Manikrao Thackeray Congress | निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती – माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Manikrao Thackeray Congress | निवडणुक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती – माणिकराव ठाकरे यांची‌ टिका

 

Manikrao Thackeray Congress – (The Karbhari News Service) – सर्वांना न्याय‌ मिळावानिवडणु प्रक्रीया निपक्षपातीपणे व्हावीयासाठी निवडणुक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्रआज निवडणुक आयोगाचा गळा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात ठेवला आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईलयाची शास्वती नाही. संविधानिक संस्था निस्तनाबुथ करण्याचे काम भाजपकडून केले जात आहेअशी‌ टीका अखल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदेगोपाळ तिवारी,अजित दरेकर,संजय बालगुडे नीता परदेशी, सुजित यादव, रफिक शेख, श्री पोळेकर, श्री मेहबूब नदाफ, गुलाम हुसेन, राज अंबिके उपस्थित होते.

 

ठाकरे म्हणालेलोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी मतदान झाले. यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळतेयहे समोर येत आहे. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असल्यामुळे ७६ लाख लोकांनी मतदान केले नाही. ग्रामीण भागात व तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल रोष आहे. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे. पंतप्रधान देशाचे असताना ते हिंदु मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. आमच्या जाहीर नाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहेअशी टिका पंतप्रधानांनी करणे दुदैवी आहे. आमच्या जाहीर नाम्यामध्ये मुस्लिमांबद्दल कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या या विधानाने आमच्या न्याय पत्राला (जाहीरनाम्याला) प्रसिद्धी मिळाली.

 

पहिल्या‌ टप्प्यात विदर्भातील सर्व पाच जागा इंडिया आघाडी‌ जिंकणार आहे. संपूर्ण राज्यात व देशात काँग्रेस व इंडिया आघाडीला‌ चांगले दिवस आहेत.

 

शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक बाबींची किंमतीत वाढझालेली आहे. शेतमालास भाव नाहीत्यामुळे शेतकरी‌ त्रस्त आहे.

देशातील संस्था विकण्याचा धडाका‌ सुरू आहे. देशात महिला‌ सुरक्षित नाहीतयाचे परिणाम या निवडणुकीत दिसतील. आघाडीमध्ये‌ सर्वत्र एकोप्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार चांगल़्या मताने निवडून येतील.

 

काँग्रेसने न्याय पत्र म्हणून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

 

मोदी यांच्या‌ सत्ताकाळात ३० लाख नोकऱ्या‌ थांबल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर सहा महिन्यातच या नोकऱ्यांची भरती‌केली जाईल. आमच्या‌ न्याय पत्रातशेतकऱ्यांची‌कर्जमाफी करू,स्वामीनाथन समितीच्या‌ सिफारशि स्विकारू,  महिलांसाठी महालक्ष्मीयोजने अंतर्गत महिलेच्या खात्यात दर वर्षी एक लाख रूपयेआरोग्यासाठी २५ लाख रुपयेआदींचा उल्लेख न्यायपत्रात आहे. हा जाहीरनामा अतिशय‌ चांगला‌ आहे. भाजपने आश्वासने दिली पण ती पाळली नाहीतत्यामुळे  भाजपची चारशे पारची घोषणा पोकळ असून ते २०० सुद्धा पार करणार नाहीत. भाजपच्या जाहीरनाम्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यांनी दिलेली गॅरंटी फसवी आहेहे लोकांच्या लक्षात आले आहे. जाहीरनाम्यातील तरतुदी काँग्रेस पक्षाच्या‌ सरकारने कर्नाटकतेलंगणा येथे पूर्ण केल्या आहेतअसेही ठाकरे म्हणाले.

 

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील महिलांचे मंगळसूत्र राहणार नाहीहे नरेंद्र मोदी‌ यांचे मत त्यांचा तोल सुटल्याचे द्योतक आहे. वरीष्ठ पद भुषविणाऱ्या‌ व्यक्तीने असे बोलणे दुर्दैवी असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहेअसेही‌ते म्हणाले.

प्रारंभी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माणिकराव ठाकरे यांचे स्वागत केले. राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले.

