MLA Sunil Tingre | लोहगावकरांना पाणी कधी मिळणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी वेधले लक्ष

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Sunil Tingre | लोहगावकरांना पाणी कधी मिळणार | आमदार सुनिल टिंगरे यांनी वेधले लक्ष

 

MLA Sunil Tingre – (The Karbhari News Service)– महापालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) समाविष्ट झालेल्या लोहगावसह समाविष्ट गावांना अद्याप पाणी पुरवठ्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. महापालिकेत येऊनही पाणी, ड्रेनेज, रस्ते या सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोषाची भावना झाली असल्याचे सांगत त्यावर शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांनी विधान सभेत केली. (Vidhansabha Session)

शहराच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील लक्षवेधीवर बोलताना आमदार टिंगरे म्हणाले, यांनी समाविष्ट गावांमधील पाणी टंचाईच्या प्रश्नावर लक्ष वेधले, ते म्हणाले, 2017 मध्ये पालिकेत 11 गावांचा तर 2021 ला 23 गावांचा समावेश झाला. मात्र, या गावांमध्ये अद्यापही महापालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत नाही. या गावांमध्ये अद्याप पाणी पुरवठ्याची वितरण व्यवस्था नाही. भामा आसखेड धरणातून माझ्या भागासाठी 2.6 टिएमसी इतका पाणीसाठा मंजुर झाला. मात्र, वितरण व्यवस्थे अभवी माझ्या मतदारसंघातील लोहगाव भागाला पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकी, त्यांची वितरण व्यवस्था, ड्रेनेज ही कामे झालेली नाहीत, ही कामे न झाल्यामुळे रस्त्यांची कामे करता येत नाहीत. ही सर्व कामे लवकरात लवकर झाली तर समाविष्ट गावांमधील नागरिकांना महापालिकेत आल्याचे समाधान लागेल असे आमदार टिंगरे यांनी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी शहरातील पाणी गळती कधी पर्यंत रोखली जाईल आणि शहर वाढत असल्याने पाणी पुरवठयासाठी अन्य काही स्त्रोत आपण वाढवत आहोत का अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सर्व भागांना सुरळीत पाणी पुरवठा होईल, तसेच शहरासाठी मुळशीच्या टाटा धरणातून पाणी घेण्याबाबत चाचपणी केली जात असल्याचे सांगितले.
——–

MLA Sunil Tingre | अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर चा मार्ग मोकळा | पुरात्वत विभागाची एनओसी मिळाली

Categories
Breaking News Political social पुणे

MLA Sunil Tingre | अखेर शास्त्रीनगर चौकातील फ्लायओव्हर व ग्रेड सेपरेटर चा मार्ग मोकळा

 | पुरात्वत विभागाची एनओसी मिळाली

  | आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Nagar Road Traffic – (The Karbhari News Service) – नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना आणखी एक यश आले आहे. शास्त्रीनगर ( येरवडा) येथील उड्डाणपुल व ग्रेडसेपरेटरच्या कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या पुरात्वत विभागाने महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे या रखडलेल्या पुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार सुनिल टिंगरे यांनी ही माहिती दिली.

नगर रस्त्यावर प्रामुख्याने येरवडा ते वाघोली दरम्यान वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी नगर शास्त्रीनगर आणि खराडी बायपास येथे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठी महापालिकेच्या  अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यात नगर रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल थेट विमानगरपर्यंत आणण्यात आमदार टिंगरे याना यश आल्याने खराडातील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागला. मात्र, शास्त्रीनगर जवळ असलेल्या आगाखान पॅलेसही राष्ट्रीय स्मारक असल्याने येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी आवशयक असलेली पुरात्वत विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र ( एनओसी) बधनकारक आहे. ही एनओसी मिळत नसल्याने या पुलाचे काम रखडले होते. यासंदर्भात आमदार टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यास यश मिळाले असून केंद्र सरकार व राज्य सरकारची एनओसीची  कार्यवाही प्रक्रिया पूर्ण होऊन अखेर दि. २ मे ला यासंबंधीची एनओसी महापालिकेला दिली असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या कामाला सुरवात होईल.

