PMC Schools : Personality Devlopment : महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा!

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

महापालिकेच्या शाळांमध्ये आता व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा

: राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा यामधून होणार सुरुवात

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये (PMC schools) कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत विदयार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा (Personality Devlopment Training) सुरू करण्यात येणार आहे. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर (Pilot project)  राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा, दिगंबरवाडी येथून करण्यात येईल. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महिला बाल कल्याण समितीने (women and child welfare committe) मान्यता दिली आहे. अशी माहिती समितीच्या अध्यक्ष रुपाली धाडवे (Rupali Dhadave) यांनी दिली.

: महिला बाल कल्याण समितीची मान्यता

याबाबतचा प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) आणि काँग्रेस गटनेते आबा बागूल (Aba Bagul) यांनी महिला बाल कल्याण समिती समोर दिला होता. त्यानुसार पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने गोरगरीब व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विदयार्थी शिक्षण घेतात. अशा कुटुंबातील विदयार्थ्यांना इतर खाजगी शाळांप्रमाणे सेवा सुविधा व शिक्षणाचा दर्जा देण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून नेहमीच केला जातो. विदयार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्या भविष्यातील यशस्वी कारकीर्दीसाठी शालांत / माध्यमिक म्हणजेच इयत्ता १० वीच्या परीक्षेच्या टप्पा महत्वाचा असतो, किंबहुना यशस्वी कारकीर्द घडण्यासाठी महत्वाचा मानला जातो. इयत्ता ७ वी ते १० वी या शैक्षणिक टप्प्यात विदयार्थ्यांच्या शारिरिक वाढीसोबत मानसिक व वैचारिक धारणांमध्ये दिर्घ परिणाम करणारे बदल होत असतात. खाजगी शाळांमध्ये जाणारे बहुतांशी विदयार्थी हे समाजाच्या मध्यम / उच्च मध्यम वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात. अशा विदयार्थ्यांना खाजगी शाळांमधून तसेच त्यांच्या कुटुंबामधून अथवा विविध उपलब्ध साधनांद्वारे व्यक्तिमत्व विकासाचे मार्गदर्शन उपलब्ध होते. पुणे मनपाच्या विविध शाळांमधील इयत्ता ७ वी ते १० वी या इयत्तांमधील विदयार्थ्यांना त्यांचे व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणेतर उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबविणे हे अतिशय हितावह व दूरगामी सामाजिक परिणाम करणारे ठरेल. गेली अदमासे २ वर्षे कोविड प्रादुर्भावामुळे विदयार्थ्यांचे शालेय शिक्षण प्रत्यक्ष तासिकांद्वारे होवू शकलेले नाही. याचा थेट परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर देखील झालेला आहे हे नाकारता येणार नाही. सबब पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत विदयार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा सुरू करावी. याची सुरूवात प्रायोगिक तत्वावर राजीव गांधी ई लर्निंग स्कूल व शामराव श्रीपत बराटे शाळा, दिगंबरवाडी येथून करण्यात यावी. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.

Abhay Yojana : Aba Bagul : १ कोटी पर्यंत थकबाकी असणारे ३८५ मिळकतधारकांचे भाजपशी काय हितसंबंध? : कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल 

Categories
Breaking News PMC Political पुणे

१ कोटी पर्यंत थकबाकी असणारे ३८५ मिळकतधारकांचे भाजपशी काय हितसंबंध?

: कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांचा सवाल

पुणे : महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते आबा बागुल म्हणाले, स्थायी समितीच्या बैठकीमध्ये बहुमताच्या जोरावर .१ कोटीपर्यंत थकबाकी असणा-या मिळकतींचा दंड माफ करणेसाठी भाजपने मिळकत कराची अभय योजनेचा प्रस्ताव मांडला. यावेळी काँग्रेस पक्षाने मागील पाच आर्थिक वर्षात प्रतिवर्षी वेळेत कर भरणा-या निवासी मिळकतधारकांचा सन २०२२-२०२३ चा संपूर्ण मिळकत कर माफ करण्यात यावा अशी उपसूचना दिली असता ती देखील सुसंगत नाही असे कारण दाखवत फेटाळण्यात आली. पुणे मनपा प्रशासन वेळेवर कर वसूल करणेस असमर्थ ठरत असून सत्ताधारी पक्षाकडून ५० लक्ष ते १ कोटी पर्यंत थकबाकी असणा-या ३८५ मिळकत धारकांना सवलत देण्यासाठी हा उदयोग सुरू आहे असे दिसत असून हे ३८५ मिळकत धारक कोण ? यांचे सत्ताधारी पक्षाबरोबर काय लागेबांधे आहेत याचे उत्तर पुणेकरांना दयावे लागणार आहे. असे ही आबा बागुल म्हणाले.

