Cabinet Decision | कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा | राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

कालपर्यंत झालेल्या पावसाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करा

| राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने अगदी कालपर्यंत युद्धपातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात मदत व पुनर्वसन तसेच कृषी विभागाला निर्देश देण्यात आले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात परतीच्या पावसाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी विशेष लक्ष घालावे. पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देवून त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

Categories
Breaking News PMC Political पुणे

नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

पाऊसाने च उघडकीस आणला भाजपचा नालेसफाई घोटाळा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

गेल्या काही दिवसात पुणे शहरात झालेल्या प्रत्येक पावसात पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचलेले पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले होते. व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी घुसले होते, कित्येक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले तर दुचाकी देखील वाहून गेल्यात. प्रशासनाच्या गैरवस्थापनाचा व नालेसफाईमध्ये हलगर्जीपणा केल्याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसला. एक कारभारी कोल्हापूरचा तर दुसरा नागपूरचा अशी पुण्याची गत झाली असून या दोघांच्या कार्यक्षमतेवर नागरिक बोट उचलतील या अगोदर त्यांनी पुणे शहरातील गत पाच वर्षातील नालेसफाई च्या कामांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवावे , असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

जगताप  म्हणाले, या अगोदर पुण्यनगरीने अनेक मोठे- मोठे पावसाळे पाहिले आहेत परंतु त्या काळात दरवर्षी उन्हाळ्यात होणारी नालेसफाई यामुळे हा सर्व पाऊस सामावून घेण्याची या पुण्यनगरीची क्षमता होती. परंतु अलीकडच्या काळातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याची किंमत सर्वसामान्य पुणेकरांना मोजावी लागली आहे.

खरे तर पुणे शहरातून उद्भवलेली ही परिस्थिती गेल्या पाच वर्षात नालेसफाई न करता परस्पर बिले लाटल्याने निर्माण झाली आहे.इतिहासात कधीही पुण्यात पाणी जमा झाले नव्हते परंतु या पाच वर्षात आंबील ओढ्याला आलेला पूर, कात्रज तलाव ओव्हर फ्लो होऊन आलेला पूर, यावर्षी तर पुणे शहराच्या मध्यवर्तीतील प्रत्येक रस्त्यावर आलेला पूर ही पाच वर्षांमध्ये झालेल्या अक्ष्यम चुकांची परिणीती आहे. पुणे शहरातील कुठलाही नाला आज साफ झालेला नाही त्यामुळे चोक-अप होणारे हे सर्व पाणी पुण्याचा रस्त्यांवर आले आहे. पुणेकर व्यावसायिकांचा दुकानांमध्ये, पुणे शहरातील नागरिकांच्या घरांमध्ये हे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये न झालेल्या नालेसफाईमुळे झालेल्या या सर्व परिस्थितीबद्दल जबाबदारी स्वीकारून जबाबदारपणे चूक मान्य करण्याऐवजी पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीवर बोट दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टीला येत्या निवडणुकांमध्ये नागरिक अरसा नक्की दाखवतील, परंतु कुठल्याही कामाचे श्रेय घेण्यासाठी जशी रस्सीखेच करता तशी जर चूक झाल्यानंतर चूक कबूल केली असती तर कदाचित पुणेकरांनी तुम्हाला माफ केले असते. परंतु यावेळी देखील पुणे भाजपमधील राजकारण्यांनी ती परिपक्वता दाखवली नाही.

आज पुणे शहर पाण्याखाली असण्याला गत पाच वर्षातील पुणे महानगरपालिकेची न झालेली नालेसफाई जबाबदार आहे व तसेच या न झालेल्या नालेसफाईच्या पोटी एक हजार कोटींची बिले लाटनारे सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व त्यांनी पाळलेले ठेकेदार देखील तितकेच जबाबदार आहेत , असा माझा थेट आरोप आहे. असे ही जगताप म्हणाले.

 

Heavy Rain in Pune | पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!

पुणे – काल दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य चोख बजावले आहे.

अग्निशमन दलाकडे दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी ०९•५७ वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे दिनांक १८•१०•२०२२ रोजी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी  सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.

विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.

कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.

