Maharashtra Andhashradhha Nirmoolan Samiti | भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात | महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Maharashtra Andhashradhha Nirmoolan Samiti | भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात | महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचा उपक्रम

Maharashtra Andhashradhha Nirmoolan Samiti – (The Karbhari News Service) – उरुळी कांचन जवळील भवरापुर गावच्या स्मशानभूमीत लहान मोठे पन्नास जण शनिवारी (दि.६) रात्रभर मुक्कामी राहिले. तिथेच जेवले, स्वच्छता केली, गाणी म्हटली, चमत्काराचे प्रयोग सादर केले, भूतांची माहिती जाणून घेतली, त्यांना साद घातली, पण भुते काही दिसली नाहीत. स्मशानात अतृप्त आत्मे हे भुताच्या स्वरूपात भटकतात आणि त्यांचा पांढरा वेश, उलटे पाय, उंच शरीरयष्टी असते, हा समाज काही खरा ठरला नाही. मात्र इंद्रियजन्य भास आणि असे-असे भूत असते, या संस्कारातून भुताची कल्पना लोकांच्या मनांमध्ये रुजल्याचे सगळ्यांना मनोमन पटले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेने भवरापुर ग्रामपंचायतच्या सहकार्याने स्मशान भेट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सायंकाळी सातवाजेपासून रविवारी सकाळी सातवाजेपर्यन्त पन्नास जण स्मशानात मुक्कामी होते. यावेळी गावाचे सरपंच सचिन सातव, शाखेचे अध्यक्ष लालचंद कुंवर, कार्याध्यक्ष विशाल विमल, सचिव स्वप्नील भोसले, माजी सरपंच बबन साठे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मयूर पटारे, निशांत धाईंजे, प्रवीण खुंटे, रतन नामपल्ले, स्नेहल लांडगे, अनुज भुजबळ, मनोहर पाटील, समाधान भगत, नम्रता ओव्हाळ, राज भगत, ज्ञानेश महाजन, संजय निकम, योगेश हुपरिकर, मंगेश चित्ते, सुरज चव्हाण, विवेक इंगोले यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम पार पडला.

भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर

‘एका पिढीकडून पुढच्या पिढीच्या मनावर अनेक माध्यमांद्वारे भूत असल्याचे कल्पना रंगवून संस्कार केले जातात. तसेच, मानसिक अनारोग्य व इंद्रियजन्य भ्रमातून भूत असल्याचे भास निर्माण होतात. त्यामुळे आजही समाजात भुताची कल्पना जनमानसाच्या मानगुटीवर बसली आहे. त्यातून अंधश्रद्धा, भीती, शोषण, मानसिक ताण, फसवणूक घडत आहे. लोकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे’, असे विशाल विमल यांनी सांगितले.

National Science Day | वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाने लोक अंधश्रद्ध | विशाल विमल

Categories
Breaking News cultural social आरोग्य पुणे

National Science Day | वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाने लोक अंधश्रद्ध | विशाल विमल

| महाराष्ट्र अंनिसच्या पुणे शहर शाखेचे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान

| दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी

National Science Day | आजची भौतिक प्रगती ही तार्किकता, सुसंगतपणा, चिकित्सा, वैज्ञानिक दृष्टिकोन या विज्ञानाच्या कसोट्यांमधून झाली आहे. लोक केवळ विज्ञानाच्या साधनांचा उपभोग घेत असून जीवनात विज्ञानाच्या कसोट्या उपयोगात आणत नाहीत. त्यामुळे लोक बुवाबाजी, अंधश्रद्धा, चमत्कार, ज्योतिष, भूतभानामती, करणी, कर्मकांड या गोष्टींना बळी पडत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेचे कार्याध्यक्ष विशाल विमल (Vishal Vimal) यांनी केले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभियानात शहर आणि जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे शहर शाखेच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘जीवनाला समृद्ध करणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सप्ताह ‘ आयोजित केला होता. प्रश्नमंजूषा, पोस्टर प्रदर्शन आणि व्याख्यानासह प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले. मनोदय व्यसन्मुक्त संस्था पुणे, मुक्ता साळवे साळवे शाळा पर्वती, यशोदीप माध्यमिक विद्यालयात वारजे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी, युनिकॉर्न इंटरनॅशनल स्कुल पिंपरी सांडस, अहिल्यादेवी होळकर विद्यालय मिरवडी, न्यु इंग्लिश स्कुल शिरूर आदी ठिकाणी कार्यक्रम झाले. विशाल विमल यांच्यासह प्रवीण खुंटे, माधुरी गायकवाड, एकनाथ पाठक, लालचंद कुंवर, स्वप्नील भोसले, वैशाली कळसाईत, निशांत धाईंजे, रतन नामपल्ले, वैशाली सावित्री आदी कार्यकर्ते या अभियानात सहभागी होते. अंधश्रद्धा निर्मूलनासह वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार प्रचार महा. अंनिस सातत्यपणे करत आहे. विज्ञान दिनाच्या निमित्ताने अधिक भर देऊन अभियान राबविले जात आहे, असे विशाल विमल यांनी सांगितले.

आपल्याकडे तार्किक, सुसंगत, चिकित्सपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून विचार व्यवहार करण्याची संस्कृती रुजविलेली नाही. अलिकडच्या काळात तर उलटा प्रवास सुरू आहे. समाजातील सर्वस्तरातील लोक धागेदोरे, अंगारे धुपारे, मंत्रतंत्र, पूजाअर्चा याच्या आधीन गेले आहेत. पाण्याचा दिवा पेटणे, अंगात संचार होणे, मंत्राने अग्नि प्रज्वलित होणे, बंद चिट्टीत लोकांनी लिहून ठेवलेले ओळखणे, पेटता कापुर खाणे, डोळे बंद असताना हलविलेली वस्तु ओळखने, मंत्राने पाणी गायब करणे आदी प्रयोग करून आजही लोकांना फसविले जाते. भोंदू लोक भौतिक क्रिया, हातचलाखी, रासायनिक अभिक्रिया, दिशाभूल करून प्रयोग सादर करतात. मात्र हे भोंदू लोक देवाधर्माचे नाव घेऊन अंगी सिद्धी असल्याने चमत्कार घडल्याचे सांगून लोकांना फसवितात. लोकही हजारोंच्या संख्येने भोंदूच्या मोहजालात फसत असल्याचे विशाल विमल यांनी सांगितले.
—–

500 crore provision for democratic empowerment | Union budget announced

Categories
Breaking News Commerce social पुणे

500 crore provision for democratic empowerment| Union budget announced

In India, people have limited access to democratic decision-making processes, their participation is minimal and people distrust the governance system. Hence, the democratic decision-making process is deteriorating day by day. It has been announced in the Union Budget that a provision of 500 crores is required in the Union Budget for the promotion of democratic values.

Center for Holistic Human Development and Research announced the Union Budget for 2024-25 at SM Joshi Auditorium. This public budget was published by Marxist leader Ajit Abhyankar, head of the center Vishweshwar Raste, and social activist Vishal Vimal. On this occasion, Swapna Alluri, Shiwangi Bageshwari, Utkarsh Pande, Pramod Dahule, Jayashri Patil, Neha Madhavi, and Vijaya Lakshmi presented the provisions of the Public Budget.

India’s global rank in democratic decision-making is declining. For overall development of the country, it is necessary to implement a democratic decision-making process with suggestions, opinions, and participation of the people. 1 crore of MP fund should be spent for the promotion of democratic values. It is necessary to create public awareness among the people about the democratic decision-making process, to know the suggestions of the people, and to encourage the people, provision has been made in the public budget.

There is a need for well-planned management of cities to curb the uncontrolled growth of cities. 73rd and 74th constitutional amendments should be effectively implemented. India invests only one percent if compared to the global tourism industry. The development of the tourism business will generate employment and economic prosperity by increasing investment. We need to create awareness of food literacy. overconsumption and malnutrition are major problems in India. Quality and regular electricity should be provided to every household and free electricity should be provided to the poor. Cold storage and processing industries are essential to increase the shelf life of perishable agricultural products. The farmers will get a stable price from it and other provisions have been made in the public budget.

The government system should increase its capacity to solve the people’s problems. Ajit Abhyankar expressed the opinion that a plan of action should be proposed and implemented strictly for the people. About 23 crore people in the country are living in poverty and providing employment and education to them will eradicate poverty in five years. Vishweshwar Raste expressed that 2 percent of the Union Budget is needed to eradicate the poverty of 20 percent of the people. Special provisions have been made in this public budget for democratic empowerment, poverty eradication, employment growth, well-planned urbanization, tourism development, skill development, food literacy, quality and sufficient electricity, girl child education, and sustainability of perishable agricultural products. Vishal Vimal stated that a copy of the public budget will be sent to the Prime Minister and Finance Minister.

Union Budge 2024 | लोकशाही सक्षमीकरणासाठी 500 कोटींची तरतूद आवश्यक | केंद्रीय जनअर्थसंकल्प जाहीर

Categories
Breaking News Commerce social पुणे

Union Budge 2024 | लोकशाही सक्षमीकरणासाठी 500 कोटींची तरतूद आवश्यक

| केंद्रीय जनअर्थसंकल्प जाहीर

Union Budge 2024 | भारतात लोकशाही निर्णय (Indian Democracy) प्रक्रियेत लोकांना मर्यादित संधी, त्यांचा अत्यल्प सहभाग आणि लोकांना शासन व्यवस्थेबद्दल अविश्वास आहे. त्यामुळे लोकशाही निर्णयप्रक्रिया दिवसेंदिवस खालावत आहे. लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budge 2024) ५०० कोटींची तरतूद आवश्यक आहे, असे केंद्रीय जनअर्थसंकल्पात जाहीर केले आहे.

