Sting Operation | MANS | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्टिंग ऑपरेशन | पाषाणसारख्या उच्छभ्रू भागात भोंदूगिरी उघड

Categories
Breaking News cultural social पुणे

Sting Operation | MANS | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  स्टिंग ऑपरेशन | पाषाणसारख्या उच्छभ्रू भागात भोंदूगिरी उघड

Sting Operation | MANS | पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाठ या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti) कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन (Sting Opération) करून पर्दापाश केला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. अशी माहिती विशाल विमल (Vishal Vimal) यांनी दिली.
या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय – 39, रा. वंशज गार्डन, पाषाण) या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये ( वय- 45, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (वय – ३३, रा. गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसतील 23 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी पुढील कार्यवाही चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (बोपोडी, पुणे) यांना सदर महिला आणि साथीदार हे जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याची नोव्हेंबर महिन्यात माहिती मिळाली. महा. अंनिसच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यानी सदर प्रकरणी शहानिशा केली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १६)  विशाल विमल हे पिडित युवक व साध्या वेशातील चतुशृंगी ठाण्याच्या पोलिसांसोबत सदर महिलेच्या पाषाण, मुक्ता रेसिडेन्सी येथील गुरुदत्त कन्सल्टन्सी कार्यालयात उपचारासाठी गेले. रिसेपशनिस्ट माया गजभिये आणि सतिष वर्मा हे बाहेरच्या रुममध्ये बसले होते. विशाल यांना कन्सल्टींग फी एक हजार  रुपये भरावयास लावून त्यानंतर विशाल  यांना आतमधील रुममध्ये जाण्यास सांगितले. आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. सदर महीला ही आघोरी, अनिष्ठ, जादुटोणा प्रकार करुन लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाल्याने त्यांनी पोलीसांना आतमध्ये बोलावले.  पोलीसांनी आतमध्ये येऊन सदर पंचनामा करुन जादूटोण्याच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने सदर युवक नैराश्येमध्ये होतो. समुपदेशक महिला असल्याची सोशल मीडियावरील जाहिरात पाहून हा युवक सदर महिलेकडे सप्टेंबर २०२१ पासून उपचारासाठी जात होता. त्याला  कोणतीही समस्या न विचारता सदर महिलेने अतेंद्रीय शक्तीने समस्या ओळखल्याचे सांगितले.  युवकाचे आयुष्य वयाच्या ३० वर्षापर्यंत आहे असे सांगुन ते वाढविण्यासाठी आलौकीक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राख  खाण्यास दिली. त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणी पोटाचा विकार झाला. सदर महिलेने तिच्या अंगात अतेंद्रिय शक्ती असल्याचे सांगुन गंडा न बांधल्यास युवकाला मृत्युची भीती घातली. नैराश्य आर्थिक अडचण दूर होण्याचा चमत्कार घडेल औषध उपचार घेण्याची गरज नाही असे भाकीत करुन युवकाची सुमारे दीड लाख रुपये अर्थिक फसवणुक केली आहे. तसेच सदर महिलेने युवकाकडून स्वतःची पुजा करून घेऊन त्याला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आहे. त्यामुळे त्याला  पोटाचे विकार झाले.   सदर महिलेने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरीक व मानसीक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे.

Pune Water cut | नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Water cut | नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Pune Water cut | शनिवारपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाचे आगमन (Pune Rain) झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही पावसाची अनिश्चितता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी आज केले. (Pune Water Cut)
बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील (Baner Balewadi Pashan) नागरिकांची पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील यांनी लोकसहभागातून तीन महिने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. या उपक्रमाचा बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील अनेक सोसायटीतील नागरिकांनी लाभ झाला. त्याबद्दल पाषाण-सूस रोडवरील माऊंट युनिक गृहनिर्माण संस्थेच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी  ते बोलत होते. (Pune News)
कार्यक्रमाला माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, विवेक मेथा यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, शहरातील  नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांसाठीची योजना कार्यान्वित करण्यात आली. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी महापालिकेने कठोर परिश्रम घेतले आहेत. (PMC Equal Water Supply Project)
ते पुढे म्हणाले , समान पाणीपुरवठा योजनेचे टप्पे पूर्ण होत असताना काही अडथळे ही पार करावे लागत आहेत. यंदा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर कोथरूड बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांसाठी लोकसहभागातून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात पाऊस समाधानकारक झाला, तर भविष्यातील पाणीटंचाईची समस्या संपेल. (PMC Water Supply Department)
वाढते शहरीकरण आणि बदलत्या निसर्गचक्रामुळे पाण्याचे स्त्रोत अपूरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचे योग्य नियोजन करावे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी गाड्या धुणे किंवा बांधकामांसाठी वापरले जाते. त्यामुळे पाण्याचा हा अपव्यय टाळला पाहिजे. तसेच, सोसायटींनीही पावसाचे पाणी संकलित करून, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प सोसायटी भागात कार्यान्वित करावेत, तसेच कचऱ्याची निर्गत, सौर ऊर्जा प्रकल्प आदींद्वारे स्वावलंबी बनावे असे आवाहन त्यांनी केले.
—-
News Title | Pune Water cut | Citizens should plan water properly| Appeal of Guardian Minister Chandrakantada Patil

