NCP Youth Congress | महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..? | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकार चालवणारेच जर गुजरातची चाकरी करत असतील तर युवकांनी दाद मागायची कोणाकडे..?

| राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अभिनव आंदोलन

महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे गुजरातमध्ये नेण्यात आला. राज्यातील युवकांना रोजगार मिळवण्याचे हेतूने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प राज्यातून निघून गेल्यामुळे हतबल झालेले युवकांनी बुट पॉलिश करत, रद्दी विकत अभिनव स्वरूपाचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेले आंदोलनास उपस्थित राहत युवकांच्या मागणीस पाठिंबा दर्शवला व राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला.

महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार असून महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारनं यात तातडीनं हस्तक्षेप करत महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणूक थांबवत प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी युवकांनी यावेळी केली. वेदांत ग्रुपच्या वतीनं या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यालाच प्रथम पसंती देण्यात आली होती. तळेगांव येथील कंपनीच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते, रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, ‘जेएनपीटी’ बंदराशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्यानं वेदांत ग्रुपनं तळेगांव येथील एक हजार एकर जागेची निवड केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच महाराष्ट्राच्या हिताचा असणारा हा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला जात आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे राज्याचे ‘जीएसटी’चे सुध्दा मोठे नुकसान होईल. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित केला असून महाराष्ट्रातील तळेगांवच्या तुलनेत ही जागा प्रकल्पाच्या उभारणीसाठी अगदीच सामान्य आहे. भाजपशासित गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार (एमओयू) केले आहेत , महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक सचिन दोडके ,प्रदीप गायकवाड ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,मनोज पाचपुते,अजिंक्य पालकर,उदय महाले,नानासाहेब नलावडे,भूषण बधे, गोविंद जाधव,कुलदीप शर्मा,अमोल ननावरे,राकेश कामठे ,महेश हांडे,मयूर गायकवाड,स्वप्निल जोशी,किरण खैरे ,गजानन लोंढे,पूजा काटकर आदी पदाधीकारी उपस्थित होते.

Signature campaign | राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम

राज्यातील ईडी सरकारच्या नाकर्तेपनामुळे वेदांता फॅक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे शहरातील सर्व महाविद्यालयांच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या सह्यांच्या मोहीमेचा शुभारंभ आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाहेर करण्यात आला मोदींनी मागील काही वर्षांपूर्वी बेरोजगारांनी पकोडे तळा असा सल्ला दिलेला होता त्यालाच अनुसरून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले पकोडे नागरीकांना वाटण्यात आले.

‘पन्नास खोके विदयार्थ्यांना धोके’, ‘महाराष्ट्राला पॉपकॉर्न गुजरातला फोकस्कॉन ‘ अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. सदर प्रसंगी विध्यार्थांचा खूप मोठेया प्रमानावर प्रतिसाद होता .
या प्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले महाराष्ट्राच्या विदयार्थ्यांना व तरुणांना दोन लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प या ED सरकारने दुर्लक्षित केला आणि परराज्याच्या दावणीला नेऊन बांधला. आपल्या राज्यातील तब्बल दोन ते तिन लाख कुटुंबाची प्रगती यामुळे थांबणार आहे या सर्व तरुणाच्या आशा ह्या ED सरकारने धुळीस मिळवण्याचे पाप केलेलं आहे ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत संपूर्ण देशाला नोक-या दिल्या त्या महाराष्ट्रातील बेरोजगारांना पुढील काळात नोक-यांकरीता कुटुंबाला सोडून परराज्यात जावे लागण्याची परीस्थीती निर्माण होण्याचा खुप मोठा धोका आहे त्यांना जनता नक्कीच योग्यवेळी उत्तर देईल.

सदर प्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख, विक्रम जाघव, संध्या सोनवणे, शुभम माताळे, कार्तिक थोटे, ओम पोकळे, ऋषीकेश शिंदे,अद्वैत कुऱ्हाडे, श्रीकांत बालघरे,ऋषीकेश कडू, चैतन्य पडघन, पियूष मोहिते, सत्यम पासलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते…