Unorganized Workers |Sunil Shinde | असंघटीत कामगारांच्या मागे कॉंग्रेस पक्ष ठामपणे उभा |  सुनील शिंदे

Categories
Breaking News Political social पुणे

Unorganized Workers |Sunil Shinde | असंघटीत कामगारांच्या मागे कॉंग्रेस पक्ष ठामपणे उभा |  सुनील शिंदे

 

Unorganized Workers – (The Karbhari News Service) – बीजेपीने जाहीर केलेला कामगारांसाठीचा जाहीरनामा हा पूर्ण फसवा आहे. असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा जो आहे त्यामध्ये वाढ करू असे भाजपने म्हटले आहे. वास्तविक पाहता असंघटीत कामगारांचा कुठेही किमान वेतन कायद्यात अंतर्भाव केलेला नाही. ते कामगार कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत आणि त्याबरोबरच कामगारांचे जे तंत्राटीकरण, खाजगीकरण झाले आहे त्यामध्ये कुठेही वेतनवाढीचा ठोस प्रस्ताव भाजपने दिलेला नाही. असंघटीत कामगारांसाठी कोणताही कायदा करण्याचे आश्वासन भाजपने दिलेले नाही. त्यामुळे, बीजेपीचे सरकार पूर्णपणे कामगारद्रोही असल्याचे आणि त्यांच्या जाहीरनाम्यातूनही कामगारविरोध असल्याचे स्पष्ट होते. अशी खरमरीत टीका असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केली. (Pune Congress) 

 

आज कॉंग्रेस भवन येथे पुणे शहरातील असंघटीत कामगारांचा मेळावा घेण्यात आला त्यात ते बोलत होते.  या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते सुनील शिंदे हे होते. त्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार नेते व कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये घरेलू कामगार त्याबरोबरच ओला, उबेर, स्वीग्गी, झोमॅटो या गिगवर्कर तसेच बांधकाम मजूर, रिक्षाचालक उपस्थित होते. यासार्वांसाठी न्याययोजनेद्वारे केंद्रीय कॉंग्रेसचे नेते आणि अध्यक्ष खर्गे साहेबांनी कॉंग्रेसचा जो जाहीरनामा सादर केला आहे त्यामध्ये सामाजिक सुरक्षितता कायदा देण्याचे आश्वासन केले. त्याचा अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच घरेलू कामगारांचे मंडळ जे युती सरकारने बंद केले आणि जे कॉंग्रेस सरकारने चालू केले होते ते मंडळ चालू करण्याचा पुढाकार घेण्याचे आश्वासन कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज दिले. त्याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

जे कामगार असंघटीत क्षेत्रात येतात त्यांना कोणताच कामगार कायदा लागू होत नाही. आणि अशा कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना आणि त्यांना कामगारांच्या कायद्याच्या कक्षेत आणण्याचे काम हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात केले आहे, असे सुनील शिंदे यांनी सांगितले.  किंबहुना त्यांच्यासाठी ठोस कायदा करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. त्याच्या अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये १०० हून अधिक कोपरासभा घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्या मेळाव्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील घरेलू कामगार, बांधकाम कामगार, हॉस्पिटल मधील कामगार, कारखान्यांमधील कामगार, अशा सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रत्येक बैठकीला शेकडो उपस्थित राहतील. आणि त्यामध्ये कॉंग्रेसचा जाहीरनामा त्याबरोबरच प्रचाराचे साहित्य वाटप करण्याचे काम देखील असंघटीत कामगार कॉंग्रेसमार्फत केले जाईल. असे सुनील शिंदे यांनी सांगितले. 

