Irrigation Dept Vs PMC | वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

Categories
Breaking News PMC पुणे

वाढीव पाणी बिलावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात रंगला वाद

| पाटबंधारेने मागितली आहे 435 कोटींची थकबाकी

पुणे | पाणी वापराच्या वाढीव बिलावरून पाटबंधारे विभाग आणि मनपा पाणीपुरवठा विभाग या दोघांमध्ये आज महापालिकेतच वाद रंगलेला पाहायला मिळाला. दरम्यान महापालिकेने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. केवळ घरगुती पाणी वापराचेच (Domestic use) पाणी बिल देणार असल्याचे महापालिकेने सांगितले. यावर पाटबंधारे विभागाचे अधिकारी ही महापालिकेला कुठलेच आश्वासन न देता निघून गेले.

पाटबंधारे विभागाकडून पाणी वापराच्या बदल्यात अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याचा आरोप महापालिकेने केला होता. त्यावर पाटबंधारे विभागाने बिल कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा वाढीव बिल दिले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर चे 99 कोटी बिल देत आजपर्यंतची थकबाकी 435 कोटी असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. शिवाय याबाबत पत्र देत बिल देण्याची मागणी केली आहे. यावर महापालिकेने पाटबंधारे विभागाला कायदा समजावून सांगत एवढे बिल नसल्याचे म्हटले होते.

महापालिका प्रशासनानुसार महापालिका फक्त घरगुती वापरासाठी पाणी देते. औद्योगिक वापरासाठी नाही. महापालिका कायद्यात तसे म्हटले आहे. त्यामुळे दंड वगैरे धरून महिन्याला फक्त 5 कोटी बिल येऊ शकते. त्यानुसार बिले द्यावीत असे महापालिकेने पाटबंधारे ला पत्र लिहिले होते. शिवाय आजपर्यंत ज्यादा घेतलेले पैसे देखील देण्याची मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने आपलाच हेका लावून 435 कोटींचे बिल पाठवले आहे.

दरम्यान हा वाद मिटवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आज महापालिकेत आले होते. यामध्ये अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता आणि अकाऊंटंट यांचा समावेश होता. सुरुवातीला मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधीक्षक अभियंता रामदास तारू यांच्याकडे ही बैठक झाली. यावेळी तारू यांनी सांगितले कि तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत आहात. कायद्यानुसार फक्त घरगुती पाणी वापराचे बिल देणे अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही औदयोगिक वापराचे बिल देणार नाही. मात्र पाटबंधारे विभागाला ही भूमिका पटली नाही. त्यामुळे तिथे चांगलाच वाद झाला. तारू यांनी या अधिकाऱ्यांना मुख्य अभियंता यांना भेटण्यास सांगितले. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे देखील असाच वाद झाला. पावसकर यांनी देखील घरगुती वापराचे बिल देण्याची मागणी लावून धरली. पाटबंधारे विभागाने यावर काही आश्वासन दिले नाही. ते तसेच उठून गेले.

Canal Advisory Committee meeting | कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

पुणे | खडकवासला प्रकल्पाची रबी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला होणार आहे. यामध्ये पाण्याच्या योग्य वापराबाबत चर्चा अपेक्षित आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सिंचन प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. माजी पालकमंत्री अजित पवार हे तत्काळ निर्णय घेण्याबाबत प्रसिद्ध होते. त्यामुळे बैठकीत वादळी चर्चा होत असत. भाजपचा अर्थात चंद्रकांत पाटील यांचा तसाच प्रयत्न असणार आहे.

नुकतेच पाटबंधारे विभागाने महापालिकेला दोन महिन्याचे १११ कोटींचे बिल दिले आहे. या वाढीव बिलावर आणि पाणी वापरावर या बैठकीत चर्चा होईल. कारण पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांचा वाद जुना आहे. दोन्ही संस्था आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे या बैठकीत कशी चर्चा होईल. याकडे लक्ष लागले आहे. शिवाय सिंचनासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे याबाबत देखील बैठकीत चर्चा होईल.

