Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी

Categories
Breaking News Political पुणे

Dr Kumar Saptarshi | मोदी – शहा‌ यांनी राजकारणाचा व्यापार मांडला | डॉ. कुमार सप्तर्षी 

 

 

Dr Kumar Saptarshi – (The Karbhari News Service) – नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून भाजपमधील ३० टक्के नेते इतर पक्षातून आयात केलेले आहेत. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. लोकसभेच्या १०२ जागांसाठी झालेल्या मतदानावरून मोदी यांची लाट ओसर्याचे लक्षात येते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप महायुतीला दोनशे ते सव्वा दोनशे जागा मिळतील,आणि त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात येईल, असे भाकीत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.

 

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सप्तर्षी बोलत होते. डॉ. सप्तर्षी म्हणाले, कोणताही पक्ष ४०० पार म्हणतो, तेव्हा थडकी भरते. ऐवढी काय भाजपची‌ किमया आहे, की लोकांनी त्यांना चारशे पार जागा निवडून द्याव्यात. आरएसएसला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्या‌ जिवावर भाजप ४०० पारचा नारा देत आहे. या निवडणुकीत मोदी शहांचा पाडाव होणे गरजेचे आहे. तरच देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षात राहिल. मोदी शहांचा पराभव झाला‌तरच भाजपही जिवंत राहणार आहे. पैसे खाल्लेल्या लोकांना धमकावून, जेलची भिती दाखवून भाजपसोबत घेतले जात आहे. अजित पवार व त्यांचे नऊ मंत्री हे भाजपसोबत जाणे, हे‌ त्याचेच उदाहरण आहे. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. मोदी-शहा ही व्यापारी जोडगोळी आहे. त्यांनी धाडी टाकून देणग्या घेतल्या. जनतेचा पैसा व्यापाऱ्यांनी वाटून घेतला. भाजपचे ३० टक्के लोक आयात केल्याने आयात आणि भाजपमधील हयात यांच्यात संघर्ष होणार आहे.

 

मोदींनी निवडणुकीतले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. बेकारी व महागाईचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. मोदींना अर्थव्यवस्थेचे अकलन आहे, असे वाटत नाही. नोट बंदीमुळे कसलाही काळा पैसा बाहेर आला नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर तुरुंगातील सगळ्यांना बाहेर सोडले, आचारसंहितेचा आदर केला.

 

 

जरांगे पाटील‌ यांच्या मराठा आंदोलनामुळे भाजपची अडचण झाली आहे. मराठा मतदार नाराज झाल्याने राज्यात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे.  महाराष्ट्रात भाजपला अनुकुल वातावरण नाही.त्यामुळे यंदा‌ मागच्या वेळी पेक्षा कमी‌ जागा मिळणार आहेत. पुण्यात काँग्रेसचा मतदार आहे. पुण्याचा जो खासदार निवडून येतो,‌ तेव्हा वर त्या पक्षाची सत्ता येते. कलमाडी जेव्हा काँग्रेसपासून दूर गेले, तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला.

 

संविधान आहे तर आपण आहोत, अशी भावना दलित व मुस्लिमांची आहे, त्यामुळे ते आघाडीच्या मागे उभे राहतील. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वंचित व एमआयएमला मते मिळणार नाहीत. पुणे जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीजिंकेल, असा विश्वासही डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केला. 

Hindi Day | Amit Shah | केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देशवासियांना दिल्या हिंदी दिनाच्या शुभेच्छा

Categories
Breaking News cultural Education Political social देश/विदेश

Hindi Day | Amit Shah | केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देशवासियांना दिल्या हिंदी दिनाच्या शुभेच्छा

 

Hindi Day | Amit Shah | केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी देशवासियांना हिंदी दिनाच्या (Hindi Day) शुभेच्छा दिल्या आहेत. भारत हा विविध भाषांचा देश आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील भाषांच्या विविधतेला हिंदी एका सूत्रात बांधते असे गृहमंत्री आपल्या संदेशात  म्हणाले. हिंदी ही लोकशाहीवादी भाषा आहे.  तिने विविध भारतीय भाषा आणि बोली तसेच अनेक जागतिक भाषांचा सन्मानच केला आहे आणि त्यांमधील शब्द, संज्ञा आणि व्याकरणाचे नियमही स्वीकारले आहेत. (Hindi Day | Amit Shah)

