Video | Anti-Inflation Movement | शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”

केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर प्रस्तावित केलेली जी.एस.टी दरवाढ, गॅसच्या दरात झालेली वाढ,राज्य सरकारने वीज दरात केलेली वाढ या सर्व महागाईच्या आघातांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे “महागाई विरोधी आंदोलन” करण्यात आले.

यांत प्रतिनिधिक स्वरूपात मोदींच्या सर्वात आवडत्या प्रतिनिधी गरिबी, महागाई व बेरोजगारी यांचा वेश परिधान करून उपस्थीत होते. यावेळी बोलताना गरीबी,महागाई व बेरोजगारी यांनी सांगितले की, “गेल्या आठ वर्षात मोदीजींनी आम्हाला एकही दिवस सुट्टी दिली नाही.आमचा उपयोग करत मोदीजी देशातील जनतेला लुटत असून आम्हाला जनतेची किव येते परंतु मोदीजींना येत नाही.कृपया जनतेनेच मोदींना धडा शिकवत आमची या त्रासातून मुक्तता करावी”.

या आंदोलन प्रसंगी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील नागरिकांनी आपल्या मूलभूत गरजा भागवायच्या कश्या….? असा प्रश्न या देशातील प्रत्येक नागरिकास पडत आहे. याचं कारण आहे, जी.एस.टी परिषदेत केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या ताटातील मूलभूत वस्तू तेल, तूप, पनीर या जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी वाढवण्याची तरतूद केली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच असं होत आहे की , अगदी मूलभूत जीवनावश्यक वस्तूंवर देखील जी.एस.टी लागल्यानंतर या गोष्टी महाग होणार आहेत. त्याचप्रमाणे घरगुती गॅसच्या किमतीत देखील तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे.गेल्या आठ वर्षात घरगुती गॅस जवळपास तिपटी ने वाढला असून स्वयंपाक घरातील प्रत्येक गोष्ट महाग करण्याचा केंद्रातील मोदी सरकारने जणू विडाच उचलला आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेले एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजेच ED सरकार देखील केंद्राच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा महागाईचा कित्ता गिरवत आहे. राज्यातील सरकारने सत्तेवर येतात पहिल्याच आठवड्यात वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्य नागरिकांना दिला आहे.

केंद्र व राज्य सरकार या दोघांकडून होत असणारी ही जनतेची लूट थांबावी जनतेला आपले जीवन सुसह्य व्हावे, याकरीता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात येत आहे.

जोरदार पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन उपस्थित होते. विशेषतः महिला भगीणींची मोठी संख्या आंदोलनात पाहायला मिळाली. तसेच जीवनावश्यक वस्तू, घरगुती गॅसचे दर वाढल्याने सर्व महिला भगिनींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रदीप देशमुख ,सुरेश गुजर ,अजिंक्य पालकर ,समिर शेख , हेमंत बघे , सागर राजे भोसले , अमोल ननावरे , नरेश पगड्डालू , शशिकला कुंभार ,प्रतिभा गायकवाड, वर्षा ढावरे ,पुजा झोळे ,मिना पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP pune Against Inflation | राष्ट्रवादी काँग्रेसने भरवला मोदी महागाई बाजार

Categories
Breaking News Political पुणे

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी महागाई बाजार उभारुन आंदोलन

पुणे : देशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर १५.८८ वर गेला आहे. हा गेल्या ९ वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठिण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.

पुणे शहरात अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. याशिवाय काही बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. पण आज पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. यामध्ये बाजारपेठ उभी करून महागाई विरोधात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. मोदीजी, महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूत देखील मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे.याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात असून आता व्यापारी आणि विक्रेत्यांवरही महागाईची ही संक्रांत ओढावली आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता.

