसले, शिवराज भोकरे, आशितोष शिंदे, सुंदर ओव्‍हाळ, प्रकाश पवार, सुनिल घाडगे, रवि पाटोळे, ऋषिकेश बालगुडे, महेश हराळे, नारायण पाटोळे, रवि आरडे आदींसह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune Congress | Pune Lok Sabha | पुणे काँग्रेस ची विजयाची तयारी पूर्ण! शहर अध्यक्षांची पदाधिकाऱ्या सोबत बैठक! 

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | Pune Lok Sabha | पुणे काँग्रेस ची विजयाची तयारी पूर्ण! शहर अध्यक्षांची पदाधिकाऱ्या सोबत बैठक!

Pune Loksabha Election 2024 Results – (The Karbhari News Service) – उद्या लोकसभा निवडणूक मतमोजणी होणार आहे. यात पुणे काँग्रेस ला विजयाची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे काँग्रेस ने विजयाची तयारी केली आहे.
त्या संदर्भात पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक अध्यक्ष व व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक कॉंग्रेस भवन येथे झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड,मा आमदार दिप्तीताई चवधरी, मा महापौर कमलताई व्यवहारे, मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक रफिक शेख, प्रदेश प्रतिनिधी महेबुब नदाफ यांच्या सह सर्व ब्लॉक अध्यक्ष,व पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे लोकसभेची निवडणूक ही मुख्यत्वे काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर, महायुतीचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात होती. Exit poll मध्ये पुण्याची जागा महायुतीच्या पारड्यात पडणार असे दाखवण्यात आले आहे. मात्र काँग्रेला पूर्ण विश्वास आहे कि, ही जागा आपणच जिंकणार आहोत. त्यामुळे काँग्रेस ने उद्याच्या विजयाची तयारी पूर्ण केली आहे. गुलाल, फटाके अशा सर्व गोष्टी तयार ठेवण्यात आल्या आहेत. निकाल लागल्यानंतर जल्लोष केला जाणार आहे. असे काँग्रेस च्या सूत्रांनी सांगितले.

 

Koregaon Park Traffic | Mohan Joshi | कोरेगाव पार्क- बंडगार्डन मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोहन जोशी पुन्हा एकदा धावले

Categories
Breaking News Political पुणे

Koregaon Park Traffic | Mohan Joshi | कोरेगाव पार्क- बंडगार्डन मधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोहन जोशी पुन्हा एकदा धावले

 

Koregaon Park Traffic – (The Karbhari News Service) – पुण्यातील रस्ता वाहतुकीच्या समस्या सोडवण्या साठी नागरिकांच्या सहभागातून ‘वेक-अप पुणेकर’ हे अभियान मा. आमदार मोहन दादा जोशी प्रभावीपणे चालवीत आहेत. बंडगार्डन-कोरेगाव पार्क मधील स्थानिक रहिवाशांना या वाहतूक बदलां मुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी मा. आमदार मोहनदादा जोशी पुन्हा एकदा धावून आले.  (Mohan Joshi Pune Congress)

साधू वासवानी पुलाच्या प्रस्तावित पाडकामा साठी पुलावरील वाहतूक बंद करून वाहतूक विभागाने कोरेगाव पार्क-बंडगार्डन भागात वाहतुकीचे मोठे बदल केले आहेत. या मुळे गेल्या शनिवारपासून या भागातील रहिवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागत आहे. शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी या वाहतूक कोंडी चा कळसच झाला होता. ज्या मुळे या भागात दिवसभर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बंडगार्डन रस्ता, मंगलदास रस्ता यावर एकेरी वाहतूक तसेच बऱ्याच ठिकाणी या भागातील रस्ते बॅरिकेड टाकून वाहतूक विभागा तर्फे बंद करण्यात आलेले आहेत. वाहनांची अचानक वाढलेली मोठी वाहतूक, रस्त्यांची अपुरी क्षमता, वाहतूक पोलिसांची नेहमीची कमतरता, हे बदल करताना स्थानिक रहिवाशांशी चर्चा न करणे, करण्यात आलेल्या बदलांमुळे प्रवासाचे वाढलेले अंतर व वेळ, ट्रांसलेट ट्रॅफिक मुळे स्थानिक रहिवाशांचे होणारी मोठी गैरसोय या मुळे या भागातील नागरिकांना, विशेषतः जेष्ठ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करायला लागत आहे. गेल्या पाच महिन्यापासून करण्यात आलेल्या विविध प्रयोगानंतर देखील कुठलीही ठोस व प्रभावी उपाययोजना वाहतूक विभागातर्फे करण्यात येऊ नये याविषयी स्थानिक नागरिकांची मोठी तक्रार होती.

