Tag: Monsoon
Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर
Monsoon 2023 | Good News | Monsoon has entered the entire Maharashtra state
| Announcement of Meteorological Department
Heavy rain forecast for two days in Pune
Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल
| हवामान विभागाची घोषणा
Monsoon 2023 | सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याबाबतची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यामुळे मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना चांगला दिलासा मिळाला आहे. (Monsoon 2023)
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे. (Maharashtra Rain)
पुण्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
पुण्यात 24 जून ला जोरदार पाऊस झाला. 25 आणि 26 ला देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार रविवार सकाळपासूनच पुण्यात पाऊस कोसळत आहे. (Pune Rain)
—-
News Title | Monsoon 2023 | Good News | Monsoon has entered the entire state | Announcement of Meteorological Department
Pune Water Cut Update | पावसाच्या ओढीने पुणे शहरात लवकरच एक दिवसाआड पाणी!
Pune Water Cut Update | यावर्षी जून महिन्यात पावसाने (Monsoon) चांगलीच ओढ दिली आहे. जून महिना संपत आला तरी खडकवासला धरणसाखळी (Khadakwasla Dam Chain) परिसरात पाऊस झालेला नाही. धरणांतील पाणीपातळी खालावल्याने पुणेकरांवर पाणीसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात पर्याप्त पाऊस नाही झाला तर पुणेकरांना एक दिवसाआड पाणी (Alternate Day Water) घ्यावे लागणार आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तशी तयारी देखील सुरु केली आहे. (Pune water cut update)
सद्यस्थितीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाते. मात्र ही कपात अजून वाढण्याची चिन्हे आहेत. शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत जूनअखेरीस आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिली. दरम्यान, मागील वर्षी जूनमध्ये सुमारे 127 मिमी पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी अद्याप 10 मिमी पाऊसही झालेला नसल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. धरणांतील पाणीसाठा आणखी खालावल्यास जुलैमध्ये शहरात दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन महापालिकेकडून (PMC Pune) सुरू आहे. त्यानुसार वेळापत्रकही तयार केले आहे. लवकरच पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (PMC Pune News)
——
News Title | Pune Water Cut Update | Due to the torrent of rain, there will soon be water in Pune city for a day!
CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना
विकासकाम झाल्यानंतर काळजी घेतली जात नाही
मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या
वाहनचालकांना करावी लागते कसरत
अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई आवश्यक
कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करीत असतात, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. याकरीता अशी अतिक्रमणे काढण्यात येवून फेरीवाले, पथारीवाले यांचेवर दैनंदिन कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे शक्य होवून पादचाऱ्यांचे अपघात कमी होतील. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. (Hawker’s in Pune)
पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक
सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे
वाहतूक कोंडीवर उपाययोजनासठी बैठक आवश्यक
पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्या
झाल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला होता, शहरामध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात वाहतूक
कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचणेसाठी त्रास सहन करावा लागला होता. वॉटर लॉगींगचे ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था होऊन लहान मोठे अपघात झाले. तसेच जागोजागी ड्रेनेजचे झाकणातुन तुंबलेले पाणी रस्त्यावर येऊन बरीचशी वाहने रस्त्यात अडकुन पडल्याने
नागरिकांना त्रास झाल्याने प्रशासनास नागरिकांचा रोष सहन करावा लागला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी
पावसाळयापुर्वीच ड्रेनेज झाकणांची दुरुस्ती तसेच रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांना तसेच प्रशासनास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व नागरिकांची गैरसोय
होणार नाही. माहितीचे अनुषंगाने यावर्षी पावसाळा सुरु होणेपुर्वी अशा वॉटर लॉगींगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी तसेच रस्त्यावरील खड्यांची पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती / उपाययोजना करुन घेणे उचित राहील जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आमदार संजय जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत या मागण्या
आमदार जगताप यांच्या पत्रानुसार पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघा अंतर्गत हवेली तालुक्यातील 11 व 23 गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली आहेत. या गावांमध्ये मोजे आंवेगाव बु. व आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, फुरसुंगी या भागात पावासाळी पाण्याचे व्यवस्थापनाची कामे झालेली नाहीत. त्यामुळे अवकाळी पाऊस व नाल्यावरील वाढते अतिक्रमणाचा फटका या परिसरातील राहणा-या सामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत होते. (MLA Sanjay Jagtap)
