Monsoon | मान्सूनचा पहिला अंदाज आला | जाणून घ्या यंदा किती पाऊस पडणार? दुष्काळाची शक्यता किती?

Categories
Breaking News social देश/विदेश लाइफस्टाइल शेती

मान्सूनचा पहिला अंदाज आला | जाणून घ्या यंदा किती पाऊस पडणार?  दुष्काळाची शक्यता किती?

 स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची केवळ 25% शक्यता आहे.  LPA च्या 94% पाऊस अपेक्षित आहे.  तेथे दुष्काळ पडण्याची शक्यता 20% आहे.  वास्तविक, ला निना संपली असून आगामी काळात एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे.
भारतात मान्सून २०२३: मान्सूनचा पहिला अंदाज आला आहे.  स्कायमेट या खाजगी हवामान अहवाल देणार्‍या संस्थेने 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे.
स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  म्हणजे, पहिल्या अंदाजात पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो.  स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची केवळ 25% शक्यता आहे.  LPA च्या 94% पाऊस अपेक्षित आहे.  तेथे दुष्काळ पडण्याची शक्यता 20% आहे.  वास्तविक, ला निना संपली असून आगामी काळात एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीतील ९ निर्णय | जाणून घ्या सविस्तर

Categories
Breaking News cultural Education Political social महाराष्ट्र शेती

मंत्रिमंडळ बैठक | एकूण निर्णय- 9

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांना दिलासा

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये 24 तासांत 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेती पिकांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेती पिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या 29 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित बैठकीत, सततच्या पावसाची सध्या कोणतीही परिभाषा नसल्याने आणि ती निश्चित करणे आवश्यक असल्याने, शेती पिकांचे नुकसान झालेल्या योग्य शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने समिती नियुक्ती करावी, असा निर्णय झाला होता. त्यानुसार सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करून शासनास शिफारशी करण्याकरिता कृषी व पदुम विभागाच्या 21 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन आदेशाद्वारे मा.अपर मुख्य सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.

या समितीने सततच्या पावसासाठी निकष निश्चित करण्याबाबत तयार केलेल्या अहवालात शेती पिकांच्या नुकसानीकरिता विहित दराने मदत देण्याकरिता सततच्या पावसासाठी काही निकष सुचविले होते. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला.

दि. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान 10 मि.मी. पाऊस झाल्यास; आणि त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील 10 वर्षाच्या (दुष्काळी वर्ष वगळून) सरासरी पर्जन्यामानच्या तुलनेत 50 टक्के (दीडपट) किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, सततच्या पावसाचा पहिला ट्रीगर लागू राहील.

अशा महसूल मंडळामध्ये पहिला ट्रीगर लागू झाल्याच्या दिनांकापासून 15 व्या दिवसापर्यंत सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI) निकष पुढीलप्रमाणे तपासण्यात येतील. 15 जुलै ते 15 ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांचे सामान्यकृत वनस्पती निर्देशांक फरक (NDVI) जर ०.५ किंवा त्यापेक्षा कमी आल्यास, सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू राहील. तथापि ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली, त्या दिवसाचा NDVI हा 15 व्या दिवसाच्या NDVI पेक्षा जास्तच असायला पाहिजे.

सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे, जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीतील सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासनास प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित प्रस्तावांकरिता वरील निकष वापरून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने मदत देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

यापुढे राज्य शासनामार्फत घोषित करण्यात आलेल्या “अतिवृष्टी” या नैसर्गिक आपत्तीकरिता देखील 24 तासामध्ये 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस हा निकष कायम ठेवून याबरोबरच सततच्या पावसाकरिता निश्चित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या ट्रीगरमधील “सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI)” हा अतिरिक्त निकष शेती पिकांच्या नुकसानीकरिता लागू करण्यात येणार आहे. दुष्काळाव्यतिरिक्त इतर सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी देखील हा निकष लागू राहील.