 

यावेळी पुणे शहर असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष एस.के.पडसे, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे ऑर्गनायझरयासीन शेख, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे सरचिटणीस राहुल गोंजारी, पुणे शहरातील कामगार नेते आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण तसेच आबा जगताप, डोंगरे, महापालिकेतील तंत्राटी कामगारांचे विविध भागातील नेते हे सर्व उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Pune agitation | वीज दरवाढ विरोधात महाविकास आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Pune agitation | वीज दरवाढ विरोधात महाविकास आघाडीचे तीव्र निषेध आंदोलन

| दरवाढ मागे न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा खा.सुप्रिया सुळेंचा इशारा

 

Mahavikas Aghadi Pune agitation – (The Karbhari News Service) – सरकारने केलेल्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टी, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी यांच्या वतीने पॉवर हाऊस चौक, रास्ता पेठ येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

याबाबत महाविकास आघाडीच्या वतीने सांगण्यात आले कि, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस – पवार – शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस – पवार – शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५% वाढ केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री.शेखर धावडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष श्री. धनंजय बेनकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड, मुकुंद किर्दत, अशोक हरणावळ, विशाल धनावड़े, कणव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार व्यक्त केला. “तिघाडी सरकारची मजा जनतेला दरवाढीची सजा, तिघाडी सरकारचा धिक्कार असो, महागाई जोमात जनता कोमात, जनतेच्या खिशाला कात्री हीच मोदींची गॅरंटी” अशा घोषणांनी संपूर्ण रास्ता पेठ परिसर दुमदुमला होता.

——

 देशातील जनता अभूतपूर्व अशा महागाईचा सामना करत आहे. देशातील गरीब, मध्यमवर्गीय वर्गाचं जीवन कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील जनतेला महागाईतून दिलासा देणं राज्य सरकारचं प्रथम कर्तव्य आहे. परंतू जनता खड्ड्यात गेली तरी चालेल, परंतू वीज उत्पादन करणाऱ्या अडाणी, अंबानी यांचे खिसे भरले पाहिजेत हेच फडणवीस – शिंदे – पवार सरकारचं धोरण आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जनता या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल.

प्रशांत सुदामराव जगताप

Aba Bagul Pune Loksabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आबा बागुल यांचं नाव जवळपास निश्चित!

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul Pune Loksabha | पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आबा बागुल यांचं नाव जवळपास निश्चित!

| लोकसभेसाठी नवीन चेहरा शिवाय ओबीसी कार्ड चा देखील होणार विचार

Aba Bagul Pune Loksabha – (The Karbhari News Service)  पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Election) भाजप अर्थात महायुती कडून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेस अर्थात महाविकास आघाडी कडून ज्येष्ठ नेते आबा बागुल (Aba Bagul Congress) यांचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या एक नेता एक पद या सूत्रानुसार आणि महायुतीच्या मराठा उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडी कडून ओबीसी उमेदवाराचा विचार करता बागूल हेच यासाठी पात्र ठरत आहेत. येत्या 18 मार्च ला हे नाव अंतिम केले जाईल. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Pune Loksabha Constituency)
पुणे लोकसभा निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत. कारण भाजप कडून आपले पत्ते ओपन करण्यात आले असून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून योगेश मुळीक, सुनील देवधर यांची देखील नावे शर्यतीत होती. मात्र मोहोळ यांची लोकप्रियता आणि मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने ब्राम्हण उमेदवार राज्यसभेसाठी देण्यात आला असल्याने, मराठा उमेदवार म्हणून मोहोळ यांचे नाव अंतिम करण्यात आले आहे. आपला उमेदवार जाहीर करण्यात महाविकास आघाडी सावध पाऊल टाकत आहे. परंपरे प्रमाणे आघाडी कडून ही जागा काँग्रेस ला सोडण्यात येईल. त्यानुसार काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही जातीची समीकरणे निश्चित करूनच उमेदवार अंतिम करणार आहे.
लोकसभेसाठी काँग्रेस कडून शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते आबा बागुल आणि आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे चर्चेत आहेत. दिल्लीत या तीन नावावर चर्चा सुरु आहे. यातील अरविंद शिंदे हे मराठा उमेदवार आहेत. जातीची समीकरणे जोडायची झाली तर शिंदे यांचे नाव मागे पडून ओबीसी चेहरा पुढे केला जाऊ शकतो, असे मानण्यात येत आहे. तसेच त्यांच्याकडे सद्यस्थितीत पद देखील आहे. ओबीसी चेहरा असलेले बागुल आणि धंगेकर हे उरतात. काँग्रेसच्या एक नेता एक पद या नियमानुसार धंगेकर यांना आमदारकी देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन आणि ओबीसी चेहरा म्हणून बागूल हेच पात्र ठरतात, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले आहे.
शिवाय आमदार धंगेकर यांना उमेदवारी मिळाली भाजप आपली दुप्पट ताकद लावणार आहे. त्याला कारण म्हणजे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात धंगेकर यांनी बाजी मारली होती. तो पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. धंगेकर उमेदवार असतील तर भाजप त्याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे काँग्रेस सावध पाऊले टाकत आहे.
बागूल हे पहिल्यापासूनच सॉफ्ट आणि काँग्रेसचा सभ्य चेहरा म्हणून ओळखले जातात. शिवाय महाविकास आघाडीतील नेते देखील त्यांचेच नाव लावून धरत आहेत. बागूल यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांनाच उमेदवारी दिली तर काँग्रेस ला पुणे लोकसभेची जागा हमखास मिळू शकेल, असे काँग्रेस वरिष्ठाना देखील वाटते. त्यामुळे येत्या काही दिवसांत बागूल यांचे नाव जाहीर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ |शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

