PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Monorail Project  | नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोथरूड थोरात उद्यान मधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही | महापालिका आयुक्त

|खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड मधील नागरिकांची आयुक्तांशी बैठक

| युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन

 

PMC Monorail Project – (The Karbhari News Service) –  शहरातील कोथरूड परिसरात असणाऱ्या थोरात उद्यान (Thorat Garden Pune) या ठिकाणी मनपाच्या वतीने मोनोरेल प्रकल्प (PMC Monorail Project) साकारत असून यामुळे सदर ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार असुन तसेच या उद्यान्यामधे यांत्रिकीकरण केले जाणार आहे. यामुळे उद्यान्यामधे मोकळा श्वास घेण्याकरिता जागा शिल्लक राहणार नाही, तसेच विकसित केलेले पदपथ, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी आदी अनेक सुविधा काढाव्या लागणार आहेत. याचमुळे  प्रकल्पास नागरिकांतून विरोध होत असून कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि आदरणीय खा. वंदनाताई चव्हाण (MP Vandana Chavan) यांच्यावतीने या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे, यासाठी मनपा आयुक्तांची (Dr Rajendra Bhosale IAS)  भेट घेण्यात आली. युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी (Girish Gurnani) यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भेटीदरम्यान थोरात उद्यानाच्या सोबत मुठा नदी काठ सुशोभीकरण कामाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. (Pune PMC News)

The Karbhari - Thorat Garden pune

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असणारे थोरात उद्यान हे अत्यंत जुने आणि प्रशस्त अशा ठराविक उद्यानांपैकी एक ऑक्सिजन हब आहे. थोरात उद्यान गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना चालण्यासाठी मोकळी जागा आणि मोकळा श्वास घेण्यासाठी आहे. खुली व्यायामशाळा, विरंगुळा केंद्र, लहान मुलांसाठी खेळणी, पदपथ अशा सुविधा या ठिकाणी मनपातर्फे विकसित करण्यात आल्या असून यामुळे हे उद्यान नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनले आहे.

परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर ठिकाणी पुणे मनपाच्या मोटर वाहन विभागातर्फे मोनोरेल साकारण्यासाठी या ठिकाणी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध काम सुरू करण्यात आले आहे. सदर कामासाठी अनेक वृक्षांची कत्तल केली जाणार असून या ठिकाणी बांधकाम केल्याने नागरिकांना मिळणारी मोकळी जागाही कमी होणार आहे. दोन बोगीच्या या मोनोरेलसाठी तब्बल ४०७ मीटरचा ट्रॅक बांधला जाणार असून नागरिकांतून याबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे आपण नैसर्गिक अधिवास नष्ट करून सिमेंटचे नवे जंगल उभारत आहोत, याचा लवलेशही मनपाला नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.

वाढते शहरीकरण आणि पुणे शहराचा गुदमरणारा श्वास तसेच प्रदूषण वाढत असताना निव्वळ मनोरंजनासाठी नागरिकांचा विरोध पत्करून नागरिकांसाठी केले जाणारे हे विकासकाम रोखण्यात यावे, अशी मागणी आज खा. वंदनाताई चव्हाण यांनी मनपाचे नवनियुक्त आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन नागरिकांचे म्हणणे पटवून दिले. मोनोरेल या गोंडस नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याचे पापकर्म आपण करत असून नागरिकांची कोणतीही मागणी नसल्याने उलटपक्षी विरोध असल्याने सदर प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्यात यावे, अशी विनंती कृती समितीच्या वतीने नागरिकांनी केली. यावेळी आयुक्तांनी नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम राबविण्यात येणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

त्याचप्रमाणे खडकवासला धरण क्षेत्राच्या लगत वाढत असलेल्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात तेथील मैला पाणी खडकवासला धरणामध्ये मिसळत आहे. याबाबत सुद्धा लवकरात लवकर मार्ग काढणे आवश्यक आहे ही बाब सुद्धा  आयुक्त  यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

