PMC Pune Hindi News |  डीपी के अनुसार पुणे शहर में सड़कों के चौड़ीकरण करने की आबा बागुल की मांग

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Pune Hindi News |  डीपी के अनुसार पुणे शहर में सड़कों के चौड़ीकरण करने की आबा बागुल की मांग

 |  पुणे महानगरपालिका के हाथ में 7 करोड़ वर्गफीट जमीन;  लेकिन जाम की स्थिति बनी रहती है

 PMC Pune Hindi News |  जबकि पुणे शहर का क्षेत्र दिन-ब-दिन बढ़ता जा रहा है, विकास योजना के अनुसार सड़कों को चौड़ा करने के लिए पुणे महानगरपालिका प्रशासन (Pune civic body) और जनप्रतिनिधियों की अक्षम्य उपेक्षा के कारण शहर का यातायात खतरनाक होता जा रहा है ( Pune Devlopment plan)।  महानगर पालिका के पास 7 करोड़ वर्गफीट जमीन होने के बावजूद सड़क का चौड़ीकरण कितनी जगह हुआ है, इसका कोई पुख्ता आंकड़ा नहीं है।  इसलिए 1987 से 2017 तक स्वीकृत विकास योजना (Pune DP) के अनुसार महानगरपालिका प्रशासन को भुगतान की गई भूमि को अपने कब्जे में लेना चाहिए और सड़कों को तुरंत चौड़ा करना चाहिए।ऐसी मांग पूर्व उपमहापौर आबा बागुल (Former Deputy Mayor ABA Bagul) ने की है.   (PMC Pune Hindi News)
 इस संबंध में पूर्व उप महापौर आबा बागुल ने कहा है कि वर्तमान में नगर निगम व जनप्रतिनिधि शहर की गंभीर यातायात समस्या (Traffic congestion in Pune) के समाधान में लापरवाही बरत रहे हैं.  नतीजतन, पुणे के निवासियों का जीवन खतरनाक यातायात में दम घुट रहा है और दुर्घटनाओं का ग्राफ भी बढ़ रहा है।  भविष्य को देखते हुए अभी से हमें ट्रैफिक प्लानिंग के लिए ठोस कदम उठाने होंगे।  उसके लिए सिटी ट्रांसपोर्ट प्लानिंग का मास्टर प्लान होना अनिवार्य है।  हालांकि वर्तमान स्थिति में यातायात व्यवस्था को दुरुस्त करने के लिए यदि विभिन्न उपायों को प्रभावी ढंग से लागू किया जाए तो जाम से निजात मिल सकती है, लेकिन उसके लिए 1987 से 2017 तक की विकास योजना में दर्शाई गई सड़कों का चौड़ीकरण अनिवार्य है।  लेकिन नगर निगम प्रशासन इसकी अनदेखी कर रहा है।  एफ. नगर निगम प्रशासन को जो ‘पीपीपी’ सिद्धांत पर मुट्ठी भर लोगों के लिए सड़कों की योजना बनाता है।  एसआई, टीडीआर, वित्तीय प्रतिफल देकर अधिग्रहित की गई 7 करोड़ वर्गफीट भूमि की सुविधा को ‘भूल’ दिया गया है।  (Pune Municipal Corporation News)
 दिलचस्प बात यह है कि सूचना के अधिकार में मांगी गई जानकारी में प्रशासन द्वारा जोनवार दी गई जानकारी में यह चौंकाने वाला तथ्य सामने आया है, इसलिए एफ.  ज्यादातर दरोगा, टीडीआर, आर्थिक मुआवजा जमीन अब भी मूल स्वामियों के कब्जे में है।कई जगहों पर अब भी अतिक्रमण है।सिर्फ सतबाड़ा पर ही नगर पालिका के नाम का जिक्र है, लेकिन कब्जा अभी तक नगर पालिका के पास नहीं है। .  इसलिए सड़क की चौड़ाई वाले इन स्थानों को तत्काल अपने कब्जे में लेकर सड़कों को विकसित करने की जरूरत है।पूर्व डिप्टी मेयर आबा बागुल ने भी इसका जिक्र किया है।  (PMC Pune News)

