Nitin Gadkari Sabha in Kasba Pune | कसबा विधानसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन

Categories
Breaking News Political पुणे

Nitin Gadkari Sabha in Kasba Pune | कसबा विधानसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन

 

 Nitin Gadkari Sabha in Kasba Pune – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol Pune Loksabha) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची जाहीर सभा शनिवार ११ मे रोजी सकाळी १० वाजता शुक्रवार पेठ येथील नातूबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख  हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. (Pune Loksabha Election 2024)

पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी हजारो कोटींचा निधी आजवर दिलेला आहे. शहराच्या विकासावर त्यांनी कायम विशेष लक्ष दिल्याने आज अनेक प्रकल्प निर्माण झाले आहेत. भविष्यात देखील केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार हे देशवासीयांनी ठरवलेलं आहे. पुणेकर नागरिकांचा देखील भाजपाच्या मागे राहण्याचा ठाम विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची पहिलीच सभा कसबा मतदारसंघात आयोजित करण्यात आली असून यावेळी त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार असून 11 मे ला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा पुण्याचे लोकप्रिय महापौर ठरलेले मुरलीधर मोहोळ यांना भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आल आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहोळ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. तर १० मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही जाहीर सभेचे आयोजन पुण्यामध्ये करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आणखीन प्रमुख नेत्यांच्या सभांचे आयोजन शेवटच्या टप्यात महायुतीकडून करण्यात आले आहे.

B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

Categories
Breaking News Political पुणे

B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

 

B. G. Kolse Patil – (The Karbhari News Service) – गेल्या‌ दहा वर्षात‌ देशाची सत्ता‌ चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यातील मतदानातून मोदी‌ सरकार जाणारहे‌ स्पष्ट झाले आहे. मात्र, “झोला लेके निकलूंगा” असे म्हणणाऱ्या मोदींनी जाण्यापूर्वी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावाअशी मागणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली. (Ravindra Dhangekar Pune Loksabha) 

 

पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीइंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशीराज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.

 

कोळसे पाटील म्हणालेसंविधान सर्वश्रेष्ठ असून सर्वोच्च न्यायालयसंसद नंतर आहे. निवडणुक आयोगन्यायमूर्ती यांच्या नियुक्तींची प्रक्रीया बदलली. मोदी  शहांना प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवायचा आहे. कायदे पायदळी तुडवण्याचे काम केले. निवडणुक रोख्यांचा जगात सर्वात मोठा घोटाळा असल्याचे निर्मला सितारामन् यांचे पती म्हणत आहेत. मुलभुत हक्काची पायमल्ली होत असेल तर न्यायालय स्वत:हून अॅक्शन घेते. मात्रदेशात मुलभुत हक्काची पायमल्ली होत असताना गेल्या दहा वर्षात एकदाही सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो अॅक्शन घेतली नाही. कायद्याचे दात काढण्याचे काम मोदी शहांनी केले आहे.

 

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यानंतर मोदी जाणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव दिसत आहे. झोला घेवून जाता येणार नाहीत्यापूर्वी त्यांना केलेल्या ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागेल. त्यानंतर त्यांनी कुठे जायचे तिकडे जावेअसेही कोळसे पाटील म्हणाले.

 

मोदींसारखा खोटं बोलणारा नेता यापूर्वी कधी देशाने पाहिला नाही. नोटबंदीनंतर काळा पैसा देशात आला का खोटं बोलून लाचारांची‌ फौज पुढे बसवून हसायला लावणारे मोदी आहेत. धमकी देवून धंदा व चंदा‌ गोळा केला. दहा‌ते लाख‌ लोक‌ देश सोडून परदेशात स्थायीक झाले. देशात बेकारी वाढलेली आहे. राहुल गांधी बुद्धांच्या‌ वाटेने चालत असून त्यांना देशाची‌ चिंता आहे. वसंतदादा व इतर लोक कमी शिकलेले होतेतरीही त्यांनी संसद गाजवली. तशाच प्रकारे रविंद्र धंगेकर संसद गाजवतीलअसेही कोळसे पाटील म्हणाले.

 

————–

 

म्हणून पानसरे यांची हत्या झाली :

 

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी मीएम. एन. मुश्रीफ आणि कॉ. गोविंद पानसरे आम्ही राज्यात “हु इज‌ करकरे” या आंतर्गत सभा घेणार होतो. दोन सभा झाल्यानंतर पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या मुंबई हल्ल्यासंदर्भात खरी माहिती लोकांसमोर येऊ नयेम्हणून करण्यात आली. त्यानंतर त्याला “शिवाजी कोण होता?” या पुस्तकामुळे झाल्याची चर्चा घडवण्यात आली.मुंबई हल्ल्यासंदर्भात आयबीने माहिती दिली होती. मात्रत्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विचारसरणी हिंदुत्ववादी होतीते पूर्वीपासूनच आरएसएसशी निगडीत होते. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून योग्य प्रकारे काम केले नाहीअसेही कोळसे पाटील म्हणाले.

Dr Shashi Tharoor Pune Tour |नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Dr Shashi Tharoor Pune Tour | नव्या भारतात लोकशाही धोक्यात :  डॉ. शशी थरूर

|  धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

 

Dr Shashi Tharoor Pune Tour – (The karbhari News Service) – आताचा भारत आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेला नाही. आपल्या देशातले या पूर्वीचे सरकार कोणाची पूजा करावीकाय खावेकाय घालावे हे सांगत नाही. मात्रपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारतामुळे जुन्या भारतातील सामाजिक एकोपामूल्य आणि इतर चांगल्या गोष्टी नष्ट होत आहेत. संविधानीक तरतूदी बदलल्या जात आहेत. यामुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून देशातील लोकांना ‘मोदींची गॅरंटी’ नव्हे तर ‘लोकशाहीची गॅरंटी’ हवी आहेअशी टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री डॉ. शशी थरूर यांनी सोमवारी पुण्यात केली.

 

पुणे लोकसभा मतदार संघाचे  महाविकास आघाडीइंडीया फ्रंटचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन सोमवारी काँग्रेस भवनमध्ये डॉ. शशी थरुर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ‘ निरोगी, आनंदी, सुरक्षित पुण्यासाठी – माझा शब्द.’ असे जहर नामयाचे वैशिष्ट्य पूर्ण नाव ठाव्न्यात आले आहे. याप्रसंगी धंगेकर यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुखमाजी राज्यमंत्री रमेश बागवेमाजी आमदार उल्हास पवारप्रचार प्रमुख मोहन जोशी, अ. भा. काँग्रेस कमिटीचे प्रभारी आशिष दुआ, अभय छाजेड, अंकुश काकडे, गजानन थरकुडे, गोपाळ तिवारी, राज अंबिके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

डॉ. थरूर म्हणालेसरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळे जनतेच्या मनात सत्ताधारी भाजप विरोधात रोष आहे. त्यामुळे चारशे पार तर सोडाच 300 सुद्धा पार होणार नाही. काँग्रेसने 60 वर्षात जनतेचे काहीही हिसकावून घेतले नाही. अनेक उद्योगांनी त्यांचे मुख्य कार्यालय परदेशातील दुबई सारख्या शहरात हलवले आहे. यंत्रणांचा वापर करून दबाव टाकला जातो. कर चुकवणारे देशभक्त होतात आणि सर्वसामान्य अँटी नॅशनल होतात.

 

मोदींनी 345 वर्षापूर्वीच्या औरंगजेबावर बोलण्यापेक्षा गेल्या 10 वर्षात काय काम केले यावर बोलावे. काँग्रेसच्या न्याय पत्रामध्ये कुठेही मुस्लिम धर्माचा उल्लेख नाहीअसे असताना नरेंद्र मोदी व भाजप नेते कोणत्या आधारावर बोलतात कळत नाही. निवडणूक रोख्यांबाबत मोदी सरकार माहिती दंडवत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मोदी सरकार उघडे पडले. त्यांनी निवडणूक रोख्यांतून स्वतः खाल्ले आणि इतरांना खऊ घातल्याची टीका डॉ. थरुर यांनी केली.

 

वायनाडमधून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. तसेच उत्तर प्रदेशात काँग्रेसला आम्ही तुमच्याबरोबर आहोत हा संदेश द्यायचा आहे. रायबरेली लोकसभा 1959 पासून काँग्रेस लढवत आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्यामुळे काँग्रेसने ही जागा लढवणे आवश्यक होते. त्यामुळे राहुल गांधी यांनी जनतेसोबत असल्याचे दाखवत रायबरेलीतून उमेदवारी अर्ज भरला आहे. पंतप्रधान पदाबाबत थरुर म्हणालेनिवडणुकीनंतर इंडीया आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षात एकोपा असून आघाडीच्या जागा महाराष्ट्रात वाढतीलआसा विश्वासही डॉ. थरुर यांनी व्यक्त केला.