 

————–

दोन पक्ष फोडल्याचे परिणाम दिसतील:

 

फडणवीस व भाजपने सुड उगवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. पवार साहेबांच्या‌ पुण्यास मोदी‌शहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेणेषडयंत्र रचणे लोकांना पटलेलं नाही. षडयंत्र करणारे कोण आहेतमाहिती आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे‌ केवळ मोहरे आहेत. उमेदवार बदललेस्वाभिमान शिल्लक राहिला नाही. अजित पवारांना चार उमेदवार दिले त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले.

 

———

शिंदे – पवारांनी पायावर दगड मारून घेतला :

 

अजित पवार पूर्वी राज्यातील निवडणुकीच्या‌ जागा ठरवत असतपवार साहेब कधीही त्यात हस्तक्षेप करत नव्हते. आज अजित पवारांची आवस्था काय आहेऐवढे मिंधे होण्याची गरज कायभाजपने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले.

उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना काय नाही दिले. सर्व निर्णय शिंदे घेत होते. त्यावेळी या दोघांना जी उंची होती ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजप सोबत जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.

 

————–

आघाडीसाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला :

 

देशातील परिस्थिती पाहून काँग्रेसने पुढाकार घेवून आघाडी‌ केली. त्यामुळे आघाडीत कमी जास्त होऊ शकते. सर्वांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची भूमीका आहे. शिवसेना व काँग्रेस नेते एकत्र बसुन सांगली बाबत निर्णय घेतील. शिस्तीच्या बाहेर कोण जाणार नाहीअसेही ते म्हणाले.

 

Keshavrao Jedhe | शहर काँग्रेसला देशभक्त कै. केशवराव जेधेंचा विसर | जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे यांनी केली टीका 

Categories
Breaking News cultural Political social

Keshavrao Jedhe | शहर काँग्रेसला देशभक्त कै. केशवराव जेधेंचा विसर | जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे यांनी केली टीका

 

Keshavrao Jedhe – (The Karbhari News Service) – देशभक्त कै. केशवराव जेधे यांच्या स्वतंत्र चळवळीत सिंहाचा वाटा होता. काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे या नेत्यांनी बहुजन समाजाला स्वातंत्र्य चळवळीच्या मुख्य प्रवाहात आणले. ऐतिहासिक काँग्रेस भवन उभारणीसाठी जेधे, गाडगीळ, मोरे यांनी पुढाकार घेतला असे असताना त्यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेसने त्यांना अभिवादन सुद्धा केले नाही. अशी टीका जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे (Kanhoji Jedhe) यांनी केली. (Pune Congress)

दरम्यान 21 एप्रिल  रोजी देशभक्त कै. केशवराव जेधे यांची 128 वी जयंतीच्या निमित्ताने जेधे पुतळा स्वारगेट, पुणे येथे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा. रवींद्र धंगेकर मा. आमदार व मंत्री रमेश बागवे मा.आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना अध्यक्ष संजय मोरे, माजी महापौर कमल व्यवहारे, मा.नगरसेवक अविनाश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल खजिनदार अजय पाटील, केशवराव जेधे यांचे पणतू कान्होजी जेधे व सर्व जेधे परिवार उपस्थित होते. मान्यवरांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले.

Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul Pune Loksabha | आबा बागुल यांची नाराजी दूर होईल | बाळासाहेब थोरात

 

Aba Bagul Pune Loksabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने महापालिकेतील माजी गटनेते आबा बागुल नाराज आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांनी बागुल यांची भेट घेतली होती. या संदर्भातील प्रश्नावर थोरात म्हणालेनाराज्यांकडे जाणे बोलणे, आमचे काम आहे, बागुल‌ यांची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे.

| इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास निवडणुक रोख्यांचा तपास‌ करू – पृथ्वीराज चव्हाण

 

ईडी‌ सीबीआयच्या धाडी‌ टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भिती दाखवत निवडणुक रोख्याच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी  निवडणुक रोख्याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. देशात इंडीया आघाडीचे‌ सरकार आल्यावर‌ आम्ही निवडणुक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही ते म्हणाले.

 

पुणे लोकसभेचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार आ. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा निवडणूक प्रचारप्रमुख मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी, ॲडअभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड,गोपाल तिवारी इत्यादी  उपस्थित होते.

 

चव्हाण म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास‌ दर जेवढा होता, तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात‌ तिसऱ्या नंबरवर गेली असती. मात्र, मोदींच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेचा दर खाली आला आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आज देशावर २०६ लाख कोटी‌ कर्ज आहे. लोकांना चुकीची माहिती देवून भुरळ टाकण्याचे काम मोदी करत आहेत.