या दोन्ही स्थितींमध्ये आपण विकास साधत असताना ज्या निसर्गात वास्तव्य करतो, त्या निसर्गाकडे सहजासहजी दुर्लक्ष करून पर्यावरणाचा समतोल ढासळत आहोत, याची कल्पना आदरणीय आयुक्तांना देण्यात आली. भविष्यातही कोणताही उपक्रम हाती घेतल्यानंतर शाश्वत विकास साधला जावा आणि नागरिकांचे कायमस्वरूपी कल्याण चिंतून निर्णय प्रक्रिया पार पडावी, ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या दोन्ही मुद्द्यांवर आदरणीय आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणताही उपक्रम न राबविण्याचा तसेच पर्यावरणीय विचार करण्याचा शब्द दिला आहे.

या वेळी नितीन कदम ,श्वेता यादवाडकर, स्वप्नील दुधाने, किरण आढागळे, सुनील जानोरकर थोरात उद्यान वाचवा कृती समितीचे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!  

Categories
Breaking News Political पुणे

 “India” Aghadi meeting will be held in Pune on February 24!

 “India” Aghadi meeting in Pune | Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) party leader Sharad Pawar’s meeting at Modi Bagh office instructed all office bearers and workers to be ready to contest the upcoming Lok Sabha elections with a new name and a new symbol.  were given  Since the upcoming Loksabha Elections (Loksabha Election 2024) India Aghadi will fight together, the meeting of India Aghadi under the leadership of Sharad Pawar will be concluded on February 24 in Pune city.
 All the constituent parties of India Aghadi will join this meeting and it was decided to win in these three Lok Sabha constituencies with a historic majority.
 In the meeting attended by Sharad Pawar, MP Supriya Sule, Mr.  Srinivas Patil, Former Minister Anil Deshmukh, Rajesh Tope, Shashikant Shinde, Balasaheb Patil, MP Vandana Chavan, MP Mr.  Dr.  Amol Kolhe, City President Prashant Jagtap, MLA Rohit Pawar, MLA Sandeep Kshirsagar were present.

Biodiversity Park | PMC Pune | BDP विकसित करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी | महापालिका आयुक्तांकडे खासदार वंदना चव्हाण यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Biodiversity Park | PMC Pune | BDP विकसित करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी | महापालिका आयुक्तांकडे खासदार वंदना चव्हाण यांची मागणी 

Biodiversity Park | PMC Pune | शहराच्या विकास आराखड्यात (Pune Devlopment Plan) पुणे आणि आजूबाजूच्या टेकड्या बीडीपी (Biodiversity Park) म्हणून आरक्षित केल्या गेल्या आहेत, परंतु सदर जमीनी मध्ये टेकडी फोड,  अनधिकृत बांधकामे होत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. तसेच सदर आरक्षणातील जमीन मालकांना किती मोबदला द्यावा यासंदर्भात शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही यासाठी आज खा. वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांनी महापालिका आयुक्तांची (PMC Commissioner) भेट घेतली. (Pune Municipal Corporation) 

महापालिका आयुकताना सादर केलेल्या निवेदनात खालीलप्रमाणे मुद्दे मांडण्यात आले.

1) BDP विकसित करण्यासाठी ठोस आराखडा तयार करणे.

२) बीडीपी आरक्षणाखालील सर्व क्षेत्रांचे सरकारी आणि खाजगी मालकीचे असे वर्गीकरण करणे.

3) BDP क्षेत्रातील सरकारी मालकीच्या जमिनी हरित करण्यास आरखडा व अंमलबजावणी तातडीने करणे.

4) सदर परिसर हरित व विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेणे

5) राज्य शासनाच्या निर्देश्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी हाय रिझोल्यूशन इमेज उपलब्ध करणे

6) बीडीपीसाठी आरक्षित जमिनीची बेकायदेशीर विक्री थांबवण्यासाठी 7/12 च्या उताऱ्यामध्ये बीडीपी आरक्षणाची नोंद करणे.

7) आरक्षित क्षेत्रामध्ये बेकायदेशीर टेकडी फोड आणि अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी – हेल्पलाईन व बीट ऑफिसर्सची कार्यक्षम यंत्रणा तयार करणे.

