Sanjay Raut : Raj Thackeray : भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग

संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

पुणे : मनसे पक्ष गोंधळलेल्या स्थितीत आहे. राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वाच्या विरोधात आहे. काल मशिदीवरील भोंगा प्रकरणामुळे पंढरपूर, शिर्डी आशा अनेक ठिकाणी काकड आरत्या होऊ शकल्या नाहीत. अनेकजण त्याचा आनंद घेत असतात. परंतु काकड आरतीचा आवाज ऐकू न आल्याने भाविकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. भाड्याच्या माणसावर भगवी शाल टाकण्याचा भाजपचा उद्योग, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंग्याबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सभेत त्यांनी भोंगे उतरवण्याबाबत ३ तारखेचा अल्टिमेटम दिला होता. आता मात्र ईदच्या मध्ये काही अडचण येऊ नये. म्हणून ४ तारखेपर्यंत भोंगे उतरले पाहिजेत असा इशारा राज यांनी दिला. त्यानंतर जोपर्यंत भोंगे उतरवले जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे आवाहन राज यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना केले आहे. त्यांचे त्याचबरोबर नुसते मशिदीवरील नाही.

 तर सर्वच प्रार्थनास्थळांवरील भोंगे उतरायला हवेत असेही त्यांनी औरंगाबादच्या सभेत सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर भोंगे लावण्यासाठी परवानगी घ्यावी. असे प्रार्थना स्थळांना पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंदिरावरील भोंगे कालपासून बंद होऊ लागले आहेत. त्यावरच खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपने राज ठाकरेंच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोठला त्यामुळं हिंदू समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

भाजपने राज ठाकरेच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला 

राज ठाकरे यांनी मशिदीबरोबरच सर्व प्रार्थनास्थळांवरचे भोंगे उतरले पाहिजेत असे सांगितले होते. त्यामुळे काल काकड आरतीच्या वेळी मंदिरांवरीलही भोंगे बंद होते. त्यावर राऊत यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, भाजपने राज ठाकरेच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटला. त्यामुळं हिंदू समाज राज ठाकरे यांच्यावर नाराज आहे.

James Laine : Shivshahir Babasaheb Purandare : बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य;   म्हणाले…! 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य;   म्हणाले…!

राज्यात सध्या मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु आहे. त्यातही मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ठाण्यात पार पडलेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद होताना दिसत आहे. एकीकडे राज ठाकरे पुरंदरेंनी घऱाघऱात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा आरोप केला आहे. त्यातच आता स्वत: लेख जेम्स लेनने या वादावर भाष्य केलं आहे. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे मुलाखत घेतली आहे.

राज ठाकरेंनी शरद पवारांवर काय आरोप केला होता –

“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.

शरद पवारांनी उत्तर देताना काय म्हटलं होतं? –

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळय़ा दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असं पुरंदरे यांनी लिहून ठेवलं होतं. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे, असं शरद पवार यांनी म्ह़टलं होतं.

यानंतर मनसेने २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

जेम्स लेन यांची मुलाखत

जेम्स लेन यांनी १६ एप्रिलला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या Shivaji: Hindu King in Islamic India पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला आहे.

पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारलं असता जेम्स लेन यांनी सांगितलं की, “तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक ते कसं सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय कथा सांगतात याबद्दल होतं. उदाहरणार्थ…काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नाही”.

तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही”.

तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंसोबत चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असं विचारण्यात आलं असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.

जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असं विचारलं असता ते म्हणाले की, मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.

बाबासाहेब पुरंदरे तसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसं पाहता? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ आदरणीय होते. 18 व्या आणि 19 व्या शतकातील राजकीय लिखाणावरुन आज त्यांच्यावर टीका केली जात आहे, जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाला”.

जवळपास दीड दशकांनंतरही पुस्तकाबाबतच्या वादग्रस्त बातम्या वाचून तुम्हाला काय वाटतं? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झालं आहे”.