 सुचारू परिवहन के प्रभावी उपाय

 शहर में मौजूदा ट्रैफिक (Pune Traffic) जाम से बचने के लिए संकरी सड़कों सहित शहर की सभी सड़कों पर चौपहिया वाहनों की पार्किंग बंद करें, ट्रैफिक कंट्रोल लाइट की व्यवस्था करें, फुटपाथों को अतिक्रमण मुक्त करें, चौड़ाई घेरकर सड़कों का विकास करें सड़क के प्रत्येक चौराहे पर दो सौ मीटर की दूरी पर ट्रैफिक जाम खड़ा करना।फंसे हुए वाहनों को उठाने के लिए क्रेन की व्यवस्था को सक्षम करने, ट्रैफिक कंट्रोल लाइट को 24 घंटे चालू रखने के लिए प्रभावी पावर बैटरी बैकअप सिस्टम, डिजाइनिंग जैसे विभिन्न उपाय पूर्व उप महापौर आबा बागुल ने जहां आवश्यक हुआ वहां वन-वे सड़कें, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तर पर पार्किंग स्थल का निर्माण आदि का सुझाव प्रशासन को दिया है और उम्मीद है कि इसे प्रभावी ढंग से लागू किया जाएगा।  आबा बागुल ने यह भी कहा कि क्षेत्रीय कार्यालय स्तर पर अलग से ट्रैफिक प्लानर नियुक्त किए जाएं और पुलिस के सहयोग से प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तर पर सुचारू यातायात की जिम्मेदारी सौंपी जाए.  (Pune Traffic)
 —
News title | PMC Pune Hindi News | According to DP, Aba Bagul’s demand for widening of roads in Pune city| 7 crore square feet of land in possession of Pune Municipal Corporation; But the situation of jam remains

Pune Municipal Corporation | डीपी नुसार पुणे शहरात रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करण्याची मागणी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Pune Municipal Corporation | डीपी नुसार पुणे शहरात रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करण्याची मागणी

| ७ कोटी स्क्वेअर फूट जागा कागदोपत्री पालिकेच्या ताब्यात; पण वाहतूक कोंडी कायम | आबा बागुल

Pune Municipal Corporation |  क्षेत्रफळाने दिवसेंदिवस पुणे शहराचा (Pune City) विस्तार होत असताना विकास आराखड्यानुसार (Pune Devlopment  Plan) रस्त्यांचे रुंदीकरण (Road widening) करण्याकडेच पुणे महापालिका प्रशासन (Pune civic body) आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शहराची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. त्यात पालिकेकडे ७कोटी स्क्वेअर फूट जागा कागदोपत्री ताब्यात असूनही प्रत्यक्ष किती ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाले याची ठोस आकडेवारीही नाही. त्यामुळे १९८७ते २०१७पर्यंत मान्य विकास आराखड्यानुसार (Pune DP)  पालिका प्रशासनाने मोबदला अदा केलेल्या जागा ताब्यात घेवून रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करावे ,अशी मागणी महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल (Congress Leader Aba Bagul) यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे की, सद्यस्थितीत शहराचा वाहतुकीचा गंभीर बनलेला प्रश्न (Traffic congestion in pune)  सोडविण्याकडे महापालिकेसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जीवघेण्या वाहतुकीत पुणेकरांचा श्वास गुदमरत आहे आणि अपघातांचा आलेखही उंचावत आहे. भविष्याचा विचार करता आतापासून आपल्याला वाहतूक नियोजनासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत. त्यासाठी शहराच्या वाहतुकीबाबत नियोजनाचा मास्टर प्लॅन तयार असणे अनिवार्य आहे. मात्र सद्यस्थितीत बिकट बनलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीरीत्या राबविल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणे सहजशक्य आहे.मात्र त्यासाठी १९८७ पासून २०१७पर्यंत विकास आराखड्यात दर्शविलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण तातडीने करणे अपरिहार्य आहे. पण त्याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ‘ पी पी पी ‘ तत्वावर काही मूठभर लोकांसाठी रस्त्यांची आखणी करणाऱ्या पालिका प्रशासनाला एफ. एस.आय.,टीडीआर,आर्थिक मोबदला अदा करून कागदोपत्री ताब्यात घेतलेल्या ७कोटी स्क्वेअर फूट जागांचा सोईस्कर ‘विसर ‘पडला आहे. (Pune Municipal Corporation News)