स्वातंत्र्य लढ्यातील खडतर काळात देशाला एका सूत्रात बांधण्याचे अभूतपूर्व काम हिंदी भाषेने केले. अनेक भाषा आणि बोलींमध्ये विभागलेल्या देशात एकतेची भावना प्रस्थापित केली असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. देशात पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण सर्वत्र स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यात हिंदीने संवादाची भाषा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. देशात ‘स्वराज्य’ प्राप्ती आणि ‘स्वभाषेची’ चळवळ एकाच वेळी सुरु होती. स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यानंतर हिंदीची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेऊन राज्यघटनेच्या निर्मात्यांनी 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारले होते असे शहा म्हणाले.

कोणत्याही देशाची अस्सल आणि सृजनात्मक अभिव्यक्ती खऱ्या अर्थाने त्या देशाच्या भाषेतूनच व्यक्त होऊ शकते असे  ते म्हणाले.  प्रसिद्ध साहित्यिक भारतेंदु हरिश्चंद्र यांनी लिहिले आहे की, ‘निज भाषा उन्नती अहै, सब उन्नति कौ मूल’ म्हणजेच भाषेची उन्नती हीच सर्व प्रकारच्या उन्नतीचे मूळ आहे. आपल्या सर्व भारतीय भाषा आणि बोली हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, आपण तो जपत पुढे न्यायचा आहे.  हिंदीची कोणत्याही भारतीय भाषेशी स्पर्धा कधीच नव्हती आणि असू शकत नाही.  आपल्या सर्व भाषांना सशक्त करूनच एक मजबूत राष्ट्र निर्माण होईल. मला विश्वास आहे की हिंदी हे सर्व स्थानिक भाषांना सक्षम करण्याचे माध्यम बनेल असे शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय भाषांना राष्ट्रीय ते जागतिक मंचावर उचित मान्यता आणि सन्मान मिळाला आहे असे अमित शाह म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांसाठी, प्रशासनासाठी, शिक्षणासाठी आणि वैज्ञानिक वापरासाठी भारतीय भाषा उपयुक्त व्हाव्यात यासाठी गृह मंत्रालयाचा राजभाषा विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आणि जनता यांच्यात भारतीय भाषांमध्ये संवाद प्रस्थापित करून लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत असे ते म्हणाले.

देशात राजभाषेत केलेल्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी संसदीय राजभाषा समितीची स्थापना करण्यात आली होती. देशातील सरकारी कामात हिंदीच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्याची आणि त्याचा अहवाल तयार करुन माननीय राष्ट्रपतींना सादर करण्याची  जबाबदारी या समितीला देण्यात आली होती असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. मला कळवण्यात आनंद होत आहे की या अहवालाचा 12वा खंड राष्ट्रपतींना सादर करण्यात आला आहे.  2014 पर्यंत या अहवालाचे केवळ 9 खंड सादर करण्यात आले होते, परंतु आम्ही गेल्या 4 वर्षांतच 3 खंड सादर केले आहेत.  2019 पासून, सर्व 59 मंत्रालयांमध्ये हिंदी सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत आणि त्यांच्या बैठकाही नियमितपणे आयोजित केल्या जात आहेत.  देशाच्या विविध भागात राजभाषेचा वापर वाढावा या उद्देशाने आतापर्यंत एकूण 528  नगर राजभाषा कार्यान्वयन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  परदेशातही लंडन, सिंगापूर, फिजी, दुबई आणि पोर्ट-लुईस येथे नगर राजभाषा कार्यान्वयन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदी भाषेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठीही भारताने पुढाकार घेतला आहे.