पुण्यातील रस्ता वाहतुकीच्या समस्या सोडवण्या साठी नागरिकांच्या सहभागातून ‘वेक-अप पुणेकर’ हे अभियान मा. आमदार मोहन दादा जोशी प्रभावीपणे चालवीत आहेत. बंडगार्डन-कोरेगाव पार्क मधील स्थानिक रहिवाशांना या वाहतूक बदलां मुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी मा. आमदार मोहनदादा जोशी पुन्हा एकदा धावून आले. मोहल्ला कमिटी सदस्य धैर्यशील वंडेकर यांच्या प्रयत्नातून आयोजित या बैठकीत त्यांनी कोरेगाव पार्क, बोट क्लब, बंड गार्डन या विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर चर्चा करून काही उपाय योजले. बैठकीत नागरिकांनी केलेल्या सूचना व योजलेले उपाय यांची अंमलबजावणी करण्यासाठी मोहनदादा जोशी तातडीने डीसीपी ट्रॅफिक यांची भेट घेणार आहेत.

स्थानिक रहिवाशांची मागणी होती की वाहतूक पोलिसांतर्फे यापूर्वी केलेले प्रयत्न यशस्वी न झाल्यामुळे ट्रायल बेसिसवर साधू वासवानी पुलावरील वाहतूक बंद केल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या बदल न करता वाहतूक आहे तशी चालू ठेवावी. यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक जरी धीम्या गतीने झाली तरी यामुळे कोंडी होण्याची शक्यता फार कमी आहे. सध्या वाहतूक विभागातर्फे करण्यात आलेल्या बदलांमुळे फार मोठी वाहतूक कोंडी होत आहे व प्रवासी एक ते दोन तास वाहतुकीत अडकून पडत आहेत. बैठकीतील चर्चेअंती सर्वानुमते हे ठरविण्यात आले की डीसीपी ट्रॅफिक यांना मंगलदास रोड बंडगार्डन रोड जे एकेरी करण्यात आले आहेत ते पूर्ववत करण्यात यावेत. तसेच प्रायोगिक तत्त्वावर वाडिया कॉलेज चौक ते जहांगीर चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून त्या बाजूस जाणारी वाहतूक ही वाडिया कॉलेज वरून डावी कडून पुढे, रेसिडेन्सी क्लब चौकातून उजवीकडे वळून पुन्हा अलंकार चौकातून उजवी कडे वळून जहांगीर चौकात येता येईल अशी करण्याचे एकमत झाले. शाळा सुरू झाल्यानंतर या भागात वाढणारी शाळेच्या बसेस रिक्षा गाड्या इत्यादींची वाहतूक लक्षात घेता या शाळांना बसेस, ऑटो रिक्षा इत्यादी रस्त्यावर पार्क न करता त्यांच्या आवारात पार्क करण्याचे तसेच या भागातील शाळांनी एकाच वेळी शाळेची वेळ न ठेवता शाळांनी थोड्याफार फरकाने आपल्या वेळा ठरवणे यासाठी पण शाळेच्या मॅनेजमेंट बरोबर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थानिक रहिवाशां तर्फे धैर्यशील वंडेकर यांनी मा. आमदार मोहनदादा जोशी हे तात्काळ मदतीस धावून आल्या बद्दल त्यांचे सर्व रहिवाशां तर्फे आभार मानले. उपस्थित नागरिकांनी मा. आमदार मोहनदादा जोशी यांनी पुणेकरांच्या वाहतूक समस्या सोडवण्यासाठी घेतलेला पुढाकार व चालवीत असलेले ‘वेक-अप पुणेकर’ अभियाना बद्दल धन्यवाद दिले. या अभियानाची माहिती घेऊन आपल्या भागातील रस्ता वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी सहभाग होण्याची तयारी नागरिकांनी दाखवली.