केंद्रातील मोदी सरकारला महागाईवर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयश आले असून याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , उदय महाले, वनराज आंदेकर, अजिंक्य पालकर, वैशाली थोपटे, सदानंद शेट्टी , मूणालीनी वाणी मोनाली गोडसे, राखी इंगळे, रोहन पायगुडे, सुशांत साबळे,सौरभ गुंजाळ, लक्ष्मण आरडे , रूपाली ठोंबरे , मनिषा होले ,योगेश पवार ,दिलशाद अत्तार हे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर नागरीकही उपस्थीत होते

NCP activists show black flags | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे

२०१४ साली अवघ्या ५ रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून ३६५ रुपये झाल्याने रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या परंतु आज भाजप सरकारच्या काळात तब्बल १००२ रुपये गॅस सिलेंडर होऊन देखील चकार शब्द देखील न काढणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सेनापती बापट रोड येथे आंदोलन घेण्यात आले.

स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत , घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी ” महागाई ची राणी, स्मृती इराणी” , ” स्मृती भाभी जवाब दो” , ” बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.


याप्रसंगी बोलतांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील प्रत्येक कुटुंब महागाईच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र याची दखल घेत दिलासा देण्यास तयार नाही.अश्या परिस्थितीमध्ये ज्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु गेल्या ७ वर्षात गॅस सिलेंडरची किंमत ३६५ वरून तब्बल १००२ वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आजच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे.२०१४ साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे.”

हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रसंगी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, जेष्ठ नेंते अंकुश काकडे, वैशाली नागवडे,प्रदीप देशमुख,बाळासाहेब बोडके,निलेश निकम, किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,उदय महाले,गणेश नलावडे,विक्रम जाधव,मानली भिलारे,राजू साने, कार्तिक थोटे , अनिता पवार,वैशाली थोपटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Video : Smriti Irani Vs Congress : तोंड उघड बया, तोंड उघड… महागाई विरोधात तोंड उघड

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

तोंड उघड बया, तोंड उघड…
महागाई विरोधात तोंड उघड

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा निषेध

महागाई विरोधात आठ वर्षांपूर्वी आंदोलन करणाऱ्या विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या वाढत चाललेल्या महागाईबद्दल गप्प आहेत.

या महागाई विरोधातील जनतेचा आवाज मांडण्यासाठी पुणे शहर महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पूजा आनंद या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या भेट देण्यासाठी हॉटेल मॅरिएट येथे शिष्टमंडळासह गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलावून या शिष्टमंडळाला मंत्र्यांची भेट घेण्यापासून रोखले. पोलिसांनी पूजा आनंद यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Firewood Protest : Shivsena : महागाईचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे मोफत सरपण वाटप

Categories
Breaking News Political पुणे

महागाईचा निषेध म्हणून शिवसेनेतर्फे मोफत सरपण वाटप

पुणे :-केंद्र सरकारच्या महागाईवाडी चा निषेध म्हणून शिवसेना पुणे शहर यांच्या वतीने प्रत्येक प्रभागात आंदोलन करून शिवसैनिक रस्त्यावर उतरले.

शिवसेना शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या वतीने सिलेंडर चे वाढलेले भाव याचा निषेध म्हणून गोखलेनगर जनवाडी वस्ती भागातील पाचशे कुटुंबांना मोफत सरपण (लाकडी) वाटप करण्यात आली. “महागाई आटोक्यात आली नाही तर आपल्या देशामध्ये श्रीलंके सारखी परिस्थिती होऊ शकते” अशी भीती गजानन थरकुडे यांनी यांनी व्यक्त केली.

आयोजित केलेल्या अनोख्या आंदोलनाला शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर संघटिका सविता मते, माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, उपशहर संघटक उमेश वाघ यांच्यासह प्रवीण डोंगरे प्रकाश धामणे, उपेश सोनवणे,युवराज जाधव,संजय डोंगरे, संतोष ओरसे, आकाश रेणुसे, सागर जाधव,स्नेहल पाटोळे,विनोद धोत्रे , विशाल गायकवाड, भाग्यश्री सागवेकर, दिपाली शिगवण, आदी उपस्थित होते.

NCP against inflation : Video : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  ‘कमळाबाई’ ची आरती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  ‘कमळाबाई’ ची आरती

: खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती

पुण्यातील शनिपार चौक येथे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदारसुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाई ची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ कमळाबाई ‘ ची आरती करण्यात आली.