विशेष म्हणजे माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत प्रशासनाने झोन निहाय दिलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.त्यामुळे एफ. एस.आय, टीडीआर,आर्थिक मोबदला दिलेल्या बहुतांश जागा या आजही मूळ मालकांच्या ताब्यात आहेत.अनेक ठिकाणी अतिक्रमणे कायम आहेत .केवळ सातबारावर पालिकेचे नाव लागले आहे मात्र ताबा पालिकेकडे आजतागायत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रस्ता रुंदीतील या जागा ताब्यात घेऊन तातडीने रस्ते विकसित करणे आवश्यक आहे.असेही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नमूद केले आहे. (PMC Pune News)

सुरळीत वाहतुकीसाठी प्रभावी उपाययोजना

सध्या शहरात होत असलेली वाहतूक कोंडी (Pune Traffic) टाळण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर चार चाकी वाहनांना पार्किंगला अटकाव घालणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे सुसूत्रीकरण करणे, अतिक्रमण विरहित फुटपाथ, रस्ता रुंदीतील जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे, प्रत्येक चौकात दोनशे मीटर अंतरावर गतिरोधक उभारणे, रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी क्रेनची व्यवस्था सक्षम करणे, चोवीस तास वाहतूक नियंत्रक दिवे सुरु ठेवण्यासाठी वीज बॅटरी बॅकअप यंत्रणा प्रभावी करणे, जिथे आवश्यक,त्या ठिकाणी एकेरी मार्गाची आखणी करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वाहनतळांची निर्मिती करणे आदी विविध उपाययोजना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाला सुचविल्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर नेमावेत आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर पोलिसांच्या मदतीने सुरळीत वाहतुकीची जबाबदारी त्या त्या ट्रॅफिक प्लॅनरवर सोपवावी असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे. (Pune Traffic)


News Title | Demand for widening of roads in Pune city as per DP| 7 crore square feet of land in the hands of the municipality; But the traffic jam remains

Akshay Tritiya | श्री.लक्ष्मीमाता मंदिरात तीन हजार हापूस आंब्यांची आकर्षक आरास | भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची रीघ

Categories
cultural social पुणे

श्री.लक्ष्मीमाता मंदिरात तीन हजार हापूस आंब्यांची आकर्षक आरास

| भक्तिमय वातावरणात दर्शनासाठी भाविकांची रीघ

अक्षय्य तृतीयेनिमित्त शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिरात सुमारे ३ हजार हापुस आंब्यांची आरास आणि फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात भाविकांची दर्शनासाठी रीघ लागल्याचे चित्र होते.

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल , पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या उपस्थितीत श्री. लक्ष्मीमाता देवीची आरती करण्यात आली.यावेळी देवीच्या चरणी तीन हजार हापुस आंबे अर्पण करण्यात आले.

दुपारी चारनंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात छबिना आणि मिरवणुकीनंतर भाविकांना प्रसादस्वरूपात आंब्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी घनश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, हेमंत बागुल ,कपिल बागुल ,सागर बागुल, सागर आरोळे, महेश ढवळे, बाबालाल पोळके, संतोष पवार, समीर शिंदे, आदींसह पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती.

Prabhag NO 19 | श्री संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे लोकार्पण 

Categories
Breaking News cultural Political पुणे

श्री संत संताजी महाराज जगनाडे उद्यानाचे लोकार्पण

प्रभाग क्र १९ काशेवाडी – लोहियानगर भागातील सेव्हन लाॅज चौक शंकर शेठ रोड पुणे,या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या नावाने उद्यान उभारण्यात आले आहे यांचा लोकार्पण  सोहळा पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, राज्याचे माजी गृह राज्यमंत्री रमेशदादा बागवे, पुणे म.न.पा चे माजी गटनेते आबा बागुल,शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे, स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे, श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे चे अध्यक्ष सतीश उबाळे, वाघोली चे सरपंच उबाळे, तेली समाजाचे प्रतिष्ठित सर्व प्रमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.