 

धंगेकर म्हणालेकी सार्वजनिक वाहतूकज्येष्ठ नागरिकआरोग्यशिक्षणपर्यावरणसांस्कृतिक आणि पर्यटनश्रमिक आणि असंघटित कामकार या घटकांचा जाहीरनाम्यात समावेश आहे.

 

—————————-

करकरेंच्या मुत्यूची चौकशी झाली पाहिजे ः

शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नाहीअसे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर थरूर म्हणालेयामध्ये नेमके तथ्य काय आहेहे मला माहीत नाही. माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. करकरे आणि माझे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी झाली पाहिजे. जे काय खरे आहेते समोर आले पाहिजेअसेही डॉ. थरूर म्हणाले. 

Mahavikas Aghadi Pune | रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे  एकाच वेळी अर्ज भरणार!

Categories
Breaking News Political पुणे

Mahavikas Aghadi Pune | रवींद्र धंगेकर, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे  एकाच वेळी अर्ज भरणार!

|  १८ एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे पुण्यात शक्तिप्रदर्शन

 

Mahavikas Aghadi Pune – (The Karbhari News Service) – महाविकास आघाडीचे उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule Baramati Loksabha Constituency), शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe Shirur Loksabha Constituency) व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune Loksabha Constituency) हे तीनही उमेदवार गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahaviaks Aghadi Pune) वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. (Pune Loksabha Election)

दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे  सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे,  रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून विजयाचे रणशिंग फुंकणार आहेत.

Pune Congress | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’

Categories
Breaking News cultural Political पुणे

Pune Congress | पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’

 

Pune Congress | Gudhipadwa – (The Karbhari News Service) – पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून शेतकरी न्याय, महिला न्याय, युवा न्याय, भागीदारी न्याय आणि श्रमिक न्यायाची गुढी आज महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे उभारण्यात आली.    (Pune News)

यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे निवडणुकीचे सन्मवयक अरविंद शिंदे, काँग्रेस नेते अभय छाजेड,  अजित दरेकर,  अशुतोष शिंदे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, ‘‘मी सध्या सर्वांना भेटतोय सर्वांशी चर्चा करतोय. येणारा काळ इंडिया आघाडीचा आणि काँग्रेसचा असणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे आणि आपण केलेले काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.

    शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढवायचा असून कशाप्रकारे प्रचार करायचा त्याची व्युहरचना कशी असावी, जाहिरनाम्यात या पाच न्याय गोष्टींचा समावेश असावा, यासारख्या मुद्दयांवर बैठक होणार आहे. तसेच न्याय कार्ड प्रत्येकाच्या घरी पोच केले जाणार असून त्यावेळी न्यायचे मुद्दे समजून सांगितले जाणार आहेत.’’

    पुण्यात राष्ट्रसेवादलाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून, तसे पत्र त्यांनी दिले आहे. त्यांच्याकडूनही पथनाट्य माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.

    यावेळी ॲड. अभय छाजेड यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

Vasant More | Pune Loksabha | अपेक्षेप्रमाणे पुणे लोकसभा निवडणूक होणार तिहेरी! | वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी

Categories
Breaking News Political पुणे

Vasant More | Pune Loksabha | अपेक्षेप्रमाणे पुणे लोकसभा निवडणूक होणार तिहेरी!

| वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी

Pune politics – (The karbhari News Service) – पुणे लोकसभा निवडणूकीत (Pune Loksabha Election 2014) आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. कारण यात अपेक्षेप्रमाणे वसंत मोरे (Vasant More) यांनी उडी घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीने (VBA)  वसंत मोरे यांना पुण्यासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता ही लढत मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि वसंत मोरे (Vasant More) यांच्यात होणार आहे. (Pune Politics)
पुणे लोकसभा निवडणूक कडे पूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या रूपात भाजपने मराठा उमेदवार समोर आणल्यानंतर महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस ने रविंद्र धंगेकर यांच्या रूपात ओबीसी उमेदवार उभा केला होता. मात्र वसंत मोरे यांच्या रूपाने अजून एक मराठा उमेदवार या लढाईत उतरला आहे. वंचित बहुजन आघाडीने मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
मोरे यांनी मनसे सोडल्या नंतर उमेदवारी साठी मोरे सगळे पर्याय अजमावून पाहत होते. यासाठी मोरे यांनी महाविकास आघाडी, मराठा मोर्चा असे सगळे दरवाजे ठोठावले होते. मनोज जरांगे पाटील यांना देखील मोरे भेटले होते. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देखील मोरे यांनी उमेदवारी मागितली होती. त्यानुसार वंचितने मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
आता या लढतीत कुठल्या समाजाची मते निर्णायक ठरणार, याबाबत विविध तर्क लावले जात आहेत. तसेच मोरे यांच्या उमेदवारीने कुणाची मते विभागली जाणार, याबाबत देखील विविध कयास लावले जात आहेत. मात्र ही निवडणूक तिरंगी होणार हे सिद्ध झाले आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत वंचित सुप्रिया सुळेंना मदत करणार

