Tag: weather
महाराष्ट्राला धुळीच्या वाऱ्याचा धोका
: हवामान खात्याचा इशारा
मुंबई : पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे येत्या १२ तासांमध्ये उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये काही ठिकाणी धुळीचे वारे ताशी २० ते ३० किमी वेगानं येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.
धुळीच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी दृश्यमानता कमी होण्याचीही शक्यता आहे. हवेतील धुलीकणांचं प्रमाण वाढल्यानं मुंबईत लोकल ट्रेन, आणि उंच इमारती काहीशा अंधुक दिसत असल्याचेही फोटो समोर आले आहेत. तसंच मुंबईत आज सकाळपासूनच हवेची गुणवत्ता खालावल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
हवेत धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचा परिणाम मुंबईत काही ठिकाणी दिसून आला आहे. मुंबईतील उंचच उंच इमारती धुळीच्या वाऱ्यामुळे दिसेनाशा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
23/01; पुढील १२ तासांत उत्तर कोकणात काही ठिकाणी धुळीचे वारे (तास 20-30 किमी) येण्याची शक्यता आहे. मुंबई ठाणे पालघर आणी आसपासच्या भागांत
– IMD
Pl read below,
To distinguish dust layer. Dust appears pink/magenta during day and purple at night. pic.twitter.com/sT4Kb81ARL— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 23, 2022
राज्यात आगामी 3 दिवसात जोरदार पावसाची शक्यता!
: हवामान खात्याचा इशारा
पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच लक्षद्विप (Lakshadweep) आणि कर्नाटक किनारपट्टी (Karnataka coast) परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची (Maharashtra Rains) स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस कडकडाटासह जोरादर पावसाचा (Maharashtra Rains) इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे.
राज्यात ठिकठिकाणी पडला पाऊस
आज सकाळपासून मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, घाट परिसर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.
येत्या काही तासांत संबंदित जिल्ह्यात मुसळधार पावसाची (torrential rain) हजेरी लागण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.5) सायंकाळी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. राज्यातील सांगली, सातारा, रत्नागिरी, पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक या जिल्ह्यात पावसाने हजेरी (Maharashtra Rains) लावली आहे. नाशिक शहराला (Nashik city) काल मुसळधार पावसानं झोडपलं आहे. काल मध्यरात्रीर्पयंत शहरामध्ये 31.8 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
तर मान्सून हंगाम संपल्यानंतर शहरात तब्बल 71.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.
पुढील काही तासात याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून म्हणजेच रविवार (दि.7) पासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे.
रविवारी राज्यातील कोल्हापूर रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय रविवारी पुणे रायगड, सांगली, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची (Maharashtra Rains) शक्यता आहे.