Opinion polls and Exit Polls | निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे

Opinion polls and Exit Polls | निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

Opinion polls and Exit Polls – (The Karbhari News Service) – भारत निवडणूक आयोगामार्फत (Election Commission of India) लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

0000

cVIGIL App | ECI | आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा | भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र

cVIGIL App | ECI | आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा | भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप

 

cVIGIL App – (The Karbhari News Servic) –  भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (General Election of India) तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता (Model code of conduct) लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल सिटीझन ॲप (cVIGIL App) विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

हा सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जावून सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करावे.त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

Final Voter List | Election Commission of India | अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Final Voter List | Election Commission of India | अंतिम मतदार यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार

 

Final Voter List | Election Commission of India |भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीची अंतिम (Final Voter list) प्रसिध्दी करण्याचा दिनांक २२ जानेवारी, २०२४ (सोमवार) असा होता. तथापि, राज्य शासनाने १९ जानेवारी, रोजीच्या अधिसूचनेनुसार सोमवार २२ जानेवारी, २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त (Shri Ram Lalla Pran Pratstha Dina) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने (ECI) त्यांच्या १९ जानेवारी, २०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या २३ जानेवारी, २०२४ (मंगळवार) रोजी करण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.

Loksabha Election 2024 | लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Loksabha Election 2024 | राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील (Maharashtra Vidhansabha) मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा निवडणुका-2024 (Loksabha Election 2024) मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदार याद्या अद्ययावत असण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तसेच लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी (District Élection Officer) यांच्याकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाने राज्याचा दौरा केला. या पथकामध्ये एन. एन. बुटोलिया, वरिष्ठ प्रधान सचिव सौम्यजित घोष, सचिव, सुमनकुमार दास, सचिव, भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) यांचा समावेश होता.
            या पथकाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यांचे विस्तृत सादरीकरण आयोगासमोर केले.  यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 18-19 वर्षे वयोगटातील मतदार नोंदणींची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय, विविध आस्थापनांमध्ये विशेष मोहीम राबविणे, मतदार साक्षरता मंडळ, स्वयंसेवी संस्था तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या मदतीने या वयोगटातील अधिकाधिक तरुणांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयनिहाय मतदार नोंदणीचा आढावा नियमित घेणे, इ. उपयायोजना सुचविल्या.
            राज्यातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवीत ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करुन टक्केवारी वाढविण्याचे निर्देश दिले. मतदार यादींमधील दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीचे मार्गदर्शन आयोगाने केले. मतदान केंद्रांमध्ये सर्व किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका-2019 मधील मतदानाची राष्ट्रीय सरासरी तसेच राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन तेथील मतदानाची आकडेवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही आयोगाने उपाययोजना सुचविल्या. तसेच, मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदानाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
****

Cricket Legend Sachin Tendulkar begins his innings as National Icon for ECI, to bat for greater voter turnout

Categories
Breaking News social देश/विदेश

Cricket Legend Sachin Tendulkar begins his innings as National Icon for ECI, to bat for greater voter turnout

Cricket legend and Bharat Ratna awardee Sachin RameshTendulkar today began a new innings – as the ‘National Icon’ for voter awareness and education for the Election Commission of India. An MoU was signed with the legend for a period of 3 years at an event organized at Akashvani Rang Bhavan, New Delhi in the presence of Chief Election Commissioner Shri Rajiv Kumar and Election Commissioners Shri Anup Chandra Pandey and Shri Arun Goel. This collaboration marks a significant step towards leveraging Tendulkar’s unparalleled impact with the youth demographic for increasing voters’ participation in the forthcoming elections, especially in General Elections 2024. ECI through this partnership aims to bridge the gap between citizens, especially youth and urban populations and the electoral process thereby, trying to address the challenges of urban and youth apathy.

