Narayan Rane in Pune | मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Narayan Rane in Pune | मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा

| केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन

Narayan Rane in Pune | आत्मनिर्भर, समृद्ध, गरिबीमुक्त देश निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले.

केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी करण्यासाठी 28 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे देशभर आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी या उपक्रमांतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार प्रकाश जावडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर भाजपचे प्रभारी माधव भांडारी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, राजेंद्र काकडे यांची उपस्थिती होती.

राणे म्हणाले, मोदी 140 कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. आपण राबविलेल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या का? त्यांना त्याचा किती लाभ झाला? लाभार्थ्यांनी लाभ कसा घेतला? जर लोकांपर्यंत योजना पोहोचल्या नसतील तर काय नियोजन करता येईल? या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी देशभर विकसित भारत संकल्प यात्रेचे मोदींनी आयोजन केले आहे.

जावडेकर म्हणाले, विविध देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणासाठी शुल्क आकारले गेले. परंतु मोदींनी भारतीयांना दोन्ही लशी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. त्याबरोबर विविध योजनांचा लाभ मिळून दिला. त्यासाठी आपण मोदींच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.

Economic recession | देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश पुणे

देशात जूननंतर आर्थिक मंदी येऊ शकते

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली चिंता

जी २० परिषदेला (G20 conference) आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan Rane) यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे. या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करणार आहेत.

नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की, जी २० या जागतिक परिषदेचे उदघाटन माझ्या हाताने झाले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात आपण देशाची प्रगती करत आहोत, आपल्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत असून आठ वर्षापूर्वी आपला देश १० व्या क्रमांकावर होता. आपला आता देश ५ व्या क्रमांकावर आहे. ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. येत्या १० वर्षांत आपण तिसर्‍या क्रमांकावर जाऊ अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. तसेच जागतिक मंदीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, जगामध्ये आर्थिक मंदी मोठ्या देशांना आहे. भारताला त्याची झळ बसू नये आणि मंदी आली तर जूननंतर येईल. मंदीची झळ सामान्य नागरिकांना पोहचू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत”, असेही नारायण राणे म्हणाले.

शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर  दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले. तसेच अमेरिकेचा जी डी पी २० ट्रिलियन आहे. भारत ५ ट्रिलियनपर्यंत पोहचू पाहत आहे. देशाच्या प्रगतीसाठी, आर्थिक स्थिती भारताची सुधारावी. यासाठी केंद्र सरकारमार्फत विशेष उपाययोजना केल्या जात आहे. तसेच जी २० परिषदेमध्ये देखील यावर चर्चा होणार आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर परिषदेत विशेष चर्चा होणार असून केंद्र सरकार युद्ध पातळीवर पावल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. (Minister Narayan Rane)