Heavy Rain in pune | बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

Categories
Breaking News PMC social पुणे

बाहेर पडताना काळजी  घ्या | खडकवासला धरणातून 30 हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळाधार पाऊस सुरू असल्याने आज दुपारी 1 वाजता खडकवासला धरणातून 30 हजार 677 क्‍यूसेक पाणी विसर्ग मुठा नदीत सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना सावधानी बाळगावी.

त्यामुळे, नदीकाठच्या भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्‍यता असून नागरिकांनी आपले वाहने तसेच इतर साहित्य काढून घ्यावे असे आवाहन महापालिका तसेच पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक विसर्ग असून पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग आणखी वाढविला जाण्याची शक्‍यता या दोन्ही विभागांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, नदीकाठच्या भागात सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

Water Reservation | पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करा | पाटबंधारे विभागाचे महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करा

| पाटबंधारे विभागाचे महापालिकेला आदेश

पुणे | पुणे म.न.पा.चे पाणी आरक्षण जलसंपदा विभागाच्या
विविध प्रकल्पांमधून मंजूर असल्याने म.ज.नि.प्रा.चे  मापदंडाप्रमाणे पाणीवापर आहे किंवा नाही व त्यानुसार आकारणी करण्यासाठी  पुणे महानगरपालिकेने सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा. तसेच दरानुसार विविध प्रकल्पातून केलेला पाणीवापर एकत्रित करून जास्तीच्या पाणीवापरावर अनुज्ञेय दराने पाणीपट्टी पुणे महानगरपालिकेस भरणा करणे अनिवार्य राहील. असे आदेश पाटबंधारे विभागाने महापालिकेस दिले आहेत.

पाटबंधारे पुणे मंडळांतर्गत बिगरसिंचन पाणीवापर ग्राहकांच्याबाबत काही ग्राहकांनी जसे कि पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोका कोला कंपनी, पिरंगुट इ. ग्राहकांनी त्यांच्या पाणीमागणीच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांतून पाणी आरक्षित केले आहे. पुणे म.न.पा.स देखील जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पातून पाणी आरक्षणास मंजूरी आहे. यामध्ये खडकवासला, पवना, भामा आसखेड चा समावेश आहे.

हे प्रकल्प पुणे मंडळांतर्गत विविध क्षेत्रीय विभागांकडे असल्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीवापरासाठी विभागनिहाय वेगवेगळे बिगरसिंचन करारनामे, सिंचन पुनर्स्थापना रक्कम व दोन महिन्याची आगाऊ पाणीपट्टी
अनामत रक्कम भरून संबंधित विभागाकडे करारनामे संबंधित संस्थेस करावे लागतात. म.ज.नि.प्रा. आदेश दि. २९.०३.२०२२ मधील निर्देशानुसार बिगरसिंचन ग्राहकांच्या पाणीवापरानुसार आकारणी दर केले आहेत.

बिगरसिंचन पाणीवापरकर्ता/ग्राहक एकच असल्याने जरी विविध धरणातून पाणी आरक्षण मंजूर असले तरी एकत्रित पाणीवापरावर गणना करून वरीलप्रमाणे दरानुसार पाणीपट्टी आकारणी करणे आवश्यक आहे. यास्तव  वस्तुस्थिती विचारात घेता पुणे म.न.पा.चे पाणी आरक्षण जलसंपदा विभागाच्य. विविध प्रकल्पांमधून मंजूर असल्याने म.ज.नि.प्रा.चे वरील मापदंडाप्रमाणे पाणीवापर आहे किंवा नाही व त्यानुसार आकारणी करण्यासाठी संबंधित अधीक्षक अभियंता यांचेकडे पुणे महानगरपालिकेने सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा व वर नमूद दरानुसार विविध प्रकल्पातून केलेला पाणीवापर एकत्रित करून जास्तीच्या पाणीवापरावर अनुज्ञेय दराने पाणीपट्टी पुणे महानगरपालिकेस भरणा करणे अनिवार्य राहील. त्यानुषंगाने पुणे म.न.पा. ने अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

Discharge water from Khadakwasla Dam | खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग 

Categories
Breaking News social पुणे

खडकवासला धरणातून २५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग

| सकाळी ६वाजता विसर्ग वाढवला

पुणे | शहर आणि शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील धरणामध्ये गेल्या ८ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे खडकवासला धरण ९४% भरले आहे. खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून  सकाळी ६ वाजले पासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा

