Tomato Price Hike | टोमॅटो किंमत वाढीमुळे महागाई दरावर होणार परिणाम!

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश महाराष्ट्र शेती

Tomato Price Hike | टोमॅटो किंमत वाढीमुळे महागाई दरावर होणार परिणाम!

Tomato Price Hike | टोमॅटोच्या वाढत्या किमतीचा (Tomato Price Hike) देशाच्या अंदाजित महागाई दरावर (Inflation Raté) परिणाम होऊ शकतो.  भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे.  कांदा (Onion) आणि बटाट्यावरही (Potato) टोमॅटोच्या दराचा (Tomato Price) परिणाम झाल्याचे अहवालात म्हटले आहे.  म्हणजे टोमॅटोच्या दरात काही बदल झाला तर त्याचा परिणाम कांदा आणि टोमॅटोवरही दिसून येतो. (Tomato Price Hike)
 या अभ्यासात असे म्हटले आहे की टोमॅटोच्या किमती इतर दोन भाज्यांच्या किमतीत बदलणे हे सूचित करते की काही प्रमाणात परस्परावलंबन आहे आणि त्यांच्या किंमती एकमेकांवर परिणाम करतात. (Inflation Rate)

 घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव 150 रुपये प्रतिकिलो या विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत

 पॅटर्न ऑफ प्राइस मूव्हमेंट्स इन इंडियाज व्हेजिटेबल मार्केट या शीर्षकाच्या अभ्यासाला DRG स्टडी सिरीज अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँकेने निधी दिला आहे.  रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत आणि धोरण संशोधन विभागांतर्गत विकास संशोधन गट (DRG) स्थापन करण्यात आला आहे.
 गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात टोमॅटोच्या घाऊक भावाने किलोमागे 150 रुपयांचा उच्चांक गाठला होता.  काही आठवड्यांपूर्वी टोमॅटो 15 ते 20 रुपये किलोने विकले जात होते.
 टोमॅटो, कांदा आणि बटाटा यांचा ग्राहक किंमत निर्देशांकात फारच किरकोळ वाटा आहे, परंतु त्यांचा मुख्य महागाई दरावर परिणाम होण्याची क्षमता आहे, असे अहवालात म्हटले आहे.
 जूनमधील बेस इफेक्टमुळे (Base Effet) त्याचा परिणाम कदाचित दिसून येणार नाही, पण पुढे महागाई वाढण्याचा धोका आहे, कारण भाजीपालाच महाग झाला नाही, तर भरड धान्य आणि दुधाचे भावही वाढले आहेत.  गुप्ता म्हणाले की ही आकडेवारी अन्नधान्याच्या महागाईच्या तीव्रतेवर अवलंबून असेल, जी 5.5 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते आणि 6 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.
 2018-19 पर्यंत अन्नधान्य किमतीची महागाई कमी राहिली.  मुख्यत्वे अन्नधान्य आणि फळबाग उत्पादनांचा पुरेसा साठा यामुळे तो नियंत्रणात राहिला.  तथापि, त्यानंतरच्या वर्षांत, अन्नधान्य महागाई वाढू लागली, विशेषतः भाज्यांमध्ये.

