MAV : Pune : महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना हिमालयात संन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी केला गोळा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाविकास आघाडीने चंद्रकांत पाटील यांना हिमालयात संन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी केला गोळा

उत्तर कोल्हापूर मतदार संघाच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या विजया निमित्त महाविकास आघाडीतर्फे आनंदोत्सव

 

उत्तर कोल्हापूर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव या १८००० अधिक मताने पोट निवडणुकीत निवडून आल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने भारतीय जनता पक्षाच्या सत्यजीत कदम यांना पराभूत करून महाविकास आघाडीचा झेंडा पुन्हा फडकविला. या विजयाचा आनंदोत्सव आज पुण्यातील काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी साजरा केला. महाविकास आघाडी सरकारचा विजय असो अशा घोषणा देवून फटाके वाजवून, लाडू वाटून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष केला.

यावेळी  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, ॲड. अभय छाजेड, गजानन तरकुडे, अरविंद शिंदे, आबा बागुल, वीरेंद्र किराड,  उपस्थित होते.

     यावेळी आपले मनोगत व्‍यक्त करताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पक्षाने ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. दिवंगत काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी ही पोट निवडणुक बिनविरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विनंती केली परंतु ते त्यास अनुकूल नव्‍हते. महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मेहनत करून कोल्हापूरची जागा राखली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमध्ये तळ ठोकून बसले होते. कोल्हापूरच्या पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नक्की निवडून येणार अन्यथा मी राजकीय सन्यास घेईल असे म्हटले होते परंतु कोल्हापूरकरांनी त्यांना नाकारले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला. काँग्रेस  पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश मिळाले. कोल्हापूरचे पालक मंत्री सतेज पाटील यांचा या विजयात सिंहाचा वाटा होता.

      यानंतर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले की, ‘‘उत्तर कोल्हापूरची निवडणुक ही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीची नांदी होती. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी खोटे आरोप करून कोल्हापूरकरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अशयस्वी ठरले. कोल्हापूरच्या जनतेने महाविकास आघाडी सरकारवर विश्वास टाकून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केले.’’

     यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हिमालयात सन्यास घेण्यासाठी जाण्याकरीता निधी गोळा करण्यात आला.

     यावेळी शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, महिला अध्यक्षा पुजा आनंद, मुख्तार शेख, मेहबुब नदाफ, विठ्ठल गायकवाड, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, प्रविण करपे, द. स पोळेकर, अविनाश अडसुळ, अनुसया गायकवाड, नलिनी दोरगे, शारदा वीर, संतोष डोके, ॲड. नंदलाल धिवार, मुन्नाभाई शेख, हनुमंत पवार, शिलार रतनगिरी, दिपक ओव्‍हाळ, किशोर मारणे, राजू मगर, जावेद निलगर, प्रशांत टेके, विशाल गुंड, आदी प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By-election of Kolhapur : भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली ; मात्र जनतेचा कौल मान्य : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

भाजपाची मते ४१ हजारांवरून  ७८ हजारांपर्यंत वाढली

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची मते ४१ हजारांवरून वाढून ७८ हजार झाली असून जनाधार वाढविण्यासाठी अधिक काय करावे याचा विचार पक्ष करेल, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, काँग्रेसच्या विजयी उमेदवार जयश्री जाधव यांचे आपण अभिनंदन करतो. सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये. या निवडणुकीत भाजपाची मते वाढली आहेत आणि निवडणुकीच्या निमित्ताने गल्लोगल्ली चांगले कार्यकर्ते उभे राहिले आहेत.

त्यांनी सांगितले की, राज्यात भाजपाचे सरकार नाही. भाजपाच्या विरोधात दडपशाही, दंडुकेशाही, पैसा व जातीच्या कार्डचा वापर करण्यात आला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांच्या अंगावर धाऊन जाण्यापर्यंत दडपशाही झाली. तथापि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही दडपशाहीला न घाबरता काम केले. भाजपाची मते ४१ हजारांवरून ७८ हजारांपर्यंत वाढली. ही फार मोठी प्रगती आहे.

ते म्हणाले की, भाजपाने ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली. हिंदुत्व हा काही भाजपाचा निवडणुकीचा अथवा राजकारणाचा मुद्दा नाही तर हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे. आम्ही आमची हिंदुत्वाची भूमिका कधीच लपवली नाही.

Mohan Joshi Vs Chandrakant patil : चंद्रकांतदादा शब्द पाळा…राजकारणातून संन्यास घ्या : चंद्रकांत पाटलांना पुण्यातून कॉंग्रेसचा टोला

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

 

चंद्रकांतदादा शब्द पाळा…राजकारणातून संन्यास घ्या

-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कोल्हापूरच्या मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नेतृत्व नाकारले आहे. स्वगृही भाजपला निवडून आणण्यात पाटील यांना अपयश आले आहे, आता त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर संन्यास घेऊन हिमालयात निघून जाईन, अशी गर्जना चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात केली होती. कोल्हापूरवासीयांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देऊन भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. आता चंद्रकांतदादा शब्द पाळा… राजकीय संन्यास घ्या, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोल्हापूरमध्ये पराभव होईल अशा भीतीने पाटील १९ साली पुण्यात कोथरुड मतदारसंघात आले, त्यांची लादलेली उमेदवारी भाजपच्याच मतदारांना मान्य नव्हती अनेक खटपटी लटपटी करूनही त्यांना निसटता विजय मिळाला होता. पदवीधर मतदारसंघही पाटील यांना राखता आला नाही आणि खुद्द त्यांच्या कोल्हापूरची जागाही गमवावी लागली आहे, या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कोथरुड मतदारसंघ वाऱ्यावर सोडून पाटील कोल्हापूरात मुक्कामाला होते, एवढेच नाही तर, त्यांनी पुण्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात नेली. प्रचाराचा धडाका उडवायचा प्रयत्न केला. कोल्हापुरातील मतदारांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोणत्याच प्रयत्नांना दाद दिली नाही. उलट मतदारांनी त्यांनाच अस्मान दाखविले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न भाजपने केला, मतदारांनी या प्रचारालाही दाद दिलेली नाही. महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्नही फसला, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले असून कोल्हापूरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई जाधव आणि विजयाचे शिल्पकार, काँग्रेसचे नेते नामदार सतेज पाटील यांचे अभिनंदन केले आहे.