Pune Congress | निष्ठावंतांना संधी द्या | काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक | पर्वती मतदारसंघाच्या बैठकीत आबा बागुल यांच्यासाठी निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

Pune Congress | निष्ठावंतांना संधी द्या | काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक

| पर्वती मतदारसंघाच्या बैठकीत आबा बागुल यांच्यासाठी निर्धार

Pune Congress – (The Karbhari News Service) – यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे,अन्यथा त्याचे विपरीत पडसाद सहाही विधानसभा मतदार संघात निश्चित उमटतील. अशी आक्रमक भूमिका घेत पर्वती विधानसभा मतदार संघातील सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पक्ष श्रेष्ठींनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा तटस्थ राहण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या निरीक्षक व अन्य पदाधिकाऱ्यांना दिला.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघांची पूर्वनियोजित बैठक झाली.माजी उपमहापौर श्री. आबा बागुल यांनी या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन केले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे असा थेट सवाल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना विचारला. ज्यांनी आजवर पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केले. त्यांनाच बाजूला सारण्याचे राजकारण होत असेल तर आता पक्षाच्या श्रेष्ठींनी निष्ठावंत म्हणजे काय ? याची व्याख्या जाहीररीत्या सांगावी.असे आव्हानही यावेळी भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी दिले. कोणत्याही स्थितीत निष्ठावंतांना संधी मिळालीच पाहिजे तरच एकदिलाने काम केले जाईल असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांना थेट सांगितले.

The Karbhari - Pune Loksabha election

याप्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे. काँग्रेसचा निष्ठावंत आहे.सलग ३०वर्षे निवडून येत आहे आणि विकासाला सदैव प्राधान्य दिले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात रुजवली आहेत.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षात मरगळ होती. त्यामुळे जाहीर सभा घ्या,आणि पुणेकरांचा कौल घेवून उमेदवार ठरवा हे पत्र दिले.  मात्र त्याला लेटर बॉम्बचे स्वरूप दिले. मात्र काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत आहे हे वातावरण निर्माण झाले.ते पत्र जर लेटर बॉम्ब होते. मग आता पुढे पहा काय होते. पुढील भूमिका ही कार्यकर्ते,समर्थक ,मतदारांशी बोलून लवकरच ठरवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच आताचे जे स्थानिक नेते आहेत. त्यांना पूर्वी कुणी थारा देत नव्हते. अशा नेत्यांची नावे विकासकामांच्या कोनशिलेवर माझ्याच आग्रहामुळे आयुष्यभर कोरली गेली.याची आठवणही आबा बागुल यांनी पक्षांतर्गत राजकारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना यावेळी करून दिली.

यावेळी निरीक्षक मुख्तार शेख, अभय छाजेड,द.स पोळेकर,मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे ,सतीश पवार,इम्तियाज तांबोळी, इर्शाद शेख आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर, संताजी प्रतिष्ठान कोथरूडचे अध्यक्ष रमेश भोज, प्रकाश कर्डिले,हरीश देशमाने,अप्पा खवळे, दिपक ओव्हाळ,ओबीसी सेल पर्वतीचे अध्यक्ष रफिकभाई अलमेल,विनायक मुळे,जयकुमार ठोंबरे,पुणे पीपल्स बँकेच्या संचालिका निशा करपे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Pune Municipal Corporation Budget | पुणे महापालिकेच्या बजेट विषयी माजी स्थायी समिती अध्यक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Municipal Corporation Budget | पुणे महापालिकेच्या बजेट विषयी माजी स्थायी समिती अध्यक्षांना काय वाटते?

Pune Municipal Corporation Budget | The Karbhari News Service – पुणे महापालिकेचे सन २०२४-२५ चे अंदाजपत्रक आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केले. याबाबत माजी स्थायी समिती अध्यक्षांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. जाणून घेऊया.
——

शहराच्या विकासाला आणखीन गती देणारा अर्थसंकल्प | हेमंत रासने

भारतीय जनता पक्षाने आपल्या महापालिकेतील शासन काळामध्ये पुणे शहराच्या विकासाला गती देण्यासाठी अनेक योजना राबवल्या. आज महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शहराच्या विकासाला आणखीन गती देणारा कोणतीही करवाढ न केल्याबद्दल पुणेकरांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानतो. तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांनी पुणे शहराकरीत १५०० बसेस मंजूर केल्या होत्या. त्यात आता ५०० बसेस ची वाढ होणार आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होईल आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.

जेनेरिक औषधांची १९ नवीन दुकाने उभारण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे. यामुळे नागरिकांना स्वस्त आणि दर्जेदार औषधे उपलब्ध होतील. तर पुणे महानगरपालिकेने चालू वर्षात ३० अभिनव शाळा निर्माण करण्याचा निर्णय शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत या निर्णयाने अजून गतिमान शिक्षणाची तरतूद पुणे महापलिकेने उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर 600 एकरामध्ये टीपी स्कीम राबवून लाेकल एरिया प्लॅन अंतर्गत 400 कोटीचे मिळणारे अनुदान हे शहराच्या नियोजन आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. अशाप्रकारे पुणे शहराच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प पुणे महापालिका प्रशासनाने सादर केला आहे. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.

