Temprature : Pune : पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार : तापमानाचा पारा वाढणार 

Categories
Breaking News social पुणे

पुणेकरांना काळजी घ्यावी लागणार : तापमानाचा पारा वाढणार

उन्हाळा कडक राहणार असल्याचा हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाचा पुणेकर यंदा अनुभव घेत आहेत. गेले काही दिवस शहराचे कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत सातत्याने अधिक राहत आहे. त्यात हवामान विभागाने पुण्यातील कमाल तापमान ४१ अंशांवर जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आणखी कडक उन्हाळा सहन करण्याची तयारी पुणेकरांना करावी लागणार आहे.

सध्या दुपार होताच अंगावर चटका बसावा, असे उन्ह जाणवत असते. त्यामुळे शहरातील रहदारीही मंदावलेली दिसून येते. गेल्या वर्षी लॉकडाऊन असताना ४० अंशांवर तापमान गेले नव्हते. एप्रिल २०२१ मध्ये सर्वाधिक कमाल तापमान ६ एप्रिल रोजी ३९.६ अंश नोंदविले गेले होते. २०२० मध्ये २९ एप्रिलला ४०.१ अंश सेल्सिअस तापमान होते. २०१९ मध्य २९ एप्रिल रोजी ४३ अंशांपर्यंत पारा चढला होता.

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकत आहे. ७ व ८ एप्रिल रोजी शहरात ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. गेले १५ दिवस सातत्याने कमाल तापमान ३९ अंशांच्या पुढे राहिले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी (दि. १८) शहरातील कमाल तापमान ४१ व किमान तापमान २२ अंश राहण्याची शक्यता आहे. १९ एप्रिल रोजी ४०/२२, २० व २१ एप्रिल रोजी ३९/२३ तर २२ एप्रिल रोजी ३९/२४ आणि २३ एप्रिल रोजी ३८ /२५ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हे पाहता, पुढील दोन दिवस शहरात दिवसा वाढते तापमान राहणार असून, पुढे रात्रीच्या तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

April will be hotter : मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये अजून गरम होणार!  : मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.

Categories
Breaking News social आरोग्य महाराष्ट्र

मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये अजून गरम होणार!

: मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता…

मार्चच्या तुलनेत एप्रिल महिन्यात अधिक गरमी असू शकते, असा हवामान विभागाने दिलेला इशाऱ्याचा प्रत्यय एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत येत असून विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये बुधवारी व गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. सर्वांत कमी किमान तापमान पुण्यात १५.६ अंश सेल्सिअस आहे.

विदर्भातील अकोला, चंद्रपूर, अमरावती या परिसरात उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंशाचे पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

पुणे ३९.७, लोहगाव ३९.६, कोल्हापूर ३८.३, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.७, सांगली ४०.२, सातारा ३९.५, सोलापूर ४२.८, मुंबई ३२.७, सांताक्रूझ ३१.८, रत्नागिरी ३१.६, पणजी ३३.३, डहाणू ३३.७, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.२, नांदेड ४१.८, अकोला ४३.५, अमरावती ४२, बुलडाणा ४०.२, ब्रम्हपुरी ४१.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, नागपूर ४१.१, वाशिम ४१, वर्धा ४२.४.