 

Sachin Tendulkar, in his role as the National Icon for the Election Commission of India, expressed his enthusiasm and commitment to the cause, and said that for a vibrant democracy like India, the youth play a key role in nation building. The hearts that beat for Team India during sports matches, with the unified cheer – ‘India, India!’ shall also beat the same way to take our precious democracy forward. One simple yet most powerful way to do that is to cast our votes regularly.

Speaking on the occasion he said that from thronging stadiums to thronging polling booths, from taking time out to stand by the National team to taking time out to cast our votes, we shall keep up the spirit and enthusiasm. When youth from the nooks and corners of the country participate in large numbers in electoral democracy, we shall see a prosperous future for our country.

Speaking on the occasion, CEC Shri Rajiv Kumar said that Shri Sachin Tendulkar, an icon revered not only in India but globally, has a legacy that extends far beyond his cricketing prowess. Mr Rajiv Kumar said his illustrious career is a testament to his commitment to excellence, teamwork, and the relentless pursuit of success. His influence transcends sports, making him an ideal choice to bat for ECI and drive up voter turn-outs, the CEC added.

The collaboration will encompass a range of activities, including Shri Tendulkar’s promoting voter awareness in various TV talk shows/ programs and digital campaigns etc, all aimed at raising awareness about the importance of voting and the role it plays in shaping the nation’s destiny.

During the event, students from National School of Drama also presented an impactful skit on the importance of voting in strengthening of democracy.

ECI associates itself with renowned Indians from various fields and designates them as ECI’s national icons to motivate voters for participation in the festival of democracy. Last year, the Commission recognised famous actor Mr. Pankaj Tripathias the National Icon. Earlier, during the 2019 Lok SabhaElections, stalwarts like M.S.DhoniAamir Khan and Mary Kom had been the ECI National Icons.

Election Commission Of India | New Voter | नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Election Commission Of India | New Voter | नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

 Election Commission Of India | New Voter | भारत निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नवमतदारांनी (New Voter) नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector Dr Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. (Election Commission Of India)
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे. आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे. अस्पष्ट अंधुक छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडुन योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे. (State Election Commission)
१ जानेवारी २०२३ रोजी नोंदणी न केलेले पात्र मतदार आणि १ जानेवारी २०२४ मतदार नोंदणीसाठी संभाव्य  पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येईल. एकापेक्षा अधिक नोंदी, मयत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरित मतदारांच्या नोंदी वगळणे व मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. (Voter list)
आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही मतदार मतदानापासुन वंचित राहु नये यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ आहे अगर कसे याबाबत नागरिकांनी पडताळणी   करून घ्यावी.  एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदाराचे नाव समाविष्ट असल्यास त्यांनी एक नाव कायम ठेवून इतर ठिकाणची नावे कमी करण्यासाठी नमुना ७ चा अर्ज भरुन मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय किंवा संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे जमा करावा.  मतदारांचे नाव चुकीने वगळण्यात आले असल्यास त्यांनी तात्काळ आवश्यक कागदपत्रासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय येथे नमुना ६ चा अर्ज जमा करावा, असे आवाहनही डॉ.देशमुख यांनी केले आहे. (Pune News)
                           —-
News Title | Election Commission Of India |  New Voter |  New voters should register  Collector Dr.  Appeal by Rajesh Deshmukh

EVM Process | ईव्हीएममधील प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नाही

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

EVM Process | ईव्हीएममधील प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप करता येत नाही