Farmers affected by heavy rains | जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा | अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत निर्णय

जून ते ऑगस्ट कालावधीतील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज घेण्यात आला. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन आणि अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १५०० कोटी रुपये राहिली असती, असे सांगून निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा

आतापर्यंत सुमारे ३९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे, काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ७५५ कोटीच्या निधीमुळे अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आतापर्यंत सुमारे ३९५४ कोटी रुपयांचा मदत निधी वितरित

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३४४५.२५ कोटी आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ
● औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र
● जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र
● परभणी- २५४५.२५ हेक्टर क्षेत्र
● हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र
● बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र
● लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र
● उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र
● यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र
● सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र

एकूण क्षेत्र- ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र
एकूण निधी – सुमारे ७५५ कोटी रुपये

Mahalunge | Heavy Rain | मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली  | औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत 

Categories
Breaking News PMC पुणे

मुसळधार पावसाने म्हाळुंगे गावातील घरे पाण्याखाली

| औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून केली गेली मदत

पुणे | महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट म्हाळुंगे गाव येथे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे सुमारे २० ते २५ घरे पाणी शिरल्यामुळे बाधित झाली होती.  त्यामुळे औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाकडून त्वरित ३ जेसिबी व दोन पंपाच्या साह्याने पाण्याचा निचरा करून सदर घरे सुरक्षित केली गेली.

या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, .उपायुक्त नितीन उदास यांनी केली.  सदर काम  महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे, उपअभियंता संजय आदीवंत  यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुरेंद्र जावळे, प्रकाश सोवळे, आकाश शिंदे, भाऊ जाधव व सर्व महापालिका औंध येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कमीतकमी वेळात काम पूर्ण केले.

Private and IT companies | पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या  | खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन 

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

पुढील 2 दिवस ‘वर्क फ्रॉम होम’ साठी प्रोत्साहन द्या

 खाजगी व आयटी कंपन्यांना महापालिकेचे आवाहन

पुणे |  भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) पुणे जिल्ह्यात पुढील २ दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्या अनुषंगाने, पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व खासगी कंपन्या तसेच आयटी कंपन्या यांना आवाहन करण्यात आले आहे की, सुरक्षिततेच्या व सतर्कतेच्या दृष्टीने, त्यांनी पुढील २ दिवस त्यांचे अधिनस्थ कर्मचारीवर्ग यांना वर्क फ्रोम होम करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Farmers affected by heavy rains | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार | योजनेतील जाचक अटी काढणार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार

योजनेतील जाचक अटी काढणार

शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई |  नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी निवेदन देऊन लाखों शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमदार प्रकाश आबिटकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. २०१८-१९ मध्ये अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखों शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकाशत राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगेवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे.

Yerwada, Kalas, Dhanori : MLA Sunil Tingre : पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा : आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश

Categories
Breaking News PMC Political पुणे

 पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा

: आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश

: पूरग्रस्त ठिकाणची केली पाहणी.

पुणे:  येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या  भागात पावसाचे पाणी शिरू नये यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र तरीही यावर्षी  पुन्हा नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याचे प्रकार घडल्यास संबधित महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाईची मागणी विधी मंडळात केली जाईल असा इशारा पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांनी दिला आहे.
          येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणार्या भागात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात सातत्याने पाणी घुसून नागरिकांचे नुकसान होत आहे. महापालिकेकडून तरीही ठोस उपाय योजना होत नाही.  येत्या पावसाळ्यात पुन्हा पूर परिस्थितीमुळे नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठी ज्या जागी पूराचे पाणी जमा होते अशा पूरग्रस्त ठिकाणे आणि नालेसफाईची कामे यांची पाहणी आमदार टिंगरे यांनी महापालिका अधिकारांसमवेत येरवडा कळस धानोरी लोहगाव क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणार्या विविध भागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. त्यात प्रामुख्याने डाॅ बाबासाहेब आंबेडकर काॅलिनी, फुलेनगर, प्रतिकनगर, शांतीनगर, गंगा कूंज सोसायटी कळस, वैभव काॅलनी, धनेश्वर शाळा मुंजाबा वस्ती धानोरी, मयुर किलबिल सोसायटी लगत नाला धानोरी, लक्षमीनगर सोसायटी धानोरी, संकल्प सोसायटी लोहगाव, कर्मभूमी नगर लोहगाव व कलवड याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
         यावेळी आमदार टिंगरे यांनी प्रत्येक पूराने बाधित ठिकाणी जाऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची कारणे काय आहेत, त्यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन काय काय उपाययोजना करतील यातील माहिती अधिकाऱ्याकडून घेतली. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. या संदर्भात येत्या गुरुवारी आयुक्तांच्या दालनात बैठक घेण्यात येणार असल्याचे ही आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली. यावेळी मा.नगरसेविका शितल सावंत, शशि टिंगरे, अशोक खांदवे, नवनाथ मोझे, बंडू खांदवे, राजेंद्र खांदवे, मिलिंद खांदवे, विश्वास खांदवे, मा. नगरसेवक सतिश म्हस्के, डाॅ. राजेश साठे, निखिल गायकवाड, बंटी म्हस्के, विनोद पवार, सतिश धापटे, राहुल म्हस्के, दाजी शेटकर, सिध्दार्थ कांबळे, सुभाष खेसे, कुलदीप शर्मा, महेश खांदवे, अमित जंगम, राहुल टेकवडे, पंकज निकाळजे, बाबू कांबळे  पुणे महानगरपालिका मलःनिसरण विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र मुळे, उप अभियंता विनायक शिंदे, कनिष्ठ अभियंता खरे, येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयाचे पुणे मनपा सहायक आयुक्त वैभव कडलख,  उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळीत  : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा 

