Tag: Jagdish mulik
BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ
| कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मोदीजींचे विकासकार्य जनतेपर्यंत पोहचवावे
| उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आवाहन
BJPs Ghar Ghar Chalo Samprak Abhiyan in pune | Devendra Fadnvis In pune |देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकासपर्वचा काळ राहिला आहे. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला. (BJPs Ghar Ghar Chalo Sampark abhiyan in pune)
भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP pune city president Jagdish Mulik) यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis in Pune)
यावेळी व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,राहुल कुल, सिद्धर्थ शिरोळे,भीमराव तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी,राजेश पांडे, चिटणीस वर्षा डहाळे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आज माननीय मोदीजींचे नेतृत्व जगमान्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील माननीय मोदीजींशी बोलण्यासाठी आतूर असतात. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगामी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती आहे. आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचे मूल्यमापन नेहमीच होत असते. कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून काम करत होता. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी असेच आपले कार्य सातत्याने सुरू ठेवावे अशी सूचना केली. तसेच घर चलो संपर्क अभियानाद्वारे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.तर स्वागत गणेश घोष यांनी केले.
—
News Title |BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in Pune BJP’s Ghar Chalo Sampark campaign launched in Pune
निष्क्रिय मुळीकांना 2019 लाच वडगावशेरीकरांनी जागा दाखविली
| आमदार सुनिल टिंगरेंचे प्रत्युत्तर
पुणे : वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिकांनी 2019 लाच जगदिश मुळीकांना घर पाठवून ते किती निष्क्रिय आहेत हे दाखवून दिले आहे. मोदी लाटेतही त्यांना निवडून येता आले नाही. आता माझ्या कामांचा धडका पाहून आता मुळीकांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे असे प्रतिउत्तर आमदार सुनिल टिंगरे यांनी दिले आहे.
मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सुनिल टिंगरे यांनी महापालिका भवनासमोर केलेल्या उपोषणावर मुळीक यांनी टिका केली होती. त्यावर उत्तर देताना आमदार टिंगरे म्हणाले, राजकिय आरोप न करता केवळ मतदारसंघातील प्रश्नांसाठी मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मात्र, या उपोषणाला केवळ मतदारसंघातूनच नाही तर शहरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मुळीक़ घाबरून गेले. खर तर पाच वर्ष ते आमदार होते. महापालिकेत त्यांची एकहात्ती सत्ता होती. असे असताना त्यांना हे प्रश्न सोडविता येऊ शकले नाही. मी विरोधी पक्षात असून मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणला आहे. प्रमुख प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे घाबरलेल्या मुळीकांनी निरर्थक पोपटपंची केली आहे.
सुनिल टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला
| भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा टोला
वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात केलेले लाक्षणिक उपोषण म्हणजे त्यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला असेच म्हणावे लागेल. असा टोला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लगावला.
मुळीक म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामे आणि प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. पुणे मेट्रोचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. भामा आसखेड पाणी प्रकल्पामुळे या भागातील पाणीपुरवठ्याची समस्या बहुतांश सुटली आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे कामही 70 टक्के पेक्षा अधिक झालेले आहे. वडगाव शेरी च्या विविध भागात पीपीपी तत्त्वावर रस्ते निर्मितीची कामे सुरू आहेत. नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गोल्फ चौकात उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून खराडी ते शिरूर उड्डाणपूल निर्मितीच्या कामाला वेग आलेला आहे. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण आणि पार्किंग ची सुविधा उपलब्ध होत आहे. मी आमदार असताना प्रस्तावित केलेले लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आता अंतिम टप्प्यात आहे. खराडीत पंतप्रधान आवास योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आली आहे या भीतीतून त्यांनी लाक्षणिक उपोषणाची स्टंटबाजी केली आहे.
मुळीक पुढे म्हणाले, राज्यात तीन वर्षे महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात राज्य शासनाच्या माध्यमातून टिंगरे यांना वडगाव शेरी तील मोठ्या प्रकल्पांसाठी शून्य भोपळा निधी मिळाला. आपले अपयश लपविण्यासाठी टिंगरे हे सातत्याने भाजपने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या किंवा सुरू करीत असलेल्या प्रकल्पाबाबत पत्रव्यवहार करतात आणि त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतात. वडगाव शेरीच्या गेल्या काही वर्षातील विकासात टिंगरे यांचे शून्य योगदान आहे. हे अपयश लपविण्यासाठी ते स्टंटबाजी करतात हे जनतेला माहिती असून त्याचे योग्य उत्तर मतपेटीद्वारे मिळेल.