वंचित बहुजन आघाडीने आज राज्यात 5 ठिकाणी आज आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये पुण्यासह, शिरूर, औरंगाबाद, परभणी आणि नांदेड लोकसभेचा समावेश आहे. वंचितने जाहीर केले आहे कि, बारामती लोकसभेसाठी वंचित उमेदवार देणार नाही. वंचित तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाला समर्थन देणार आहे.

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल 

Categories
Uncategorized

Ravindra Dhangekar Vs BJP | काँग्रेस उमेदवाराचा काँग्रेसच्या नेत्यांवर विश्वास उरला नाही का?  भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरायची वेळ का आली? |गौरव बापट यांचा सवाल

 

Ravindra Dhangekar Vs BJP – (The Karbhari News Service) –  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Loksabha Election) महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) तर महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचा प्रचार जोर धरताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांवर आज दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरून त्यावर जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशा आशयाचा मजकूर टाकून तो प्रसारित केला. याला दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी तीव्र आक्षेप घेतला.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा त्यांच्याच पक्षावर व नेतृत्वावर विश्वास नसल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरण्याची वेळ आलेली आहे. यावरून त्यांच्या पराभवाची मानसिकता दिसून येते जर स्वतःच्या पक्षावर आणि स्वतःच्या पदाधिकाऱ्यांवर व नेत्यांवर विश्वास असता तर अशा पद्धतीचे बालिश चाळे  कार्यकर्त्यांनी व धंगेकरांनी केलेच नसते असा आरोप  गौरव बापट यांनी केला.

पुढे ते म्हणाले देशामध्ये पंतप्रधान  नरेंद्र  मोदी यांच्यावर जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास या जोरावरच भारतीय जनता पार्टीचे चारशेहून अधिक खासदार 100% निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे देखील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात आगामी काळात हिरीरीने सहभाग घेऊन  मोहोळ यांना खासदार केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे प्रतिपादन गौरव बापट यांनी केले

FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!

Categories
Breaking News PMC Political social पुणे

FIR against MLA Ravindra Dhangekar in the case of insulting PMC Chief Engineer!

 

FIR on Ravindra Dhangekar PMC Chief Engineer Abuse | Pune | Abusing the PMC HOD of Water Supply Department and the Chief Engineer of Pune Municipal Corporation has done well to MLA Ravindra Dhangekar. A case has been registered against Dhangekar at Chatushrungi Police Station on Monday night after the protest of PMC Engineers Association. (Pune Municipal Corporation Latest News)

PMC Chief Engineer Nandkishore Jagtap, Head of Water Supply Department of Pune Municipal Corporation, has filed a complaint in this matter. Based on that, a case has been registered against MLA Dhangekar under section 353 for obstructing the government work and for abusing him. The Municipal Corporation organized a program on the Republic Day to inaugurate the water tank constructed by the Municipal Corporation at Ashanagar in Gokhalenagar area.

Meanwhile, MLA Dhangekar had threatened Nandkishore Jagtap, the head of water supply department of the Municipal Corporation, by abusing him in Aravachy language, accusing the Congress party of dropping the relevant program. His video went viral on social media.

Meanwhile, the Municipal Corporation’s Engineer’s Association held a meeting on Monday and protested against Dhangekar’s action. After that, the officials reached the Chatushringi police station and registered a case against Dhangekar.

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा! 

 
 
 
Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात आचारसंहिता देखील लागू शकते. कुठल्याही पक्षाने आपले पत्ते उघड केले नसले तरीही सर्वांची अंतर्गत तयारी जोरदारपणे सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कारण गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त आहे. यासाठी आता नवीन उमेदवार कोण असणार? गेल्या काही दिवसापासून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता सुनील देवधर (Sunil Devdhar) हे नवीनच नाव चर्चेत आले आहे. भाजप नेहमी नवीन चेहऱ्याच्या शोधात असते. तोच धागा पकडून भाजपने हा नवीन उमेदवार शोधला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
 
 
 

कोण आहेत सुनील देवधर?