———–

जमाच नाही तर खर्च कुठे ? विकासाची  होणार बोंबाबोब :  आबा बागुल 

 
 
 आज लोकप्रतिनिधी विरहित  पुणे महानगरपालिकेचे  अंदाजपत्रक सादर झाले,हे अंदाजपत्रक पाहिल्यावर फक्त अंदाजच राहणार आहे हेच स्पष्ट होत आहे. बजेटच्या जमेचा गाभा कुठेही नाही.  त्यामुळे विकासाची बोंबाबोब होणार अशी प्रतिक्रिया  स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.
प्रशासक  तथा आयुक्तांनी पुणे महानगरपालिकेचे अंदाजपत्रक सादर केले,त्यावर मत व्यक्त करताना आबा बागुल यांनी हे फुगवलेले अंदाजपत्रक असून त्यातून शहराच्या विकासासाठी काही ठोस होणे अशक्य आहे.उत्पन्नासाठी मिळकतकर आहे, मात्र त्यात सुमारे साडे चार लाख मिळकतीची  अद्यापही  कर आकारणी नाही.  त्यावर आम्ही आधीच लक्ष वेधलेले आहे पण त्यावर कार्यवाही नाही.केवळ बँड वाजवून दोन कोटी  मिळाले म्हणजे मिळकत कर जमा झाला असे नाही.त्यासाठी ठोस पर्याय बजेटमध्ये नाही.  दुसरे महत्वाचे उत्पन्नाचे साधन म्हणजे बांधकाम आणि पेड एफएसआय मात्र त्यातही ठोस अशी पाऊले उचलली,  हेही कुठे दिसत नाही. मात्र खर्चाचे  विवरण व्यवस्थित आहे. त्यात खर्च कसा करायचा.  हे मात्र बरोबर नमूद केलेले आहे. परंतु जमाच नाही तर खर्च कुठे ? हाच प्रश्न  खऱ्याअर्थाने पुणे महानगरपालिकेने सादर केलेल्या बजेटमुळे उपस्थित होत आहे. उत्पन्नासाठी  आम्ही गेली अनेक वर्षे सांगत आहोत की, जमेसाठी रेव्हेन्यू कमिटी स्थापन केली.मुख्य सभेने दिलेली ही कमिटी मात्र  या बजेटमध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली या कमिटीद्वारे सुचवलेले उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले पाहिजे.त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. फक्त पगार आणि देखभाल खर्च यावरच हे अंदाजपत्रक खर्च होणार आहे. विकासाच्या नावाने बोंबाबोंब होणार आहे असेही आबा बागुल यांनी नमूद केले आहे.   

INDIA Front Pune | महाविकास आघाडी मेळाव्याला आबा बागुलांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा | पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं नसल्याने नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा! 

Categories
Breaking News Political पुणे

INDIA Front Pune | महाविकास आघाडी मेळाव्याला आबा बागुलांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा | पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं नसल्याने नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा!

INDIA Front Pune | पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट (India Aghadi Pune melava) चा पुण्यात मेळावा होत आहे. भाजपला मात देण्यासाठी इंडिया आघाडी मजबूत करण्या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र या मेळाव्याला उपस्थित लोकांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्या नेत्यांनीच जास्त जास्त चर्चा झाली. कारण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले आबा बागूल (Aba Bagul pune Congress) यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. पक्ष संघटनेत विश्वासात घेतले जात नसल्याने बागूल मेळाव्याला आले नाहीत. अशी चर्चा कार्यकर्त्यामध्ये रंगली होती. शिवाय काँग्रेसमध्ये सातत्यानं डावललं जात असल्याने आपली योग्य पारख करणाऱ्या पक्षाकडे बागुल मोर्चा वळवतील,  अशी शक्यता देखील कार्यकर्ते वर्तवत होते.
लोकसभा निवडणूक जवळ येऊ घातली आहे. आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाला हाणून पाडण्यासाठी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट देखील कामाला लागला आहे. खासकरून पुण्यावर या लोकांचे लक्ष आहे. त्याचाच भाग म्हणून आणि आपली एकी दाखवण्यासाठी महाविकास आघडी आणि इंडिया फ्रंट चा आज काँग्रेस भवन मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्यातील माजी उपमहापौर आबा बागूल यांची अनुपस्थिती काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगलीच खटकली.
आबा बागूल हे सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. म्हणजे 30 वर्षांचा त्यांचा कालखंड. जनसंपर्क दांडगा. शिवाय ओबीसी चेहरा. अशा सगळ्या जमेच्या बाजू असताना देखील शहर काँग्रेस मध्ये नेहमी त्यांना डावललं गेलं. अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करत होते. पक्षासाठी एवढं झटणारा आणि जनसंपर्क असलेल्या माणसाला काँग्रेस ने पुढे करायला हवं होतं. अशा नेत्याच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यायला हवं. मात्र तेच होताना दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना एकदाही संधी दिली गेली नाही. उलट जे लोक नेहमी निवडणुकीत अपात्र ठरले त्यांना लोकसभा आणि विधानसभा लढवण्यासाठी पुढं केलं जातं. त्यात ही लोकं हरली तर पुन्हा त्यांनाच पदाधिकारी म्हणून पार्टीत महत्वाची पदं दिली जातात. अशाने काँग्रेस कधी मोठी होणार पुढे जाणार? अशीही व्यथा कार्यकर्ते बोलून दाखवत होते.
बागुल यांनी पार्टीने त्यांच्या 30 वर्षाच्या कालावधीत अवघी 8-9 वर्षे महत्वाची पदे दिली. ती देखील सगळ्यांना देऊन झाल्यानंतर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेत काँग्रेस कडे उपमहापौर पद होते. बागूल यांना हे पद शेवटी दिलं गेलं. काँग्रेसनं ज्यांना उपमहापौर केलं त्या सर्वांनी पक्ष बदलला. बागूल यांनी मात्र आपला एकनिष्ठतेचा धर्म पाळला. असे असूनही त्यांना पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं जात नसल्याची चिंता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आजचा मेळावा हा इंडिया आघाडी, पुणे च्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. तसेच काँग्रेस च्या दृष्टीने देखील. काँग्रेस भवन मधला हा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. अशा वेळी काही महत्वाच्या नेत्यांची नाराजी दिसणे, हे ग्रहण लागल्यासारखे आहे. काँग्रेस मधून महत्वाचे नेते निघून जात आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, ज्योतिरादित्य सिंधिया नुकतेच अशोक चव्हाण, अशा लोकांना भाजपनं हेरलं आणि आपल्या पक्षात घेतलं. शिवाय त्यांना चांगली पदे देखील दिली. तरीही काँग्रेस मध्ये अंतर्गत बदल होताना दिसून येत नाही. बागुल यांच्यासारखा नेता देखील आपल्या कारकिर्दीला साजेसा पक्ष शोधू शकतो. काँग्रेसने अशी लोकं टिकवून ठेवायला हवीत. तरच पक्ष पुढे जाईल आणि सत्तेची गणितं सोपी होतील.