या बैठकीस धैर्यशील वंडेकर, डॉ. विद्या दामले, समीर रूपानी, भारती पाटील, साथी नैयर, डॉ. बोरगावकर, मनोज फुलपगार, शुभांगी, अमृता चंदानी, मल्लिका साबुनानी, अनाहिता आणि व इतर नागरिक उपस्थित होते. बैठकीस महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Ravindra Dhangekar Pune Loksabha | पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? |  रविंद्र धंगेकरांचा भाजपला सवाल |  महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता

Categories
Breaking News Political पुणे

Ravindra Dhangekar Pune Loksabha | पुण्याच्या विकासाला खिळ का बसली ? |  रविंद्र धंगेकरांचा भाजपला सवाल

महाविकास आघाडीच्या प्रचाराची सांगता

 

Pune Mahavikas Aghadi – (The Karbhari News Service) – पुणेकरांनी भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी निवडून देवूनही पुण्याच्या विकासाला खिळ का बसली असा सवाल काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना केला. तेसच या प्रश्नाचे उत्तर पुणेकर मतदानाच्या माध्यमातून देतील आणि आपणास विजयी करतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणुक धनशक्ती विरुद्ध जणशक्तीची असून पुढील दोन दिवसात पुण्यात पैशाचा पाऊस पडेल. यावर प्रशासनाने योग्य ते प्रतिबंधनात्मक उपाय करावेतअन्यथा आम्ही रस्त्यावर उतरूअसा ईशाराही धंगेकर यांनी दिला.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे  महाविकास आघाडीइंडिया फ्रंटचे काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सांगता समारंभाप्रसंगी काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदमनागपूरचे आमदार विकास ठाकरेनिवडणुक प्रमुख मोहन जोशीमाजी आमदार उल्हास पवारदीप्ती चवधरी, पूजा आनंद, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरेगजानन थरकुडेराज्य प्रवक्ता गोपाळ तिवारी, अमीर शेख, माध्यम समन्वयक राज अंबिके, आदींसह महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

धंगेकर म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारासाठी काढलेल्या पदयात्रामेळावासभांना पुणेकरांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ मी पिंजून काढला आहे. गेल्या तीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याने पुण्याचे प्रश्न मी जाणतो. सर्वांना सोबत घेवून मी सामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे. मोदींच्या कारभारामुळे नागरिकांचे जगणे मुश्कील  झाले आहे. गेल्या दहा वर्षात पुण्याच्या विकासाला खिळ का बसलीहे पुणेकर या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपला विचारतील आणि महाविकास आघाडीला विजयी करतील. पुणे धार्मिक सलोख्याचे शहर आहेही परंपरा मी कायम राखणार आहे.

वंचित व एमआयएम भाजपची बी टीम असून ही निवडणुक पुणेकरांनी हातात घेतली आहे. भाजप पैसे देवून सभांना गर्दी करत होते. आज व उद्या भाजपचे लोक पैशाचा महापूर आणतीलदमदाटी करतीलपोलिसांनी यावर निर्बंध आणावेतअन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू.

माझी ही दहावी निवडणुक आहेमाझ्या पहिल्या निवडणुकीपासून सोबत असलेले लोक आजही सोबत आहेत. मी पुणेकरांचा कार्यकर्ता आहे. भाजपने काय विकास केलाहे काल राज ठाकरे सभेत बोलले आहे. ते पुण्याच्या विकासावर बोललेत्यांचा रोख भाजपकडे होता. या सभेत त्यांनी कमळाला मत द्याअसे एकदाही म्हंटले नाही. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.

प्रचाराची सांगता आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघात रॅली काढून केली. संविधान टिकवण्यासाठी आम्ही सदैव उभे राहू आणि या निवडणुकीत चांगल्या मताने निवडून येऊअसा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला.

