Tomato Price Hike | टोमॅटो किंमत वाढीमुळे महागाई दरावर होणार परिणाम!

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश महाराष्ट्र शेती

Tomato Price Hike | टोमॅटो किंमत वाढीमुळे महागाई दरावर होणार परिणाम!

Tomato Price Hike | टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा (Tomato Price Hike) देशाच्या अंदाजित महागाई दरावर (Inflation Raté) परिणाम होऊ शकतो.  भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे.  कांदा (Onion) आणि बटाट्यावरही (Potato) टोमॅटोच्या दराचा (Tomato Price) परिणाम झाल्याचे अहवालात म्हटले आहे.  म्हणजे टोमॅटोच्या दरात काही बदल झाला तर त्याचा परिणाम कांदा आणि टोमॅटोवरही दिसून येतो. (Tomato Price Hike)
 या अभ्यासात असे म्हटले आहे की टोमॅटोच्या किमती इतर दोन भाज्यांच्या किमतीत बदलणे हे सूचित करते की काही प्रमाणात परस्परावलंबन आहे आणि त्यांच्या किंमती एकमेकांवर परिणाम करतात. (Inflation Rate)

 घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव 150 रुपये प्रतिकिलो या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत

 पॅटर्न ऑफ प्राइस मूव्हमेंट्स इन इंडियाज व्हेजिटेबल मार्केट या शीर्षकाच्या अभ्यासाला DRG स्टडी सिरीज अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने निधी दिला आहे.  रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत आणि धोरण संशोधन विभागांतर्गत विकास संशोधन गट (DRG) स्थापन करण्यात आला आहे.
 गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात टोमॅटोच्या घाऊक भावाने किलोमागे 150 रुपयांचा उच्चांक गाठला होता.  काही आठवड्यांपूर्वी टोमॅटो 15 ते 20 रुपये किलोने विकले जात होते.
 टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांचा ग्राहक किंमत निर्देशांकात फारच किरकोळ वाटा आहे, परंतु त्यांचा मुख्य महागाई दरावर परिणाम होण्याची क्षमता आहे, असे अहवालात म्हटले आहे.
 जूनमधील बेस इफेक्टमुळे (Base Effet) त्याचा परिणाम कदाचित दिसून येणार नाही, पण पुढे महागाई वाढण्याचा धोका आहे, कारण भाजीपालाच महाग झाला नाही, तर भरड धान्य आणि दुधाचे भावही वाढले आहेत.  गुप्ता म्हणाले की ही आकडेवारी अन्नधान्याच्या महागाईच्या तीव्रतेवर अवलंबून असेल, जी 5.5 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते आणि 6 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
 2018-19 पर्यंत अन्नधान्य किमतीची महागाई कमी राहिली.  मुख्यत्वे अन्नधान्य आणि फळबाग उत्पादनांचा पुरेसा साठा यामुळे तो नियंत्रणात राहिला.  तथापि, त्यानंतरच्या वर्षांत, अन्नधान्य महागाई वाढू लागली, विशेषतः भाज्यांमध्ये.

 महागाईचे मुख्य कारण म्हणजे पाऊस

 महागाईचे मुख्य कारण म्हणजे पाऊस (Monsoon). काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर काही ठिकाणी पाऊसच नाही. त्यामुळे कांदा, टोमॅटो, बटाटे यांचे भाव वाढले आहेत.  भाजीपाला, ज्याचा वाटा CPI अन्न आणि पेय पदार्थांच्या बास्केटमध्ये 13.2 टक्के आहे, त्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या अन्न महागाई वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  या अहवालात भाजीपाल्याच्या किमती वाढण्यात आणि अन्नधान्याच्या महागाईत घट होण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 जूनच्या चलनविषयक धोरणाच्या विधानात, देशांतर्गत दर निर्धारण समितीने म्हटले होते की चलनवाढीचा भविष्यातील मार्ग अन्नाच्या किमतींच्या हालचालीमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
 ग्राहक किंमत निर्देशांकात खाद्यपदार्थांचा वाटा सुमारे ४० टक्के आहे.  CPI महागाई मे महिन्यात 25 महिन्यांच्या नीचांकी 4.25 टक्‍क्‍यांवर आली, कारण खाद्यान्न महागाई 2.91 टक्‍क्‍यांच्या 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होती.  एप्रिल-मेमध्ये ग्राहक महागाई 4.5 टक्के होती.
—-
News Title | Tomato Price Hike |  Tomato price increase will affect the inflation rate!