 महागाईचे मुख्य कारण म्हणजे पाऊस

 महागाईचे मुख्य कारण म्हणजे पाऊस (Monsoon). काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. तर काही ठिकाणी पाऊसच नाही. त्यामुळे कांदा, टोमॅटो, बटाटे यांचे भाव वाढले आहेत.  भाजीपाला, ज्याचा वाटा CPI अन्न आणि पेय पदार्थांच्या बास्केटमध्ये 13.2 टक्के आहे, त्यांनी ऐतिहासिकदृष्ट्या अन्न महागाई वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.  या अहवालात भाजीपाल्याच्या किमती वाढण्यात आणि अन्नधान्याच्या महागाईत घट होण्यात महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 जूनच्या चलनविषयक धोरणाच्या विधानात, देशांतर्गत दर निर्धारण समितीने म्हटले होते की चलनवाढीचा भविष्यातील मार्ग अन्नाच्या किमतींच्या हालचालीमुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
 ग्राहक किंमत निर्देशांकात खाद्यपदार्थांचा वाटा सुमारे ४० टक्के आहे.  CPI महागाई मे महिन्यात 25 महिन्यांच्या नीचांकी 4.25 टक्‍क्‍यांवर आली, कारण खाद्यान्न महागाई 2.91 टक्‍क्‍यांच्या 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होती.  एप्रिल-मेमध्ये ग्राहक महागाई 4.5 टक्के होती.
—-
News Title | Tomato Price Hike |  Tomato price increase will affect the inflation rate!

NCP pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महागाईची होळी

Categories
Breaking News Political पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महागाईची होळी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच ई.डी.सरकारच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत प्रतिकात्मक होळी साजरी केली. “नोटबंदीची घोषणा करुन जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे महाराजा”, “सरकारी कंपन्या विकून जनतेचा रोजगार हिसकाविणाऱ्यांना शिक्षा दे रे महाराजा”, “जाती-धर्मात तेढ वाढवून राजकारण करणाऱ्यांना चोप दे रे महाराजा”, “सत्तेच्या धुंदीत बेताल वागणाऱ्यांना ताळ्यावर आण रे महाराजा “, “पेट्रोल-डिझेल-गॅस महाग करणाऱ्यांना बुद्धी दे महाराजा”, “शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणाऱ्याना अक्कल दे रे महाराजा” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

आज होळी या सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी असत्य अन्याय अत्याचार यांसह अनेक अनिष्ट तत्वांची होळी करत नकारात्मक गोष्टींतून नव्या सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करत असतो. आज या प्रतिकात्मक होळी च्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो वा राज्यातील शिंदे फडणवीस सरकार असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले आजही महागाई, जातिवाद, धार्मिक तेढ हे मुद्दे गंभीर बनले असून जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत विरोधी पक्षातील जनतेचा आवाज उचलणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही, अशा परिस्थितीत या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून सर्व अष्ट प्रवृत्तींचा आम्ही दहन करत आहोत”. असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

सर्वच महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या बाबत अदानी- अंबानी यांसारख्या मोठ्या उद्योगपतींच्या हातात खाजगीकरणाद्वारे देशाची सूत्रे दिल्याने मोठ्या प्रमाणात महागाईला सामोरे जावे लागत आहे. नुकतीच झालेली गॅस दरवाढ, सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ, सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला जी.एस.टी जीवनावश्यक वस्तू , गोळ्या औषधे यांवर देखील टॅक्स वाढवल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत आहेत. या सर्वांच्या विरोधात आज या प्रतीकात्मक होळीच्या आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने करण्यात आले आहे.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, महेश हांडे,डॉ. शंतनु जगदाळे,अनिता पवार,संतोष नांगरे दिपक कामठे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

NCP Youth | Girish Gurnani | कैसे लगे अच्छे दिन? – राष्ट्रवादी युवक ने जनतेला केला प्रश्न

Categories
Breaking News Political social पुणे

कैसे लगे अच्छे दिन? – राष्ट्रवादी युवक ने जनतेला केला प्रश्न

| शहरात अनेक ठिकाणी दिवाळी निमित्त सरकार ची केली पोलखोल

शहरात ठिकठिकाणी बॅनर बाजी करत युवक राष्ट्रवादी चे गिरीश गुरूनानी यांनी जनतेला दिवाळी निमित्त शुभेच्छा देतानाच जनतेला प्रश्न ही विचारला आहे. “कैसे लागे अच्छे दिन, लौटा दो हमारे बुरे दिन” असे वाक्य लिहत हे बॅनर जनतेचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच २०१४ व २०२२ च्या अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींचा तुलनात्मक तक्ता लावत युवक राष्ट्रवादी ने केंद्र शासित भाजपा सरकार च्या आर्थिक धोरणांवर आघात केला आहे.

