Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला

| कॉंग्रेस नेत्यांचा आरोप

Pune News | निवडणुकीत भाजपाने (BJP) आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा (Old Wada) विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू. परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला आहे. असा आरोप कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar), कॉंग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी केला. (Pune News)

कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहराचा विकास आराखडा (Pune Devlopment Plan) सन 2013-14 मध्ये प्रकाशित झाला. त्या वेळेस शहरातला गावठाण भाग विशेषता पेठामध्ये बांधकामाला 1.5 FSI करण्यात आला होता. या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता व सभागृहात तसेच राज्य सरकारने हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यावेळेस पुण्यातील पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांवर अन्यायकारक आहे अशी हरकत व सूचना केली होती. पुण्यातील गावठाणात आलेले जुने वाडे व त्यात राहणारे नागरिक अक्षरश 60 ते70 स्क फूट घरात राहत आहेत, भाडेकरूंना पुनर्वसन करण्यासाठी व वाड्यांच्या विकास करायचा असेल तर 2.50 FSI द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. (Pune Municipal Corporation)

सन 2015 मध्ये भाजप सरकारने मनपा कडून विकास आराखडा स्वतःच्या ताब्यात घेतला व तो प्रकाशित केला. परंतु त्यात सुद्धा पुणेकरांना गावठाण भागात 1.50 FSI. ठेवण्यात आला होता. त्यावर निवडणुकीत भाजपाने आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू.परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठाया मध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (PMC Pune)

तसेच वाड्याचा व पेठामधील घरांचा विकासाला 1 मीटर साईड मार्जिन सोडावी लागणार असे समान विकास नियमावलीत (U.D.C.P.R) सन 2020 मध्ये नमूद करण्यात आले होते. याबाबत आपण 1 मीटरची अट रद्द करू असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी अनेक वेळा दिली व कसबा पोटनिवडणुकीत सुद्धा दिले होते परंतु साईड मार्जिनची अट सुद्धा तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पुण्याचा विकास ठप्प होणार आहे. पुणेकरांनी भाजपा ला 100 नगरसेवक 4आमदार 1खासदार दिले. त्या बदल्यात  पुणेकरांवर भाजपाने सूड उगवला आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (Pune News)


News Title | Pune News | It is difficult to develop palaces in Pune BJP took revenge on the people of Pune| Allegation of Congress leaders

Pune Rain | Sanjay Balgude | पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या  अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा | कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या  अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा

| कॉंग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे | पुणे शहरात मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. सदर पावसाने पुणेकर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शहरात स्मार्ट सिटी,रस्ते,ड्रेनेज व इतर खात्यांची कामे करणारे ठेकेदार योग्य कामे करत नाहीत. तसेच काही ठेकेदार फक्त बिल घेतात आणि काम करत नाहीत. तर काही ठेकेदार पावसाळी,ड्रेनेज लाईन बुजवण्याचे काम करत आहे. तथापि याबाबत कारवाई झाली असती तर अशी वेळ पुणेकरांवर आली नसती. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या  अधिकारी, ठेकेदार यांच्यावर कारवाई करा. अशी मागणी प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

