Pune New Corporation | हडपसर-वाघोली नवी महापालिका करण्याच्या मागणीला जोर!

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

Pune New Corporation | हडपसर-वाघोली नवी महापालिका करण्याच्या मागणीला जोर!

| काँग्रेस कडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी

                                                                                  Pune New Corporation |  पुणे महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation) विभाजन करून हडपसर वाघोली नवी महापालिका (Pune New Corporation) करण्याबाबत पुणे काँग्रेस (Pune Congress) कडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे ऋषिकेश बालगुडे  यांनी ही मागणी केली आहे. (Pune New Corporation)
काँग्रेस च्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका (PMC Pune) 1997 साली 143 स्क्वेअर किलोमीटर होती. सण 1997 साली त्यात 23 गावांचा (Pune Merged Villages) समावेश झाला 2002 साली त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. तथापि आजही या गावांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास झालेला नाही. येथील पाणी, कचरा व बेकायदा इमारतींचा प्रश्न तसाच आहे. सन 2015 आम्ही पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून आजूबाजूची गावे सामाविष्ट करून क दर्जाची महापालिका करा. अशी मागणी पुणे मनपा ठरावाद्वारे सरकारकडे केली होती. त्यावेळेस पुण्याच्या बाजूची गावे पुणे मनपा मध्ये सामाविष्ट करण्याचा विचार सरकार दरबारी चालू होता. सदर गावे सामाविष्ट करायची असतील तर महापालिकेस विकासासाठी २५००० हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. तो खर्च सरकारने करावा असे आम्ही मागणी केली होती. (Pune Municipal Corporation)
 2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. त्यावेळेस आम्ही उपोषण करून त्यास विरोध केला होता. त्याचे कारण गावे समाविष्ट झाली तर प्रशासकीय व्यवस्था, तेथील मूलभूत प्रश्न, आर्थिक तरतूद व मनुष्यबळ या सर्व बाबी अनेक वर्ष प्रलंबित राहतात. सन 2021 मध्ये आणखी 23 गावे पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. पुणे महानगरपालिकेची आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका जवळजवळ ४८०  स्क्वेअर किलोमीटर एवढी हद्द झाली. परंतु मनपाच्या उत्पन्नात  वाढ त्या प्रमाणात होत नाही. सर्वच बाबींना मनुष्यबळ अपुरे पडते. या सर्वबाबींचा पुणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. (PMC Pune Marathi News)
गावातून महापालिकेत यायला नागरिकांना अथवा वार्डऑफिस मध्ये तक्रार देण्यासाठी साधारणता दीड ते दोन तास प्रवास करावा लागतो. तसेच मूळच्या पुणे शहरात याचा प्रचंड ताण आलेला आहे पुणे शहर हे बकाल होत चालले आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुद्धा ओलमडली आहे. सामान्य नागरिक या सर्व बाबींमुळे त्रासून गेला आहे.
              मुंबई महापालिकेच्या गेल्या 30 ते 35 वर्षात सहा नव्या महापालिका झाल्यात उदाहरणार्थ नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवली, वसई विरार, पनवेल या पद्धतीने पुणे महानगरपालिकेतून आजूबाजूच्या परिसरात नवी महापालिका होणे आवश्यक आहे. काही राजकीय व्यक्तींना स्वतःची सत्ता पुणे मनपात येण्यासाठी नव्या महापालिकेची आवश्यकता असून विचार केला नाही.
महापालिकेचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकाच्या सोयी सुविधा पुरविणे आहे. परंतु त्याच उद्दिष्ट पूर्ण होत नाही. खराब रस्ते, ११०  टक्के घरपट्टी वाढ, सार्वजनिक वाहतुकीचा बोजबारा, अपुरा पाणीपुरवठा, दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी, अपूर्व मनुष्यबळ कचरा, पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न अशा अनेक समस्यांबाबत पुणेकर नागरिक हैराण  झाले आहेत येथील डोंगर फोड व त्यावरील बेकायदे बांधकाम त्याला असलेला राजकीय पाठिंबा व त्यामुळे पावसाळ्यात ओढ्या नाल्यांना येणारे पूर हा नवीन प्रकार गेल्या काही वर्षात पुणेकरांना पाहायला मिळते. या सर्व जाचातून पुणेकर नागरिकांची सुटका करावी व शहराच्या लगत गावाची  नवी महापालिका करावी. अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. (Pune News)
——-
News Title | Pune New Corporation |  The demand for a new municipal corporation in Hadapsar-Wagholi is emphasized! |  Demand from Congress to Chief Minister