यावेळी उल्हासदादा पवार यांनी आपल्या भाषणात येणा-या पिढीला जगनाडे महाराजाच्या कामाची माहिती, सर्व वारकरी संप्रदाय तसेच भागवत समाजाची माहिती देणारे व समाजसेवेची प्रेरणा देणारे , दिशादर्शक हे उद्यान ठरणार आहे.. असे मत त्यांनी व्यक्त केले.
रमेशदादा बागवे यांनी पुर्वीच्या काळात देखील जगनाडे महाराज व तुकाराम महाराज यांच्या वर करमठ वादयान कडून अन्याय होत होता. तसेच अताचे काही लोक प्रयत्न करतायत ते सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून ते हाणून पाडला पाहिजे असे मत मांडले.
महाराष्ट्रात कुठेच जगनाडे महाराज यांचे नाव असलेले सार्वजनिक उद्यान, समाजमंदिर, वास्तू किंव्हा चौक, नाही त्यामुळे अनेक वर्षांपासून तेली समाजाच्या मागणीनुसार हे उद्यान साकारण्यात आले आहे..या उद्यानात महाराष्ट्रातील सर्व संतांची माहिती, त्यांचे अभंग, भागवत समाज व वारकरी संप्रदाय ची परंपरा. तथा इतिहासाची माहिती दर्शविणारे चित्र येथे आहे असे स्थानिक नगरसेवक अविनाश बागवे यांनी सांगितले.

प्रास्ताविक सुदुंबरे संस्थांचे उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे यांनी केले तर आभार क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान चे विठ्ठल थोरात यांनी केले.

Aba Bagul | मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा

माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाचे मा. गटनेते आबा बागुल यांच्या संकल्पनेतून देशात प्रथमच साकारलेल्या आणि रोल मॉडेल ठरलेल्या पुणे महानगरपालिकेच्या   राजीव गांधी  अकॅडमी ऑफ   ई- लर्निंग स्कुलचे   विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत आणि विविध क्षेत्रात यशस्वी  पदार्पण करत आहेत.

आनंदाची आणि अभिमानास्पद  बाब अशी की, पुणे महानगरपालिका संचलित राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ-लर्निग स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पुणे या कनिष्ठ महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष एप्रिल/मे 2022 चा इयत्ता बारावीचा निकाल 97.49टक्के लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यंदा एकूण 403 विद्यार्थी परीक्षेस बसले होते .त्यापैकी 389 विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून यंदा निकाल ९७.४९टक्के लागला आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आबा बागुल यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्गाचेही आबा बागुल यांनी आभार व्यक्त करून गुणवत्तेची ही उत्तुंग भरारी सदैव असू द्या अशा शुभेच्छाही दिल्या.

विशेष म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अल्पावधीत ख्याती निर्माण करणाऱ्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.२०१७च्या बॅचमधील नितिशा संजय जगताप ही  आज ‘आयपीएस अधिकारी ‘ झाली आहे. नितिशाची बहीण तनिशा जगताप ही सुद्धा  २०१५च्या बॅचमधून घवघवीत यश संपादन करून आज इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे.  राजीव गांधी  अकॅडमी ऑफ   ई- लर्निंग स्कुलने दहावी -बारावी आणि अन्य परीक्षांच्या   निकालांमध्ये सातत्याने शंभर टक्क्यांची परंपरा कायम राखली आहे. आयआयटीमध्ये ५०० विद्यार्थी तर जेईईमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. इतकेच नाहीतर ‘नासा’साठी दोन विद्यार्थीही पात्र ठरले आहेत .खऱ्या अर्थाने हा गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा जल्लोष आहे.