या विषयी बोलत असताना युवक राष्ट्रवादी चे कोथरूड अध्यक्ष गिरीश गुरूनानी म्हणाले की केंद्र शासित भाजपा सरकार ने खरंच जनतेची दिवाळी गोड केली आहे का हे या किमतींकडे बघून जनतेनेच ठरवावे. सामान्य जनतेवर होत असलेल्या महागाईच्या माऱ्याला केवळ आणि केवळ केंद्रातील भाजपा सरकारच कारणीभूत असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले. “आमदनी अठन्नी खर्चा रुपया” हे वाक्य लिहलेले फलक हातात धरत त्यांनी गृहिणींना ही कोलमडत असलेल्या बजेट बद्दल प्रश्न केला आहे. GST च्या माऱ्याने बेजार झालेल्या व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडण्याचा ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. दुधाचे भाव २ – २ रुपयाने वाढवत वाढवत आता ५२₹ प्रती लिटर ला पोचले आहेत असे ही त्यांनी निक्षून सांगितले.

वरील सर्व बाबींचा विचार करून सामान्य जनतेने स्वतः ठरवावे की त्यांना हा महागाई चा राक्षस डोक्यावर बसवून नाचायचे आहे की मग येत्या निवडणुकीत सरकार ला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे, असे आवाहन गुरूनानी यांनी केले. या आशयाचे बॅनर शहरातील महत्वाचे भाग जसे चांदणी चौक, कोथरूड पेट्रोल पंप, नळ स्टॉप, डेक्कन पेट्रोल पंप, ज्ञानेश्वर पादुका चौक,बालगंधर्व, तसेच बिग बाजार आणि डी मार्ट बाहेर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने झळकावण्यात आले आहेत.

या वेळी राष्ट्रवादी युवक चे अमोल गायकवाड,श्रीकांत भालगरे,शशांक काळभोर,संकेत शिंदे,ऋषिकेश कडू,प्रीतम पायगुडे,ऋषिकेश शिंदे,रवी गाडे,तेजस बनकर ,आरव दिघे, अविनाश गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Pune | पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई, बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन

गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातत्याने वाढणारी महागाई, सुशिक्षित तरुणांवर आलेले बेरोजगारीचे संकट, अन्नधान्यावरील जीएसटी, इंधन दरवाढ, विकास कामांमधील भ्रष्टाचार, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, सातत्याने देशातील विविध भागात सुरू असणाऱ्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना, शेतकरी बळीराजाच्या आत्महत्या, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, केंद्र सरकारची लोकशाही विरोधी धोरणे या सर्व अन्यायकारक व जुलूमकारक गोष्टींमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, निवेदने देत लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या विरोधाने देखील केंद्र सरकारला जाग येत नाही, त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशातील या दृष्ट प्रवृत्तींच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच “महागाईचा रावण जाळलाच पाहिजे…,बेरोजगारीचा रावण जाळलाच पाहिजे….,धार्मिक द्वेष करणारा रावण जाळलाच पाहिजे….” या घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय नागरिकांवर या गोष्टी लादणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा दृढ निश्चय देखील युवकांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “देशातील युवक हा देशाच्या विकासाचा प्रमुख शिलेदार असतो परंतु हाच युवक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राजसत्तेच्या विरोधात बंड पुकारत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने बेरोजगारीमुळे युवकांवर ही वेळ आणली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील ज्या दृष्ट प्रवृत्तीचे रावण दहन झाले आहे, त्या दृष्ट प्रवृत्ती देशातील युवक,युवती, महिला यांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय घातक आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जनतेवर लादण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आज या महागाईमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातून बचत ही जवळपास हद्दपार झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ आपली नोकरी, व्यवसाय, छोटा मोठा काम- धंदा करणे व त्यातून जमा झालेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ज्या काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतील, त्या प्रत्येक गोष्टीवर भरमसाठ टॅक्स भरणे केवळ हेच कालचक्र सध्या सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यकाळात भारतीय नागरिकांची परिस्थिती श्रीलंकेतील नागरिकांसारखी होण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर गल्लीपासून -दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी नावाच्या दृष्ट राक्षसाचा वध करणे हे ही काळाची गरज बनली आहे.