—–०—–

महसूल विभाग

नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळणार |अनधिकृत उत्खननाला आळा घालणारे नवे रेती धोरण

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये (रुपये १३३ प्रति मेट्रिक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. यात स्वामित्व धनाची रक्कम माफ करण्यात येईल. याशिवाय जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क इ.खर्च देखील आकारण्यात येतील. वाळूचे उत्खनन, उत्खननानंतर वाळूची डेपो पर्यंत वाहतूक, डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. यातून वाळू किंवा रेती उत्खनन करण्यात येईल. ही रेती शासनाच्या डेपोमध्ये नेली जाईल व तिथून या रेतीची विक्री करण्यात येईल.

नदी पात्रातील वाळू गटाचे निरीक्षण करण्याची कार्यवाही तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती करेल. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरिय वाळू संनियत्रण समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती वाळू गट निश्चित करून, त्या गटासाठी ऑनलाईन ई-निविदा पद्धती जाहीर करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीला शिफारस करेल. जिल्हास्तरीय संनियत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील आणि या समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त, अपर जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, भू-विज्ञान व खनिकर्म विभाग, भूजल सर्वेक्षण तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील. ही समिती वाळू डेपोमध्ये वाळू साठा उपलब्ध करून घेण्यासाठी वाळू गट निश्चित करतील. तसेच राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाच्या निर्देशांचे पालन होईल, याची दक्षता घेईल.

—–०—–

महसूल विभाग

नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास मंजुरी

मुंबईतील फोर्ट परिसरातील भारतीय नौदलास दिलेल्या सेलर इन्स्टिट्यूट ‘सागर’ या संस्थेस भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे नाममात्र दराने नूतनीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संस्थेस फोर्ट महसूल विभागातील भूकर क्र. २/४ क्षेत्र ७४१३.१७ चौ.मी. या भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतीचे नाममात्र एक रुपया दराने भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली. पुढील तीस वर्षांच्या कालावधीसाठी हा भाडेपट्टा राहील.

—–०—–

नगरविकास विभाग

नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता

४३.८० किमी अंतराची मेट्रो मार्गिका उभारणार

नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे नागपूरमध्ये ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येईल.

या प्रकल्पाकरिता ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येईल. या मध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ कि.मी.). मार्गिका क्रमांक २- ए ऑटोमेटिव्ह चौक ते कन्हान नदी (१३ कि.मी.). मार्गिका क्रमांक ३ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५कि.मी.). मार्गिका क्रमांक ३-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० कि.मी.) असे मेट्रो मार्ग असतील. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरवात झाली होती. यामध्ये ४०.०२ कि.मी. लांबीचा मेट्रो मार्ग आणि ३२ स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

—–०—–

नगरविकास विभाग

देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार

जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

मुंबईतील गोवंडी येथील देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीवरील आरक्षणात फेरबदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे या जमिनीवर प्रस्तावित असलेल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ बृहन्मुंबई विकास योजना-२०३४ मधील न.भू.क्र.१ (भाग), मौ. देवनार, देवनार डम्पिंग ग्राऊंड, गोवंडी, मुंबई या जमिनीवरील महापालिका शाळा, इतर शिक्षण , खेळाचे मैदान, विद्यार्थी वसतिगृह व उद्यान/बगीचा ही आरक्षणे वगळून भूखंड भरणी स्थळाचे नामनिर्देशानसह उद्यान, बगिचाचे आरक्षण दाखवणाऱ्या फेरबदलास मान्यता देण्यात आली. याठिकाणच्या खेळाच्या मैदानावरील साधारणतः ३१ हजार २०० चौ.मीटर क्षेत्राचे आरक्षण वगळण्यात आले आहे.