 

——

नगर रोड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या साडेचार वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. त्यात नगर रस्त्यावर शिरूर ते वाघोली पर्यंत होणारा दुमजली उड्डाणपूल आपण थेट रामवाडीपर्यंत आणण्यासाठी पाठपुरावा केला आणि त्याला यश आले. तसेच येरवडा ते विमानगरपर्यंत बीआरटी काढल्याने कोंडी सुटली आहे. आता पुरातत्व विभागाची एनओसी मिळाल्याने शास्त्रीनगर येथील उड्डाणपूल व ग्रेडसेप्रेटरच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर निश्चितपणे नगर रस्ता कोंडीमुक्त आणि सिग्नल मुक्त होईल.

सुनील टिंगरे (आमदार, वडगाव शेरी मतदारसंघ)

MLA Sunil Tingre | वडगावशेरी परिसरातील पाणी टंचाई वरून आमदार सुनिल टिंगरे यांचा आंदोलनाचा इशारा! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

MLA Sunil Tingre | वडगावशेरी परिसरातील पाणी टंचाई वरून आमदार सुनिल टिंगरे यांचा आंदोलनाचा इशारा!

| महापालिका आयुक्तांना दिले पत्र

MLA Sunil Tingre – (The Karbhari News Service) – वडगावशेरी मतदारसंघातील (Vadgaonsheri Constituency) वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागात नियमीत व सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आमदार टिंगरे यांनी दिला आहे.  (PMC Water Supply Department)

टिंगरे यांच्या पत्रानुसार वडगावशेरी मतदारसंघातील, वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागांमध्ये मागील दोन महिन्यांपासून, अनियमित व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्याबाबत स्थानिक नागरीक वारंवार मनपा प्रशासनास व माझ्याकडे तक्रारी व विनंती करत आहेत. माझ्या कार्यालयाकडूनही सदर भागातील कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता यांना वारंवार तक्रारी / सुचना देऊनही या भागातील पाणीपुरवठयाची समस्या सोडविणेबाबत मनपा प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. (Pune Water Issue)
आमदार टिंगरे यांनी पुढे म्हटले आहे कि, सद्यस्थितीत उन्हाळा चालू असून नागरीकांना पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने, नागरीकांमध्ये मनपा प्रशासना विरोधात तिव्र असंतोष पसरला आहे. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास, स्थानिक नागरीक मनपा प्रशासना विरोधात तिव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. तरी वडगावशेरी, खराडी, खांदवेनगर व विमाननगर या भागातील पाणी पुरवठ्याच्या समस्येचे निवारण होणेबाबत आपल्या स्तरावर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा सदर भागातील नागरीकांसह मनपा प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा टिंगरे यांनी दिला आहे.

Punitive tax relief should be given to all Pune city  | MLA Sunil Tingre’s demand to Ajit Pawar

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 Punitive tax relief should be given to all Pune city  | MLA Sunil Tingre’s demand to Ajit Pawar

 Pune Property Tax – (The Karbhari News Service) – Pune Municipal Corporation (PMC Pune) has been ordered by the state government to suspend collection of 2 percent penalty on illegal construction and annual arrears of property tax in 34 villages newly included in Pune Municipal Corporation (PMC Pune).  have been given.  Due to this, the citizens of the villages have got relief.  Meanwhile, MLA Sunil Tingre of Vadgaonsheri has requested the deputy chief minister Ajit Pawar and the state government to give exemption of penalty tax to all the cities.  (Pune Municipal Corporation Property tax)
 According to the statement given by MLA Tingre to Pawar, a meeting was held recently regarding the income tax of the villages included in the municipal corporation.  In this meeting, everyone demanded to cancel the one and a half times penalty imposed on residential unauthorized income and three times imposed on commercial income.  In this regard, according to the instructions, the state government has sought information from the municipal corporation.  Accordingly, there is talk in the city that a decision will be taken to cancel this punitive tax in the cabinet meeting to be held on Wednesday.  However, there is a discussion that this decision of penalty tax exemption will be available only to the income of the included villages.  Therefore, apart from the villages, there is a feeling of displeasure among other citizens of the city.  Punitive tax on all types of unauthorized property in Pimpri Chinchwad city was waived summarily.  Similarly, in Pune too, penalty tax should be waived.  This is the demand of the income tax paying citizens here.  However, while taking a decision in this regard, a decision should be taken to abolish the punitive tax on the income of the entire city including the villages involved.  Tingray has said that.

