Environment Conservation | अस्थिविसर्जन नदीत न करता वृक्षारोपण करण्याचा विधायक उपक्रम | पर्यावरण संवर्धनाचा दिला गेला संदेश

Categories
cultural social महाराष्ट्र शेती

Environment Conservation | अस्थिविसर्जन नदीत न करता वृक्षारोपण करण्याचा विधायक उपक्रम | पर्यावरण संवर्धनाचा दिला गेला संदेश

Environment Conservation | गोरमाळे ता. बार्शी (Gormale Tal – Barshi) येथील कै. रणजित (आबा) मोरे यांच्या अंत्यविधी नंतर राखेचे विसर्जन नदीमध्ये न करता त्यांचे चिरंजीव सतीश मोरे (Satish More) व दत्ता मोरे (Datta More)  आणि मोरे कुटुंबीय यांनी राखेचे विसर्जन वृक्षारोपण (Tree Plantation) कार्यासाठी करण्याचा संकल्प केला. यातून पर्यावरण संवर्धनाचा चांगला संदेश दिला गेला आहे. (Environment Conservation)
वृक्षसंवर्धन समिती बार्शी (Tree Conservation Committee Barshi) यांनी या संकल्पनेला प्रतिसाद देऊन वृक्षारोपण करण्यास सहकार्य केले. या अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिल्याने आसपासच्या परिसरात आणि समाज माध्यमात देखील मोरे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्र वर्गाचे या कामाबाबत कौतुक होत आहे. या वेळी माणिक हजारे हनुमंत काळेल, सुरज वराळे, अमर शिंदे, प्रवीण काकडे, नितीन मोरे, शेखर भांडवलकर, अमर आगलावे तसेच  गोरमाळे गावातील नागरिक उपस्थित होते.
News Title | Environmental Conservation Constructive initiative to plant trees without disposing of bones in the river A message of environmental conservation was given

Dilip Sopal | स्पोर्ट शुज घालुन झोपणारे गिरीश बापट | माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितलेला किस्सा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

स्पोर्ट शुज घालुन झोपणारे गिरीश बापट |  माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितलेला किस्सा

स्व गिरीश बापट साहेब आणि माजी मंत्री दिलीप सोपल  यांची जिगरी मैत्री . त्यातून अनेक किस्से ऐकायला अनुभवायला मिळाले. विधिमंडळाची लॉबी  असो ,मॅजेस्टिक आमदार निवास तील खोली असो  की सार्वजनिक व्यासपीठ  दोघेही एकत्र आले की हास्य कल्लोळ ठरलेला.
असाच एक आठवणीतील किस्सा  सोपल यांच्या  भाषेत .. ” नागपूर अधिवेशन काळातील हा प्रसंग .  अधिवेशन काळात मॉर्निंग वॉक चा  गिरीश बापट आणि मी संकल्प केला. बापट म्हणले चला सोपल स्पोर्ट शुज घेऊ. दोघांनी स्पोर्ट शूज घेतला. सकाळी ६ ला नागपूर च्या थंडीत मॉर्निंग वॉक ला जायचेच असा निश्चय करून आम्ही  आपापल्या  रूम  कडे गेलो. सकाळी ठरल्याप्रमाणे मी बापटांच्या रूम वर गेलो दरवाजा ठोठावला त्यांचा पी ए डोळे चोळत बाहेर आला मी म्हटले अरे उठव तुझ्या साहेबांना . पी ए  म्हणाला साहेब वॉकिंग ला जाऊन आलेत आणि परत झोपलेत. मी पाहिले तर खरच बापट शुज  घालून झोपलेले . म्हटले आपल्याला उशीर झाला म्हणून मी  गेलो वॉकिंग  ला . परत विधिमंडळात भेट झाल्यावर बापट बोलले आरे दिलीप सकाळी उशिरा का आला ?  मी बोललो झाला उशीर  परत दुसऱ्या दिवशी  गेलो  परत तसाच प्रसंग वॉकिंग शुज घालून बापट झोपलेले . पी ए चे तेच उत्तर आताच येऊन झोपलेत. २-३ दिवस हे असेच चाललेले . जरा संशय आला काहीतरी गडबड आहे.  चौथा दिवस पुन्हा पी ए बाहेर. त्याला विश्वासात घेतले काय गडबड आहे नक्की म्हणून  विचारले त्याने त्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले अहो सोपल साहेब तुमची  लय धास्ती घेतली साहेबांनी थंडीत कुठे उठून  मॉर्निंग वॉक ला जायचे म्हणून वॉकिंग शुज घालूनच झोपतात आणि तुम्ही आले की आताच आले वॉकिंग  वरून असे मला सांगायला लावतात.  आणि मग मी विधिमंडळ लॉबी त  नाव न घेता  बापटासमोर जेंव्हा हा प्रसंग सांगितला तेंव्हा मात्र माझा पी ए फुटला काय की म्हणून या  गमती ची त्यांनी पण मजा घेतली . “

