Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

Maharashtra Politics | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पत्रकार परिषद महत्वाचे मुद्दे

 देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीनंतर म्हणजे 1994 सालानंतर एका नेत्याच्या नेतृत्वाखाली देशात सरकार आले आहे.
 पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व खंबीर, त्यामुळे परदेशात सुध्दा मोदी साहेबांना मोठा काम.
 देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. त्यामुळे मा. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
 आम्ही सगळ्यांनी एकत्रित निर्णय घेऊन सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय.
 अनेक दिवस चर्चा सुरु होती. देशपातळीवरील आणि राज्याच्या परिस्थितीचा विचार करुन विकासासाठी आम्ही सरकार मध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला.
 मोदीसाहेब देशाला मजबुतीने पुढे नेत आहेत.
 देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान मोदी साहेब करत आहेत, म्हणूनचं त्यांना पाठींबा देण्याचा निर्णय.
 विकासाला महत्व देण्यासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय.
 शुक्रवारी विरोधी पक्षपदाचा राजीनामा दिला.
 इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देण्याची गरज आहे. तरुणांना संधी देणार. त्यामुळे आदिती तटकरे, संजय बनसोडे या तरुणांना संधी.
 महिला, आदिवासी, ओबीसींना मोठ्या प्रमाणात सत्तेत संधी.
 आम्ही आमच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोना असून सुध्दा विकासाकामे केली.
 आपण विकासाला महत्व देऊनच काम करतो, टीका टिपणीला महत्व देत नाही.
 पक्षातल्या बहुतेकांना आमचा निर्णय मान्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सरकार बरोबर.
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आणि पक्षाच्या चिन्हावर या पुढच्या निवडणुका लढविणार.
 घड्याळ या चिन्हावरच पुढच्या निवडणुका लढविणार.
 आम्ही शिवेसेनेबरोबर जाऊ शकतो तर भाजप बरोबर सुध्दा जाऊ शकतो. नागालँण्डमध्ये पक्ष यापूर्वीच भाजप बरोबर आहे.
 पक्ष वाढीसुध्दा आम्ही सर्वस्व पणाला लावणार.
 काही आमदार बाहेर आहेत, संध्याकाळपर्यंत ते मुंबईत पोहोचतील.
 पक्षाचे आमदारांसह कार्यकर्ते सुध्दा आमच्यासोबत आहेत.
 लोकशाहीत बहुमताला महत्व, त्यामुळे बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतला आहे. पक्ष आमच्या सोबत आहे, नेते आमच्या सोबत आहेत. वरिष्ठांशी चर्चा करुनच निर्णय घेतला आहे.
 महाराष्ट्रातल्या तरुणांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेत.
 राज्यात एका पक्षाचे सरकार येण्याचे दिवस संपले त्यामुळे सहकारी पक्षांना सोबत घेऊनच राज्यातील सत्ता चालवावी लागले.
 राज्याचं आणि देशाचं हित बघुनचं सत्तेत येण्याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला.
******