सेंटर फॉर हॉलिस्टिक ह्युमन डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्यावतीने एस एम जोशी सभागृह येथे २०२४-२५ या वर्षीचा केंद्रीय जनअर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. हा जनअर्थसंकल्प मार्क्सवादी नेते अजित अभ्यंकर, सेंटरचे प्रमुख विश्वेश्वर रास्ते, सामाजिक कार्यकर्ते विशाल विमल यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी स्वप्ना अलुरी, शिवांगी बागेश्वरी, उत्कर्ष पांडे, प्रमोद डाहूले, जयश्री पाटील, नेहा मधवी, विजया लक्ष्मी यांनी जनअर्थसंकल्पातील तरतुदींसंबंधी मांडणी केली.

जागतिक पातळीवर भारताचा लोकशाही निर्णय प्रक्रियेतील क्रमांक घसरत आहे. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी लोकांच्या सूचना, मते आणि सहभागाने लोकशाही निर्णय प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. लोकशाही सक्षमीकरणासाठी खासदार निधीतील १ कोटी रुपये खर्च केले पाहिजेत. लोकशाही निर्णय प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे, लोकांच्या सूचना जाणून घेणे, लोकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, अशी तरतूद जन अर्थसंकल्पात केली आहे.

शहरांची अनिर्बंध बकाल वाढ रोखून शहरांचे सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 73 व 74 वी घटना दुरुस्तीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायामध्ये जागतिक पातळीवर विचार करता भारतामध्ये केवळ एक टक्का खर्च होतो. पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ती गुंतवणूक वाढवून रोजगार आणि आर्थिक सुबत्ता निर्माण होईल. आपल्याकडे आहार साक्षरता घडवून आणण्याची आवश्यकता असून अतिसेवन आणि कुपोषण या मोठ्या समस्या आहेत. दर्जेदार, नियमित आणि गरिबांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नाशवंत शेतीमाल पदार्थांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी शीतगृह आणि प्रक्रिया उद्योग आवश्यक आहे. त्यातून शेतकऱ्यांना स्थिर भाव मिळेल, आदी तरतुदी जनअर्थसंकल्पात केल्या आहेत.

लोकांचे प्रश्न सोडवणुकीसाठी शासन व्यवस्थेने स्वतःची क्षमता वाढविल्या पाहिजेत. लोकांसाठी योजना आखून त्याची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे, असे मत अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. देशातील सुमारे 23 कोटी लोक गरिबीत असून त्यांच्यासाठी रोजगार आणि शिक्षण उपलब्ध करून दिल्यास पाच वर्षात गरिबी निर्मूलन होईल. 20 टक्के लोकांच्या गरिबी निर्मूलनासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातील 2 टक्के रक्कम आवश्यक आहे, असे मत विश्वेश्वर रास्ते यांनी व्यक्त केले. लोकशाही सबलीकरण, गरिबी निर्मूलन, रोजगार वृद्धी, सुनियोजित शहरीकरण, पर्यटन विकास, कौशल्य विकास, आहार साक्षरता, दर्जेदार व पुरेशी वीज, मुलींचे शिक्षण, नाशवंत शेतमालाचा टिकाऊपणा या बाबींसाठी विशेष तरतूद या जनअर्थसंकल्पात केली आहे. जन अर्थसंकल्पाची प्रत पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे, असे विशाल विमल यांनी सांगितले.

Budget 2024 | अर्थसंकल्पात हवी गरिबी निर्मूलनासाठी तरतूद | जनअर्थसंकल्प प्रस्तावावरील चर्चेत मागणी

Categories
Breaking News Commerce social देश/विदेश पुणे

Budget 2024 | अर्थसंकल्पात हवी गरिबी निर्मूलनासाठी तरतूद | जनअर्थसंकल्प प्रस्तावावरील चर्चेत मागणी

Budget 2024 | देशाचा अर्थसंकल्प हा गोपनीय पद्धतीने बनविला जात असून त्यात लोकसहभाग नसतो. त्यामुळे त्यात लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कार्यक्रम नसतो. देशात आजही 23 कोटीहुन अधिक लोक गरिबीत जगत असून त्यांच्या उत्थानासाठी १ लाख कोटी रुपये देशाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद अपेक्षित आहे, असा सूर जनअर्थसंकल्प २०२४-२५ च्या प्रस्तावावरील चर्चासत्रात उमटला. (Budget 2024)