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर

Pune Municipal Corporation | पावसाळ्यात रस्त्यावर पाण्याची थारोळी साचू नयेत म्हणून गेल्या काही वर्षांत पुणे महापालिकेने (PMC Pune) अनेक रस्त्यांवर शेकडो कोटी रुपये खर्च करून पावसाळी गटारे बांधली आहेत. मात्र ही गटारे निरुपयोगी ठरत आहेत. रस्त्यावर पाण्याची थारोळी साचत आहेत. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला आहे. (Pune Municipal Corporation)
 वेलणकर यांनी सांगितले कि, रस्त्यावर पाणी न साचता ते या गटारांमधून वाहून जावे ही या मागची मूळ कल्पना. मात्र यासाठी रस्ते डांबरीकरण करताना,  दुरुस्त करताना त्यांचा उतार या पावसाळी गटारांच्या मॅनहोल कडे राहील याची दक्षता घ्यावी लागते. मात्र महापालिकेचे रस्ते कंत्राटदार याची कोणतीही काळजी घेत नाहीत आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी फक्त कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठीच काम करत असल्याने आज दोन दिवसांच्या थोड्या पावसाने रस्तोरस्ती तळी निर्माण झाली आहेत , त्यातली अनेक तर मॅनहोलच्या सभोवताली आहेत.  यातून पाणीच पाणी चोहीकडे आणि गेले पावसाळी गटार कुणीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ही पावसाळी गटारे निरुपयोगी ठरत आहेत आणि ती बांधण्यासाठी खर्च करण्यात आलेले नागरीकांच्या करांचे शेकडो कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत. (Pune News)
वेलणकर पुढे म्हणाले कि,  आमची मागणी आहे की रस्त्यावर पाणी साचण्याच्या जागांचा तातडीने सर्व्हे करावा आणि ज्या रस्त्यावर पावसाळी गटारे बांधली असूनही पाणी साचते आहे त्यासाठी जबाबदार कंत्राटदार व महापालिकेचे अधिकारी यांचेवर कारवाई करावी. (PMC Pune News)
——
News Title | Pune Municipal Corporation |  Rainy sewers built by Pune Municipal Corporation at a cost of crores of rupees are useless  Water splashing on the road  Vivek Velankar

Monsoon 2023 |  Good News |  Monsoon has entered the entire Maharashtra state  |  Announcement of Meteorological Department

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र शेती

Monsoon 2023 |  Good News |  Monsoon has entered the entire Maharashtra state

 |  Announcement of Meteorological Department

 Monsoon 2023 |  There is a good news for all.  Monsoon has covered entire Maharashtra today.  The Indian Meteorological Department has announced this.  The Indian Meteorological Department has informed that monsoon has become active in the entire country except Gujarat, Rajasthan, Haryana, Punjab and some parts of Jammu and Kashmir.  However, this has brought relief to the farmers and common people.  (Monsoon 2023)
 According to the information provided by the Meteorological Department (IMD), the entire Maharashtra is covered by monsoon.  The Meteorological Department has also informed that there is a favorable environment for the activation of Monsoon in the next two days in Gujarat, Rajasthan, Haryana, Punjab and Jammu Kashmir.  It is currently raining in some parts of the state.  Still waiting for rain in some places.  (Maharashtra Rain)

 Heavy rain forecast for two days in Pune

 There was heavy rain in Pune on June 24.  Heavy rain is also predicted on 25th and 26th.  Accordingly, it has been raining in Pune since Sunday morning.  (Pune Rain)
 —-

Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल | हवामान विभागाची घोषणा 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र शेती