राजभाषा विभागाने ‘अखिल भारतीय राजभाषा संमेलना’ची नवी परंपराही सुरू केल्याचे गृहमंत्री म्हणाले. बनारस येथे 13-14 नोव्हेंबर 2021 रोजी पहिली अखिल भारतीय राजभाषा परिषद आयोजित करण्यात आली होती आणि दुसरी अखिल भारतीय राजभाषा परिषद 14 सप्टेंबर 2022 रोजी सुरत येथे आयोजित करण्यात आली होती. यंदा पुण्यात तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले आहे.  तंत्रज्ञानानुरुप राजभाषा विकसित होण्यासाठी ‘कंठस्थ’ ही स्मृती-आधारित भाषांतर प्रणालीही राजभाषा विभागाने तयार केली आहे. राजभाषा विभागाने आणखी पुढाकार घेत ‘हिंदी शब्द सिंधु’ हा शब्दकोशही तयार केला आहे.  संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट भारतीय भाषांमधील शब्दांचा समावेश करून हा शब्दकोश सतत समृद्ध केला जात आहे. एकूण 90 हजार शब्दांचा ‘ई-महाशब्दकोश’ हे मोबाईल अॅप आणि सुमारे नऊ हजार वाक्यांचा ‘ई-सरल’ शब्दकोशही विभागाने तयार केला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

भाषा बदलाचे तत्व असे सांगते की “भाषा जटिलतेकडून साधेपणाकडे जाते” असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. माझ्या मते, कार्यालयीन कामकाजात हिंदीतील सोपे आणि स्पष्ट शब्द वापरले पाहिजेत. मला विश्वास आहे की राजभाषा विभागाच्या या प्रयत्नांमुळे, सर्व मातृभाषा आत्मसात करून, लोकसंमत असलेली हिंदी भाषा, विज्ञान-संमत आणि तंत्रज्ञान-संमत बनून एक समृद्ध राजभाषा म्हणून प्रस्थापित होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हिंदी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे शहा म्हणाले.

RSS Meeting in Pune | संघाच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा | सुनील आंबेकर

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

RSS Meeting in Pune | संघाच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्दे आणि सामाजिक परिवर्तनासाठीचे प्रयत्न यावर होणार चर्चा | सुनील आंबेकर

 

RSS Meeting in Pune | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक २०२३ पुणे येथे होत असून या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी बुधवारी दिली.

रा. स्व. संघ समन्वय समितीच्या दि. १४, १५, १६ सप्टेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. आंबेकर बोलत होते. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यावेळी उपस्थित होते.

श्री. आंबेकर म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक आपल्या शाखा कार्याच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य अविरत करत असतात. दैनंदिन शाखेच्या कामाबरोबरच समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात संघाचे कार्यकर्ते विविध सामाजिक कामांमध्ये मग्न असतात. ही सर्व कामे समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी सुरू आहेत.

बैठकीत सहभागी होणार्‍या सर्व संघटना संघप्रेरित असून सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात त्या स्वायत्तरितीने कार्य करतात. या संघटनांची बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य व त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. अनेक संघटना विषयानुरूप आणि आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य करतात. उदा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना एकत्र येऊन काम करत आहेत. अशाप्रकारच्या सामूहिक कामावरही बैठकीमध्ये चर्चा होते, अशी माहिती श्री. आंबेकर यांनी दिली.

समाजासमोर जी आव्हाने येतात त्यांचा विचार करून कार्याची दिशा
निश्चित केली जाते आणि हे कार्य राष्ट्रीय भावनेतून केले जाते, ज्यातून कामाचा वेग वाढेल. जवळपास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या साऱ्या संघटना अनेक वर्षांपासून समाजजीवनात सक्रिय असून त्यांनी आपल्या परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव बैठकीत मांडतील. तसेच राष्ट्रीय आणि वर्तमान परिस्थितीच्या संदर्भातील अनुभव देखील सांगितले जातील. त्यासंबंधित अनेक विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन होईल आणि त्या-त्या संघटनांची आपापल्या क्षेत्रातील आगामी कार्याची दिशा काय राहील याचीही योजना बैठकीत मांडली जाईल, असेही श्री. आंबेकर म्हणाले.

पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह श्री. दत्तात्रेयजी होसबाळे, तसेच डॉ. कृष्णगोपालजी, डॉ. मनमोहनजी वैद्य, श्री. अरुण कुमारजी, श्री. मुकुंदाजी आणि श्री. रामदत्तजी चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

श्री. आंबेकर म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारावर आधारित आर्थिक धोरण, त्याचबरोबर जातिभेद संपुष्टात येईल असा समरसतापूर्ण व्यवहार अशा अनेक विषयांवर या तीन दिवसांत विचारविनिमय होणार आहे.
दरवर्षी समन्वय बैठक आयोजित केली जाते. गेल्या वर्षीची बैठक छत्तीसगडमधील रायपूर येथे झाली होती.

Hindi News | RSS | BJP | पुणे में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की समन्वय बैठक | गृह मंत्री, सरसंघचालक, राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित रहेंगे

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे हिंदी खबरे

RSS  | BJP | पुणे में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की समन्वय बैठक | गृह मंत्री, सरसंघचालक, राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित रहेंगे

RSS | BJP | बीजेपी और संघ परिवार (RSS) ने आगामी लोकसभा और विधानसभा चुनाव (General Élections) की तैयारी शुरू कर दी है। इसकी योजना के लिए पुणे को स्थान के रूप में चुना गया है। दिलचस्प बात यह है कि हाल ही में चर्चा शुरू हुई कि नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे से चुनाव लड़ सकते हैं. इसलिए पुणे में आरएसएस की समन्वय बैठक आयोजित की गई है. इसके लिए केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, बीजेपी के राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मौजूद रहेंगे. इसलिए इस बैठक की ओर ध्यान खींचा गया है. (आरएसएस | भाजपा)

| हिंदी भाषा दिवस के लिए गृह मंत्री पुणे के दौरे पर

14 एवं 15 सितम्बर 2023 को केन्द्रीय गृह मंत्री, भारत सरकार की अध्यक्षता में हिन्दी भाषा दिवस 2023 एवं तृतीय अखिल भारतीय राजभाषा परिषद् का संयुक्त आयोजन श्री. शिव छत्रपति स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाड़ी, पुणे (पिंपरी चिंचवड़ पुलिस आयुक्तालय क्षेत्र) में आयोजित किया गया। साथ ही पुणे में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की समन्वय बैठक में 14 से 16 सितंबर के बीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और संघ परिवार के संगठनों की एक महत्वपूर्ण समन्वय बैठक होगी. उस बैठक के केंद्र में गृह मंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, निवर्तमान दत्तात्रेय होसांबले बीजेपी के संगठन सचिव बीएल संतोष बैठक में पूर्णकालिक रूप से शामिल होंगे. बैठक का आयोजन तिलक स्ट्रीट स्थित एसपी कॉलेज मैदान में किया गया है.

देश में इस समय चुनाव की बयार चल रही है। उसको लेकर सत्ता पक्ष और विपक्ष पूरी तैयारी कर रहा है. भारत का नेतृत्व विपक्ष ने किया है. लेकिन सत्यधारी उन्हें हराने की पुरजोर कोशिश कर रहे हैं. इस बीच बीजेपी हाल ही में कसबा विधानसभा उपचुनाव हार गई थी. यह हार बीजेपी पर भारी पड़ी है. इसी के तहत अब बीजेपी ने पुणे पर अच्छा ध्यान दिया है. नरेंद्र मोदी भी पुणे से चुनाव लड़ सकते हैं. इसी पृष्ठभूमि में पुणे में टीम की समन्वय बैठक आयोजित की गई है. इसमें अलग-अलग विषयों पर मंथन किया जा सकता है.