—–०—–

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग

अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार
१४ नव्या पदांना मान्यता

अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या करिता अध्यापकीय पदांची युनिटनिहाय पुनर्रचना करुन सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. सध्या या संवर्गात १३८ पदे मंजूर आहेत आणि संस्थानिहाय कमाल विद्यार्थी संख्या १३७ आहे. या निर्णयामुळे मंजूर विद्यार्थी पद संख्या १३७ वरून २०९ इतकी होणार आहे. ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर ज. जी. समूह रुग्णालय, बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर या संस्थांमध्ये ही पदे निर्माण करण्यात येतील.

—–०—–

ऊर्जा विभाग

महावितरणला कर्जासाठी शासन हमी देण्यास मंजुरी

थकीत देणी देण्यासाठी २९ हजार २३० कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज घेण्यास महावितरण कंपनीला शासन हमी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

विलंब अदायगी अधिभार व संबंधित बाबी (Late Payment Surcharge and Related Matters ) नियम २०२२” अंतर्गत महावितरण कंपनीस कर्ज घेण्यासाठी ही शासन हमी देण्यात आली आहे.

महावितरण कंपनीकडे महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांची थकीत देणी २९ हजार २३० कोटी इतकी असून यामध्ये मुद्दल १७ हजार २५२ कोटी आणि व्याज ११ हजार ९७८ कोटी इतके आहे. महावितरण कंपनीने विविध वित्तीय संस्थांकडून स्पर्धात्मक व्याज दर मागवून कमीत कमी व्याज दर असलेला प्रस्ताव स्वीकारावा या अटीवर ही शासन हमी देण्यात आली आहे.

—–०—–

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अकृषी विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा, सातवा वेतन आयोग

अकृषी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक, सहायक संचालक व प्रकल्प अधिकारी या शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोगाची वेतन संरचना लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या पदांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यामुळे ५ कोटी ९० लाख दहा हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

—–०—–

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

नॅक, एनबीए मुल्यांकनासाठी आता महाविद्यालयांना मार्गदर्शन

उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी ‘परीस स्पर्श’

राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्याकरिता ‘परीस स्पर्श’ योजना सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात सध्या ३ हजार ३४६ महाविद्यालयांपैकी १ हजार ३६८ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. सद्य:स्थितीत १ हजार ९७८ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झालेले नाही. तसेच ७०४ तंत्रशिक्षण महाविद्यालयांचे एनबीए मूल्यांकन झालेले नाही. या संदर्भात मुंबई विद्यापीठामध्ये आयोजित एका कार्यशाळेमध्ये महाविद्यालयांना मूल्यांकनासाठी मार्गदर्शनाची गरज असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परामर्ष (PARAMARSH) योजनेच्या धर्तीवर राज्याकडून ‘परीस स्पर्श’ योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा कालावधी तीन वर्षांचा राहील. यासाठी राज्य सल्लागार समिती, विद्यापीठस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येईल. या समित्यांमार्फत मार्गदर्शक संस्थांची निवड करण्यात येईल. या योजनेसाठी येणाऱ्या १३ कोटी ५० लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

Heavy Rain in Pune | पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

पुणे – काल दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य चोख बजावले आहे.

अग्निशमन दलाकडे दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी ०९•५७ वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे दिनांक १८•१०•२०२२ रोजी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी  सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.

विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.

Pune Rain | Tree Fall | शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

Categories
Breaking News social पुणे

शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना

पुणे – शहरात  दिनांक ३०|०९| २०२२ रोजी दुपारी चार नंतर मुसळधार पाऊस व वारयाचा प्रचंड जोर असल्याने शहराच्या विविध ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून  दिनांक ०१|१०|२०२२ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत १०० झाडे पडल्याची तसेच अनेक ठिकाणी झाडपडीच्या किरकोळ घटनांची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे.