सेंटर फॉर हॉलिस्टिक ह्युमन डेव्हलपमेंट अँड रिसर्च च्यावतीने एस एम जोशी सभागृह येथे जनअर्थसंकल्प २०२४-२५ च्या प्रस्तावावर चर्चा आयोजित केली होती. यावेळी सेंटरचे प्रमुख विश्वेश्वर रास्ते, मार्क्सवादी नेते अजित अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल विमल आदी उपस्थित होते. यावेळी स्वप्ना अलुरी, शिवांगी बागेश्वरी, उत्कर्ष पांडे, प्रमोद दाहूले, जयश्री पाटील, नेहा मधवी, विजया लक्ष्मी यांनी मांडणी केली. उपस्थितांनी आपली मते व्यक्त केली. गरिबी निर्मूलन, रोजगार वृद्धी, सुनियोजित शहरीकरण, पर्यटन विकास, कौशल्य विकास, लोकशाही सबलीकरण, आहार साक्षरता, दर्जेदार व पुरेशी वीज, मुलींचे शिक्षण, नाशवंत शेतमालाचा टिकाऊपणा याकडे देशाच्या अर्थसंकल्पात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मुद्यांकडे अधिक लक्ष देऊन त्यासाठी भरीव तरतूद करण्याची गरज चर्चेत व्यक्त करण्यात आली. जनअर्थसंकल्प २०२४-२५ च्या प्रस्तावावर आलेल्या सूचना, मते लक्षात घेऊन जनअर्थसंकल्प २१ जानेवारी २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याची प्रत पंतप्रधान व अर्थमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे विशाल विमल यांनी सांगितले.

आपल्या १४० करोड लोकसंख्येमधील क्वचितच लोकांना देशाचा अर्थसंकल्प माहीत असतो. देशाचा अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा दोन दिवस केवळ त्यावर चर्चा होते. ती चर्चाही केवळ आयकर किती वाढला, कमी झाला एवढ्यापुरती मर्यादित असते. अर्थसंकल्पामध्ये लोकांचे प्रश्न, समस्या, भविष्य याचे प्रतिबिंब हे अपवादात्मक असते. त्याचा एकूणच देशाच्या सर्वांगीण विकासावरती विपरीत परिणाम होत आलेला आहे, असे मत मार्क्सवादी नेते अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले. आपल्या देशात 23 ते 27 कोटी लोक गरीबीत जगत आहे, या गरिबीच्या निर्मूलनासाठी देशाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही स्वतंत्र तरतूद नाही. गरिबी निर्मूलनासाठी लोकांना रोजगार, शिक्षण आणि नव्याने काही योजना आखण्याची गरज आहे. हे सातत्यपूर्ण चार ते पाच वर्षे केल्यास गरिबी नियंत्रणात येईल असे मत विश्वेश्वर रास्ते यांनी व्यक्त केले. शहरांची अनिर्बंध बकाल वाढ रोखून शहरांचे सुनियोजित व्यवस्थापन करण्याची गरज आहे. 73 व 74 वी घटना दुरुस्तीची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायामध्ये जागतिक पातळीवर विचार करता भारतामध्ये केवळ एक टक्का खर्च होतो. पर्यटन व्यवसायाचा विकास केल्यास ती गुंतवणूक वाढवून रोजगार आणि आर्थिक सुबत्ता निर्माण होईल, असेही रास्ते यांनी सांगितले.

लोकशाही पद्धती रुजवणुकीसाठी आपल्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कुटुंब, संस्था, संघटना, राज्य आणि देशांमध्ये लोकांची मते विचार जाणून घेऊन लोकशाही प्रक्रिया राबवण्याची गरज आहे. लोकशाही प्रक्रिया रुजवण्यासाठी देशाच्या अर्थसंकल्पामध्ये किमान 500 कोटी रुपये तरतूद आवश्यक आहे. आपल्याकडे आहार साक्षरता घडवून आणण्याची आवश्यकता असून अतिसेवन आणि कुपोषण या मोठ्या समस्या आहेत. दर्जेदार, नियमित आणि गरिबांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. नाशवंत शेतीमाल पदार्थांचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी शीतगृह आणि प्रक्रिया उद्योग आवश्यक आहे. त्यातून शेतकऱ्यांना स्थिर भाव मिळेल, या स्वरूपाची मांडणी स्वप्ना अलुरी, शिवांगी बागेश्वरी, उत्कर्ष पांडे, प्रमोद दाहूले, जयश्री पाटील, नेहा मधवी, विजया लक्ष्मी यांनी केली.

