BBC | Congress | केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

केंद्रातील मोदी सरकारने देशामध्ये अघोषित आणीबाणी लागू केली आहे | अरविंद शिंदे

 

केंद्र सरकारच्या अखतारित असलेल्या आयकर खात्याने काल BBC या आंतरराष्ट्रीय वृत्त समुहाच्या दिल्ली व मुंबई येथील कार्यालयांवर छापे टाकून तेथील कामगारांना बंदीस्त करून कारवाई केली याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी पेठ पत्रकार भवन येथे तोंडाला काळीफित बांधून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘नरेंद्र मोदी हे हुकूमशाहीपद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. मोदी व शहांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करुन तो आवाज दडपण्याचे काम केले जाते. BBC च्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे हे त्याचाच भाग आहे. BBC ने गुजरात दंगलीसंदर्भात दोन आठवड्यापूर्वी एक डॉक्युमेंटरी प्रसारित केली होती, त्याचा राग धरूनच ही छापेमारी केली असून हा योगायोग नसून देशात अघोषीत आणीबाणी अल्याचेच हे द्योतक आहे, BBC ने तयार केलेली डॉक्युमेंटरी भारतात दाखवू नये यासाठी मोदी सरकारने तात्काळ त्यावर बंदी घातली. बंदी घातली असतानाही काही ठिकाणी ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली. बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीमुळेच मोदी सरकारचे पित्त खवळले व त्यांच्या आवडत्या अस्त्रातील आयकर विभागाचे छापे टाकून बीबीसीला गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास त्याच्यावर ईडी, सीबीआय अथवा आयकर विभागाच्या माध्यमातून कारवाई करून गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. याचा निषेध म्हणून आज आम्ही पत्रकारांच्या संरक्षणासाठी व लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या स्वातंत्र्यासाठी हे मूक आंदोलन करीत आहोत.’’

यावेळी प्रदेश पदाधिकारी ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी, सोनाली मारणे, रजनी त्रिभुवन ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, सुधीर काळे, भरत सुराणा, मारूती माने, सचिन भोसले, आनंद गांजवे, भगवान कडू, प्रकाश पवार, राजेंद्र नखाते, शिवाजी भोईटे, सुनिल पंडित, भोला वांजळे, राजू नाणेकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Gajanan Deshmukh | व्हॉईस आॅफ मिडीयाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा़ | सकारात्मक पत्रकारीता जोपासण्याचा संघटनेकडून प्रयत्ऩ

Categories
Breaking News cultural social महाराष्ट्र

व्हॉईस आॅफ मिडीयाच्या वतीने पुरस्कारांची घोषणा़

| सकारात्मक पत्रकारीता जोपासण्याचा संघटनेकडून प्रयत्ऩ

परभणी : सकारात्मक पत्रकारिता ही मराठी पत्रकारितेची विचारधारा आहे, हे विचार रुजवण्यासाठी व्हॉईस आॅफ मीडिया संघटनेने या वर्षीपासून व्हॉईस आॅफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नालिझम पुरस्कार सुरू केला आहे. यात रोख अडीच लाख रुपयांचे चार पुरस्कार तसेच विशेष पाच पुरस्कार व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार असल्याची माहिती व्हॉईस आॅफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी शनिवार, दि़२८ जानेवारी रोजी निरज हॉटेल येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली़

लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन काम करीत असलेल्या व्हॉईस आॅफ मीडिया या देश पातळीवरील पत्रकार संघटनेचे १८ हजार सदस्य असून २३ राज्यात ही संघटना सक्रिय आहे. सकारात्मक पत्रकारिता वाढावी यासाठी संघटनेच्या वतीने यावर्षी पासून अडीच लाख रुपयांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे स्वरूप प्रथम बक्षीस रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, द्वितीय ६१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान, महिला पत्रकार ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, मानपत्र, सन्मान असे आहे. उत्तेजनार्थ पाच विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दैनिक, साप्ताहिक, मासिक, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचे प्रतिनिधी यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रस्ताव देताना संपादकांचे पत्र जोडणे आवश्यक आहे. १ फेब्रुवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये किमान ४२ किंवा त्यापेक्षा अधिक थेट परिणामकारक असणाºया सकारात्मक बातम्या, लेख या स्पर्धेसाठी ग्राह्य धरल्या जातील. महाराष्ट्र व मराठी भाषेपुरतीच ही स्पर्धा असणार असून जानेवारी २०२४ मध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. व्हॉईस आॅफ मीडिया कोकण विभागीय कार्यालय एल. ३०- १२०१ – स्वप्नपूर्ती, सेक्टर ३६ खारघर, नवी मुंबई ४१०२१० या पत्त्यावर प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत संघटनेच्या सर्वच ठिकाणचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव यांना सहभागी होता येणार नसल्याचेही संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्पर्धा संघटने बाहेरील पत्रकारांसाठी सुद्धा असणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी सकारात्मक बातम्या लिहून या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस आॅफ मीडियाचे राज्य सहसरचिटनिस डॉ.ज्ञानेश्वर भाले, राज्य कार्यवाहक सूरज कदम, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया आणि परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण चौधरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी संघटनेचे अक्षय मुंडे, कैलास चव्हाण, विजय कुलकर्णी, प्रदीप कांबळे, मोईन खान, सुशील गायकवाड, मोहन धारासुरकर, प्रसाद जोशी, अमोल लंगर आदींची पत्रकार परिषदेस उपस्थिती होती़