धुवादार बरसणारा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे कुठे रस्त्यावर तर कुठे वाहनावर व एखाद्या ठिकाणी घरावर झाड पडल्याचे दुरध्वनी अग्निशमन दलाकडे आले होते. नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावणारे अधिकारी व जवान यांनी योग्य नियोजन करत अग्निशमन मुख्यालय व इतर अग्निशमन केंद्र अशा एकूण २० केंद्रातील अग्निशमन वाहने व रेस्क्यु व्हॅन वेळेत रवाना केल्या. तसेच दलाचे सर्व अधिकारी व जवान यांनी प्रत्येक ठिकाणी तत्परतेने काम करत चेन सॉ, रश्शी, ट्रि पुनर अशी वेगवेगळी अग्निशमन उपकरण वापरून झाडे हटवण्याचे कार्य पार पाडले असून अजून ही बरयाच ठिकाणी जवान काम करीत होते.

Private and IT companies | पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या  | खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन 

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या

 खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन

पुणे |  भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यात पुढील २ दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने, पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व खासगी कंपन्या तसेच आयटी कंपन्या यांना आवाहन करण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्या व सतर्कतेच्या दृष्टीने, त्यांनी पुढील २ दिवस त्यांचे अधिनस्थ कर्मचारीवर्ग यांना वर्क फ्रोम होम करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Holiday for all schools in Pune | पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार 

Categories
Breaking News Education PMC पुणे

पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी | शिक्षक व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहावे लागणार

| महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय

पुणे | पुणे शहर आणि परिसरात गेल्या 10 दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. खडकवासला धरण भरले असल्याने  पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अशातच आगामी काळातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील सर्व शाळांना उद्या (14 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने निर्देश जारी केले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिका हद्दीतील क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, सर्व मनपा खाजगी शाळांना अनुदानित, विना अनुदानित, अंशत: अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित इ.शाळांना दिनांक १४/०७/२०२२ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
तथापि पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाच्या अनुषगांने शाळेत उपस्थित राहतील.

Potholes in pune | महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी 

Categories
Breaking News PMC social पुणे

महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी

| तर आदर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजवले

पुणे : शहरात गेल्या आठवड्या भरापासून संततधार सुरु आहे. या पावसाने मात्र शहरातील विविध रस्त्यांची चाळण झाली आहे. संततधार पावसामुळे महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामाची पोलखोल होत आहे. एकीकडे शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेने अंदाजपत्रकात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे. पण आता खड्डे पडल्यानंतर महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्डे बुजविले आहेत. तर आदर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजवले आहेत. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी यांनी दिली.
महापालिकेकडून पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाते. कोट्यवधी रुपये खर्च करून डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना पहिल्याच पावसात खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने पुणेकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनांचा वेग मंदावल्याने कोंडीही होत आहे. नागरिकांकडून टीका होत असताना महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याच सोबत महापालिकेच्या या कामात आदर पुनावाला फाउंडेशनकडूनही मदत केली जाते. सीएसआरच्या माध्यमातून त्यांची स्वतःची यंत्रणा वापरून खड्डे बुजविले जातात. गेल्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच भागात खड्डे पडले आहेत, पण महापालिकेच्या पथ विभागाकडे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची स्वतंत्र यंत्रणा असतानाही संथ गतीने खड्डे बुजविले जात आहेत. पण त्या उलट आदर पुनावाला फाउंडेशनकडे केवळ दोन मशिन आहेत. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून त्यांना यादी दिली जाते, त्यानुसार त्यांच्या खड्डे बुजविण्याचे काम करतात. गेल्या आठवड्याभरात महापालिकेच्या मुख्य खात्याने केवळ १०० खड्डे बुजविले आहेत. तर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजविले आहेत. असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Pune Rain | खडकवासला साखळीतील चार धरणात जमा झाले ७ टीएमसी पाणी!  | पाणीकपाती पासून पुणेकरांची होणार सुटका 

Categories
Breaking News PMC social पुणे

खडकवासला साखळीतील ४ चार धरणात जमा झाले ७ टीएमसी पाणी!

| पाणीकपाती पासून पुणेकरांची होणार सुटका

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ६.९५ टीएमसी  झाला आहे. दरम्यान आता हे पाणी आगामी ५ महिने पुरेल इतके आहे. त्यामुळे आता पुणे शहरात पाणीकपात होईल, अशी शक्यता  दिसत नाही. असे प्रशासनातील सूत्रांनी स्पष्ट केले.

