Tag: pune fire brigrade
फायर सिस्टम सुस्थितीत व कार्यान्वित ठेवण्याचे आदेश
| दुर्घटना घडल्यास मालक किंवा भोगवटाधार जबाबदार
नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग
पुणे – आज दुपारी नगर रस्ता, वडगाव शेरी, सोपान नगर येथे एका भंगारच्या गोडाऊनला आग लागली असल्याची वर्दि दलाच्या नियंञण कक्षात मिळताच व नागरिकांचे सतत फोन येत असल्याने प्रथम येरवडा व धानोरी अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन व एक टँकर रवाना करण्यात आला. त्याचवेळी वर्दिवर पोहोचताना अधिकारी सुभाष जाधव यांनी दुरूनच मोठा धूर पाहत अतिरिक्त फायरगाडी व टँकरची मागणी करताच नायडू, हडपसर तसेच पीएमआरडीए आणि दलाचे व महापालिकेचे वॉटर टँकर अशी एकुण सुमारे १५ वाहने व ०८ अग्निशमन अधिकारी व जवळपास ५० ते ६० जवान दाखल होते.
घटनास्थळी पोहोचताच आग भीषण स्वरुपात असल्याचे निदर्शनास येताच दलाच्या जवानांनी होज पाईप वापरत पाण्याचा मारा सुरू केला. त्याचवेळी अग्निशमन अधिकारी यांनी आगीमधे कोणी आत अडकले आहे अथवा कसे याची चौकशी करत खाञी केली असता कोणी नसल्याचे समजले. त्या ठिकाणी सुमारे ६,००० स्केवर फुट व शेजारीच ४,००० स्केवर फुट जागेत पञ्याच्या शेडमधे उभारलेले हे भंगार मालाचे गोडाउन असल्याने जवानांनी घन, पोगर, कटर व इतर अग्निशमन उपकरणांचा वापर करीत पञा काढत आतमधे प्रवेश करुन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. सुमारे तासाभरा नंतर दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणत शेजारी जवळच असलेली पञ्याची शेडची काही घरे व दुकाने यांना आगीच्या ज्वाळांपासून वाचविले व मोठा धोका टाळला. या गोडाऊधमनमधे छोटे व मोठे असे एकुण ०८ ते १० सिलेंडर ही फुटले. घटनास्थळी जेसीबी यांची मदत घेत जळालेला माल आजुबाजूला करीत पाणी मारत आग पुर्ण विझवली. शेजारील पाण्याच्या हौदातून पंपाच्या साह्याने पाण्याचा उपसा केला. सदर ठिकाणी कोणीही जखमी नसून जिवितहानी नाही याची खाञी केली.
या कामगिरीत दलाचे वरिष्ठ अधिकारी रमेश गांगड, गजानन पाथ्रुडकर, विजय भिलारे, सुभाष जाधव व पीएमआरडीएचे विजय महाजन व इतर जवानांनी सहभाग घेतला.
—-
“भंगार साहित्या मध्ये बरेचसे सिलेंडर होते ज्यांच्या स्फ़ोट होता त्या मुळे अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती अशा वेळेस अग्निशमन दलाने अतिशय कौशल्यपूर्ण परिस्थिती हाताळून आगीवर नियंत्रण मिळवले “
| देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी
शहरात आगीच्या 2 भीषण घटना : अग्निशमन दलाची प्रशंसनीय कामगिरी
पुणे – आज सकाळी 8:15 वाजता कोंढवा, लुल्लानगर चौक, मार्वल व्हीस्टा इमारत येथे आग लागल्याची घटना घडली कोंढवा खुर्द व गंगाधाम अग्निशमन केंद्र, व मुख्यालयातुन 6 अग्निशमन वाहने व टँकर तसेच पीएमआरडीए येथून एक वाहन रवाना करण्यात आले होते.
सदर ठिकाणी इमारतीच्या सातव्या मजल्यावर व्हिजेटा हॉटेलमधे आग लागल्याचे दिसून येताच जवानांनी सातव्या मजल्यावर पोहोचत आग मोठी असल्याने दार तोडून आतमधे प्रवेश करत आग विझवण्याचे काम सुरू केले. त्याचवेळी अग्निशमन अधिकारी यांनी कोणी आतमधे अडकले आहे का याची खाञी केली असता हॉटेल बंद असल्याने कोणी कामगार आतमधे नाहीत असे समजले. इमारतीमधील स्थायी अग्निशमन यंञणेचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता पंप बंद असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन यंत्रणा, स्प्रिंकलर्स असूनही कार्यरत नसल्यमुळे आग एवढ्या मोठया प्रमाणात पसरली असे मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले
अग्निशमन जवानांनी शर्थी चे प्रयत्न करून सदर आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा केला व आग आजूबाजूला पसरणार नाही याची दक्षता घेतली , सुदैवाने या आगीमधे कोणीही जखमी वा जिवितहानी नाही याची खाञी केली. सदर आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागली असा अंदाज आहे.
घटनास्थळावरून ०८ एलपीजी सिलेंडर जवानांनी बाहेर काढत पुढील संभाव्य धोका टाळला.