Sting Operation | MANS | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्टिंग ऑपरेशन | पाषाणसारख्या उच्छभ्रू भागात भोंदूगिरी उघड

Categories
Breaking News cultural social पुणे

Sting Operation | MANS | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे  स्टिंग ऑपरेशन | पाषाणसारख्या उच्छभ्रू भागात भोंदूगिरी उघड

Sting Operation | MANS | पुण्यातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत असलेल्या वृषाली ढोले शिरसाठ या तरुण महिलेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti) कार्यकर्ते, पोलीस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन (Sting Opération) करून पर्दापाश केला आहे. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी युवकाला औषधोपचार घेण्यापासून रोखून त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. अंगी अंतींद्रिये शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. अशी माहिती विशाल विमल (Vishal Vimal) यांनी दिली.
या प्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात वृषाली संतोष ढोले शिरसाठ (वय – 39, रा. वंशज गार्डन, पाषाण) या महिलेसह साथीदार माया राहुल गजभिये ( वय- 45, रा. विठ्ठलनगर, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (वय – ३३, रा. गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या पाषाण परिसतील 23 वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. जादूटोणा विरोधी कायदा कलम 3(2) आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 420, 506(2), ३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सदर प्रकरणी पुढील कार्यवाही चतुशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव, पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पुर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल (बोपोडी, पुणे) यांना सदर महिला आणि साथीदार हे जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक करत असल्याची नोव्हेंबर महिन्यात माहिती मिळाली. महा. अंनिसच्या पुणे शहर शाखेच्या कार्यकर्त्यानी सदर प्रकरणी शहानिशा केली.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १६)  विशाल विमल हे पिडित युवक व साध्या वेशातील चतुशृंगी ठाण्याच्या पोलिसांसोबत सदर महिलेच्या पाषाण, मुक्ता रेसिडेन्सी येथील गुरुदत्त कन्सल्टन्सी कार्यालयात उपचारासाठी गेले. रिसेपशनिस्ट माया गजभिये आणि सतिष वर्मा हे बाहेरच्या रुममध्ये बसले होते. विशाल यांना कन्सल्टींग फी एक हजार  रुपये भरावयास लावून त्यानंतर विशाल  यांना आतमधील रुममध्ये जाण्यास सांगितले. आतमध्ये बसलेल्या वृषाली ढोले शिरसाठ यांनी कोणतीही समस्या न विचारता विशाल यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. सदर महीला ही आघोरी, अनिष्ठ, जादुटोणा प्रकार करुन लोकांना फसवत असल्याची विशाल यांचीही खात्री झाल्याने त्यांनी पोलीसांना आतमध्ये बोलावले.  पोलीसांनी आतमध्ये येऊन सदर पंचनामा करुन जादूटोण्याच्या वस्तू जप्त केल्या आहेत.
स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्याने सदर युवक नैराश्येमध्ये होतो. समुपदेशक महिला असल्याची सोशल मीडियावरील जाहिरात पाहून हा युवक सदर महिलेकडे सप्टेंबर २०२१ पासून उपचारासाठी जात होता. त्याला  कोणतीही समस्या न विचारता सदर महिलेने अतेंद्रीय शक्तीने समस्या ओळखल्याचे सांगितले.  युवकाचे आयुष्य वयाच्या ३० वर्षापर्यंत आहे असे सांगुन ते वाढविण्यासाठी आलौकीक शक्तीची कृपा असलेला गंडा हातात बांधण्यास व राख  खाण्यास दिली. त्याने युवकाच्या घशाला इजा झाली आणी पोटाचा विकार झाला. सदर महिलेने तिच्या अंगात अतेंद्रिय शक्ती असल्याचे सांगुन गंडा न बांधल्यास युवकाला मृत्युची भीती घातली. नैराश्य आर्थिक अडचण दूर होण्याचा चमत्कार घडेल औषध उपचार घेण्याची गरज नाही असे भाकीत करुन युवकाची सुमारे दीड लाख रुपये अर्थिक फसवणुक केली आहे. तसेच सदर महिलेने युवकाकडून स्वतःची पुजा करून घेऊन त्याला पाय धुतलेले पाणी प्यायला दिले आहे. त्यामुळे त्याला  पोटाचे विकार झाले.   सदर महिलेने युवकाचे मित्र आणि नातेवाईक यांनाही शारीरीक व मानसीक आजार बरे करण्यासाठी घेऊन येण्यास सांगून त्यांचीही फसवणूक केली आहे.

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal | पैशाचा पाऊस हा जादूटोणाविरोधी गुन्हा | गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

Categories
Breaking News cultural social पुणे

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal | पैशाचा पाऊस हा जादूटोणाविरोधी गुन्हा | गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

 

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal |पुणे : अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार करून पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हडपसर परिसरातील एका युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असून या कायद्याच्या कलम 3 नुसार भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केली आहे. (Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal)

युनिव्हर्सल शाळेशेजारी असलेल्या एका बंगल्यामध्ये भोंदूबाबा पूजा मांडून बसला होता. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून १८ लाख रुपये भरा, त्याचे तुम्हाला ५ कोटी रुपये करून देतो असे आमिष त्याने दिले होते. अधिक पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून चमत्कार जादूटोण्याच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने १८ लाख रुपये बाबाला दिले. त्यांनतर तोतया पोलिसांचे पथक तेथे आले आणि ते १८ लाख रुपये व भोंदूबाबाला घेऊन गेले. मात्र पोलिस हे तोतया असून भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांनी ही एकत्रित येऊन फसवणूक केल्याचे तरुणांच्या नंतर लक्षात आले. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा प्रकार घडला आहे. यासंबंधी तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. भोंदूबाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यात जादूटोणाविरोधी कायद्याची कलमे समाविष्ट केलेली नाहीत.