MLA Rajendra Raut | शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करू नका  | आमदार राजेंद्र राऊत यांच्या खत दुकानदारांना सूचना 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करू नका 

| आमदार राजेंद्र राऊत यांच्या खत दुकानदारांना सूचना

बार्शी तालुक्यातील सध्याची पाऊसाची परिस्थिती व पेरणीचा आढावा, तसेच खते बी-बियाणे यांची उपलब्धता या बाबतीत  प्रांत अधिकारी हेमंत निकम  यांच्या उपस्थितीत कृषी विभाग बार्शी तालुका व खते दुकानदारांची आढावा बैठक आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
बार्शी तालुक्यात जून महिन्यातील प्रदीर्घ विश्रांतीनंतर सध्या पाऊसाचे चांगल्या प्रकारे आगमन झाले आहे. या पाऊसाच्या आगमनाने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने, त्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील सध्याची पेरणीची परिस्थिती पाहता, तालुक्यातील शेतकरी बांधवांना खते, बी-बियाणे यांची कमतरता भासू नये, त्यांना उच्च व चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे उपलब्ध व्हावी यासाठी खत दुकानदार व कृषी विभागाने दक्षता घ्यावी अशा सूचना बैठकीत दिल्या.
त्याचबरोबर तालुका कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, पेरणी करीता योग्य असलेले चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे यांबाबत जनजागृती करावी असे आवाहन संबंधित कृषी खात्याच्या अधिका-यांना केले. तसेच खते दुकानदारांनी शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारे अडवणूक व फसवणूक करू नये अशा सक्त सूचना, दुकानदारांना दिल्या गेल्या आहेत. 
या बैठकीत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, त्यांना पेरणीच्या कामामध्ये तसेच खते, बी-बियाणांच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, माजी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, रावसाहेब मनगिरे, विलास आप्पा रेनके, कुंडलिकराव गायकवाड, बाबासाहेब मोरे, खते दुकानदार व कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Vairag-Ukkadgaon road : Rajendra Raut : वैराग-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

वैराग-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी

: आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती

बार्शी :  बार्शी तालुक्यातील वैराग-हिंगणी-मळेगांव-चिखर्डे-गोरमाळा-पांगरी-उक्कडगांव ते जिल्हा हद्द, हा ३० किमी. रस्ता दुरुस्ती करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
राऊत म्हणाले, ५ कोटी रुपयांचा निधी हा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व पूल परिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१ – २०२२ अंतर्गत योजनेतर तरतूदी मधून रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमानुसार मंजूर करण्यात आला आहे.

: रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य

दरम्यान सद्य स्थितीत या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक ठरते आहे. कारण रस्त्यावर जागोजागी खड्डे तयार झाले आहेत. लोकांना कसरत करूनच गाड्या चालवाव्या लागतात. नागरिकांची ओरड झाल्याने या अगोदर बऱ्याच वेळा रस्ता दुरुस्ती केली गेली, मात्र ती मलमपट्टी कुचकामी ठरली. नागरिकांचा त्रास काही कमी झाला नव्हता. कारण पाऊस पडून गेल्यावर पुन्हा खड्डे तयार होत गेले. आता ५ कोटी निधी मंजूर झाल्याने आता तरी रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त होईल. अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

Barshi : Transgender Meeting : वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!  : लेखक सचिन वायकुळे

Categories
social महाराष्ट्र

वर्तन चांगले ठेवा; समाज नक्कीच डोक्यावर घेईल!