Maharashtra Lavni | पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका!

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Maharashtra Lavni | पुणे नवरात्रौ महोत्सवात सलग १२ तासांचा लावणी धमाका!

Maharashtra Lavni | घुंगरांचा आवाज आणि ढोलकीची थाप लालित्यपूर्ण पडण्यास सोबत गाण्यातील आर्जव, प्रेक्षकांचे वन्स मोअरचे नारे, टाळ्यांचा कडकडाट आणि हजारो रसिक प्रेक्षकांची गर्दी अशा लावणीमय वातावरणात पुणे नवरात्रौ महोत्सवात रविवारी दु. १२ ते रात्री १२ असा विक्रमी १२ तासांचा‘लावणी धमाका’श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. महाराष्ट्रात सलग १२ तासांचा धमाकेबाज‘लावणी महोत्सव’पुणे नवरात्रौ महोत्सवात आम्ही प्रथम सुरू केला. त्यास चोखंदळ पुणेकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला, याबद्दल सर्व लावणी कलावंत आणि रसिक पुणेकर यांचे मी आभार मानतो, असे भावपूर्ण उद्गार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांनी आज काढले. (Pune Navratri Mahotsav)
१० दिवसांच्या २९व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात रविवारी दु. १२ ते रात्री १२ अशा तब्बल १२ तासांच्या लावणी महोत्सवाचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नटराजपूजन व नारळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर व सुरेखा पुणेकर आणि आयोजक आबा बागुल व सौ. जयश्री बागुल उपस्थित होते.
खा. श्रीनिवास पाटील उद्घाटनाप्रसंगी म्हणाले, “आबा बागुल यांच्या प्रयत्नांतून सलग 29 वर्षांपासून नवरात्रौत्सव साजरा होत आहे. कन्यापूजनासह विविध उपक्रम साजरे करतात. लावणी महोत्सवात कलाकारांना व्यासपीठ मिळवून देतात,” असे सांगून त्यांनी आबा बागुल यांचे कौतुक केले. तसेच “लावणीसारख्या लोककलेला प्रतिष्ठेचे व्यासपीठ दिले हे फार मोठे योगदान आहे,” असे ते म्हणाले.
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी आपल्या दिलखेचक अदाकारीने ‘कारभारी दमानं होऊ दमानं’ ही लावणी सादर करून वन्स मोअरची दाद मिळवली.  शिट्ट्या व टाळ्यांची दाद प्रेक्षकांनी दिली. यावेळी त्या म्हणाल्या, देवी आणि आबा बागुल हे एक समीकरण आहे. मला आनंद वाटतो, आबा यांच्या हातून देवीची सेवा होते. त्यांच्यामुळे नवरात्रोत्सवात कलाकारांना व्यासपीठ मिळते. आम्हा सर्व कलाकारांना महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. आबांच्या हातून अशीच गोरगरीबांची सेवा होत राहावी,  अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
१२ तास चालेल्या या लावणी महोत्सवात ‘तुमच्यासाठी कायपन’ लावणी सम्राज्ञी पूनम कुडाळकर, मृणाल लोणकर, ‘नटखट सुंदरा’ नृत्यांगना आरती पुणेकर, समृद्धी पुणेकर, ‘शिवानीचा नाद खुळा’  सिनेअभिनेत्री शिवानी कोरे, काव्या मुंबईकर, ‘लावणी धमाका’ नृत्यांगना सोनाली जळगावकर, शितल पुणेकर, ‘अहो नाद खुळा’ नृत्यांगना माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ नृत्यांगना नमिता पाटील, प्राची मुंबईकर सह त्यांच्या सहकार्‍यांनी तब्बल बारा तास ठसकेबाज लावणी सादर करुन प्रक्षेकांची वाहवा मिळविली.
महोत्सवाची सुरुवात ‘तुमच्यासाठी काय पण’ ग्रुपने गणेश वंदना सादर करून  केली. शंभरहून अधिक लावण्यवतींनी आपला नृत्यविष्कार दाखवून प्रत्येक लावणीत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी प्रेक्षकांनी शिट्या, टाळ्या व नृत्य करुन लावणीला वन्समोअरची दाद दिली. ‘विचार काय हाय तुमचा…’, ‘पैलवान आला हो पैलवान आला…’, ‘तुमच्या पुढ्यात कूटते मी…’, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा…’, ‘ज्वानीच्या आगीची मशाल हाती…’ या लावण्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.
‘विचार काय आहे तुमचा पाहूनं…’, ‘मला वाटलं होतं तुम्ही याल…’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी…’, ‘कैरी मी पाडाची….’, ‘सांगना कशी दिसते मी नववारी साडीत…’, ‘शिट्टी वाजली गाडी सुटली….’, ‘चंद्रा’ चित्रपटातील ‘बान नजंतला घेऊनी अवतरली चंद्रा’, ‘नटरंग’ चित्रपटातील ‘नटरंग उभा अशा एकाहून एक सरस’ अशा लावण्या व गौळणीच्या सादरीकरणाने रसिकांवर लावणी या लोकप्रिय लोककलेची भुरळ घातली.
या बरोबरच ‘बुगडी माझी सांडली गं…’, ‘सोडा सोडा राय नांद खुळा…’ या लावणीने वन्समोअरची दाद मिळवली. ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’ ही लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘इंद्राची अप्सरा आली…’, ‘कान्हा वाजवितो बासरी’ यासह ‘वाजले की बारा…’, ‘अप्सरा आली…’, ‘नटरंग उभा…’, या ‘नटरंग’ चित्रपटातील लावण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…’ या बैठकीच्या लावणीच्या सादरीकरणाने आपल्या हावभावातून लावण्यवतींनी रसिकांची मने जिंकली. ‘मी मेनका ऊर्वशी…’ आणि ‘छत्तीस नखरेवाली…’ या लावण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात बहार आणली. ‘केसात गुंफूणी गजरा तुम्हाला मानाचा मुजरा..’, ‘तुमच्या पुढ्यात बसले मी..’, ‘तुझ्या उसाला लागेल कोल्हा’,  ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘आई मला नेसव शालू नवा’ अशा ठसकेबाज जुन्या  लावण्यांचे सादरीकरणाने प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद दिली.
हावभाव, पदन्यास आणि ढोलकीची थाप यांच्या एकत्रित सादरीकरणाने लावणी या लोककलेचा अप्रतिम कलाविष्कार रसिकांनी अनुभवला. तब्बल सलग 12 तास नृत्यांगणांनी आपली लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी मान्यवरांचा व कलाकारांचा सत्कार केला. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे विश्वस्त घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे,  रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, मुख्य संयोजक अमित बागुल, सागर बागुल यांच्यासह माजी नगरसेवक विशाल तांबे, उद्योगपती भारत देसरडा, अमित भगत, रितेश अगरवाल, रितेश राठोड, विठ्ठल चरवड, बाळासाहेब घुले, टी. एस. पवार, सतीश पवार, रमेश सोनकांबळे आदी पदाधिकारी व मान्यवर  उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. हा लावणी महोत्सव रात्री उशिरापर्यंत चालू राहिला. लावणीरसिकांनी सारे प्रेक्षगृह तुडुंब भरले होते.
—-

