Dr Kumar Saptarshi | ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान’ डॉ.कुमार सप्तर्षी यांना प्रदान

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र
Spread the love

 

‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान’
डॉ.कुमार सप्तर्षी यांना प्रदान

| इतरांवर मत न लादणं हे डॉ. सप्तर्षी यांचं वैशिष्टय : डॉ.मोहन आगाशे

| लोकांनी सत्यातील रस सोडू नये | डॉ.कुमार सप्तर्षी

पुणे : नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान ‘ विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष ,ज्येष्ठ लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान करण्यात आला . मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकाकरीता असलेल्या ‘प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारा’साठी पोपट श्रीराम काळे यांना ‘काजवा’ या आत्मकथनासाठी प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रुपये ११ हजार रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ . मोहन आगाशे यांच्या हस्ते शनिवार ,दि. १ एप्रिल रोजी ,सायंकाळी साडे पाच वाजता कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात डॉ. कुमार सप्तर्षी आणि पोपट काळे यांना हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान(नांदेड)च्या वाङ्मय पुरस्कारांचे हे २२ वे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. खा. सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाआधी डॉ. सप्तर्षी यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, वाङ्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत आणि अभंग पुस्तकालय चे संजीव कुळकर्णी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन,संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, काँटिनेंटल प्रकाशनच्या अमृता कुलकर्णी, लिज्जतचे मार्गदर्शक सुरेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते.हा सोहळा गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात झाला.

डॉ.मोहन आगाशे म्हणाले, ‘सप्तर्षी यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते कुणावरही आपले मत लादत नाहीत, तर एखाद्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या सर्व बाजू अभ्यासपूर्ण आणि विश्लेषण करून मांडतात, समजावून सांगतात, त्यामुळेच त्यांचे मुद्दे ऐकणाऱ्याला पटतात, त्यामुळेच त्यांचे कडे अनेक अनुयायी आकर्षित होतात.दर्जेदार साहित्य हाच शिक्षणाचा मुलभूत पाया असतो. पाठ्यपुस्तकापेक्षाही आपल्याला ही जीवनानुभव देणारी पुस्तके अधिक समुद्र, आणि संस्कारक्षम बनवतात.त्यामुळे मला असे वाटते की लेखक आणि कवींच्या संगतीत राहिल्याने आपले जीवन नक्कीच अधिक समृद्ध आणि सृजनशील होवू शकते, अशी संधी ज्याने त्याने शोधली पाहिजे!

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘लोकशाहीत लोकांना स्वतःच शहाणं व्हावे लागते, हे खरं असलं तरी काही वेळा लोकांना थापा ऐकण्याची इतकी सवय झालेली असते की, अदानी बद्दल केजरीवाल यांनी कितीही प्रश्न विचारले तरी पंतप्रधान मोदी उत्तरच देत नाहीत, उलट वेगवेगळ्या थापाच मारतात! आणि लोकांना त्या ऐकण्यात मजा वाटते. लोकांना सत्य ऐकण्यात रस नाही.मोदी यांना पुन्हा निवडून दिल्यास सत्य बोलणारे तुरुंगात दिसतील आणि खोटं बोलणारे बाहेर किंवा सत्तेत असतील.सत्ता हे भ्रष्टाचाराचं स्थान आहे असं आपल्याला खोटं सांगितलं जातं, खरंतर ज्या आमदारांच्या मनात भ्रष्टाचार करायची भावना असते तेच भ्रष्टाचार करतात, ज्याला इमानदारीने राहायचे तो सत्तेतही इमानदार राहू शकतो.पूर्वी फक्त काही मोजके लोक लेखन करीत असत, आता सोशल मीडिया मुळे ही संधी सर्व सामान्य लोकांना मिळू लागली आहे, ही अमूल्य संधी मानून, सर्वांनी आपल्या मनातील भावना, जीवनानुभव लिहिण्याची आवश्यकता आहे. युरोपीय देशांत अगदी पूर्वीपासून अगदी छोट्या छोट्या अनुभवांवर प्रचंड लेखन होते, आणि त्याची पुस्तकेही प्रकाशित होतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुरेश सावंत यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.अच्युत बन यांनी केले. संजीव कुलकर्णी यांनी सप्तर्षी कारकिर्दीचा यावेळी आढावा घेतला.