INDIA Front Pune | महाविकास आघाडी मेळाव्याला आबा बागुलांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा | पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं नसल्याने नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा! 

Categories
Breaking News Political पुणे

INDIA Front Pune | महाविकास आघाडी मेळाव्याला आबा बागुलांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा | पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं नसल्याने नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा!

INDIA Front Pune | पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट (India Aghadi Pune melava) चा पुण्यात मेळावा होत आहे. भाजपला मात देण्यासाठी इंडिया आघाडी मजबूत करण्या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र या मेळाव्याला उपस्थित लोकांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्या नेत्यांनीच जास्त जास्त चर्चा झाली. कारण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले आबा बागूल (Aba Bagul pune Congress) यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. पक्ष संघटनेत विश्वासात घेतले जात नसल्याने बागूल मेळाव्याला आले नाहीत. अशी चर्चा कार्यकर्त्यामध्ये रंगली होती. शिवाय काँग्रेसमध्ये सातत्यानं डावललं जात असल्याने आपली योग्य पारख करणाऱ्या पक्षाकडे बागुल मोर्चा वळवतील,  अशी शक्यता देखील कार्यकर्ते वर्तवत होते.
लोकसभा निवडणूक जवळ येऊ घातली आहे. आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाला हाणून पाडण्यासाठी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट देखील कामाला लागला आहे. खासकरून पुण्यावर या लोकांचे लक्ष आहे. त्याचाच भाग म्हणून आणि आपली एकी दाखवण्यासाठी महाविकास आघडी आणि इंडिया फ्रंट चा आज काँग्रेस भवन मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्यातील माजी उपमहापौर आबा बागूल यांची अनुपस्थिती काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगलीच खटकली.
आबा बागूल हे सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. म्हणजे 30 वर्षांचा त्यांचा कालखंड. जनसंपर्क दांडगा. शिवाय ओबीसी चेहरा. अशा सगळ्या जमेच्या बाजू असताना देखील शहर काँग्रेस मध्ये नेहमी त्यांना डावललं गेलं. अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करत होते. पक्षासाठी एवढं झटणारा आणि जनसंपर्क असलेल्या माणसाला काँग्रेस ने पुढे करायला हवं होतं. अशा नेत्याच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यायला हवं. मात्र तेच होताना दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना एकदाही संधी दिली गेली नाही. उलट जे लोक नेहमी निवडणुकीत अपात्र ठरले त्यांना लोकसभा आणि विधानसभा लढवण्यासाठी पुढं केलं जातं. त्यात ही लोकं हरली तर पुन्हा त्यांनाच पदाधिकारी म्हणून पार्टीत महत्वाची पदं दिली जातात. अशाने काँग्रेस कधी मोठी होणार पुढे जाणार? अशीही व्यथा कार्यकर्ते बोलून दाखवत होते.
बागुल यांनी पार्टीने त्यांच्या 30 वर्षाच्या कालावधीत अवघी 8-9 वर्षे महत्वाची पदे दिली. ती देखील सगळ्यांना देऊन झाल्यानंतर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेत काँग्रेस कडे उपमहापौर पद होते. बागूल यांना हे पद शेवटी दिलं गेलं. काँग्रेसनं ज्यांना उपमहापौर केलं त्या सर्वांनी पक्ष बदलला. बागूल यांनी मात्र आपला एकनिष्ठतेचा धर्म पाळला. असे असूनही त्यांना पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं जात नसल्याची चिंता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आजचा मेळावा हा इंडिया आघाडी, पुणे च्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. तसेच काँग्रेस च्या दृष्टीने देखील. काँग्रेस भवन मधला हा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. अशा वेळी काही महत्वाच्या नेत्यांची नाराजी दिसणे, हे ग्रहण लागल्यासारखे आहे. काँग्रेस मधून महत्वाचे नेते निघून जात आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, ज्योतिरादित्य सिंधिया नुकतेच अशोक चव्हाण, अशा लोकांना भाजपनं हेरलं आणि आपल्या पक्षात घेतलं. शिवाय त्यांना चांगली पदे देखील दिली. तरीही काँग्रेस मध्ये अंतर्गत बदल होताना दिसून येत नाही. बागुल यांच्यासारखा नेता देखील आपल्या कारकिर्दीला साजेसा पक्ष शोधू शकतो. काँग्रेसने अशी लोकं टिकवून ठेवायला हवीत. तरच पक्ष पुढे जाईल आणि सत्तेची गणितं सोपी होतील.