Vinod Dua : वरिष्ठ  पत्रकार विनोद दुआ का निधन : कल होगा अंतिम संस्कार

Categories
Breaking News देश/विदेश हिंदी खबरे

वरिष्ठ  पत्रकार विनोद दुआ का निधन

: कल होगा अंतिम संस्कार

नई दिल्ली: वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ का शनिवार को निधन हो गया.  वह पिछले कुछ दिनों से बीमार चल रहे थे।  उनका अस्पताल में इलाज चल रहा है।  विनोद दुआ की बेटी मल्लिका दुआ ने एक इंस्टाग्राम पोस्ट के जरिए उनके निधन की घोषणा की।  विनोद दुआ के पार्थिव शरीर का अंतिम संस्कार कल लोधी कब्रिस्तान में किया जाएगा।

विनोद दुआ को हिंदी पत्रकारिता में एक बहुत ही लोकप्रिय नाम माना जाता है।  उनकी अलंकारिक शैली, सटीक विश्लेषण और संक्षिप्त प्रस्तुति के कारण उनके विश्लेषणात्मक कार्यक्रमों की आज भी प्रशंसा की जाती है।  विनोद दुआ ने लंबे समय तक दूरदर्शन और एनडीटीवी इंडिया में काम किया था।  1996 में, उन्हें रामनाथ गोयनका पुरस्कार से सम्मानित किया गया।  उन्हें 2008 में भारत सरकार द्वारा पद्म श्री से भी सम्मानित किया गया था।  जून 2017 में, उन्हें पत्रकारिता के क्षेत्र में उनकी उपलब्धियों के लिए मुंबई प्रेस क्लब द्वारा रेड इंक अवार्ड से सम्मानित किया गया था।

 दिल्ली विश्वविद्यालय से शिक्षा

विनोद दुआ का बचपन दिल्ली में वनवास में बीता।  उनके माता-पिता 1947 में आजादी के बाद खैबर पख्तूनख्वा से आए थे।  विनोद दुआ ने दिल्ली विश्वविद्यालय के हंसराज कॉलेज से अंग्रेजी में स्नातक किया।  बाद में उन्होंने दिल्ली विश्वविद्यालय से अंग्रेजी साहित्य में स्नातकोत्तर की उपाधि प्राप्त की।

 एंकरिंग का लंबा अनुभव

1975 में, विनोद दुआ ने युवा कार्यक्रम की एंकरिंग की।  उसी वर्ष, उन्होंने जवान तरंग नामक एक युवा कार्यक्रम की एंकरिंग शुरू की।  विनोद दुआ ने 1984 में प्रणय रॉय के साथ टेलीविजन पर चुनावी विश्लेषण की एंकरिंग की।  उन्होंने 1985 में पीपुल्स वॉयस, एक कार्यक्रम की भी एंकरिंग की, जहां आम जनता को सीधे मंत्रियों से सवाल पूछने का अवसर मिला।  यह अपनी तरह का पहला शो था।

इसके अलावा, विनोद दुआ ने 1992 में ज़ी टीवी के चक्रव्यूह शो की एंकरिंग की।  साथ ही विनोद दुआ टीवी शो ‘तसवीर-ए-हिंद’ के एंकर रह चुके हैं।  मार्च 1998 में, उन्होंने सोनी एंटरटेनमेंट चैनल के शो ‘इलेक्शन चैलेंज’ की एंकरिंग की।  वह 2000 से 2003 के बीच सहारा टीवी की एंकरिंग कर रहे थे।  विनोद दुआ ने NDTV इंडिया के JICA इंडिया को भी एंकर किया।  बाद में, उन्होंने द वायर हिंदी के लिए जन गण मन की बात की एंकरिंग भी की।