NCP – Sharadchandra Pawar Manifesto | देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे | शरद पवार यांची ‘शपथनामा’ मधून भाजप वर सडकून टीका 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP – Sharadchandra Pawar Manifesto | देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे | शरद पवार यांची ‘शपथनामा’ मधून भाजप वर सडकून टीका

 

NCP – Sharadchandra Pawar Manifesto – (The karbhari news service)  – राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज आपला जाहीरनामा सादर करण्यात आला. त्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले आहे. यात प्रस्तावनेच्या माध्यमातून पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप वर सडकून टीका केली आहे. देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राची सर्व आघाड्यांवर पीछेहाट होते आहे. हे चित्र पालटविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या भावना समजून घेत, विकासाची दिशा काय असावी, याचे आमचे चिंतन सदैव सुरू असते, त्या विचारमंथनातूनच आलेला हा ‘शपथनामा’ आम्ही सादर करतो आहोत. असे पवार यांनी म्हटले आहे.

| शरद पवार यांची काय आहे प्रस्तावना?

प्रजासत्ताकाचा आत्मा जपताना संवादाची भूमिका हवी, भारतीय लोकशाही  कार्यपद्धतीत सामूहिक विचारविनिमयातूनच निर्णय झाले पाहिजेत, यावर आमचा विश्वास आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला देश सामोरा जात असतानाच गेल्या १० वर्षांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. गेल्या दहा वर्षांत चित्र असे आहे, की केंद्रातील सत्तारूढ पक्षाला संवाद नको आहे आणि कार्यपद्धती एकाधिकारशाहीची आहे.

लोकशाहीत प्रत्येक निर्णय चर्चा आणि संवादातून जन्माला येणे अपेक्षित असते. गेल्या दहा वर्षांत बहुमताच्या गुर्मीतून निर्णय लादण्याची सवंग कार्यपद्धती अनुसरली गेली, असे चित्र आहे. याचे तडाखे देशाच्या अर्थव्यवस्थेला, देशातील शेतकरीवर्गाला, कामगारवर्गाला, मध्यमवर्गाला
बसताना दिसत आहेत. या देशातील रचनेत आपल्याला किंमत नाही, अशी
भावना अल्पसंख्याकांमध्ये निर्माण झालेली आहे. सरकारी यंत्रणांचा वापर
हत्यारासारखा होतो आहे आणि राजकीय विरोध उभा राहूच द्यायचा नाही,
अशी मुजोरी सातत्याने दाखविली जाते आहे.

राज्यकारभार करताना सर्व मतप्रवाह विचारात घेऊन निर्णय अमलात
आले पाहिजेत, असे संविधानाला अपेक्षित आहे. संविधानाची ही चौकट
उखडून टाकण्याचे काम गेली दहा वर्षे अत्यंत बेमुर्वतपणे सुरू आहे. पंतप्रधान माध्यमांशी संवाद करीत नाहीत, सभागृह नेता या नात्याने सभागृहाच्या कामकाजात सहभागी होत नाहीत, असे दारुण चित्र देश पाहतो आहे. संसदेला काडीमोल किंमत आपण देतो, असा संदेश पोहोचविला जातो आहे. राजकीय पक्षांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायची नाहीत, सूचनांचा स्वीकार करायचा नाही, अशा पद्धतीने संसदेत कारभार सुरू आहे. हे चित्र देशाच्या लोकशाहीच्या भवितव्यासाठी घातक आहे. संसदेला वजा करून, ‘मुखवटा लोकशाहीचा व राजवट एकाधिकारशाहीची’ हीच कार्यपद्धती रुजविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या हितासाठीच सरकारच्या योजना राबविल्या जातात. आज या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना मतपेढी म्हणून वापरले जाते आहे. राज्यकारभार करीत असतानाच्या किळसवाण्या वृत्तीचे दर्शन यातून होते आहे. सत्तेचे केंद्रीकरण करण्याची ही कार्यपद्धती देशाच्या लोकशाहीला नख लावणारी ठरताना दिसते आहे.

शेतकरी या देशाचा कणा आहेत, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याची भूमिका घेतली जाते आहे. विकासाचे धोरण आपल्यासाठी नव्हे, तर उद्योजकांसाठी राबविले जाते आहे, ही भावना सामान्य जनतेच्या मनात बळावत आहे. शेजारील राष्ट्रांचा विश्वास कमाविण्यात आपण कमी पडतो आहोत.
अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी जागतिक पातळीवर अनुकूल संधी असताना रोजगारविरहित विकासाचे धोरण राबविले जाते आहे. देशातील तरुणांमध्ये उन्मादाची भावना चेतविली जाते आहे. विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी राज्यपाल या संस्थेचा हरप्रकारे उपयोग केला जातो आहे.
इतिहासात जेव्हा जेव्हा आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा
महाराष्ट्राने आपली तलवार परजली आहे. विचारांची लढाई लढताना देशाला
मार्गदर्शन केले आहे. ही परंपरा चालविण्याची कधी नव्हे तेवढी आज गरज आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचायचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात
स्थान असलेल्या नेत्यांना पांगळे करायचे, आर्थिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्राला
दुबळे बनवायचे, महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाला आपला बटीक
करायचे, असेच धोरण राबविले जाते आहे.
देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राची सर्व आघाड्यांवर पीछेहाट होते आहे. हे चित्र पालटविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या भावना समजून घेत, विकासाची दिशा काय असावी, याचे आमचे चिंतन सदैव सुरू असते, त्या विचारमंथनातूनच आलेला हा ‘शपथनामा’ आम्ही सादर करतो आहोत.
——