Service Duty Dedication Week | द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत | जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत

| जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

|गांधी परिवार, काँग्रेसला त्यागाची मोठी परंपरा

|भारतीय संविधान, काँग्रेस विचारांमुळे देश एकसंध

 

पुणे : “गांधी परिवार, (Gandhi Family) काँग्रेसला (Congress) त्यागाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी (Rahul Gandhi)  भारत जोडो पदयात्रेतून (Bharat Jodo yatra)  करत आहेत,” असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी केले. (Indian National congress, INC, INC Pune)

सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, दत्ता बहिरट आदी उपस्थित होते. (Former MLA Mohan Joshi)

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर आपण बोलले पाहिजे. हृदयाची आणि प्रेमाची भाषा, संवाद गरजेचा आहे. आज राहुल गांधी तेच करत आहेत. स्वत्व विसरून काम करणाऱ्या राहुल गांधींचा त्याग आपण लक्षात घ्यायला हवा. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी जो त्याग केला, त्याच वाटेवर राहुल गांधी चालत आहेत. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम ते करत असल्याने त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रेम, आस्था आहे. आपल्या पित्याच्या खुन्यांना क्षमा करण्याची त्यागभावना केवळ राहुल गांधींकडे आहे.”

“हा देश महात्मा गांधींचा आहे आणि त्या देशाची सद्भावनेची संस्कृती आहे. मात्र, गांधींना मारणाऱ्या त्याच नथुरामचे इथे होणारे उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. चित्रपटांच्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर होणार हल्ला आपण सहन करता कामा नये. शिवाजी महाराजांना देवत्व देऊ नये, त्यांचा कार्याचा आदर्श ठेवून काम करायला हवे. गांधी-आंबेडकर यांच्यातील संबंध खूप चांगले होते. त्यांच्यात मतभेद जरूर होते. मात्र, देशहितासाठी त्यांनी कायम एकत्रित काम केले. खरा इतिहास आपण नव्या पिढीला सांगितला पाहिजे. गांधी-नेहरू-आंबेडकर या तिघांनी दूरदृष्टीने देशाची रचना केली. अनेक संस्था निर्माण केल्या. इंदिरा गांधींनी देशाला सक्षम केले. काँग्रेसच्या विचारधारेतून हे सगळे झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहावा,” असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडले.

उल्हासदादा पवार म्हणाले, “सेवा, कर्तव्य आणि त्यागाची गांधी घराण्याची परंपरा आहे. ‘भारत जोडो’ मधून खऱ्या अर्थाने ‘मन की बात’ होत आहे. सत्याची जाण नसलेल्या, खोटेपणाचा बुरखा पांघरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनतेने डोळे तपासणी करण्याची गरज आहे. एका वेगळ्या परीपेक्ष्यातून देश जात असताना आजच्या स्थितीत निर्भय लोकांची गरज आहे.”

स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “समाजातील सर्व घटकांना जोडणारे विविध कार्यक्रम शहराच्या विविध भागात होत आहेत. अशा अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनियाजीना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न करतो आहोत.”

अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. वीरेंद्र किराड यांनी आभार मानले.
——————————-
सप्ताहाचे आव्हाडांकडून कौतुक
गेली १८ वर्षे मोहनदादा जोशी या सप्ताहाच्या माध्यमातून गांधी परिवाराच्या त्यागाची, सेवेची आणि कर्तव्यभावनेने केलेल्या कामाची परंपरा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काँग्रेसच्या प्रेमाच्या, सद्भावनेच्या विचाराने समाजातील सर्व घटकांसाठी नाविन्यपूर्ण व उपयुक्त असे उपक्रम राबवत आहेत. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने दिलेल्या या कृतियुक्त शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी जोशी यांचे कौतुक केले.
——————————-
राज ठाकरे जातीद्वेष पसरवणारे
जाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे काम राज ठाकरे यांच्याकडून वारंवार केले जात आहे. मग ते इतिहासाचे दाखले देऊन असो की, भोंग्याचा प्रश्न उपस्थित करून. शरद पवार यांनी कधीही जाती-धर्मात द्वेष पसरवण्याचे पाप केले नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याची काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची विचारधारा आहे, असे कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

Arvind Shinde | Pune Congress | आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे

आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

१९४२ ला इंग्रजांविरूध्द काँग्रेसने ‘चले जाव’ ची हाक दिली, मात्र आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. 

 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ‘‘ध्वजारोहण’’ करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणीताई गवाणकर यांचा सन्मान करण्यात आला.

       यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘१९४२ च्या चले जाव च्या आंदोलनामध्ये मुंबई नंतर देशामधील महत्वाचे ठिकाण असलेले हे पुणे शहर जिथे हुतात्मा नारायण दाभाडे यांना इंग्रजांनी या काँग्रेस भवनच्या आवारामध्ये गोळ्या घातल्या. याच पुणे शहराने देशाला दिशा देणारे विचारवंत नेतृत्व देणारे कतृत्ववान नेते दिले. देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यांदा याच १९४२ च्या आंदोलनामध्ये अरुणा असफ अली यांनी फडकविला. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कसलाही आणि कोणताही भाग न घेता आज देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे हर घर तिरंगा हे अभियान राबवित आहे परंतु ज्यांनी या तिरंगा झेंड्याला विरोध केला, ज्यांनी झेंडा जाळला आणि ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर ५१ वर्ष देशाचा तिरंगा झेंडा फडकविला नाही ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चमकोगिरी करीत आहेत. १९४२ च्या चले जाव आंदोलनानंतर १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी व क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हुतात्मे झाले. आज मी त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना व क्रांतीकारकांना अभिवादन करतो.’’

       यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणीताई गवाणकर यांचा सन्मान ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रोहिणीताई गवाणकर म्हणाल्या, ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचे देखील मोठ्या प्रमाणावर योगदान होते. त्यामध्ये प्रामुख्याने अरूणा असफ अली या क्रांतिकारी विचारांच्या होत्या आणि क्रांतीकारी भूमिका त्या निभावत असते. ९ ऑगस्टला गवालिया टँक येथे त्यांनी अत्यंत क्रांतीकारी भूमिका बजावत देशाचा तिरंगा झेंडा फडकवून भूमिगत झाल्या. अशा अनेक महिला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या.’’

       यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, द. स. पोळेकर, ॲड. अनिल कांकरिया, भगवान धुमाळ, आबा जगताप, नितीन परतानी, भरत सुराणा, अविनाश गोतारणे, बाळासाहेब प्रताप, हरिदास अडसूळ, ॲड. विजय तिकोने, ॲड. राहुल ढाले, ॲड. संजय साळवे, ॲड. राजेंद्र काळेबेरे, परवेज तांबोळी, आशिष व्‍यवहारे, सचिन भोसले, वाल्मिक जगताप, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रविण करपे, अनुसया गायकवाड, शारदा वीर, ॲड. अश्विनी गवारे, गौरव बोराडे, कान्होजी जेधे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Congress Bhavan : P. Chidambaram : केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

Categories
Breaking News Political पुणे

काँग्रेसच्या थोर नेत्यांनी दिलेले योगदान आजच्या युवा पिढीला पोहचवा

– मा. खा. पी. चिदंबरम

 

     राज्यसभेचे खासदार व माजी केंद्रिय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज काँग्रेस भवन येथे भेट देवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांना पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देवून सत्कार केला.

आपल्या प्रास्ताविक भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, माजी अर्थमंत्री, राज्यसभेचे खासदार पी. चिदंबरम यांनी आज ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट दिली आहे. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना देशाच्या अर्थव्‍यवस्थेची चांगली प्रगती झाली. जी. एस. टी. ची संकल्पना त्यांची होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले.

      आपले मनोगत व्‍यक्त करताना पी. चिदंबरम म्हणाले की, ‘‘मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की मी या ऐतिहासिक काँग्रेस भवनला भेट दिली. आज काँग्रेस पक्षाची सत्ता काही मोजक्या राज्यांमध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सत्तेत आहोत. नुकतेच पक्ष संघटनेच्या निवडणुकीसाठी डिजिटल सभासद नोंदणीची प्रक्रिया पार पडली आहे. लवकरच बुथ, ब्लॉक व शहर कार्यकारिणीचे निवडणुका होतील. त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी आणि नंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची निवडणूक होईल. लाहोर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि तसा ठराव करण्यात आला. पं. जवाहरलाल नेहरू अगदी लहान वयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. आज ६०% मतदार युवक आहेत. पक्षातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना बळकट करण्याचे काम हाती घ्यावे. आज काँग्रेस पक्षाला हाडाच्या कार्यकर्त्याची गरज आहे. कार्यकर्त्यांमुळे आपण निवडणुक जिंकतो आणि सत्तेत येतो. आजच्या पिढीला महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल माहिती नाही. केंद्रातील सरकार इतिहासातून या थोर नेत्यांनी केलेले कार्य संपविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने आजच्या युवा पिढीला काँग्रेसच्या थोर नेत्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली पाहिजे.’’

      यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अनंत गाडगीळ, ॲड. अभय छाजेड, रमेश अय्यर, चंद्रशेखर कपोते, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, पुजा आनंद, शानी नौशाद, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे, नुरूद्दीन सोमजी, रजनी त्रिभुवन, शिलार रतनगिरी, सुजित यादव, सचिन आडेकर, ॲड. अनिल कांकरिया, ॲड. निलेश बोराटे, ॲड. शाहिद अख्तर, ॲड. जाधव, ॲड. राहुल ढाले, गौरव बोराडे, सुमित डांगी, राहुल तायडे, मीरा शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress : MNS : Sanjay Jagtap : मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे पदाधिकाऱ्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

पुणे : काँग्रेस भवन, पुणे येथे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार  संजय चंदूकाका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस विचारसरणीने प्रेरित झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देहूरोड येथील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी मलिक हसन शेख, असिफ इसा सय्यद, हसन शेख, जावेद शेख, हुसेन शेख, जेदिन नाडार, सुरज गायकवाड, अजय बाला, संकेत गायकवाड, आकाश सुतार, अजय रामोशी रवी स्वामी, शरद सोनी व माजी पोलीस अधिकारी आबूबकार लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आगामी काळात देहूरोड परिसरात काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चय केला.
या सर्वांचे स्वागत करत असताना पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष-आमदार संजय चंदूकाका जगताप म्हणाले की, काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडी मध्ये एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच इतर दोन पक्षाला कधीही दुखावण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भविष्यातदेखील आम्ही कधीही तो प्रयत्न करणार नाही. सध्या वर्तमानपत्रातून मावळ परिसरातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात सातत्याने येत आहेत.  या निमित्ताने मला मित्र पक्षाला सूचित करायचे आहे की, काँग्रेस पक्षाला अनेक जणांनी संपवण्याचा प्रयत्न केला, पण तो कधीही संपला नाही कारण काँग्रेस जनसामान्यांची मजबूत विचारधारा आहे.  तसेच आजही देहूरोड लोणावळा मावळ या ठिकाणी काँग्रेस पक्ष अतिशय सक्षम असून या ठिकाणच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर ती अशा कोणत्याही वाऱ्या वादळाचा काहीही फरक पडणार नाही. जे आता या पक्षातून दुसरीकडे गेले आहेत ते काँग्रेस पक्षात किती दिवस होते याचा देखील अभ्यास करावा असे संजय जगताप म्हणाले.
  यावेळी मावळ परिसरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत  सातकर, मावळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा यशवंत मोहोळ, देहूरोड काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, खजिनदार महेश बापु ढमढेरे, सरचिटणीस पृथ्वीराज पाटील,दीपक साचसर वेंकटेश कोळी,गफूरभाई शेख, राणी पाडियन, मेहबूब गोलंदाज, बबन टोपे व इतर मान्यवर उपस्थित होते.

MAV : Pune : महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना हिमालयात संन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी केला गोळा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना हिमालयात संन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी केला गोळा

उत्तर कोल्हापूर मतदार संघाच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजया निमित्त महाविकास आघाडीतर्फे आनंदोत्सव

 

उत्तर कोल्हापूर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव या १८००० अधिक मताने पोट निवडणुकीत निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने भारतीय जनता पक्षाच्या सत्यजीत कदम यांना पराभूत करून महाविकास आघाडीचा झेंडा पुन्हा फडकविला. या विजयाचा आनंदोत्सव आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी साजरा केला. महाविकास आघाडी सरकारचा विजय असो अशा घोषणा देवून फटाके वाजवून, लाडू वाटून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष केला.

यावेळी  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, ॲड. अभय छाजेड, गजानन तरकुडे, अरविंद शिंदे, आबा बागुल, वीरेंद्र किराड,  उपस्थित होते.

     यावेळी आपले मनोगत व्‍यक्त करताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्षाने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. दिवंगत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ही पोट निवडणुक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विनंती केली परंतु ते त्यास अनुकूल नव्‍हते. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मेहनत करून कोल्हापूरची जागा राखली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये तळ ठोकून बसले होते. कोल्हापूरच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नक्की निवडून येणार अन्यथा मी राजकीय सन्यास घेईल असे म्हटले होते परंतु कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला. काँग्रेस  पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळाले. कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांचा या विजयात सिंहाचा वाटा होता.

      यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, ‘‘उत्तर कोल्हापूरची निवडणुक ही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची नांदी होती. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी खोटे आरोप करून कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अशयस्वी ठरले. कोल्हापूरच्या जनतेने महाविकास आघाडी सरकारवर विश्वास टाकून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केले.’’

     यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हिमालयात सन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी गोळा करण्यात आला.

     यावेळी शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, महिला अध्यक्षा पुजा आनंद, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, विठ्ठल गायकवाड, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, प्रविण करपे, द. स पोळेकर, अविनाश अडसुळ, अनुसया गायकवाड, नलिनी दोरगे, शारदा वीर, संतोष डोके, ॲड. नंदलाल धिवार, मुन्नाभाई शेख, हनुमंत पवार, शिलार रतनगिरी, दिपक ओव्‍हाळ, किशोर मारणे, राजू मगर, जावेद निलगर, प्रशांत टेके, विशाल गुंड, आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.