 

मोदी सरकारने दहा वर्षात काय केलं याची‌ श्वेत पत्रिका काढावी, म्हणजे २०१४ पूर्वी आणि नंतर काय झालं याची‌ तुलना करता येईल.  दरवर्षी २ कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. दहा वर्षात २० कोटि लोकांना रोजगार मिळायला हवा होता, मात्र काहीच झाले नाही, उलट देशात बेरोजगारी वाढली. डिझेल पेट्रोलचा‌ भाव ३५ रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, यांशिवाय शंभर शहरे‌ स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल मोदींनी तयार करावा, असेही चव्हाण म्हणाले.

 

मोदी सरकार शेतकऱ्याच्या जीवनात वीष कालवत आहे. कोणालाही विश्वासात न घेता शेतीसंदर्भात तीन काळे कायदे केले. शेतकरी आंदोलनात सातशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा‌जीव गेला. शेत मालास भाव नाही. कांदा, गहू, साखर, तांदुळ यांवर निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. त्यामुळे‌या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे मतदान महत्वाचे आहे.

 

२०१९ मध्ये‌ सत्तर टक्के लोकांनी मोदी विरोधी मते दिली. मात्र मत विभाजनामुळे मोदी सत्तेवर आले. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडी उभे केली आहे. भाजपला राज्य घटना बदलायची आहे, त्यासाठी त्यांचे नेते ४०० पार म्हणत आहेत. मात्र, देशात मोदी विरोधी वातावरण आहे, पंतप्रधानांचा दांभिकपणा व खोटारडेपणा जनतेसमोर आलेला आहे. त्यामुळे निवडणुकीचा‌ निकाल लागल्यानंतर भाजप २०० पारही करू शकले नाही, हे कळेल. मत विभाजनासाठी भाजपकडून वंचित व एमआयएमचे उमेदवार निवडणुकीत उतरवले जात आहेत. मागच्या वेळी वंचित व एमआयएमची आघाडी होती, या निवडणुकीत ती नाही. आता संविधान बचावण्यासाठी मोदींचा पराभव गरजेचे आहे. ही निवडणुक संविधान व देश वाचवणारी आहे, त्यामुळे वंचित व एमआयएमच्या उमेदवारांना जनता मते देणार नाहीत.

 

शेतकरी, युवक, महिला, कामगार व सामाजिक न्याय यावर आधारीत काँग्रेसचा जाहीरनामा आहे. शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर स्वतंत्र आयोग असेल. आम्ही कर्नाटकातील पाचही आश्वासने पूर्ण केली आहेत. लोकसभेसाठी‌ दिलेली देखील सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करू, असेही चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. राज्यात आर्थिक व नैतीक भ्रष्टाचार आहे. फोडा फोडीचा लोकांना राग आलेला आहे. आमदार तिकडे गेलेले असले तरी जनता गेलेली नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड मोठा विजय मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

——————-

४८ पैकी ४६ ठिकाणी एकमताने

 

महाविकास आघाडीतील जागा वाटप ४८ पेकी ४६ ठिकाणी एकमताने झाले. दोन जागांबाबत तिढा निर्माण झाला. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, तेथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो. ती जागा आमची हक्काची आहे. मात्र आता निवडणुक सुरू झाल्याने सर्वांनी एकत्र येवून लढणे गरजेचे आहे, विशाल पाटील माघार घेतील आणि सांगलीतही गोड शेवट होईल अशी आम्हाला आशा आहे , असेही‌ चव्हाण म्हणाले.

 

————

 

 

————–

 

काळ्या पैशामध्ये मोदींचे तोडपाणी :

 

परदेशी बँकांमधील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये  १५ लाख रुपये‌जमा करण्याचे आश्वासन देवून नरेंद्र मोदी २०१४ मध्ये‌ सत्तेवर आले. त्यानंतर भारत सरकारकडे विविध संस्थांच्या माध्यमातून स्विस बँक आणि परदेशात गुंतवलेल्या काळ्या पैशाची‌ सर्व माहिती आली. आजही भारत सरकारकडे यांची माहिती आहे.  तरीही मोदी सरकारने आजवर संबंधीतांवर  कारवाई केला नाही. याचा अर्थ यामध्ये कुठेतरी तोडपाणी झाले आहे. इंडिया आघाडीचे‌ सरकार आल्यानंतर आम्ही याबाबत माहिती उघड करू, असेही‌चव्हाण म्हणाले

Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी

Categories
Breaking News Political पुणे

Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी 

 

 

Dr Kumar Saptarshi – (The Karbhari News Service) – नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून भाजपमधील ३० टक्के नेते इतर पक्षातून आयात केलेले आहेत. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. लोकसभेच्या १०२ जागांसाठी झालेल्या मतदानावरून मोदी यांची लाट ओसर्याचे लक्षात येते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप महायुतीला दोनशे ते सव्वा दोनशे जागा मिळतील,आणि त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात येईल, असे भाकीत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सप्तर्षी बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले, कोणताही पक्ष ४०० पार म्हणतो, तेव्हा थडकी भरते. ऐवढी काय भाजपची‌ किमया आहे, की लोकांनी त्यांना चारशे पार जागा निवडून द्याव्यात. आरएसएसला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्या‌ जिवावर भाजप ४०० पारचा नारा देत आहे. या निवडणुकीत मोदी शहांचा पाडाव होणे गरजेचे आहे. तरच देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षात राहिल. मोदी शहांचा पराभव झाला‌तरच भाजपही जिवंत राहणार आहे. पैसे खाल्लेल्या लोकांना धमकावून, जेलची भिती दाखवून भाजपसोबत घेतले जात आहे. अजित पवार व त्यांचे नऊ मंत्री हे भाजपसोबत जाणे, हे‌ त्याचेच उदाहरण आहे. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. मोदी-शहा ही व्यापारी जोडगोळी आहे. त्यांनी धाडी टाकून देणग्या घेतल्या. जनतेचा पैसा व्यापाऱ्यांनी वाटून घेतला. भाजपचे ३० टक्के लोक आयात केल्याने आयात आणि भाजपमधील हयात यांच्यात संघर्ष होणार आहे.

 

मोदींनी निवडणुकीतले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. बेकारी व महागाईचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. मोदींना अर्थव्यवस्थेचे अकलन आहे, असे वाटत नाही. नोट बंदीमुळे कसलाही काळा पैसा बाहेर आला नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर तुरुंगातील सगळ्यांना बाहेर सोडले, आचारसंहितेचा आदर केला.

 

 

जरांगे पाटील‌ यांच्या मराठा आंदोलनामुळे भाजपची अडचण झाली आहे. मराठा मतदार नाराज झाल्याने राज्यात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे.  महाराष्ट्रात भाजपला अनुकुल वातावरण नाही.त्यामुळे यंदा‌ मागच्या वेळी पेक्षा कमी‌ जागा मिळणार आहेत. पुण्यात काँग्रेसचा मतदार आहे. पुण्याचा जो खासदार निवडून येतो,‌ तेव्हा वर त्या पक्षाची सत्ता येते. कलमाडी जेव्हा काँग्रेसपासून दूर गेले, तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला.

 

संविधान आहे तर आपण आहोत, अशी भावना दलित व मुस्लिमांची आहे, त्यामुळे ते आघाडीच्या मागे उभे राहतील. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वंचित व एमआयएमला मते मिळणार नाहीत. पुणे जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीजिंकेल, असा विश्वासही डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केला. 

Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Categories
Breaking News Political पुणे

Dhiraj Ghate on MIM – एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा दावा पोकळ – धीरज घाटे

Dhiraj Ghate on MIM – (The Karbhari News Service) – एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके (Anis Sundke MIM Pune Loksabha) यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड (Abhay Chajed Pune Congress) यांनी पत्रकाव्दारे केला आहे. त्या आरोपांचा समाचार पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate Pune BJP) यांनी सुस्पष्ट शब्दात घेतला. (Pune Loksabha Election)

घाटे म्हणाले, एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने हैद्राबादमधील ५ लाख ४० हजार बोगस मतदारांची नावे काढून टाकली आहेत. तसेच हैद्राबादमध्ये मोठ्या संख्येने बोगसमतदार असल्याचा आरोपच तेथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी जाहीरपणे केला होता. जर एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर भाजपचे त्यांचे नुकसान ऐन निवडणुकीत केले असते का’

भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भाजपला तिसऱ्यांदा विजयी करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्वच गोष्टी जर भाजपच्या बाजूने असतील, तर विजयासाठी पुण्यात भाजपला षडयंत्र करण्याची गरज नाही हे सामान्य मतदाराही समजते. उलट काहीही करा पण निवडणूक जिंकून सत्ता काबीज करा, हे अलिखित आणि अघोषिक धोरण गेली ६०-७० वर्षे देशात राबवणाऱ्या काँग्रेसचे चरित्र षडयंत्र रचण्याचेच आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे.