Pune Property Tax | शास्ती कराची सवलत सरसकट पुणे शहराला द्या | आमदार सुनील टिंगरे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Property Tax | शास्ती कराची सवलत सरसकट पुणे शहराला द्या | आमदार सुनील टिंगरे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

 

Pune Property Tax – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेत (PMC Pune) नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावातील अवैध बांधकामावरील शास्ती व वार्षिक थकीत मालमत्ता करावर लावण्यात आलेली २ टक्के शास्तीची रक्कम वसूल करण्यास स्थगिती देण्याचे आदेश राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला (PMC Property tax) देण्यात आले आहेत. त्यामुळे गावांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान शास्ती कराची सवलत सरसकट सर्व शहराला देण्याची मागणी वडगावशेरी चे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्य सरकारकडे केली आहे. (Pune Municipal Corporation Property tax)

आमदार टिंगरे यांनी  पवार यांना दिलेल्या  निवेदनानुसार महापालिकेत समाविष्ट गावांतील मिळकतकराबाबत  नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने निवासी अनधिकृत मिळकतींना लावली जाणारी दीडपट आणि व्यापारी मिळकतीना लावली जाणारी तीन पट शास्ती रद्द करण्याची मागणी सर्वांनी केली. यासंदर्भात  सूचनेनुसार राज्य शासनाने महापालिकेकडून माहिती मागविली आहे. त्यानुसार बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची चर्चा शहरात आहे. मात्र, शास्ती कर माफीचा हा निर्णय केवळ समाविष्ट गावातील मिळकतींनाच मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गावे वगळता शहरातील अन्य नागरिकांमध्ये नाराजीचा सुर आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रकारच्या अनधिकृत मिळकतींचा शास्ती कर ज्याप्रमाणे सरसकट माफ करण्यात आला. त्याचप्रमाणे पुण्यातही शास्ती करात सरसकट माफी देण्यात यावी. अशी मागणी येथील मिळकतकरधारक नागरिकांची आहे. तरी  यासंबंधीचा निर्णय घेताना समाविष्ट गावांसह संपूर्ण शहरातील मिळकतीवरील शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात यावा. असे टिंगरे यांनी म्हटले आहे.

Pune News | विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

Categories
Breaking News Political पुणे

Pune News | विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

| उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचे भूमिपूजन

 

The Karbhari News Service – पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनिल टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्ते विकासावर भर देण्यात येत आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याच्या प्रयत्नासोबत रिंगरोडचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रिंगरोडमुळे राज्याच्या कुठल्याही भागातून येणारी वाहने पुण्यात प्रवेश न करता इतर जिल्ह्यात जावू शकतील आणि यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे वडगाव शेरी परिसराचा वेगाने विकास होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात आपल्या आकांक्षा पुर्ण होत असल्याची भावना निर्माण व्हायला हवी असा शासनाचा प्रयत्न आहे. विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. उड्डाणपूलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक कोटी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमातून विकासकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असल्याने शहराचा लौकीक कायम रहावा यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेथे कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

आमदार श्री.टिंगरे म्हणाले, वडगावशेरी विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. गोरगरिबांना हक्काची घरे देण्यासोबत अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. विश्रांतवाडी परिसराला भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते एकूण १७२ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

0000

MLA Sunil Tingre | प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी | आमदार सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

MLA Sunil Tingre | प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी

| आमदार सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी

 

