Water wasted : ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!  :  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार 

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!

:  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार

पुणे : बाणेर आणि बालेवाडी परिसरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. याकडे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गंभीरपणे लक्ष वेधले आहे. पाषाण पंपिंग स्टेशन प्रत्यक्ष जाऊन पाणी टंचाई बाबत अमोल बालवडकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी करोडो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://youtube.com/shorts/1kESO8wMEaE

याबाबत अमोल बालवडकर म्हणाले, मी पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी गेल्या ३ महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याची माहिती मिळाली, जवळपास २४ तास दररोज हे पाणी वाहत असुन सुमारे १ करोड लिटर पिण्याचे पाणी रामनदीला जाऊन मिळत आहे. यामुळेच बाणेर-बालेवाडी भागाला दैनंदिन सुमारे १ करोड लिटर पाणी पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आले. हि समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकार्यांना माहिती असुन सुद्धा जाणीव पुर्वक का सोडवण्यात आली नाही..?

गेली ३ महिन्यांपासुन बाणेर-बालेवाडीचे हजारो नागरीक या पाणी समस्येमुळे त्रस्त आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्विकारत नसुन जाणीवपुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना जर हि समस्या दिसत आहे तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हि समस्या का दिसत नाही..? झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे खरच कठीण आहे.

बालवडकर पुढे म्हणाले, येत्या ४ दिवसात जर बाणेर-बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर माझ्या समस्त बाणेर-बालेवाडीतील नागरीकांना आवाहन आहे की आपण पुणे महानगरपालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसुन जाणीव पुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे फोन किंवा मेसेज द्वारे करावी हि विनंती.

सर्वप्रथम मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन ना.मा.श्री.अजितदादा पवार तसेच स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील व पुणे शहराचे खासदार मा.श्री.गिरीषजी बापट साहेब यांच्याकडे या विषयाबाबत तक्रार करणार असुन या सर्वांनी बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता लक्ष घालावे अशी विनंती करणार आहे.

Leave a Reply