वेळी बोलताना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले की, ” मला आजही आठ वर्षांपूर्वी स्वर्गीय सुषमाजी स्वराज यांचे एक वाक्य आठवते ” आकडों से पेट नही भरता साहब धान से भरता है” आज केंद्रातील भाजप सरकारने किमान स्व.सुषमा स्वराज यांच्या या वक्तव्याची जाण ठेवत देशातील महागाई कमी करावी नागरिकांना दिलासा द्यावा. गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच टक्क्यांनी झालेली ही वाढ खरोखर अन्यायकारक अशीच आहे .आज जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी,घरगुती गॅस,व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत”.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले,  देशातील सर्व प्रश्न सुटले असून, हनुमानाची आरती केल्याने उर्वरित प्रश्न देखील सुटणार आहेत असा संदेश गेल्या काही दिवसांत भाजप,मनसे,नरेंद्र मोदी , राज ठाकरे देत असून त्या अनुषंगाने सर्वसामान्य पुणेकरांना हनुमान प्रसन्न व्हावे व महागाई कमी व्हावी यासाठी आज शनिपार येथे हनुमानास साकडे घालण्यात आल्याने आता येत्या काळात सिलेंडर १ हजार रुपयांवरून ३०० रुपये , पेट्रोल १२५ रुपयांवरून ५० रुपये व्हावा अशी आम्हाला अपेक्षा आहे.

जनतेचा विचार न करता केवळ आपले निर्णय त्यांच्यावर लादणारे सरकार म्हणून मोदी सरकारचा नावलौकिक आहे. वेग -वेगळे कायदे असतील, नोटबंदी जी.एस.टी लागू करणे, सरकारी कंपन्या – बँका विकणे, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने या देशाला दिले आणि या निर्णयामुळे हा देश होरपळत आहे.

या आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुशआण्णा काकडे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे,निलेश निकम,नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्यासौ.रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune Congress : भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता : रमेश बागवे

Categories
Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता : रमेश बागवे

पुणे  काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारच्या अनियंत्रित महागाई विरोधात जनजागरण पदयात्रा 

      पुणे :   पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या अनियंत्रित महागाई विरोधात जनजागरण पदयात्रा संत कबीर चौक, नाना पेठ ते महात्मा फुले स्मारक, गंज पेठ, पुणे पर्यंत काढण्यात आली व आंदोलन करण्यात आले.

     यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची शुद्ध फसवणूक केलेली आहे. पेट्रोल-डीजेलच्या भाववाढी बरोबरच दैनंदिन वस्तूंच्या भाववाढीने सुध्दा आकाशाला गवसणी घातलेली आहे. यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. भाजपने पुणे महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे भ्रष्टाचार म्हणजे भाजप, खोटे बोलणारा पक्ष म्हणजे भाजप असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. भाजपच्या नगरसेवकांनी अनावश्यक ठिकाणी खोदकाम करून टक्केवारी व ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार केलेला आहे. याचा कळस म्हणजे टेंडर न काढता बिल काढण्याचे पाप भाजपने केलेले आहे. यांच्या कथनी आणि करनीमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. मोदींनी देशातील जनतेला ज्याप्रकारे जुमलेबाजी करून फसविले तसाच नेमका प्रकार पुण्यात देखील भाजपची मंडळी करत आहे. एकीकडे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठेवतात तर दुसरीकडे त्या कार्यक्रमाच्या होर्डिंग्ज मधून छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला गायब करतात. महामानवांपेक्षा यांच्यासाठी यांचे नेते मोठे झाले आहेत. आज भाजपच्या ‘मुहं में राम और बगल में छूरी’ या नीतीच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे.’’

     यावेळी उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘‘देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असतांना फक्त काँग्रेस पक्षच रस्त्यावर उतरून या अनियंत्रीत महागाई विरोधात लढत आहे. महागाई कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदींनी जनतेची शुद्ध फसवणूक केली आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महागाई वाढवून देशाची अर्थव्‍यवस्था उध्दवस्त केली आहे. जे सरकार महागाईवर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. आज मोदी सरकारने महागाईचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे त्यांनी त्वरीत महागाईवर नियंत्रण आणावे अन्यथा त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.’’

     याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, महिला अध्यक्षा सोनाली मारणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

     या जनजागरण पदयात्रेत केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात आल्या.

     या जनजागरण पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, कमलताई व्यवहारे, आबा बागुल, अविनाश बागवे, रफिक शेख, संगीता पवार, भीमराव पाटोळे, अनिल सोंडकर, उस्मान तांबोळी, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रवि पाटोळे, क्लेमेंट लाजरस, रॉबर्ट डेविड, वाल्मिक जगताप, सुनिल पंडित, मुख्तार शेख, अशोक जैन, बाबा धुमाळ, मुन्नाभाई शेख, अरूण वाघमारे, रमेश सकट, सुनील घाडगे, प्रवीण करपे, सतीश पवार, प्रदिप परदेशी, शिलार रतनगिरी, सुजित यादव, जयकुमार ठोंबरे, जावेद निलगर, नंदू मोझे, रजनी त्रिभुवन, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, मंजूर शेख, विठ्ठल गायकवाड, विजय मोहिते, दिपक ओव्‍हाळ, छाया जाधव, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Pune Congress :  प्रभात फेरी व कोपरा सभा घेत महागाईच्या  विरोधात कॉंग्रेस जनजागरण करणार : शहर अध्यक्ष रमेश बागवे

Categories
PMC Political पुणे महाराष्ट्र

 प्रभात फेरी व कोपरा सभा घेत महागाईच्या  विरोधात कॉंग्रेस जनजागरण करणार

शहर अध्यक्ष रमेश बागवे यांची महिती

पुणे : केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि. १४ ते दि. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशात ”जनजागरण अभियान” आयोजित केले आहे. नेहरू स्टेडियम येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे शहर जिल्हा  कॉंग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक पुतळा, मंडई पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे छायाचित्रांचे फलक घेवून, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले. यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले कि पुढच्या १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी व कोपरा सभा घेवून या महागाईच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करणार आहोत.

१४ ते  २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आदेश

यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ”आज भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती आहे. देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. भाक्रा नांगल धरण प्रकल्प, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आय.आय.टी., आय.आय.एम., एम्स, हिंदुस्थान अँटी बॉटिक्स, भाभा अटोमिक संशोधन केंद्र, एन.डी.ए. सारख्या संस्थेची स्थापना केली.

     देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी देशाची प्रगती केली त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. आज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत सामान्य जनतेचे जगणे कठिण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत स्थापन केलेले सरकारी संस्थांचे भाजप सरकार खाजगीकरण करीत आहे, या खाजगी करणाच्या नावाखाली अनेकांची नोकरी संपुष्टात आली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. कॉंग्रेस पक्षाने आंदोलनामार्फत या भाववाढीकडे आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले, परंतु सरकार कानाडोळा करीत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांनी महागार्इच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी दि. १४ ते दि. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आज पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून प्रभात फेरी काढली. पुढच्या १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी व कोपरा सभा घेवून या महागार्इच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करणार आहोत.

जनतेच्या हिताकरीता आज कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जनजागरण करीत आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाने त्वरीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.”

यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे यांचीही भाषणे झाली.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, अमीर शेख, लता राजगुरू, मनीष आनंद, पुजा आनंद, नीता रजपूत, सोनाली मारणे, प्रकाश पवार, विशाल मलके, भूषण रानभरे, संगिता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, प्रवीण करपे, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, शिलार रतनगिरी, अमित बागुल, बाळासाहेब अमराळे, प्रशांत सुरसे, किशोर वाघेला, नितीन परतानी, जावेद निलगर, सादिक लुकडे, अनुसया गायकवाड, तार्इ कसबे, मिरा शिंदे, अॅड. राजश्री अडसूळ, ज्योती परदेशी, कल्पना उनवणे, राधिका मखामले, रजिया बल्लारी, संगिता क्षिरसागर, अविनाश अडसूळ, क्लेमेंट लाजरस, राकेश नामेकर, सुरेश कांबळे, भरत सुराणा, बबलू कोळी, गणेश शेडगे, दिलीप लोळगे, अक्षय माने आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्या कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी कॉंग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress movement : inflation : जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून मोदी सरकारने जनतेला दिवाळीची भेट दिली – रमेश बागवे  