बागूल पुढे म्हणाले, .५० लक्ष वरील र.रू.१ कोटी पर्यंत थकबाकी असणा-या ३८५ मिळकती असून यांची निव्वळ थकबाकी ५६.३५ कोटी असून २ टक्के दंडाची रक्कम २१५.०६ कोटी असून एकूण थकबाकी २७१.४२ कोटी इतकी आहे. तसेच ५० लक्ष पेक्षा कमी थकबाकी असलेल्या मिळकतींची संख्या ४,२३,४३७ असून त्यांची निव्वळ थकबाकी १३७२.९८ कोटी असून २ टक्के दंडाची रक्कम २१५०.५९ कोटी असून एकूण थकबाकी असून ३५२३.५७ कोटी इतकी आहे.

वरील आकडे पाहता सत्ताधारी भाजप प्रामाणिकपणे प्रतिवर्षी मिळकत कर भरणा-या पुणेकरांवर अन्याय करणारी, महापालिकेला कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणारी अशी ही योजना आहे. पुणे मनपा प्रशासन वेळेवर कर वसूल करणेस असमर्थ ठरत असून सत्ताधारी पक्षाकडून ५० लक्ष ते १ कोटी पर्यंत थकबाकी असणा-या ३८५ मिळकत धारकांना सवलत देण्यासाठी हा उदयोग सुरू आहे असे दिसत असून हे ३८५ मिळकत धारक कोण ? यांचे सत्ताधारी पक्षाबरोबर काय लागेबांधे आहेत याचे उत्तर पुणेकरांना दयावे लागणार आहे.

पुणे मनपाचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्न असून हा कर वेळेत भरून महापालिकेडून मूलभूत सेवा व सुविधांची कामे वेळेवर व्हावीत या हेतूने हा कर वेळेत भरला जावा म्हणून कायदयामध्ये २ टक्के शास्तीची तरतूद करण्यात आली असून ही शास्ती माफ करण्याचा अधिकार कायदयाने कोणासही नाही. पूर्वी गोरगरीबांसाठी अभय योजना आणली ही बाब आम्ही समजू शकतो. परंतू कोटयावधींची थकबाकी असलेल्या मिळकतींना अभय योजना देणे महापालिकेच्या हिताचे नाही. या सर्व बाबींचा विचार करून महापालिकेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने प्रामाणिक करदात्यांवर अन्याय करत, महापालिकेस कोटयावधींचा भुर्दंड देणारी व करबुडव्यांना सवलत देणा-या अभय योजनेस विरोध केला असून मा.महापालिका आयुक्तांकडे या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नका अशी मागणी आबा बागूलांनी केली आहे.

1971 War : Aba Bagul : पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी चित्रफितीचे लोकार्पण गुरुवारी  : कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांची संकल्पना 

Categories
Breaking News cultural PMC पुणे

1971 युद्धाची 50 वर्षे

 पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी चित्रफितीचे लोकार्पण गुरुवारी

: कॉंग्रेस गटनेते आबा बागुल यांची संकल्पना

पुणे : 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या युद्धावर आधारित 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद अशा पाण्याच्या पडद्यावर थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफितीचे लोकार्पण दि. 16 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजता कै. वसंतराव बागुल उद्यान, शिवदर्शन पुणे येथे
संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होईल. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार
मोहन जोशी, मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह पुणे मनपा पदाधिकारी, नगरसेवक व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच निवृत्त लष्करी अधिकार्‍यांचा गौरवही यावेळेस केला जाणार आहे. पुणे मनपा काँग्रेस गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम पुणे महानगरपालिका सादर करणार आहे.

याप्रसंगी लष्करी बँड व पोलिस बँडही असेल.

या कार्यक्रमात एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ब्रिगेडियर अजित आपटे (निवृत्त), ब्रिगेडियर प्रकाश घोगले (निवृत्त) आणि कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त) हे उपस्थित राहणार असून, त्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी केला जाणार आहे. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 1971 या काळात झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने विजय मिळवला त्यास 50 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2021 असा ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताह आयोजित केला. त्यातील उद्घाटन व समारोपास पुणे महानगरपालिकेचा सहयोग लाभला. सैन्यदलाने पुणे महानगरपालिकेस भेट दिलेल्या प्रदर्शनीय रणगाड्याचे लोकार्पण, 1971 भारत-पाक युद्धातील छायाचित्रांचे प्रदर्शन, ‘1971’ या विषयावर खुली निबंध स्पर्धा, पुण्यातील 25 नामवंत चित्रकारांनी ‘इंदिरा गांधी आणि 1971 चे युद्ध’ या विषयावर साकारलेली पेंटिंग्ज, घोरपडी येथील युद्ध स्मारकास आदरांजली, ‘एक स्वाक्षरी शहीद जवानांच्या अभिवादनासाठी’ उपक्रम असे विविध कार्यक्रम या द्विसप्ताहात साजरे केले गेले. या
द्विसप्ताहाचा समारोप 16 डिसेंबर रोजी भव्यतेने साजरा होत आहे. 120 फूट लांब आणि 40 फूट रुंद पाण्याच्या पडद्यावर 1971 च्या युद्धावर आधारित 20 मिनिटांची थ्रीडी मल्टिमीडिया चित्रफीत हे प्रमुख आकर्षण असेल. ही चित्रफीत त्यानंतर रोज सायंकाळी कै. वसंतराव बागुल उद्यान येथे नागरिकांना दाखवली जाईल, अशी माहिती पुणे
मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली.