पैशाचा पाऊस पाडण्याचा चमत्कार घडवून आणण्याचा दावा करून त्यासाठी आर्थिक फसवणूक करणे हा महाराष्ट्रात १० वर्षांपासून लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक करून चमत्काराद्वारे पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणे हा जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 3 स्वरूपानुसार गुन्हा आहे. त्यामुळे भोंदूबाबा आणि या फसवणूक प्रकारात सहभागी असणाऱ्या सहकाऱ्यांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विशाल विमल यांनी केली आहे.

पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, वेळीअवेळी पाऊस का पडतो आणि त्याच्यामागे असलेल्या कार्यकारणभावाची माहिती प्राथमिक शाळेत मिळते. मात्र आपल्या समाजात हा कार्यकारणभाव अजूनही लक्षात घेतला जात नसल्याने पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषावर लोक विश्वास ठेवत आहेत. पैशाच्या पावसातून आर्थिक प्राप्ती होणार यासाठी स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत, ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे, असेही विशाल विमल यांनी सांगितले.

MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

MANS Vs Bageshwar Dham Sarkar | राज्याच्या गृह खात्याचे संविधान विरोधी कृत्यांना पाठबळ | धिरेंद्र शास्त्रीच्या दरबारात गृहमंत्री, पोलीस अधिकारी नतमस्तक | महा. अंनिस चा आरोप

 

MANS Vs Bageshwar Dham Sarkar |वादग्रस्त असलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील तीन दिवशीय सत्संग आणि दरबार कार्यक्रम 22 नोव्हेंबर २०२३ रोजी संपला असला तरी आमचे काम अद्याप संपलेले नाही. अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य, दिशाभूल, फसवणूक करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य धिरेंद्र शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यात देखील झाली आहे, असा आरोप महा. अंनिसने केला आहे. गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी पोलीस यंत्रणेकडे कार्यक्रमपूर्व केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस अधिकारी धिरेंद्र शास्त्री यांच्या चरणी लिन झाले आहेत. राज्याचा गृह विभाग अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाबाह्य वक्तव्य, भाष्य, कृत्य करणाऱ्याला, दिशाभूल, फसवणूक करणाऱ्याला व अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्याला बळ, पाठींबा देत आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाचे हे वर्तन संविधान विरोधी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केले आहे. महा. अंनिसने मागण्यांचे निवेदन पुन्हा गुरुवारी पोलीस प्रशासनाला दिले आहे. पुणे शहर अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आर राजा यांची भेट घेतली. यावेळी विशाल विमल, एकनाथ पाठक, प्रतीक पाटील उपस्थित होते.

अपरिचित व्यक्तीच्या भूतकाळात घडलेल्या गोष्टी अचूकपणे कागदावर लिहून दाखवतो. लोकांच्या मनात काय सुरू आहे ते ओळखतो. असाध्य आजार बरे करतो. भूत प्रेते पळवून लावतो. लिंबूद्वारे समाधान प्राप्त करून देतो, आदी दावे धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या कार्यक्रमातून केले आहेत. तसेच संतांसंबंधी चुकीची बदनामीकारक वक्तव्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांनी महा. अंनिसच्या चमत्कार सिद्ध चाचणीला सामोरे जाण्याऐवजी पळवाट काढली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजकांमध्ये हाणामारी झाली. शहरात पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, आदी सर्व बाबी या तत्सम कायद्यांच्या नियमांचा भंग करणाऱ्या असून कारवाईसाठी पात्र आहे. त्यामुळे वरील बाबींसंदर्भात गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी, अशीही मागणी महा. अंनिसने केली आहे.