|  मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 EVM process | सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी (General Election) नागरिकांना ईव्हीएम (EVM) आणि व्हीव्हीपॅटविषयी (VVPAT) वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी. याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित करण्यावर भर द्यावा. ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही. असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Election Officer Shrikant Deshpande) यांनी केले. (EVM Process)
‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवसातील प्रथम सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे सहसचिव ओ. पी. सहानी, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते. (State Election Commission)
ईव्हीएममधील प्रक्रिया पारदर्शक असून त्यामध्ये कोणताही प्रकारचा मानवी हस्तक्षेप करता येत नाही, असे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रकियेच्यावेळी ईव्हीएम जोडताना मतदान कक्षात स्वतंत्र वीज जोडणी असल्याची खात्री करावी. ईव्हीएमवर सूर्यप्रकाश, पाऊस आदी तांत्रिक बाबीचा होणारा परिणामाबाबत पडताळणी करुन घ्यावीत. यासाठी निवडणूकीपूर्वी अभिरुप मतदान (मॉकपोल) घेण्यात यावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळताना घेण्यात येणाऱ्या दक्षतेबाबत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे. (Election Commission Of India)
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयामध्ये शिबीरे, प्रश्नंमजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमाचा वापर करावा.
सहसचिव श्री. सहानी म्हणाले, सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी ईव्हीएम ताब्यात घेताना आवश्यक तांत्रिक बाबी विचारात घेऊनच ताब्यात घेण्यात याव्यात. व्हीव्हीपॅटमध्ये तांत्रिक अडचण असल्यास संपूर्ण संच बदलण्यात येतो, असेही श्री.सहानी म्हणाले.
भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी ईव्हीएम हाताळताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम बाबतचे गैरसमज व त्याअनुषंगाने करावयाच्या उपायोजना, ईव्हीएम विषयी न्यायालयीन याचिका, न्यायनिवाडे, परिपत्रके, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मॉकपोल, व्हीव्हीपॅट, निवडणूक साहित्य वाटप, साहित्य ताब्यात घेताना घ्यावची काळजी आदी विषयाबद्दल माहिती दिली.
यावेळी राज्यातील विविध जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक प्रकियेत काम करताना आलेले अनुभव मांडले.
0000
News Title | EVM Process |  There is no human intervention in the process in EVM
:  Chief Electoral Officer Shrikant Deshpande

State Election Commission| मतदार नोंदणीच्या मोहिमेत महानगरपालिका आयुक्तांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार | मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

State Election Commission|  मतदार नोंदणीच्या मोहिमेत  महानगरपालिका आयुक्तांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार

| मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

State Election Commission | भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशानुसार आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आदी महानगरांमध्ये मतदार नोंदणीसाठी (Voter Registration) विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी कार्यगटामध्ये तेथील महानगरपालिका आयुक्तांना (Municipal Commissioner) सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा मतदार नोंदणी तसेच मतदार यादी शुद्धीकरणासाठी चांगला लाभ होईल, असे मत अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Élection Officer Shrikant Deshpande) यांनी व्यक्त केले. (State Election Commission)
‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४ व इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी)’ या विषयावर यशदा येथे आयोजित महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेतील सत्रात मार्गदर्शन करताना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर आदी उपस्थित होते. (Lok Sabha election)
यावेळी श्री. देशपांडे म्हणाले, मोठ्या शहरातील मतदानाबाबतची उदासीनता कमी करण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोग गंभीर आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना या प्रक्रियेत सहभागी करुन घेतल्यास प्रभावी काम होईल. संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत मतदार यादी शुद्धीकरण करत असताना कोणतेही शंकेला वाव राहू नये यासाठी प्रारूप मतदार याद्यांमधील नावे वगळणी, नवीन नावे समाविष्ट करणे आदीसंबंधाने हरकतीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रकरणी योग्य कार्यपद्धतीने नोटीस देणे आणि त्यानंतर सुनावणी घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले.
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) संख्या कमी असलेल्या शहरी मतदार संघात बीएलओ नेमणुकीसाठी नागरी स्वराज्य संस्थासोबत समन्वयाने काम करावे. प्रत्यक्ष निवडणुक कामकाजासाठी मनुष्यबळाची कमतरता असलेल्या मतदारसंघासाठी नागरी स्वराज्य संस्था, केंद्रीय कार्यालये आदी कडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबत पर्याय तपासून काम करावे.
आगामी निवडणूक वर्ष पाहता निवडणूक कामकाजासाठी आवश्यक बाबींची खरेदी, भाड्याने साधनसामग्री, सेवा घेणे आदी कामकाज वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे जेणेकरून ऐनवेळी अडचणी उद्भवणार नाहीत. त्यासाठी राज्यभरातील जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आदर्श अशी कार्यपद्धती उपयुक्त व्हावी म्हणून १३ प्रकारच्या ई- निविदांचे नमुने तयार करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले
यावेळी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक श्री. अजमेरा म्हणाले, आता होणारे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हे लोकसभा निवडणूक पूर्वी होणारे शेवटचे पुनरिक्षण असल्याने त्याला सर्वाधिक महत्व आहे. मतदार याद्या पूर्णतः शुद्ध करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपल्या कामकाजावर भारत निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष असून चांगल्या कामाची दखलही तातडीने घेतली जाते. पुणे जिल्हाधिकारी यांनी मतदार यादी शुद्धीकरण, नव मतदार नोंदणी साठी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट ईलेक्टोरल प्रॅक्टिसेस’ साठी पुरस्कार देत घेतल्याचे दिसून येते, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यावेळी पुणे जिल्ह्यात नव युवा मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा सहभाग घेत एकाच दिवशी ४४५ हून अधिक महाविद्यालयात विशेष मोहिम राबवून ४८ हजार पात्र विद्यार्थ्यांचे मतदार नोंदणी अर्ज घेण्यात आले असे सांगितले. असा उपक्रम इतर जिल्ह्यातही राबविण्याबाबत सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी केल्या.
यावेळी सहमुख्य निवडणूक अधिकारी श्री. पारकर यांनी निवडणूक आयोगाच्या नवीन सूचना, परिपत्रके यांची, तसेच लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने माहिती दिली. निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक, अतिसंवेदनशील (क्रिटिकल) मतदान केंद्रासह एकूणपैकी ५० टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा करणे, मतदान केंद्राच्या आत व परिघाबाहेरील व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेबाबत घ्यायची काळजी आदी अनुषंगाने श्री. पारकर यांनी माहिती दिली. उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम कार्यक्रमाची माहिती दिली. सर्व राजकीय पक्षांची बैठक घेणे, बीएलओंनी घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रृटी दूर करणे आदींबाबत माहिती त्यांनी दिली.
यावेळी मुख्य निवडणूक कार्यालयातील स्वीप समन्वयक पल्लवी जाधव यांनी स्वीप उपक्रमाबाबत सादरीकरण करुन माहिती दिली. ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब आदी समाजमाध्यमांचा मतदारजागृतीसाठी प्रभावी उपयोग कसा करता येईल आदींबाबत माहिती श्रीमती साधना गोरे यांनी दिली. प्रसिद्ध गायक, गीतकार, संगीतकार मिलिंद इंगळे यांच्याकडून निवडणूक विभागाचे ब्रँड गीत बनवून घेण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

– निवडणूक निविदा समिती अहवाल सादर

यावेळी सोलापूरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या निवडणूक निविदा समितीने आपला अहवाल मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांना सादर केला. यावेळी समितीतील सदस्यांचा सत्कार श्री. देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आला.
0000
News Title | State Election Commission  Municipal commissioners will be actively involved in the voter registration campaign
 |  Chief Electoral Officer Shrikant Deshpande

Breaking News | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का | ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला!

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला!

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी  हा मोठा धक्काच आहे.

शिवेसेनेत (Shiv Sena) बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले शिंदे गट आणि उद्धव ठाकरे  यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती.  या सुनावणीवर आयोगाने आज अखेर निकाल दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे.शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले.

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यापासून धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली.  यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.

सुनावणी दरम्यान, दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निकाल दिला आहे.  काही महिन्यातच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरच आज आयोगाने चिन्हावर निर्णय दिला आहे.