City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

महापालिका निवडणुकी अगोदर कॉंग्रेस पक्षात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कॉंग्रेस हायकमांड च्या निर्णयानुसार ५ वर्ष पूर्ण झालेल्या  पदाधिकाऱ्याना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यानी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आगामी काही दिवसात यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात शहर अध्यक्ष पदाची माळ पडणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे पाठवल्याचं कळतंय. यामुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट झालंय.

पाच वर्षांपेक्षा जास्त पदावर असलेल्यानी पदं रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. मागील आठवड्यात नगरच्या शिर्डीत राज्य काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी चिंतन शिबिरात हाच नियम राज्यात लागू करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर पुण्याला नवं नेतृत्व मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आबा बागुल हे सलग सहा वेळा महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पुण्यात ते कॉंग्रेसचे जुने नेते म्हणून ओळखले जातात. शिवाय त्यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून देखील पहिले जाते. आज ओबीसी बाबत चर्चा राज्यात सुरु आहे. त्यामुळे कॉंग्रेस बागुल यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहू शकते. शिवाय आगामी महापालिका निवडणुकीत बागुल यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होऊ शकतो. तसेच बागुल यांनी महापालिकेचे गटनेते झाल्या नंतर शहरातील सर्व नेत्यांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करू शकतो.

अरविंद शिंदे यांच्याकडे एक अभ्यासू नेता म्हणून पहिले जाते. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी महापालिकेत देखील बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडली आहे. सध्या ते प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. नगरसेवक पदाचा त्यांना गाढा अनुभव आहे. शिवाय त्यांनी आमदारकी देखील लढवली होती. या सर्वांचा महापालिका निवडणुकीत उपयोग होऊ शकतो. शिवाय मराठा समाजाचा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जाते. शहर कॉंग्रेसला आता मराठा समाजाचा नेता शहर अध्यक्ष म्हणून करायाचा आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे पक्ष शिंदे यांचा देखील विचार करू शकतो.

संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांच्याकडे देखील मराठा नेता म्हणून पहिले जाते. संजय बालगुडे हे देखील प्रदेश सरचिटणीस आहेत. शिवाय त्यांनी सुमारे १६ वर्षे युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना स्वीकृत नगरसेवक देखील करण्यात आले होते. बालगुडे नेहमी प्रदेश पातळीवर एक्टीव असतात. युवक कॉंग्रेस च्या माध्यमातून त्यांनी बरीच कामे केली आहेत. नेहमी आंदोलने केली आहेत. त्यामुळे पक्ष त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेऊ शकतो. तसेच दत्ता बहिरट हे देखील या पदासाठी इच्छुक आहेत. बहिरट यांनी नेहमीच कॉंग्रेसच्या धोरणानुसार गरीब लोकांना जवळ करत त्यांना मदत करण्याचे काम केले आहे. खास करून झोपडपट्टीतील लोकांसाठी त्यांचे काम कौतुकास्पद आहे. सामान्या विषयी कळवळा असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्याकडे आता कुठलेही पद नाही. बहिरट यांनी देखील आमदारकी लढवली आहे.

हे सगळेच नेते आपापल्या परीने शहर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे पक्ष आता या चौघांपैकी कुणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Taljai Hills | प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा  आरोप!

Categories
Breaking News PMC Political पुणे

‘ग्रे वॉटर ‘प्रक्रिया प्रकल्पामुळे तळजाई टेकडी सदैव राहणार हिरवीगार!

‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा   प्रकार:  काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल

पुणे | गेली १५ वर्षे  पिण्याच्या पाण्याच्या  टँकरवर अवलंबून  असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  माझ्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कै. वसंतराव बागुल उद्यानात साकारलेल्या  देशातील पहिल्या  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातुन आज पाणी मिळत  आहे,त्यामुळे तळजाई टेकडी आता हिरवीगार दिसत आहे आणि भविष्यातही  हा प्रकल्पच तळजाई टेकडीला हिरवीगार ठेवण्यासाठी आधारवड ठरणार आहे. मात्र ही बाब  लक्षात घेऊन काही स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मात्र अंतिम प्रभाग रचनेतून हा प्रकल्प स्वतःच्या प्रभागात समाविष्ट करण्याचे कारस्थान केले आहे . असे असले तरी जनता सुज्ञ आहे. ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ मारणाऱ्यांना ते अजिबात  थारा देणार नाहीत ,अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी दिली आहे. तसेच श्रेयाच्या राजकारणासाठीच प्रभाग रचनेत  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून हा प्रकल्प पळविण्याचा ‘उद्योग’ केला का ? असा सवालही केला आहे.