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल वाकडकर, मनोज पाचपुते,महेश हांडे, अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,कुणाल पोकळे, ॲड.निखिल मलानी,मंगेश मोरे,स्वप्निल जोशी,योगेश सुतार,गजानन लोंढे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress Vs PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी | गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

Categories
Breaking News Commerce Political social पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यापारी आणि जनता भिकारी ! मोहन जोशी

| गॅस सिलिंडरवर मर्यादा लावून मोदी सरकारकडून जनतेची क्रूर थट्टा

जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सध्या सर्वात निच्चांकी पातळवीर आहेत पण देशात पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर मात्र मोदी सरकार कमी करत नाही. मागील तीन महिन्यापासून क्रूड ऑईलचे दर कमी होत आहेत पण पेट्रोल, डिझेलचे दर कमी न करता मोदी सरकार त्यातून जनतेची लूट करत आहे. आतातर मोदी सरकारने घरगुती सिलिंडर वापरावरच मर्यादा आणून जनतेची क्रूर थट्टा केली आहे. नरेंद्र मोदींच्या व्यापारी वृत्तीमुळे जनता मात्र भिकारी झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे फक्त भांडलदारांचे हित जोपासणारे सरकार आहे. या सरकारच्या काळात मोजक्या भांडवलदारांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे तर गरिब, मध्यमवर्ग, सर्वसामान्य जनता मात्र समस्यांच्या गर्तेत ढकलली जात आहे. नरेंद्र मोदींनी व्यापारी वृत्तीमुळे देशातील सगळी संपत्ती विकून टाकली आहे. केवळ हम दो हमारे दो, हेच मोदी सरकारचे काम आहे. सर्वसामान्य जनता महागाई, बेरोजगारी सारख्या समस्यांनी त्रस्त आहे आणि मोदी व मोदींचे मित्र मात्र मस्त आहेत. महागाईच्या आगडोंबाने जनतेला जगणे कठीण झाले आहे तसेच जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून महागाई वाढवण्यात आणखी हातभार लावला जात आहे. पेट्रोल, डिझेलच्या करातून मोदी सरकारने २७ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. मोदी देश विकून देश चालवत आहेत त्यांच्या या व्यापारीवृत्तीमुळे देश रसातळाला जात आहे असेही मोहन जोशी म्हणाले.

Signature campaign | राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम

राज्यातील ईडी सरकारच्या नाकर्तेपनामुळे वेदांता फॅक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे शहरातील सर्व महाविद्यालयांच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या सह्यांच्या मोहीमेचा शुभारंभ आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाहेर करण्यात आला मोदींनी मागील काही वर्षांपूर्वी बेरोजगारांनी पकोडे तळा असा सल्ला दिलेला होता त्यालाच अनुसरून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले पकोडे नागरीकांना वाटण्यात आले.

‘पन्नास खोके विदयार्थ्यांना धोके’, ‘महाराष्ट्राला पॉपकॉर्न गुजरातला फोकस्कॉन ‘ अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. सदर प्रसंगी विध्यार्थांचा खूप मोठेया प्रमानावर प्रतिसाद होता .
या प्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले महाराष्ट्राच्या विदयार्थ्यांना व तरुणांना दोन लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प या ED सरकारने दुर्लक्षित केला आणि परराज्याच्या दावणीला नेऊन बांधला. आपल्या राज्यातील तब्बल दोन ते तिन लाख कुटुंबाची प्रगती यामुळे थांबणार आहे या सर्व तरुणाच्या आशा ह्या ED सरकारने धुळीस मिळवण्याचे पाप केलेलं आहे ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत संपूर्ण देशाला नोक-या दिल्या त्या महाराष्ट्रातील बेरोजगारांना पुढील काळात नोक-यांकरीता कुटुंबाला सोडून परराज्यात जावे लागण्याची परीस्थीती निर्माण होण्याचा खुप मोठा धोका आहे त्यांना जनता नक्कीच योग्यवेळी उत्तर देईल.

