Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election 2024 | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

 

Pune Loksabha Election 2024 – (The karbhari News Service) –  जिल्ह्यातील ३४- पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

निवडणूक निरीक्षक म्हणून प्रसाद लोलयेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-१०६ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९३०९३५४९२४ आणि इमेल आयडी loksabhaelectionpune@gmail.com असा आहे.

निवडणूक निरीक्षक, पुणे लोकसभा मतदारसंघ यांना व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथे मंगळवार व गुरुवार रोजी १०.३० वाजेपासून सायं १२.३० वाजेपर्यंत भेटता येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही पुणे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

Unorganized Workers |Sunil Shinde | असंघटीत कामगारांच्या मागे कॉंग्रेस पक्ष ठामपणे उभा |  सुनील शिंदे

Categories
Breaking News Political social पुणे

Unorganized Workers |Sunil Shinde | असंघटीत कामगारांच्या मागे कॉंग्रेस पक्ष ठामपणे उभा |  सुनील शिंदे

 

Unorganized Workers – (The Karbhari News Service) – बीजेपीने जाहीर केलेला कामगारांसाठीचा जाहीरनामा हा पूर्ण फसवा आहे. असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा जो आहे त्यामध्ये वाढ करू असे भाजपने म्हटले आहे. वास्तविक पाहता असंघटीत कामगारांचा कुठेही किमान वेतन कायद्यात अंतर्भाव केलेला नाही. ते कामगार कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत आणि त्याबरोबरच कामगारांचे जे तंत्राटीकरण, खाजगीकरण झाले आहे त्यामध्ये कुठेही वेतनवाढीचा ठोस प्रस्ताव भाजपने दिलेला नाही. असंघटीत कामगारांसाठी कोणताही कायदा करण्याचे आश्वासन भाजपने दिलेले नाही. त्यामुळे, बीजेपीचे सरकार पूर्णपणे कामगारद्रोही असल्याचे आणि त्यांच्या जाहीरनाम्यातूनही कामगारविरोध असल्याचे स्पष्ट होते. अशी खरमरीत टीका असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी केली. (Pune Congress) 

 

आज कॉंग्रेस भवन येथे पुणे शहरातील असंघटीत कामगारांचा मेळावा घेण्यात आला त्यात ते बोलत होते.  या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते सुनील शिंदे हे होते. त्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार नेते व कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये घरेलू कामगार त्याबरोबरच ओला, उबेर, स्वीग्गी, झोमॅटो या गिगवर्कर तसेच बांधकाम मजूर, रिक्षाचालक उपस्थित होते. यासार्वांसाठी न्याययोजनेद्वारे केंद्रीय कॉंग्रेसचे नेते आणि अध्यक्ष खर्गे साहेबांनी कॉंग्रेसचा जो जाहीरनामा सादर केला आहे त्यामध्ये सामाजिक सुरक्षितता कायदा देण्याचे आश्वासन केले. त्याचा अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला. तसेच घरेलू कामगारांचे मंडळ जे युती सरकारने बंद केले आणि जे कॉंग्रेस सरकारने चालू केले होते ते मंडळ चालू करण्याचा पुढाकार घेण्याचे आश्वासन कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज दिले. त्याच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

जे कामगार असंघटीत क्षेत्रात येतात त्यांना कोणताच कामगार कायदा लागू होत नाही. आणि अशा कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना आणि त्यांना कामगारांच्या कायद्याच्या कक्षेत आणण्याचे काम हे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात केले आहे, असे सुनील शिंदे यांनी सांगितले.  किंबहुना त्यांच्यासाठी ठोस कायदा करण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. त्याच्या अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला. या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये १०० हून अधिक कोपरासभा घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्या मेळाव्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील घरेलू कामगार, बांधकाम कामगार, हॉस्पिटल मधील कामगार, कारखान्यांमधील कामगार, अशा सर्वांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या प्रत्येक बैठकीला शेकडो उपस्थित राहतील. आणि त्यामध्ये कॉंग्रेसचा जाहीरनामा त्याबरोबरच प्रचाराचे साहित्य वाटप करण्याचे काम देखील असंघटीत कामगार कॉंग्रेसमार्फत केले जाईल. असे सुनील शिंदे यांनी सांगितले. 

 

यावेळी पुणे शहर असंघटीत कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष एस.के.पडसे, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे ऑर्गनायझरयासीन शेख, असंघटीत कामगार कॉंग्रेस राज्याचे सरचिटणीस राहुल गोंजारी, पुणे शहरातील कामगार नेते आणि राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण तसेच आबा जगताप, डोंगरे, महापालिकेतील तंत्राटी कामगारांचे विविध भागातील नेते हे सर्व उपस्थित होते.