याबाबत काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल म्हणाले कि, माझ्या संकल्पनेतून आणि पुणे  महापालिकेच्यावतीने  सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे  हा   देशातील पहिला  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प साकारला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाच लाख  लिटर पाणी दररोज  तळजाई टेकडीवर जलवाहिनीतून जात आहे.सांडपाण्याचा पुनर्वापर या चळवळीला दिशादर्शक ठरणाऱ्या   या  शुद्ध पाण्याच्या   प्रकल्पाचे सर्वच स्तरातून कौतुक झालेले  आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत स्वतःकडे हा प्रकल्प यावा यासाठी काही व्यक्तींनी तो प्रभाग क्रमांक ५० मध्ये समाविष्ट करण्याचा उद्योग केला आहे. वास्तविक जाहीर झालेल्या  प्रभाग क्रमांक ३८ शिवदर्शन – पद्मावतीमध्ये यापूर्वीच  साकारलेल्या या प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे अगोदरच पाणी तळजाईवर जात आहे. असे असताना या प्रकल्पाचा निवडणुकीसाठी फायदा करून घेण्याबरोबरच श्रेयाच्या राजकारणासाठी  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून फक्त हा प्रकल्पच  प्रभाग क्रमांक ५० सहकारनगर -तळजाईमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. वास्तविक या पद्धतीने अशी प्रभाग रचना आजपर्यंत कधीही झालेली नाही. ज्यांनी हे कारस्थान केले. त्यांनी आजवर तळजाईच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केलेले आहे. त्यांच्या प्रभागात तळजाई टेकडी असताना,त्यांनी गेली पंधरा वर्षे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरच निधी खर्च केला. त्यातून तळजाई टेकडी कधीही हिरवीगार दिसली नाही. मात्र ज्यावेळी या भागाचे लोकप्रतिनिधित्व माझ्याकडे आले. त्यावेळी तळजाई टेकडीचा पर्यावरणपूरक विकासाचा आराखडा तयार करण्यात आला.  तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  पाणी मिळावे. टेकडी सदैव हिरवीगार राहावी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या भरमसाठ खर्चाला आळा बसावा, यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या आदर्शवत   ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली. मात्र  आता ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत हा  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प पळविण्याचाच  प्रकार झाला असला तरी जनता या वृत्तीच्या लोकांना थारा देणार नाही असेही आबा बागुल म्हणाले.

Akshay tritiya : श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

Categories
cultural पुणे

श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी शिवदर्शन वसाहतीच्या श्री लक्ष्मी मातेचा उत्सव पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकारातूनदरवर्षी विविध उपक्रमातून हा मातेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो.

श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त शिवदर्शन येथील मंदिरात फळांची आरास करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.

सकाळी 9 वाजता मा.आबा बागुल यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला असून संध्याकाळी पालकी सोहळा संपन्न झाला या वेळी मंदिराचे ट्रस्टी नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत,नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी, अमित बागुल, हेमंत बागुल व शिवदर्शन वसाहतीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Integrated Development Control and Promotion Regulations : विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही

Categories
Breaking News PMC पुणे

विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही

: महापालिका प्रशासनाचा अभिप्राय

पुणे : शहरामध्ये अनेक बांधकामांना पुणे महानगरपालिका स्थापन झालेपासून परवानगी देण्यात आली असून अनेक बांधकामे जीर्ण होवून मोडकळीस आल्याचे, बांधकामे अचानक पडून अनेक जीवित व वित्तीयहानी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. यासाठी बांधकाम परवानगी देणाऱ्या नियम, अटी व शर्ती यामध्ये योग्य दुरुस्ती करून घेण्यात यावी. असा ठराव आबा बागूल यांनी दिला होता. यावर महापालिका प्रशासनाने आपली भूमिका सादर केली आहे. त्यानुसार नव्याने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही. असे प्रशासनाने म्हटले आहे.

: शहर सुधारणा समितीत देण्यात आला होता प्रस्ताव

पुणे शहरात बांधकाम परवानगी पुणे महानगरपालिकेकडून नियमांस अधीन राहून दिली जाते. शहरामध्ये अनेक बांधकामांना पुणे महानगरपालिका स्थापन झालेपासून परवानगी देण्यात आली असून अनेक बांधकामे जीर्ण होवून मोडकळीस आल्याचे, बांधकामे अचानक पडून अनेक जीवित व वित्तीयहानी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे शहराच्या विकासावर परिणाम होत आहे. उदा.रस्तारुंदीमध्ये बाधित होणाऱ्या इमारती ह्या जीर्ण झाल्या असून कधीही पडू शकतील अश्या अवस्थेत असूनही त्या इमारतीस बांधकाम परवानगी (कमीटेड डेव्हलपमेंट) असल्याने सदर इमारतीमुळे रस्तारंदीकरण होत नाही. यासाठी बांधकाम परवानगी देणाऱ्या नियम, अटी व शर्ती यामध्ये योग्य दुरुस्ती करून घेण्यात यावी
असा ठराव आबा बागुल यांनी दिला होता.

प्रस्तुत ठरावाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे अभिप्राय देण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील जुन्या इमारतींची नियतकालीन पाहणी करणे व सुस्थिती प्रमाणपत्र घेणे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६५ व २६५ (अ) नुसार पुणे महानगरपालिकेवर धोका निर्माण होणार नाही अशा रीतीने दुरुस्त करून सुस्थितीत ठेवणे हे प्रत्येक
इमारतीच्या मालकाचे कर्तव्य आहे. तसेच जर इमारतीचा तीस वर्षांचा कालावधी समाप्त झाला असेल किंवा कायद्यातील तरतुदीनुसार जे नमूद असेल त्यानुसार इमारतीचा मालक किंवा भोगवटादार यांनी इमारत मानवी वस्तीसाठी योग्य आहे असे प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून प्रतिवर्षी नियमित पावसाळा पूर्व पाहणी करून याबाबत आवश्यक नोटीस देणे, धोकदायक वाडे इमारतींवर कारवाई करून पाडणे इत्यादी स्वरुपाची कार्यवाही करणेत येते. धोकादायक वाडे | इमारती यांचे तांत्रिक सर्वेक्षण तज्ञ स्ट्रक्चरल इंजिनीअरसंस्थांकडून करून घेण्यात येते. तसेच धोकादायक वाडे/ इमारतींची वर्गवारीही पुणे महानगरपालिकेकडून करण्यात येते.

धोकादायक वाडे | इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंच्या | मालकांच्या सोसायटीच्या विकसनसाठी प्रोत्साहन मिळावे यासत्व मे.राज्य शासनाने मंजूर केलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रक व प्रोत्साहन नियमावलीतील नियम क्र.७.६ मधील उपनियम क्र.७.६.१ व ७.६.२ मध्ये जादा एफ.एस.आय
व प्रोत्साहनपर एफ.एस.आय.ची तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतुदींच्या अनुषंगाने सध्या जुन्या जीर्ण / धोकादायक इमारती/वाड्यांचे विकसन होत आहे. त्यामुळे आता नव्याने एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही अशी धारणा आहे.

हा अभिप्राय शहर सुधारणा समिती समोर सादर करण्यात आला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत निर्णय होणार आहे.