 

सुनील देवधर (जन्म 29 सप्टेंबर 1965). त्यांनी ईशान्य भारतातील माय होम इंडिया या एनजीओची स्थापना केली. 

2010 मध्ये, ते सक्रिय राजकारणात सामील झाले आणि जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या ईशान्य भारत संपर्क सेलचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त झाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग ३ वेळा निवडणूक लढविणारे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. गुजरातमधील त्यांच्या मेहनतीने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदींनी त्यांची वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, 2016 मध्ये, त्यांची 2 दशकांहून अधिक काळ मार्क्सवादी पक्षाने राज्य केलेल्या त्रिपुरा राज्याचे पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तत्कालीन भाजप अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, पंतप्रधान मोदींच्या प्रचंड लोकप्रिय प्रतिमेसह, त्यांच्या जमिनीवर कठोर परिश्रम करून, ते राज्यातील २५ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवण्याचे प्रमुख साधन बनले. ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि जुलै २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी होते. २०१८ मध्ये ते भाजप आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी बनले.
दरम्यान मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक हे आपण उमेदवार असण्याची आस लावून आहेत. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत. मुळीक यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ आणि मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. असे असले तरी लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय ही केंद्रीय टीम करणार आहे. तसेच भाजप नेहमी ऐन वेळेला नवीन चेहरा देत असते. त्यानुसार या टीम ने सुनील देवधर यांच्या नावाला पसंती देण्याची तयारी चालवली आहे, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली. अशी देखील चर्चा आहे कि देवधर यांचा प्रचार बड्या उद्योगपतींच्या माध्यमातून सुरु आहे.
दरम्यान लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याबाबत कोर्टाच्या आदेशाने भाजपची गोची झाली आहे. कारण पोटनिवडणुकीची भाजपची सध्या तरी कुठली तयारी दिसत नाही किंवा भाजप त्या मनःस्थितीत नाही.
दरम्यान इकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्टवादी चे देखील अजून काही ठरलेले नाही. लोकसभेची जागा परंपरागत रित्या काँग्रेस कडे राहिलेली आहे. मागील वेळी मोहन जोशी यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हता. यावेळी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांना संधी देऊ शकते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र आघाडीचे अजून तरी काही ठरलेले नाही.
मनसे ने मात्र आधीच आपला उमेदवार घोषित केला आहे. वसंत मोरे ना उमेदवारी दिली जाणार आहे. त्या दिशेने मोरेंनी आपली तयारी देखील सुरु केली आहे. शहर तसेच ग्रामीण भागात मोरे दौरे करत फिरत आहेत. तसेच मोरे नेहमीच आपल्या कामाच्या पद्धतीने प्रकाशझोतात असतात. सोशल मीडियावर त्यांना पसंत करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.

Sharad Pawar | Kasba | कसबा जिंकण्याची आम्हांला अपेक्षा नव्हती | शरद पवार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा जिंकण्याची आम्हांला अपेक्षा नव्हती | शरद पवार

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगरातील मोदी बाग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी रवींद्र धंगेकरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी १० हजार ९४० मतांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार गिरीश बापट यांचीदेखील दोन दिवसांपूर्वी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. यावेळी गिरीश बापट यांनी धंगेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या होत्या.

गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात कसबा पोटनिवडणुकीची चर्चा चालू आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ११ हजाराहून जास्त मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असणारा हा मतदारसंघ काँग्रेसनं जिंकला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात असताना भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावर आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्या स्वत:लाच कसबा निवडणूक जिंकण्याची अपेक्षा नव्हती, असं म्हटलं आहे. “तो भाजपाचा गड आहे असं बोललं जात होतं. तिथे अनेक वर्षं गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. पुण्यातील बिगर भाजपा वर्गाशी मैत्रीचे संबंध हे बापटांचं वैशिष्ट होतं. त्यामुळे त्यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा आमचा अंदाज होता. पण शेवटी शेवटी त्यांनी बापटांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याची कुजबुज ऐकायला मिळाली. त्यामुळे बापटांना किंवा टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयांचा फटका बसेल आणि त्याचा फायदा होईल असा अंदाज होता”, असं शरद पवार म्हणाले.