२००३ मध्ये पेटला होता वाद

२००३ मध्ये जेम्स लेन यांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जेम्ल लेन यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत पुण्यातील भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यू़टवर हल्ला केला होता. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने पुस्तकावर बंदी घातली. महाराष्ट्रातील गदारोळानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनेही हे पुस्तक मागे घेतले होते. मात्र या पुस्तकामुळे निर्माण झालेले वाद अद्यापही जिवंत आहेत.

Hanuman Jayanti : Raj Thackeray : राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती ; मात्र राज काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण 

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती ; मात्र राज काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण

पुणे : जय श्रीराम, जय हनुमानच्या घोषणेने पुण्यातील खालकर चौक खालकर चौकातील हनुमान मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आज हनुमान जयंती निमित्त (hanuman jayanti) मारुती मंदिरात साडे सातच्या सुमारास महाआरती पार पडली. यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र यावेळी राज ठाकरे काहीच न बोलण्याने चर्चांना उधाण आले आहे.

दुपारपासून मंदिर परिसरात ढोलताशा, झांज पथक सुरू होते. ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरेंचे स्वागत करण्यात आले. महाआरतीनंतर हनुमान चालिसा पठणही झाले. खालकर चौकात सगळीकडे हिंदूजननायक राज ठाकरे असे फलक लावले होते. त्या फलकावर मागे मारूती पुढे राज ठाकरे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मशिदीवरील भोंग्यांवरून वाद सुरू आहे.

राज ठाकरे आंबा महोत्सवानंतर महाआरतीला जाणार होते पण अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सरळ महाआरतीसाठी खालकर चौकात आले होते आणि मारुती मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी हनुमान चालिसा छापलेल्या लहान पुस्तिकांचे जनसमूदायाला वाटप ही करण्यात आले होते. खालकर चौकात मनसैनिकानी मोठी गर्दी केली होती.

Hanuman Chalisa : पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे होणार सामुहिक पठण 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

पुण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान चालीसाचे होणार सामुहिक पठण

: प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांची संकल्पना

पुणे : मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात वाद सुरू असताना आता हनुमान जयंतीच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी हनुमान चालीसाचे सामुहिक पठण देखील होणार आहे. शनिवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजता कुमठेकर रस्त्यावरील खालकर चौक मारुती मंदिर येथे ही आरती होणार आहे.

गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोगें उतरवा नाही तर मशिदींपुढे स्पीकरवर हनुमान चालिसा दावा असे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला. तर ठाण्यात झालेल्या सभेत ३ मे पर्यंत भोंग उतरविण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्यात वाद सुरू झाला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.शनिवारी हनुमान जयंती साजरी करण्यासाठी पुण्यातील सर्व हनुमान मंदिरांमध्ये तयारीला वेग आलेला असताना आता याच दिवशी राज ठाकरे हे पुण्यात आहेत.
दीडशे वर्ष जुन्या खालकर चौकातील मारुती मंदिरात राज ठाकरे हे आरतीसाठी येणार आहेत. सुमारे २० वर्षापूर्वी एका अपघातामध्ये मंदिराची भिंत पडली होती, त्यावेळी नव्याने मंदिर बांधताना त्यांचे भूमिपूजन देखील राज ठाकरे यांच्याच हस्ते झाले होते. त्यानंतर ते आता आरतीसाठी या मंदिरात येणार आहेत. यावेळी सामुहिक हनुमान चालिसा पठण देखील होणार आहे, असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, या दिवसभरातील राज ठाकरे यांचे अन्य कार्यक्रम अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

Home Minister VS MNS : पोलीस तयार आहेत : गृहमंत्र्यांचा मनसेला इशारा 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