बालगुडे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहरात मागील तीन-चार दिवस मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. सदर पावसाने पुणेकर नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. अनेकांची घरे काही प्रमाणात वाहून गेले आहेत. तर अनेकांच्या झोपड्यांमध्ये व सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. हजारो नागरिकांची वाहनांची व घरातल्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच पुण्याच्या रस्त्यांना नदी नाल्यांचे स्वरूप आले होते. यापूर्वीसुद्धा पुण्यात मुसळधार वृष्टी व्हायची परंतु काही तुरळक घटना सोडल्या तर शहराला खूप त्रास होत नव्हता. परंतु मागील तीन वर्षात हा प्रकार वाढत गेला आहे. विशेषता या वर्षात पावसाळी पाण्याचे नियोजन न केल्याने व ठेकेदारांनी रस्त्याची,नाल्यांची,गटारांची कामे योग्य पद्धतीने न केल्याने हा प्रकार वाढला आहे. पावसाच्या पाण्याला वाहून जायला वाटणं निघाल्याने पाणी रस्त्यावर झोपड्यांमध्ये सोसायट्यांमध्ये पार्किंगमध्ये पेठाण मधील तळ घरात राहत असलेल्या घरांमध्ये शिरत आहे. संपूर्ण पुणे शहरात हजारो नागरिक बाधित झाले आहेत, व पुणेकरांचे किमान कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बालगुडे म्हणाले, आम्ही प्रदेश काँग्रेसच्या वतीने व वैयक्तिक पुणेकर नागरिक म्हणून आपल्याला फेब्रुवारी महिन्यात निवेदन देऊन याची संपूर्ण कल्पना दिली होती. शहरात स्मार्ट सिटी,रस्ते,ड्रेनेज व इतर खात्यांची कामे करणारे ठेकेदार योग्य कामे करत नाहीत. तसेच काही ठेकेदार फक्त बिल घेतात आणि काम करत नाहीत. तर काही ठेकेदार पावसाळी,ड्रेनेज लाईन बुजवण्याचे काम करत आहे.तथापि याबाबत कारवाई झाली असती तर अशी वेळ पुणेकरांवर आली नसती. हा प्रकार म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. पुणेकरांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याची जबाबदारी निश्चित करावी ज्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांबरोबर संगनमत केले आहे. अशा त्वरित कारवाई करावी व ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी.असे ही बालगुडे म्हणाले.

Smart city | pune | काय ते रस्त्यावरचे खड्डे… काय ती स्मार्ट सिटी .. एकदम ओके…

Categories
Breaking News PMC Political पुणे

काय  ते  रस्त्यावरचे खड्डे… काय  ती  स्मार्ट  सिटी .. एकदम  ओके…

कॉंग्रेसची भाजपवर उपहासात्मक टीका

पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.  पुण्यातील बऱ्याच रस्त्यांवर  मोठमोठे खड्डे पाहण्यास मिळत आहेत. जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना आपले वाहन चालवावे लागत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे यांनी पुणे करांच्या वतीने आपली चिन्ता कट आऊटच्या द्वारे व्यक्त केली आहे.
पुणे शहर २०१७ ते २०२२ .
” काय ते रस्त्यावरचे खड्डे … काय ती घरपट्टीत वाढ … काय ती पाणीपट्टीत वाढ … काय ती स्मार्ट सिटी … काय तो कोट्यावधींचा घोटाळा … एकदम ओके “. 
असे या कट आऊट वर  उल्लेख करण्यात आले.  पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर कट आऊट लावण्यात आले आहेत.

City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?

महापालिका निवडणुकी अगोदर कॉंग्रेस पक्षात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कॉंग्रेस हायकमांड च्या निर्णयानुसार ५ वर्ष पूर्ण झालेल्या  पदाधिकाऱ्याना राजीनामा देण्यास सांगितले आहे. तसा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह तीन पदाधिकाऱ्यानी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आगामी काही दिवसात यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात शहर अध्यक्ष पदाची माळ पडणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या ठरावानुसार त्यांनी हे राजीनामे पाठवल्याचं कळतंय. यामुळे पुण्यातील काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार हे स्पष्ट झालंय.

पाच वर्षांपेक्षा जास्त पदावर असलेल्यानी पदं रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार देशभरातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. मागील आठवड्यात नगरच्या शिर्डीत राज्य काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी चिंतन शिबिरात हाच नियम राज्यात लागू करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर पुण्याला नवं नेतृत्व मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

आता नवीन शहर अध्यक्ष कोण होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. या पदासाठी शहरातून सर्व तगडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये आबा बागुल, अरविंद शिंदे, संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांचा समावेश आहे. आबा बागुल हे सलग सहा वेळा महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पुण्यात ते कॉंग्रेसचे जुने नेते म्हणून ओळखले जातात. शिवाय त्यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून देखील पहिले जाते. आज ओबीसी बाबत चर्चा राज्यात सुरु आहे. त्यामुळे कॉंग्रेस बागुल यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहू शकते. शिवाय आगामी महापालिका निवडणुकीत बागुल यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होऊ शकतो. तसेच बागुल यांनी महापालिकेचे गटनेते झाल्या नंतर शहरातील सर्व नेत्यांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पक्ष या सर्व गोष्टींचा विचार करू शकतो.

