Navratri Mahostav | “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा” | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात लहान मुले रमली ‘चिंटू’समवेत चित्रांमध्ये!

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Navratri Mahostav | “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा” | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात लहान मुले रमली ‘चिंटू’समवेत चित्रांमध्ये!

 

Navratri Mahotsav | शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणातील भव्य मंडपात ४००हून अधिक लहान मुलांच्या उपस्थितीत चित्रकार चारुहास पंडित (Charuhas Pandit)यांनी ‘चिंटू’चे (Chintoo) चित्र काढले आणि लहान मुलांच्या टाळ्यांच्या कडकडाटात एकच भावना तयार झाली की, “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा”! या प्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल (Jayashri Bagul) उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात झालेल्या लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी या वयोगटासाठी ‘गणेशोत्सव’ आणि ‘आवडता प्राणी’ तसेच इयत्ता पाचवी ते सातवी वयोगटासाठी ‘माझा स्वप्नातील भारत’ आणि ‘समुद्रकिनाऱ्यावर खेळणारी मुले’ असे विषय देण्यात आले होते.

२४व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात झालेल्या लहान मुलांच्या या चित्रकला स्पर्धेत शेकडो लहान मुले-मुली ‘चिंटू’ आणि चित्रांमध्ये रमली. पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रख्यात चित्रकार ‘चिंटू’फेम चारुहास पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मुलांना चारुहास पंडित यांनी आवडत्या ‘चिंटू’चे चित्र रेखाटून आनंद दिला. यावेळी चित्रकार चारुहास पंडित यांनी आबा बागुल आणि जयश्री बागुल यांचे कौतुक करून म्हटले की, “तुम्ही सौंदर्यदृष्टी असणारे भावी नागरिक घडवत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन करतो.”

प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत करून चित्रकार चारुहास पंडित यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “शाळा आणि कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच लहान मुलांमध्ये खेळ आणि चित्रकला, गायन, वादन, नृत्य अशा कलांचेदेखील शिक्षण द्यायला हवे. कलेमुळे आनंद तर मिळतोच, शिवाय कौतुकही होते. चित्रकार चारुहास पंडित यांनी चितारलेला ‘चिंटू’ आज महाराष्ट्रात घराघरात आणि मनामनात पोहोचला आहे. त्यांचा आदर्श लहान मुलांनी घ्यावा,” असे ते म्हणाले.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी मुलांना शुभेच्छा देऊन म्हंटले की, “लहान मुलांच्या मनातील भावविश्वाचे दर्शनच आजच्या चित्रांमधून दिसून येत आहे. या लहान मुलांमधील सुप्त गुण लक्षात घेऊन पालकांनी त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे. बी.ए., बी.कॉम. जरूर व्हा, त्याचबरोबर आपल्या जीवनाला कलेची जोड द्या आणि त्याची सुरुवात लहान वयापासूनच व्हावी,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम बागुल यांनी केले. प्राजक्ता ढवळे यांनी आभार मानले.

प्रत्येक गटात प्रथम क्रमांक ३,००० रुपये, दुसऱ्या क्रमांक २,००० रुपये व तिसऱ्या क्रमांक १,००० रुपये आणि उत्तेजनार्थ आणि दोन बक्षिसे दिली गेली. सर्व सहभागी मुला-मुलींना भेटवस्तू आणि खाऊ दिला गेला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –

इयत्ता पहिली ते चौथी वयोगट
प्रथम – अनन्या कुंजीर
द्वितीय – रिमाश शिंदे
तृतीय – तन्मय शिंदे

इयत्ता पाचवी ते सातवी वयोगट
प्रथम – संस्कृती पाचंगे
द्वितीय – मयुरी भागवत
तृतीय – अर्जून महाडिक

Adarsh Mata Award | आदर्श माता पुरस्काराने जयश्री बागुल सन्मानित

Categories
Breaking News cultural social पुणे

Adarsh Mata Award | आदर्श माता पुरस्काराने जयश्री  बागुल सन्मानित

| ‘इंटरनेट,’एआय’च्या  जमान्यात कौटुंबिक आपलेपणा वाढविण्याची नवी जबाबदारी आता प्रत्येक आईवर’

Adarsh Mata Award | सद्यस्थितीत  विविध दूरचित्रवाहिन्या पाठोपाठ  मोबाईल, इंटरनेट ,व्हाट्सअप ,इंस्टाग्राम, ट्विटरच्या जगात मुलं पालकांपासून दूर जात आहे. त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात पालक आणि मुलं यांच्यातील अंतर अधिक वाढणार आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवून कौटुंबिक आपलेपणा मुलांमध्ये वाढविण्याची नवी जबाबदारी आता प्रत्येक आईवर  येऊन ठेपली असून कुटुंबातील संवाद हाच नात्यांमधील जिव्हाळा वाढवेल असे प्रतिपादन पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री आबा बागुल (Jayashri Aba Bagul) यांनी केले. (Adarsh Mata Award)
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, जय शंकर ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्रीराम योग साधना,धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने जयश्री आबा बागुल  यांचा ज्योतीकुमार अग्रवाल यांच्या हस्ते  आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी व्यासपीठावर पुणे महापालिकेच्या सहायक आयुक्त  सुरेखा शिंदे, रविंद्र गोलार,भारती विद्यापीठ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शंकरराव पाटील, माजी नगरसेविका अश्विनी भागवत आदी उपस्थित होते.

यावेळी जयश्री बागुल म्हणाल्या कि, माझे पती माजी उपमहापौर आबा बागुल यांच्यासोबत प्रदीर्घ काळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा अनेक क्षेत्रात मी काम करीत आहे.  मात्र समाजासाठी वेळ देताना घराकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेत राहते. मुलांना लहान वयापासून वाढवताना आईने त्यांच्यावर केलेले संस्कार हेच अतिशय महत्वाचे असतात. प्रत्येक आई आपल्या मुलांवर चांगलेच संस्कार करते.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही म्हण अतिशय सार्थ आहे.  मी माझ्या मुलांचे संगोपन केले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले.  आता सुना आणि नातवंड यांनी भरलेल्या ‘गोकुळा’त मी रमून जाते.  अधून मधून वृद्धाश्रमाबद्दलच्या बातम्या ऐकू येतात तेव्हा वाईट वाटते.  कोणतीच आई वृद्धाश्रमात जायला नको असे मला वाटते. असेही  त्या म्हणाल्या.
——
News Title | Adarsh ​​Mata Award | Jayashree Bagul honored with Adarsh ​​Mata Award