या कामगिरीत अग्निशमन अधिकारी समीर शेख, प्रभाकर उम्राटकर व प्रभारी अधिकारी कैलास शिंदे व जवान दशरथ माळवदकर, निलेश लोणकर, रवि बारटक्के, प्रकार शेलार, राहुल नलावडे, अतुल खोपडे व इतर जवानांनी सहभाग घेतला.
दुसरी घटना : येरवडा, शास्ञीनगर चौकात एका ‘शिवशाही’ (यवतमाळ ते पुणे) बसला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाकडून 2 फायरगाडी व 1 वॉटर टँकरच्या साह्याने आग आटोक्यात.
सर्व 42 प्रवाशी सुरक्षित असल्या बाबत मुख्यअग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.
अग्निशमन दलाकडे सायंकाळी आगीच्या तीन घटना
पुण्यात पाऊसाचा हाहाकार | अग्निशमन दलाने वाचवले 12 लोकांचे प्राण!
पुणे – काल दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य चोख बजावले आहे.
अग्निशमन दलाकडे दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी ०९•५७ वाजेपासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे दिनांक १८•१०•२०२२ रोजी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ तसेच ०१ ठिकाणी सीमा भिंतीचा भाग पडल्याची घटना पर्वती, रमणा गणपतीजवळ घडली. तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.
विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले. यामधे तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन येताच स्थानिकांनी त्यांचे आभार मानले व याचा विडीओ सोशल मिडियावर बराच प्रसिद्ध झाला.
कोंढवा खुर्द भाजी मंडई लगत एका ठिकाणी ०७ नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्व ०७ सुखरुप बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करून पाण्यामधे जात कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली.
पुणे महापालिकेत धमाका होतो तेंव्हा ..!
| अग्निशमन दलाचे मॉक ड्रील
—
शहरात परवाच्या पाऊसाने शंभरहून अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना
पुणे – शहरात दिनांक ३०|०९| २०२२ रोजी दुपारी चार नंतर मुसळधार पाऊस व वारयाचा प्रचंड जोर असल्याने शहराच्या विविध ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून दिनांक ०१|१०|२०२२ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत १०० झाडे पडल्याची तसेच अनेक ठिकाणी झाडपडीच्या किरकोळ घटनांची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात झाली आहे.
धुवादार बरसणारा पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे कुठे रस्त्यावर तर कुठे वाहनावर व एखाद्या ठिकाणी घरावर झाड पडल्याचे दुरध्वनी अग्निशमन दलाकडे आले होते. नियंत्रण कक्षात कर्तव्य बजावणारे अधिकारी व जवान यांनी योग्य नियोजन करत अग्निशमन मुख्यालय व इतर अग्निशमन केंद्र अशा एकूण २० केंद्रातील अग्निशमन वाहने व रेस्क्यु व्हॅन वेळेत रवाना केल्या. तसेच दलाचे सर्व अधिकारी व जवान यांनी प्रत्येक ठिकाणी तत्परतेने काम करत चेन सॉ, रश्शी, ट्रि पुनर अशी वेगवेगळी अग्निशमन उपकरण वापरून झाडे हटवण्याचे कार्य पार पाडले असून अजून ही बरयाच ठिकाणी जवान काम करीत होते.
अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे आणि फायरमन चंद्रकांत आनंदास यांना राष्ट्रपती पदक
पुणे – पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे (Fire Brigade) प्रमुख प्रशांत दादाराम रणपिसे (Prashant Ranpise) यांना “विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल’, तर फायरमन चंद्रकांत नारायण आनंदास (Chandrakant Anandas) यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक (President Award) जाहीर करण्यात आले आहे.
: अपघाती घटनांवर धाडसी कामगिरी
प्रशांत रणपिसे हे अग्निशामक दलात 34 वर्षांपासून कार्यरत आहेत.2015 पासून ते मुख्य अग्निशामक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, जनता वसाहत, गंगाधाम येथील अग्निशामक केंद्रे तयार झाली. 2014 मध्ये राज्यात सर्वाधिक उत्पन्न मिळविणारे अग्निशामक विभाग म्हणूनही विभागाचा गौरव झाला. त्यांनी शहरामध्ये एक हजार अग्निसुरक्षा मित्र स्वयंसेवक तयार केले. बहुतांश मोठ्या आगींच्या घटना त्यांनी स्वतः हातळल्या आहेत. कोरोनाकाळात त्यांनी शहरातील सर्व कोविड सेंटरचे फायर ऑडीट करून आगीच्या दुर्घटना टाळल्या आहेत. त्यांना 2010 मध्ये “गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते. त्यानंतर आता उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. आनंदास यांना “गुणोत्कृष्ट अग्निशामक सेवा’ राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले आहे. त्यांनी विविध आगी व अपघाती घटनांवर धाडसी कामगिरी केली आहे. त्यांनी 200 5 मधील टिंबर मार्केट येथील आग, मांढरदेवी येथील आग व चेंगराचेंगरीत अडकलेल्यांची सुटका केली. 5 ऑगस्ट 2015 रोजी पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील लोळेवस्तीमधील कुपनलिकेत अडकलेल्या अडीच वर्षाच्या सोहम यादव या मुलाला सुखरुप बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.