गेल्या ८ दिवसापासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची चांगलीच वाढ झाली आहे. खडकवासला धरण साखळीतील चार धरणामध्ये १०.७९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. मागील वर्षी याच दिवशी ८.६३ टीएमसी पाणी धरणामध्ये होते. पाऊस चांगला सुरु असल्याने ही वाढ होतच राहिल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान खडकवासला धरणाची क्षमता कमी असल्याने पाटबंधारे विभागाने मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. काल रात्री १२ वाजले पासून विसर्ग करण्यात येत आहे. रात्री धरणाच्या सांडव्यातून चालू असणारा 856 क्युसेक विसर्ग वाढवून ठीक सकाळी ६ वाज्लेपासून २५६८ क्युसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी… असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

MP Vandana Chavan | नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 

| खासदार वंदना चव्हाण यांची माहिती

 जलसंपदा विभागाने पुणे मनपाच्या  नदीकाठ सुधार प्रकल्पावर अनेक वेळा आक्षेप घेतले आहेत. “ह्या प्रकल्पाचे काम; सर्व शंका निरसन शास्त्रीय पद्धतीने झाल्या शिवाय सुरू करू नका.” असेही स्पष्ट निर्देशही दिले आहेत. परंतु पुणे मनपाने जलसंपदा विभागाच्या सर्व आदेशांना पूर्णपणे झुगारून ह्या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे आणि नदीपात्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकायला सुरुवात केली आहे.

मनपाच्या ह्या बेगुमान कृत्यामुळे पुण्यामध्ये ऐन पावसाळ्यात मोठी पूर परिस्थिती उद्भवू शकते. या परिस्थितीची गंभीर दखल घेत खा. वंदना चव्हाण यांनी मुख्य अभियंता, जलसंपदा यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. सदर नदी काठ सुधार प्रकल्पाच्या चालू असलेल्या कामाचा आढावा घेऊन या.  असा मुख्य अभियंता यांनी आता पुणे मनपाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

“नदी प्रवाहाला अडथळा येता कामा नये. नदीची वहन क्षमता कमी होऊ नये. नदीच्या काटछेदात कोणताही बदल होता कामा नये.” तसेच, “नदी प्रवाहाला अडथळा आणणाऱ्या बांधकामा विरुद्ध मुख्य अभियंता कारवाई करू शकतील.” एवढेच नव्हे तर, “या कामा मुळे पूर आल्यास; त्याला पूर्णपणे पुणे मनपाच जबाबदार असेल.” असा स्पष्ट इशारा जलसंपदा विभागाने पुणे मनपाला दिला आहे. अशी माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी दिली आहे.

Rain | Dams | धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ 

Categories
Breaking News पुणे

धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ

 

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या दोन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा २.९६ झाला आहे.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या दोन ते दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे चार दिवसांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १९ मिमी, पानशेत ५० मिमी, वरसगाव ५३ मिमी तर टेमघर धरणात सर्वाधिक ६६ मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

MWRRA | वारंवार सुनावणी घेण्यापेक्षा कमिटीनेच अहवाल द्यावा  | जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