नगर रस्त्यासाठी वाहतूक आराखडा भाजपने केला
केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन 2019 मध्ये पुणे शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती याचा विचार करून स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला. त्यामध्ये मेट्रो मार्गाचे नियोजन, ठीकठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग अशा उपायोजना करून महापालिकेच्या सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात सुचविल्या होत्या. त्यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. खराडी, कल्याणी नगर ते कोरेगाव पार्क उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, येरवडा, शास्त्री नगर येथे उड्डाणपूल, विश्रांतवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग योजनेअंतर्गत उड्डाणपूल सुचविण्यात आले होते. विश्रांतवाडी येथील पुलाच्या कामासाठी तज्ञ सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे. त्याचे पूर्व गणन पत्रक तयार करण्यात येत आहे. म्हणजे नजीकच्या काळात ही सर्व विकासकामे सुरू होणार आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठी सुनील टिंगरे स्टंटबाजी करत आहेत.
यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे माजी नगरसेवक योगेश मुळीक,संतोष खांदवे,अर्जुन जगताप,,राजू बाफना,विजय चौगुले आदी उपस्थित होते
महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?
पुणेकरांनी भाजपला योग्य धडा शिकवावा | प्रशांत जगताप
राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिकेचे जे बजेट मांडलेले आहे ते अत्यंत निराशाजनक तथा अवास्तव आहे, असे आमचे ठाम मत आहे. गेल्या वर्षी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी साडेआठ हजार कोटींचे बजेट मांडल्यानंतर आज २४ मार्च २०२३ रोजी देखील पुणे महानगरपालिकेला या आर्थिक वर्षात साडेपाच ते सहा हजार कोटींचे पुढे उत्पन्न गाठण्यात यश आलेले नाही, असे असताना देखील पुणे महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून विक्रम कुमार यांनी यावर्षी साडेनऊ हजार कोटींचे बजेट मांडले ही एक प्रकारे पुणेकरांची थट्टाच केली आहे. हे बजेट किमान ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट आहे,असा आमचा थेट आरोप आहे.
गेली अनेक दशके लोकप्रतिनिधींच्या आड लपून हे स्थायी समितीने फुगवलेले बजेट आहे, असा आरोप करणारे प्रशासन आज वास्तववादी बजेट मांडू शकले नाही, हे या बजेट चे ठळक वास्तव आहे.
२०१७ ते २०२२ या पाच वर्षाच्या भाजपच्या काळात पुणे महानगरपालिकेची झालेली घसरण लपविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या दबावाखाली आज माननीय महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी हे बजेट मांडले आहे,असा आमचा आरोप आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना पुणे महानगरपालिकेकडे कर भरणाऱ्या तब्बल १० लाख मालमत्ता होत्या,त्यावेळी ५ ते ६ हजार कोटींची जमा रक्कम येत होती. आज पुणे महानगरपालिकेमध्ये ३४ गावे समाविष्ट होऊन नव्याने ६ लाख मिलकती येवून सुधा तब्बल ३ हजार कोटींच्या तुटीचे बजेट मांडण्याची वेळ पुणे महानगरपालिका आयुक्तांवर आली, अर्थात या संपूर्ण फसलेल्या बजेटचे श्रेय पुणे भाजपला जाते. त्यांच्या दबावाखाली व त्यांचा गेल्या पाच वर्षातील भोंगळ कारभार लपविण्यासाठीच अशा प्रकारचे बजेट सादर करण्यात आलेले आहे, ही बाब ओळखून येणारे काळात पुणेकरांनी याबाबत भाजपला योग्य तो धडा शिकवावा, अशी माझी पुणेकरांना विनंती राहील.
पुण्याच्या विकासाला चालना देणारे बजेट |जगदीश मुळीक
भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, पुणे महापालिका आयुक्तांनी सादर केलेले अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाला चालना देणारे आहे.
शहर भाजपने केलेल्या मागणीनुसार कोणतीही करवाढ पुणेकरांवर लादण्यात आलेली नाही.
भाजपने सुरू केलेली मेट्रो, नदी शुद्धीकरण आणि सुशोभीकरण आरोग्य यंत्रणांचे सक्षमीकरण, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय निर्मिती, ठिक ठिकाणी उड्डाणपूल, रस्ते विकास याला प्राधान्य देण्यात आले आहे. भाजपच्या कारकिर्दीत सुरू झालेली विविध विकासकामे पूर्ण होण्यास या अर्थसंकल्पामुळे चालना मिळेल.
स्व. सुषमा स्वराज अवॉर्डने ‘ती’चा सन्मान
पुणे: आपल्या कुटुंबापासून ते देश सांभाळण्याची अविरत शक्तीचे उदाहरण असलेल्या स्त्री शक्तीला सलाम करत समाजातील उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा भाजप महिला आघाडीच्या वतीने पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर व भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक हे प्रमुख उपस्थित होते.
भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चनाताई तुषार पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात अनुरागजी ठाकूर यांनी महिलांच्या कामाचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर महिलांचा सन्मान यावेळी संपन्न झाला. सांस्कृतिक आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी यावेळी प्रमुख उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी नव्या निवडीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्याच्या प्रभारी अलका शिंदे, अपर्णा गोसावी, सर्व मंडलाध्यक्षा विनया बहुलीकर, हर्षदा फरांदे, स्वाती कुरणीक, ममताताई दांगट, अश्विनी पांडे या उपस्थित होत्या. सर्व कार्यकारिणी, पदाधिकारी व सहकारी उपस्थित होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला.