सदर प्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख, विक्रम जाघव, संध्या सोनवणे, शुभम माताळे, कार्तिक थोटे, ओम पोकळे, ऋषीकेश शिंदे,अद्वैत कुऱ्हाडे, श्रीकांत बालघरे,ऋषीकेश कडू, चैतन्य पडघन, पियूष मोहिते, सत्यम पासलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते…

Congress | Inflation | महंगाई पे हल्ला बोल काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महंगाई पे हल्ला बोल काँग्रेसची दिल्लीत रविवारी महारॅली

| महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे : मोदी सरकारची दिशाहीन आर्थिक नीती आणि महागाई याचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्ष दिल्लीत रविवार दि.4 सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर महा रॅली काढनार असून महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते दिल्लीला रवाना झाले आहेत,अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे.
सध्याच्या कठीण काळात काँग्रेस पक्ष जनते बरोबर आहे आणि राहील.मोदी सरकारची धोरणे विनाशकारी आहेत. गेल्या आठ वर्षांत अशा चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. घरगुती गॅस सिलिंडर, तेल, कडधान्ये यांचे भाव वाढलेले आहेत. सध्या सण चालू असून महागाईच्या झळा सोसत सण साजरे केले जात आहेत. या बिकट परिस्थितीच्या विरोधात २०२१ च्या जून महिन्यापासून काँग्रेस पक्षाने देशभरात संसदेपासून अगदी रस्त्यावर आंदोलने करून जनतेचे गाऱ्हाणे मांडून मोदी सरकारचा निषेध नोंदविला आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून दिल्लीत महा रॅली आयोजित केली आहे.भारतभर चाललेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील काँग्रेस सातत्याने सहभागी झाली आहे,असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हंटले आहे.
दिल्लीतील महा रॅली मध्ये महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते दिल्लीला जात असून पुण्यातील काँग्रेस कार्यकर्तेही त्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत, पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलने करुन यापूर्वी सातत्याने निषेध नोंदविला आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली आहे.

Supriya Sule | महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे | खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

Categories
Breaking News Political पुणे

महागाईकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहे

| खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

घरखर्च भागवणे अवघड झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जनतेच्या प्रश्नावर झोपेचे सोंग घेतले आहे त्याला जागवण्याचे काम राष्ट्रवादी रस्त्यावर येवून करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने कोथरूडला महागाई प्रश्नावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. महागाईचा विषय देशातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. मात्र, या विषयाकडे केंद्रातील सत्ताधारी जाणीवूपर्वक दुर्लक्ष करीत आहेत., असा आरोप खासदार सुळे यांनी यावेळी केला.

खासदार सुळे म्हणाल्या की, तुम्ही केले तर जन कल्याण विरोधकांनी केले तर रेवडी वाटप म्हणायचे. हा अन्याय आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या यंत्रणांच्या फक्त राजकारण्यांनाच नव्हे तर मिडीयावाल्यांना सुध्दा नोटीसा जात आहेत. अटक केली जात आहे. संविधानाने, डॉ. आंबेडकरांनी जो हक्क दिला, तो आवाज दाबण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे अध्यक्ष नढ्ढा म्हणतात की, एक पार्टी एक देश. आम्ही संविधान मानणारे आहोत. आम्ही एक देश अनेक पार्टी चा पुरस्कार करतो.