वारंवार सुनावणी घेण्यापेक्षा कमिटीनेच अहवाल द्यावा 

| जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे आदेश 

 
पुणे |  महापालिकेच्या जादा पाणी वापराबाबत शेतकरी विठ्ठल जऱ्हाड यांनी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाकडे (MWRRA) याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी सुरू आहे. मात्र या सुनावण्या वाढतच चालल्या आहेत. प्राधिकरणाने महापालिकेला याआधीच निर्देश आहेत. त्यावर फक्त अंमल करायचा आहे. त्यामुळे हा अंमल होतो कि नाही याची तपासणी नियुक्त कमिटीने करावी आणि अहवाल आमच्याकडे सोपवावा, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.
महापालिकेच्या पाणीवापरबाबत शेतकऱ्याने आक्षेप घेतला होता. त्यावर महापालिकेने देखील 2018 साली अपील केले होते. त्यावर प्राधिकरणाने दुसऱ्याच सुनावणीत काय करायचे याचे आदेश दिले होते. यामध्ये वेगवेगळे मुद्दे होते. त्यानंतर यावर अंमल होतो कि नाही हे पाहायला एक कमिटी स्थापन केली होती. आता compliance hearing सुरु आहेत. यामध्ये शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचा महापालिकेने फेरवापर करावा. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय रोखावा याबाबत आदेश दिले आहेत. मुंढवा आणि खराडी एसटीपी बाबत देखील आक्षेप आहेत. त्यावर महापालिकेने “शहरातील सांडपाण्याचा फेरवापर करावा, यासाठी “जायका’ प्रकल्प राबविण्यात येत आहे,’ अशी माहिती दिली. मात्र, “त्यासाठी तीन वर्षे लागणार असून,’ त्यानंतरच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय कमी करता येईल, अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र प्राधिकरणाने त्याकडे दुर्लक्ष करत आहे ते प्लांट व्यवस्थित चालवा, असे सांगितले.
दरम्यान प्राधिकरणाकडे या सुनावण्या वाढतच चालल्या आहेत. प्राधिकरणाने महापालिकेला याआधीच निर्देश आहेत. त्यावर फक्त अंमल करायचा आहे. त्यामुळे हा अंमल होतो कि नाही याची तपासणी नियुक्त कमिटीने करावी आणि अहवाल आमच्याकडे सोपवावा, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

Irrigation Department Vs PMC : महापालिकेने पाटबंधारे विभागाला जाब विचारला खरा; मात्र पाटबंधारेचा महिना उलटूनही कसलाही प्रतिसाद नाही 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेने पाटबंधारे विभागाला जाब विचारला खरा; मात्र पाटबंधारेचा महिना उलटूनही कसलाही प्रतिसाद नाही

पुणे : महापालिकेकडून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिका खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी उचलते. त्याबदल्यात महापालिका जलसंपदा विभागाला पाणीपट्टी देते. मात्र पाणीपट्टी थकीत असल्याने आता जलसंपदा विभागाने महापालिकेवर कारवाई केली आहे. महापालिकेच्या परस्पर जलसंपदाने 23 कोटी रुपये वळते करून घेतले आहेत. विशेष म्हणजे महापालिका म्हणते कि थकलेली पाणीपट्टी एवढी नाही. असे असतानाही जलसंपदा विभागाने जास्तीची रक्कम समायोजित करून घेतली आहे. दरम्यान जलसंपदा विभागाचे असे धोरण असताना देखील महापालिकेने मात्र गुळमुळीत भूमिका घेतली होती. मात्र टीका झाल्यानंतर महापालिकेने जलसंपदा विभागाला याचा जाब विचारला. समायोजित केलेली रक्कम तात्काळ परत करावी, असे पत्र महापालिकेने पाटबंधारे विभागाला मागील महिन्यात पाठवले होते. मात्र महिन्याभरापासून पाटबंधारे विभागाचा महापालिकेला कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे महापालिका अजून एकदा पत्र पाठवणार आहे.

: महापालिकेने काय म्हटले आहे पत्रात? 

पुणे महानगरपालिकेचा शासन मान्य पाणीपुरवठा १६.३६ TMC असून पुणे महानगरपालिका खडकवासला घरणामधून, जॅकवेल व बंद पाईपलाईन द्वारे पाणी घेत आहे. पुणे महानगरपालिका प्रत्यक्ष वापर केलेल्या पाण्याचे मीटर
रिडिंग नुसार व MWRRA च्या मान्य दरानुसार पाणीपट्टी पाठबंधारे विभागाकडे अदा करत आहे.  पुणे महानगरपालिका, पाणीपुरवठा विभागाकडे मार्च २०२२ अखेर कोणतीही थकीत पाणीपट्टी असल्याबाबत
कळविले आहे. आपल्या विभागाकडे पुणे महानगरपालिकेची स्थानिक उपकरा पोटी जमा असलेली रक्कम रुपये २३,०१,७७,११०/-, थकीत पाणीपट्टी दर्शवून समायोजित केल्याचे दिसून येते. पुणे महानगरपालिकेस देय असलेली रक्कम परस्पर वर्ग करून घेण्यात आलेली आहे. तरी पाणीपट्टी थकबाकीपोटी समायोजित केलेली स्थानिक उपकराची रक्कम रुपये २३,०१,७७,११०/- त्वरित पुणे महानगरपालिकेकडे
वर्ग करण्यात यावी हि विनंती.