नागरिकांना या गोष्टी मिळणार

NCP – Sharadchandra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ग्रंथालय विभाग शहराध्यक्षपदी प्राजक्ता जाधव

Categories
Political पुणे

NCP – Sharadchandra Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ग्रंथालय विभाग शहराध्यक्षपदी प्राजक्ता जाधव

 

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ग्रंथालय विभाग, पुणे, शहराध्यक्षपदी प्राजक्ता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र सौ.जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला आघाडीच्या चिटणीस,सरचिटणीस आणि उपाध्यक्ष या पदांवर सौ.जाधव यांनी काम केले आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निरिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.आता पक्षाच्या ग्रंथालय विभागाचे शहराध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा.सुप्रियाताई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय विभागाच्या कामातही ठसा उमटवेन, असे सौ.प्राजक्ता जाधव यांनी नियुक्तीपत्र स्वीकारताना सांगितले.

Ayushman Bharat | NCP – Sharadchandra Pawar – आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी! | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

Ayushman Bharat | NCP – Sharadchandra Pawar – आयुष्मान भारत योजना रुग्णांच्या नव्हे तर विमा कंपन्यांच्या भल्यासाठी! | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने आंदोलन

 

Ayushman Bharat | NCP – Sharadchandra Pawar – (The Karbhari News Service) – मोदी सरकारच्या  धोरणाच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने केईएम् हॉस्पिटल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत केंद्र सरकारच्या योजनेचा व केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. “मोदी सरकारच्या घोषणा फसव्या योजना, मोदी सरकारचा गोलमाल गोरगरीब रुग्णांचे हाल, आयुष्मान भारतचा केवळ प्रचार गोरगरीब रुग्ण झाले बेजार, मोदी सरकार डोळे उघडा” अशा योजनांनी परिसर दणाणून गेला.

प्रशांत जगताप म्हणाले, आयुष्मान भारत योजनेची जाहिरात आपल्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार आपल्याच खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना गोरगरीब रुग्णांना नव्हे तर केवळ विमा कंपन्यांना फायदा देणारी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना अक्षरशः रुग्णालयांच्या दारात पडून राहावे लागत आहे. गोरगरीब रुग्णांचे हाल होत असताना योजनेत सुधारणा करायचे सोडून मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे.

———

 गेल्या एक महिन्यापासून आम्ही या योजनेच्या अंमलबजावणीचा मागोवा घेत आहोत. पुणे शहरातील सरकारी हॉस्पिटल्स वगळता एकाही हॉस्पिटल मध्ये आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत. सरकारी हॉस्पिटल्स मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वांना उपचार मोफत मिळतात, म्हणून आयुष्मान भारत योजना ही केवळ धूळफेक असून देशाच्या नागरिकांच्या भावनांसोबत हा क्रूर खेळ आहे.

– प्रशांत जगताप

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!  

Categories
Breaking News Political पुणे

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!

 “India” Aghadi meeting in Pune | Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) party leader Sharad Pawar’s meeting at Modi Bagh office instructed all office bearers and workers to be ready to contest the upcoming Lok Sabha elections with a new name and a new symbol.  were given  Since the upcoming Loksabha Elections (Loksabha Election 2024) India Aghadi will fight together, the meeting of India Aghadi under the leadership of Sharad Pawar will be concluded on February 24 in Pune city.
 All the constituent parties of India Aghadi will join this meeting and it was decided to win in these three Lok Sabha constituencies with a historic majority.
 In the meeting attended by Sharad Pawar, MP Supriya Sule, Mr.  Srinivas Patil, Former Minister Anil Deshmukh, Rajesh Tope, Shashikant Shinde, Balasaheb Patil, MP Vandana Chavan, MP Mr.  Dr.  Amol Kolhe, City President Prashant Jagtap, MLA Rohit Pawar, MLA Sandeep Kshirsagar were present.

“India” Aghadi meeting in Pune |24 फेब्रुवारी रोजी “इंडिया” आघाडीचा महामेळावा होणार पुण्यात! | शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

Categories
Political पुणे महाराष्ट्र

“India” Aghadi meeting in Pune |”इंडिया” आघाडीचा 24 फेब्रुवारी रोजी होणार पुण्यात महामेळावा  !

| शिरूर, बारामती व पुणे  लोकसभेसाठी इंडिया आघाडीचा एल्गार

 

“India” Aghadi meeting in Pune |राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar)  पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मोदी बाग या कार्यालयात झालेल्या बैठकीत नवीन नाव व नवीन चिन्हसह आगामी लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) इंडिया आघाडी एकत्रितपणे लढणार पासून या अनुषंगाने शरद पवार यांच्या नेतृत्वात 24 फेब्रुवारी रोजी इंडिया आघाडीचा मेळावा पुणे शहरात संपन्न होणार आहे.

इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष या मेळाव्यात सामील होणार असून या तीनही लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत MP सुप्रिया सुळे, खा. श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, खा. वंदना चव्हाण, खा. डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आमदार रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित होते.