RSS | BJP | Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) in Pune

Categories
Breaking News Political पुणे

RSS | BJP | Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) in Pune

| Home Minister, Sarsangchalak, National President will be present

RSS | BJP | BJP and Sangh Parivar (RSS) have started preparations for the upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections (General Election). Pune has been selected as the location for planning this. Interestingly, the discussion started recently that Narendra Modi can contest elections from Pune. Hence the coordination meeting of rss has been organized in Pune. Union Home Minister Amit Shah, Sarsangchalak Mohan Bhagwat, BJP National President JP Nadda will be present for this. Therefore, attention has been drawn to this meeting. (RSS | BJP)

| Home Minister on visit to Pune for Hindi Language Day

On 14th and 15th September 2023, under the chairmanship of Union Home Minister, Government of India, Hindi Language Day 2023 and Third All India Raj Bhasha Parishad jointly organized by Shri. Organized at Shiv Chhatrapati Sports Complex, Balewadi, Pune (Pimpri Chinchwad Police Commissionerate Area). Also, in the coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh in Pune, an important coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh and Sangh Parivar organizations will be held between 14 and 16 September. Central to that meeting.
Home Minister Amit Shah, Sarsangchalak Mohan Bhagwat, National President JP Nadda, Incumbent Dattatraya
Hosambale BJP’s Organizing Secretary BL Santosh will attend the meeting full time. This meeting. The meeting has been organized at SP College Grounds on Tilak Street.

The winds of election are currently blowing in the country. In that regard, the ruling party and the opposition are preparing thoroughly. India has been led by the opposition. But Satyadhari is trying hard to defeat them. Meanwhile, BJP had recently lost the Kasba Assembly by-election. This defeat has taken a toll on the BJP. Accordingly, now BJP has paid good attention to Pune. Narendra Modi can also contest from Pune. In the same background, a coordination meeting of the team has been organized in Pune. It can be brainstormed on different topics.

RSS | BJP | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये समन्वय बैठक | गृहमंत्री, सरसंघचालक, राष्ट्रीय अध्यक्ष राहणार उपस्थित

Categories
Breaking News Political पुणे

RSS | BJP | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये समन्वय बैठक | गृहमंत्री, सरसंघचालक, राष्ट्रीय अध्यक्ष राहणार उपस्थित

RSS | BJP | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या (General Election) दृष्टिकोनातून भाजप (BJP) आणि संघ परिवाराने (RSS) चांगलीच तयारी सुरु केली आहे. याचे नियोजन करण्यासाठी पुणे हे स्थान निवडण्यात आले आहे. विशेष म्हणजे नुकतीच चर्चा सुरु झाली होती कि नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुण्यातून निवडणूक लढवू शकतात. त्यामुळे rss ची समन्वय बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) , सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat), भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. (RSS | BJP)

| गृहमंत्री हिंदी भाषा दिवस साठी पुणे दौऱ्यावर

१४ व १५ सप्टेंबर २०२३ रोजी केंद्रीय गृह मंत्री, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी भाषा दिवस २०२३ तसेच तिसरी अखिल भारतीय राजभाषा परिषदेचे संयुक्तरित्या आयोजन श्री. शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणे (पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द) येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुण्यामध्ये समन्वय बैठकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील संस्थाची महत्वाची समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. त्या बैठकीस केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, सरकार्यवाहक दत्तात्रय होसमाबाळे भाजपाचे, संघटन सचिव बी एल संतोष हे बैठकीस पुर्णवेळ उपस्थित रहाणार आहे. ही बैठक टिळक रस्त्यावरील एस पी कॉलेज मैदानावर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक कसून तयारी करत आहेत. विरोधकांकडून इंडिया आघाडी करण्यात आली आहे. तर सत्याधारी त्यांना हाणून पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. दरम्यान भाजप नुकतीच कसबा विधानसभेची पोटनिवडणूक हरलं होतं. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यानुसार आता भाजपने पुण्यावर चांगले लक्ष दिले आहे. नरेंद्र मोदी देखील पुण्यातून निवडणूक लढू शकतात. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात संघाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात वेगवेगळ्या विषयावर मंथन केले जाऊ शकते.
News Title | RSS | BJP | Coordination meeting of Rashtriya Swayamsevak Sangh in Pune Home Minister, Sarsangchalak, National President will be present

Amit Shah : Book : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ पुस्तकाचे स्मृती इराणी यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन

पुणे : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तकाचे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते येत्या सोमवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शहर भाजपच्या वतीने प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पुस्तकाचे मूळ लेखक शिवानंद द्विवेदी, मराठी अनुवादक डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर उपस्थित राहणार आहेत.