हे पत्र मागील महिन्यात पाठवण्यात आले होते. मात्र पाटबंधारे विभागाने याला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही.

Water Resources Department Vs PMC : पाणीपट्टी थकीत ठेवल्याने जलसंपदा विभागाची महापालिकेवर कारवाई : नेमकं काय आहे प्रकरण…

Categories
Breaking News PMC पुणे

पाणीपट्टी थकीत ठेवल्याने जलसंपदा विभागाची महापालिकेवर कारवाई

: 23 कोटी रुपये वळते करून घेतले

पुणे : महापालिकेकडून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महापालिका खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी उचलते. त्याबदल्यात महापालिका जलसंपदा विभागाला पाणीपट्टी देते. मात्र पाणीपट्टी थकीत असल्याने आता जलसंपदा विभागाने महापालिकेवर कारवाई केली आहे. महापालिकेच्या परस्पर जलसंपदाने 23 कोटी रुपये वळते करून घेतले आहेत. विशेष म्हणजे महापालिका म्हणते कि थकलेली पाणीपट्टी 5 कोटीच्या आसपास आहे. असे असतानाही जलसंपदा विभागाने जास्तीची रक्कम समायोजित करून घेतली आहे. दरम्यान जलसंपदा विभागाचे असे धोरण असताना देखील महापालिकेने मात्र गुळमुळीत भूमिका घेतली आहे. जलसंपदा विभागाला याचा जाब विचारणे अपेक्षित असताना आणि त्याबाबत लेखी पत्रव्यवहार करणे अपेक्षित असताना महापालिकेने याबाबत काहीही केले नाही. पाणीपुरवठा विभाग प्रमुखांनी फक्त तोंडी माहिती मागितली आहे. ती ही पालिकेला गेल्या 4 दिवसापासून मिळालेली नाही.
खडकवासला प्रकल्पातील धरण साखळीतून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. महापालिका त्याबदल्यात जलसंपदा विभागाला पाणी दरानुसार पाणीपट्टी देते. मात्र याबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागात मतभेद आहेत. जलसंपदा विभाग ज्यादा दर घेते. असे महापालिकेचे म्हणणे आहे. तर जलसंपदा विभागाची तक्रार असते कि महापालिका जास्त पाणी वापरून देखील पाणीपट्टी थकवते. याबाबत जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तक्रार केली होती. त्यावेळी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेला पिंपरी महापालिकेचा आदर्श घेण्यास सांगितले होते.
 त्यांनतर मात्र जलसंपदा विभागाने महापालिकेवर कारवाई केली आहे. कारवाई केल्यानंतर जलसंपदाने याची माहिती महापालिकेला कळवली आहे. जलसंपदा विभागाने आयुक्तांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे कि पुणे महानगर पालिकेकडील पाण्याची थकित पाणीपट्टी रक्कम जलसंपदा खात्याकडे अदा न केल्याने आपले महानगरपालिकेस देय असलेल्या स्थानिक उपकराच्या रकमेतून 23 कोटी इतकी रक्कम पाणीपट्टी साठी समायोजित करण्यात आली आहे. हे आपल्या माहितीसाठी सविनय सादर करत आहोत. असे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान जलसंपदा विभागाचे असे धोरण असताना देखील महापालिकेने मात्र गुळमुळीत भूमिका घेतली आहे. जलसंपदा विभागाला याचा जाब विचारणे अपेक्षित असताना आणि त्याबाबत लेखी पत्रव्यवहार करणे अपेक्षित असताना महापालिकेने याबाबत काहीही केले नाही. पाणीपुरवठा विभाग प्रमुखांनी फक्त तोंडी माहिती मागितली आहे. ती ही पालिकेला गेल्या 4 दिवसापासून मिळालेली नाही. जलसंपदाने एवढी कारवाई करूनही विभाग प्रमुख जाब विचारू शकत नाहीत, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.