Pune Rain Update | पुणे आणि परिसरातील शाळा आज बंद राहणार | जिल्हाधिकारी यांचे आदेश

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Pune Rain Update | पुणे आणि परिसरातील शाळा आज बंद राहणार | जिल्हाधिकारी यांचे आदेश

 

Pune Heavy Rain – (The Karbhari News Service) – हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. (Pune Rain Update)

 

खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश! 

Categories
Breaking News social पुणे

Black Spot in Pune |  ब्लॅक स्पॉट बाबत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले महत्वाचे आदेश!

Dr Suhas Diwase – (The Karbhari News Service) –  पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरातील रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी सतत अपघात होणाऱ्या ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. (Pune Collector)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे योगेश्वर डी., पुणे मनपाचे वाहतूक नियोजक निखील मिझार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उप अभियंता एम. डी. कजरेकर आदी उपस्थित होते.

दिवसे म्हणाले, अपघात रोखण्यासाठी ब्लॅक स्पॉटवरची उपाययोजना खूप महत्वाची आहे. वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांचा डेटा तयार ठेवावा. डेटाच्या आधारे उपाययोजनानंतर ब्लॅक स्पॉटवर किती अपघात कमी झाले, अपघात कोणत्या वेळी झाले याची माहिती मिळण्यास मदत होईल. सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका यांनी रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजना आखाव्यात.

संबंधित विभागाने आवश्यकतेनुसार रस्त्यावर रम्बलर्स बसविणे, सूचना फलक, रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, झेब्रा क्रॉसिंग, ब्लिंकर्स, रिफ्लेक्टर्स आदी बसविण्याची कार्यवाही करावी. दर तीन महिन्यांनी रोड मार्किंग्ज, रस्त्यावरील परावर्तक, झेब्रा क्रॉसिंग, साईड पट्ट्या रंगविण्यात याव्यात. रस्त्यावरील सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावर स्वच्छतागृहे, शौचालये यासारख्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात.

पुणे शहरात होणाऱ्या अपघातामध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी यांची संख्या अधिक आहे. वाहतुक विभागाने अपघात कमी करण्यासाठी रस्ता वाहतुक नियम तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने उपाययोजना कराव्यात. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने चांदणी चौकात वाहनचालकांना समजेल आणि दिसेल असे फलक रस्त्यावर लावावेत. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने, वाहनचालक यांची संबंधित विभागाने नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.

पुणे जिल्ह्यात ३९ ब्लॅक स्पॉट्स आहेत असे यावेळी श्री. बहीर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात कमी करण्याच्यादृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीत ‘ब्लॅक स्पॉट’ दुरुस्तीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, युनिसेफ व आयरॅड संस्थेच्यावतीने सादरीकरण करण्यात आले.

Pune Schools Closed | पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

Categories
Breaking News Education social पुणे

Pune Schools Closed | पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर

Pune School News – (The Karbhari News Service) – प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात ९ जुलै रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना ९ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Dr Suhas Diwase) यांनी निर्गमीत केले आहेत. (Pune News)

अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी, धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ नये. आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

The Karbhari | Pune collector Directions
पुणे जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांचे शाळा बंद बाबतचे आदेश

000

RPI on Pune Rain | पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाचा आर्थिक मदतीचा हात | प्राथमिक टप्यात तात्काळ अडीच हजार रुपयांची मदत मिळणार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

RPI on Pune Rain | पावसाळ्यात नुकसान झालेल्या नागरिकांना प्रशासनाचा आर्थिक मदतीचा हात | प्राथमिक टप्यात तात्काळ अडीच हजार रुपयांची मदत मिळणार

| आरपीआयच्या शिष्टमंडळाच्या निवेदनानंतर जिल्ह्याधिकारी, महापालिकेची कार्यवाही

 