MVA | Shetkari Akrosh Morcha | महाविकास आघाडीच्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ला उद्यापासून प्रारंभ

|शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा

 

MVA | Shetkari Akrosh Morcha | पुणे : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने काढण्यात येणाऱ्या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ची (Shetkari Akrosh Morcha)  तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होणार आहे. (Maharashtra News)

संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे आणि संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठविल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. कोल्हे यांनी ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवणे आणि निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित ‘शैक्षणिक कर्ज ‘ धोरण लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेससह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी हा एल्गार पुकारला असून २७ ते ३० डिसेंबर दरम्यान भव्य ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती खासदार सुळे आणि अमोल कोल्हे यांनी दिली.

उद्या ( दि. २७) सकाळी ८ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून ओतूर येथे पदयात्रा व कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आळेफाटा येथे कोपरा सभा व नारायणगाव येथे एस.टी. स्टँडजवळ पदयात्रा होणार असून ठिकठिकाणी शेतकऱ्यांकडून या आक्रोश मोर्चाचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी ३ वाजता कळंब येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर कोपरा सभा आणि मंचर बाजार समिती येथून पदयात्रेने लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठी सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता राजगुरुनगर बाजार समिती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाजवळ सभा आणि त्यानंतर राजगुरुनगर एस.टी. स्टँड येथील हुतात्मा राजगुरू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पाबळ चौकातून वाहनांद्वारे हा मोर्चा चाकणकडे रवाना होईल. चाकण बाजार समिती प्रवेशद्वारापासून रात्री ८ वाजता काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचा समारोप बाजारपेठेतून एस.टी.स्टँड, तळेगाव चौक येथे होईल. त्यानंतर चौफुला, करंदी मार्गे केंदूर येथे मोर्चाचा पहिला मुक्काम होईल, असे त्यांनी सांगितले.

गुरुवारी (दि. २८) सकाळी केंदूर येथील श्रीराम चौकात सभा आयोजित करण्यात आली असून पाबळ येथील लोणी चौकात कोपरा सभा होईल. त्यानंतर धामारी, मुखी, जातेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वागत केल्यानंतर दुपारी दीड वाजता शिक्रापूर येथे पाबळ चौक ते चाकण चौक अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता तळेगाव ढमढेरे येथील सावता माळी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर टाकळीभीमा, पारोडी, दहीवडी, उरळगाव मार्गे न्हावरा येथे हा मोर्चा येईल. न्हावरा येथे तळेगाव फाटा ते निर्विदरम्यान पदयात्रा आणि पुढे निर्वि, कोळगाव डोळस, कुरुळी, वडगाव रासाई मार्गे मांडवगण फराटा येथे आल्यानंतर या ठिकाणी सभा होईल आणि पुढे तांदळी, काष्टी मार्गे दौंड येथे मुक्काम, असे नियोजन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी (दि. २९) सकाळी नऊ वाजता दौंड येथील महात्मा फुले पुतळा ते आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर मोर्चा कुरकुंभ, मळद, रावणगाव मार्गे खडकी येथे येईल. याठिकाणी बारामती चौकातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत होईल. त्यानंतर भिगवण आणि पळसदेव येथे कोपरा सभा करुन दुपारी अडीच वाजता मोर्चा इंदापूर येथे येईल. इंदापूर येथे पदयात्रा झाल्यानंतर निमगाव केतकी येथे कोपरा सभा, आणि तेथून मसाळवाडी, काटेवाडी, लिमटेक, पिंपळी, बांदलवाडी मार्गे मोर्चा बारामती येथे आल्यानंतर नगरपालिकेसमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बारामती येथे मुक्काम होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