Navratri Mahostav | “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा” | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात लहान मुले रमली ‘चिंटू’समवेत चित्रांमध्ये!

Categories
Breaking News cultural Political social पुणे

Navratri Mahostav | “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा” | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात लहान मुले रमली ‘चिंटू’समवेत चित्रांमध्ये!

 

Navratri Mahotsav | शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणातील भव्य मंडपात ४००हून अधिक लहान मुलांच्या उपस्थितीत चित्रकार चारुहास पंडित (Charuhas Pandit)यांनी ‘चिंटू’चे (Chintoo) चित्र काढले आणि लहान मुलांच्या टाळ्यांच्या कडकडाटात एकच भावना तयार झाली की, “आम्ही चालू ठेवू पुढे हा वारसा”! या प्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल (Jayashri Bagul) उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात झालेल्या लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथी या वयोगटासाठी ‘गणेशोत्सव’ आणि ‘आवडता प्राणी’ तसेच इयत्ता पाचवी ते सातवी वयोगटासाठी ‘माझा स्वप्नातील भारत’ आणि ‘समुद्रकिनाऱ्यावर खेळणारी मुले’ असे विषय देण्यात आले होते.

२४व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात झालेल्या लहान मुलांच्या या चित्रकला स्पर्धेत शेकडो लहान मुले-मुली ‘चिंटू’ आणि चित्रांमध्ये रमली. पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रख्यात चित्रकार ‘चिंटू’फेम चारुहास पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मुलांना चारुहास पंडित यांनी आवडत्या ‘चिंटू’चे चित्र रेखाटून आनंद दिला. यावेळी चित्रकार चारुहास पंडित यांनी आबा बागुल आणि जयश्री बागुल यांचे कौतुक करून म्हटले की, “तुम्ही सौंदर्यदृष्टी असणारे भावी नागरिक घडवत आहात याबद्दल तुमचे अभिनंदन करतो.”

प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत करून चित्रकार चारुहास पंडित यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “शाळा आणि कॉलेजचे शिक्षण घेत असतानाच लहान मुलांमध्ये खेळ आणि चित्रकला, गायन, वादन, नृत्य अशा कलांचेदेखील शिक्षण द्यायला हवे. कलेमुळे आनंद तर मिळतोच, शिवाय कौतुकही होते. चित्रकार चारुहास पंडित यांनी चितारलेला ‘चिंटू’ आज महाराष्ट्रात घराघरात आणि मनामनात पोहोचला आहे. त्यांचा आदर्श लहान मुलांनी घ्यावा,” असे ते म्हणाले.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी मुलांना शुभेच्छा देऊन म्हंटले की, “लहान मुलांच्या मनातील भावविश्वाचे दर्शनच आजच्या चित्रांमधून दिसून येत आहे. या लहान मुलांमधील सुप्त गुण लक्षात घेऊन पालकांनी त्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे. बी.ए., बी.कॉम. जरूर व्हा, त्याचबरोबर आपल्या जीवनाला कलेची जोड द्या आणि त्याची सुरुवात लहान वयापासूनच व्हावी,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम बागुल यांनी केले. प्राजक्ता ढवळे यांनी आभार मानले.

प्रत्येक गटात प्रथम क्रमांक ३,००० रुपये, दुसऱ्या क्रमांक २,००० रुपये व तिसऱ्या क्रमांक १,००० रुपये आणि उत्तेजनार्थ आणि दोन बक्षिसे दिली गेली. सर्व सहभागी मुला-मुलींना भेटवस्तू आणि खाऊ दिला गेला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –

इयत्ता पहिली ते चौथी वयोगट
प्रथम – अनन्या कुंजीर
द्वितीय – रिमाश शिंदे
तृतीय – तन्मय शिंदे

इयत्ता पाचवी ते सातवी वयोगट
प्रथम – संस्कृती पाचंगे
द्वितीय – मयुरी भागवत
तृतीय – अर्जून महाडिक

Pune Navratri Mahotsav | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ललित पंचमीनिमित्त कन्यापुजानाचा भव्य सोहळा

Categories
Breaking News cultural social पुणे

                                                                                    Pune Navratri Mahotsav | पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ललित पंचमीनिमित्त कन्यापुजानाचा भव्य सोहळा