डॉ. विश्वजीत कदम म्हणालेकेंद्रातील सरकारकडून सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा राग नागरिकांमध्ये आहे. ईडी सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांमध्ये भाजप विषयी राग आहे. पुण्याचे वातावरण महाविकास आघाडीसाठी चांगले आहे. धंगेकर यांनी नगरसेवक व आमदार म्हणून चांगले काम केले आहे. धंगेकर सर्वसामान्य परिस्थितीतून आलेले आहेत. ते चोवीस तास सर्वसामांन्यांची कामे करतात. काँग्रेसचे अनुभवी नेते शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी आहेत. पुण्यासारखेच वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे.

 

मोहन जोशी म्हणालेनिवडणुक सुरू झाल्यापासून 37 पदयात्राकॉर्नर सभा घेवून काँग्रेसचा न्यायनामा घरोघरी पोहचवला आहे. महागाई व बेरोजगारीमुळे धंगेकर यांचा विजय निश्चित आहे. दहा वर्षात केलेले एक काम भाजप नेत्यांना सांगता येत नाही. पक्ष फोडलेहे जनतेला आवडलेले नाही. भाजपची ताकद कागदावरच आहेहे प्रचारावरून पुढे आले आहे. ज्या दिवशी कसबा पोटनिवडणुक जिंकलीतेव्हाच लोकसभेचा गड काँग्रेस जिंकणार हे निश्चित झाले होते. या निवडणुकीत प्रचाराची पातळी आम्ही राखलीकमरेखालचे आरोप केले नाहीत. याउलट भाजपने खालच्या पातळीवर जाऊन टिका केली. भाजपची बी टीम असलेल्या वंचित व एमआयएमचा कोणताही परिणाम पुणेकरांवर व निवडणुकीवर होणार नाही. आम्ही निवडणुकीपूर्वी रेसकोर्स मैदान संरक्षण खात्याकडे मागितले होतेत्यावेळी त्यांनी आम्ही राजकीय पक्षांना मैदान देत नाहीअसे लेखी दिले. त्यानंतर आचारसंहिता असतानाही संरक्षण विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेसाठी रेसकोर्स मैदान दिले. मोदींच्या सभेनंतर पुन्हा भाजपला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा घ्यावी लागली. यातच भाजपचा पराभव स्पष्ट होतो.

 

उल्हास पवार म्हणालेही निवडणुक हिंदु मुस्लिम मुद्द्यावर आलीएका मतदार संघात मतदान सुरू असताना शेजारच्या मतदार संघात पंतप्रधान सभा घेतातयातच मोदी व भाजपचा पराभव होणार हे स्पष्ट होते.

 

————————————————————

 

मोदी सरकाने व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडवली: अभिषेक मनू सिंघवी

 

पुणे :  मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या काळात व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागले आहे.  2004 ते 2014 या काळात जी परिस्थिती होती ती परिस्थिती मोदी सरकारने ठेवली नाहीत्यामुळे मोदी सरकार देशातून हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व जेष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी केले. जगभरात भारताची प्रतिमा उंचावलेली होती मात्र पंतप्रधान मोदी यांनी ती घालवली आहेअशी टीका यावेळी त्यांनी केली. व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती मोदी सरकारने विस्कटली आहे. ती पुन्हा बसवण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी रविंद्र धंगेकर यांना बहुमताने निवडून द्याअसे यावेळी त्यांनी सांगितले.

 

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या  प्रचारार्थ व्यापारी मेळावा  मुकुंद नगर येथे ३डी बँक्वेट येथे आयोजित करण्यात आला होता.

 

त्यावेळी सिंघवी बोलत होते. यावेळी विठ्ठलशेठ मणियार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस एड. अभय छाजेडपोपटलाल ओस्तवालपुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहारज्येष्ठ व्यापारी राजेश शहाराजेंद्र बाठीया, राजेंद्र फुलपगर, राजेंद्र गुगुळे, शांतीलाल कटारिया, जनक व्यास, भोला अरोरा, भारत सुराणा,  वालचंद संचेती,   मिलिंद फडे,  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुलमाजी नगरसेविका संगीता तिवारीहिरालाल राठोडबाळासाहेब भुजबळ आदी  मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

 