 

१) पुण्यात झालेल्या सदर कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे केली होती. ते व्हिडीओ शूटिंग उपलब्ध करून द्यावे. प्रचलित कायद्यांच्या विसंगत विधाने, भाष्य, वक्तव्ये, इशारे, कृत्य धिरेंद्र शास्त्री यांनी केल्याचे प्रसारमाध्यमातून समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ तपासून धिरेंद्र शास्त्री यांच्यावर जादूटोणाविरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक ॲक्ट आणि तत्सम कायद्यांनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी. २) संतांसंबंधी धिरेंद्र शास्त्री यांनी चुकीची, बदनामीकारक वक्तव्य केली आहे. त्यामुळे धिरेंद्र शास्त्री यांना समज देण्यात यावी आणि तत्सम कायद्यांच्या आधारे गुन्हे दाखल करून कारवाई करावी. ३) धिरेंद्र शास्त्री हे चमत्काराचे अशास्त्रीय, अवैज्ञानिक, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे करत आहेत. ते दावे त्यांनी सिद्ध करून दाखवावेत आणि आमचे 21 लाख रुपये बक्षीस मिळवावे, असे आव्हान आहे. राज्यात सोईच्या ठिकाणी, तज्ञ कमिटीसमोर, निवडक कार्यकर्त्यांसह ही दावे सिद्धता चाचणी होईल. ही चाचणी घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने सहकार्य करावे आणि धिरेंद्र शास्त्री यांना हजर करावे. ४) वर्दीवर असणारे पोलीस अधिकारी हे धिरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात जाऊन शास्त्रीपुढे नतमस्तक झाले. त्यांनी अशास्त्रीय पद्धतीने समस्यांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे दरबारात जाणे हे महाराष्ट्र सेवा अधिनियम व तत्सम कायद्यांचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. ५) धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भक्त आणि संयोजक यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. तसेच शहरात वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे यासंबंधी संबंधितांवर कारवाई व्हावी. ६) धिरेंद्र शास्त्री यांची विधाने, भाष्य, कृत्ये याला महा. अंनिसचा विरोध असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस प्रशासनाकडे कार्यक्रमपूर्व केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. पुण्यातील कार्यक्रमात देखील पुन्हा धिरेंद्र शास्त्री यांनी अशास्त्रीय, अवैज्ञानिक, घटनाविरोधी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, चुकीची माहिती देणारे वक्तव्य, भाष्य, कृत्य केली आहेत. धिरेंद्र शास्त्री यांची ही कार्यपद्धती थांबत नाही. त्यामुळे पुन्हा पुण्यात धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये. पुन्हा होणाऱ्या कार्यक्रमाला महा. अंनिसचा विरोध असणार आहे. ७) धीरेंद्र शास्त्री हे करत असलेले दावे अशास्त्रीय असल्याची उकल करून शास्त्रीय विचारधारा समाजात रुजवण्यासाठी शासन संस्थेने प्रसारमाध्यमे, शिक्षण संस्था आदींमार्फत प्रयत्न करावेत. ८) धीरेंद्र शास्त्री यांच्या दाव्यांविरोधी महा. अंनिस शास्त्रीय माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचे काम करत आहे, त्याला पाठबळ द्यावे.

भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला देव धर्म श्रद्धा उपासना स्वातंत्र्य दिले. त्याचा महा. अंनिस संघटना आदर करते. मात्र व्यक्तीची देव धर्म श्रद्धा उपासनेच्या आधारे फसवणूक, दिशाभूल, शोषण होत असेल, त्यातून सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता, कायदा सुव्यवस्थेला अडथळा येत असेल तर त्याविरोधी संघटना भूमिका, प्रबोधन, प्रतिकार, कृतिकार्यक्रम करत आली आहे. महा. अंनिसचे हे वर्तन घटनेशी सुसंगत असून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठीचे आहे. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या देव, धर्म, श्रद्धा, उपासना आणि भावना, अगतिकता, अज्ञान यांचा गैरफायदा घेऊन लोकांना देव धर्म श्रद्धा उपासनेशी निगडित विसंगत, अशास्त्रीय, अवैज्ञानिक बाबी सांगत आहेत. लोकांना ते सांगून प्रभावित करत असून अशास्त्रीय मार्गाने जगण्यास प्रवृत्त करत आहेत. हे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने विसंगत आहे. भारतीय राज्य घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे सांगितले आहे. मात्र धीरेंद्र शास्त्री हे अशास्त्रीय, अवैज्ञानिक दावे करून लोकांना प्रभावित करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करत आहोत.

Bageshwar Dham Sarkar News | अगर कोई आपत्ति है तो दरबार में आमने-सामने करेंगे | बागेश्वर धाम सरकार की ‘अनीस’ को जवाबी चुनौती

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Bageshwar Dham Sarkar News | अगर कोई आपत्ति है तो दरबार में आमने-सामने करेंगे | बागेश्वर धाम सरकार की ‘अनीस’ को जवाबी चुनौती