Pune Navratri Mahotsav | वयोगट३ ते१२ वर्षांमधील१००० हून अधिकमुली, रंगीबेरंगी ड्रेस,कपाळावर चुनरी,चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्राॅ,खाऊ अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमातामंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्तपुणे नवरात्रौ महिला महोत्सव अंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला.प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.सहभागी सर्व लहान मुलींच्या कपाळावर चुनरी,चंद्रकोरओम आणि कुमकुम टिलक सौ जयश्री बागुल यांनी लावलले .या सर्व लहान कन्यांचे पाय धुवून यावर स्वस्तिक चिन्ह काढण्यात आले.त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. तसेच सामुहिक आरतीकरण्यात आली. (Aba Bagul)
यावेळी या मुलींनी नवारीसाडी, घागरा,पंजाबी ड्रेस असे रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते.या प्रसंगी अनेक मुलींनी गणपती स्तोत्र,श्रीसूक्त पठण, दुर्गास्तुतीतोंडपाठ म्हणून दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली. यावेळीपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लकी ड्राॅमधीलविजेत्या मुलींना दप्तर सायकल इत्यादी बक्षिसे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठनेते खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देण्यात आली तसेच सहभागीसर्व मुलींना टीफीन,वॉटर बॅग, क़ंमपास,लेजचे पाकीट  व खाऊ देण्यातआला. याप्रसंगीपुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजकअध्यक्ष व माजी उपमहापौर आबाबागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला तू मोठी झाल्यावर काय होणार ? असेविचारले. यावर अनेकींनी डॉक्टर,पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञअशी उत्तरे दिली. यावर आबाबागुल म्हणाले की मुलींना मोठी स्वप्ने बघुद्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तताकरण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे खा. श्रीनिवास पाटील यांनी या प्रेरणादायी उपक्रमाबद्दलआबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांचे कौतुक करून म्हंटले की, प्रत्येक मुलींनीशिकलेच पाहिजे तिच्यातील कला गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कन्यापुजनाची हीसंस्कृती प्रत्येक कुटुंबाने जोपासली पाहिजे.  पुणेनवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्री बागुल यांनीस्त्रीभृण हत्येविरूद्ध आवाज उठवण्याचे आवाहन करून म्हंटले कीपालकांनी याबाबत मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे.मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा.त्याचबरोबर आपले कुटुंब नातेवाईक, मित्र,शेजारी या सर्वांमध्ये स्त्री भृण हत्येबद्दल जागरण करा. यावेळी उद्योजिका अनुराधावाघोलीकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन संगीता बागुल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्युल्त्ता साळी, सोनमबागुल , नुपूर बागुल आदींनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्राॅचा निकाल –
प्रथम क्रमांक -सीमा पाटील
द्वितीय क्रमांक -सबा शेख
तृतीय क्रमांक – स्वर्दा पोळेकर
उत्तेजनार्थ – हर्षदा लकडे

Pune Navratri Mahotsav | आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा निर्धार करा | रुपाली चाकणकर

Categories
Breaking News cultural Political social पुणे
Pune Navratri Mahotsav | आपले प्रश्न आपणच सोडवण्याचा निर्धार करा |  रुपाली चाकणकर
Pune Navratri Mahotsav | ‘राज्य महिला आयोगाच्या (Women Commission for State of Maharashtra) माध्यमातून काम करताना कौटुंबिक कलहाची प्रकरणे सर्वाधिक असल्याचे दिसून येते. बेपत्ता होणाऱ्या मुलींचा प्रश्नही मोठा आहे. तसेच भृणहत्या आणि बालविवाह ही देखील समस्या आहे. यासाठी आपल्या सर्वांनाच मोठे काम करावे लागेल. आपली मुलगी १८ वर्षाची झाल्याशिवाय आणि स्वतःच्या पायावर उभी राहिल्याशिवाय कोणत्याही आईने आपल्या मुलीचे लग्न करू नये हा संकल्प नवरात्रौनिमित्त केला पाहिजे’ असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हंटले.
 पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत संपन्न होणाऱ्या २४ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन करतांना त्या बोलत होत्या. शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले आणि स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ११ हजार रुपये, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा अध्यक्षा जयश्री बागुल, समितीच्या उपाध्यक्षा निर्मलाताई जगताप, सदस्या छायाताई कातुरे, विद्याताई साळी, अनुराधाताई वाघोलीकर व प्रांजली गांधी मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन झाल्यावर देवीची आरती करण्यात आली. ऋतुजा माने व सहकलावंतांनी याप्रसंगी गणेश वंदना सादर केली. महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक करतांना म्हंटले की “नवरात्रौ हा स्त्री शक्तीचा महोत्सव आहे. घरातील प्रत्येक मुलीला शिकवलेच पाहिजे. विविध सामाजिक प्रश्नांमुळे मुलींची घटती संख्या आणि मोठ्या संख्येने मुली बेपत्ता होणे याकडे समाजाने विचारमंथन केले पाहिजे.”
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष  व पुण्याचे माजी महापौर आबा बागुल म्हणाले की ,  हा महिला महोत्सव सलग २४ वर्षे चालू आहे. ही सारी श्री. लक्ष्मीमातेचीच कृपा आहे. पुणे नवरात्रौ महोत्सव व पुणे नवरात्रौ महिला महोत्सव या माध्यमातून हजारोंना आधार देण्याचे विविध उपक्रम सातत्याने चालू असून सांकृतिक , शैक्षणिक, सामजिक, धार्मिक , अध्यात्मिक याबरोबरच हरवेलेले संस्कार समाजात रुजवण्यासाठी ‘संस्कारमाला’ हे उपक्रम समाजाला आधार देतात याचे समाधान आहे.
याप्रसंगी रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, “मुलगी सासरी जातांना जमवून घे असे आई मुलीला सांगत असते. मात्र आता आईनी असे सांगितले पाहिजे की सासरचे तुला जेवढे सन्मानाने वागवतील त्याच्यापेक्षा जास्त सन्मानाने तू त्यांना वागव. मात्र हुंड्यासाठी छळ होऊ लागला तर जाब विचारायला शिक.
कुठलाही उपक्रम सुरु करणे सोप्पे असते चालू ठेवणे मात्र अवघड असते. गेली २४ वर्षे पुणे नवरात्रौ महिला महोत्सव मोठ्या उत्साहात चालू आहे ही कौतुकाची बाब आहे. जयश्री बागुलांच्या मागे आबा बागुल भक्कमपणे उभे आहेत ही कौतुकाची बाब आहे. आपल्याला संविधान देऊन महिलांना हक्क मिळून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाईंच्या हाती लेखणी देणारे महात्मा फुले हे पुरुषच होते. समाजात काम करतांना पती, भाऊ, वडील यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. मात्र आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात. त्यासाठी नवरात्रौनिमित्त संकल्प करूया असे त्या म्हणल्या.
सत्काराला उत्तर देताना Rescuing Every Distressed Indian Overseas (REDIO) संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा धनश्री पाटील म्हणल्या की, “तेजस्विनी पुरस्कार मिळाला हा लक्ष्मीमातेचा आशीर्वाद आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना भारतात सुखरूप परत आणणे हे मी काम करते. यामध्ये महिलांना खूप मोठा आधार मिळत असतो. पुणे नवरात्रौ महोत्सवात परवा महर्षी पुरस्काराने सन्मानित होणारे डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे माझे गुरु असून त्यांचे फार मोठे सहकार्य या कामात मिळाले. तसेच माझे पती व कुटुंबीय यांचे देखील या कामी मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि माझे पती व कुटुंबीय यांना मी हा पुरस्कार समर्पित करते.”
आंतरराष्ट्रीय कीर्तीची लॉन टेनिस खेळाडू ऋतुजा भोसले म्हणल्या की, “आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उंचावण्याची संधी मला मिळाली याचे मला खूप समाधान आहे.”
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती रामदासी यांनी केले. आभार प्रदर्शन महोत्सवाच्या उपाध्यक्षा निर्मला जगताप यांनी केले. कार्यक्रमात महिलांची प्रचंड मोठी गर्दी होती.
या उद्घाटन सोहळ्यानंतर महिलांसाठी असणारी ‘वेशभूषा’ स्पर्धा संपन्न झाली.
——-