12 types of identity proofs will be accepted for voting

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

12 types of identity proofs will be accepted for voting

 

The Karbhari News Service – The Lok Sabha general election in the state will be held in five phases and voting will be held on April 19, 26, May 7, May 13 and May 20. The Election Commission of India accepts 12 forms of identity proof other than voter photo ID for voting. The Office of the Chief Electoral Officer has informed that the concerned will be able to vote after showing any one of these proofs.

As per the order of Election Commission of India for Lok Sabha General Election, the voters who have voter ID card with photo will present voter ID card with photo for identification at the polling station. Voters who will not be able to present voter ID card with photograph, any proof other than voter ID card will be accepted for identification of voters.

Apart from the election ID card given to the voters at the time of voting, these proofs include passport, driving license, photo ID card issued by central or state government, as well as public sector undertakings, public limited companies to their employees, passbook issued by bank or postal department with photo. , PAN Card, Smart Card issued by Registrar General of India and Census Commissioner under National Population Register, Employment Identity Card issued under MGNREGA, Pension Document, Official Identity Card issued to Members of Parliament, Legislative Assembly, Legislative Council, Aadhaar Card, on behalf of Ministry of Social Justice and Empowerment, Government of India 12 proofs to be considered for voting are special identity card issued to disabled persons, health insurance smart card issued by Ministry of Labour. Indian travelers will need their original passport to prove their identity.

If a voter has changed his address in the electoral roll, but has not yet received a new identity card, the previous identity card will be accepted. But that person’s name must be in the electoral roll with the existing address. Also, at least five days before the date of polling, information slips will be distributed by the Election Office to all the registered voters with information about the polling station, list part number, polling date, time etc. The Office of the Chief Electoral Officer has requested that the voters should carry the information-sheet and photo ID card along with them while going to the polling station.

Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election 2024 | देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे | मूळ संकल्पना पुण्याची

| पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

Loksabha Election 2024 – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे.

आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.

सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

Categories
Breaking News Political social पुणे

Brahmin Samaj Pune | ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

 

Brahmin Samaj Pune – (The Karbhari News Service) –  देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निमित्ताने पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या संस्थांसोबत भाजप नेते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. (Pune Loksabha Election Mahayuti)

यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी (MP Medha Kulkarni), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधवराव भांडारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष  दीपक मानकर, पुणे लोकसभेचे उमेदवार  मुरलीधर  मोहोळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष  विश्वजीत देशपांडे, व्यावसायिक किशोर सरपोतदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला.

यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे केंद्राचे श्री. विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे श्री. चैतन्य जोशी,ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे श्री. अशोक जोशी,श्री प्रमोद जोशी,परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, धीरज जोशी, शैलेश खोपटीकर, डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री.विजय शेकदार,वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे व वेळोवेळी ब्राह्मण समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार व स्वतः वैयक्तिक पातळीवर देखील आपण प्रयत्न करतच असतो या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले गेली 25 वर्ष ज्या भागातून मी राजकारण करत आहे तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला पुत्रवत प्रेम दिले आहे माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले पाहिजे.
ह्या बैठकीत विधानसभा निहाय मेळावे घेऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरविण्यात आले.

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

 

Pune Lok Sabha Election – (The Karbhari News Service) –  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोर मतदार संघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भोर विधानसभा मतदार संघात ९ आणि उर्वरित विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येकी ६ एसएसटी स्थापन करण्यात आली आहेत.

या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.

उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हिव्हिटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हिएसटी आणि २ व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात. एमसीएमसीद्वारे उमेदवारांच्या वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरात खर्चाचा अहवाल समितीकडे पाठविला जातो. या विविध माध्यमातून उमेदवारांनी दर्शविलेला निवडणूक खर्चाची पडताळणी केली जाते. खर्च दर्शविण्यात आला नसल्यास त्याबाबतची नोटीस देऊन त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.

प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी सहायक खर्च निरीक्षक नेमण्यात येतो. केंद्र शासनाच्या आयकर विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय लेखापरीक्षा व लेखा विभाग किंवा केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून होते. ते विधानसभा मतदार संघातील खर्च तपासणीचे काम योग्य पद्धतीने चालले आहे का याची पाहणी करणे आणि खर्च निरीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खर्च पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे काम करतात. तसेच उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तसेच शॅडो ऑब्झर्वेशन रजिस्टरचे संनियंत्रण करतात, अशीही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल 

Categories
Uncategorized

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल

 

Ravindra Dhangekar Vs BJP – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरून त्यावर जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो प्रसारित केला. याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे. यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते जर स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर व नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे  कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते असा आरोप  गौरव बापट यांनी केला.

पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन  मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

| काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

Aba Bagul | Pune Politics – (The Karbhari News Service) – एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे. मग न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे. असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. (Pune congress)

आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.

ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील. असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत. निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

| मराठा विरुद्ध ओबीसी लढत, पुण्यात काँग्रेसला विजयाची गॅरंटी

Pune Loksabha – Pune Congress – (The Karbhari News Service) – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यंदा मतदानातून सत्ताधारी भाजपलाच काय त्यांच्यासमवेत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना – राष्ट्रवादी पक्षांना ( गट) त्याची मोठी झळ बसणार असल्याची दाट शक्यता आहे.नेमक्या या स्थितीचा काँग्रेसने फायदा उठवला तर पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची नामी संधी काँग्रेसला आहे ;मात्र त्यासाठी ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्यास ओबीसी वर्गासह मराठा समाजाची मते काँग्रेससाठी निर्णायक ठरतील. त्यातही काँग्रेस पक्षाने केलेल्या नव्या धोरणानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेला निष्ठावंत चेहरा दिला तर पुणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे चित्र पाहावयास मिळू शकते.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मराठा कार्ड खेळले असले तरी मराठा आरक्षण प्रश्नावरून मतांची विभागणी अटळ असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे काँग्रेसने यंदा ओबीसी उमेदवार देऊन मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत केल्यास काँग्रेसच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर ठरेल मात्र नवा चेहरा रिंगणात उतरविल्यास मतांचे समीकरणही सहज साध्य आहे. त्यामुळे एकेकाळी पुण्याचा हा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेल्या जुन्या निष्ठावंतांना संधी दिली तर काँग्रेसला विजयाची गॅरंटी निश्चित राहील. यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने एक महत्वाचे धोरण तयार केले आहे.

लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे आणि विजय कसा मिळेल यासाठी हे धोरण आहे. त्यानुसार विजयाची खात्री असलेल्या नव्या व्यक्तींना यंदा प्राधान्य दिले जात आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. या धोरणानुसार एका व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत, की विद्यमान आमदारांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवले जाणार नाही तसेच ज्यांनी आजवर लोकसभा,विधानसभा निवडणूक लढवली ;पण पराभव पत्करला आहे. त्यांनाही संधी देऊ नये असे हे धोरण आहे. त्यामुळे पुण्यात ओबीसी नवीन उमेदवार दिला तर काँग्रेसला विजय निश्चित आहे.

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी! 

Categories
Breaking News Political पुणे

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी!

| महाविकास आघाडी टाकतेय सावध पाउल

Muralidhar Mohol Pune Loksabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Loksabha Constituency) हा भाजपचा (BJP)  बालेकिल्ला मानला जातो. पुणे लोकसभेसाठी यावेळी भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Ex Mayor Pune Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मात्र जपून आणि सावध पावले टाकताना दिसून येत आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून कळणार आहे कि पुणे लोकसभा निवडणूक किती रंगतदार होणार आहे. (Pune Loksabha Election)
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. सगळेच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. मात्र यात भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. भाजपने उमेदवार जाहीर करण्यात मुसंडी मारली आहे. भाजपने आपल्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. आज भाजपने महाराष्ट्रतील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे.
पुणे लोकसभेसाठी बरेच लोक इच्छुक होते. यामध्ये मोहोळ, जगदीश मुळीक, सुनिल देवधर अशी नावे आघाडीवर होती. अखेर मोहोळ यांच्या नावावर मोहोर उमटवली गेली आहे. मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर राहिले आहेत.
दरम्यान भाजपकडून दोन याद्या जाहीर केल्या तरीही विरोधी पक्षाकडून हालचाल दिसून येत नाही. महाविकास आघाडीने मात्र जपून आणि सावध पाऊल टाकायचे ठरवलेले दिसत आहे. कारण महाविकास आघाडीने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत. पुणे ही सगळ्यासाठी प्रतिष्ठेची जागा आहे. खासकरून भाजप साठी तर जास्तच. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत तेव्हाच कळणार आहे जेव्हा महाविकास आघाडी पुण्यासाठी उमेदवार जाहीर करेल!