:लेखक सचिन वायकुळे यांनी तृतीयपंथीयांच्या बैठकीत व्यक्त केले विचार

बार्शी:- स्त्री अन पुरुष यांच्या मधले आयुष्य म्हणजेच तृतीयपंथी होणे हे नक्कीच भूषण नाही, याकडे समाज खूप सहानुभूतीपूर्वक पाहत आला आहे. मात्र काहींच्या चुकीच्या वर्तनामुळे सर्वच तृतीयपंथीबद्दल नकारात्मक वातावरण तयार होत आहे.  चांगल्या वर्तनाने हे बदलता येईल; शिवाय समाजही तुम्हाला नक्कीच डोक्यावर घेईल, असे मत लेखक सचिन वायकुळे यांनी व्यक्त  केले.
येथील स्मार्ट अकॅडमीमध्ये बार्शी शहर व तालुक्यातील तृतीयपंथींची बैठक घेण्यात आली.या बैठकीत सूचना व मार्गदर्शन करताना वायकुळे बोलत होते.

: बार्शी तालुक्यातील  तृतीयपंथींची बैठक

मागील काही दिवसांपासून व्यापारी व नागरिक यांना तृतीयपंथींचा त्रास होत असल्यासाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. अलीकडच्या काही दिवसांत तृतीयपंथींची संख्या वाढत असल्याने अंतर्गत स्पर्धाही निर्माण होऊ लागली आहे. याचा त्रास समाजातील विविध घटकांना होत आहे. तुम्ही याबाबत गंभीरपणे विचार करायला हवा आणि वर्तमानात, संभाषणात काही बदल करावेत, असे आवाहन वायकुळे यांनी केले. खरे तर कोणत्याही तृतीयपंथीचे आयुष्य  वेदनेने भरलेले असते. तृतीयपंथींना मदत करण्याची भावना समाजातील प्रत्येकाची असते.  फक्त ही मदत सन्मानाने घ्यावी. पैसे दिले नाहीत म्हणून  कोणतेही अपशब्द  वापरू नये, भविष्याचा विचार करून बचत खाते उघडून पैशांची बचत करावी, इतर अनाथांनाही मदत करण्यास तृतीयपंथींनी पुढे यावे. अशी काही पथ्ये पाळल्यास, वर्तनात बदल केल्यास नक्कीच आणखी सहानुभूतीचे वातावरण तयार होईल, असे वायकुळे म्हणाले.
शहर व तालुक्यतील बहुतांश तृतीयपंथी यावेळी उपस्थित होते.

Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत च्या विकासाबाबत दिले हे आश्वासन

Categories
Political महाराष्ट्र

ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊ

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची ग्वाही

बार्शी : ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. पंचायत समिति बार्शी, येथे तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार रूट यांनी ही ग्वाही दिली.

: अनेक सरपंचांनी आपले प्रश्न, समस्या सांगितल्या

या बैठकीत तालुक्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विविध विकास कामे करताना येणाऱ्या अडी-अडचणी, प्रश्न जाणून घेऊन, त्यांवर मात करून गावचा विकास करण्यावर मी आमदार या नात्याने सर्वतोपरी मदत करीन असे अभिवचन दिले. ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. या बैठकीत अनेक सरपंचांनी आपले प्रश्न, समस्या सांगितल्या. ते प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. गावातील पाण्याचा प्रश्न, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, घरकुले, दलित वस्ती योजना, जिल्हा परिषद शाळांचा स्तर उंचावणे, पाझर तलाव, साठवण तलाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज आदी विषयांवर सरपंचां सोबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, गटविकास अधिकारी शेखर सावंत, उपसभापती  मंजुळा वाघमोडे, माजी उपसभापती अविनाश मांजरे ,प्रमोद वाघमोडे, ज्येष्ठ नेते ॲड. अनिल पाटील, इंद्रजीत चिकणे, उमेश बारंगुळे, सुमंत गोरे, बाजार समितीचे संचालक वासुदेव बापू गायकवाड व सरपंच बंधू-भगिनी उपस्थित होते.