International Grandparents Day | जागतिक दिनाच्या पूर्व संध्येला आजी आजोबांप्रती पुरस्कार रूपी कृतज्ञता

Categories
Breaking News cultural social देश/विदेश पुणे

International Grandparents Day | जागतिक दिनाच्या पूर्व संध्येला आजी आजोबांप्रती पुरस्कार रूपी कृतज्ञता

पुणे नवरात्रौ महोत्सव  राजीव गांधी ईलर्निंग स्कूलचा उपक्रम

आजीआजोबा नातवंड म्हणजे घरातील जुन्या नव्याचा संगम – डॉकुमार सप्तर्षी

 

International Grandparents Day | 

पुणे –  आजी आजोबांचा (Grandparents) त्यांच्या आय़ुष्यातील शेवटचा मित्र म्हणजे त्यांच नातवंडनातवंडच्या आयुष्यातील त्याचे पहिले मित्र म्हणजे आजी आजोबा असतात याचं कारण म्हणजे दोघांकडेही असलेला वेळलहान मुलांना भिती कशाची वाटत असेल तर ती अनोळखीपणाचीया अनोळखी गोष्टींची ओळख करून देणारे आजीआजोबा असतातजशा नद्या संगमाच्या ठिकाणी एकमेकांत मिसळतातत्यांचे पाणी ओळखू येत नाही तसेच आजी आजोबा नातवंड एकमेकांच्या सहवासात मिसळून जातातत्यामुळे आजी आजोबा नातवंड हा घरातील नव्या जुन्याचा संगम आहे. अशा शब्दात ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉकुमार सप्तर्षी यांनी भावना व्यक्त केल्या. (International Grandparents Day)

 

निमित्त होते ते जागतिक आजी आजोबा दिनाचे…… (International Grandparents Day) पुणे नवरात्रौ महोत्सव  राजीव गांधी  लर्निंग स्कूल यांनी जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला डॉकुमार सप्तर्षी  उर्मिला सप्तर्षीज्येष्ठ गांधीवादी विचारवंत हरिभक्त परायण उल्हासदादा पवार  अनुराधाताई पवारडॉवीणा देव आणि कवयत्री डॉसंगीता बर्वे  राजीव बर्वे यांचा आदर्श आजी आजोबा पुरस्कार देऊन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष  माजी उपमहापौर आबा बागूल यांनी सत्कार केलायावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उपाध्यक्ष घनश्याम सावंतकोषाध्यक्ष  श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष नंकदुमार बानगुडेरमेश भंडारीनंदकुमार कोंढाळकरराजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे प्राचार्य जांबुवंत मसलकर आणि पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सांस्कृतिक प्रमुख संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होतेसन्मान चिन्हंशालपुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आबा बागूल यांनी यामागची भूमिका स्पष्ट केलीते म्हणालेराजीव गांधी ईलर्निंग स्कूलचे सुमारे चारशे विद्यार्थी आयआयटीत शिकत किंवा शिकलेले आहेतआयएएस – आयपीएस होत आहेतदोन विद्यार्थी नासा संशोधन संस्थेत कार्यरत आहेतहे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील किंवा घरात कोणतिही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील आहेतया विद्यार्थ्यांकडे बघितल्यावर त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर ते चांगले नागरीक होऊ शकतात हा आत्मविश्वास मिळालात्यातून सध्या समाजातील एकंदर वातावरण बघून आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी हरवलेले संस्कार अशी मालिका गेल्या महिन्यापासून सुरू केली आहेयाचे पहिले पुष्प प्राजोशी यांनी गुंफलेहा दुसरा कार्यक्रम जागतिक आजी आजोबा दिनाच्या पूर्व संध्येला होत आहेआजी आजोबा ही घरातील संस्काराची केंद्र होतीआज संस्कार घरातच हरवले असल्याने मुलांवर बाहेरच संस्कार जास्त होऊन त्यातून नवे नवे प्रश्न तयार होत आहेतआजी आजोबा या कुटुंबातील दोन्ही संस्थांना योग्य सन्मान मिळणे किती आवश्यक आहे हे समजावण्यासाठी आदर्श आजी आजोबा पुरस्कार वितरण सोहळा आहेतसेच या दिवसाचे औचित्य साधून या महिन्यापासून दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आजी आजोबांनी आणि ते नसतील तर त्यांच्या पालकांनी शाळेत मुलांना सोडायला येणे बंधनकारक करत असल्याचे जाहीर केलेयावेळी त्यांनी पुण्यात नुकत्याच घडलेल्या घटनांचे दाखलेही दिले.

