BJP vs Nawab Malik : भारतीय जनता युवा मोर्चाने पुण्यात नवाब मलिक यांचा पुतळा जाळला 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

भारतीय जनता युवा मोर्चाने पुण्यात नवाब मलिक यांचा पुतळा जाळला

: भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक कडून राजीनाम्याची मागणी

पुणे : नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघडकीस येत असल्याने ते वैफल्यग्रस्त अवस्थेत पुरावा नसलेले बिनबुडाचे आरोप करीत आहेत. दररोज उठून आरोप करायचे आणि नंतर सारवासारव करायची या मलिकांच्या नौटंकीला जनता कंटाळली आहे. मंत्री म्हणून त्यांना काहीच काम राहिलेले नाही. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे उघड झाल्याने मलिक यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

मुळीक पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अशा नेत्यावर चिखलफेक करण्याचे काम मलिक करीत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जनाधार दिला होता. अशा नेत्यावर टीका करण्याची मलिक यांची योग्यता नाही.

भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने आज कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर नवाब मलिक यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. त्यावेळी मुळीक बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘मलिकांच्या जावयाला अंमली पदार्थाच्या व्यवहारात अटक करण्यात आली. त्याला निर्दोष सिद्ध करण्याच्या नादात सूडाच्या भावनेने सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे चारित्र्यहनन करीत आहेत. मात्र या नादात ते स्वतः अडकले असून त्यांचे अंडरवर्ल्ड बरोबरचे संबंध उघडकीस आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. त्यांनी तातडीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र जन आंदोलन केले जाईल.’

बाप्पू मानकर म्हणाले, मलीक यांनी नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जावयाच्या प्रेमात ते आंधळे झाले आहेत. त्यांची विधाने वैयक्तिक द्वेषातून आणि जाती, धर्मांमध्ये भांडणे लावणारी आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही.

या आंदोलनाला मुळीक यांच्या सह युवा मोर्चा चे शहराध्यक्ष राघवेंद्र उर्फ बाप्पू मानकर, अमृत मारणे, प्रतीक देसरडा, दीपक पवार सुनील मिश्रा राजू परदेशी, अक्षय वयाळ अभिजित राऊत, निवेदिता एकबोटे, दुष्यंत मोहोळ, अपूर्व खाडे, अमित कंक, निखिल शिळीमकर, आशिष सुर्वे, अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Pune : BJP Agitation : प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधून शहर भाजपचे अभिनव आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधून शहर भाजपचे अभिनव आंदोलन

पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी

पुणे – केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यापाठोपाठ देशातील अकरा राज्यांनी मूल्यवर्धित करकपात करुन नागरिकांना दिलासा दिला. परंतु केवळ हप्ता वसुली करण्यासाठी जनमताचा विश्वासघात करून राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये स्वारस्य नसल्याची टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरचा मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) कपात करावी, एसटी कामगारांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात आणि आरोग्य विभागातील भरती परीक्षांमधील अनागोंदी कारभारावर नियंत्रण आणावे या मागण्यांसाठी शहर भाजपच्या वतीने आज महात्मा फुले मंडई परिसरात अभिनव आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक राक्षसाच्या डोळ्यांना पट्टी बांधण्यात आली होती. झोपेचे सोंग घेतलेल्या वसुली सरकारने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मुळीक पुढे म्हणाले, आपले अपयश लपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने केंद्राकडे बोट दाखवून टीका करीत असते. केंद्र सरकारने इंधनाचे भाव कमी केल्यानंतर राज्यातील आघाडीचा खरा चेहरा नागरिकांपुढे उघडा पडला आहे. इंधनावरील व्हॅट कमी केल्यास सर्वच वस्तूंच्या किमती कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकेल. परंतु हप्ता वसुली, बदल्यांमधील भ्रष्टाचार, गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठीशी घालणे, जनतेमध्ये दहशत निर्माण करणे हे राज्य सरकारचे प्राधान्यक्रम आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात इंधनावरील जिझिया कर सहन करावा लागत आहे.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, उपाध्यक्षा स्वरदा बापट, महिला अध्यक्ष अर्चना पाटील, प्रमोद कोंढरे, रवींद्र साळेगावकर, धनंजय जाधव आणि इतर शहर पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Pune : MSRTC : भाजपचे जगदीश मुळीक म्हणतात; एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार

Categories
Political पुणे महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या  संपाला शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी स्वारगेट येथील आगारात जाऊन पाठिंबा दिला.