पोलीस तयार आहेत : गृहमंत्र्यांचा मनसेला इशारा

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे  (Raj Thackeray) यांनी एकामागून एक दोन सभा घेतल्याने राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. यातच राज ठाकरेला यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरून ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करत ३ मेपर्यंत ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाष्य करत मनसेला थेट इशारा दिला आहे. राज्यातील परिस्थिती बिघडू देणार नाही. पोलीस तयार आहेत, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केलेला दावा खोडून काढला असून, मशिदींवरील भोंग्यांना विरोध करताना ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेतला जातो, त्यामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या काळात कोणत्याही ठिकाणी लाऊडस्पीकर्स वाजवू नयेत, असे म्हटले आहे. ज्याठिकाणी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, ते काढण्याचा प्रश्नच येत नाही, असे दिलीप-वळसे पाटील यांनी नमूद केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कोणत्याही परिस्थितीत राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण करून देणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोक आहोत. आमच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. पोलीस सज्ज असल्यामुळे कोणताही तणावाची परिस्थिती उद्भवणार नाही, असा विश्वास दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दिलासाबाबत बोलताना, विशिष्ट पक्षाच्या लोकांना दिलासा मिळत असेल तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत हा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही, असे ते म्हणाले.

दरम्यान, अखंड भारताच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाला संजय राऊत यांनी दिलेल्या समर्थनाबाबत विचारले असता, भारत हा वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांनी मिळून बनलेला देश आहे. त्याच्या विघटनाचा प्रयत्न करू नये. तसेच अखंड भारताबाबत संजय राऊत यांची नेमकी आणि सविस्तर भूमिका काय आहे, हे मी त्यांना भेटल्यावर विचारेन, अशी प्रतिक्रिया दिलीप-वळसे पाटील यांनी दिली आहे.

Sharad pawar Vs Raj Thackeray : राज ठाकरेंच्या आरोपावर शरद पवारांनी दिली उत्तरे : वाचा सविस्तर

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या आरोपावर शरद पवारांनी दिली उत्तरे