MLA Sunil Tingre | पुणे शहरात मेट्रोचे (Pune Metro) जाळे उभे राहत आहे. मात्र, पुणे विमानतळाला मेट्रोची लाईन जोडण्यात आलेली नाही, प्रवाशांच्या सोईसाठी ही मेट्रो विमानतळापर्यंत (Pune Airport) नेण्यात यावी अशी मागणी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत 293 व्या ठराव्यावरील चर्चेत आमदार टिंगरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, शहरात मेट्रोचे जाळे अतिशय मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळतोय. या मेट्रोने शिवाजीनगर, पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन, स्वारगेट एसटी स्टॅन्ड असे महत्वाचे भाग जोडले आहेत. मात्र, शहरात विमानतळ आहे याचा विसर पडलेला दिसतो. नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत ही मेट्रो आलेली आहे. मात्र, ती विमानतळाला जोडलेली नाही, त्यामुळे विमानतळावर ये-जा करणार्‍या प्रवाशांची गैरसोय होत आहे. आपण परदेशात विमानतळापासून थेट मेट्रोची सुविधा पाहतो. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सोईसाठी पुणे विमानतळापर्यंत मेट्रो नेण्यात यावी अशी मागणी आमदार टिंगरे यांनी सरकारकडे केली.
———————

2024 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना घरे द्यावीत

झोपडपट्टीतील रहिवाशांना हक्काची घरे देण्यासाठी राबविण्यात आलेल्या एसआरए योजनेत 2011 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना घरे दिली जात आहे. मात्र, या योजनेच्या नियमावलीत सुधारणा करून 2024 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांचा समावेश करून त्यांना घरे देण्यात यावी, जेणेकरून कुटुंब वाढलेल्या झोपडपट्टीधारकांना त्याचा फायदा मिळू शकेल अशी मागणीही आमदार टिंगरे यांनी सरकारकडे केली.

Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद |  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Shivgarjana Mahanatya  | शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

|  महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन तास उपस्थिती

Shivgarjana Mahanatya | मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट… मोगलांचे आक्रमण आणि त्यांच्या लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांसह त्यांच्या मावळ्यांच्या चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया. महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा, तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप… संपूर्ण शिवकालीन इतिहास शिवप्रेमीसमोर अवतरला.

वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग व पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारपासून या ‘शिवगर्जना’ महानाट्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मा. आमदार रामभाऊ मोझे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, माजी विशेष पोलीस महनिरीक्षक विठ्ठल जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

The karbhari - Shivgarjana Mahanatya pune
शिवगर्जना महानाट्याला रसिकांची गर्दी

यावेळी आमदार टिंगरे म्हणाले, पुणे जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भूमीत त्यांचा पराक्रम सांगणारे शिवगर्जना महानाट्य होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्याव, असे आवाहन त्यांनी केले. तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी उदघाटन प्रसंगी केले.
दरम्यान हे नाट्य पाहण्यासाठी शिवप्रेमींनी उस्फूर्त गर्दी केल्याने अनेकांना खुर्च्याही न मिळाल्याने त्यांनी उभे राहुन हे नाट्य पाहिले. तर उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः दोन तास समोर बसून हे नाट्य पाहिले. महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसर यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेने दुमदुमून गेला.

भव्य मंचावर साकारला शिवकालीन इतिहास

देखण्या आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. देशप्रेम जगविणारे संवाद, ताकदीचा अभिनय, ऐतिहासिक प्रसंगांना साजेसे नेपथ्य, प्रसंगानुरूप गीत-नृत्य आणि संगीत यामुळे त्यात छत्रपतींच्या पराक्रमासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले. स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगातून इतिहास प्रेक्षकांच्या समोर उभा राहिला. उपमुख्यमंत्री पवार यांनी कलाकारांना टाळ्या वाजवून दाद दिली.

‘शिवगर्जना’ महानाट्याचे सोमवार दि. २६ फेब्रुवारीपर्यंत साय. ६ : ३० ते ९ : ३० यावेळेत आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Shivgarjana Mahanatya | येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य | 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन

Categories
cultural Political social पुणे महाराष्ट्र

Shivgarjana Mahanatya | येरवडा येथे साकारणार शिवगर्जना महानाट्य | 24 ते 26 फेब्रुवारीला आयोजन

|छत्रपती शिवाजी महाराज यांचा धगधगता इतिहास मांडणार

Shivgarjana Mahanatya | छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त येरवडा येथे आज शनिवारपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘शिवगर्जना’ या आशिया खंडातील भव्य-दिव्य महानाट्य साकारले जाणार आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी ही माहिती दिली.