8) बीडीपी आरक्षण क्षेत्रातील खाजगी जमिनीच्या मालकांना भरपाई देण्यासाठी सूत्र शोधणे.

शहराची  झपाट्याने होत असलेली वाढ, सरकारचे भरघोस एफएसआयच्या वाटपाचा निर्णय (ज्याला आमचा विरोधही आहे). हवामान बदलाचे गंभीर परिणाम – ढगफुटीपूर येणेउष्णतेच्या लाटाहवेची खालावत जाणारी गुणवत्तारोगराई, भूगर्भातील पाणी कमी होणे इ. लक्षात घेता शहराच्या हिरव्या फुफ्फुसांचे संरक्षण करणे अत्यंत अत्यावश्यक आहे!!

तरी टेकडी सर्वर्धनाच्या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने व लवकरात लवकर पाठपुरावा करावा असे सूचित करण्यात आले. माननीय महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी या विषयासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली.

सदर बैठकीसाठी खा. वंदना चव्हाण, श्री. यशवंत खैरे (माजी उद्यान अधीक्षक, पुणे मनपा), अनिता बेनेंजर (वास्तुविशारद), श्री. नितीन कदम (अध्यक्ष अर्बन सेल पुणे शहर), श्री. नितीन जाधव (समन्वयक, अर्बन सेल महाराष्ट्र प्रदेश) आदि उपस्थित होते.

MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व धर्मियांना मदत केली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केले. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा अतिशय मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे नररत्नाची खाण असल्याचे आपण म्हणतो, त्यापैकी खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. त्यांच्यामध्ये माणसे जपण्याची कला होती. महत्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. बोलण्यामध्ये ते खूप चपखल होते. कोणालाही न दुखावता शालजोडीतून शब्द वापरुन आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी होती. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसदीय कार्यमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य नोंद घेण्यासारखे होते. शेतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचे केलेले काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सगळ्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. असे नेते तयार होण्यासाठी चाळीस- चाळीस वर्षे लागतात, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बापट कुटुंबियांचे सांत्वन
मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक उपस्थित होते.


खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

 

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकासंदेशामध्ये म्हटले आहे.


राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले | राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

 

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


पुणे शहराचे खासदार आणि माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. गेला काही काळ त्यांचे आजारपण चालू होते पण त्यामुळे त्यांना मृत्यू इतका लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. याच बरोबर राजकीय स्पर्धा असली तरी विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले मित्र होते. पुण्याच्या विकासात त्यांनी निश्चितच भरीव योगदान दिले. मात्र, शहराच्या विकासात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. हे त्यांचे अजून एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. पुण्याच्या मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा म्हणजेच सलग २५ वर्षे ते आमदार म्हणून निवडून येत होते. यातूनच त्यांच्या लोकसंपर्काची प्रचीती येते. पुण्यातील गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली. मात्र, तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला. यामुळे कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखेच दुःख मला झाले आहे. ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

मोहन जोशी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी


मागील ३ ते ४ दशकापासून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले नाव म्हणजे गिरीशजी बापट.
अत्यंत संघर्षातून महानगरपालिका,विधानसभा व लोकसभा सदस्य या पदांवर काम करत असताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रीपद भूषाविताना त्यांनी जपलेले पुणेरीपण ही बाब चिरकाल स्मरणात राहील. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते ,त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक चळवळीचे अपरीमित नुक़सान झाले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

| प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.


गिरीश बापट – कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र ….भावपूर्ण श्रद्धांजली!

वंदना चव्हाण खासदार, राज्यसभा


गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही : डॉ. नीलम गोऱ्हे

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली

पुणे, ता. २८ : दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

त्यांचा आणि माझ्या गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. पुणे शहरातून कसबा विधान सभेतून आमदार म्हणून काम करीत असताना त्यांचा परिचय आमच्या कुटुंबात आमची आई कै. श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्याशी सर्वप्रथम झाला.
त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपर्कात असत.

२०१४ नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार देखील झाले. या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. ते मंत्री असतांना विधान परिषदेत नेहमीच येत होते. सर्व पक्षांच्या आमदारांचे एक चांगले स्नेही म्हणून ते परिचित होते.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाना देखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुनः होणे नाही अशी भावना मी व्यक्त करीत आहे.