Pune Shivsena : Amit Shah : शिवसेनेची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ‘ही’ मागणी! 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा

: शिवसेनेची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काशी विश्वेश्वर मंदिरात केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत गौरवोद्गार काढले होते. या कार्यक्रमाला काही दिवस होत नाहीत तोच भाजपशासित कर्नाटक राज्यात शिवरायांची विटंबना होते आणि या घटनेतील गुंडांवर कारवाई करण्याऐवजी मराठी माणसाचाच आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, हे जास्तच संतापजनक आहे. संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाची विटंबना करणाऱ्या गुंडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. त्यामुळे यापुढे शिवरायांचा असा अवमान करण्यास कोणीही धजावणार नाही. अशी मागणी शहर शिवसेनेच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून केली गेली.

याबाबत शहर शिवसेना अध्यक्ष संजय मोरे म्हणाले,  कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची  कानडी गुंडांनी केलेली विटंबना अत्यंत संतापजनक आहे. भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आणि आदर दाखवते, एवढंच काय छत्रपती शिवराय का हाथ भाजप के साथ अशा घोषणाही देते. आणि दुसऱ्या बाजूला भाजपशासित कर्नाटकात वारंवार छत्रपतींचा अवमान होतो, ही गोष्ट आपण व आपल्या पक्षाविषयी संभ्रम निर्माण करणारी आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या याविषयी भावना अतिशय तीव्र आहेत. देशातील कुठलाही शिवरायांवर प्रेम करणारा माणूस छत्रपतींचा अपमान कदापि सहन करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजानी सर्व जाती धर्मांची रक्षा करून तमाम हिंदुस्तानात एक आदर्श निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हिंदूं धर्माची अस्मिता  आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कुशल रणनीतीचे धडे केवळ हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरात दिले जातात. अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले आहेत. मात्र, शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राशेजारील कर्नाटक राज्यात त्यांचा अवमान करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान शिवसेना कदापि खपवून घेणार नाही. गेल्या वर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता पुन्हा त्यांच्या पुतळ्याची कानडी गुंडांनी विटंबना केली. या घटनांमधून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी द्वेष स्पष्ट होत आहे. तसेच कर्नाटकाकडून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अत्याचार सुरूच आहेत.

आज आपण पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमीपूजनासाठी आला आहात. आपल्या हस्ते आज भूमिपूजन झाले आणि कर्नाटक मध्ये आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री घडलेल्या निंदनीय आणि अपमानास्पद घटनेला क्षुल्लक घटना म्हणून संबोधित करतात आणि ह्या घटनेचा निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून जेलमध्ये डांबत आहेत किती हा विरोधाभास ? एक प्रकारे ते ह्या घटनेचे समर्थनच करत आहेत. हे अतिशय अशोभनीय आणि निंदनीय आहे आपल्याच पक्षाच्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असे वक्तव्य होणे हे आपल्या हस्ते होणारे आज चे भूमिपूजन निरर्थकच ठरवत आहे. हे या घटनांवरून दिसून येत आहे. आपण देशाचे गृहमंत्री म्हणून कर्नाटक सरकारने दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्याचे तेथील मुख्यमंत्र्यांना आदेश पारित करावेत. आज जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा  वापर फक्त निवडणुकीत आणि भाषणापूरता करून बाकी काहीही झाले तर दुर्लक्षित करणे योग्य लक्षण नाही ह्याला वेळीच आळा घालणे खूप आवश्यक आहे.