अरविंद शिंदे यांच्याकडे एक अभ्यासू नेता म्हणून पहिले जाते. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी महापालिकेत देखील बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडली आहे. सध्या ते प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. नगरसेवक पदाचा त्यांना गाढा अनुभव आहे. शिवाय त्यांनी आमदारकी देखील लढवली होती. या सर्वांचा महापालिका निवडणुकीत उपयोग होऊ शकतो. शिवाय मराठा समाजाचा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पहिले जाते. शहर कॉंग्रेसला आता मराठा समाजाचा नेता शहर अध्यक्ष म्हणून करायाचा आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे पक्ष शिंदे यांचा देखील विचार करू शकतो.

संजय बालगुडे आणि दत्ता बहिरट यांच्याकडे देखील मराठा नेता म्हणून पहिले जाते. संजय बालगुडे हे देखील प्रदेश सरचिटणीस आहेत. शिवाय त्यांनी सुमारे १६ वर्षे युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यांना स्वीकृत नगरसेवक देखील करण्यात आले होते. बालगुडे नेहमी प्रदेश पातळीवर एक्टीव असतात. युवक कॉंग्रेस च्या माध्यमातून त्यांनी बरीच कामे केली आहेत. नेहमी आंदोलने केली आहेत. त्यामुळे पक्ष त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेऊ शकतो. तसेच दत्ता बहिरट हे देखील या पदासाठी इच्छुक आहेत. बहिरट यांनी नेहमीच कॉंग्रेसच्या धोरणानुसार गरीब लोकांना जवळ करत त्यांना मदत करण्याचे काम केले आहे. खास करून झोपडपट्टीतील लोकांसाठी त्यांचे काम कौतुकास्पद आहे. सामान्या विषयी कळवळा असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्याकडे आता कुठलेही पद नाही. बहिरट यांनी देखील आमदारकी लढवली आहे.

हे सगळेच नेते आपापल्या परीने शहर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे पक्ष आता या चौघांपैकी कुणाला संधी देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tax exemption : पुण्यातही ५००चौरस फुटांपर्यंतच्या मिळकत धारकांना करमाफी द्यावी

Categories
PMC Political पुणे

पुण्यातही ५००चौरस फुटांपर्यंतच्या मिळकत धारकांना करमाफी द्यावी

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे – सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पुण्यातही ५००चौरस फुटापर्यंतच्या मिळकत धारकांना महापालिकेनी करमाफी द्यावी, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी आणि प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

मुंबई महापालिकेने ५००चौरस फुटांच्या घरांचा मिळकत कर रद्द केलेला आहे. त्या धर्तीवर पुणे महापालिकेनेही मिळकत कर रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाने यापूर्वीच केलेली होती. महापालिकेतकर सवलतीचा ठरावही मांडला, मंजूर झाल्यावर राज्य शासनाकडे पाठविला होता. पन्नास हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते, अशी माहिती मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी दिली .

गेली दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे, त्यातही औषधोपचारांवर बराच खर्च झाला आहे. यातून लोकं अद्याप सावरलेले नाहीत तोच परत कोरोनाची तिसरी लाट ओमायक्रॉन या साथींनी डोकं वर काढलं आहे. या परिस्थितीत पुन्हा निर्बंध येणे अटळ आहे. लोकांच्या हातात पुरेसे उत्पन्न नाही. त्यातच मिळकत कर भरण्याचा बोजा त्यांना सोसवणारा नाही. त्यामुळे ५००चौरस फुटापर्यंतच्या मिळकतीवरचा कर रद्दच करण्यात यावा, अशी मागणी मोहन जोशी आणि संजय बालगुडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

महापालिकेचे उत्पन्न यंदा डिसेंबर महिन्यातच उद्दीष्टापेक्षाही वाढले आहे, २०२१मध्ये बांधकाम क्षेत्राला चालना मिळाल्याने पालिकेचे उत्पन्न ४००कोटीहून अधिक वाढले असून मार्च पर्यंत ते अधिक वाढेल हे लक्षात घेऊन महापालिका करमाफी देऊ शकते. अशा करमाफीतून महापालिकेवर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही. ही बाब लक्षात घ्यावी, असेही मोहन जोशी, संजय बालगुडे यांनी पत्रकात म्हटले आहे.