RPI on Pune Rain – (The Karbhari News Service) – वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाळ्यात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ आर्थिक मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने सकारात्मकता दाखवली आहे. सुरुवातीच्या टप्यात तातडीची मदत म्हणून अडीच हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला मिळणार आहे. त्यानंतर आणखीन मदतीसाठी सकारात्मक प्रयत्न केले जाणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शिष्ठमंडळाने जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले. या वेळी प्रशासनाकडून तातडीने सकारात्मक पाऊले उचलत ही घोषणा केली. (Pune Municipal Corporation (PMC)

या वेळी आरपीआयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, वसंत बनसोडे, शाम सदाफुले आदींसह आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आरपीआयच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, देशासह राज्यात मान्सून दाखल झाला आहे. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना त्यामुळे एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. बळीराजा देखील सुखावला आहे. ही एक बाजू असताना दुसऱ्या बाजूला गेली दोन आठवडे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची संततधार कायम राहत असल्यामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर पाणी साचण्याच्या मोठ्या घटना घडल्या. नागरीवस्तीत पाण्याचा शिरकाव झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेकांच्या घरांची दुरवस्था झाली. यासह वाहनधारकांचे देखील मोठे नुकसान झाले. अनेकांची वाहने वाहून गेली तर काहींची वाहने बंद पडली.

The Karbhari - Pune Rain RPI

वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे पडली. अनेकांच्या वाहनांवर देखील झाडे पडण्याच्या घटना घडल्या. या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आणखीन खर्चाचा बुर्दंड बसला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत झालेल्या नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत मिळावी. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल. याबाबत त्वरित शासकीय पातळीवर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची मागणी करण्यात आली.

यावर दोन्ही प्रशासनाने सुरुवातीच्या टप्यात तातडीची मदत म्हणून अडीच हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याचे जाहीर केले. त्यानंतर शासन स्तरावर पाठपुरावा करून आणखीन मदतीसाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ओढ्यावरील अतिक्रमण हटवा –

तसेच शहरातील ओढ्यांच्या बाजूला केंद्रीय संरक्षण विभागाने सीमा भिंती घातलेल्या आहेत. वडगाव शेरी सह पुण्यातील विविध परिसरात ही परिस्थिती आहे. त्यामुळे या सीमाभिंती काढून ओढ्यांचे पात्र मोठे करण्याबाबत कार्यवाही करावी. पावसामध्ये जीवितहानीची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफचे पथक पुण्यात कायमस्वरूपी तैनात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे ऐनवेळी होणाऱ्या धावपळीपासून मुक्तता होईल. याबरोबरच शहरातील नाल्यांवर अतिक्रमण झालेले आहे. हे अतिक्रमण काढून विकसित आराखड्याप्रमाणे नाल्यांचे रुंदीकरण करावे. तसे आदेश पुणे महापालिकेला द्यावे. विशेषता धानोरी रस्ता ते साठे बिस्कीटकडे जाणारा तसेच धानोरी ते नगररोड मार्गे नदीला मिळणाऱ्या नाल्यांवर अतिक्रमण झाले असून त्याच्या रुंदीकरणाची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली.

 पुणेकरांसाठी आरपीआयची धाव –

यंदाच्या वर्षी झालेल्या पावसात शहरात ठिकठिकाणी दुर्घटना घडल्या. साचलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. नुकसानीला सामोरे जाताना नागरिकांच्या नाकी नऊ येत आहे. या दरम्यान शासनाकडे मदतीसाठी कोणी पाठपुरावा करत नसल्याचे चित्र आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून आरपीआयचे शिष्टमंडळ धावून आले. नागरिकांना मदत मिळावी म्हणून मागणी केली. त्या मागणीला यश आले आहे.
——————————————-

Mahila Arogya Wari | महिला आरोग्य वारीसाठी विविध उपाययोजना पुरवण्याचे महिला आयोगाचे आदेश!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

Mahila Arogya Wari | महिला आरोग्य वारीसाठी विविध उपाययोजना पुरवण्याचे महिला आयोगाचे आदेश!

Palkhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – आषाढी वारी (Aashadhi Wari 2024) कालावधीत महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या आणि सुरक्षिततेच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत असते. महिला आयोगाकडून महिलांसाठी आरोग्य वारी उपक्रम राबवण्यात येतो. वारी कालावधीत महिला विविध सुविधा पुरवण्याचे आदेश राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Women) दिले आहेत. त्यानुसार महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने (PMC Disaster Management Department) महापालिकेच्या संबंधित विभागांना या सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. (Palkhi Sohala 2024)

महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाकडून मागील दोन वर्षांपासून राज्यात वारकरी संप्रदायाचा समृध्द
सांस्कृतिक वारसा लाभलेल्या आषाढी व कार्तिकी वारी कालावधीत पालखी सोहळ्यामध्ये महिलांचा सहभाग
मोठ्याप्रमाणात असल्याने महिलांसाठी आरोग्य वारी हा उपक्रम राबविला जात आहे. संतांनी आपल्या जनजागृती कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आध्यात्मिक लोकशाही स्थापन केली आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक सांस्कृतिक परंपरा आहे. आषाढी व कार्तिकी वारीच्या निमित्ताने वारकरी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून देहू/आळंदी/पंढरपूर येथे दाखल होत असतात. या वारक-यांमध्ये सहभागी होणा-या
महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. वारीचा कालावधी बघता वारीमध्ये सहभागी होणा-या महिलांना काही मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत अध्यक्षा, राज्य महिला आयोग यांनी निर्देश दिले आहेत. महिला आयोगाने जिल्हाधिकारी यांना हे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले होते. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाने महापालिकेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, घनकचरा विभागाला या सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या सुविधा देण्याचे आदेश

1. वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय व न्हाणी घराची व्यवस्था असावी.
2. सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकीन बर्निंग मशीन असणे आवश्यक आहे.
3. स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
4.  महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी / मंदिर परिसरात दर्शनी भागात लावण्यात यावेत.
5.  स्तनदामातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन देण्यात यावा.
6. पालखी सोहळ्याकरिता निर्भया पथक तैनात करण्यात यावे, हेल्पलाईन नंबर दर्शनी भागात लावण्यात यावे.

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

Categories
Breaking News social पुणे

Pune Loksabha Election | निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

 

Pune Lok Sabha Election – (The Karbhari News Service) –  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोर मतदार संघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भोर विधानसभा मतदार संघात ९ आणि उर्वरित विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येकी ६ एसएसटी स्थापन करण्यात आली आहेत.

या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.

उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हिव्हिटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हिएसटी आणि २ व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात. एमसीएमसीद्वारे उमेदवारांच्या वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरात खर्चाचा अहवाल समितीकडे पाठविला जातो. या विविध माध्यमातून उमेदवारांनी दर्शविलेला निवडणूक खर्चाची पडताळणी केली जाते. खर्च दर्शविण्यात आला नसल्यास त्याबाबतची नोटीस देऊन त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.

प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी सहायक खर्च निरीक्षक नेमण्यात येतो. केंद्र शासनाच्या आयकर विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय लेखापरीक्षा व लेखा विभाग किंवा केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून होते. ते विधानसभा मतदार संघातील खर्च तपासणीचे काम योग्य पद्धतीने चालले आहे का याची पाहणी करणे आणि खर्च निरीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खर्च पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे काम करतात. तसेच उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तसेच शॅडो ऑब्झर्वेशन रजिस्टरचे संनियंत्रण करतात, अशीही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी रद्द करा | मराठा क्रांती मोर्चाची मागणी

 

Pune – (The karbhari Online) – मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha quota activist Manoj Jarange Patil) केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एसआयटी चौकशीची आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही एसआयटी चौकशी रद्द करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा पुणे (Maratha Kranti Morcha Pune) शहराच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

निवेदनानुसार मराठा समाजास ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण तसेच सगेसोय-यांची अंमलबजावणी याबाबत केलेल्या आंदोलनानंतर, राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचे सोडून स्वतंत्र एस ई बी सी प्रवर्ग करून १० टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर केला. यामुळे मराठा समाजाची दिशाभूल झाली. असे असताना व आंदोलन करणं हा हक्क असताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर राज्य सरकारकडून एसआयटी चौकशी चे आदेश देण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत . जरांगेपाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर दिलगीरी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात शांतता रहावी याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. परंतु सत्तेत सहभागी असलेले अनेक नेते मंत्री/आमदार यांचेकडून महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल तसेच एकमेकांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर चुकीचे संदेश जातात,अशा नेत्यांवर देखील एसआयटी चौकशी का नेमली नाही असा प्रश्न समाजामध्ये निर्माण होत आहे.
तरी मुख्यमंत्री यांनी याचा फेरविचार करून सदर चौकशी मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक राजेंद्र कुंजीर अनिल ताडगे ,सचिन आडेकर ,संतोष नानवटे अर्जुन जाधव यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिले.

Suhas Diwase IAS | आगामी निवडणुकीसाठी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करा |  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना

Categories
पुणे महाराष्ट्र

Suhas Diwase IAS | आगामी निवडणुकीसाठी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करा |  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना

 

Suhas Diwase IAS |  आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Loksabha election 2024)  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करावीत; कामांच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करुन उत्कृष्ट आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, महानगरपालिकेचे उपायुक्त महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, सहायक निवडणूक अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मानकांचे सर्व अधिकाऱ्यांनी अवलोकन करावे. मानके सर्वांना अवगत होईल अशा सोप्या भाषेत भाषांतरीत करावीत. तसेच या मानकांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे.

निवडणूकीच्या कालावधीचा विचार करता निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य प्रशिक्षण होईल, याबाबत दक्षता घ्यावी. ईव्हीएम सुरक्षिततेच्या अनुषंगाने महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करावे. यामध्ये आचारसंहितेचे पालन, उल्लंघन, हिंसककृत्य, विविध परवानग्या, सुरक्षितता तसेच व्हिडीओ कॅमेरे, सीसीटिव्ही, वेबकास्टिंग आदी बाबींचा समावेश करावा.

पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी कमी राहता कामा नये. विशेषतः युवक आणि महिलांची टक्केवारीत वाढ होण्याच्यादृष्टीने ‘स्वीप’अंतर्गत मतदार जनजागृतीकरीता विविध उपक्रम राबवावेत. यासाठी त्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यासह समाज माध्यमांद्वारे जनजागृतीवर भर द्यावा.

ईव्हीएम सुरक्षितता महत्वाची असून त्यामध्ये ईव्हीएम कक्ष, कक्षाची डागडुजी, कक्षातील वीजयंत्रणा, सीसीटीव्ही, वेबकास्टिंग, अभिलेख जतन तसेच वाहन जीपीएस ट्रॅकिंग, परिसरातील वाहनतळ, ईव्हीएम ने-आण करताना येणारे अडथळे आदी बाबींचा विचार करुन कार्यवाही करावी.

निवडणूकीच्यावेळी निर्माण होणारे संभाव्य धोके लक्षात सूक्ष्म आराखडा तयार कामाचे नियोजन करावे. समन्वय कक्षाने सर्वंकष आराखडा तयार करावा. माहिती पाठवताना भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या विहीत नमुन्यात माहिती सादर करा. सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