 

Amit shah : Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली : अमित शाह यांचा घणाघात 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली

: अमित शाह यांचा घणाघात

पुणे : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ठरले होते. तरीही, उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. ज्यांच्याशी लढायचे, त्यांच्या मांडीवर जाऊन बसले आणि भाजपशी विश्वासघात केला, असा घणाघात केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केला. हिंमत असल्यास राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुका लढा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

पुण्यात आज गृहमंत्री अमित शाह दौऱ्यावर असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संवाद मेळाव्यात भाषण करताना अमित शाह  यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ”महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन दोन दोन हात करा आम्ही घाबरत नाही. भाजप एकटे लढा देईल असे आव्हान देत हिम्मत असेल तर महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा असे ते यावेळी म्हणाले आहेत.”

विजयाची मुहूर्तमेढ पुण्यातूनच व्हावी

महाआघाडी सरकारच्या अध:पतनाची सुरुवात आता व्हायला हवी. महासंपर्क अभियानातूनच आपण निवडणुका जिंकू आणि त्याची सुरुवात पुण्यापासून व्हायला हवी. तुमच्या नेतृत्वाने तुमची मान खाली जाईल, असे कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे आत्मविश्वासाने, निधड्या छातीने, निर्भयतेने आणि विवेकाने मतदारांसमोर जा. लक्ष्य उंच ठेवा, जनता खूप द्यायला तयार आहे, मागताना संकोच करू नका’, असा कानमंत्रही त्यांनी दिला.

कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो

अमित शहा यांनी ‘भारत माता की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी अमित शहा यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ‘माझ्या कारकिदीर्ची सुरुवात बूथ अध्यक्ष म्हणून झाली. बुथचा अध्यक्ष हा राष्ट्रीय अध्यक्ष होतो, हे केवळ भाजपमध्येच घडू शकते. पक्षात जो मागत नाही, त्याला न मागताच सगळे काही मिळते. हा नेत्यांचा नव्हे, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तेच पक्षाचे भविष्य आहे. कार्यकर्ता हा जनता आणि नेता यामधील दुवा असतो.’

Amit Shah : Pune : अमित शाह यांचा कॉंग्रेस वर निशाणा ; म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची काँग्रेसने एकही संधी सोडली नाही

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची काँग्रेसने एकही संधी सोडली नाही

: अमित शाह यांचा कॉंग्रेस वर निशाणा

पुणे : पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि इमारतीसमोरील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याचे भूमिपूजन गृहमंत्री शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी पुणे महापालिकेत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नसल्याची टीका अमित शाह यांनी काँग्रेसवर केली आहे.

शाह म्हणाले,  भारतरत्न पुरस्कार त्यांना कॉग्रेस सरकार नसताना आणि भाजपच्या काळात मिळाला. संविधान दिवस जेव्हा केला त्यावेळीही काँग्रेसने  विरोध केला आहे. पण मोदी संविधानाला ग्रंथ मानून सरकार चालवत आहेत. पुण्याच्या विकासाची अनेक कामे मोदी सरकारने केली. विमानतळ वाढवणे, मेट्रो ज्याचे तीन मार्ग केले, लवकरचं पुण्याला मेट्रो प्रवास सुरू होईल, बस दिल्या, मुळा मुठा नदी सर्वधन साठी निधी दिला, स्टार्टअपला प्रोत्साहन दिलं, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे आम्ही कुठही कमी पडणार नाही असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील

ज्यावेळेस स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारणे अवघड होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. न्याय, समाजकल्याण,  आत्मरक्षा, आणि पहिले नौदल उभारण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. स्वराज्य कार्य शिवाजीमहाराजांच्या नंतरही त्यांच्या प्रेरणेने सुरु राहिले. पुणे महापालिकेतील छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

 दगडुशेठ गणपती कडे केली प्रार्थना  

पुण्यातील प्रसिद्ध गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले आहे. शहा यांनी आज पुणे येथे आज श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली. ”महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो… असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.”