PMC Commissioner | आयुक्त साहेब नागरिकांना भेटण्यासाठी वेळ द्या

Categories
Breaking News PMC social पुणे

आयुक्त साहेब नागरिकांना भेटण्यासाठी वेळ द्या

| रयत स्वाभिमानी संघटनेची मागणी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ द्यावी. नागरिकांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि त्याचा निपटारा करावा. अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेने केली आहे. (PMC Commissioner Vikram Kumar)

रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नागरिकांना भेटण्याची वेळ सोमवार व शुक्रवार 10:30 ते 11:30 अशी आहे. आठवड्यातील फक्त दोन तास नागरिकांसाठी प्रशासक म्हणून आपले मिळत आहेत. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालावे व त्यात पण जर तुम्हाला कोणती अर्जंट मिटींग असेल किंवा तुमचे काही काम असतील तर या दिवशी कोणालाही तुम्हाला भेटता येत नाही; त्यामुळे नागरिकांच्या समस्यांवर एकंदरीत चर्चा होताना पुणे महानगरपालिकेमध्ये दिसत नाही. त्याचबरोबरने नागरिकांनी आपल्या समस्या कोठे आणि कोणापाशी मांडायच्या याबाबत आजही नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. बाकी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर अधिकाऱ्यांचा एकच सूर दिसून आला आहे, आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, मग जर महानगरपालिकेकडे निधीच उपलब्ध नसेल तर त्यांनी नवीन 23 गाव समाविष्ट करून घेण्याची भूमिका किंवा हिम्मत का दाखवली? आम्हाला प्रश्न पडतोय समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये विविध प्रश्न उपस्थित आहेत आणि ते प्रश्न कोणापाशी, कुठे आणि कसे मांडावेत याबाबत नागरिकांना कसलीही माहिती नाही व याबाबत महानगरपालिका आयुक्तांना भेटून प्रश्न विचारावे तर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे वेळच नाही. (PMC Pune)

महानगरपालिका प्रशासन हे प्रशासकाच्या हाताखाली चालतंय की स्थानिक व माजी नगरसेवकांच्या मर्जीनुसार चालतंय याबाबत आम्हाला प्रश्न पडत आहेत कारण कोणतीही गोष्ट अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्या गोष्टीची रिपोर्टिंग ही स्थानिक नगरसेवकांना केली जाते मग अधिकाऱ्यांना पगार प्रशासक किंवा शासन देतं की नगरसेवक देतात हा संशोधनाचा विषय आहे.
या सर्व बाबींवरून मला महानगरपालिकेच्या आयुक्तांना एकच नम्र विनंती करायची आहे की आपण आठवड्यातले पाचही दिवस किमान दोन तास तरी नागरिकांसाठी खुले करावेत प्रत्येक दिवशी दोन तास नागरिकांना भेटण्यासाठी राखीव करावेत किंवा पूर्ण वेळ नागरिकांसाठी काम करावे आम्ही देखील समजू शकतो की आपणास प्रशासकीय वेगवेगळी कामामध्ये व्यस्त असतात यामुळे आपल्याला पूर्ण वेळ नागरिकांना भेटता येत नसेल परंतु दिवसातला ठराविक वेळ हा नागरिकांच्या प्रश्नांसाठी द्यावा अशी विनंती मी एक सामान्य नागरिक म्हणून आपणाकडे करू इच्छितो आणि आपण या विनंतीला मान देऊन याकडे गांभीर्याने लक्ष घालून आपली नागरिकांसाठी असणारे भेटण्याचे धोरण लवकरात लवकर बदलाल व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे. (Rayat Swabhimani Sanghatana)

त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जी मोहल्ला कॉर्नर सभा होते ती सभा दर आठवड्याच्या कोणत्याही एका दिवशी ठेवावी म्हणजे यातून किमान नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी चार दिवस मिळतील,  आपण मोहल्ला कॉर्नर हे व्यासपीठ निर्माण केला आहे. त्या व्यासपीठात न्याय मिळेल व जास्तीत जास्त नागरिक यामध्ये सहभाग नोंदवतील आणि आपले प्रश्न मांडतील त्यामुळे जसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दर सोमवार जनसभा होते. त्याचप्रमाणे आपणही आठवड्यातील एक दिवस मोहल्ला कॉर्नर घ्यावेत या सर्व बाबींवर आपण सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आपणा विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहील व नागरिकांच्या रोशाला आपल्याला सामोरे जावे लागेल. असा इशारा रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी आयुक्तांना दिला. यावेळी  रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे इत्यादी उपस्थित होते