सिद्धार्थ नगर मधील रहिवाशाना मिळणार पक्की घरे
नगर रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या रामवाडी मधील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी धारकांना एसआर अंतर्गत घरे देण्याचे महापालिका आयुक्तानी मान्य केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून खुळेवाडी ट्रांनझिट कॅम्प मध्ये रहाणाऱ्या नागरिकांना हक्काचे पक्के घर मिळणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
मुळीक म्हणाले, सिद्धार्थनगर वासियांची घरे 2007 मध्ये रस्ता रुंदीकरणात बाधित झाली होती. येथील रहिवाशांना खुळेवाडी येथील तात्पुरत्या स्वरूपात रहाण्यासाठी जागा दिली होती. मात्र त्याठिकाणी रहाणाऱ्या राहिवाशांना कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा दिल्या जात नव्हत्या. असुविधेमुळे नागरिक त्रस्त होते. रहिवाशाना पक्की घरे मिळण्यासाठी जगदीश मुळीक, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी नागरिकांसासह एसआरएचे अधिकारी, महापालिका आयुक्त यांचे कडे वारंवार पत्र व्यवहार करून वारंवार बैठाका घेतल्या होत्या. एसआरएच्या अधिका-यांनी महापालिकेने सदर राहिवाशांची सोय करावी असे पत्र दिल्यानंतर महापालिका आयुक्त, मालमता विभागाचे उपायुक्त यांचेशी बैठक घेऊन नागरिकांना विमाननगर, रामवाडी येथील एसआरए योजनेत घरे मिळावीत अशी मागणी बैठकीत केली होती. आयुक्ताच्या आदेशा नंतर मालमत्ता विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांनी विमाननगर व रामवाडी येथील एसआरए इमारती मधील शिल्लक असणारी घरे खुळेवाडी येथे ट्रांनजीट कॅम्प मध्ये रहाणाऱ्या राहिवाशांना देण्याचे मंजूर केल्याचे पत्र दिले आहे.
जगदीश मुळीक म्हणाले, आपण याबाबत एसआरए तसेच महापालिका अधिकारी यांच्याकडे टेबल टू टेबल असा पाठपुरावा केल्यामुळे आज खुळेवाडी येथे स्थलांतर झालेल्या राहिवाशाना पक्की घरे देण्याचे मंजूर झाले आहे.
आयुक्तानी घेतलेल्या या निर्णयामुळे सिद्धार्थनगर मधील रहिवाशाना पक्की घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत सिद्धार्थ नगर मधील राहिवाशा मध्ये आनंदाचे वातावरण असून राहिवाशानी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्यासह अधिकाऱ्यांचे आभार मानले.
नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार
| भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
वडगावशेरी मतदार संघातील नगर रस्त्यावर खराडी आणि विश्रांतवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या उड्डाण पूल उभारण्याचे काम निधीची तरतूद करून लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन केली.
या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.
मुळीक म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सन 2018 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता, त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण, पुरेशा बसव्यवस्था, आणि गोल्फ चौक, खराडी कल्याण नगर, येरवडा, विश्रांतवाडी येथे आवश्यकतेप्रमाणे उड्डाणपूल किंवा ग्रेड कामे अंदाजपत्रकात सुचविली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. खराडी येथे उड्डाणपुलासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सूतोवाच केले. राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.’
कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार
पुणे | मुक्ताताई टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक (kasba byelection) भारतीय जनता पक्ष (BJP) जिंकणारच असा निर्धार आज भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक माननीय खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक (city president Jagdish Mulik)यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.
विधानसभा कसबा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा माजी पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघातील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे.
नामदार पाटील पुढे म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे एकप्रकारे कोरं पाकीट असतात. पक्ष नेतृत्व जे काम सांगेल ते कार्यकर्ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे विधानसभेच्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डकडून ठरविण्यात येईल. पण त्यापूर्वीच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळणारे मताधिक्य वाढविण्यावर सर्व कार्यकर्त्यांचा भर आहे. तसेच, माननीय खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल.
बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नामदार पाटील म्हणाले की, मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
चुकीच्या वक्तव्यासाठी अजित पवार यांनी माफी मागावी
| भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
वंदनीय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल (Chhaptrapati Sambhaji Maharaj) चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City president Jagdish Mulik) यांनी केली.
मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली आज शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज खंडोजीबाबा चौकात तीव्र निदर्शने केली. या वेळी ते बोलत होते.
मुळीक म्हणाले, ‘संभाजी महाराजांचे कर्तृत्व थोर आहे. त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. शंभू राजांचा अपमान हा शिवछत्रपती घराण्याच्या कर्तृत्वाचा, माता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि समस्त हिंदुजनांच्याअस्मितेचा अपमान असून, तो कदापि सहन केला जाणार नाही. अजित पवारांनी संपूर्ण देशाची माफी मागावी.’
युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, प्रतिक देसरडा, दिपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा, यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.