खासदार गिरीश बापट यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपुलकी, प्रेम आणि मैत्री जपण्याचे काम केले. मला व्यक्तिशः त्यांनी मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम त्यांनी पक्ष न पाहता वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावून देण्याचे काम केले. प्रत्येक घटकाला ते नेहमी आपलेसे वाटायचे. त्यांच्या निधनाने पुण्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हेडमास्तर गमविला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुनिल टिंगरे, आमदार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

—–

G 20 in pune | G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

Categories
Breaking News PMC Political पुणे

G20 च्या निमित्ताने मागील ५ वर्षातील भाजपचे अपयश उघडे पडले |ओव्हर नाईट विकासाला आक्षेप | प्रशांत जगताप

G20 परिषदेच्या निमित्ताने सुरू असलेल्या कामांबाबत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी काही प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण सुशोभीकरणावर आक्षेप नोंदविला आहे.

जगताप म्हणाले, “G20 परिषदेच्या निमित्ताने जगभरातील सुमारे वीस देशांचे प्रतिनिधी व मंत्री गट देशात येत आहेत. देशभरात घेण्यात येणाऱ्या विविध शहरातील बैठकांमध्ये पुणे शहराचा देखील नंबर लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या २० देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत करते.या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी पुणे शहराचे १५ दिवसात रूप बदलण्याचा प्रयत्न पुणे महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. परंतु ज्या २० देशातील प्रतिनिधी भारतात येणार आहेत त्यांना दाखवण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून जो काही ओवर नाईट विकास सुरू आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्षेप आहे. केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे गेल्या पाच वर्षातील अपयश झाकण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी अक्षरश: पडदे लावत लपवाछपवी सुरू केली आहे.

आज G20 परिसराच्या निमित्ताने शहराची अवस्था सुधारण्याच्या नादात पुणे महानगरपालिका प्रशासनाची जी दमछाक होत आहे, त्याचे कारण केवळ गेल्या पाच वर्षातील भारतीय जनता पार्टीने पुणेकरांच्या पायाभूत सुविधांकडे केलेले दुर्लक्ष आहे. शहरातील रस्ते, फुटपाथ, उड्डाणपूल यांची घाईगडबडीमध्ये रंगरंगोटी करण्यात आली. कित्येक ठिकाणी गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच राडा- रोडा उचलला गेला आहे. कित्येक ठिकाणी राडा- रोडा उचलता न आल्याने पडदा टाकून तो कचरा झाकण्यात आलेला आहे. एकूणच काय तर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी पाहुण्यांच्या डोळ्यातच धूळफेक केली जात आहेत.
पुणे महानगरपालिकेचे वार्षिक बजेट दहा हजार कोटींचे असले तरी या पुणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या पाच वर्षात विकास कामांचा राहिलेला बॅकलॉग म्हणून भरून काढण्यासाठी काही हजार कोटींची आवश्यकता असताना राज्य सरकारने अवघे 50 कोटी रुपये पाठवून पुणे शहराच्या तोंडाला पाने पुसलेली आहेत. आशिया खंडातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर, राज्यातील सर्वाधिक जीएसटी देणाऱ्या टॉप फाईव्ह शहरांपैकी एक शहर, आयटी हब, राज्याची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे शहरात नियमितपणे टॅक्स भरणाऱ्या पुणेकरांच्या सोयीसाठी ज्या गोष्टी गेल्या ५ वर्षात केल्या गेल्या नाहीत, त्या गोष्टी या पाहुण्यांसाठी केल्या जात आहेत. ठराविक पक्षाचा लोगो, पक्षाच्या नेत्यांचे फोटो डोळ्यासमोर ठेवत करण्यात आलेली रंगरंगोटी ही अक्षरशः हास्यस्पद आहे. पुणे विमानतळाच्या समोरचा रस्ता देखील कापड टाकून झाकण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी या पाहुण्यांची राहण्याची सोय आहे, त्या सेनापती बापट रस्त्यावरील काही ठिकाणे देखील शेडनेटचा कपडा टाकून झाकण्यात आलेली आहेत. गेल्या पाच वर्षात पुणेकरांच्या टॅक्सरुपी पैश्याची केवळ मर्जीतील ठेकेदारावर टेंडरद्वारे उधळपट्टी करत आपले खिसे भरणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींचे अपयश झाकण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी हा सगळा खटाटोप केलेला आहे.