 

सत्काराला उत्तर देताना डॉसप्तर्षी पुढे म्हणालेनातवंडांच्यातील असुरक्षिततेची भावना आजी आजोबाच नष्ट करतातलहान मुलांना सतत अनेक प्रश्न पडत असतातत्याची उत्तरेही आजी आजोबांनी देणे आज आवश्यक झाले आहेतशी तयारी आजी आजोबांनीही केली पाहिजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोजिथे अक्कल नसते तिथे नक्कल चालतेनातवंडांना वयोमानाने अक्कल नसल्याने ते आजी आजोबांचीच नक्कल करत असतातत्यामुळे आजी आजोबांनीही त्यांच्याशी वागताना जपून वागणे किंवा कृती केली पाहिजेआईवडीलही आपले मूल चांगले व्हावे यासाठी नवे नव शिकवत असतातत्याचवेळी आजी आजोबांनी त्याला विरोध करण्याऐवजी नातवंडाला चांगले बोलायलावागायला शिकवले पाहिजेकाय चांगले काय वाईट हे ओळखायला शिकवले पाहिजे.

 

डॉ. संगीता बर्वे यांनी त्यांच्या ‘झाड आजोबा ही त्यांची कविता म्हटली प्रक्षागृहातील सर्वांकडून म्हणून घेतलीत्या म्हणाल्याआजी आजोबांनी नातवंड शाळा कॉलेज मधून घरी आले की ते आज काय शिकले हे विचारले पाहिजे आणि आपणही ते शिकले पाहिजे.  यातूनच आपापसातील नातं घट्ट होत जातंनवे शिकण्यासाठी आज आजी आजोबांसाठीही एखादी शाळा असली पाहिजे असे त्यांनी नमूद केलेडॉवीणा देव म्हणाल्याआज तंत्रज्ञानाचे युग आहेनविन तंत्रज्ञान शिकवण्याठी आजी आजोबांनी आपल्या नातवंडाना गुरू केले पाहिजेसर्वात महत्वाचं म्हणजे आजी आजोबांनी तडजोड करायला शिकलं पाहिजे.

 

उल्हासदादा पवार म्हणालेया कार्यक्रमाला येऊन मला माझ्या आजी आजोबांची आठवण झालीआम्ही लहान असताना चिमणी पाखरं आणि बाळा जो जो रे हे चित्रपट संस्कारक्षम होते म्हणून घरातील सर्व मुलांना बघायला नेले होतेघरातील संस्कार आज कुठेतरी हरवल्यासारखे दिसतातते संस्कार आबा बागूल यांनी सांगितल्याप्रमाणे कुठे बाजारात विकत मिळत नाहीत त्यामुळे आणून देता येत नाहीतते घरातच होत असतातआजी आजोबाच नाहीतर आई वडीलभावंड सर्वांच्या वागण्याबोलण्यातून  कळत संस्कार लहान मुलांवर होत असतात.

 

कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून  स्वागत गीताने झालीत्यानंतर राजीव गांधी ईलर्निंग स्कूलमधील मुलांनी आजी आजोबांचे महत्व सांगणारे प्रहसन  कविता सादर केल्याकार्यक्रमाचे सूत्रसंचलन घनशाम सावंत यांनी केले तर आभार प्राचार्य जांबुवंत मसलकर यांनी मानलेकार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आजी आजोबा, मुलांसमवेत आलेले होते.

Rajiv Gandhi Jayanti 2023 | राजीव गांधी जयंतनिमित्त सद्भावना क्रीडा ज्योतीचे आयोजन

Categories
Breaking News Political social पुणे

Rajiv Gandhi Jayanti 2023 | राजीव गांधी जयंतनिमित्त सद्भावना क्रीडा ज्योतीचे आयोजन

Rajiv Gandhi Jayanti 2023 |  स्व. राजीव गांधी जयंतनिमित्त ( Rajiv Gandhi Jayanti 2023) (सद्भावना क्रीडा ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. या ज्योतीचे प्रज्वलन माजी आमदार मोहनदादा जोशी (Congress Leader Mohan Joshi) व आशियाई कुस्ती चॅम्पियन सुजय तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. (Rajiv Gandhi Jayanti 2023)
माजी आमदार मोहन जोशी म्हणाले आज देशा मध्ये १०० कोटी हून अधिक लोकांकडे मोबाईल ही सर्व क्रांती व किमया देशाचे पंतप्रधान राजीव गांधी मुळे भारतात झाली. भारतामध्ये 1982 आली ज्या आशियाई स्पर्धा झाल्या. त्याची संपूर्ण जबाबदारी फिल्म त्या यशस्वीरित्या केल्या.
यावेळी माजी नगरसेवक आबा बागुल (Aba Bagul) यांनी आपल्या भाषणात म्हणाले स्वर्गीय राजीव गांधींनी अनेकांना आमदार, खासदार, क्रिडा मंत्री केले. या ज्योतीचे सुरुवात ई लर्निंग स्कूल येथील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरुवात करण्यात आली.त्याचा समारोप पंडित नेहरू स्टेडियम या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे नरेंद्र व्यवहारे, यांनी केले होते.यावेळी श्रीकृष्ण बराटे, विरेंद्र किराड आदी क्रिडा पट्टू, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
——-
News Title | Rajiv Gandhi Jayanti 2023 | Organized Sadbhavana Krida Jyoti on the occasion of Rajiv Gandhi Jayanthi