प्रस्ताविक काँग्रेसचे जेष्ठ नेते अभय छाजेड  यांनी केले. ते म्हणालेमोदी सरकारने देशाची आर्थिक परिस्थिती बिघडवली. जीएसटी सारख्या जाचक अटी आणल्या. कोरोना काळात व्यापाऱ्यावर निर्बंध घातले. त्यामुळे मोदी सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी एका दिलाने रवींद्र धंगेकर यांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी धंगेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा,  असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

 

अभिषेक मनू सिंघवी म्हणाले,  मोदी सरकारला आपली सत्ता जाण्याची भीती आहे म्हणूनच पहिल्यापासून 400 पार चा नारा त्यांनी दिला आहे. आता समाजाने जागरूक होऊन भाजपाला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. मोदी सरकारच्या काळात तरुणांना बेरोजगारी तसेच सामन्यांना आर्थिक घडी विस्कटलेलीचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील मोदी जगभर फिरून आपली प्रतिमा उंचावलेली दाखवतात. परंतू भारताची प्रतिमा मोदींनी घालवलेली आहे. देश पुढे नेण्यासाठी तसेच प्रगतीपथावर आणण्यासाठी इंडिया आघाडीला सत्तेत आणावे. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून भाजपची सत्ता उलथून टाकावी असेआवाहन यावेळी त्यांनी केले.

 

लोकशाही संपवण्यासाठी मोदींनी घाट घातला आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ भाजप संपवत आहे. माध्यमे मोदी सरकारने हातात घेऊन त्यांचा हवा तसा वापर करत आहे. निवडणूक आयोग ईडीचा वापर आपल्या हितासाठी करत आहेहे लोकशाहीसाठी चिंताजनकबाब आहे. लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजेअसेही यावेळी त्यांनी नमूद केले.

 

वालचंद संचेती म्हणाले रवींद्र धंगेकर गोरगरिबांच्या कामाला येणारा सामान्य कार्यकर्ता आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ते निवडून आले आहेत. आता पुणे लोकसभा मतदारसंघात खासदारकीला विजयी होणार आहेत. तळागाळातील नागरिक त्यांना निवडून देणार आहेत. कार्यक्रमाचे आभार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा यांनी मांडले.

 


गिरीष बापट यांचे कार्यालय‌ कुणी फोडले होते ? – माजी मंत्री सुनिल केदार यांचा सवाल

 

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांचे कार्यालय आणि भाजपचे पक्ष कार्यालय जून २००७ मध्ये कुणी फोडले होते आसा सवाल उपस्थित करत माजी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. पुण्याचा खासदार हा बापट‌ यांचा वारसदार म्हणून दिल्लीत जाणार आहे. त्यामुळे तो सुसंस्कृत व पुणेकरांचे हित‌ जपणारा हवाअसेही केदार म्हणाले. पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी काल झालेल्या पावसात पुण्यातील रस्ते जलमय का झालेयाचे उत्तर द्यावेअसे आव्हानही केदार यांनी दिले.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत‌ केदार बोलत होते. यावेळी माजी आमदार उल्हास पवारजेष्ठ पत्रकार सुनिल माने उपस्थित होते.

 

सुनिल केदार म्हणालेपुण्यात काल जो पाऊस झालातेव्हा शहरातील रस्ते जलमय झालेले पाहिले. त्यावेळी वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पाहणारे आणि पुण्याच्या विकासाच्या गप्पा मारणारे आठवले. त्यांनी केलेला विकास कुठे शोधू असा प्रश्न पडला. पुण्याच्या नदीची वाट लावली आहे. जून २००७ साली बापट व भाजप पक्षाचे कार्यालय कुणी फोडले भापट यांनी काय चुक केली होती का त्यावेळी कोणाचे कोणाचे फोटो खाली पडले होते त्यामुळे पुण्यातील महायुतीच्या उमेदवाराला भाजपच्या‌ नावावर मते मागण्याचा अधिकार आहे का याचा विचार होणे गरजेचे आहे. खा. बापट शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेवून जात होते.  पुणे शहर अभ्यासू व विचारवंतांचे आहे. या शहराला टिळक फुलेंचा वारसा आहे. त्यामुळे पुणेकरांनी निवडलेला खासदार कोण आहे हे दिल्लीत पाहिले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांनी योग्य उमेदवार निवडून पाठवणे गरजेचे आहे.