Public Relation Office of Chandrakant Patil | चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेरमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Categories
Breaking News Political पुणे

Public Relation Office of Chandrakant Patil | चंद्रकांतदादा पाटील यांच्या बाणेरमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Public Relation Office of Chandrakant Patil | कोथरुड मतदारसंघातील (Kothrud Constituency) बाणेर-बालेवाडी-पाषाण (Baner-Balewadi-Pashan) भागातील नागरिकांच्या सेवेसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील (Minister Chandrakant Patil)  यांचे बाणेरमध्ये नवे जनसंपर्क कार्यालय (Public Relations office in Baner) सुरू झाले असून, रविवार  २१ मे रोजी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे कार्यालय सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिली. (Public Relation Office of Chandrakant Patil)

या कार्यक्रमाला स्थानिक माजी नगरसेवक अमोल बालवडकर, दिलीप वेडे पाटील, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, राहूल कोकाटे, रोहन कोकाटे, स्थानिक भाजपा कार्यकर्त्या उमाताई गाडगीळ, अस्मिता करंदीकर, सचिन पाषाणकर, ॲड. मिताली सावळेकर यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनानंतर नामदार पाटील यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. हे कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव कार्यरत असेल, अशी ग्वाही यावेळी दिली. त्यावर उपस्थित सर्व नागरिकांनी नामदार पाटील यांचे अभिनंदन करुन, त्यांच्या कार्य कुशलतेबाबत समाधान व्यक्त केले.

—–

पाषाण मधील नागरिकांची पाण्याची समस्या दूर होणार | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

| थेट भेट द्वारे पाषाणमधील नागरिकांशी संवाद

पाषाण मध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यातील अडथळे लवकरच दूर करुन पाषाणमधील नागरिकांना बाणेर-बालेवाडीप्रमाणे सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. थेट भेट उपक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी पाषाणमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. (Pashan Water Distribution)

यावेळी भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहूल कोकाटे, सनी निम्हण, रोहन कोकाटे, औंध क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कलाटे यांच्या सह इतर अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

यावेळी कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पोलीस गस्त वाढविणे, योग अभ्यास केंद्र उपलब्ध करून देणे आदी समस्या स्थानिक नागरिकांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना सर्व समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून, पाणीपुरवठा सुरळीत करण्याची सूचना नामदार पाटील यांनी केली‌‌.

त्यासोबतच चुकीच्या पद्धतीने वाहन चालवून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश नामदार पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. तसेच योग अभ्यासासाठी आयुक्तांसोबत चर्चा करुन केंद्र सुरू करण्याचे निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी नामदार पाटील यांनी यावेळी दिली.

नामदार पाटील यांनी लोकसहभागातून स्वच्छच्या माध्यमातून कचरा संकलन सुरू केल्याबाबत सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, महामार्गालगत काहीजण राडारोडा टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे, नामदार पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावरही लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


News Title | Inauguration of Public Relations Office of Namdar Chandrakantada Patil in Baner

Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

Categories
Breaking News cultural Political social पुणे

बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प

| अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प अमोल बालवडकर फाऊंडेशन  आणि भाजपा सक्रिय महिला यांच्या वतीने केला आहे.

याबाबत अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, आज या अभियानाची सुरुवात योग्य व्यक्तीच्या हाती पहिला तिरंगा देऊन करावी असे मनात होते. या अनुषंगाने आपल्या देशाच्या सेवेसाठी आपल्या मुलाला प्रोत्साहन देणार्या शूरवीराच्या मातोश्री सौ.मित विज यांना पहिला तिरंगा देऊन या अभियानाला सुरुवात झाली. आपल्या प्रभागातील एक युवक लेफ्टनंट गुरप्रितसिंग विज हे भारतीय सैन्य दलात मोलाची कामगिरी बजावत असुन त्यांच्या मातोश्री सौ.मित विज व त्यांचा संपुर्ण परिवार कायमच गुरप्रित सिंग यांना प्रोत्साहन देत असतात. यावेळी गुरप्रित सिंग सैन्य दलात बजावत असलेल्या कर्तव्याबाबत त्यांच्या मातोश्रींकडुन माहिती घेतली.

खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिक, सीमेवरचे सैनिक किंवा देशसेवा करणारे सगळे लोक जेव्हा देशासाठी आपले योगदान देतात तेव्हा फक्त तेच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण परिवाराचे योगदान मोठे असते. त्यामुळे या सर्वांच्या हिमतीने आणि त्यागामुळे आज देश ताठ मानेने उभा आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या-ज्या सैनिकांनी बलिदान दिले आणि आजही आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी जे-जे सैनिक स्वतःचे मौलिक योगदान देत आहेत अशा सर्व सैनिकांना माझा मानाचा मुजरा! असे ही बालवडकर म्हणाले.

Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा

| भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगे आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महापालिकेने हा प्रश्न तत्काळ सोडवावा, अशा सूचना भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केल्या.

बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार  चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त  विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेली पाणीपुरवठा समस्या निवारण बैठक बाणेर येथील अमोल बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर संपन्न झाली.
या बैठकिचे आयोजन मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योतीताई गणेश कळमकर, स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर यांनी केले होते.

यावेळी पुरेसा पाऊस पडुन धरणांमध्ये पाणी साठा असुनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरणाच्या अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच वारंवार पाठपुरावा करुन देखिल अधिकारी या गंभिर पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आयुक्तांना निदर्शनास आणुन दिले.

“जागो-जागी पाईप लाईन मधुन होत असलेली गळती थांबवुन, पंप दुरुस्त करुन तसेच वितरण व्यवस्थेत सातत्य ठेवुन लवकरात लवकर या भागाला पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करावा” अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

यावेळी आयुक्तांनी बाणेर बालेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारे जे पंप आहेत ते पंप लवकरात लवकर दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तसेच नव्याने समाविष्ठ सुस-म्हाळुंगे-बावधन बु. या गावांसाठी पुणे मनपा मार्फत पाणी पुरवठा करण्यासाठीचा आराखडा तयार झाला असुन लवकरच याकरीता निधी उपलब्ध करुन दिला जाईल व या गावांमध्ये देखिल पुणे मनपा मार्फत पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले.

यासोबतच जोपर्यंत या गावांमधील पाणी प्रश्न मार्गी लागत नाही व पाईप लाईन विकसित होत नाहित तोपर्यंत बाणेर-बालेवाडी-पाषाण सहित नविन समाविष्ठ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या मदतीकरीता या भागातील सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन व लोकसहभागातुन विविध भागात टाक्यांची उभारणी करण्यात येईल व सर्वत्र पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासित केले. तसेच २४x७ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ८ टाक्या तातडीने सुरू करण्याचेही आदेश मा.चंद्रकांतदादांनी पुणे मनपा आयुक्त व अधिकारी यांना दिले.

याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, बाणेर बालेवाडी येथील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व पत्रकार बांधव, विविध सोसायटीचे चेअरमन-सेक्रेटरी व पदाधिकारी तसेच समस्त नागरिक उपस्थित होते.

Water wasted : ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!  :  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

ऐन उन्हाळ्यात करोडो लिटर पाणी जातेय वाया!

:  अमोल बालवडकर यांनी उघडकीस आणला प्रकार

पुणे : बाणेर आणि बालेवाडी परिसरात पाणी समस्या निर्माण झाली आहे. याकडे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी गंभीरपणे लक्ष वेधले आहे. पाषाण पंपिंग स्टेशन प्रत्यक्ष जाऊन पाणी टंचाई बाबत अमोल बालवडकर यांनी आढावा घेतला. त्यावेळी करोडो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

https://youtube.com/shorts/1kESO8wMEaE

याबाबत अमोल बालवडकर म्हणाले, मी पाषाण पंपिंग स्टेशन येथील टाकी गेल्या ३ महिन्यांपासुन मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याची माहिती मिळाली, जवळपास २४ तास दररोज हे पाणी वाहत असुन सुमारे १ करोड लिटर पिण्याचे पाणी रामनदीला जाऊन मिळत आहे. यामुळेच बाणेर-बालेवाडी भागाला दैनंदिन सुमारे १ करोड लिटर पाणी पुरवठा कमी होत असल्याचे निदर्शनास आले. हि समस्या पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अधिकार्यांना माहिती असुन सुद्धा जाणीव पुर्वक का सोडवण्यात आली नाही..?

गेली ३ महिन्यांपासुन बाणेर-बालेवाडीचे हजारो नागरीक या पाणी समस्येमुळे त्रस्त आहेत. प्रशासन कोणत्याही प्रकारे स्वतःची जबाबदारी स्विकारत नसुन जाणीवपुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना जर हि समस्या दिसत आहे तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना हि समस्या का दिसत नाही..? झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे करणे खरच कठीण आहे.

बालवडकर पुढे म्हणाले, येत्या ४ दिवसात जर बाणेर-बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा झाला नाही तर माझ्या समस्त बाणेर-बालेवाडीतील नागरीकांना आवाहन आहे की आपण पुणे महानगरपालिका आयुक्त व त्यांचे अधिकारी जबाबदारीने काम करत नसुन जाणीव पुर्वक बाणेर-बालेवाडीच्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारची तक्रार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे फोन किंवा मेसेज द्वारे करावी हि विनंती.

सर्वप्रथम मी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणुन ना.मा.श्री.अजितदादा पवार तसेच स्थानिक आमदार प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील व पुणे शहराचे खासदार मा.श्री.गिरीषजी बापट साहेब यांच्याकडे या विषयाबाबत तक्रार करणार असुन या सर्वांनी बाणेर-बालेवाडीचा पाणी प्रश्न सोडविण्याकरीता लक्ष घालावे अशी विनंती करणार आहे.