Categories
Political पुणे महाराष्ट्र

 जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून मोदी सरकारने जनतेला दिवाळीची भेट दिली – रमेश बागवे

 

पुणे –  केंद्रातील मोदी सरकारच्या पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असल्यामुळे सामान्य जनतेला जगणे कठिण झाले आहे. या भाववाढीच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली सेवन लव्हस्‌ चौक, शंकरशेठ रोड, पुणे येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, महापालिकेचे गटनेते आबा बागुल, सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, अरविंद शिंदे, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट, लता राजगुरू, अजित दरेकर, अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, रफिक शेख, रजनी त्रिभुवन,  व इतर मान्यवर उपस्थित होते.

चूल पेटवून मोदी सरकारचा निषेध व्यक्त

    महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे गाडी चालविणे सामान्य नागरिकाच्या खिशाला न परवडणारे आहे त्यामुळे गाडी विकणे आहे असा फलक लावून गाड्यांना व स्वयंपाक गॅसला हार घालून तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात आला.

     यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘ऐन सणासुदीच्या काळात या मोदी सरकारने इंधन व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून गोरगरीब, कष्टकरी व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाववाढीच्या विरूध्द जनता संताप व्यक्त करीत असताना सुध्दा पंतप्रधान मोदींना त्याचे गांभीर्य कळत नाही. इंधन व जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून त्यांनी जनतेला दिवाळीची भेट दिली आहे. ही दिवाळी महागाईची दिवाळी म्हणून साजरी करावी लागणार आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने या दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ त्वरीत कमी करावी अन्यथा काँग्रेस पक्षाला जनतेच्या हितासाठी उग्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.’’

     यानंतर आपला रोष व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की, ‘‘मोदी सरकारच्या राजवटीत विमानाला लागणारे इंधनाचा दर ७९ रू. आहे आणि सामान्य नागरिकांच्या गाड्यांना लागणाऱ्या पेट्रोलचा दर १११ रू. व डिझेलचे दर १०४ रू. आहे. स्वयंपाक गॅसची किंमत १००० रू. पर्यंत पोहचली आहे. गेल्या मे २०२० ला स्वयंपाक गॅसची सबसिडी कोणाला न सांगता मोदी सरकारने बंद केली आहे. त्यामुळे या सरकारला सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत विचार करण्यास वेळ मिळत नाही. अच्छे दिनची घोषणा करून जनतेची फसवणूक करून मोदी सरकार कारभार करीत आहे. भाजप सरकारच्या दिशाहीन कारभाराला जनता योग्य वेळी धडा शिकवेल या बाबतीत शंका नाही.’’

      या आंदोलनात नीता रजपूत, मुख्तार शेख, सुनिल शिंदे, राजेंद्र शिरसाट, अरूण वाघमारे, सुरेखा खंडागळे, भिमराव पाटोळे, मेहबुब शेख, सुनिल पंडित, द. स. पोळेकर, शिलार रतनगिरी, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, शोएब इनामदार, रमेश सकट, प्रदिप परदेशी, सुनिल घाडगे, राजेंद्र पडवळ, विठ्ठल थोरात, सौरभ अमराळे, निलेश सांगळे, दिपक ओव्हाळ, ॲड. शाबिर खान, वाल्मिक जगताप, विजय वारभुवन, दयानंद अडागळे, यासीर बागवे, रवि पाटोळे, दत्ता पोळ, विनय ढेरे, मीरा शिंदे, शर्वरी गोतारणे, सुंदरा ओव्हाळ, राजश्री अडसुळ, ज्योती परदेशी, संदिप मोकाटे, भरत सुराणा, चेतन आगरवाल, रमाकांत साठे, विठ्ठल गायकवाड, लतेंद्र भिंगारे, राजू गायकवाड व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.