संयोजक शंकर केमसे म्हणाले की, या सरकारच्या काळात जगणं अवघड, मरण सोप झाले आहे. ज्वारी, मुग, साखर सगळेच महाग झाले. मोदीजी तुमच्या राज्यात स्वस्त काय आहे ते सांगा. खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे एवढेच यांचे धोरण आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत.

Edible Oil Price | खाद्यतेल आता अजून स्वस्त होऊ शकते | 16 ऑगस्टला IMC ची मोठी बैठक

Categories
Breaking News Commerce social आरोग्य देश/विदेश लाइफस्टाइल

खाद्यतेल आता अजून स्वस्त होऊ शकते | 16 ऑगस्टला IMC ची मोठी बैठक

 खाद्यतेलाचे दर : देशातील सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  16 ऑगस्ट रोजी IMC ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, ज्यामध्ये खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या शक्यतेवर चर्चा केली जाणार आहे.
  देशातील सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.  स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून लोकांना महागाईपासून शक्य तितका दिलासा मिळावा.  मंगळवार, 16 ऑगस्ट रोजी अशाच काही मोठ्या मुद्द्यांवर IMC ची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, ज्यामध्ये विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत.  मंगळवारी होणाऱ्या या बैठकीत खाद्यतेल आणि तेलबियांच्या साठा मर्यादेबाबत फेरविचार करण्यात येणार आहे.  गेल्या काही महिन्यांत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्‍या तेलाच्या किमतीत अनेकवेळा कपात करण्यात आली आहे.

 खाद्यतेलाच्या किमती कमी करण्याच्या शक्यतेवर चर्चा होणार

 आयएमसीच्या या महत्त्वाच्या बैठकीत पाम ऑइलच्या भविष्यावरील उद्योग सादरीकरणावरही चर्चा होऊ शकते.  या बैठकीत विविध खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होण्याच्या शक्यतेवरही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  याशिवाय येत्या सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचा पुरेसा साठा राखणे हाही अजेंड्यावर असेल.
 शुक्रवारी अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली.
 खाद्यतेलाच्या किमतींबाबत शुक्रवारी एक महत्त्वाची बैठकही झाली, ज्याच्या अध्यक्षतेखाली अन्न सचिव होते.  बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.  अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यावरही विचार करण्यात आला.  याशिवाय TRQ प्रमाण आणि पाम तेलाच्या भविष्यातील व्यवसायावरही चर्चा झाली.  या बैठकीत तेलाच्या किमतीवर होणाऱ्या परिणामाबाबतही महत्त्वपूर्ण चर्चा झाली.  बैठकीत अन्न सचिवांनी खाद्यतेल संघटनांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी आयातीवरील अवलंबित्व कमी करावे आणि सरकारसोबत देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचे मार्ग शोधावेत.

Retail inflation | जुलैमध्ये किरकोळ महागाई दर झाला कमी|  भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या आधारावर दिलासा

Categories
Breaking News Commerce social आरोग्य देश/विदेश लाइफस्टाइल

जुलैमध्ये किरकोळ महागाई दर झाला कमी|  भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या आधारावर दिलासा