यातील निकृष्ट दर्जाच्या कामांचा पडदा फाश करण्यासाठी उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दररोज एका ठिकाणी लाईव्ह करणार आहे. या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या टॅक्सरुपी पैश्यांची करण्यात आलेली उधळपट्टी, पाच वर्षात पुणेकरांना ज्या सोयी सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, अशी सर्वच ठिकाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणेकरांना लाईव्ह दाखवणार आहे”.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, “जी-२० ही आंतरराष्ट्रीय परिषद आहे.सरकारी कार्यक्रम आहे.भारताला त्याचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाचीच बाब आहे.मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष या परिषदेचे राजकीयीकरण करत आहे.प्रशासनही त्यांचेच सर्व ऐकत आहे.परिषदेच्या पुण्यात बैठका होत असून त्यासाठी पुण्याचे खासदार, आमदार यांनाही साधे निमंत्रणसुद्धा दिलेले नाही.लोकप्रतिनिधी असलेल्यांचे त्यांच्या स्वत:च्या शहराबद्दल काय म्हणणे आहे हे संयोजक म्हणून केंद्र सरकारने ऐकून तरी घ्यायला हवे होते, मात्र प्रशासनावर त्यांचा दबाव असल्याचे दिसते आहे. महापालिका आयुक्तांना आपण खासदार म्हणून स्वत: सहभाग तसेच शहरात सुरू असलेल्या दिशाहिन सुशोभीकरणाबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांचा ‘सगळे चांगले आहे’ असा आश्चर्यकारक प्रतिसाद आला.हा सरकारी कार्यक्रम आहे तर भाजपने त्यासाठी समन्वय समिती कशी स्थापन केली? राजकीय व्यक्ती नको असे असेल तर मग या तथाकथित समन्वय समितीच्या प्रमुखाला थेट परिषदेत सहभाग कशासाठी?त्यांना तिथे स्थान कसे काय दिले जाते?”

MP Vandana Chavan | नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 

| खासदार वंदना चव्हाण यांची माहिती

 जलसंपदा विभागाने पुणे मनपाच्या  नदीकाठ सुधार प्रकल्पावर अनेक वेळा आक्षेप घेतले आहेत. “ह्या प्रकल्पाचे काम; सर्व शंका निरसन शास्त्रीय पद्धतीने झाल्या शिवाय सुरू करू नका.” असेही स्पष्ट निर्देशही दिले आहेत. परंतु पुणे मनपाने जलसंपदा विभागाच्या सर्व आदेशांना पूर्णपणे झुगारून ह्या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे आणि नदीपात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकायला सुरुवात केली आहे.

मनपाच्या ह्या बेगुमान कृत्यामुळे पुण्यामध्ये ऐन पावसाळ्यात मोठी पूर परिस्थिती उद्भवू शकते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत खा. वंदना चव्हाण यांनी मुख्य अभियंता, जलसंपदा यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. सदर नदी काठ सुधार प्रकल्पाच्या चालू असलेल्या कामाचा आढावा घेऊन या.  असा मुख्य अभियंता यांनी आता पुणे मनपाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

“नदी प्रवाहाला अडथळा येता कामा नये. नदीची वहन क्षमता कमी होऊ नये. नदीच्या काटछेदात कोणताही बदल होता कामा नये.” तसेच, “नदी प्रवाहाला अडथळा आणणाऱ्या बांधकामा विरुद्ध मुख्य अभियंता कारवाई करू शकतील.” एवढेच नव्हे तर, “या कामा मुळे पूर आल्यास; त्याला पूर्णपणे पुणे मनपाच जबाबदार असेल.” असा स्पष्ट इशारा जलसंपदा विभागाने पुणे मनपाला दिला आहे. अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे.