Hemant Bagul | ‘टीडीआर’ च्या इत्यंभूत नोंदींसाठी ‘  डिजिटायझेशन’ ठोस पर्याय

Categories
Breaking News PMC Political पुणे

‘टीडीआर’ च्या इत्यंभूत नोंदींसाठी ‘  डिजिटायझेशन’ ठोस पर्याय

  | दस्तावेजाऐवजी ‘स्मार्ट कार्ड’  देणेबाबत मनपा आयुक्तांना हेमंत बागुल यांची मागणी

 

विविध विकासकामांपोटी पुणे महानगरपालिकेकडून जमिनी ताब्यात घेताना संबंधितांना मोबदला म्हणून अदा होणाऱ्या ‘टीडीआर’चा हिशोब चोख राहावा आणि त्यातील गैरप्रकारांना कायमचा आळा बसावा यासाठी  ‘ डिजिटायझेशन   ‘ हाच एकमेव ठोस पर्याय  आहे. त्यामुळे  ‘टीडीआर’च्या इत्यंभूत नोंदींसाठी ‘  डिजिटायझेशन’ संदर्भात सकारात्मक विचार करून त्यानुसार कार्यवाहीचे  निर्देश द्यावेत,  अशी मागणी वास्तुविशारद हेमंत बागुल यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

बागुल यांनी दिलेल्या निवेदनानुसार महापालिकेच्या जुन्या हद्दीत १९९७ ते २०१० या काळात किती चौरस फूट हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) निर्माण झाला आणि त्यापैकी किती टीडीआर खर्ची पडला, याचा लेखाजोखा प्रशासनाकडे नाही,ही गंभीर बाब आहे. वास्तविक सद्यस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन अनेक किचकट कामे सुसह्य झाली  आहेत. बँकिंगप्रणालीसारखे सॉफ्टवेअरही अनेक नामवंत कंपन्यांचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. किंबहुना पालिका प्रशासनाला  हवे तसे सॉफ्टवेअर तयार करणेही  शक्य आहे. ज्यातून महापालिकेने अदा केलेल्या    ‘ सर्व टीडीआर’च्या नोंदी, कुणाला  अदा केला,किती खर्ची पडला यासह सर्व आवश्यक नोंदी करणे सहजशक्य आहे आणि एका ‘क्लिक’वर टीडीआरचा हिशोब मिळू शकतो.  ‘क्लाऊड’वर सर्व डेटा सुरक्षितही  राहू शकतो.

सध्या महापालिका प्रशासनाची टीडीआरच्या नोंदी ठेवण्याची प्रक्रिया म्हणजे   एखाद्या विकासकामांसाठी जमीन ताब्यात घेतल्यानंतर मोबदला म्हणून टीडीआर दिला जातो, ते एक प्रमाणपत्र आहे. ज्यावर नंतर ज्यांना टीडीआर  प्रमाणपत्र अदा केले  आहे.त्यांनी तो विकताना ज्यांना विकणार आहेत,त्यांच्याशी करारनामा करून तशा नोंदी संबंधितांच्या  टीडीआर प्रमाणपत्रावर केल्या जातात. मात्र अशा ‘डीआरसी’ सांभाळण्याचे काम हे पालिका प्रशासन करत  आहे. त्यात अनेक ‘डीआरसी’ गहाळ झाल्याचे बोलले जात आहे. तसेच भविष्यात  आगीची घटना घडल्यास या ‘डीआरसी’ नष्ट होण्याची भीती देखील आहे. त्यामुळे   ‘टीडीआर’चा हिशोब  ठेवण्याची  दस्तावेज  पद्धतच आता बदलली पाहिजे.  एकीकडे स्मार्ट सिटीकडे प्रवास होत असताना पालिका प्रशासनाने टीडीआरच्या नोंदी ( (दस्तावेज )) करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे.  बँकिंग प्रणालीसारखे एखादे सॉफ्टवेअर तयार करून  ज्यांना टीडीआर दिला जाणार आहे,त्यांना ‘स्मार्ट कार्ड ‘द्यावे आणि ज्यांना टीडीआर हवा आहे,त्यांचे स्मार्ट कार्ड तयार करावे.त्या दोघांचे टीडीआर अनुषंगाने होणारे सर्व व्यवहार हे या स्मार्ट कार्डमध्ये नोंदवले जातील.  जेणेकरून कुणाला टीडीआर दिला, कुणी घेतला, एकूण   किती चौरस फूट टीडीआर निर्माण झाला, किती वापरला गेला याचा सर्व  हिशोब एका ‘ क्लिक’ वर पालिकेकडे सहज उपलब्ध होईल. तसेच सद्यस्थितीत पालिकेला सांभाळाव्या लागणाऱ्या ‘डीआरसी’ गहाळ, नष्ट होण्याची भीतीही राहणार नाही आणि गैरप्रकारांना कायमचा आळा बसून पारदर्शकता येईल. त्यामुळे  ‘टीडीआर’च्या इत्यंभूत नोंदींसाठी ‘  डिजिटायझेशन’ संदर्भात सकारात्मक विचार करून त्यानुसार कार्यवाहीचे  निर्देश द्यावेत. असे ही बागुल यांनी म्हटले आहे.

Akshay tritiya : श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

Categories
cultural पुणे

श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त मंदिरात फळांची आरास

अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी शिवदर्शन वसाहतीच्या श्री लक्ष्मी मातेचा उत्सव पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पुढाकारातूनदरवर्षी विविध उपक्रमातून हा मातेचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो.

श्री लक्ष्मी माता उत्सवानिमित्त शिवदर्शन येथील मंदिरात फळांची आरास करण्यात आली होती. संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात मोगऱ्याच्या फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.

सकाळी 9 वाजता मा.आबा बागुल यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला असून संध्याकाळी पालकी सोहळा संपन्न झाला या वेळी मंदिराचे ट्रस्टी नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत,नंदकुमार कोंढाळकर,रमेश भंडारी, अमित बागुल, हेमंत बागुल व शिवदर्शन वसाहतीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dr. Jagannath Dixit : Hemant Bagul : मधुमेहावर नियंत्रण आणणे शक्य – डॉ.जगन्नाथ दीक्षित

Categories
cultural पुणे लाइफस्टाइल

मधुमेहावर नियंत्रण आणणे शक्य – डॉ.जगन्नाथ दीक्षित

पुणे : आपल्या देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तरुण वयात ही मधुमेहाने झडलेले अनेक युवक बघायला मिळतात. हा देशाच्या दृष्टीने देखील चिंतेचा विषय आहे, मात्र मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी व तसेच वजन कमी करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करून योग्य मार्गदर्शनाच्या आधारे त्याचे तंतोतंत पालन केले तर मधुमेहासारखे असाध्य रोग देखील नियंत्रणात आणता येऊ शकतील. गोळ्या अथवा इन्सुलिन हा तात्पुरता उपाय आहे. कायमचा मधुमेह नष्ट करण्यासाठी व मधुमेह मुक्त होण्यासाठी कंबर कसून काम केले पाहिजे, यासाठी 100, 200, 300 मधुमेह रुग्णांची छोटी युनिट्स करून त्याद्वारे चांगले मार्गदर्शन मिळून मधुमेह नियंत्रण आणणे व  अखेरीस मधुमेह मुक्त होणे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मधुमेह तज्ञ डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी केले

पुण्याच्या सहकार नगर भागातील तुळशीबागवाले मैदानात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत आबा बागुल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे मनपा काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल होते.

याप्रसंगी सांस्कृतिक दिवाळीतील हा कार्यक्रम सर्वांना उपयोगी पडो अशी प्रारंभी सदिच्छा व्यक्त करून हेमंत बागुल म्हणाले की, ”स्वतः साठी वेळ काढून नाही जगलात तर काय जगलात” असे सांगत देशात 10 कोटीहून अधिक मधुमेह नागरिक असून त्याची संख्या वाढत आहे मानसिक ताण, अयोग्य आहार, व्यसनाधीनता बैठे जीवन व व्यायामाचा अभाव या पाच गोष्टींमुळे हा रोग जडतो व डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या सारख्यांचा सल्ला तंतोतंत आत्मसात केला पाहिजे असे सांगून सर्वांना मधुमेह मुक्त होणाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे मनपा काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल म्हणाले की मधुमेहासारखे रोग नियंत्रित आणणे प्रत्येकाचे स्वप्न असून त्यासाठी धन्वंतरी आपल्या दारी असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आरोग्याची गोळी बाजारात कुठेही विकत मिळत नाही असे सांगून केवळ वयाच्या 60 व्या वयापासून नव्हे तर तरुण वयापासून हृदय विकार, ब्लड प्रेशर, असे विकार जडणार नाहीत यासाठी डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते.

: डॉ दीक्षित यांच्याकडून हेमंत बागुल यांचे कौतुक

यावेळी डॉ जगन्नाथ दीक्षित म्हणाले की, मधुमेह हा वंशपरंपरागत रोग आहे तसेच अनेक कारणांमुळे ही व्याधी जडू शकते. आपल्याला त्यावर सातत्याने देखरेख करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि तो नियंत्रनात आणता येऊ शकतो हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. देशात आता वैद्यकीय आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता येत असून हेमंत बागुल यांच्या सारख्या तरूणांनी अश्या प्रकारच्या व्याख्यानाचे आयोजन करणे ही देखील कौतुकाची बाब आहे.

जगभरात फिरताना मधुमेहाची व्याधी किती मोठी आहे याची जाणीव होते, याचे दुष्परिणामही अनेकांनी अनुभवले आहे मधुमेह नियंत्रणात आणण्यासहित मधुमेह मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत त्या पध्दतीची जीवनशैली अंगिकारली तर आपण मधुमेह मुक्त जीवन जगू यापासून सुटका होऊ शकते, यासाठी छोटे युनिट्स करून 100 मधुमेह रुग्णांनी एकत्र येऊन सातत्याने तपासणी करणे. ज्यास दीक्षित डाएट म्हंटले जाते त्याचा अवलंब करत चळवळ उभी केली पाहिजे.
तरुणांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले पाहिजे अशी आशा डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी आधार सेवा केंद्र अध्यक्ष हेमंत बागुल यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमा नंतर प्रश्नोत्तरे घेण्यात आली. यावेळी डॉ जगन्नाथ दीक्षित यांनी अनेक नागरिकांना विविध प्रश्नांची उत्तरे देत मार्गदर्शन केले.

Hemant Bagul : सहकारनगर मध्ये सांस्कृतिक दिवाळी! : आधार सेवा केंद्राचा उपक्रम 

Categories
cultural पुणे

सहकारनगर मध्ये सांस्कृतिक दिवाळी!

: आधार सेवा केंद्राचा उपक्रम

पुणे : पुण्याच्या सहकार नगर भागातील तुळशीबागवाले कॉलनी मैदानात शनिवार आणि रविवारी सांस्कृतिक दिवाळी कार्यक्रम आधार सेवा केंद्रातर्फे आयोजित करण्यात आला आहे.

शनिवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता मधुमेह तज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित (दीक्षित डायट)यांचे आरोग्यदायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असून वेटलॉस आणि मधुमेह नियंत्रण या दोन विषयावरती ते व्याख्यान देतील या वेळेस प्रश्नोत्तराचा तास होणे अपेक्षित आहे या कार्यक्रमाला काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी दिनांक ७ नोव्हेंबर २०२१रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचा किशोर कुमार, मोहम्मद रफी तसेच अन्य नामांकित गायकांचा “गीतो का सफर” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. मार्गदर्शक म्हणून काँग्रेस पक्ष नेते आबा बागूल उपस्थित राहतील.

हे दोन्ही कार्यक्रम नागरीकांसाठी विनामूल्य आहेत. यावेळी कोरोनाचा प्रसार थांबल्यामुळे वातावरण पूर्ववत होत असताना कोरोना संपला नाही याची जाण घेऊन नागरिकांच्या काळजीबद्दल ही विशिष्ट निर्देश दिले जातील.

या कार्यक्रमाचे आयोजन आधार सेवा केंद्राचे अध्यक्ष हेमंत आबा बागूल यांनी केले आहे.