ते म्हणाले, ‘गेली दहा वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही. पुण्यातील मतदारांनी सन २०१४ आणि २०१९ साली मोदीजींसाठी कसे मतदान केले याचा इतिहास ताजा आहे. यावेळीही मतदारांनी त्यांचे मन बनवले असून आता पुण्यातील नाही तर देशातील मतदार मोदीजींना पुन्हा तिस-यांचा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

घाटे यांनी सांगितले की, ‘अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये केवळ तिकीटासाठी आलेल्या रविंद्र धंगेकरांना काँग्रेसने काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. आता पुन्हा त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली असल्याने धंगेकरांना उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. ही नाराजी व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून भाजपसारख्या पक्षावर षडयंत्राचे आरोप केले जात आहेत.

ज्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात शपथेवर श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले होते, त्याच काँग्रेसच्या सर्व नेत्यांवर रामनवमीच्या शुभेच्या देऊन पत्रकार परिषद सुरू करण्याची वेळ का आली ? आमची सत्ता राज्यात १९९५ साली आली पण नंतर पंधरा वर्षे नाही आली. जेव्हा काँग्रेसच्या कारभाराला लोक कंटाळले आणि त्यांनी २०१४ साली भाजपला सत्तेवर बसवले. जे राज्यात तेच केंद्रात, स्व. अटलजींचे सरकार २००४ साली गेल्यानंतर काँग्रेसची सत्ता देशात आली, पण अवघ्या दहाच वर्षात देशातील जनतेने बहुमताने भाजपला केंद्रात सत्ता दिली. त्यासाठी कोणतेही षडयंत्र करावे लागले नाही, कारण ते भाजपचे चरित्रच नाही, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.

Murlidhar Mohol Vs Congress |  मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

Categories
Breaking News Political पुणे

Murlidhar Mohol Vs Congress |  मुरलीधर मोहोळ यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल

 

Murlidhar Mohol Vs Congress – (The Karbhari News Service) पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol Mahayuti pune loksabha) यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे (Pune Congress) आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून “राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात” या मथळ्याखाली जाहिरात करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र असलेली पत्रके वाटली. 

 

याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, ” राम मंदिराला निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनवून याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवून मोहोळ यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.”

 

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

 

Unorganized Workers |Sunil Shinde | असंघटीत कामगारांच्या मागे कॉंग्रेस पक्ष ठामपणे उभा |  सुनील शिंदे

Categories
Breaking News Political social पुणे

Unorganized Workers |Sunil Shinde | असंघटीत कामगारांच्या मागे कॉंग्रेस पक्ष ठामपणे उभा |  सुनील शिंदे

 

Unorganized Workers – (The Karbhari News Service) – बीजेपीने जाहीर केलेला कामगारांसाठीचा जाहीरनामा हा पूर्ण फसवा आहे. असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा जो आहे त्यामध्ये वाढ करू असे भाजपने म्हटले आहे. वास्तविक पाहता असंघटीत कामगारांचा कुठेही किमान वेतन कायद्यात अंतर्भाव केलेला नाही. ते कामगार कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत आणि त्याबरोबरच कामगारांचे जे तंत्राटीकरण, खाजगीकरण झाले आहे त्यामध्ये कुठेही वेतनवाढीचा ठोस प्रस्ताव भाजपने दिलेला नाही. असंघटीत कामगारांसाठी कोणताही कायदा करण्याचे आश्वासन भाजपने दिलेले नाही. त्यामुळे, बीजेपीचे सरकार पूर्णपणे कामगारद्रोही असल्याचे आणि त्यांच्या जाहीरनाम्यातूनही कामगारविरोध असल्याचे स्पष्ट होते. अशी खरमरीत टीका असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केली. (Pune Congress) 

 