जगताप यांनी पुढे म्हटले आहे कि हवेली तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील मौजे आंबेगाव बु. व आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, फुरसुंगी या गावांमध्ये अपु-या क्षमतेचे पुल अपु-या सिमा भिंती, व पावसाळी लाईन अभावी मागील वर्षापूर्वी अवकाळी पावसामुळे पुरस्थिती निर्माण झालेली होती . व त्यामुळे या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते . हि बाब लक्षात घेता, महानगरपालिके मार्फत वर नमुद केलेल्या गावांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापनाची लवकरात लवकर व्यवस्था होणे गरजेचे आहे. तरी पावसाळया आधी ही कामे तातडीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. असे जगताप यांनी म्हटले आहे. (PMC Pune)
| मतदारसंघात तातडीने करावयाच्या कामाची यादी
1) धबाडी-ज्ञानदीप कॉलनी (आंबेगाव बु. )
2 ) शनिनगर (हनुमान नगर ) या परिसरामध्ये नाला बंदिस्त आहे. त्यामुळे पुर सदृष्य परिस्थिती
निर्माण होते. (आंबेगाव खुर्द)
3 ) राजमाता भुयारी मार्गः (आंवेगाव पठार)
4) निलगिरी चौक / जिजामाता चौक / राजे चौक, आंबे पठार,
5) दत्त नगर चौक, व परिसर (आंबेगाव खुर्द )
6) पिसोळी पेट्रोल पंप, परिसर व जेधे वजन काटा
१) उंड्री चौक ते वडाची वाडी परिसर, पुर्णपणे पाणी साचलेले असते.
8) हिलग्रीन हायस्कुल समोरील परिसर उंड्री
(9) पाटील नगर व झांपरे बस्ती व येवलेवाडी परिसर, बोपदेव घाट रोड
10) पिसोळी व जगदंब भवन मार्ग परिसर
11 ) येवलेवाडी – पानसरे नगर व दलिफ सोसा एरिया
12) विठ्ठल पेट्रोलपंप, सासवड रोड व परिसर फुरसुंगी
13 ) ग्रीनलिस्ट सोसा. भोसले नगर, सासवड रोड, परिसर (Purandar MLA Sanjay Jagtap)
मान्सूनचा पहिला अंदाज आला | जाणून घ्या यंदा किती पाऊस पडणार? दुष्काळाची शक्यता किती?
हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता
| विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता
केरळमध्ये मान्सूनचे आगमण झाल्यानंतर पुढील काही दिवसांत तो महाराष्ट्राच एंट्री करणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. मान्सूनच्या चाहुलीमुळे राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरजार हजेरी लावली आहे. दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना उष्णता आणि पावसापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. याउलट विदर्भात मात्र उष्णतेची लाट येणार आहे. महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने विशेष करुन किनारपट्टीवरील नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.दरम्यान, कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती अधिक अनुकूल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ सोडून राज्यातील इतरही काही भाग जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सोसाट्याचा वारादेखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.पावसाचे आगमन वेळेआधी होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून टाकली आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेती कामांची धांदल सुरु आहे. त्यामुळे आता शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल परिस्थिती असली, तरी मुंबईत पावसाच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी माहितीही दिली होती.
यंदा पाऊस चांगला | पण जून मध्ये पेरणीसाठी घाई करू नका
यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने, जूनमध्ये पावसात खंड राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस असून, संपूर्ण मान्सून काळात यंदा पाऊस १०१ टक्के होणार आहे, तसेच दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस होणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला. त्यात देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, साबळे यांनी त्यांच्या मॉडेलचा अंदाज जाहीर केला, त्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील ८४ ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल व किमान तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार, राज्यात १०१ टक्के पावसाचा शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र, यंदा वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पेरणीची घाई करू नये
जूनमध्ये पावसात खंड पडणार असल्याने, शेतकऱ्यांनी जमिनीत ६५ मिलिमीटर म्हणजेच अडीच ते तीन फूट ओलावा असल्याशिवाय पेरणीला घाई करू नये, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे खान्देश, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूस व सोयाबीनची लागवड करण्याची घाई करू नये. जिरायती शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवड करावी, असेही ते म्हणाले.
हवामान बदलाचा परिणाम
राज्यात गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पावसात खंड पडत आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत आहे. गेली दोन वर्षे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत महापूर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही आता हवामान बदलाला प्रवण राज्य झाले आहे. त्या दृष्टीने पीक बदल करायला हवा व नियोजन करावे, असेही ते म्हणाले.