PMC : Aba Bagul : महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या मानधनाचा मार्ग मोकळा : कॉंग्रेस गटनेते  आबा बागुल यांची माहिती 

Categories
PMC पुणे

 महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या मानधनाचा मार्ग मोकळा

: कॉंग्रेस गटनेते  आबा बागुल यांची माहिती

पुणे : गेली अनेक वर्षे पुणे महानगरपालिकेतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींचा बुके व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात येतो; परंतु काही कारणांमुळे त्यांना मानधन देणे बंद करण्यात आले होते. हे मानधन सुरू होण्यासाठी मीअनेक वर्षे पाठपुरावा करत होतो. त्याबाबतचा ठराव  महानगरपालिकेत दिला होता. तो मुख्यसभेने एक मताने मंजूर केला असून पुरस्काराबरोबरच मानधन देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आबा बागुल म्हणाले.

आबा बागुल म्हणाले की, आता पूर्वीप्रमाणे महापालिकेतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींना यथोचित पुरस्कार देता येणार असून पुरस्कारासाठी राखीव असणाऱ्या 5 लाख रुपायातून पुरस्कार्थीचा यथोचित सत्कार, मानधन 1,11,000/-, मोमेंडो व श्रीफळ असे स्वरूप असणार आहे. यामुळे नक्कीच पुरस्कार्थीना पुरस्कार मिळाल्यासारखे वाटेल असा विश्वास आबा बागुल यांनी शेवटी व्यक्त केला.

Shivshahir : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

Categories
cultural Political पुणे महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे: पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज 15 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.

  स्वर्गीय पुरंदरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते

त्याबाबत महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची अनन्य भक्ती केली. त्यांच्या लेखणीचा, व्याख्यानांचा, महानाट्याचा आणि एकूणच जगण्याचा विषय शिवरायच होते. त्यांनी लेखन, वक्तृत्त्व, नाटके, गडकोट मोहिमा या सर्व माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरात शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास साध्या आणि सोप्या भाषेत घराघरात पोहोचवला, मनामनात रुजवला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे शिवरायांच्या पालखुणा आहेत त्या साऱ्या गडकोटांवर आणि ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन आणि तिथला इतिहास जागवून ते नतमस्तक झाले.

बाबासाहेबांच्या जाण्याने इतिहास आणि साहित्य क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. आज ते देहरुपाने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कार्यारूपाने ते भावी पिढ्यांना शिवरायांचा इतिहास सांगत कायमच प्रेरणा देत राहतील. पुणे महानगरपालिकाही वंदनीय बाबासाहेबांच्या स्मृती यथोचित जपण्याचे काम नक्कीच करेल. त्यांना समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली’.

मुरलीधर मोहोळ,
महापौर, पुणे

——–

शिवरायांचा जाज्वल्य इतिहास आपल्या लेखणीतून मराठी मनामनात पोहोचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करते. भावपूर्ण श्रद्धांजली!

दिपाली प्रदीप धुमाळ.
विरोधीपक्ष नेत्या पुणे मनपा.

—–

‘शिवचरित्र’ घरोघरी पोहचविण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य झिजवले. शिवप्रेम म्हणजे काय, हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जनमाणसात पोहचविले. शिवरायांच्या संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी अनेक गडकिल्ले पालथे घातले. महाराजांची माहिती, संदर्भ, याचा अभ्यास तसेच संशोधन करून शिवशाहिरांनी केवळ महाराष्ट्र, देश नव्हे तर जगामध्ये शिवाजी महाराजांची किर्ती पोहचविली. असा शिवभक्त पुन्हा होणे नाही.

– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका


महाराष्ट्र भूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे इतिहासाचे एक पर्व संपले. जाणता राजाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र पोहचवले. बाबासाहेबांनी महाराष्ट्रात दोन पिढ्या घडवल्या संपूर्ण जीवन त्यांनी शिवचरित्राच्या प्रसारासाठीच व्यतिथ केले. मी आयोजित करत असलेल्या पुणे नवरात्रौ महोत्सव या गेली 27 वर्षे साजरे करीत असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात ते अनेक वर्षे अनेक कार्यक्रमांना ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. तसेच पुणे नवरात्रौ महोत्सवातही त्यांचा महर्षी पुरस्कार देऊन गौरव केला होता. आपल्या विषयातून सर्वच काही चांगले घडत राहावे ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे या त्यांच्या उदगारामुळे सगळेच अंतर्मुख झाले होते. त्यांच्या सारखा व्यासंगी पुन्हा निर्माण होणे शक्य नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील एक मोठा दुवा निखळला ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

आबा बागुल
गटनेता, काँग्रेस पक्ष पुणे मनपा.