शनिवारी (दि. ३०) बारामती येथून मेडद, कऱ्हावागज, जळगाव, माळवाडी, तारडोळी मार्गे मोरगाव येथे मोर्चा आल्यावर मयुरेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरासमोर कोपरा सभा होईल. त्यानंतर आंबी बु. मार्गे जेजुरी येथे कोपरा सभा होऊन मोर्चा शिंदवणे मार्गे हवेली तालुक्यात प्रवेश करेल. शिंदवणे येथे स्वागत स्वीकारुन उरळीकांचनला रवाना होईल. या ठिकाणी जुन्या इलाईट हॉटेलसमोर कोपरा सभा होणार असून सोरतापवाडी फाटा, कुंजीरवाडी फाटा, थेऊर फाटा मार्गे लोणी काळभोर येथे आल्यावर रेल्वे स्टेशनजवळ कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोणी काळभोर येथून कवडीपाट टोलनाका मार्गे मांजरी फार्म, शेवाळवाडी फाटा, १५ नंबर, हडपसर गाडीतळ मार्गे पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर सभा होणार असून खासदार शरद पवार, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या न्याय्य मागण्यांसाठी काढण्यात येत असलेल्या या ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी केले असून पुण्यातील सभेला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Mahavikas Aghadi | Maratha Samaj | मराठा समाजाच्या समर्थनार्थ महविकास आघाडीचे धरणे आंदोलन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Mahavikas Aghadi | Maratha Samaj | मराठा समाजाच्या समर्थनार्थ महविकास आघाडीचे  धरणे आंदोलन

Mahavikas Aghadi | Maratha Samaj | अंतरावली सराटी, जालना (Jalana) या ठिकाणी मराठा समाजाच्या शांतीपूर्वक चाललेल्या आंदोलनावर राज्य सरकारकडून अमानुषपणे लाठीचार्ज (Lathichge) करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये अनेक निरागस नागरिक जखमी झाले असून हा फक्त आंदोलनकर्त्यांवर नाही तर प्रत्यक्ष लोकशाहीवर झालेला हल्ला होता. याच अनुषंगाने या घटनेचा निषेध करण्यासाठी आज कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजाच्या पाठीशी महाविकास आघाडी ठामपणे उभी असून भविष्यात असा कोणताही लोकशाहीवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम सरकारला देण्यात आला. (Mahavikas Aghadi | Maratha Samaj)
महाविकास आघाडीच्या निवेदनानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून लाखोंच्या संख्येने निघणारे मराठा मोर्चे जगाला आदर्श घालून देणारे आणि नवा आदर्श स्थापित करणारे आहेत. जालना जिल्ह्यातील आंदोलनही शांतीपूर्वक आणि लोकशाहीचा आदर राखत सुरू असताना झालेला हल्ला जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला काळिमा फासणारा होता.
सरकारचे लोकशाहीविरोशी धोरण आणि आबालवृद्धांवर करण्यात आलेला हा हल्ला स्वातंत्र्यपूर्व काळातील जालियनवाला बाग हल्ल्याची आठवण करून देणारा होता, ज्याला विरोध करणे हे जागरूक नागरिक या नात्याने आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.
या वेळी ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे,अरविंद शिंदे, चंद्रकांत मोकाटे, अभय छाजेड, गजानन थरकुडे, पृथ्वीराज सुतार ,स्वप्नील दुधाने, गिरीश गुरनानी, योगेश मोकाटे ,राम थरकुडे, संगीता ताई तिवारी, मृनाली वाणी, आदी महाविकास आघाडी पदाधिकारी नेते उपस्थित होते.

NCP president Sharad Pawar | महाराष्ट्र की राजनीति में इतने अहम क्यों हैं शरद पवार?

Categories
Breaking News Political social देश/विदेश पुणे महाराष्ट्र हिंदी खबरे

NCP president Sharad Pawar | महाराष्ट्र की राजनीति में इतने अहम क्यों हैं शरद पवार?

| शरद पवार कितनी बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं?  (How many times Sharad pawar was CM of Maharashtra?)

 NCP president Sharad Pawar | शरद पवार एक प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (NCP) के संस्थापक हैं।  वह पांच दशकों से अधिक समय तक भारतीय राजनीति में एक प्रमुख व्यक्ति रहे हैं और भारत सरकार में कई महत्वपूर्ण पदों पर रहे हैं, जिसमें महाराष्ट्र के मुख्यमंत्री के रूप में चार कार्यकाल शामिल हैं। NCP president Sharad Pawar
 शरद पवार का जन्म कब हुआ था?  (How old is Sharad pawar?)
  12 दिसंबर 1940 को महाराष्ट्र के एक छोटे से शहर बारामती में जन्मे, पवार ने 1960 के दशक के अंत में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सदस्य के रूप में अपना राजनीतिक जीवन शुरू किया।  वह पहली बार 1967 में महाराष्ट्र विधान सभा के लिए चुने गए और कांग्रेस पार्टी में विभिन्न पदों पर रहे।
  शरद पवार ने एनसीपी क्यों स्थापित की?  (Why Sharad pawar formed NCP?)
  1999 में, शरद पवार ने भारतीय राष्ट्रीय कांग्रेस से नाता तोड़ लिया और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन किया।  एनसीपी एक क्षेत्रीय राजनीतिक दल है जो मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में काम करता है, लेकिन इसने भारत के अन्य राज्यों में भी अपनी पैठ बना ली है।
 शरद पवार जिन्होंने किस क्षेत्र में काम किया?
  शरद पवार महाराष्ट्र के विकास में एक महत्वपूर्ण व्यक्ति हैं, खासकर कृषि और उद्योग में।  उन्होंने 2005 से 2008 तक भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) के अध्यक्ष के रूप में भारत में क्रिकेट के विकास में भी महत्वपूर्ण भूमिका निभाई।
  वर्षों से, पवार कई प्रमुख राजनीतिक गठबंधनों का हिस्सा रहे हैं और उन्होंने भारत के राजनीतिक परिदृश्य को आकार देने में महत्वपूर्ण भूमिका निभाई है।  उन्होंने भारत सरकार में रक्षा मंत्री, कृषि मंत्री और उपभोक्ता मामले, खाद्य और सार्वजनिक वितरण मंत्री के रूप में कार्य किया है।  उन्होंने अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद (आईसीसी) के अध्यक्ष के रूप में भी काम किया है।
 महाविकास अघाड़ी में शरद पवार का क्या योगदान है?
  शरद पवार को भारतीय राजनीति की गहरी समझ के साथ एक चतुर और चतुर राजनेता के रूप में जाना जाता है।  उन्हें अक्सर सर्वसम्मति निर्माता के रूप में वर्णित किया गया है और सफल गठबंधन बनाने के लिए विभिन्न राजनीतिक दलों और नेताओं को एक साथ लाने में सक्षम हैं।
  हाल के वर्षों में, पवार भारत की सत्तारूढ़ भारतीय जनता पार्टी (भाजपा) के खिलाफ एकजुट विपक्ष बनाने के प्रयासों में सक्रिय रूप से शामिल रहे हैं।  वह विभिन्न विपक्षी दलों को एक साथ लाने और भाजपा के खिलाफ एक संयुक्त मोर्चा बनाने के उद्देश्य से कई बैठकों और चर्चाओं में सबसे आगे रहे हैं।
  शरद पवार भारत में एक राजनीतिक दिग्गज नेता हैं और उनका प्रभाव महाराष्ट्र से बाहर तक फैला हुआ है।  उनके राजनीतिक कौशल और भारत के विकास के प्रति प्रतिबद्धता के लिए उनका व्यापक रूप से सम्मान किया जाता है।  अपने अस्सी के दशक में होने के बावजूद, पवार भारतीय राजनीति में एक सक्रिय और प्रभावशाली व्यक्ति बने हुए हैं और भारतीय राजनीति में उनके योगदान को हमेशा याद किया जाएगा।