Monsoon 2023 | आनंदाची बातमी | मान्सून संपूर्ण राज्यात दाखल

| हवामान विभागाची घोषणा

Monsoon 2023 | सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) याबाबतची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. यामुळे मात्र शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांना चांगला दिलासा मिळाला आहे. (Monsoon 2023)

 

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची  प्रतिक्षा कायम आहे. (Maharashtra Rain)

पुण्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुण्यात 24 जून ला जोरदार पाऊस झाला. 25 आणि 26 ला देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार रविवार सकाळपासूनच पुण्यात पाऊस कोसळत आहे. (Pune Rain)

—-

News Title | Monsoon 2023 | Good News | Monsoon has entered the entire state | Announcement of Meteorological Department

Pune Water Cut Update | पावसाच्या ओढीने पुणे शहरात लवकरच एक दिवसाआड पाणी!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut Update | पावसाच्या ओढीने पुणे शहरात लवकरच एक दिवसाआड पाणी!

Pune Water Cut Update | यावर्षी जून महिन्यात पावसाने (Monsoon) चांगलीच ओढ दिली आहे. जून महिना संपत आला तरी खडकवासला धरणसाखळी (Khadakwasla Dam Chain) परिसरात पाऊस झालेला नाही. धरणांतील पाणीपातळी खालावल्याने पुणेकरांवर पाणीसंकट ओढवण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात पर्याप्त पाऊस नाही झाला तर पुणेकरांना एक दिवसाआड पाणी (Alternate Day Water) घ्यावे लागणार आहे. पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) तशी तयारी देखील सुरु केली आहे. (Pune water cut update)

सद्यस्थितीत शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाते. मात्र ही कपात अजून वाढण्याची चिन्हे आहेत.  शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत जूनअखेरीस आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिली. दरम्यान, मागील वर्षी जूनमध्ये सुमारे 127 मिमी पाऊस झाला होता. मात्र, यावर्षी अद्याप 10 मिमी पाऊसही झालेला नसल्याचे आयुक्‍तांनी यावेळी सांगितले. धरणांतील पाणीसाठा आणखी खालावल्यास जुलैमध्ये शहरात दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन महापालिकेकडून (PMC Pune) सुरू आहे. त्यानुसार वेळापत्रकही तयार केले आहे. लवकरच पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. (PMC Pune News)

——

News Title | Pune Water Cut Update | Due to the torrent of rain, there will soon be water in Pune city for a day!

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

CP Pune | PMC Pune | यावर्षी पावसाळा (Monsoon) सुरु होणेपुर्वी शहरातील वॉटर लॉगींगचे ठिकाणांची (Water Logging Places) व ड्रेनेजच्या झाकणांची (Drainage Covers) पाहणी करा. तसेच रस्त्यावरील खड्यांची (Potholes) पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती आणि उपाययोजना करुन घेणे उचित होणार आहे. जेणेकरुन वाहतूक कोंडी (Traffic Jam) होणार नाही.  तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. अशा सूचना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) केल्या आहेत. (CP Pune | PMC Pune)

विकासकाम झाल्यानंतर काळजी घेतली जात नाही

पोलीस आयुक्तांनी महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये विविध विकासकामे (Devlopment Works) सुरु असुन विविध विकासकामांकरीता रस्ते खोदाई ( ड्रेनेज लाईन / पिण्याचे पाईपलाईन / इलेक्ट्रीसीटी केबल / गॅस लाईन ) करण्यात येते. मात्र काम पूर्ण झालेनंतर त्या कामाकरीता खोदलले रस्ते तात्काळ दुरुस्त केले जात नाहीत. कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवत नाहीत. खडी, माती टाकून बुजवलेल्या रस्त्यावरुन गाडी गेल्यास रस्ता लगेच खचून तो वाढतच जातो. त्यात पाणी साचल्याने खड्डे तयार होतात व असे खड्डे अपघातास कारणीभूत होतात.  विकास कामांकरीता रस्ते खोदाई झालेनंतर खोदलेला भाग बऱ्याच ठिकाणी तसाच ठेवला जात असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता वाढते. (Pune Police)

मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या

पुणे शहरामधील अनेक रस्त्यावर मेट्रोचे कामकाज (Pune Metro) चालु असुन त्या कामाच्या अनषंगाने रस्त्यावर खोदण्याचे कामे करण्यात आलेली आहे. काम पुर्ण झालेनंतर त्याकारीता खोदलेले रस्ते दुरूस्त केले गेलेले नाहीत. त्यामध्ये तात्पुरती खडी, माती टाकुन ते बुजविण्यात येतात. या ठिकाणावरून वाहने जाऊन रस्ता खचला जातो. त्यामुळे मोठा खड्डा होऊन पावसाचे पाणी साठवुन अपघात होण्याची शक्यता असते. मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडुन वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोच्या कामकाजाकरीता बरेच ठिकाणी बॅरीकेडस् करण्यात आले असुन मेट्रोचे कामकाज पुर्ण झालेनंतरही सदर ठिकाणाचे बॅरीकेडस् तसेच असल्याने वाहतुकीस कॅरेज वे कमी मिळुन अडथळा होवुन पावसाळयामध्ये सदर बॅरीकेडस् चुकविण्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होतात. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली मशिनरी रोडवर तशीच ठेवण्यात आलेली आहे.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असुन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. (Pune Municipal Corporation News)

वाहनचालकांना करावी लागते कसरत

विविध कामांमुळे रस्त्यांची दूरावस्था होवून त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेवून रस्त्यावर चालावे लागत आहे. अनेक भागात सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यामुळे अगर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता वाहतूकीस उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ड्रेनेजची तुटलेली झाकणे, रस्त्यावर अर्धवट बाहेर आलेली झाकणे यामुळे अपघातास निमंत्रण ठरते व रस्त्यावरचे खड्डे व अशी तुटलेली झाकणे चुकविण्याचे नादात वाहनचालकांचे वाहनावरचे लक्ष विचलीत होवून पायी चालणाऱ्या नागरिकांचा तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. (Pune police commissioner)

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई आवश्यक

पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फुटपाथ, रस्ते या ठिकाणी विशेषतः शहराचे मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत परिणामी वाहतूकीस रस्ता कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वाहतूक
कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करीत असतात, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. याकरीता अशी अतिक्रमणे काढण्यात येवून फेरीवाले, पथारीवाले यांचेवर दैनंदिन कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे शक्य होवून पादचाऱ्यांचे अपघात कमी होतील. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. (Hawker’s in Pune)

पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांकरीता पार्किंग उपलब्ध नसल्याने रोडवर वाहने पार्क होत असतात, याकरीता पुणे महानगरपालिके तर्फे जास्तीत जास्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ / भाजीमंडई आहे अशा ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पार्किंगची व्यवस्था / पार्किंग प्लाझा करणे गरजेचे आहे. (Parking Management)

सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे

पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहतूक नियमन करणे जिकिरीचे होत आहे. त्यातच पुणे शहरातील प्रवेशाचे ठिकाणी जेथे अवजड वाहतूकीची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी रस्त्यांची रुंदी जास्त असणे तसेच चौकामध्ये सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. (Signal Management)

वाहतूक कोंडीवर उपाययोजनासठी बैठक आवश्यक

पुणे शहरामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील सर्व स्टेक होल्डर्स यांची संयुक्त बैठक झाल्यास एकत्रित चर्चा होऊन पावसाळयापुर्वी उपाययोजना करणेबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांमुळे व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. तसेच पोलीसांना वाहतूक नियमन करणे सोईस्कर होईल. ( Pune Traffic update)

पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्या

पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच विविध कारणांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठून वाहतूक कोंडी झाल्याने वॉटर लॉगींगचे ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येवून वॉटर लॉगींग होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना होणे आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी साठून वॉटर लॉगींग
झाल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला होता, शहरामध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात वाहतूक
कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचणेसाठी त्रास सहन करावा लागला होता. वॉटर लॉगींगचे ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था होऊन लहान मोठे अपघात झाले. तसेच जागोजागी ड्रेनेजचे झाकणातुन तुंबलेले पाणी रस्त्यावर येऊन बरीचशी वाहने रस्त्यात अडकुन पडल्याने
नागरिकांना त्रास झाल्याने प्रशासनास नागरिकांचा रोष सहन करावा लागला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी
पावसाळयापुर्वीच ड्रेनेज झाकणांची दुरुस्ती तसेच रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांना तसेच प्रशासनास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व नागरिकांची गैरसोय
होणार नाही. माहितीचे अनुषंगाने यावर्षी पावसाळा सुरु होणेपुर्वी अशा वॉटर लॉगींगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी तसेच रस्त्यावरील खड्यांची पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती / उपाययोजना करुन घेणे उचित राहील जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | CP Pune |  PMC Pune |  Take care that Pune residents do not face any hardship during monsoon season  Notice of Pune Police Commissioner to Pune Municipal Corporation

MLA Sanjay Jagtap | आमदार संजय जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत या मागण्या 

Categories
Breaking News PMC Political पुणे

आमदार संजय जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत या मागण्या

पुणे | पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाअंतर्गत (Purandar-Haveli Constituency) नव्याने समाविष्ठ झालेली 11 व 23 गावांमध्ये पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे निर्माण होणा-या पाण्याचे व्यवस्थापन (water management) करण्याची मागणी पुरंदरचे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

आमदार जगताप यांच्या पत्रानुसार  पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघा अंतर्गत हवेली तालुक्यातील 11 व 23 गावे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली आहेत. या गावांमध्ये मोजे आंवेगाव बु. व आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, फुरसुंगी या भागात पावासाळी पाण्याचे व्यवस्थापनाची कामे झालेली नाहीत. त्यामुळे अवकाळी पाऊस व नाल्यावरील वाढते अतिक्रमणाचा फटका या परिसरातील राहणा-या सामान्य नागरिकांना बसतो. त्यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत होते. (MLA Sanjay Jagtap)

जगताप यांनी पुढे म्हटले आहे कि हवेली तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील मौजे आंबेगाव बु. व आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, उंड्री पिसोळी, फुरसुंगी या गावांमध्ये अपु-या क्षमतेचे पुल अपु-या सिमा भिंती, व पावसाळी लाईन अभावी मागील वर्षापूर्वी अवकाळी पावसामुळे पुरस्थिती निर्माण झालेली होती . व त्यामुळे या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते . हि बाब लक्षात घेता, महानगरपालिके मार्फत वर नमुद केलेल्या गावांमध्ये पावसाळी पाणी व्यवस्थापनाची लवकरात लवकर व्यवस्था होणे गरजेचे आहे.  तरी पावसाळया आधी ही  कामे तातडीने होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. असे जगताप यांनी म्हटले आहे. (PMC Pune)

|  मतदारसंघात तातडीने करावयाच्या कामाची यादी

1) धबाडी-ज्ञानदीप कॉलनी (आंबेगाव बु. )
2 ) शनिनगर (हनुमान नगर ) या परिसरामध्ये नाला बंदिस्त आहे. त्यामुळे पुर सदृष्य परिस्थिती
निर्माण होते. (आंबेगाव खुर्द)
3 ) राजमाता भुयारी मार्गः (आंवेगाव पठार)
4) निलगिरी चौक / जिजामाता चौक / राजे चौक, आंबे पठार,
5) दत्त नगर चौक, व परिसर (आंबेगाव खुर्द )
6) पिसोळी पेट्रोल पंप, परिसर व जेधे वजन काटा
१) उंड्री चौक ते वडाची वाडी परिसर, पुर्णपणे पाणी साचलेले असते.
8) हिलग्रीन हायस्कुल समोरील परिसर उंड्री
(9) पाटील नगर व झांपरे बस्ती व येवलेवाडी परिसर, बोपदेव घाट रोड
10) पिसोळी व जगदंब भवन मार्ग परिसर
11 ) येवलेवाडी – पानसरे नगर व दलिफ सोसा एरिया
12) विठ्ठल पेट्रोलपंप, सासवड रोड व परिसर फुरसुंगी
13 ) ग्रीनलिस्ट सोसा. भोसले नगर, सासवड रोड, परिसर (Purandar MLA Sanjay Jagtap)

Monsoon | मान्सूनचा पहिला अंदाज आला | जाणून घ्या यंदा किती पाऊस पडणार? दुष्काळाची शक्यता किती?