Bageshwar Dham Sarkar News | पुणे: हमारा द्वारपाल हिंदू एकता और भारतीय संस्कृति के संरक्षण और प्रचार के लिए है।  धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ ​​बागेश्वर धाम सरकार ने महाराष्ट्र अंधश्रद्धा उन्मूलन समिति (MANS) को जवाबी चुनौती दी कि क्या इस पर कोई आपत्ति है.  उन्होंने अपने राजनीतिक समर्थकों को भी सलाह दी कि वे चुनाव तभी जीतेंगे जब वे जनता को अपने पिता के समान मानेंगे।(Bageshwar Dham Sarkar)
 भारतीय जनता पार्टी के पूर्व विधायक जगदीश मुलिक ने संगमवाड़ी में बागेश्वर बाबा का तीन दिवसीय संतसंग दरबार का आयोजन किया है।  कार्यक्रम से पहले बाबा ने पत्रकारों से बातचीत की.  अनीस समेत कई राजनीतिक दलों और संगठनों ने बाबा के इस दरबार का विरोध किया है.  एनिस ने आक्रामक तरीके से मांग की कि बाबा संविधान के खिलाफ बोलते हैं, संतों की आलोचना करते हैं, अवैज्ञानिक सबूत देकर अंधविश्वास को बढ़ावा देते हैं, उनके खिलाफ मामला दर्ज किया जाए।  इस बारे में बात करते हुए बागेश्वर बाबा ने कहा कि दरबार हर किसी को हिंदू संस्कृति के बारे में जानने के लिए है.  मैं अस्पतालों के ख़िलाफ़ नहीं हूं, लेकिन मुझे नहीं लगता कि मंत्र विज्ञान और मंत्र चिकित्सा की वकालत करने में कुछ भी गलत है।  बाबा ने यह भी दावा किया कि मुझ पर भगवान की कृपा है.
 बागेश्वर बाबा ने कहा कि अगर तुम्हें आपत्ति है तो कोर्ट में आओ, आमने-सामने करके सुनाएंगे, लेकिन उस वक्त बहाना मत बनाना.  संविधान में अब तक इतने संशोधन हो चुके हैं तो एक संशोधन हिंदू राष्ट्र के लिए भी कर दीजिए.  हिंदू राष्ट्र बन जाने से अल्पसंख्यकों को कहीं जाने की जरूरत नहीं है.  हिंदू राष्ट्र में सामाजिक समरसता, समानता और धर्म के अंतर्गत कर्म का महत्व होगा।  लेकिन अगर किसी के दिल में झूठ है, तो उसके लिए हिंदू राष्ट्र में कोई जगह नहीं है,’ बागेश्वर बाबा ने कहा।

 संत तुकाराम का सम्मान

 संत तुकाराम मुझे भगवान जैसा लगता है।  एक लेख पर बोलते समय मैंने उनके सन्दर्भ में बुन्देलखण्डी भाषा के शब्दों का गलत प्रयोग किया।  मैं उसके लिए माफी माँगता हूँ।  अगर पुणे दौरे में समय मिला तो हम देहू जाकर संत तुकाराम महाराज की समाधि के दर्शन करेंगे
– धीरेंद्र शास्त्री उर्फ ​​बागेश्वर धाम सरकार

If any objections, we will do it face to face in Darbar | Bageshwar Dham sarkars counter-challenge to ‘Anis'(MANS)

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

If any objections, we will do it face to face in Darbar | Bageshwar Dham sarkars counter-challenge to ‘Anis'(MANS)

 Pune: Our gatekeeper is for preserving and promoting Hindu unity and Indian culture.  Dhirendra Shastri alias Bageshwar Dham Sarkar gave a counter challenge to the Maharashtra Superstition Eradication Committee if there are any objections to it.  He also advised his political supporters that they will win the elections only if they treat the people as their father.
 Former Bharatiya Janata Party MLA Jagdish Mulik has organized a 3-day Santsang Durbar of Bageshwar Baba at Sangamwadi.  Baba interacted with journalists before the program.  Anis (MANS) and many political parties and organizations have opposed this court of Baba.  MANS  aggressively demanded that Baba speaks against the constitution, criticizes saints, fuels superstitions by giving unscientific proofs, to file a case against him.  Talking about it, Bageshwar Baba said that the Durbar is there for everyone to know about Hindu culture.  I am not against hospitals, but I don’t think there is anything wrong in advocating mantra science and mantra therapy.  Baba also claimed that I have the grace of God.
 Bageshwar Baba said that if you have objections, then come to the Darbar, let’s do it face to face, but don’t make excuses at that time.  So many amendments have been made in the constitution so far, then make one amendment for Hindu Rashtra.  Minorities don’t need to go anywhere as Hindu Rashtra has become.  Social harmony, equality and karma under religion will be important in Hindu Rashtra.  But if one has a lie in his heart, he has no place in Hindu Rashtra,’ said Bageshwar Baba.
 Respect for Saint Tukaram
 Sant Tukaram I feel like God.  While speaking on an article, I made a wrong use of words in reference to him from Bundelkhandi language.  I apologize for that.  If we have time in our Pune tour, we will go to Dehu and see the Samadhi of Sant Tukaram Maharaj
– Dhirendra Shastri aka Bageshwar Dham Sarkar