 —-
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन कब हुआ था?  (When was national congress party formed?)
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) भारत में एक क्षेत्रीय राजनीतिक दल है, जो मुख्य रूप से महाराष्ट्र राज्य में काम कर रही है।  पार्टी की स्थापना 1999 में प्रमुख भारतीय राजनीतिज्ञ और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री शरद पवार ने की थी।  (शरद पवार)
 |  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन कैसे हुआ?  (How was NCP formed?)
  राकांपा का गठन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस में विभाजन का परिणाम था, वह राजनीतिक दल जिसका पवार कई वर्षों से हिस्सा थे।  1990 के दशक के अंत में, सोनिया गांधी की नेतृत्व शैली से महाराष्ट्र के कुछ कांग्रेस नेताओं में असंतोष बढ़ रहा था, जिन्होंने अपने पति राजीव गांधी की हत्या के बाद पार्टी अध्यक्ष का पद ग्रहण किया था।
 शरद पवार ने कांग्रेस पार्टी क्यों छोड़ी?
  पवार सहित कुछ कांग्रेस नेताओं ने पार्टी के भीतर सत्ता के केंद्रीकरण पर नाराजगी जताई और महसूस किया कि क्षेत्रीय नेताओं के विचारों को नजरअंदाज किया जा रहा है।  युवा नेताओं को मौके नहीं मिलने से पार्टी के भीतर भी असंतोष का माहौल था।
 एनसीपी की स्थापना किसने की?  (Who formed ncp in 1999?)
  1999 में, पवार और तारिक अनवर और पी.  एक।  संगमा ने कई अन्य कांग्रेस नेताओं के साथ कांग्रेस से अलग होने और महाराष्ट्र के लोगों की जरूरतों के प्रति अधिक संवेदनशील एक नई राजनीतिक पार्टी बनाने का फैसला किया।
  एनसीपी को आधिकारिक तौर पर 25 मई 1999 को लॉन्च किया गया था, जिसके संस्थापक और अध्यक्ष पवार थे।  पार्टी के संस्थापक सदस्यों में महाराष्ट्र के अन्य प्रमुख राजनेताओं में छगन भुजबल, प्रफुल्ल पटेल और अजीत पवार शामिल थे।
  एनसीपी का गठन महत्वपूर्ण था क्योंकि यह पहली बार था जब भारत में मौजूदा राजनीतिक ढांचे के बाहर एक प्रमुख राजनीतिक दल का गठन किया गया था।  पार्टी किसी भी प्रमुख राष्ट्रीय राजनीतिक दल जैसे कांग्रेस, भारतीय जनता पार्टी (बीजेपी) या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआई) से संबद्ध नहीं थी।
 राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अवधारणाएं और नीतियां क्या हैं?  (What is the concept of ncp and ideology of ncp?)
  शुरुआती दिनों में, एनसीपी ने एक मजबूत संगठनात्मक संरचना बनाने और महाराष्ट्र में अपना राजनीतिक आधार विकसित करने पर ध्यान केंद्रित किया।  पार्टी ने अपने राजनीतिक प्रभाव को बढ़ाने के लिए अन्य क्षेत्रीय दलों के साथ गठबंधन बनाने का काम किया।
—–

Ravindra Dhangekar | रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

रविंद्र धंगेकर यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स झळकले आणि तात्काळ काढले देखील

पुणे | कसबा पेठ पोटनिवडणूक ही राज्य नाही तर देशभर गाजत होती. भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेस चे रवींद्र धंगेकर यांच्यात चांगलीच टक्कर बघायला मिळाली. मतदान झाल्यानंतर दरम्यान दोन्हीकडील कार्यकर्ते सांगत आहेत कि आम्हीच निवडून येणार. रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांचे आमदार पदी निवड झाल्याचे फ्लेक्स देखील लावले. मात्र ते काही वेळातच हटवावे लागले.

मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले होते. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी होणार आहे. पण दोन दिवस अगोदरच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची आमदारपदी (MLA) निवड झाल्याचे फ्लेक्स पुण्यात लावण्यात आले आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स असावा तर धंगेकर यांच्यासारखा… दोन दिवस आधीच विजयाचा फलक लावल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, सिंहगड रस्त्यावरीस वडगाव बु. येथील फलक लावल्यानंतर आवघ्या दोन तासातच ते काढण्यात आले.

Clashes | अजित पवारांच्या रोड शो वेळी महाविकास आघाडी- शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अजित पवारांच्या रोड शो वेळी महाविकास आघाडी- शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी आणि शिंदे भाजप गटाचे क२र्यकर्ते एकमेकांना भिडले. अजित पवार (Ajit pawar) यांच्या उपस्थितीत फडके हौद चौकातील गुजराती शाळेसमोर ‘रोड शो’ आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांनी समयसूचकता दाखवित रोड शो ला मार्ग करून दिला.

कसबा विधानसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थतीत भाजप उमेदवार हेंमत रासने यांच्या प्रचारासाठी विविध समाज घटकांचा मेळावा सुरू आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार आणि अन्य नेत्यांच्या उपस्थित रोड शो सुरू आहे. शिंदे यांचा मेळावा सुरू असतानाच महाविकास आघाडीचा रोड शो फडके हौद चौकात आला. त्यानंतर  दोन्ही बाजूनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीतील बंड शमले | बाळासाहेब दाभेकर यांची माघार

Categories
Breaking News Political पुणे

महाविकास आघाडीतील बंड शमले | बाळासाहेब दाभेकर यांची माघार

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होत काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. पण आज दाभेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीतील एकी दिसून आली आहे.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण धंगेकरांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्येच बंडखोरी उफाळून आली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्जही दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीचसमोर दाभेकरांची बंडखोरी आघाडीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती.

याचमुळे काँगेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दाभेकरांची मनधरणी सुरु होती. अखेर महाविकास आघाडीच्या शिष्टाईला मोठं यश आलं असून बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

Affidavit | Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती

Categories
Breaking News Political पुणे

रवींद्र धंगेकर १० कोटींचे मालक | शपथ पत्रात नमूद केली माहिती

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Byelection) महा विकास आघाडीकडून काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रामध्ये आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या नावाने स्थावर जंगम मालमत्ता ४ कोटी ३५ लाख ३६ हजार ८९२ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम ३ लाख ५० हजार रुपये इतकी आणि १५ तोळे सोने आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्ब्ल १० कोटी २४ लाख ३३ हजार ९९९ इतकी आहे. तसेच त्यांच्या नावावर गुन्हेगारी, फौजदारी स्वरूपाचा एकही गुन्हा दाखल नाही, अशी माहिती त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

 

रवींद्र धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. ते स्वतः सोने-चांदीचे कारागिरीचा व्यवसाय करत आहेत. तर त्यांच्या पत्नी या शेती तसेच बांधकाम व्यवसाय करत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची विशेष करून दौंड तालुक्यातील पिंपळगाव आणि हवेली तालुक्यातील नांदोशी येथे जवळपास दहा एकर शेतजमीन तर पुणे शहरातील कोथरूड येथे पाच गुंठे जागा आहे. रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर अशी दोघांच्या नावे १० एकरहून अधिक जमीन आहे. त्याचबरोबर पुणे शहरातील मंगळवार पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे प्रत्येकी एक फ्लॅट देखील आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपले वार्षिक उत्पन्न ३ लाख ३६ हजार ९४० रुपये रुपये तर पत्नी प्रतिभा ३ लाख ९८ हजार ४०० रुपये इतके दाखवले आहे. तसेच रवींद्र धंगेकर यांच्याकडे एक होंडा ऍक्टिव्हा, एक रॉयल एनफिल्ड अशी एक दुचाकी वाहन आहे.