खडकवासला धरण साखळीतील ४ धरणातील पाणी खूप कमी झाले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात एक दिवसाआड पाणी सुरु केले होते. मात्र ईद आणि आषाढी एकादशी मुळे तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता धरण क्षेत्रात वाढणारा पाण्याचा साठा पाहून पाणी कपात होईल असे चित्र दिसत नाही. ह पुणेकरांसाठी दिलासाच आहे.

धरणातील पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता ५  महिन्यांचे पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला  तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला. गुरुवारी सायंकाळी हा पाणी साठा ४.९३ टीएमसी झला होता. शनिवारी सायंकाळी हा साठा ६.९५ टीएमसी इतका झाला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला २२ मिमी, पानशेत ८५ मिमी, वरसगाव ८६  मिमी तर टेमघर धरणात १०० मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

Dams Water | चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर | धरण क्षेत्रात संततधार सुरूच 

Categories
Breaking News PMC social पुणे

चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर

| धरण क्षेत्रात संततधार सुरूच

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या तीन दिवसापासून  जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा ४.९३ टीएमसी  झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा ८.६६ टीएमसी इतका होता.

हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आता ३ महिन्यांचे पाणी वाढले आहे.

 

सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६ झाला  तर बुधवारी सकाळी हा पाणी साठा ३.६७ टीएमसी झाला. गुरुवारी सायंकाळी हा पाणी साठा ४.९३ टीएमसी झला आहे. या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, खडकवासला १० मिमी, पानशेत ४०  मिमी, वरसगाव ३३  मिमी तर टेमघर धरणात ३६  मिमी पावसाची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे.

MLA Rajendra Raut | शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करू नका  | आमदार राजेंद्र राऊत यांच्या खत दुकानदारांना सूचना 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करू नका 

| आमदार राजेंद्र राऊत यांच्या खत दुकानदारांना सूचना

बार्शी तालुक्यातील सध्याची पाऊसाची परिस्थिती व पेरणीचा आढावा, तसेच खते बी-बियाणे यांची उपलब्धता या बाबतीत  प्रांत अधिकारी हेमंत निकम  यांच्या उपस्थितीत कृषी विभाग बार्शी तालुका व खते दुकानदारांची आढावा बैठक आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
बार्शी तालुक्यात जून महिन्यातील प्रदीर्घ विश्रांतीनंतर सध्या पाऊसाचे चांगल्या प्रकारे आगमन झाले आहे. या पाऊसाच्या आगमनाने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने, त्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील सध्याची पेरणीची परिस्थिती पाहता, तालुक्यातील शेतकरी बांधवांना खते, बी-बियाणे यांची कमतरता भासू नये, त्यांना उच्च व चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे उपलब्ध व्हावी यासाठी खत दुकानदार व कृषी विभागाने दक्षता घ्यावी अशा सूचना बैठकीत दिल्या.
त्याचबरोबर तालुका कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, पेरणी करीता योग्य असलेले चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे यांबाबत जनजागृती करावी असे आवाहन संबंधित कृषी खात्याच्या अधिका-यांना केले. तसेच खते दुकानदारांनी शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारे अडवणूक व फसवणूक करू नये अशा सक्त सूचना, दुकानदारांना दिल्या गेल्या आहेत. 
या बैठकीत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, त्यांना पेरणीच्या कामामध्ये तसेच खते, बी-बियाणांच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, माजी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, रावसाहेब मनगिरे, विलास आप्पा रेनके, कुंडलिकराव गायकवाड, बाबासाहेब मोरे, खते दुकानदार व कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.