 

सुनिल माने म्हणालेभाजपचा प्रवास उलट्या‌ दिशेने सुरू आहे. एससी एसटी साठी अर्थसंकल्पात करावयाची तरतूद मोदींनी दहा वर्षात केली नाही. बापट यांचे प्रचारप्रमुख असतानाही मुरलीधर मोहळ सिंगापूरला निघून गेले. शहराध्यक्षही प्रचारात सक्रीय नव्हते. वाहतुक कोंडीमुळे मोहोळांना परवा स्वत:च्याच प्रचाराला पोहचता आलं नाही. वाहतुकीच्या‌ सुधारणेसाठी मोहोळांकडे व्हिजन नाही. समाविष्ट गावांना पाणी नाहीपायाभुत सुविधा नाहीत. ज्यांना भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला त्यालाच उमेदवारी दिलीहे भाजप कार्यकर्त्यांना दुख आहे. बापट यांना आपल्या भाषणात कधीही पुण्याश्वरचा मुद्दा आणला नाही. मात्रनितेश राणे या जहाल हिंदुत्ववादी माणसाला पुण्यात आणून त्यांची महापालिकेसमोर सभा करणे व त्याचे संयोजन मोहोळ यांनी केलेयामुळे पुण्याचे भले होणार नाही. याचे दु:ख बापट यांना होते.

 

उल्हास पवार म्हणालेभाजपचे दोन दिग्गज नेते नागपूरात असताना विधान परिषदजिल्हा परिषद केदार यांनी काँग्रेसच्या‌ ताब्यात आणली.

 

——————

तुम्ही नागपूरला या नाही तर मी बारामतीत येतो.

 

हा कसा निवडून येतोतो कसा निवडून येतोअसे म्हणून आणि कॉलर पकडून मत मिळत नाहीत.  कोण कसा निवडून येतोहे बघायचं असेल तर त्यांनी नागपूरला यावं नाही तर मी बारामतीला येतोअसे आव्हान सुनील केदार यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.


सर्व धर्म समभाव हाच  भारताचा पाया: यशोमती ठाकूर

  | पर्वती  विधानसभा मतदारसंघात पालक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

पुणे :सर्व धर्म समभाव हाच  भारताचा पाया आहेअसे प्रतिपादन काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे महा विकास आघाडीचे उमेदवार  रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी पर्वती  विधानसभा मतदारसंघात पालक मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी एक हजारहून अधिक पालकांची उपस्थिती होती.  

 

यावेळी ठाकूर म्हणाल्या कीकाँग्रेस हा असा एकमेव पक्ष आहेजो सर्व धर्म समभाव जोपासणारा आहे. आपल्या थोर महापुरुषांनीही आपल्याला हीच शिकवण दिली आहे. विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही.त्यासाठीच महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी  केले.

यावेळी थोर महापुरुषांच्या प्रतिमा हातात घेवून सर्व धर्म समभाव हाच भारताचा पाया आहे.त्यासाठी सदैव कटिबध्द राहायचे आणि काँग्रेसचे हात बळकट करायचे हा निर्धारही   करण्यात आला.

 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल म्हणाले कीगेल्या दहा वर्षात पुण्याचा विकास ठप्प झाला आहे. विकासाची दूरदृष्टी ही काँग्रेसकडे आहे. धार्मिक द्वेषाची पेरणी करून शहरांची काय देशाची प्रगतीही  होणार नाही. सर्व धर्म समभाव असेल तरच देशाचा खऱ्याअर्थाने विकास होणार आहे. आजचा जो विकास झालेला दिसतोय त्यामागे काँग्रेस पक्षाचे योगदान मोठे आहे.  त्यामुळे आता पुण्याच्या विकासाचे समीकरण दृढ करायचे असेल तर रवींद्र धंगेकर यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करायचे आहे. असेही आबा बागुल म्हणाले.  यावेळी  पूजा आनंद,  घनःश्याम सावंत,  मसलकर,  संतोष गेळे आदींसह पदाधिकारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.