खाद्यतेलासारख्या स्वस्त झालेल्या खाद्यपदार्थांमुळे जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 6.71 टक्क्यांवर आली.  तथापि, ते अजूनही रिझर्व्ह बँकेच्या 6.0 टक्क्यांच्या उच्च थ्रेशोल्डच्या वरच आहे.  पीटीआयच्या वृत्तानुसार, भाजीपाला आणि खाद्यतेल आणि इतर वस्तूंच्या किमती घसरल्या असल्या तरी किरकोळ महागाई मात्र उंचावली आहे.  अशा परिस्थितीत, सप्टेंबरच्या अखेरीस प्रस्तावित पतधोरण आढाव्यात आरबीआय धोरण दरात आणखी एक वाढ करू शकते.  शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, जून २०२२ मध्ये महागाईचा दर ७.०१ टक्के होता, तर जुलै २०२१ मध्ये ५.५९ टक्के होता.
 अन्नधान्याची महागाईही कमी झाली
 आकडेवारीनुसार, अन्नधान्य चलनवाढीचा दरही जुलैमध्ये 6.75 टक्‍क्‍यांवर आला आहे, जो जूनमधील 7.75 टक्‍क्‍यांवर होता.  चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत तो सात टक्क्यांच्या वर राहिला.  नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाईचा दर जून महिन्यातील 7.75 टक्क्यांवरून जुलैमध्ये 6.75 टक्क्यांवर आला.
 RBI ची समाधानकारक पातळीची वरची मर्यादा ६.० टक्क्यांपेक्षा जास्त आहे
 ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनवाढ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) 6.0 टक्क्यांच्या उच्च उंबरठ्यावर कायम आहे.  किरकोळ महागाई दर ६ टक्क्यांच्या वर गेल्याचा हा सलग सातवा महिना आहे.  दोन टक्के चढउतारांसह किरकोळ चलनवाढ चार टक्क्यांवर ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर सोपवण्यात आली आहे.  आकडेवारीनुसार, जुलैमध्ये किरकोळ महागाई कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घट.  इंधन आणि उर्जेच्या बाबतीत, किमती उच्च आहेत.
 अर्थशास्त्रज्ञ काय म्हणतात
 ICRA च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, जागतिक मंदी आणि तणाव पुन्हा सुरू होण्याची भीती यामुळे वस्तूंच्या किमतीत घट झाली आहे, जी जूनच्या मध्यात उच्चांकावर पोहोचली होती.  तथापि, देशांतर्गत स्तरावर सेवांना असलेली जोरदार मागणी पाहता महागाई वाढण्याचा धोका आहे, असेही ते म्हणाले.  सीपीआयमधील महत्त्वपूर्ण वाटा लक्षात घेता, यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.  याशिवाय भात पेरणीतही तुटवडा जाणवत आहे.  CPI मध्ये सेवांचा वाटा 23.4 टक्के आहे.  नायर म्हणाले की चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यावर चलनविषयक धोरण समितीचा भर (किरकोळ चलनवाढ जुलै 2022) पाहता, पुढील आर्थिक आढाव्यात, धोरण दर 0.1 टक्क्यांवरून 0.35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा आमचा अंदाज आहे.
 भाजीपाला आणि खाद्यतेलाच्या किमती किती कमी झाल्या?
 मध्यवर्ती बँकेने पॉलिसी रेट रेपोमध्ये सलग तीन वेळा वाढ केली असून सध्या तो 5.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.  आकडेवारीनुसार, जुलैमध्ये भाजीपाला आणि खाद्यतेल आणि चरबी विभागातील महागाई अनुक्रमे 10.90 टक्के आणि 7.52 टक्क्यांवर आली.  जून महिन्यात तो अनुक्रमे १७.३७ टक्के आणि ९.३६ टक्के होता.  जुलै महिन्यात इंधन महागाई 10.39 टक्क्यांवरून 11.76 टक्के होती.
 अंड्याचे दर घसरले आहेत
 या वर्षी जुलैमध्ये मांस, मासे आणि कडधान्ये आणि त्यांच्या उत्पादनांची महागाई अनुक्रमे 9 टक्के आणि 0.18 टक्क्यांवर पोहोचली आहे.  मात्र, अंड्यांच्या किमतीत घसरण कायम असून जुलैमध्ये त्यात ३.८४ टक्क्यांनी घट झाली असून, जून महिन्यात अंड्यांच्या किमतीत ५.४८ टक्क्यांनी घट झाली आहे.  आकडेवारीनुसार, जूनमध्ये 3.10 टक्क्यांवरून फळांच्या किमतीत 6.41 टक्क्यांनी वाढ झाली आहे.