100th Natya Sammelan | सोलापुरात होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

100th Natya Sammelan | सोलापुरात होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

| सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

| नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार

 

100th Natya Sammelan |अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुरात (Solapur)  जानेवारीत होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्वीकारले. यावेळी नाट्यसंमेलन दिमाखात करण्याचा निर्धार सोलापुरातील कलावंतांनी व्यक्त केला. (100th Natya Sammelan)

नाट्यसंमेलनाबाबत सोमवारी हॉटेल सूर्या येथे बैठक झाली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारावे असा आग्रह सर्व सदस्यांनी धरला. यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारत असल्याचे जाहीर केले.

नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. राजेंद्र राऊत, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने, अखिल भारतीय उपनगरीय शाखेचे अध्यक्ष तथा नाट्यपरिषद मुंबईचे कार्यकारणी सदस्य विजय दादा साळुंके, नाट्य परिषद चे सहकार्यवाह दिलीप कोरके नियमक मंडळ सदस्य सुमित फुलमामडी, विश्वनाथ आव्हाड, तेजस्विनी कदम, सोमेश्वर घाणेगावकर उपस्थित होते.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सोलापुरात होणारे १०० वे नाट्यसंमेलन अत्यंत दिमाखात पार पडेल. या संमेलनासाठी निधी व अन्य कशाचीही कमतरता भासू देणार नाही. जुळे सोलापूर परिसरात भव्य नाट्यगृह व्हावे अशी सोलापूरकरांची इच्छा आहे. त्यामुळे आगामी दोन वर्षांत जुळे सोलापुरात मोठे नाट्यगृह तयार होईल. याकरिता मी स्वतः पाठपुरावा करीन, असे आश्वासनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले.

प्रास्ताविक करताना विजय दादा साळुंके म्हणाले की नाट्य परिषदेच्या आठ शाखा मिळून विभागीय नाट्य संमेलन पार पाडणार आहोत.सोलापूरमध्ये 88 वे नाट्यसंमेलन तसेच पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलन अविस्मरणीय झाले त्याचप्रमाणे विभागीय नाट्यसंमेलन होणार आहे. सदर नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वीकारावं हा एकमताने ठराव झाला. हे संमेलन चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार असल्यामुळे सर्वांना मनस्वी आनंद झाला आहे.
यावेळी आ. राजेंद्र राऊत, ज्येष्ठ पत्रकार राजा माने, शोभा बोल्ली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक दत्ता सुरवसे, मोहन डांगरे, शहाजीभाऊ पवार, कृष्णा हिरेमठ, नरेंद्र गंभीरे,पद्माकर कुलकर्णी,शशिकांत पाटील, ज्योतिबा काटे,हरिभाऊ चौगुले, सुहास मार्डीकर,प्रशांत शिंगे,आशुतोष नाटकर, जे.जे कुलकर्णी, पी.पी कुलकर्णी,जगदीश पाटील, राजू राठी, अनिल पाटील यासह नाट्य परिषदेचे पदाधिकारी, रंगकर्मी, नाट्य रसिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशांत बडवे यांनी मानले.
———

स्वागताध्यक्षांनी दिली अडीच लाखांची देणगी

१०० व्या नाट्यसंमेलनासाठी स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतःच्या पगारातून दोन लाख ५१ हजार रुपयांची देणगी यावेळी दिली. तर आ. राजेंद्र राऊत आणि उद्योजक दत्ता सुरवसे यांनी प्रत्येकी एक लाख रुपये देणगी नाट्य संमेलनासाठी दिली.

जानेवारी सांस्कृतिक मेजवानी या विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने वीस ते 26 जानेवारी या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे 27 व 28 जानेवारी रोजी मुख्य नाट्य संमेलन व संमेलनाच्यापूर्वी 20 ते 26 जानेवारी सोलापूरच्या नाट्य परिषदेच्या आठही शाखेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखा, महानगर शाखा, यासह पंढरपूर, बार्शी मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या शाखांचा सहभाग असणार आहे.

MLA Rajendra Raut | शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करू नका  | आमदार राजेंद्र राऊत यांच्या खत दुकानदारांना सूचना 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करू नका 

| आमदार राजेंद्र राऊत यांच्या खत दुकानदारांना सूचना

बार्शी तालुक्यातील सध्याची पाऊसाची परिस्थिती व पेरणीचा आढावा, तसेच खते बी-बियाणे यांची उपलब्धता या बाबतीत  प्रांत अधिकारी हेमंत निकम  यांच्या उपस्थितीत कृषी विभाग बार्शी तालुका व खते दुकानदारांची आढावा बैठक आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
बार्शी तालुक्यात जून महिन्यातील प्रदीर्घ विश्रांतीनंतर सध्या पाऊसाचे चांगल्या प्रकारे आगमन झाले आहे. या पाऊसाच्या आगमनाने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने, त्यांनी पेरणीला सुरुवात केली असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील सध्याची पेरणीची परिस्थिती पाहता, तालुक्यातील शेतकरी बांधवांना खते, बी-बियाणे यांची कमतरता भासू नये, त्यांना उच्च व चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे उपलब्ध व्हावी यासाठी खत दुकानदार व कृषी विभागाने दक्षता घ्यावी अशा सूचना बैठकीत दिल्या.
त्याचबरोबर तालुका कृषी विभागाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, पेरणी करीता योग्य असलेले चांगल्या प्रतीचे खते, बी-बियाणे यांबाबत जनजागृती करावी असे आवाहन संबंधित कृषी खात्याच्या अधिका-यांना केले. तसेच खते दुकानदारांनी शेतकरी बांधवांची कोणत्याही प्रकारे अडवणूक व फसवणूक करू नये अशा सक्त सूचना, दुकानदारांना दिल्या गेल्या आहेत. 
या बैठकीत तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, त्यांना पेरणीच्या कामामध्ये तसेच खते, बी-बियाणांच्या बाबतीत कोणतीही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीस पंचायत समितीचे माजी सभापती अनिल काका डिसले, माजी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी, नायब तहसीलदार संजीवन मुंढे, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, रावसाहेब मनगिरे, विलास आप्पा रेनके, कुंडलिकराव गायकवाड, बाबासाहेब मोरे, खते दुकानदार व कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Farmers Protest : Saundare : MLA Rajendra Raut : सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला  : वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

सौंदरे गावच्या नागरिकांनी सोलापूर महामार्ग रोखला

: वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

बार्शी :  महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला.  सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

: आमदार राऊत यांचा सरकारला इशारा

 सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज खंडीत केली असून तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. याचाच परिणाम म्हणून महावितरणच्या मनमानी कारभारा विरोधात सौंदरे गावचे शेतकरी उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करत बार्शी – सोलापूर महामार्ग रोखला.  सरकार अजूनही भानावर येणार नसेल तर आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल. असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्र लिहीत आंदोलनाचा इशारा दिला आहे.  आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचे  वीज बील माफ करुन वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा.  अन्यथा बार्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसमवेत रास्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. तरी शेतीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत होणेकामी संबंधीतांना आदेश व्हावेत. असे ही राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.