PMC School : पुणे महापालिका शाळेतील विद्यार्थी जाणार अमेरिकेत 

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

पुणे महापालिका शाळेतील विद्यार्थी जाणार अमेरिकेत

: अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलचा शैक्षणिक प्रयोग हा आदर्श मॉडेल आहे. शाळेतील विद्यार्थी तसेच  शिक्षक यांचे शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत येथील विद्यार्थी अमेरिकेमध्ये व अमेरिकेतील विद्यार्थी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमध्ये काही दिवसाचा शैक्षणिक दौरा करतील.  यासाठी राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूलची निवड करण्यात आली असून तसा  प्रस्ताव तयार करून  असे प्रपोझल मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करीत आहे  असे उद्गार अमेरिकेच्या मुंबईतील  कॉन्सलेट जनरल ऑफिसचे व्हॉइस कॉन्सुल फॉर पॉलिटिकल अफेर्स  कॉड़ी एतलें यांनी आज काढले.

महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंग स्कूल ही भारतासह अमेरिकेत देखील प्रसिद्ध  असून अमेरिकेतून आलेल्या ३० शिक्षकांच्या गटाने दिलेला शाळेचा रिपोर्ट आधारे अमेरिकेच्या मुंबईतील  कॉन्सलेट जनरल ऑफिसचे व्हॉइस कॉन्सुल फॉर पॉलिटिकल अफेर्स  कॉड़ी एतलें यांनी आज शाळेला भेट दिली. पुणे महानगरपालिकेतील काँगेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी त्यांचे स्वागत केले.

आबा बागुल व कॉड़ी एतलें यांच्यात चर्चा झाली असून आर्थिक दुर्बल घटकातील व गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने सुरु केलेल्या या शाळेने गेल्या १२ वर्षात  घेण्यात आलेले विविध  उपक्रम, शाळेची गुणवत्ता, १०० टक्के निकालाची परंपरा तसेच शाळेतील विद्यार्थी ते नासमध्ये काम करण्याची संधी,इंजिनिअर, स्पर्धा परीक्षेतून आयपीएस होण्यापर्यंत विविध क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी काम करत आहेत.शाळेतील ५०० विद्यार्थी आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच शाळेत विद्यार्थ्यांवर विशेष शैक्षणिक लक्ष देण्यात येत असून रोजचा अभ्यासक्रम,  क्रीडा व इतर घेतले जाणारे उपक्रम, बुद्धिमत्ता टेस्ट अश्या विविध प्रकारच्या संदर्भात सविस्तर माहिती आबा बागुल यांनी दिली.

राजकीय व्यक्तीने पुढाकार घेऊन अश्या पद्धतीने आणि तेही महानगरपालिकेच्या माध्यमातून अश्या प्रकारची शाळा उभारणे ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.  यामुळे गरीब विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्याचा चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे,त्यांनी शाळेचे गेल्या १२ वर्षांचे  रिझल्ट अभ्यासले ते दरवर्षी १०० टक्के आहेत ते देखील कौतुकास्पद आहेत. अशी अभ्यासाबरोबरच इतर सुख सोइ देणारी शाळा  सुरु केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल व पुणे महानगरपालिकेचे त्यांनी अभिनंदन केले. या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले. या शाळेशी एक्सचेंज प्रोग्रॅम संदर्भात लवकरच पत्र व्यवहार करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल अश्विनी थेट व शिक्षक उपस्थित होते.

आबा बागुल यांनी त्यांच्या प्रस्तावाचे स्वागत केले व  या एज्युकेशनल  एक्सचंगे प्रोग्रॅमचा मी पाठपुरावा करून  पुणे महानगरपालिका ,राज्य व केंद्र शासनाची मान्यता, विद्यार्थ्यांची निवड, सोबत जाणाऱ्या शिक्षकांची निवड, सर्वांचे पासपोर्ट विझा तसेच विमान प्रवास तेथील सर्व खर्च या संदर्भात तपशीलवार प्रकल्प तयार करून  एक्सचेंज  प्रोग्राम  अंतर्गत राजीव गांधी अकॅडमी  ऑफ इ  लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवण्याकरिता पाठपुरावा करणार असल्याचे आबा बागुल म्हणाले

प्रिन्सिपल अश्विनी थेटे यांनी आभार मानले.