Categories
Breaking News social देश/विदेश लाइफस्टाइल शेती

मान्सूनचा पहिला अंदाज आला | जाणून घ्या यंदा किती पाऊस पडणार?  दुष्काळाची शक्यता किती?

 स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची केवळ 25% शक्यता आहे.  LPA च्या 94% पाऊस अपेक्षित आहे.  तेथे दुष्काळ पडण्याची शक्यता 20% आहे.  वास्तविक, ला निना संपली असून आगामी काळात एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे.
भारतात मान्सून २०२३: मान्सूनचा पहिला अंदाज आला आहे.  स्कायमेट या खाजगी हवामान अहवाल देणार्‍या संस्थेने 2023 चा मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे.
स्कायमेटच्या मते, यंदा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.  म्हणजे, पहिल्या अंदाजात पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो.  स्कायमेटच्या मते, सामान्य पावसाची केवळ 25% शक्यता आहे.  LPA च्या 94% पाऊस अपेक्षित आहे.  तेथे दुष्काळ पडण्याची शक्यता 20% आहे.  वास्तविक, ला निना संपली असून आगामी काळात एल निनोमुळे मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Monsoon Update | हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र शेती

हवामान विभागाचा अंदाज | येत्या ४,५ दिवसांत महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

| विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता

केरळमध्ये मान्सूनचे आगमण झाल्यानंतर पुढील काही दिवसांत तो महाराष्ट्राच एंट्री करणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. मान्सूनच्या चाहुलीमुळे राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरजार हजेरी लावली आहे. दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना उष्णता आणि पावसापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. याउलट विदर्भात मात्र उष्णतेची लाट येणार आहे. महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने विशेष करुन किनारपट्टीवरील नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.दरम्यान, कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती अधिक अनुकूल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ सोडून राज्यातील इतरही काही भाग जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सोसाट्याचा वारादेखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.पावसाचे आगमन वेळेआधी होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून टाकली आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेती कामांची धांदल सुरु आहे. त्यामुळे आता शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल परिस्थिती असली, तरी मुंबईत पावसाच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी माहितीही  दिली होती.

Monsoon | यंदा पाऊस चांगला | पण जून मध्ये पेरणीसाठी घाई करू नका

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र शेती

यंदा पाऊस चांगला | पण जून मध्ये पेरणीसाठी घाई करू नका

यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने, जूनमध्ये पावसात खंड राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस असून, संपूर्ण मान्सून काळात यंदा पाऊस १०१ टक्के होणार आहे, तसेच दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस होणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला. त्यात देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, साबळे यांनी त्यांच्या मॉडेलचा अंदाज जाहीर केला, त्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील ८४ ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल व किमान तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार, राज्यात १०१ टक्के पावसाचा शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र, यंदा वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेरणीची घाई करू नये

जूनमध्ये पावसात खंड पडणार असल्याने, शेतकऱ्यांनी जमिनीत ६५ मिलिमीटर म्हणजेच अडीच ते तीन फूट ओलावा असल्याशिवाय पेरणीला घाई करू नये, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे खान्देश, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूस व सोयाबीनची लागवड करण्याची घाई करू नये. जिरायती शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवड करावी, असेही ते म्हणाले.

हवामान बदलाचा परिणाम

राज्यात गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पावसात खंड पडत आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत आहे. गेली दोन वर्षे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत महापूर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही आता हवामान बदलाला प्रवण राज्य झाले आहे. त्या दृष्टीने पीक बदल करायला हवा व नियोजन करावे, असेही ते म्हणाले.