Categories
Breaking News महाराष्ट्र

राज्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळीत

: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा

पुणे : आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या लक्ष्यद्वीप बेट समुह ते उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते ४ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस दक्षिण भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

लक्ष्यद्वीप बेट समुहापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत पसरलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात सध्या पाऊस पडत आहे. २ डिसेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

३ डिसेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळ आंध्र प्रदेश – ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता 

दक्षिण थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र मंगळवारी मध्य अंदमान समुद्र परिसरात आले आहे. ते पश्चिम वायव्य दिशेला सरकून बंगालच्या उपसागरात गुरुवारी प्रवेश करेल. त्यानंतर त्याची तीव्रता वाढत जाईल. त्यानंतर त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल. ४ डिसेंबर रोजी हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश – ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

: 24 तासात अजून धुवांधार 

येत्या २४ तासात राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार ला ORANGE इशारा तर मुंबई ठाणे पुणे व इतर काही ठिकाणी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा मध्ये YELLOW इशारा.

मच्छिमारांनी ह्या दरम्यान अरबी समुद्रात जाऊ नये. असे आवाहन -IMD कडून करण्यात आले आहे.

chennai Rain : चेन्नई शहर पाण्याखाली!  : मुसळधार पावसाने वाताहत 

Categories
Breaking News देश/विदेश

चेन्नई शहर पाण्याखाली!

: मुसळधार पावसाने वाताहत

चेन्नई : तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. चेन्नई आणि उपनगरांत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच दोन धरणांमधून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनी रविवारी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळं रविवारी चेन्नईतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई शहराला पाणीपुरवठा करणारे चेम्बरमबक्कम आणि पुझल तलाव मुसळधार पावसामुळं ओसंडून वाहत आहेत.

 

प्रशासनानं चेन्नईतील नागरिकांना पुराचा इशारा दिला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या भागांतील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये 2015 नंतर इतका मुसळधार पाऊस पहिल्यांदाच पडतोय. चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील अनेक उपनगरांमध्ये शनिवारी सकाळपासून अधूनमधून पाऊस पडला आणि रात्रभर सुरु राहिल्यानं अनेक भागांत पूर आला, त्यामुळे लोकांची गैरसोय झाली.

चेन्नईतील कोरातूर, पेरांबूर, पोरूर, पूनमल्ले, कोडंबक्कम, अण्णा सलाई, टी नगर, अडयार, पेरुंगुडी आणि ओएमआर या भागांतही पावसामुळे पाणी साचले आहे. यामुळे चेन्नईत वास्तव्याला असणाऱ्या अनेकांनी पावसाचं रौद्ररुप दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. .

 

रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत चेन्नईत 207 मिमी पाऊस झाला होता. नुंगमबक्कममध्ये 145 मिमी, विलिवक्कममध्ये 162 मिमी आणि पुझलमध्ये 111 मिमी पाऊस झाला. चेन्नई आणि लगतच्या भागांत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, तिरुवल्लूर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी 11 वाजता पुझल जलाशयातून 500 क्युसेक पाणी सोडण्याची घोषणा केली आहे. तलावालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

 

महाराष्ट्रातही अनेक भागांत अवकाळी पाऊस 

 

पावसाळा संपला तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं चित्र महाराष्ट्रात बघायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने दक्षिण महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुढील पाच दिवस मच्छिमारांना देखील समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.