आज कॉंग्रेस भवन येथे पुणे शहरातील असंघटीत कामगारांचा मेळावा घेण्यात आला त्यात ते बोलत होते.  या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते सुनील शिंदे हे होते. त्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार नेते व कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये घरेलू कामगार त्याबरोबरच ओला, उबेर, स्वीग्गी, झोमॅटो या गिगवर्कर तसेच बांधकाम मजूर, रिक्षाचालक उपस्थित होते. यासार्वांसाठी न्याययोजनेद्वारे केंद्रीय कॉंग्रेसचे नेते आणि अध्यक्ष खर्गे साहेबांनी कॉंग्रेसचा जो जाहीरनामा सादर केला आहे त्यामध्ये सामाजिक सुरक्षितता कायदा देण्याचे आश्वासन केले. त्याचा अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच घरेलू कामगारांचे मंडळ जे युती सरकारने बंद केले आणि जे कॉंग्रेस सरकारने चालू केले होते ते मंडळ चालू करण्याचा पुढाकार घेण्याचे आश्वासन कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज दिले. त्याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

जे कामगार असंघटीत क्षेत्रात येतात त्यांना कोणताच कामगार कायदा लागू होत नाही. आणि अशा कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना आणि त्यांना कामगारांच्या कायद्याच्या कक्षेत आणण्याचे काम हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात केले आहे, असे सुनील शिंदे यांनी सांगितले.  किंबहुना त्यांच्यासाठी ठोस कायदा करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. त्याच्या अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये १०० हून अधिक कोपरासभा घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्या मेळाव्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील घरेलू कामगार, बांधकाम कामगार, हॉस्पिटल मधील कामगार, कारखान्यांमधील कामगार, अशा सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रत्येक बैठकीला शेकडो उपस्थित राहतील. आणि त्यामध्ये कॉंग्रेसचा जाहीरनामा त्याबरोबरच प्रचाराचे साहित्य वाटप करण्याचे काम देखील असंघटीत कामगार कॉंग्रेसमार्फत केले जाईल. असे सुनील शिंदे यांनी सांगितले. 

 

यावेळी पुणे शहर असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष एस.के.पडसे, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे ऑर्गनायझरयासीन शेख, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे सरचिटणीस राहुल गोंजारी, पुणे शहरातील कामगार नेते आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण तसेच आबा जगताप, डोंगरे, महापालिकेतील तंत्राटी कामगारांचे विविध भागातील नेते हे सर्व उपस्थित होते.

Pune Congress | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’

Categories
Breaking News cultural Political पुणे

Pune Congress | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’

 

Pune Congress | Gudhipadwa – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून शेतकरी न्याय, महिला न्याय, युवा न्याय, भागीदारी न्याय आणि श्रमिक न्यायाची गुढी आज महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे उभारण्यात आली.    (Pune News)

यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे निवडणुकीचे सन्मवयक अरविंद शिंदे, काँग्रेस नेते अभय छाजेड,  अजित दरेकर,  अशुतोष शिंदे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, ‘‘मी सध्या सर्वांना भेटतोय सर्वांशी चर्चा करतोय. येणारा काळ इंडिया आघाडीचा आणि काँग्रेसचा असणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे आणि आपण केलेले काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

    शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढवायचा असून कशाप्रकारे प्रचार करायचा त्याची व्युहरचना कशी असावी, जाहिरनाम्यात या पाच न्याय गोष्टींचा समावेश असावा, यासारख्या मुद्दयांवर बैठक होणार आहे. तसेच न्याय कार्ड प्रत्येकाच्या घरी पोच केले जाणार असून त्यावेळी न्यायचे मुद्दे समजून सांगितले जाणार आहेत.’’

    पुण्यात राष्ट्रसेवादलाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून, तसे पत्र त्यांनी दिले आहे. त्यांच्याकडूनही पथनाट्य माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.

    यावेळी ॲड. अभय छाजेड यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल 

Categories
Uncategorized

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल

 

Ravindra Dhangekar Vs BJP – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरून त्यावर जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो प्रसारित केला. याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे. यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते जर स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर व नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे  कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते असा आरोप  गौरव बापट यांनी केला.

पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन  मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

| काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

Aba Bagul | Pune Politics – (The Karbhari News Service) – एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे. मग न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे. असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. (Pune congress)

आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.

ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील. असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत. निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.