PMC Pune Hindi News |  डीपी के अनुसार पुणे शहर में सड़कों के चौड़ीकरण करने की आबा बागुल की मांग

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Pune Hindi News |  डीपी के अनुसार पुणे शहर में सड़कों के चौड़ीकरण करने की आबा बागुल की मांग

 |  पुणे महानगरपालिका के हाथ में 7 करोड़ वर्गफीट जमीन;  लेकिन जाम की स्थिति बनी रहती है

 PMC Pune Hindi News |  जबकि पुणे शहर का क्षेत्र दिन-ब-दिन बढ़ता जा रहा है, विकास योजना के अनुसार सड़कों को चौड़ा करने के लिए पुणे महानगरपालिका प्रशासन (Pune civic body) और जनप्रतिनिधियों की अक्षम्य उपेक्षा के कारण शहर का यातायात खतरनाक होता जा रहा है ( Pune Devlopment plan)।  महानगर पालिका के पास 7 करोड़ वर्गफीट जमीन होने के बावजूद सड़क का चौड़ीकरण कितनी जगह हुआ है, इसका कोई पुख्ता आंकड़ा नहीं है।  इसलिए 1987 से 2017 तक स्वीकृत विकास योजना (Pune DP) के अनुसार महानगरपालिका प्रशासन को भुगतान की गई भूमि को अपने कब्जे में लेना चाहिए और सड़कों को तुरंत चौड़ा करना चाहिए।ऐसी मांग पूर्व उपमहापौर आबा बागुल (Former Deputy Mayor ABA Bagul) ने की है.   (PMC Pune Hindi News)
 इस संबंध में पूर्व उप महापौर आबा बागुल ने कहा है कि वर्तमान में नगर निगम व जनप्रतिनिधि शहर की गंभीर यातायात समस्या (Traffic congestion in Pune) के समाधान में लापरवाही बरत रहे हैं.  नतीजतन, पुणे के निवासियों का जीवन खतरनाक यातायात में दम घुट रहा है और दुर्घटनाओं का ग्राफ भी बढ़ रहा है।  भविष्य को देखते हुए अभी से हमें ट्रैफिक प्लानिंग के लिए ठोस कदम उठाने होंगे।  उसके लिए सिटी ट्रांसपोर्ट प्लानिंग का मास्टर प्लान होना अनिवार्य है।  हालांकि वर्तमान स्थिति में यातायात व्यवस्था को दुरुस्त करने के लिए यदि विभिन्न उपायों को प्रभावी ढंग से लागू किया जाए तो जाम से निजात मिल सकती है, लेकिन उसके लिए 1987 से 2017 तक की विकास योजना में दर्शाई गई सड़कों का चौड़ीकरण अनिवार्य है।  लेकिन नगर निगम प्रशासन इसकी अनदेखी कर रहा है।  एफ. नगर निगम प्रशासन को जो ‘पीपीपी’ सिद्धांत पर मुट्ठी भर लोगों के लिए सड़कों की योजना बनाता है।  एसआई, टीडीआर, वित्तीय प्रतिफल देकर अधिग्रहित की गई 7 करोड़ वर्गफीट भूमि की सुविधा को ‘भूल’ दिया गया है।  (Pune Municipal Corporation News)
 दिलचस्प बात यह है कि सूचना के अधिकार में मांगी गई जानकारी में प्रशासन द्वारा जोनवार दी गई जानकारी में यह चौंकाने वाला तथ्य सामने आया है, इसलिए एफ.  ज्यादातर दरोगा, टीडीआर, आर्थिक मुआवजा जमीन अब भी मूल स्वामियों के कब्जे में है।कई जगहों पर अब भी अतिक्रमण है।सिर्फ सतबाड़ा पर ही नगर पालिका के नाम का जिक्र है, लेकिन कब्जा अभी तक नगर पालिका के पास नहीं है। .  इसलिए सड़क की चौड़ाई वाले इन स्थानों को तत्काल अपने कब्जे में लेकर सड़कों को विकसित करने की जरूरत है।पूर्व डिप्टी मेयर आबा बागुल ने भी इसका जिक्र किया है।  (PMC Pune News)

 सुचारू परिवहन के प्रभावी उपाय

 शहर में मौजूदा ट्रैफिक (Pune Traffic) जाम से बचने के लिए संकरी सड़कों सहित शहर की सभी सड़कों पर चौपहिया वाहनों की पार्किंग बंद करें, ट्रैफिक कंट्रोल लाइट की व्यवस्था करें, फुटपाथों को अतिक्रमण मुक्त करें, चौड़ाई घेरकर सड़कों का विकास करें सड़क के प्रत्येक चौराहे पर दो सौ मीटर की दूरी पर ट्रैफिक जाम खड़ा करना।फंसे हुए वाहनों को उठाने के लिए क्रेन की व्यवस्था को सक्षम करने, ट्रैफिक कंट्रोल लाइट को 24 घंटे चालू रखने के लिए प्रभावी पावर बैटरी बैकअप सिस्टम, डिजाइनिंग जैसे विभिन्न उपाय पूर्व उप महापौर आबा बागुल ने जहां आवश्यक हुआ वहां वन-वे सड़कें, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तर पर पार्किंग स्थल का निर्माण आदि का सुझाव प्रशासन को दिया है और उम्मीद है कि इसे प्रभावी ढंग से लागू किया जाएगा।  आबा बागुल ने यह भी कहा कि क्षेत्रीय कार्यालय स्तर पर अलग से ट्रैफिक प्लानर नियुक्त किए जाएं और पुलिस के सहयोग से प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तर पर सुचारू यातायात की जिम्मेदारी सौंपी जाए.  (Pune Traffic)
 —
News title | PMC Pune Hindi News | According to DP, Aba Bagul’s demand for widening of roads in Pune city| 7 crore square feet of land in possession of Pune Municipal Corporation; But the situation of jam remains