यापूर्वीच्या आणि आगामी सार्वत्रिक निवडणूकीची परिस्थिती लक्षात घेता संवेदनशील आणि अतिसंवदेनशील (क्रिटीकल आणि वल्नरेबल) मतदान केंद्रे निश्चित करावीत. निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन निर्णय, शासन परिपत्रक, कायदे यामधील सूचनांची काटेकोर अमंलबजावणी करुन कामकाज सुरळीत पार पाडावे. मागील निवडणुकीच्या वेळी आलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असेही डॉ. दिवसे म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी अधिकारी कर्मचारी नियुक्ती, निवडणूक प्रशिक्षण, निवडणूक साहित्य व लेखनसामुग्री, वाहन अधिग्रहन, वाहन आराखडा, संगणकीकरण, स्वीप उपक्रम, ईव्हीएम, आदर्श आचारसंहिता, निवडणूक खर्च, कायदा व सुव्यवस्था, माध्यम कक्ष आदी विषयांबाबत आढावा घेतला.

Pune Collector Dr. Suhas Diwase reviews EVM security at Koregaon Park

Categories
Breaking News पुणे

Pune Collector Dr. Suhas Diwase reviews EVM security at Koregaon Park

Pune |  Collector Dr.  Suhas Diwase today visited the Food Corporation of India warehouse at Koregaon Park and reviewed EVM security.
 On this occasion, Joint Commissioner of Police Praveen Pawar, Deputy Commissioner of Police Smartana Patil, Additional Collector of Maharashtra State Agriculture Corporation Rupali Awale, Deputy District Election Officer Meenal Kalaskar, Deputy Divisional Officer Sanjay Aswale, Sneha Kiswe-Devkate, Pune City Tehsildar Suryakant Yewale, Madhusdan Barge etc. were present.
 Dr.  Diwase said, keeping in mind the importance of the upcoming general elections, all the relevant systems should work in coordination.  The standards given by the Election Commission of India regarding ‘EVM’ should be strictly followed.  Standards should be prepared in Marathi language and distributed to all concerned.  Conduct joint training of revenue and police administration regarding EVM security.
 Every visitor to the godown should be noted in the register.  Necessary facilities should be made available to the security guard here.  The number of security guards should be increased as per requirement.  All the necessary measures should be taken for the safety of the godown, said Dr.  Diwase gave.
 At this time Dr.  Diwase took information about CCTV, electricity, fire prevention measures, various types of registers etc.
 *Voting Center Inspection*
 Collector Dr.  Diwase inspected the polling stations of Sant Gadge Maharaj High School at Koregaon Park and Saint Meera Girls High School at Sadhu Vaswani Chowk under Pune Cantonment Vidhan Sabha constituency.

Koregaon Park EVM Godam | Suhas Diwase IAS | जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील ईव्हीएम सुरक्षिततेचा घेतला आढावा

Categories
Breaking News पुणे

Koregaon Park EVM Godam | Suhas Diwase IAS | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील ईव्हीएम सुरक्षिततेचा घेतला आढावा

 

Koregaon Park EVM Godam | Suhas Diwase IAS | पुणे | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम सुरक्षिततेचा आढावा घेतला.

यावेळी पोलीस सहआयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अपर जिल्हाधिकारी रुपाली आवळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उप विभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले, मधुसदन बर्गे आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीचे महत्व लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. ‘ईव्हीएम’बाबत भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मानकांचे तंतोतंत पालन करावे. मानके मराठी भाषेत तयार करुन सर्व संबंधितांना देण्यात यावीत. ईव्हीएम सुरक्षिततेच्या अनुषंगाने महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करावे.

गोदामाला भेट देणाऱ्या प्रत्येकाची नोंदवहीत नोंद घ्यावी. येथील सुरक्षा रक्षकाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन घ्यावात. आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी. गोदामाच्या सुरक्षितेच्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.

यावेळी डॉ. दिवसे यांनी सीसीटीव्ही, वीज, आगप्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध प्रकारच्या नोंदवह्या आदी बाबत माहिती घेतली.

मतदान केंद्राची पाहणी

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज हायस्कूल आणि साधू वासवानी चौक येथील सेंट मीरा गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्राची पाहणी केली.