Pune City Woman Congress : शहर महिला काँग्रेस तर्फे अनोखे आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शहर महिला काँग्रेस तर्फे अनोखे आंदोलन

पुणे : पुणे  शहर महिला काँग्रेस तर्फे मकर संक्रांत निमित्त  भाजप सरकार उज्ज्वला गॅस योजना वान परत भेट करण्याचे  आंदोलन आज महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे व पुणे शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष पूजा आनंद यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी उपस्थित होते.

संध्या सव्वालाखे म्हणाल्या, सर्व सामान्यांना न परवडणारे उज्ज्वला गॅस सिलेंडर मोदींना परत करणार. अच्छे दिनाचे  स्वप्न दाखवणाऱ्या या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्व सामान्यांचे जगणे मुशकील केले आहे. इंधन व गॅस दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढल्याने महिलांचे किचन बजेट कोडमडले आहे. उज्वला गॅसची  सबसिडी कमी केल्याने गरीब महिलांना गॅस सोडून पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे,त्या मुळे  महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर परत करून मोदी सत्कार चा निषेध करत आहोत. महागाई वाढवून केंद्र सरकारने महिलांच्या संक्रांतीच्या उत्साहावर विरजण टाकण्याचे काम केले आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे  दर गगनाला भिडले आहेत. पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करून महिलांना उज्ज्वला योजने मार्फत मोफत गॅस देण्याची घोषणा केली. मात्र आता गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड वाढल्याने महिलांना गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही. उज्वला योजनेच्या  बहुतांश लाभार्थ्यांनी आता गॅस सिलेंडर अडगळीत टाकले असून महिलांना परत जुन्या चुलीवर स्वयंपाक करावे लागणार आहे.

पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा आनंद म्हणाल्या, दरवाढ केली मोदीने आणि आता त्याचा त्रास महिलांना संसार चालवण्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ज्या महिलांनी  चुल सोडून गॅस चे कनेक्शन घेतले त्यांना पुन्हा मोदी सरकारच्या ना करते पणामुळे गॅसचे दर १००० रुपय च्या आसपास पोचले आहे. घर खर्च नाकेनऊ झाले आहे. मोदी सरकारने महिलांना चुलीवर जाण्यास भाग पाडले  आहे, त्यामुळे महिलां मध्ये प्रचंड आक्रोश वाढले आहे, आता परत भाजपा  ला कधी महिला मत देणार नाही.

या आंदोलनास संगीता तिवारी, उज्ज्वला साळवे, अस्मिता शिंदे, शोभा पनीकर, इंदिरा आहिरे, सुजाता चिन्ता, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, स्वाती शिंदे, वैशाली मराठे, पल्लवी सुरसे,  सीमा सावंत व अनेक महिला उपस्थित होते.

आंदोलनाचे आयोजन  पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा आनंद यांनी केले.

Pune Mahila Congress : अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात महिला काँग्रेसचं जोरदार आंदोलन. 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात महिला काँग्रेसचं जोरदार आंदोलन.

पुणे: अभिनेत्री कंगणा राणावतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक विधानाविरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतिने आज राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस दिप्ती चवधरी,भूषण राणभरे,अजित जाधव, द.स. पोळेकर,रमेश अय्यर,राहुल सोनवणे,  उपस्थित होते.
यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व प्रदेश सचिव सोनाली मारणे म्हणाल्या की, “एक विकृत बुद्धीची तीनपाट नटी अन्नदात्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणते, महाराष्ट्राची शान असणाऱया मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणते आणि आता समस्त राष्ट्रीय नेते आणि भारतीयांनी प्रचंड संघर्ष करून, गोळ्या झेलून, तूरूंगवास भोगून, लाठ्या काठ्या घेऊन मिळविलेल्या स्वातंत्र्याला भिक म्हणते…. ही विकृती आली कुठून ? हिच्या मुखातून कोणाचे विचार बाहेर पडत आहेत ? याचा विचार करण्याची वेळ आता आलीय…… या विकृत बाईला परवाच आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं अवमूल्यन थांबलं पाहिजे. या पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्यासाठी ताबडतोब तिचा पुरस्कार काढून घेणं गरजेचं आहे. केंद्र सरकारनं हे ऐवढं तरी करावं अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. मागे एकदा खा. प्रज्ञा ठाकूर या दूसर्या एका विकृत बाईने राष्ट्रपिता महात्माजी गांधींबद्दल असंच विधान केलं होतं. भाजपाच्या युवा आघाडीची एक वेडसर पोरगी असंच मागे स्वातंत्र मिळालं नसून करार झाला म्हणाली…..
गांधीजी, नेहरूजी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल संघ परीवाराला एक असूया आहे, राग आहे. कारण ही मंडळी त्या वेळी इंग्रजांच्या बाजूची होती. इंग्रजांशी एकनिष्ठ राहण्याच्या यांनी शपथा घेतल्या होत्या. स्वातंत्र सैनिकांच्या गुप्त खबरा हे इंग्रजांना पूरवायचे, इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. म्हणून संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्याची यांना चिड आहे. ती कंगणाकडून हेच लोक वदवून घेत असण्याची शक्यता आहे…. देशभक्तीचे नारे देऊन, भारतमातेच्या घोषणा देऊन, महापुरूषांचा वारसा आंम्ही चालवतो म्हणत, उठता बसता  वंदे मातरम् म्हणणारे भाजपवाले आता या देशाच्या स्वातंत्र्याचा असा अपमान होताना कुठं लपून बसले आहेत ? मोदीजी का कांहीच बोलत नाहीत, अमित भाईंचं का कांही स्टेटमेंट नाही ? JNU, दिल्ली विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ, जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर खोटे आरोप करून देशद्रोहाचे खटले लादणारं केंद्र सरकार कंगणा नावाची विकृती ठेचणार आहे का ? कि बक्षीस म्हणून तिला भारतरत्न बहाल करणार आहात ?
मोदीजी, आता तूम्हाला १५ आगस्ट, २६ जानेवारीला लाल किल्यावरून देशाला संबोधित करायचा नैतिक अधिकार अबाधीत ठेवाय चचा असेल तर कंगणाचा पद्मश्री काठून घ्या. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा करू…
बघू तूमची हिंम्मत आणि बघू तूमचं देशप्रेम “