राज ठाकरेंनी ठाण्याच्या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि शरद पवारांना टार्गेट केले होते. त्यावर आता शरद पवारांनी देखील उत्तरे दिली आहेत.
पवार म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेतील वक्तव्यांबद्दल पत्रकारांनी माझे मत विचारले. एखादी व्यक्ती वर्ष-सहा महिने एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकारांनी विचारणा केली म्हणून याबाबत माझी भूमिका मांडली.
मी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, अशाप्रकारचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. पण दोनच दिवसांपूर्वी मी अमरावतीत असताना केलेले संपूर्ण भाषण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर होते. कमीत कमी २५ मिनिटे मी या विषयावर बोललो होतो.
ते भाषण आपण पाहू शकता वा वर्तमानपत्रात त्याबाबत वाचू शकता. अर्थात मला रोज सकाळी उठून वर्तमानपत्र वाचण्याची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावे लागते. ज्या लोकांना वर्तमानपत्र न वाचता मत व्यक्त करायचे असेल तर त्यांना मी दोष देणार नाही.
पवार पुढे म्हणाले, दुसरे त्यांनी असे सांगितले की, फुले-शाहू-आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो. मला याचा अभिमान आहे. या राज्यात  छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा फुले यांनी रचले होते. त्यामुळे महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर हे शिवछत्रपतींबद्दल अतीव आस्था असणारी व्यक्तिमत्वं होती.
महाराजांचा आदर्श घेऊन आपले काम कसे करावे, यासंबंधीची भूमिका तिघांनीही मांडली. म्हणून या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखेच आहे.
तसेच त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबतच्या माझ्या विधानाचा उल्लेख केला. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले, असे विधान केले होते. याला माझा सक्त विरोध होता.
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व हे राजमाता जिजाऊंनी घडवले. त्यामुळे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे मोठेपण मान्य केले पाहिजे. पण पुरंदरेंनी याबाबत वेगळे लिहिण्याचा प्रयत्न केला, तो योग्य नव्हता. हे माझे मत तेव्हाही होते आणि आजही आहे. असे ही पवार म्हणाले.
दुसरा गंभीर प्रश्न असा की, जेम्स लेन यांनी जे विकृत लेखन केले होते, त्याचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता, अशी माहिती जेम्स लेनने दिली होती. एखादा लेखक जर असे गलिच्छ लिखाण करत असेल व जर ती माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव घेत असेल आणि त्याचा खुलासा पुरंदरे यांनी कधी केला नसेल तर त्याबाबत टीका केली तर दुःख वाटण्याचे कारण नाही. उलट मला याचा अभिमान वाटतो.
आज खऱ्या अर्थाने लोकांसमोर प्रश्न काय होते? महागाई, दरवाढ, बेरोजगारी या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आज कुणी बोलत नाही. काल राज ठाकरे यांनी एवढे मोठे भाषण केले. त्यात सामान्य माणसांच्या प्रश्नांना यत्किचिंतही स्थान मिळालेले नाही.
ज्या पद्धतीने भाजप सत्ता चालवत आहे, त्याचाही कालच्या भाषणात उल्लेख नाही. त्यामुळे या भाषणाबाबत अधिक बोलण्याचे काही कारण नाही.
तसेच सोनिया गांधींविषयीच्या भूमिकेबाबत त्यांनी वक्तव्य केले. याबाबतीत माझे मत आधीपासूनच स्पष्ट होते. श्रीमती सोनिया गांधी यांनी जेव्हा मी पंतप्रधान पदावर जाऊ इच्छित नाही, असे जाहीर वक्तव्य केले तेव्हा तो प्रश्न तिथेच संपला होता.
आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होती, तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर वाद करण्याचे कारण नव्हते. त्यानंतर एकत्र येऊन काम करण्याची सूचना सहकाऱ्यांनी केल्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो. हे जे सर्व त्याकाळात घडले, त्याचे सविस्तर वाचन केले असते तर असे उद्गार काढले गेले नसते.
लोक राज ठाकरेंच्या सभांना जातात. त्यांच्या सभा मोठ्या होत्या, हे बरोबर आहे. पण तिथे शिवराळ भाषा असते, नकला केल्या जातात, यातून लोकांची करमणूक होते. त्यामुळे लोक भाषणाला जातात.
मी नास्तिक असल्याबाबतही त्यांनी उल्लेख केला. मी धर्माचे प्रदर्शन करत नाही. मी आजवर १२ ते १४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. माझा प्रचाराचा पहिला नारळ कोणत्या मंदिरात फुटतो हे बारामतीमधल्या लोकांना जाऊन विचारा. त्याचा आम्ही कधी गाजावाजा करत नाही.
दुसरीकडे माझे काही आदर्श आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरेही आहेत. प्रबोधनकारांचे लिखाण जर तुम्ही वाचले तर यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला होईल. प्रबोधनकारांनी देव-धर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तीविरोधात प्रचंड टीका-टिप्पणी केली.
धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना ठोकून काढण्याचे काम त्यांनी केले. प्रबोधनकारांचे लिखाण आम्ही लोक वाचतो. पण सगळेच वाचतात असे नाही. बहुतेक त्यांच्याच कुटुंबातले लोक वाचत नसावेत, असे दिसते. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही.
माझे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन आहे की, सांप्रदायिक विचारांची पेरणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये. तसेच भोंग्याबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यावर राज्य सरकार गंभीरतेने विचार करेल.
भाजपबद्दल कालच्या भाषणात एकही शब्द आलेला नाही. त्यांच्यावर भाजपने कदाचित काही जबाबदारी दिलेली असावी याचा प्रत्यय कालच्या सभेत आला. महागाई, बेरोजगारी एवढी वाढलेली असताना जर एखादा राजकीय नेता आपल्या सभेत त्याबाबत एकही शब्द बोलत नसेल, तर काय समजायचं? असा प्रश्न देखील शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

Raj Thackeray : कुणा कुणाला लागले राज ठाकरेंचे फटकारे? वाचा सविस्तर  

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

कुणा कुणाला लागले राज ठाकरेंचे फटकारे? वाचा सविस्तर  

संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र, 1999 ला ज्यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे राज यांनी सांगितले. संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.

देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे 3 मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असेदेखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.
सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या विधानांचे तीन व्हिडिओ खास अजित पवारांसाठी लावले यामध्ये त्यांनी मशिंदींवरील भोग्यांबाबत भूमिका मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018, 23 जानेवारी 2020 मधील राज ठाकरें यांनी भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली होती. भाषणादरम्यान, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेते भुजबळ होते. मनसे हा विझलेला पक्ष असल्याचे जयंत पाटील म्हणतात. मात्र, मला त्यांना सांगायचे आहे की, जंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा उल्लेख ‘जंत’ पाटील असा केला.भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी आपण देशात समान नागरी कायदा आणण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे आवाहन नरेंद्र मोदींना केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असे ते म्हणाले.राज ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड होते. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कंस जमलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.पंतप्रधान मोदींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोलले असे राज यांनी सांगितले.
ईडीच्या नोटीसीनंतर ट्रॅक बदलाला असे अनेकांनी म्हटले, मात्र, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. कास्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर मोदींचे अभिनंदन करणारे ट्वीट माझे होते असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.माझ्या सभेपूर्वी पोलिसांचा आपल्याला फोन आला त्यावेळी त्यांनी माझा ताफा काही छोट्या संघटना अडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळलं मात्र, पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे पोलिसांना कळलं नाही का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थीत केला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी तारे तोडल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.राज ठाकरे हेच हिंदुंचे खरे नेते होऊ शकतात असे मत मनसेचे नेते आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंसाठी हिंदूत्त्व हेच सत्व असल्याचे ते म्हणाले. संजज राऊत मातोश्रीची नोकरी करतात अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचा शब्द पाळला नाही, अशी टीका महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.
वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, शिवसेना हळूहळू संपत चालली असून, शिवसेना म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसू ‘ढ’ सेना असल्याचे ते म्हणाले. शिवसेना प्रमुखांचा विचार शिवसेनेकडून संपवला जात असल्याचेही ते म्हणाले.कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी मनसेची दार उघडी होती. कामे असतात तेव्हाच मनसेची आठवण येते, मात्र निवडणुकांवेळी मनसेची आठवण का होत नाही? असा सवाल यावेळी वसंत मोरेंनी उपस्थित केला.राज्यात उद्बवलेला कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो असे म्हणत याकाळात सरकारनं जी कामे करायला हवी होती ती कामे करण्यास हे सरकार अपयशी ठरणल्याचा हल्लाबोल वसंत मोरे यांनी केला आहे. या जी काम करण्यात सरकार अपयशी ठरले ती सर्व कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.ठाण्यातील उत्तरसभेतील राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी पुण्यातील मनसेेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी कोरोनाकाळात पुण्यात उद्भवलेल्या परिस्थिवर भाष्य करत पुण्यात रस्त्यावर सामान्यांसाठी केवळ आणि केवळ मनसचे कार्यकर्ते काम करत होते. तर बाकीच्या पक्षांचे नेत मंडळी घरात बसली होती. पुण्यात एक अॅम्बेसिडर फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला असे वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.

Emotional post by Vasant More : भितीने पोटात गोळा आला होता : वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