येरवडा जेल रोड येथील के.के. भवन समोरील मैदानावर दि. 24 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत साय. साडेसहा ते रात्री साडेनऊ यावेळेत हे महानाट्य होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी मी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार वडगाव शेरी मतदारसंघात हा कार्यक्रम होत आहे. हे महानाटय विनामुल्य असून शिवप्रेमींनी या महानाट्याला उपस्थित रहावे.

शिवगर्जना महानाट्याचे वैशिष्टे

छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपुर्ण जीवपट उलगडणारे हे जिवंत महानाट्य आहे. त्यामध्ये 300 कलाकारांचा भव्य संच असणार असून फिरता 65 फुटी रंगमंचावर हे नाटय सादर होणार आहे. त्यात हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्षात वापर होणार असून चित्तथरारक लढाया, रोमांचकारी प्रसंगातून धगधगत्याची इतिहासाची आठवण करून दिली जाणार आहे. याशिवाय नेत्रदिपक अतिशबाजी पाहता येणार आहे.
———————
महानाट्यात साकारणार हे प्रसंग

– शिवजन्म
– युध्द कला व राज्य कारभाराचे प्रशिक्षण
– स्वराज्याची शपथ, अफजलखान वध
– पन्हाळगढ वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा
– शाहिस्तेखानाची फजिती
– सुरत लुट व कोकण मोहिम
– पुरंदरचा वेढा व मुरारबाजीचे शौर्य
– आग्रा भेट व तानाजी मालुसरे बलिदान
– छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा

Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत

Categories
PMC Political social पुणे

Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत

 

Dehu Alandi Municipal Corporation |शहराशेजारील गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे व्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक असून देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का याबाबत विचार सुरू आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लोहगाव येथे लोहगाव- वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, पांडुरंग खेसे, सतीश म्हस्के, स्वप्नील पठारे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरुन काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरू शकतील. कोणत्याही विकास प्रकल्पांना जागा आवश्यक असते. जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पाण्याच्या समस्येबाबत बोलतांना श्री.पवार म्हणाले, पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य, निवारा आदी सुविधा पुरवव्या लागतात. त्यामुळे इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. पाणी बचत व्हावी म्हणून कालव्याऐवजी बोगदा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावे म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येथील, असेही श्री. पवार म्हणाले.

नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केली आहे. लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पीएमपीएमएलची बीआरटी लेन बंद केली. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, असेही ते म्हणाले.

राज्य शासन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात नोकरभरती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. त्यासोबतच ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये युवांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात नवीन युवा धोरण बनविण्यात येणार आहे. आयटीआय मध्ये रोजगारक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याचा युवकांना फायदा होईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प संनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो, रिंग रोड, मोठी रुग्णालये, बंदरे, समुद्र किनारी मार्ग आदी विविध विषयांच्या प्रकल्पांचा आढावा देऊन त्यांना गती दिली जात आहे. राज्यभरात टिकाऊ रस्ते व्हावेत म्हणून ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

आमदार श्री. टिंगरे म्हणाले, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना निधी मिळत आहे. लोहगाव – वाघोली समान पाणीपुरवठा योजनेसाठी २३० कोटी रुपये मंजूर असून एकूण ४५० कि.मी. च्या वितरण नलिकांपैकी २३० कि.मी. नलिका फक्त लोहगावमध्येच आहेत. २० लक्ष हून अधिक क्षमतेच्या ८ टाक्या येथे असून नवीन ९ टाक्यांची कामे सुरू होत आहेत. लोहगाव उपजिल्हा रुग्णालयचे काम अंतिम टप्प्यात असून लोहगाव आयटीआय साठी निधी मंजूर आहे. रस्ते, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यासाठी निधी मंजुरीचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.