Hemant Rasne Vs Ankush Kakade : शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली  : राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला 

Categories
Breaking News PMC Political पुणे

शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली

: राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला

पुणे : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्तांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्थायी समिती बरखास्त होत नाही, असा मुद्दा रासने यांनी मांडला होता. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी रासने यांना टोला लगावला आहे. शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली, असा शाब्दिक टोला काकडे यांनी लगावला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनाही काकडे यांनी टोला लगावला आहे.
काकडे म्हणाले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री हेमंत रासने यांनी अट्टाहासाने, स्थायी समिती रद्द होत नाही, यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे विनाकारण महानगरपालिकेला विधी खात्याला जो खर्च झाला त्याला जबाबदार कोण ? शेवटी  रासने यांची आपली हौस फिटली, पण महानगरपालिकेला मात्र आर्थिक बोजा पडला त्याला जबाबदार कोण? पण शेवटी हेमंत रासने यांची हौस फिटली असेच म्हणावे लागेल. चंद्रकांत दादा अतिशय चांगले अभ्यासू अध्यक्ष आपण पुणे महानगर पालिकेला दिले त्याबद्दल आपले देखील मनःपूर्वक अभिनंदन.

Ankush Kakade Vs Girish Bapat : बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे 

Categories
Breaking News Political पुणे

बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे

: राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा टोला

पुणे : पुण्यातील पाणी प्रश्नावरुन राजकारण तापलं आहे. खासदार गिरीश बापट कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग करत  बाहेर पडले होते. आयुक्तांच्या ( Pune Municipal Commissioner)घरी पाण्याचे प्रेशर चांगलं, पण त्यांना इतर प्रेशरच जास्त’ असा टोला गिरीश बापट यांची लगावला होता. यावरुन आता राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade)यांनी गिरीश बापटांवर निशाणा साधला आहे. “गिरीश बापट यांना आत्ताच पाण्याची टंचाई का जाणवू लागली ” असा प्रश्न अंकुश काकडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच  बापटांनी मोहोळांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते पाहावे आणि जनतेला सांगावे, असा टोलाही काकडे यांनी लगावला आहे.

”पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होतं, त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे ही वस्तुस्थिती आपली भाजपची कारकीर्द संपल्यानंतर गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहे,” असा टोला काकडेंनी बापटांना लगावला आहे.

”बापटांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली, माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे आणि जनतेला सांगावे. गेल्या पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्त वर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील भाजपचा महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही,” असे अंकुश काकडे म्हणाले.