 भितीने पोटात गोळा आला होता

: वसंत मोरे यांची भावनिक पोस्ट

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याच्या दिवशी केलेल्या मशिदीवरील भोंग्याच्या वक्तव्यावरुन वाद पेटला होता. या वक्तव्यावर पुण्याचे मनसे अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना पुण्याच्या मनसे शहराध्यक्ष पदावरुन काढण्यात आलं होत. त्यानंतर त्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे. भेटीनंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.आज सकाळी साधारण ११ वाजण्याच्या सुमारास वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज यांच्या भेटीच्या अगोदर त्यांनी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी सगळ्या पक्षांच्या ऑफर येथे संपलेल्या आहेत असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आता आपल्या फेसबुकवरुन एक भावनिक पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, “आयुष्यात खूप पदे मिळाली, ती कामाच्या आणि एकनिष्ठेच्या जोरावर.. पद काय आज आहे तर उद्या नाही हो… पण माझं जे “माझा वसंत” हे स्थान काही काळासाठी डळमळीत झालं होतं, ते तिथं (शिवतीर्थावर) गेल्यावर कळलं की मी तर काहीच हरवलेलं नाही.” असं म्हणत त्यांनी आपली कृतज्ञता आणि पक्षांबद्दलचा आदर व्यक्त केला आहे. पुढं ते लिहितात की, उगाचंच भितीने पोटात गोळा आला होता म्हणूनच मी म्हणतो मी आपला इथंच बरा…

 

MNS : आयुष्यात संघर्षाचा वनवास … वसंत मोरे म्हणाले …!

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आयुष्यात संघर्षाचा वनवास … वसंत मोरे म्हणाले …!

एका आठवड्याच्या नाराजीनंतर अखेर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेच्या भोंग्यांविरोधातील भूमिकेला दुजोरा न दिल्याने मोरे यांची पदावरून हकालपट्टी झाली होती. यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे मनसेने पुण्याची सूत्र दिली. अखेर वसंत मोरे राज ठाकरेंच्या भेटीला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता त्यांची नाराजी दूर झाल्याचं कळतंय. (Vasant More Meets Raj Thackeray in Mumbai)ठाण्यातील सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत, असं मोरे म्हणाले. राज साहेबांच्या भेटीवर मी १०० टक्के समाधानी आहे, असं त्यांनी सांगितलं. उद्याच्या सभेला ये, असं साहेब म्हणाल्याचं मोरेंनी माध्यमांना सांगितलं. मी पहिल्यापासून सांगत होतो कि मी मनसेत राहणार आहे. उद्याची उत्तर सभा आहे. त्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत, असे मोरे म्हणाले. (Vasant More News)

 
दरम्यान वसंत मोरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात, मी माझ्या साहेबांसोबत…

आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही…!जय श्रीराम

आज पुण्याचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष साईनाथ बाबर देखील राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मात्र, वसंत मोरे यांनी सर्वात आधी शर्मिला ठाकरेंची भेट घेतली. यानंतर ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले. यामध्ये खलबतं झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना ‘सगळ्या ऑफर संपल्या’ असं सांगितलं.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं. यादरम्यान, मोरेंना अनेक मोठ्या पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली. मात्र वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केलं. यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली आणि अखेर दोघांची मुंबईत भेट झाली.

Vasant More : MNS : पुणे मनसेत कोण आहेत पार्ट टाइम जॉबवाले?  : वसंत मोरे आज राज ठाकरेंना याबाबत बोलणार  

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनसेत कोण आहेत पार्ट टाइम जॉबवाले?

: वसंत मोरे आज राज ठाकरेंना याबाबत बोलणार

पुणे : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मोरे यांना शहराध्यक्ष पदाला मुकावे लागले होते. मोरे नाराज असल्याची चर्चाही होती याशिवाय ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाणार असल्याचेही बोलले जात होते. या पक्षांकडून ऑफर असल्याचा दावाही मोरे यांनी केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचेही त्यानी स्पष्ट केलं होते. दरम्यान आज मोरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेणार आहेत.

वसंत मोरे पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्याआधी मोरे म्हणाले राज ठाकरे जे विचारतील त्याबाबतीत चर्चा करेन, संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले, यात मला शंभर टक्के यश मिळाले आहे. या यशामुळे काही पार्टटाईम जॉबवाले नाराज झाले होते. त्यांच्यामुळे थोडी अडचण झाली, अशी खंत वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. या पार्टटाईम जॉबवाल्यांबद्दल आज राज ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, मशिदींसमोर भोंगे लावण्याने माझ्या प्रभागातील अडचणी राज ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहे. राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील अशी आपल्याला अपेक्षा असल्याचेही मोरे यांनी व्यक्त केली आहे.