मुळीक म्हणाले, राज्यातील अकार्यक्षम महाविकास आघाडी सरकार केवळ आणि केवळ वसुली आणि अधिकाऱ्यांच्या  बदल्यांमधील भ्रष्टाचारात गुंतलेले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये सरकारला अजिबात स्वारस्य राहिलेले नाही. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, गेल्या तीन-चार महिन्यांपासून राज्यातील एक लाखांहून अधिक कर्मचार्यांचे पगार झालेले नाही. साडेतीनशे कर्मचार्यांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला. आजपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ३५ कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. परंतु सरकारला याचे गांभीर्य नाही. केवळ आर्यन खान आणि नवाब मलिकांच्या जावयाला निर्दोष ठरविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार दिवस-रात्र कार्यरत असल्याची राज्यातील नागरिकांची भावना झालेली आहे. शासनाने तातडीने एसटी कर्मचार्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

Jagdish Mulik : युवकांच्या भवितव्याशी चाललेला राज्य सरकारी खेळ त्वरित थांबवावा: जगदीश मुळीक

Categories
Education पुणे महाराष्ट्र

युवकांच्या भवितव्याशी चाललेला राज्य सरकारी खेळ त्वरित थांबवावा: जगदीश मुळीक

 

पुणे : आज आबेदा इनामदार कॉलेजमध्ये होणाऱ्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेचा पेपर वेळेवर न मिळाल्यामुळे त्या केंद्रावरील उमेदवारांचे मोठे नुकसान होणार आहे. पुणे आणि नाशिक मधील केंद्रांवर हा अभूतपूर्व गोंधळ राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे झाला असून त्यामुळे परीक्षा देणाऱ्या युवकांना प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागले आहे. त्याचबरोबर त्यांचे भवितव्य देखील टांगणीला लागले आहे. या अनागोंदी कारभारामुळे परीक्षा देणाऱ्या युवकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. तसेच या परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या कंपन्यांना देण्यात आलेले आहे त्या कंपन्या ब्लॅक लिस्टेड असून राज्य सरकारने त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जगदीश मुळीक यांनी यावेळी केली. या ब्लॅक लिस्ट अँड कंपन्यांना या परीक्षा घेण्याचे कंत्राट कोणाच्या सांगण्यावरून आणि का देण्यात आले याचाही खुलासा ठाकरे सरकारने त्वरित करावा असेही त्यांनी सांगितले.

युवकांच्या मनस्तापाची व आर्थिक नुकसानीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवरच

दिशाहीन राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचे प्रतिबिंब प्रत्येक सरकारी योजनेमध्ये दिसत आहे. विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये चाललेला सरकारी घोळ राज्यातील युवकांच्या संयमाची ची परीक्षा घेत आहे.

आरोग्य विभागातील विविध पदासाठी परीक्षेतील गोंधळाची परंपरा या परीक्षेतही कायम आहे. परीक्षेतील प्रवेशपत्रातील गोंधळ, हॉलतिकीटांमध्ये चूका, परीक्षा केंद्राचा पत्ता नसणे, चुकीचे फोटो, दूर-दूर जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र अशा गोंधळामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ, संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आयत्यावेळी परीक्षाच रद्द करण्यात आल्याआहेत त्यामुळे हा गोंधळ आणखी वाढला. राज्यात नऊ लाखांपेक्षा अधिक युवकांनी परीक्षेला नोंदणी केलेली आहे.

अनेक उमेदवारांचा नंबर त्यांचा स्वतःचा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांमध्ये आलेला आहे. पुणे आणि इतर जिल्ह्यातील विद्यार्थी गोंदिया भंडारा अशा जिल्ह्यांमध्ये, तर तेथील उमेदवार पुणे मुंबई मध्ये असा सावळा गोंधळ राज्य सरकारने घातलेला आहे. तालुका स्तरावरही परीक्षाचे केंद्र देण्यात आले आहेत. तासनतास प्रवास करून पोहचलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या काहीतास आधी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कळल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

या महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत निष्काळजी कार्यवाही मुळे परीक्षा देणे राहिले दूर परंतु दूरवरून प्रवास करून आलेल्या युवकांना प्रचंड आर्थिक नुकसान देखील सहन करावे लागत आहे. या युवकांच्या मनस्तापाची व आर्थिक नुकसानीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवरच आहे.

खंडणी वसुली आणि हरबल तंबाखू चे समर्थन यामध्येच राज्य सरकारचा प्रत्येक मंत्री व्यस्त आहेत आणिसर्वसामान्य जनतेच्या कोणत्याही मूलभूत प्रश्नाकडे अथवा गरजांकडे लक्ष देण्याची गरज ठाकरे सरकारला अजिबात वाटत नाही हे या राज्यातील जनतेचे मोठे दुर्दैव आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.